Wednesday, 23 September 2020

बुद्ध पूजा

 

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
  
                   *_मेण्डकारंभ कथा_*
                       *_बुद्ध पुजा_*
     
    *_मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनांना अंजलीबद्ध प्रणाम केला व म्हणाला -_*

        *_"भंते, निरनिराळ्या मतांच्या लोकांचे म्हणणे आहे की, भगवान बुद्धांच्या मानसन्मानार्थ केलेली पूजा जर भगवान बुद्ध स्वीकारतात. तर त्यांना निर्वाणपदाचा लाभ झाला असे म्हणता येणार नाही आणि ते या संसारात कोठे निश्चितच भटकत असतील. त्यांचे सद्यस्थितीत संसारातील अस्तित्व मुळीच नाकारता येणार नाही. हे जर खरे असेल तर भगवान बुद्ध अगदीच साधारण व्यक्ती झालेत, मग त्यांची पूजा करण्यात अर्थ तो काय?"_*
       *_"आणि समजा, त्यांना जर निर्वाणपद लाभले असेल, संसाराशी आता त्यांचा मुळी संबंधच राहिलेला नसेल आणि ते समस्त स्थितीतून मुक्त झाले असतील, तर त्यांची पूजा करण्यात काय स्वारस्य? कारण ते जर आहेतच नाहीत, तर पूजा करावी कोणाची? त्याचप्रमाणे भगवान बुद्धाला निर्वाणपद मिळाले असे म्हटले तरी प्रश्न सुटत नाही व निर्वाणपद नाही मिळाले म्हटले तरी प्रश्न सुटत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी विवादात सापडलेल्या भगवान बुद्धाची पूजा करण्यात काहीच अर्थ उरत नाही."_*
    *_"हा प्रश्न सामान्य बुद्धी असलेल्या माणसाच्या शक्तींच्या पलीकडला आहे. सामान्य लोकांसाठी हा विषय नाही. महान लोकच हा प्रश्न सोडवू शकतात. आता आपणच कृपाकरुन या प्रश्नाचे सडेतोड उत्तर देऊन मिथ्या तर्काचे खंडन करावे. या प्रश्नामुळे उत्पन्न होणाऱ्या स्थितीचा विरोधकांना फायदा घेता येणार नाही, तेव्हा भावी बौद्धांच्या सोयीसाठी या कोड्याची सोडवणूक करून प्रकाश पाडावे, जेणेकरून ते दुसऱ्या मताच्या लोकांच्या कुतर्कास झणझणीत उत्तर देऊ शकतील."_*

         यावर स्थविर म्हणाले, *_"महाराज, भगवान बुद्धांना महापरिनिर्वाणाचा लाभ झाला हे सूर्यप्रकाशा इतकेच खरे आहे. ते आता कोणत्याही पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाहीत. बोधिवृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती करुन ते या प्रश्नाच्या पलीकडे गेले होते. तेव्हा आत्ता संसारातून पूर्णतः मुक्त होऊन निर्वाण प्राप्त केल्यानंतर प्रश्न उरतोच कुठे"_*
         *_"महाराज, धर्म सेनापती सारिपुत्रांनी सुद्धा म्हंटले आहे की, ज्यांची बरोबरी करू शकणारा आजपर्यंत कोणी झाला नाही. ते भगवान बुद्ध देवता व मनुष्य या उभयतांनी केलेल्या पूजेचा स्वीकारही करीत नाही की, अस्वीकारही करीत नाहीत. युगानुयुगापासून सर्व बुद्धांचा हा सिद्धांन्त चालत आला आहे."_*

_राजा म्हणाला,_ *_"भंते, पुत्र आपल्या पित्याची किंवा आपल्या पुत्राची स्तुती करीत असेल तर त्याला पुरावा म्हणता येणार नाही. त्या तर आपापल्या मनातील भावना आहेत. परंतु खोट्या सिद्धांताचा पाठराखणी करणाऱ्या लोकांचा भ्रम दूर करण्याकरिता आणि आपल्या सद्धर्माचा प्रकाश पसरविण्याकरिता आपण योग्य तऱ्हेने समजावून सांगावे."_*

       _स्थविर म्हणाले,_ *_"महाराज, भगवान बुद्ध तर पुर्णतः मुक्त झाले आहेत. तेव्हा ते आता कोणाच्या पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार कसे करतील? परंतु देवता आणि मनुष्य लोक त्यांची विहारे व स्तूप बांधून त्यात त्यांच्या अस्थी, कोश, दात इत्यादी शरीर धातूंची स्थापना करून ठेवतात, ज्यांच्या पुण्य फळाने अर्हतपद किंवा बोधिसत्व पद प्राप्त करता यावे. याशिवाय त्या धातूची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान रत्नानुसार आचरण करून तिन्ही समापत्तीचा लाभ करून घेतात. यासाठीच विहारादी उभारणे किंवा पूजा करणे आवश्यक आहे."_*

                              
               *(१) अग्नीची उपमा*
     
    _"महाराज, समजा एखाद्याने फार मोठा अग्नी पेटवून नंतर तो विझवून टाकला, तर तो निर्जीव अग्नी पुनः त्यात टाकलेल्या गवताच्या लाकडाचा किंवा अशाच दुसऱ्या प्रकारच्या इंधनाचा स्वीकार करील काय?_

       _"नाही भंते, जवळ असलेला अग्नीच जर स्वतः होऊन इंधनाचा स्वीकार करीत नाही तर तो एकदम विझून शांत झालेला अग्नी कसा काय लाकडादि इंधनाचा स्वीकार करील?"_
                 
      _"महाराज, तर काय मोठा अग्नी विझून शांत झाल्यानंतर जगातील सर्वच अग्नी नष्ट झाला काय?"_

        _"मुळीच नाही भंते, अग्नी तर वाळलेल्या लाकडातून उत्पन्न होतो. ज्या कोणाला अग्नीची आवश्यकता असेल तो आपल्या सामर्थ्याने अरणीचे (दोन लाकडाचे) घर्षण करून अग्नी उत्पन्न करू शकेल आणि त्यापासून आपले कार्येही त्याला करता येईल."_

*_महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल जे आक्षेप ते सर्व खोटे ठरतात. की "पूजेचा स्वीकार न करणारांची पूजा करणे व्यर्थ आहे."_*

           *_महाराज, जसा तो मोठा अग्नी पेटविण्यात आला तसेच भगवान बुद्ध सुद्धा आपल्या ज्ञान तेजाने या समस्त दहा हजार लोक विश्वात विशाल अग्निपूजासारखे प्रकाशमान झालेत आणि जसा तो अग्नी विझून शांत झाला, तसेच भगवंताने निर्वाणपदाची प्राप्ती करून त्यांनी संसारातून एकदम आपली आवागमनापासून सुटका करून घेतली. ज्याप्रमाणे पूर्णपणे पेटविलेला अग्नी विझून थंड झाल्यानंतर तो कोणत्याही लाकडादी इंधनास जाळू शकत नाही तसेच संसारावर महान उपकार करणारे भगवान बुद्ध स्वीकार व अस्वीकार या प्रश्नापासून अगदी मुक्त झालेत आणि ज्याप्रमाणे अग्नी विझून गेल्यानंतर सुद्धा अग्नीची आवश्यकता भासल्यास कोणी अरणीचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करू शकतो तद्वतच देवता आणि मनुष्य भगवंताच्या अष्टधातूंची पूजा करून किंवा विहार, स्तुपादी उभारून आणि तथागतांनी सांगितलेल्या सद्धर्मानुसार आचरण करून ते बुद्ध तेज निर्माण करू शकतात आणि तिन्ही सभापतींचा लाभ करून घेऊ शकतात."_*

       *_"महाराज, यामुळेच भगवान बुद्धाने जर महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी ठरते आणि ध्येय साध्य करून देणारी ठरते."_*

                      
            *(२) वादळाची उपमा*
     
    _"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_

      _"महाराज, समजा, एकदा खूप मोठे वादळ आले आणि हळूहळू ते शांत झाले. तर ते एकदा शांत पावल्यानंतर पुनः फिरून येईल काय?"_
      _"नाही भंते, शांत पावलेले वादळ पुनः कसे काय फिरून येऊ शकेल?"_
        _"असे का होऊ नये?"_
        _"कारण की, वादळ म्हणजे अगदीच अचेतन वस्तू आहे. त्याला इच्छा ती कशी नसतेच."_
       _"महाराज, ते शांत पावल्यानंतरही त्यास वादळ नावानेच ओळखले जाते काय?"_
       _"नाही भंते, परंतु पंखा हेही एक वारा निर्माण करण्याचे साधन आहे. ज्या कोणाला उकाडा जाणवत असेल किंवा ताप आल्यामुळे वाऱ्याची गरज भासत असेल तर पंख्याच्या साहाय्याने वारा निर्माण करता येतो. काही प्रमाणात का होईना पण त्या वाऱ्यापासून उकाडा किंवा ताप या अवस्थेत आराम मिळविता येते."_

         _*"महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखणी करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप खोटा ठरतो की, 'पूजेचा स्वीकार न करणारांची पूजा व्यर्थ आहे."*_

