🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_धर्म चर्चेस अयोग्य अशी आठ स्थाने_*
राजा मिलिंद आणि त्यांचे गुरू नागसेन हे दोघेही ठरल्याप्रमाणे एका शांत ठिकाणी पोहचले. तेव्हा राजा म्हणाला, *" भंते, धर्माच्या गूढ अशा रहस्यमय तत्त्वावर चर्चा करणारांनी आठ प्रकारच्या स्थळांना टाळणेच बरे. या आठ ठिकाणी कोणताही बुद्धिमान मनुष्य अशा धर्मचर्चा करणार नाही. कारण चर्चा करून सुद्धा काहीच निर्णय लागत नाही आणि मुद्दा तसाच पडून राहतो."*
*ही आठ स्थाने अशी आहेत*
*१)* चढउताराचे स्थान
*२)* असुरक्षित भयावह असे स्थान
*३)* वादळी वारे वहात असलेले स्थान
*४)* अत्यंत गुप्त असे स्थान
*५)* पवित्र असे देवस्थान
*६)* जेथे अधिक रहदारी आहे असे स्थान
*७)* पूल
*८)* घाट
_स्थविर म्हणाले, "महाराज या स्थळांमधील दोष कोणते? की, जेणेकरून ही स्थाने त्याज्य मानावी?"_
राजा म्हणाला,
*_"भंते चढउतार असलेल्या स्थानावर मन लागत नाही, त्यामुळे चर्चा विस्कटल्या जाऊन कोणताच निष्कर्ष निघत नाही."_*
*_" असुरक्षित ठिकाणी काळजीने चित्ताची तारांबळ उडते असते, त्यामुळे चर्चेत मन लागत नाही."_*
*_"अधिक वादळी वारे वाहत असलेल्या ठिकाणी परस्परांचे शब्द नीट ऐकू येत नाहीत."_*
*_"अत्यंत गुप्त अशा स्थानी चर्चा करीत असता कोणी दुसरा ती लपून ऐकण्याची शक्यता असते."_*
*_"पवित्र देवस्थानी चर्चेचा विषय विनाकारण गंभीर होण्याची शक्यता असते."_*
*_"अधिक रहदारी असलेल्या रस्त्यावर चर्चेचे स्वरूप उद्धटपणाचे होण्याची शक्यता असते."_*
*_"पुलावर बसून चर्चा करीत असता त्यात चंचलता येऊन संभाषण उथळ होण्याची शक्यता असते."_*
*_"सार्वजनिक घाटावरील चर्चा सर्वस्वी जाहीर होतात."_*
*_यासाठीच असे म्हटले आहे की, धार्मिक विषयावर सल्लामसलत करण्याकरिता ही आठ स्थाने त्याज्य मानली पाहिजेत._*
*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment