Saturday, 10 July 2021

माराच्या दहा सेना

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

                          *_माराच्या दहा सेना_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2021/07/blog-post_10.html

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

*_कामा ते पठमा सेना दुतिया अरति बुच्चति ।_*

*_ततिया खुप्पिपासो ते चतुत्थी तण्हा पवुच्चति ।। १ ।।_*

*_पंचमी थीनमिद्धं ते छट्ठा भीरुपवुच्चति ।_*

*_सत्तमी विचिकिच्छा ते मक्खो थंभो ते अट्टमो ||२||_*

*_लाभो सिलोको सक्कारो मिच्छा लद्धो च यो यसो ।_*

*_यो चत्तानं समुक्कंसे परे च अवजानति ॥३॥_*

*_एसा नमुचि ते सेना कण्हस्साभिप्पहारणी ।_*

*_न तं असूरो जिनाति जेत्वा च लभते सुखं ||४||_*

         *_(हे मार) इंद्रियांना सुखविणारे चैनीचे पदार्थ ही तुम्ही पहिली सेना होय, अरति (कंटाळा) ही तुझी दुसरी सेना, तिसरी भूक आणि तहान, चवथी विषयवासना, पाचवी आळस, सहावी भीति, सातवी कुशंका आणि आठवी गर्व ही तुझी सेना होय.  ।।१ -२ ।।_*

*_(याशिवाय) लाभ, सत्कार, पूजा ही तुझी (नववी) सेना आहे, आणि खोट्या मार्गानि मिळालेली कीर्ति (ही दहावी); या कीर्तींच्या योगाने मनुष्य आत्मस्तुति आणि परनिंदा करीत असतो. ।। ३ ।।_* 

*_हे काळ्याकुट्ट नमुचि (मार), (साधुसंतांवर) प्रहार करणारी ही तुझी सेना आहे. तिला भ्याड मनुष्य जिंकू शकत नाही. परंतु जो शूर मनुष्य तिला जिंकतो तोच सुख लाभतो. ।। ४ ।।_* 

ज्याप्रमाणे चांगल्या कामात सहाय्यक होण्याकरिता देवी-देवतांची कल्पना केली आहे, तशीच चांगल्या कामात विघ्न टाकणारा म्हणजे मार अशी कल्पना केली आहे. अर्थात मार म्हणजे मनुष्याच्या मनातील कलुषित विचारांची साकार मूर्ती होय. मार मनाची दुर्बलता, मनातील वाईट प्रवृत्ती ह्यांचेच दुसरे नाव होय. वास्तविक पाहता ‘प्रेय’ कि ‘श्रेय’, हा कलह सनातन आहे. एक मत असे कि, जे ‘प्रेय (प्रिय)’ आहे. इंद्रियांना जे प्रिय व चांगले वाटते, तेच ‘श्रेय (कल्याणकारी)’ आहे. दुसरे मत असे कि, सामाजिक दृष्टीने जे खरोखरच कल्याणकारी आहे, तेच आम्हाला प्रिय वाटायला पाहिजे. 

”पधानसुत्त” माराच्या दहा सेनांचे वर्णन करते, ज्या बाधक आहेत, ध्यान साधनेत ध्यान लागू देत नाही.

 

१)

माराची पहिली सेना

:

इंद्रियजन्य सुखाचा अनुभव घेण्याची आसक्ती

२)

माराची दुसरी सेना

:

एखाद्या शांत वातावरणात वनातील एकांत जागी समाधानाने राहण्याविषयी इच्छा नसणे.

३)

माराची तिसरी सेना

:

भूक

४)

माराची चौथी सेना

:

विविध प्रकारच्या भोजनाची इच्छा

५)

माराची पाचवी सेना

:

स्त्यान व म्रुद्ध आहे (थिन आणि मिद्ध)

६)

माराची सहावी सेना

:

एकटे न राहण्याची इच्छा आणि एकांतवासाची भीती वाटणे

७)

माराची सातवी सेना

:

विचिकित्सा आहे, संदेह आहे. जसे एखाद्याला या गोष्टीची शंका आहे कि, तो ध्यान भावनेमध्ये यशस्वी होईल अथवा नाही.

८)

माराची आठवी सेना

:

जेव्हा ध्यान भावना सफल होऊ लागते तेव्हा व्यक्तीला गर्व येतो, त्यामध्ये उद्धटपण आणि आखडलेला येतो.

९)

माराची नववी सेना

:

हे आचार्यांविषयी आहे, असे आचार्य ज्यांना खूप लाभ-सत्कार मिळत आहे.

१०)

माराची दहावी सेना

:

कोणा धर्माचे, खोट्या धर्माचे अनुसरण करणे, एका नव्या अजून विशेष धर्माला स्थापित करणे, यासाठी करणे कि, खूप दान – दक्षिणा मिळेल, एकाची प्रशंसा आणि दुसर्यांची निंदा करणे.