         *_"महाराज, जसे वादळ आले, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा आपल्या शीतल, मधुर, शांत, सुखदायक आणि मैत्रिरूपी वायू लहरींनी या दहा हजार लोक धातूंवर वहात राहिले. ज्याप्रमाणे ते वादळ येऊन शांत झाले तद्वतच भगवान बुद्धाने निर्वाणाचा लाभ करून संसारातून मुक्ती प्राप्त करून घेतली. जसे शांत झालेले वादळ पुनः परत येण्याची इच्छा करीत नाही, तसेच या जगतावर महान उपकार करणारे तथागत स्वीकार किंवा अस्वीकाराच्या कामनेतून पुर्णतः मुक्त झाले. जसे ते मनुष्य गर्मीमुळे किंवा तापामुळे तळमळत होते, तसेच देवता आणि मनुष्य लोक लालसा, दुष्टपणा व भ्रमरूपी तापाने तळमळत आहेत. ज्याप्रमाणे पंखा हा वायू उत्पन्न करण्याचे साधन आहे तद्वतच भगवान बुद्धाचे शरीर-धातू-रत्न हे तिन्ही समापती आणण्याकरिता साधन आहेत. ज्याप्रमाणे गर्मी व तापाने तळमळणारे लोक पंखा हलवून वारा उत्पन्न करतात आणि ताप दूर करतात त्याचप्रमाणे देवता आणि मनुष्य लोक शरीर धातूंची पूजा करून व भगवान बुद्धाने सांगितलेल्या ज्ञान रत्न-मार्गाचे आचरण करून पुण्य लाभ करतात आणि लालसा, दुष्टपणा व भ्रमरूपी अग्नीच्या तापास दूर करतात._*

        *_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा ही तत्काळ फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी ठरते."_*

                  
                 *(३) ढोलाची उपमा*
     
    _"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_

         _"महाराज, कोणी एका मनुष्याने ढोलावर थाप मारली असता आवाज निघून नंतर बंद झाला, तर काय तो बंद झालेला आवाज पुन्हा फिरून येण्याची इच्छा करील काय?"_

            _"नाही भंते, शिवाय आवाजास विचार नाही की, कल्पना नाहीत. एकदा आवाज निर्माण होऊन बंद पडला म्हणजे पुनः निर्माण होण्याची त्याला इच्छा ती कशी व्हावी? ढोलाचा आवाज निर्माण होऊन बंद पडला की, तो कायमचाच बंद होतो. परंतु आवाज काढण्याकरिता ढोल हे एक साधन आहे. तेव्हा जर तसा प्रसंग आलाच तर कोणीही मनुष्य ढोलावर थाप मारून आवाज उत्पन्न करू शकतो."_

             *_"महाराज, याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्ध शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती, विमुक्तीज्ञान आणि दर्शनाने परिभावीत शरीर धातुरुपी रत्ने, धर्म आणि विनय इत्यादी देऊन स्वतः निर्वाण लाभ करून संसारातून स्वतःची सुटका करून घेतली परंतु भगवान जरी मुक्त झाले असले तर तिन्ही समापत्तींचा लाभ काही थांबत नाही. सांसारिक दुःखाने त्रस्त झाल्यामुळे जे कोणी या तिन्ही समापत्तीचा लाभ करू इच्छितात, ते भगवान बुद्धांच्या विहारांची निर्मिती करून त्यात त्यांच्या शरीर धातूंची स्थापना करतात आणि श्रद्धाभावे त्या धातूंची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान मार्गाचे आचरण करून ते तिन्ही समापत्तींचा लाभ करून घेऊ शकतात."_*
        *_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वानाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी आहे."_*

         *_"महाराज, भगवंताने भविष्यात घडून येणारा हा प्रसंग तेव्हाच आपल्या दूरदृष्टीने जाणून घेतला होता. म्हणूनच त्यांनी समजावून सांगितले होते की -_*

            *_आनंद, तुमच्यापैकी कोणाच्या तरी मनात असे विचार येऊ शकतात की, आम्हाला मार्गदर्शन करणारे शास्ता तर निघून गेले. आता आम्हाला सद्धर्माची वाट दाखविणारा गुरू कोणी उरला नाही. परंतु तुम्ही असे समजून घेऊ नये. आनंद, असे पश्चाताप करण्यासारखे काहीही कारण नाही. मी ज्या सद्धर्माचा आजपर्यंत उपदेश केला. संघासाठी पालन करावयाचे जे नियम सांगितले. माझ्यानंतर तेच तुम्हाला मार्ग दाखवतील म्हणून त्यांनाच तुम्ही माझ्यास्थानी मानले पाहिजे."_*

        *_याही कारणाने जरी आता भगवान बुद्ध राहिले नाही व त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा निरर्थक होऊ शकत नाही. इतर पंथांच्या लोकांनी घेतलेले आक्षेप अगदी खोटे, अन्यायी, वस्तुस्थितीस सोडून आणि केवळ विरोधाभास निर्माण करणारे आहेत, हे आता सिद्ध झाले. हे दुःखाचे कारण आहे, कारण दुःख हे खोटेपणाचे फळ आहे व अध:पाताच्या मार्गाने नेणारे आहे."_*


               
                    *(४) पृथ्वीची उपमा*
     
    _"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_
          _"महाराज, पृथ्वीला अशी इच्छा असते का की आपणात सर्वच प्रकारचे बीज पेरले जावे?"_
       _"नाही भंते, ती अशी इच्छा कशी करील?"_
      _"मग पृथ्वीची इच्छा किंवा मान्यता नसताही बीज फुटून रोपटे वाढून मोठमोठ्या खोडांचे, विस्तीर्ण शाखांचे वृक्ष होऊन जमिनीत आपली मुळे रुतवून ताठ उभे राहतात, फुलतात, ते पृथ्वीच्याच आधाराने हे कसे घडते? त्यात बीज का पेरले जाते?"_
        _"भंते, पृथ्वीकडून जरी मान्यता मिळाली नाही, हे खरे असले, तरी पण बीज फुटून रोपटे तयार होण्यासाठी व त्याच्या विकासासाठी पृथ्वीच आश्रय देते. पृथ्वीतच पेरलेले बीज उगवून ते विकसित होऊन शेवटी खोड तयार झाल्यानंतर फुले, फळे व विस्तीर्ण असा शाखासंभार धारण करणारे मोठे वृक्ष होतात."_

         *_"महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मताच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप म्हणजे स्वीकार न करण्याप्रति केल्या जाणाऱ्या व्यवहारात कांहीच अर्थ नाही. हा एकदम अशिष्ट, निरर्थक आणि खोटा ठरतो."_*
     
       *_"महाराज, भगवान अर्हत सम्यक सम्बुद्धांना या महान पृथ्वी समान समजले पाहिजे. या महान पृथ्वीप्रमाणे ते कशाचाही स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आश्रयाने बीज उगवून त्यांचेच मोठमोठे वृक्ष होतात, त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या शरीर धातूंच्या सुरक्षिततेसाठी विहार व स्तुपांची उभारणी करून त्या अवशेषांची पूजा व भगवंताच्या आदेशाचे पालन इत्यादींचा आश्रय घेऊन देवता आणि मनुष्यलोक पुण्य फळरूपी मुळांनी मजबूत पकडून समाधी-स्कंध, धर्म-सार आणि शीला (सदाचार) चा शाखा संभार केलेलं मोठमोठे वृक्ष तयार होतात आणि त्या वृक्षांना श्रामण्यरूपी फुले व विमुक्तीरूपी फळे येतात."_*

      *_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले, तरी त्यांच्याप्रती केली जाणारी पूजा ही अचूक फळ देणारी ध्येयसिद्धीस कारण होणारी आहे."_*


              
            *(५) पोटातील कृमींची उपमा*
     
    _"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_
          
        _"उंट, बैल, गाढवे, बकरे तसेच इतर जनावरे आणि मनुष्यप्राणी आपल्या उदरात कृमींनी उत्पन्न व्हावे म्हणून सम्मती देतात काय?"_

         _"नाही भंते, तशी सम्मती ते कशी काय देणार?"_

            *_"तर मग महाराज, हे कृमी त्यांची मान्यता न घेताच त्यांच्या उदरात जन्मास येतात आणि असे ठाण मांडून बसतात की, जणू त्यांचीच हक्काची भूमी आहे. तेवढ्या वरच ते थांबत नाही तर संतती देखील इतकी जन्मास घालतात की, विचारच करीत रहावे लागते."_*

         _"भंते, असे त्या प्राण्यांच्या वाईट कर्माने घडते."_

         *_"महाराज, अगदी याच उदाहरणाप्रमाणे जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले आणि संसारातून एकदम आपली सुटका करून घेतली तरी पण त्यांच्याप्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येयसिद्धीस कारण होणारी ठरते."_*

               

*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
              
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


Thursday, 17 September 2020

भगवान बुद्ध समाधी का लावतात?

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
        *_भगवान बुद्ध समाधी का लावतात?_*
           *"_भगवान बुद्धाने बोधिवृक्षाखालीच सर्वे कार्ये समाप्त केले होते आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर देखील ते तीन महिनेपर्यंत समाधी लावून बसले होते, ह्या दोन्ही बाबी खऱ्या आहेत. समाधी अंतर्गत पुष्कळ काही चांगले गुणधर्म आहेत. सर्व बुद्धांनी समाधीच्या योगायोगानेच बुद्धत्वाचाच लाभ करून घेतला आहे. म्हणूनच ते बुद्धत्व लाभ घेतल्यानंतर सुद्धा समाधीच्या चांगल्या गुणांचे सदैव स्मरण करताना पुन्हा पुन्हा समाधीचा ते उपयोग करतात._"*
            _"समजा कोणी एका माणसाने राजाची सेवा केली. त्यामुळे खुष होऊन राजाने त्यास फार मोठे इनाम दिले. आपल्या कर्तुत्वनिष्टेमुळे लाभलेल्या बक्षिसाचे स्मरण करून तो अधिकच सेवेमध्ये तत्पर झाला, अथवा कोणी दीर्घ आजारी पुरुष आपल्या आजाराची योग्य प्रकारे सुश्रुषा व्हावी म्हणून कोणी एका वैद्यास चांगली रक्कम देण्याचे कबूल करून त्याची सेवासुद्धा निष्ठार्वक करतो. तसा त्याला गुणही चांगलाच घडून येतो व अल्पावधीतच तो चांगला निरोगी होतो; परंतु निरोगी झाल्यावर देखील त्या वैद्याच्या उपकारांचे स्मरण करून तो आणखीही सेवा करतो. याप्रमाणेच, *सर्व बुद्धांनी समाधीच्या योगानेच बुद्धत्वाचा लाभ करून घेतला आहे.* त्या त्या समाधीच्या गुणांचे स्मरण करून बुद्धत्व लाभ केल्यानंतर देखील ते त्या समाधीची सेवा करतात."_
       *समाधीचे २८ असं चांगले गुण आहेत. ते पाहूनच सर्व बुद्ध अव्याहत त्या समाधीची सेवा करतात.* ते अठ्ठावीस गुण असे -
*१)* समाधी जीवनाचे रक्षण करते
*२)* दीर्घायुष्य प्राप्त होते
*३)* दिव्य बळ लाभते
*४)* दोषमुक्त होतो
*५)* अपयश धुऊन निघतात
*६)* यशाची वृद्धी होते
*७)* असंतुष्टपणाचा नाश होतो
*८)* पूर्णतः संतोष लाभ होतो
*९)* भीती नाश पावते
*१०)*  निर्भयतेचा लाभ होते
*११)* आळस नष्ट होतो
*१२)* उत्साहात भर पडते
*१३ - १५)* लालसा, द्वेष आणि मलूलपणाचा नाश होतो
*१६)* मिथ्या गर्वहरण होतो
*१७)* समस्त शंकांपासून निवारण होते
*१८)* चित्त एकाग्र होते
*१९)* सदैव मन प्रसन्न राहते
*२०)* मन एकदम पवित्र व निर्मळ बनते
*२१)* गांभीर्य प्राप्त होते
*२२)* मोठा लाभ होतो
*२३)* अपूर्व नम्रतेचा लाभ होतो
*२४)* प्रीती उत्पन्न होते
*२५)* प्रमोद प्राप्त होतो
*२६)* समस्त संस्कार खिळखिळे करण्याचे ज्ञान होते
*२७)* पुनर्जन्माचा शेवट होतो
*२८)* श्रमण जीवनाचे यथार्थ फळ प्राप्त होते
                _ह्याच समाधीच्या अठ्ठावीस गुणांस अनुलक्षून सर्व बुद्ध तिची सेवा करतात. चित्त एकाग्र होताच जी प्रीती उत्पन्न होते, तिचा आनंद आगळा असतो, म्हणून तृष्णा नाश करून सर्वच बुद्ध समाधीत मग्न राहतात._
     *_सर्वच बुद्ध समाधीत मग्न होतात याची चार कारणे अशी आहेत-_*
*१)* आपदरहीत सुखमय जीवन
*२)* सर्वश्रेष्ठ गुणांचा वास
*३)* उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग
*४)* सर्वच बुद्धांनी मुक्त कंठाने केलेली समाधीची प्रशंसा
        _याच कारणाने *तथागत नेहमी समाधी भावनेत मग्न होत असत.* तथागत बुद्धांस काही करावयाचे शिल्लक राहिले होते म्हणून नव्हे, तर समाधीचे अमाप गुणधर्म पाहूनच ते समाधीचे चिंतन करीत असत._

*संदर्भ :* 
*मिलिंद प्रश्न, खंड ४,* 
*मेण्डक प्रश्न (क) महावर्ग*

*संकलन :* *महेश कांबळे*

Friday, 11 September 2020

श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                  *_सात प्रकारचे चित्त_*

         

          *_मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे -_*

*१)* सक्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे

*२)* श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त

*३)* सकृदागामी व्यक्तीचे चित्त

*४)* अनागामी व्यक्तीचे चित्त

*५)* अर्हत व्यक्तीचे चित्त

*६)* प्रत्येक बुद्धाचे चित्त

*७)* सम्यक संबुद्धाचे चित्त


*२) श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त*


                    *_"ज्यांनी श्रोतापन्नपदाचा लाभ करून घेतला आहे, जे कधी वाईट मार्गाने जात नाहीत, ज्यांनी सत्य ओळखले आहे आणि ज्यांना भगवान बुद्धांच्या धर्माची जाणीव झाली आहे अशा लोकांचे चित्त, आत्मभाव, कर्मकांड आणि शंका या तीन भ्रममूलक विषयापासून एकदम मुक्त, हलके व गतिमान होत असते. तथापि वरच्या (आर्य मार्ग) विषयात त्याला विचार शक्तीच्या कार्यात अडचणी येतात. कारण त्याबाबत ते जड, विकृत आणि मंदच असते."_*

           *_त्यांची कार्ये मंदगतीने चालतात कारण तीन विषयात चित्त एकदम परिपूर्ण झालेले असले तथापि बाकीच्या अवस्थांच्या बाबतीत चित्ताचे क्लेश (मळ) मात्र कायम असतात._*

    _उदा. ज्याप्रमाणे वेळवांच्या रांजीतील वेळू कापून काढताना तीन पेरांपर्यंत शाखा तोडून साफ केल्यामुळे आणि बाकी वरच्या शाखा तशाच त्या रांजीत गुंतलेल्या अवस्थेत तोडून दिल्यामुळे वेळू ओढताना तीन पेरांपर्यंत पकडावयास किंवा ओढावयास कठीण जाणार नाही. परंतु बाकी वरचा भाग ओढून अशक्य व कठीणच होते. कारण खालचा भाग कापून साफ केला असला तरी वरचा भाग तसाच सोडून दिला आहे._


             *_"याप्रमाणे ज्यांनी श्रोतापन्नपदाचा लाभ करून घेतला आहे..... अशा लोकांचे चित्त, आत्मभाव, कर्मकांड आणि शंका या तीन भ्रममूलक विषयापासून एकदम मुक्त, हलके व गतिमान होत असते. तरीपण वरच्या विषयाबाबतीत त्याला विचारशक्तीच्या कार्यात अडचणी येतात. कारण त्याबाबत ते जड, विकृत आणि मंदच असते. ते का म्हणून? तर, ह्या तीन भ्रममूलक बाबी दूर झाल्या असल्या तरी बाकीचे क्लेश अवशिष्ट असल्यामुळे असे घडते. दुसऱ्या प्रकारचे चित्त हे असे आहे."_*


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

सात प्रकारचे चित्त - १) सक्लेश चित्त

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                  *_सात प्रकारचे चित्त_*

         

          *_मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे -_*

*१)* सक्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे

*२)* श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त

*३)* सकृदागामी व्यक्तीचे चित्त

*४)* अनागामी व्यक्तीचे चित्त

*५)* अर्हत व्यक्तीचे चित्त

*६)* प्रत्येक बुद्धाचे चित्त

*७)* सम्यक संबुद्धाचे चित्त


*१) सक्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे*

            *_"लालसेच्या आहारी गेलेले (रागयुक्त), दुष्ट (द्वेशी), मोहात बुडालेले, क्लेशांच्या भोवऱ्यात सांपडलेले, तसेच शरीररचनेची व्यवस्था न पाहणारे, सदाचाराच्या नियमात गाफील असलेले, चित्त (मन) कृत्याची व प्रज्ञेची जाणीव नसलेले अशा लोकांचे चित्त (मन) अतिशय जड, विकृत आणि मंद असते. कारण की, त्यांच्या चित्ताला शिक्षण मिळालेले नसते, म्हणजे त्यावर सुसंस्कार जडलेले नसतात."_*

       _उदा. समजा एखादा वेळू त्यांच्या रांजीतून काढावयाचा असल्यास तो कधीही सहजपणे काढता येणारे नाही. हे काम अत्यंत युक्ती, प्रयुक्ती व हळूहळू करावे लागते. कारण अवाढव्य वाढलेला वेळू आपल्या अनंत व विशाल शाखा संपूर्ण रांजीत पसरविल्यामुळे त्याची परस्परात चांगलीच गुंतागुंत झालेली असते. अशारितीने फसलेला वेळू कापून काढणे अत्यंत कठीण आहे."_

          _याच उदाहरणाप्रमाणे लालसेच्या आहारी गेलेले..... जे लोक असतात त्यांचे चित्त अतिशय जड, विकृत आणि मंद असते_



*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

सर्वज्ञ बुद्ध

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                   *_सर्वज्ञ बुद्ध_*

         

                 _"भंते नागसेन, भगवान बुद्ध सर्वज्ञ होते हे खरे आहे काय"?_

           *_"होय महाराज, भगवान बुद्ध सर्वज्ञ होते. परंतु याचा अर्थ समजून घेऊ नये की, सदासर्वकाळ, कोणत्याही अवस्थेत त्यांना संसारातील समस्त बाबींची जाणीव रहात असे. तथापि ते थोडे चिंतन (ध्यान) करून कोणत्याही गोष्टीला तत्काळ समजून घेत असे. यातच त्यांची सर्वज्ञता होती."_*

         _"भंते, भगवान बुद्धांना जर चिंतनाद्वारे शोध घेऊन त्यानंतरच कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होत असेल, तर त्यांना सर्वज्ञ म्हणता येणार नाही."_


       *_"महाराज, समजा आपल्या गोदामात असलेल्या तांदळांपैकी शंभर गाड्या, अर्धी चूक, सात अर्म्मन आणि दोन तुंबे तांदळाचे दाने किती? ते भगवान अगदी क्षणात चिंतन (ध्यान) करून सांगु शकत होते की, ते इतके इतके लाख करोड तांदळाचे दाणे आहेत. हे सर्वज्ञते शिवाय कोणी सांगू शकेल काय?"_*


         _"मुळीच नाही भंते!"_


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

मेण्डकारंभ कथा _ बुद्ध पुजा _ पोटातील कृमींची उपमा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                   *_मेण्डकारंभ कथा_*

                       *_बुद्ध पुजा_*

            *पोटातील कृमींची उपमा*

     

    _"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_

          

        _"उंट, बैल, गाढवे, बकरे तसेच इतर जनावरे आणि मनुष्यप्राणी आपल्या उदरात कृमींनी उत्पन्न व्हावे म्हणून सम्मती देतात काय?"_


         _"नाही भंते, तशी सम्मती ते कशी काय देणार?"_


            *_"तर मग महाराज, हे कृमी त्यांची मान्यता न घेताच त्यांच्या उदरात जन्मास येतात आणि असे ठाण मांडून बसतात की, जणू त्यांचीच हक्काची भूमी आहे. तेवढ्या वरच ते थांबत नाही तर संतती देखील इतकी जन्मास घालतात की, विचारच करीत रहावे लागते."_*


         _"भंते, असे त्या प्राण्यांच्या वाईट कर्माने घडते."_


         *_"महाराज, अगदी याच उदाहरणाप्रमाणे जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले आणि संसारातून एकदम आपली सुटका करून घेतली तरी पण त्यांच्याप्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येयसिद्धीस कारण होणारी ठरते."_*


                      *-क्रमशः*


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

मेण्डकारंभ कथा _ बुद्ध पुजा _ पृथ्वीची उपमा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                   *_मेण्डकारंभ कथा_*

                       *_बुद्ध पुजा_*

                    *पृथ्वीची उपमा*

     

    _"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_

          _"महाराज, पृथ्वीला अशी इच्छा असते का की आपणात सर्वच प्रकारचे बीज पेरले जावे?"_

       _"नाही भंते, ती अशी इच्छा कशी करील?"_

      _"मग पृथ्वीची इच्छा किंवा मान्यता नसताही बीज फुटून रोपटे वाढून मोठमोठ्या खोडांचे, विस्तीर्ण शाखांचे वृक्ष होऊन जमिनीत आपली मुळे रुतवून ताठ उभे राहतात, फुलतात, ते पृथ्वीच्याच आधाराने हे कसे घडते? त्यात बीज का पेरले जाते?"_

        _"भंते, पृथ्वीकडून जरी मान्यता मिळाली नाही, हे खरे असले, तरी पण बीज फुटून रोपटे तयार होण्यासाठी व त्याच्या विकासासाठी पृथ्वीच आश्रय देते. पृथ्वीतच पेरलेले बीज उगवून ते विकसित होऊन शेवटी खोड तयार झाल्यानंतर फुले, फळे व विस्तीर्ण असा शाखासंभार धारण करणारे मोठे वृक्ष होतात."_


         *_"महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मताच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप म्हणजे स्वीकार न करण्याप्रति केल्या जाणाऱ्या व्यवहारात कांहीच अर्थ नाही. हा एकदम अशिष्ट, निरर्थक आणि खोटा ठरतो."_*

     

       *_"महाराज, भगवान अर्हत सम्यक सम्बुद्धांना या महान पृथ्वी समान समजले पाहिजे. या महान पृथ्वीप्रमाणे ते कशाचाही स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आश्रयाने बीज उगवून त्यांचेच मोठमोठे वृक्ष होतात, त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या शरीर धातूंच्या सुरक्षिततेसाठी विहार व स्तुपांची उभारणी करून त्या अवशेषांची पूजा व भगवंताच्या आदेशाचे पालन इत्यादींचा आश्रय घेऊन देवता आणि मनुष्यलोक पुण्य फळरूपी मुळांनी मजबूत पकडून समाधी-स्कंध, धर्म-सार आणि शीला (सदाचार) चा शाखा संभार केलेलं मोठमोठे वृक्ष तयार होतात आणि त्या वृक्षांना श्रामण्यरूपी फुले व विमुक्तीरूपी फळे येतात."_*


      *_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले, तरी त्यांच्याप्रती केली जाणारी पूजा ही अचूक फळ देणारी ध्येयसिद्धीस कारण होणारी आहे."_*



                      *-क्रमशः*


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

मेण्डकारंभ कथा _ बुद्ध पुजा - ढोलाची उपमा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                   *_मेण्डकारंभ कथा_*

                       *_बुद्ध पुजा_*

                 *ढोलाची उपमा*

     

    _"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_


         _"महाराज, कोणी एका मनुष्याने ढोलावर थाप मारली असता आवाज निघून नंतर बंद झाला, तर काय तो बंद झालेला आवाज पुन्हा फिरून येण्याची इच्छा करील काय?"_


            _"नाही भंते, शिवाय आवाजास विचार नाही की, कल्पना नाहीत. एकदा आवाज निर्माण होऊन बंद पडला म्हणजे पुनः निर्माण होण्याची त्याला इच्छा ती कशी व्हावी? ढोलाचा आवाज निर्माण होऊन बंद पडला की, तो कायमचाच बंद होतो. परंतु आवाज काढण्याकरिता ढोल हे एक साधन आहे. तेव्हा जर तसा प्रसंग आलाच तर कोणीही मनुष्य ढोलावर थाप मारून आवाज उत्पन्न करू शकतो."_


             *_"महाराज, याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्ध शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती, विमुक्तीज्ञान आणि दर्शनाने परिभावीत शरीर धातुरुपी रत्ने, धर्म आणि विनय इत्यादी देऊन स्वतः निर्वाण लाभ करून संसारातून स्वतःची सुटका करून घेतली परंतु भगवान जरी मुक्त झाले असले तर तिन्ही समापत्तींचा लाभ काही थांबत नाही. सांसारिक दुःखाने त्रस्त झाल्यामुळे जे कोणी या तिन्ही समापत्तीचा लाभ करू इच्छितात, ते भगवान बुद्धांच्या विहारांची निर्मिती करून त्यात त्यांच्या शरीर धातूंची स्थापना करतात आणि श्रद्धाभावे त्या धातूंची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान मार्गाचे आचरण करून ते तिन्ही समापत्तींचा लाभ करून घेऊ शकतात."_*

        *_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वानाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी आहे."_*


         *_"महाराज, भगवंताने भविष्यात घडून येणारा हा प्रसंग तेव्हाच आपल्या दूरदृष्टीने जाणून घेतला होता. म्हणूनच त्यांनी समजावून सांगितले होते की -_*


            *_आनंद, तुमच्यापैकी कोणाच्या तरी मनात असे विचार येऊ शकतात की, आम्हाला मार्गदर्शन करणारे शास्ता तर निघून गेले. आता आम्हाला सद्धर्माची वाट दाखविणारा गुरू कोणी उरला नाही. परंतु तुम्ही असे समजून घेऊ नये. आनंद, असे पश्चाताप करण्यासारखे काहीही कारण नाही. मी ज्या सद्धर्माचा आजपर्यंत उपदेश केला. संघासाठी पालन करावयाचे जे नियम सांगितले. माझ्यानंतर तेच तुम्हाला मार्ग दाखवतील म्हणून त्यांनाच तुम्ही माझ्यास्थानी मानले पाहिजे."_*


        *_याही कारणाने जरी आता भगवान बुद्ध राहिले नाही व त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा निरर्थक होऊ शकत नाही. इतर पंथांच्या लोकांनी घेतलेले आक्षेप अगदी खोटे, अन्यायी, वस्तुस्थितीस सोडून आणि केवळ विरोधाभास निर्माण करणारे आहेत, हे आता सिद्ध झाले. हे दुःखाचे कारण आहे, कारण दुःख हे खोटेपणाचे फळ आहे व अध:पाताच्या मार्गाने नेणारे आहे."_*



                      *-क्रमशः*


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

मेण्डकारंभ कथा - बुद्ध पुजा _ वादळाची उपमा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                   *_मेण्डकारंभ कथा_*

                       *_बुद्ध पुजा_*

            *(१) वादळाची उपमा*

     

    _"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_


      _"महाराज, समजा, एकदा खूप मोठे वादळ आले आणि हळूहळू ते शांत झाले. तर ते एकदा शांत पावल्यानंतर पुनः फिरून येईल काय?"_

      _"नाही भंते, शांत पावलेले वादळ पुनः कसे काय फिरून येऊ शकेल?"_

        _"असे का होऊ नये?"_

        _"कारण की, वादळ म्हणजे अगदीच अचेतन वस्तू आहे. त्याला इच्छा ती कशी नसतेच."_

       _"महाराज, ते शांत पावल्यानंतरही त्यास वादळ नावानेच ओळखले जाते काय?"_

       _"नाही भंते, परंतु पंखा हेही एक वारा निर्माण करण्याचे साधन आहे. ज्या कोणाला उकाडा जाणवत असेल किंवा ताप आल्यामुळे वाऱ्याची गरज भासत असेल तर पंख्याच्या साहाय्याने वारा निर्माण करता येतो. काही प्रमाणात का होईना पण त्या वाऱ्यापासून उकाडा किंवा ताप या अवस्थेत आराम मिळविता येते."_


         _*"महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखणी करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप खोटा ठरतो की, 'पूजेचा स्वीकार न करणारांची पूजा व्यर्थ आहे."*_


         *_"महाराज, जसे वादळ आले, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा आपल्या शीतल, मधुर, शांत, सुखदायक आणि मैत्रिरूपी वायू लहरींनी या दहा हजार लोक धातूंवर वहात राहिले. ज्याप्रमाणे ते वादळ येऊन शांत झाले तद्वतच भगवान बुद्धाने निर्वाणाचा लाभ करून संसारातून मुक्ती प्राप्त करून घेतली. जसे शांत झालेले वादळ पुनः परत येण्याची इच्छा करीत नाही, तसेच या जगतावर महान उपकार करणारे तथागत स्वीकार किंवा अस्वीकाराच्या कामनेतून पुर्णतः मुक्त झाले. जसे ते मनुष्य गर्मीमुळे किंवा तापामुळे तळमळत होते, तसेच देवता आणि मनुष्य लोक लालसा, दुष्टपणा व भ्रमरूपी तापाने तळमळत आहेत. ज्याप्रमाणे पंखा हा वायू उत्पन्न करण्याचे साधन आहे तद्वतच भगवान बुद्धाचे शरीर-धातू-रत्न हे तिन्ही समापती आणण्याकरिता साधन आहेत. ज्याप्रमाणे गर्मी व तापाने तळमळणारे लोक पंखा हलवून वारा उत्पन्न करतात आणि ताप दूर करतात त्याचप्रमाणे देवता आणि मनुष्य लोक शरीर धातूंची पूजा करून व भगवान बुद्धाने सांगितलेल्या ज्ञान रत्न-मार्गाचे आचरण करून पुण्य लाभ करतात आणि लालसा, दुष्टपणा व भ्रमरूपी अग्नीच्या तापास दूर करतात._*


        *_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा ही तत्काळ फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी ठरते."_*


                      *-क्रमशः*


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

मेण्डकारंभ कथा _ बुद्ध पुजा _ अग्नीची उपमा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

            *_मेण्डकारंभ कथा_*

                       *_बुद्ध पुजा_*

                *(१) अग्नीची उपमा*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼     

    _"महाराज, समजा एखाद्याने फार मोठा अग्नी पेटवून नंतर तो विझवून टाकला, तर तो निर्जीव अग्नी पुनः त्यात टाकलेल्या गवताच्या लाकडाचा किंवा अशाच दुसऱ्या प्रकारच्या इंधनाचा स्वीकार करील काय?_

       _"नाही भंते, जवळ असलेला अग्नीच जर स्वतः होऊन इंधनाचा स्वीकार करीत नाही तर तो एकदम विझून शांत झालेला अग्नी कसा काय लाकडादि इंधनाचा स्वीकार करील?"_             

      _"महाराज, तर काय मोठा अग्नी विझून शांत झाल्यानंतर जगातील सर्वच अग्नी नष्ट झाला काय?"_

        _"मुळीच नाही भंते, अग्नी तर वाळलेल्या लाकडातून उत्पन्न होतो. ज्या कोणाला अग्नीची आवश्यकता असेल तो आपल्या सामर्थ्याने अरणीचे (दोन लाकडाचे) घर्षण करून अग्नी उत्पन्न करू शकेल आणि त्यापासून आपले कार्येही त्याला करता येईल."_

*_महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल जे आक्षेप ते सर्व खोटे ठरतात. की "पूजेचा स्वीकार न करणारांची पूजा करणे व्यर्थ आहे."_*

           *_महाराज, जसा तो मोठा अग्नी पेटविण्यात आला तसेच भगवान बुद्ध सुद्धा आपल्या ज्ञान तेजाने या समस्त दहा हजार लोक विश्वात विशाल अग्निपूजासारखे प्रकाशमान झालेत आणि जसा तो अग्नी विझून शांत झाला, तसेच भगवंताने निर्वाणपदाची प्राप्ती करून त्यांनी संसारातून एकदम आपली आवागमनापासून सुटका करून घेतली. ज्याप्रमाणे पूर्णपणे पेटविलेला अग्नी विझून थंड झाल्यानंतर तो कोणत्याही लाकडादी इंधनास जाळू शकत नाही तसेच संसारावर महान उपकार करणारे भगवान बुद्ध स्वीकार व अस्वीकार या प्रश्नापासून अगदी मुक्त झालेत आणि ज्याप्रमाणे अग्नी विझून गेल्यानंतर सुद्धा अग्नीची आवश्यकता भासल्यास कोणी अरणीचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करू शकतो तद्वतच देवता आणि मनुष्य भगवंताच्या अष्टधातूंची पूजा करून किंवा विहार, स्तुपादी उभारून आणि तथागतांनी सांगितलेल्या सद्धर्मानुसार आचरण करून ते बुद्ध तेज निर्माण करू शकतात आणि तिन्ही सभापतींचा लाभ करून घेऊ शकतात."_*

       *_"महाराज, यामुळेच भगवान बुद्धाने जर महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी ठरते आणि ध्येय साध्य करून देणारी ठरते."_*


                      *-क्रमशः*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:* : 

१) *मिलिन्द प्रश्न*

२) *मेण्डक प्रश्न*              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 10 September 2020

मेण्डकारंभ कथा - बुद्ध पुजा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                   *_मेण्डकारंभ कथा_*

                       *_बुद्ध पुजा_*

     

    *_मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनांना अंजलीबद्ध प्रणाम केला व म्हणाला -_*


        *_"भंते, निरनिराळ्या मतांच्या लोकांचे म्हणणे आहे की, भगवान बुद्धांच्या मानसन्मानार्थ केलेली पूजा जर भगवान बुद्ध स्वीकारतात. तर त्यांना निर्वाणपदाचा लाभ झाला असे म्हणता येणार नाही आणि ते या संसारात कोठे निश्चितच भटकत असतील. त्यांचे सद्यस्थितीत संसारातील अस्तित्व मुळीच नाकारता येणार नाही. हे जर खरे असेल तर भगवान बुद्ध अगदीच साधारण व्यक्ती झालेत, मग त्यांची पूजा करण्यात अर्थ तो काय?"_*

       *_"आणि समजा, त्यांना जर निर्वाणपद लाभले असेल, संसाराशी आता त्यांचा मुळी संबंधच राहिलेला नसेल आणि ते समस्त स्थितीतून मुक्त झाले असतील, तर त्यांची पूजा करण्यात काय स्वारस्य? कारण ते जर आहेतच नाहीत, तर पूजा करावी कोणाची? त्याचप्रमाणे भगवान बुद्धाला निर्वाणपद मिळाले असे म्हटले तरी प्रश्न सुटत नाही व निर्वाणपद नाही मिळाले म्हटले तरी प्रश्न सुटत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी विवादात सापडलेल्या भगवान बुद्धाची पूजा करण्यात काहीच अर्थ उरत नाही."_*

    *_"हा प्रश्न सामान्य बुद्धी असलेल्या माणसाच्या शक्तींच्या पलीकडला आहे. सामान्य लोकांसाठी हा विषय नाही. महान लोकच हा प्रश्न सोडवू शकतात. आता आपणच कृपाकरुन या प्रश्नाचे सडेतोड उत्तर देऊन मिथ्या तर्काचे खंडन करावे. या प्रश्नामुळे उत्पन्न होणाऱ्या स्थितीचा विरोधकांना फायदा घेता येणार नाही, तेव्हा भावी बौद्धांच्या सोयीसाठी या कोड्याची सोडवणूक करून प्रकाश पाडावे, जेणेकरून ते दुसऱ्या मताच्या लोकांच्या कुतर्कास झणझणीत उत्तर देऊ शकतील."_*


         यावर स्थविर म्हणाले, *_"महाराज, भगवान बुद्धांना महापरिनिर्वाणाचा लाभ झाला हे सूर्यप्रकाशा इतकेच खरे आहे. ते आता कोणत्याही पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाहीत. बोधिवृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती करुन ते या प्रश्नाच्या पलीकडे गेले होते. तेव्हा आत्ता संसारातून पूर्णतः मुक्त होऊन निर्वाण प्राप्त केल्यानंतर प्रश्न उरतोच कुठे"_*

         *_"महाराज, धर्म सेनापती सारिपुत्रांनी सुद्धा म्हंटले आहे की, ज्यांची बरोबरी करू शकणारा आजपर्यंत कोणी झाला नाही. ते भगवान बुद्ध देवता व मनुष्य या उभयतांनी केलेल्या पूजेचा स्वीकारही करीत नाही की, अस्वीकारही करीत नाहीत. युगानुयुगापासून सर्व बुद्धांचा हा सिद्धांन्त चालत आला आहे."_*


_राजा म्हणाला,_ *_"भंते, पुत्र आपल्या पित्याची किंवा आपल्या पुत्राची स्तुती करीत असेल तर त्याला पुरावा म्हणता येणार नाही. त्या तर आपापल्या मनातील भावना आहेत. परंतु खोट्या सिद्धांताचा पाठराखणी करणाऱ्या लोकांचा भ्रम दूर करण्याकरिता आणि आपल्या सद्धर्माचा प्रकाश पसरविण्याकरिता आपण योग्य तऱ्हेने समजावून सांगावे."_*


       _स्थविर म्हणाले,_ *_"महाराज, भगवान बुद्ध तर पुर्णतः मुक्त झाले आहेत. तेव्हा ते आता कोणाच्या पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार कसे करतील? परंतु देवता आणि मनुष्य लोक त्यांची विहारे व स्तूप बांधून त्यात त्यांच्या अस्थी, कोश, दात इत्यादी शरीर धातूंची स्थापना करून ठेवतात, ज्यांच्या पुण्य फळाने अर्हतपद किंवा बोधिसत्व पद प्राप्त करता यावे. याशिवाय त्या धातूची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान रत्नानुसार आचरण करून तिन्ही समापत्तीचा लाभ करून घेतात. यासाठीच विहारादी उभारणे किंवा पूजा करणे आवश्यक आहे."_*


                                       *-क्रमशः*


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 8 September 2020

उपासकांचे दहा गुण

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

          *_उपासकांचे दहा गुण_*


               *_उपासकाच्या अंगी दहा सद्गुण असले पाहिजे, तरच तो योग्य उपासक बनू शकतो. ते दहा गुण असे -_*


*१)* उपासकाने आपल्या भिक्षुविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगावी

*२)* धर्माला सर्वश्रेष्ठ मानावे

*३)* भिक्षुस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये

*४)* धर्माचा लोप पावत आहे असे दिसून आल्यास धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी पराकाष्टेचे प्रयत्न केले पाहिजेत

*५)* तो त्रिरत्नाप्रति योग्य विचारसरणी ठेवीत असतो

*६)* असा उपासक केवळ जिज्ञासेपायी सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मतात न जाता धर्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो

*७)* असा उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो

*८)* तो शांतता प्रिय असतो

*९)* ऐकतेचा प्रशंसक असतो

*१०)* असा शिष्य केवळ धर्माचे दिखाऊ अवडंबर माजवीत नाही, तर तो यथार्थाने बुद्ध, धर्म व संघाचे ठाई त्याची नितांत श्रद्धा व निष्ठा असते


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

शिष्याप्रती आचार्यांचे पंचवीस कर्तव्य

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

          *_शिष्याप्रती आचार्यांचे पंचवीस कर्तव्य_*


            *_शिष्याचा गुरू २५ सद्गुणांनी युक्त असावयास पाहिजे. गुरूच्या अंगी असलेले २५ सद्गुण कोणते?"_*


*१)* आपल्या शिष्यावर गुरूने सदैव देखरेख ठेवली पाहिजे

*२)* कोणते नियम पाळावे व कोणते कर्तव्य त्याज्य मानावे यासंबंधी सदैव उपदेश करीत राहिले पाहिजे

*३)* कोणत्या गोष्टीत दक्षता बाळगावी व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे यांसंबंधी उपदेश देत राहिले पाहिजे

*४)* त्याचे खान-पान व झोपणे इत्यादी बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजे

*५)* आजारात लक्ष घातले पाहिजे

*६)* आतापर्यंत त्याने काय मिळविले आणि काय नाही याबाबीकडे लक्ष ठेवले पाहिजे

*७)* त्याच्या चारित्र्याकडे लक्ष ठेवले पाहिजे

*८)* भिक्षा पात्रात जे काही मिळाले असेल, ते वाटून खाल्ले पाहिजे

*९)* *'घाबरु नकोस हेही तुला समजेल' असे म्हणून त्यास प्रोत्साहित केले पाहिजे*

*१०)* त्यांनी कोणाची संगत करावी याविषयी वारंवार सांगत राहिले पाहिजे

*११)* शिष्याने कोणत्या गावी जावे हेही सांगितले पाहिजे

*१२)* त्याने कोणत्या विहारात जावे हे ही सांगितले पाहिजे

*१३)* त्याच्याशी गप्पा ठोकत व्यर्थ वेळ घालवू नये

*१४)* त्याचे दोष दिसून आल्यास सहसा त्याला गुरूने क्षमा केली पाहिजे

*१५)* त्याला मन लावून दिले पाहिजे

*१६)* अनाठाई त्याला सुट्टी न देता शिकविले पाहिजे

*१७)* शिष्या पासून ज्ञान लपवून ठेवू नये

*१८)* आपल्या जवळील सर्व ज्ञान उत्साहपूर्वक शिष्यास शिकविले पाहिजे

*१९)* शिष्यास आपल्या ज्ञान-पुत्र समजून गुरूने त्याजवर पुत्रवत प्रेम ठेवले पाहिजे

*२०)* तो आपल्या उद्दिष्टांपासून वळणार नाही, याची खबरदारी गुरुंनी घेतली पाहिजे

*२१)* ज्ञानकण खाऊ घालून याला वाढवीत आहे, असा विचार गुरूने सतत आपल्या मनात ठेवला पाहिजे

*२२)* गुरूने शिष्याप्रती मैत्रिभावनेने प्रेमळ वर्तन ठेवले पाहिजे

*२३)* त्याजवर आपत्ती आली असता, त्याला सोडून न देता त्याचे रक्षण केले पाहिजे

*२४)* त्याला शिकविण्यासारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये

*२५)* धर्मापासून शिष्य ढळत असल्यास त्याला सावरून धरले पाहिजे


       *_योग्य आचार्यांच्या अंगी हेच २५ सद्गुण असले पाहिजे, जेणेकरून ते आपल्या योग्य शिष्याप्रती व्यवहार करतील._*


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

गोपनीयता न राखणारे नऊ प्रकारचे व्यक्ती

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

          *_गोपनीयता न राखणारे नऊ प्रकारचे व्यक्ती_*


             *_भंते, गुप्त गोष्टी सुद्धा न पचविता त्या जिकडे तिकडे सांगत सुटणारे नऊ प्रकारच्या व्यक्ती विद्यमान आहेत. कोणतीही सांगितलेली गोष्ट ते हृदयात ठेऊ शकत नाही."_*


           *_"ते नऊ प्रकारचे लोक कोणते आणि त्यांच्यातील दोष कोणता?"_*


       *_ते नऊ प्रकारचे लोक असे-_*

*१)* _लालसी मनुष्य लालसेच्या आहारी जाऊन गुप्त गोष्ट प्रसूत करतो_


*२)* _द्वेषी मनुष्य विध्वंसक विचारसरणीमुळे कटाला बळी पडून गुप्त गोष्ट प्रसूत करतो_


*३)* _भ्रमिष्ट मनुष्य मोहाला बळी पडून गुप्त गोष्ट प्रसूत करतो_


*४)* _भित्रा मनुष्य भेकड स्वभावामुळे गुप्त गोष्ट प्रसूत करतो_


*५)* _घुसखोर मनुष्य स्वार्थापायी गुप्त गोष्ट प्रसूत करतो_


*६)* _स्त्री ही आपल्या दुर्बलतेमुळे गुप्त गोष्ट प्रसूत करते_


*७)* _दारुड्या मनुष्य दारूच्या नशेत सर्व गुप्त गोष्ट प्रसूत करतो_


*८)* _नपुंसक मनुष्य आपल्या अपूर्णत्वामुळे सर्व गोष्टी प्रसूत करतो_


*९)* _बालक आपल्या मनमोकळेपणामुळे गुप्त गोष्टी न पचविता उघड करून टाकतो_


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 7 September 2020

धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा आठ व्यक्ती

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

          *_धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा आठ व्यक्ती_*


             *_भंते नागसेन, चर्चेचा विषय बिघडवून अर्थाचा अनर्थ करणारे आठ प्रकारचे लोक असतात. म्हणून महत्वपूर्ण चर्चा करीत असता त्यांचा संग टाळला पाहिजे," ते आठ प्रकारचे लोक असे -_*

*१)* लालसी

*२)* द्वेषी म्हणजे दुष्ट

*३)* भ्रमिष्ट

*४)* गर्विष्ठ

*५)* लोभी

*६)* आळशी

*७)* एकच कल्पना धरून ठेवणारी हट्टी

*८)* मूर्ख


          _स्थविर म्हणाले, "महाराज, या आठ प्रकारच्या लोकांत कोणते दोष आहेत की, जेणेकरून त्याचा संग त्याज्य मानला आहे?_

       *_भंते, लालसी व्यक्ती लालसेपायी, दुष्ट व्यक्ती आपल्या दुष्टपणाने, भ्रमिष्ट व्यक्ती अभिभूत स्वभावामुळे म्हणजे भ्रामक कल्पनांमुळे, गर्विष्ठ व्यक्ती गर्वाभिमाने, लोभी व्यक्ती लोभाच्या कारणाने, आळशी मनुष्य आळसामुळे, एकच कल्पना धरून ठेवणारा हट्टी मनुष्य संकुचितपणाने आणि मूर्ख व्यक्ती मुर्खपणामुळे एकदमच अर्थाचा विचका करून टाकतो."_*



*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

धर्म चर्चेस अयोग्य अशी आठ स्थाने

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

          *_धर्म चर्चेस अयोग्य अशी आठ स्थाने_*


             राजा मिलिंद आणि त्यांचे गुरू नागसेन हे दोघेही ठरल्याप्रमाणे एका शांत ठिकाणी पोहचले. तेव्हा राजा म्हणाला, *" भंते, धर्माच्या गूढ अशा रहस्यमय तत्त्वावर चर्चा करणारांनी आठ प्रकारच्या स्थळांना टाळणेच बरे. या आठ ठिकाणी कोणताही बुद्धिमान मनुष्य अशा धर्मचर्चा करणार नाही. कारण चर्चा करून सुद्धा काहीच निर्णय लागत नाही आणि मुद्दा तसाच पडून राहतो."*

             

 *ही आठ स्थाने अशी आहेत*

*१)* चढउताराचे स्थान

*२)* असुरक्षित भयावह असे स्थान

*३)* वादळी वारे वहात असलेले स्थान

*४)* अत्यंत गुप्त असे स्थान

*५)* पवित्र असे देवस्थान

*६)* जेथे अधिक रहदारी आहे असे स्थान

*७)* पूल

*८)* घाट


         _स्थविर म्हणाले, "महाराज या स्थळांमधील दोष कोणते? की, जेणेकरून ही स्थाने त्याज्य मानावी?"_


           राजा म्हणाला, 

*_"भंते चढउतार असलेल्या स्थानावर मन लागत नाही, त्यामुळे चर्चा विस्कटल्या जाऊन कोणताच निष्कर्ष निघत नाही."_*

 

*_" असुरक्षित ठिकाणी काळजीने चित्ताची तारांबळ उडते असते, त्यामुळे चर्चेत मन लागत नाही."_*


*_"अधिक वादळी वारे वाहत असलेल्या ठिकाणी परस्परांचे शब्द नीट ऐकू येत नाहीत."_*


*_"अत्यंत गुप्त अशा स्थानी चर्चा करीत असता कोणी दुसरा ती लपून ऐकण्याची शक्यता असते."_*


*_"पवित्र देवस्थानी चर्चेचा विषय विनाकारण गंभीर होण्याची शक्यता असते."_*


*_"अधिक रहदारी असलेल्या रस्त्यावर चर्चेचे स्वरूप उद्धटपणाचे होण्याची शक्यता असते."_*


*_"पुलावर बसून चर्चा करीत असता त्यात चंचलता येऊन संभाषण उथळ होण्याची शक्यता असते."_*


*_"सार्वजनिक घाटावरील चर्चा सर्वस्वी जाहीर होतात."_*


         *_यासाठीच असे म्हटले आहे की, धार्मिक विषयावर सल्लामसलत करण्याकरिता ही आठ स्थाने त्याज्य मानली पाहिजेत._*




*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करू नका

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

          *_सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करू नका_*


                  *_जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहचू शकत नाहीत. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहचू शकत नाहीत._*


            *_जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यकदृष्टी आहे, त्यांना सत्य लाभते._*


           *_घर नीट शाकरलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते._*


          *_घर नीट शाकरलेले असले की  त्यात पावसाचे पाणी शिरू शकत त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही._*


           *_उठा! प्रमादी राहू नका. धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत रहा. जो त्या प्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. सन्मार्गाचा अवलंब करा. कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात._*


*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*धम्मपद*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

सम्यक मार्गानुसरण

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                   *_सम्यक मार्गानुसरण_*


              *_सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहेत. परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही. तो बहुजन सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवनमार्गाचे अनुसरण होय._*


              *_अष्टांगमार्ग हा श्रेष्टमार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्यचतुष्ट्य आहे; श्रेष्ठ वैषयीक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे. दुसरा नाही, याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निरास होईल. दुःखकंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर, मी या मार्गाचा उपदेश केला._*


        *_तथागत हे केवळ पथ-दर्शक आहेत. (स्वोन्नतीचा) प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो._* 


           *_सर्व स्पष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत, हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत. जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही._*


          *_जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही, जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही._*


          *_भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायेने कोणतेही पाप न करणे, हे काया-वाचा-मनसा आचरावयांचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते._*


            *_वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरदऋतुतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडुन काढावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे. अधर्माने वागू नका. अविचाराने जगू नका. दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका.जागे व्हा. सुस्त पडू नका. सद्गुणांची कास धरा. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्ये सोडून सत्कृत्ये करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो._*


           *_एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही, हे सांगवत नाही. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात, त्यांचे दुर्विकार (आसव) शेवटी लोप पावतात._*


          *_अशी एक जुनी म्हण आहे की, जो स्तब्ध बसतो, त्याला लोक दूषण लावतात. जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर, ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही._*


           *_वाणीच्या क्रोधापासून सावध रहा आणि जिभेचा संयम करा. मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणांचा आचार करा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत._*


*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*धम्मपद*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

ढोंग

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                      *_ढोंग_*


              *_खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे._*

    

             *_तथागत जसे बोलतात तसे वागतात, तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात._*


           *_हा बौद्ध जिवनमार्ग आहे._*


*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*


              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

दुःख आणि सुख; दान आणि कर्म

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

         *_दुःख आणि सुख; दान आणि कर्म_*


            *_दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्यनाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. हा बौद्ध जीवनमार्ग होय._*


        *_क्षुधा हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे._*


        *_जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसांत आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसांत आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे._*


          *_शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते; म्हणून गर्वरहीत पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते._*


             *_शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषयोभोगाने नाश पावते; म्हणून विषयामुक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते._*


             *_धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे._*


           *_विजयातून द्वेष उत्पन्न होतो. कारण जित हा दुःखी असतो. जयपराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही. द्वेषासारखे चुकीचे वार नाही. शरीरासारखे दुसरे दुःख नाही. शांतीसारखे सुख नाही._*


         *_दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्ये करतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकांतप्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते._*


            *_उमद्या घोड्याला भरधाव धावण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये त्या उमद्या घोड्यासारखा कोणी आहे का? की जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही._*


           *_कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल. रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, निःस्वार्थीपना आहेत._*


*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*धम्मपद*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 6 September 2020

जागरूकता, कळकळ आणि धैर्य (अप्रमाद आणि वीर्य)

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

         *_जागरूकता, कळकळ आणि धैर्य (अप्रमाद आणि वीर्य)_*


            *_शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानव जातींकडे पाहात असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वतशिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे._*


       *_निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडेलतट्टूला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो._*


           *_निष्काळजीपणाच्या आधीन होऊ नका, कामभोगापासून दूर राहा, जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. दक्षता (अप्रमाद) अमर आहे. अविचार (प्रमाद) मृत्यूचे पद आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाहीत. उलट प्रमादी हे मृतवतच आहेत_*


         *_दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतुपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. सावधान-चित्त राहा. आळस सोडा. सम्यक मार्गाचा अवलंब करा, जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो._*


          *_आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी ह्यांच्या साहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा - हा विषारी बाण उपटून काढा._*


          *_प्रमादात फसू नका. विषयोपभोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा._*


        *_जो अप्रमत्त आणि जागरूक आहे, स्मृतिमान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे; जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत्त आहे - अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते._*


*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*धम्मपद*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

विवेकशीलता आणि एकाग्रता

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

         *_विवेकशीलता आणि एकाग्रता_*


          *_प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. सावधान राहात जा. आस्थायुक्त आणि धैर्यशील राहात जा, हा बौद्ध जीवनमार्ग होय._*


          *_आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्टित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलु लागेल, कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्व आहे._*


        *_अविचारी बनू नका. आपल्या विचारांवर लक्ष असू द्या. कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत् मार्गापासून आपली मुक्तता करा._*


        *_शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी. कारण ते कळायला कठीण, अतिशय धूर्त, असून, जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहातात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत._*


          *_कशा तरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही._*


        *_माझें मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते; परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वळवीत असतो त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे._*


         *_दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे._*

 

          *_दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे काम-बंधनापासून विमुक्त होतात._*


        *_जर माणसाची श्रद्धा अचल नसली, तर सद्धर्म त्यास अज्ञात असेल, आणि जर त्याची मनःक्षांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहीत असू शकत नाही._*


         *_एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते._*


      *_आईबाप, आप्तेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते._*



*संदर्भ:*

*बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*धम्मपद*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                

           *_प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती_*


               *_बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती करा. हा बौद्ध जीवनमार्ग आहे._*


          *जो मनुष्य काय वर्ज्य करावे हे तुम्हाला दाखवितो, जो तुमच्या दोषांबद्दल तुम्हाला वाक्ताडन करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या हातून, ज्याप्रमाणे गुप्त धन दाखविणार्या माणसामागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात रहा. अशा सत्पुरुषांचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही. भले करील.*


       *जो चुकल्यास रागे भरतो; जो शिकवितो; अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो तो सुजनांचा प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. सदाचारी पुरुषांची मैत्री करा. श्रेष्ठ पुरुषांची मैत्री करा. जो धर्मामृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशिलेल्या धर्माने आनंद पावतात.*


       *_पाटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो, बाणाकार बाणाला नीट वळवितो, सुतार लाकडाच्या ओंडक्याला वळण देतो, त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात._*


        *_सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात. ते इच्छातृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात. सुखाचा स्पर्श होवो अथवा दुःखाचा स्पर्श होवो ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेने पछाडलेले दिसत नाहीत._*


         *_जीवनप्रवाशाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकलेपणानेच प्रवास करावा. परंतु मुरळाचा सहवास मात्र कधीही करू नये._*


          *मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो, त्या प्रमाणात तो शहाणा असतो; परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखर पुरा मूर्ख होय. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य समजत नाही. अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचेच शत्रू असतात; कारण ते दुष्कृत्ये करतात आणि त्याची कटू फळे त्यांना चाखावी लागतात. मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी, भिक्षुमध्ये अग्रमान, विहारात स्वामित्व, लोकांमध्ये सन्मान यांची खुशाल हाव धरू ध्या. कितीही बहुभाषी असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरीही जो मत्सरी, कृपण, अप्रामाणिक आहे तो सन्मानास पात्र ठरत नाही.*


       *ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत, ज्याचे दुर्गुणाचे आमूलाग्र उच्चाटन झालेले असते, तो दोषयुक्त आणि शहाणा असतो तो सन्माननीय होय. जो मनुष्य एखादी गोष्ट हिंसेने तडीस नेतो, जो न्यायी नव्हे, उलट जो सत् आणि असत् यात भेद करतो, जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दर्शवितो, जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो त्यालाच न्यायी पुरुष म्हणतात. फार बोलतो एव्हढ्यावरूनच कोणीही पंडित ठरत नाही. जो क्षमाशील आहे, जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झाला आहे तोच पंडित होय. फार बोलतो एव्हढ्यावरून कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही. जती माणसाचे ज्ञान अल्प असले तरी जो धम्माला साक्षात पाहतो, जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही तोच धम्माचा आधारस्तंभ असतो.*


       *माणसाला दूरदर्शी, शाहणा, संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी, आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी. जर माणसाला दुरदृष्टिचा, शहाणा, संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपथ एकट्यानेच आक्रमावा.*


      *_जगात मातेची - पित्याची - श्रमणाची अवस्था सुखकर आहे. वार्धक्यातही टिकणारा सद्गुण सुखदायक, खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर, ज्ञानार्जन सुखकर, पापत्याग सुखदायक. माणसाने शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाक्षील, कर्तव्यदक्ष श्रेष्टच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रांच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सुजनांचे अनुयायी व्हावे. डामडौल, प्रीती आणि आसक्ती ह्यांच्या उपभोगांची कास धरू नका. ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद येतो_*


         *_आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचा निराश करतो तेव्हा तो शहणपणाच्या एकाहून उंच अशा शिखरावर चढून मूर्खांकडे तुच्छतेने पाहात असतो. दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसांना पाहात असतो, त्याप्रमाणेच दुःखात मग्न असलेल्या लोकांकडे पाहात असतो. अविचारी माणसात विवेकशील, निद्रिस्तात जागृत असा तो शाहणा मनुष्य दुबळ्यांना मागे सारून पुढे जात असतो._*



*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

आपण आणि आत्मविजय

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                

           *_आपण आणि आत्मविजय_*


             *_जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा (आत्मविजय) परिपाठ ठेवावा. हा बौद्ध जीवनमार्ग आहे._*


         *_मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे. दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण. जो मूर्ख मनुष्य अर्हत, शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्म सिद्धांतांच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते._*


       *_आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो, आपणच आपणाला शुद्ध करू शकतो; शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबुन असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही._*


        _*जो केवळ सुखोपभोगांसाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे.*_


        *_ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याने इंद्रियदमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्रकायपर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही._*


         *जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.*


       *_प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी. मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो._*


        *_स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून, जो आत्मविजय मिळवितो टोकंग परमवीर होय_*


          *_मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वतःच स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे._*


*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

मनुष्य, मन आणि मनोमल

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                

           *_मनुष्य, मन आणि मनोमल_*


             *_मन घडविते तसा मनुष्य होतो, जो सत् आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे, हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवनमार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे._*


         *_मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनःप्रधान आहेत._*


      *_मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते._*


       *_मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते._*


        *_मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला, एकाग्र व सरळ करतो._*

       _पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते, त्याप्रमाणे माराच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते._ _*ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे, कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते.*_ _तू आपल्या स्वतःस एक द्वीप (बेट) बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहीत झाल्यावर तू दिव्य भूमिला पोहोचशील._


         _*ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुप्यातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतिकडे नेत असते.*_


       _*सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अज्ञानाचा कलंक. भिक्खुंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा.*_


         *_जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुकर आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र-अपवित्र यांचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परदागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो. तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो._*


       *_माणसा, हे लक्षात ठेव, संयमहिनांची स्थिती चांगली नव्हे; लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते, जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्नपाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मुलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते._*


       *_कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. परदोष हे सहज दिसतात. परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी, अपेशी फारसा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो. जो मनुष्य परदोषच पाहात राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो._*


*_पापापासून दूर राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा ही भगवान बुद्धाची शिकवण आहे._*



*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

क्रोध आणि वैर

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                

           *_क्रोध आणि वैर_*


           *_मनात क्रोधभावना ठेवू नका, वैरभाव विसरा व आपल्या शत्रुलाही प्रेमाने जिंका हा बौद्ध जीवनमार्ग आहे._*


        *क्रोधाग्नी शमन करा.* _तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही._ *_ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो._*


      *_शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो._* _माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वावर साधुत्वाने जिंकावे._


          _खरे बोलावे, रागावू नये, मागीतल्यानंतर थोडे तरी द्यावे. क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा. सर्व बंधनांवर जय मिळवावा येणेप्रमाणे जो *नामरूपाविषयी अनासक्त असतो असा* अपरिग्रही दुःख भोगत नाही._


        *_वाढत्या क्रोधाला तो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो, त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत._*


        *_ज्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसते; परंतु ज्याने जयपराजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो._*


      *_कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखा दुर्दैव नाही. उपादान स्कंधासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही._*


      *_वैराने वैर कधीच शांत होत नाही. प्रेमानेच ते शांत होते_*


*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

क्लेश आणि द्वेष

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                

           *_क्लेश आणि द्वेष_*


            *_कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेषभावना बाळगू नका, हा बौद्ध जीवनमार्ग आहे._*


          *_ज्याप्रमाणे जातिवंत घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहीत पुरुष कोण आहे?_*


         *_श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. क्षमा परमतप आहे. निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसर्यांना त्रास देणारा प्रवजित खरा श्रमण होऊ शकत नाही._*


          *_कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना साहाय्यही करू नका._*


       *_जो स्वतः सुखाच्या शोधात आहे, त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्यांची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट करू देत नाही त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे._*


        *जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते.*


       *_जो क्षमारुप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खु होय._*


*_ज्याप्रमाणे जातिवंत घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही त्यासाठी काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा, लज्जेने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय?_*


            *_जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्पपरिणाम भोगावा लागतो._*



*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

लोभ आणि तृष्णा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                

           *_लोभ आणि तृष्णा_*


          *_लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे._*


           _धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही. *सुज्ञ लोक जाणतात की, कामना ही अशक्य व दुःखकर आहे.*_ 


      *_जो स्वर्लोकीच्या कामभोगातही आनंद मानीत नाही, जो तुष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो तो सम्यक सम्बुद्धाचा शिष्य होय._*


           *_लोभातून - तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, लोभातून - तृष्णेतून भय निर्माण होते, लोभापासून - तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते._*


            *_जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा द्वेष करू लागतो._* _जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. *ज्यांना कोणतेही अति प्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात.*_


       *_कामभोगापासून - आसक्तीमुळे - कामुकतेपासून - लोभापासून दुःख - भय उत्पन्न होते, जो कामभोगासक्त नाही, आसक्तीच्या - कामुकतेच्या बंधनापासून मुक्त आहे, लोभमुक्त आहे त्याला दुःख - भय नाही._*

           

      *_जो शीलवान व प्रज्ञावान आहे, तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात._*




*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

सत्, असत्, आणि पाप

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                

           *_सत्, असत्, आणि पाप_*


          *_शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पापकर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे._*


           _माणसाने एकदा शुभ कर्म केले की, परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की, त्यायोगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. *शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे.*_

        _शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. *थेंबाथेंबाने पात्र भरते थोड्याथोड्या शुभ कर्माने शुभकर्म वाढत राहते.*_

      _जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, पश्चात्तापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे._

       _जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात; परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. 'ते मला बरोबर साधणार नाही' असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये, *थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो.*_


*_चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा (सदाचरणाचा) सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो._*


        _अशुभ हे शूद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढत राहते._

        _ज्याच्या योगाने / कृत्याने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नव्हे._


    *_जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागु लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते._*

      _पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचारांचे दमन करून परिपुर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते._

        *_पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्या वेळी त्याची पापे परिपक्व होतात त्या वेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प दुष्कृत्ये करता करता, मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो._*

       _माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते._

       _माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत पाप करू नये आणि पापाने आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते_

     *_कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे इहलोकी धन्यता मानतात._*

      _कामुकतेने दुःख - भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो._

    *_भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वांत मोठे दुःख आहे, हे सत्य उमगले की, निब्बान हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते._*

    _ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मीत, स्वपोषित पाप कृत्याचा नाश करते._

       *_ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो, तो त्याच्या शत्रुलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहचवितो._*


*_दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात. परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात._*




*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

शुभ संकल्पाची आवश्यकता

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

        *_शुभ संकल्पाची आवश्यकता_*

         

        _एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहात  असता भगवान भिक्खुंना म्हणाले, *"पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका."*_


            *_'असा शुभ संकल्प करा की -_*

➡️ *आयुष्यभर मी आपल्या माता-पितरांचे परिपालन करीन*

➡️ *मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन*

➡️ *माझी वाणी सदैव मृदू राहील*

➡️ *मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही*

➡️ *स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन.*

➡️ *औदार्याने, शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानीत राहीन.*

➡️ *आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन*

➡️ *वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन.*

➡️ *आयुष्यभर शांत राहीन, क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन*


*_"भिक्खुंनो, असे हे संकल्प केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल._*



*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

शुभ कर्मांची / कुशल कर्मांची आवश्यकता

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

        *_शुभ कर्मांची / कुशल कर्मांची आवश्यकता_*

         

 एके समयी भगवान भिक्खुंना म्हणाले,

      

              *_"सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, ईप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म, सत्कर्माचा लाभ म्हणजे ईप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे नि त्याची ग्वाही मी देऊ शकतो."_*

     

             _"मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे, तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे?"_

      

            *_"आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की, हे तीन प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो तीन प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम ह्या तीन सत्कर्माचा परिपाक होय."_*

        

           *_"शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात! तोच खरा शुभ दिन. तोच खरा सुखमय क्षण. जेव्हा सत्पात्री दान दिले जाते, ज्या वेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय"_*


*_"ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे."_*


*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

न्यायी आणि सज्जन असा पुरुष

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

        *_न्यायी आणि सज्जन असा पुरुष_*

          

            _भिक्खुंना उद्देशून भगवान म्हणाले, *'माणसे चार प्रकारची असतात. जर तुम्हांला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या चार प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत.'*_


           *_'भिक्खुंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात; परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषयवासनेचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांनी विषयवासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत, ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात; परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविध्येचे निर्मूलन करतात; परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत.' असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो; परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही_*


     *_'दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात. स्वहितासाठी झटत नाहीत. अशी माणसे आपल्या अंगच्या विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. भिक्खूहो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःच्या नाही.'_*


          *_'भिक्खूहो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठी झटत नसतात. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही; त्याचप्रमाणें दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचे हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही.'_*


          *_'भिक्खूहो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषयवासना, क्रोध आणि अविद्या  यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे.'_*



*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

सर्वोत्तम पुरुष

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                 *_सर्वोत्तम पुरुष_*

          

एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खुंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले -


            भिक्खुंना उद्देशून भगवान म्हणाले, *_'जगात चार प्रकारची माणसे आढळतात'_*


           *_पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही._*


           *_दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी जगतो._*


          *_तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही._*        


         *_चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचा त्याप्रमाणेच दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो._*


         *_जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखी आहे, ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे._*


        *_'जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो, तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय._*


   *_आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वांत उत्तम पुरुष समजावा._*


*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

दुष्ट मनुष्य

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                 *_दुष्ट मनुष्य_*

          

एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खुंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले.

    *_'भिक्खुंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हास माहीत आहे काय?' भिक्खुंनी 'नाही', म्हणताच बोलले,_*


*_तर मग मीच तुम्हांला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो_*


*_दुष्ट मनुष्य न विचारताच दुसर्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो._*


*_जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवीत नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो._*


*_जो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघड करीत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो. परंतु त्याचा तपशील लपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय._*


*_भिक्खूहो, असाही मनुष्य असतो की, जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खुंनो, असा मनुष्य दुष्ट समजावा._*


*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*


*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...