*_१) माराची पहिली सेना – इंद्रियजन्य सुखाचा अनुभव घेण्याची आसक्ती_*

       काही जन विपश्यना शिबिरात ध्यान साधना करण्यासाठी येतात परंतु निर्वाण प्राप्तीसाठी अजिबात येत नाहीत. ते अशा काही गुप्त हेतूंनी येतात कि जसे, “जर मी गुरुजींच्या, जवळचा झालो तर गुरुजींच्या ओळखीने, एखादवेळी मला नोकरीत बढती मिळेल, जे अंतकरणात लोभ घेऊन येतात ते आपल्या ध्यान साधनेत यशस्वी होणे शक्य नाही. लोभ मुळीच असता कामा नये. जेव्हा आपण विपश्यना विधी शिकण्यासाठी पार्थना केली तेव्हा आपण म्हणतो कि, “निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी मला विपश्यना विधी शिकवा. गुरुजी/आचार्य तुम्हाला चार आर्यसत्ये समजून घेण्यास शिकवतील, पण जर त्यात आपल्याला रस नसेल आणि त्यासाठी आपण पाहिजे तेवढा वेळ लावायचे ठरवीत असाल तर त्याला गुरुजी किंवा आचार्य काय करू शकतात?

_*२) माराची दुसरी सेना - एखाद्या शांत वातावरणात वनातील एकांत जागी समाधानाने राहण्याविषयी इच्छा नसणे.*_

       जेव्हा एखाद्या शांत, एकांत स्थानी राहण्याविषयी अनिच्छा उद्भवते त्या माणसाला सोडून पळून जावेसे वाटते. कधी तो स्वतःहून जाऊ इच्छितो असे तो दुसर्यांना सांगतो किंवा कधी कधी अगदी गुपचूप जातो. आतमध्यल्या गडबड गोंधळामुळे, अशांतीमुळे तो शांत, एकांत जागी राहू इच्छित नाही. आतील अशांती आणि वादळ माराची दुसरी सेना आहे.

*_३) माराची तिसरी सेना - भूक_*

            जर एखाद्याची ध्यानात प्रगती होत असेल तर त्याला भूक लागत नाही, पण जर ध्यान व्यवस्थित होत नसेल तरच भूक लागते. आतमधले काहीतरी एखाद्याला क्षुधार्त करते. मग त्याला भूक आवरत नाही. एकदा का साधक ध्यानात स्थापित झाला , मग त्याला नंतर भूक लागत नाही. बरेच विपश्यना शिबिरार्थी शिबिरात येतात त्यातील काही खादाड असतात ते म्हणतात कि ते खाण्याशिवाय राहू शकत नाहीत. मग त्यांना खेळीमेळीने खुलवावे लागते, याचा परिणाम असा होतो कि दहा दिवसात ते कधीही भुकेलेले नसतात. काही शिबिरार्थी म्हणतात कि जर ते दोन दिवस जेवले नाहीत तर चक्कर येउन पडतील आणि ते असेही म्हणतात कि त्यांनी तसं करून पाहिले हि आहे म्हणून असे काही शिबिरार्थी जेवणाची परवानगी घेतात आणि त्यांना तशी परवानगी दिली जाते पण जेव्हा ते पहिल्या दिवशी ध्यान केल्यानंतर दुसर्या आणि तिसर्या दिवशी ध्यान केल्यानंतर ते अजिबात भुकेले नव्हते.

*_४) माराची चौथी सेना – विविध प्रकारच्या भोजनाची इच्छा_*

       जेव्हा आपण खूप चविष्ट, स्वादिष्ट भोजन करतो तेव्हा काय होते? अशा प्रकारचे चविष्ट भोजन करण्याची आपली इच्छा अजून वाढते. भोजनाचा स्वाद न जाणता भोजन करणे संभव आहे का? असे फक्त अर्हत करू शकतात. विपश्यना शिबिरात येण्याचा उद्देश क्लेशापासून सुटका मिळविणे नव्हते का? तृष्णेपासून सुटका मिळविणे नव्हते का? जेव्हा आपण डोळे बंद करून खाणे खातो  तेव्हा काही दिसणार नाही, तेव्हा आपल्या मनात कोणत्या दृश्य वस्तूची इच्छा वा कामना होणार नाही? हीच गोष्ट ऐकण्याला लागू होते. विपश्यना शिबिरात टेप रेकॉर्डर नाही, रेडियो नाही, ज्यावर आपण गाणी वाजवत आहोत, आपल्याला जे ऐकायचे नाही, हीच गोष्ट गंधासाठी सुद्धा म्हटली जाऊ शकेल.शिबिरात कोणी आपल्या शरीरावर किंवा कपड्यावर अत्तर शिंपडलेले नाही, जेणेकरून सुगंधासाठी कोणता लोभ किंवा तृष्णा जागत नाही. शिबिराच्या ठिकाणी अशी कोणतीही वस्तू नाही जी आपल्या शरीरात सुखद संवेदना निर्माण करेल. जिव्हा हि तर आहे आणि ती कशी स्वाद चाखल्याशिवाय राहू शकते? हे तर तेव्हा शक्य आहे जेव्हा एकतर आपण खाणार नाही. अशा अवस्थेत आपल्या शारिरीक स्थितीसाठी डॉक्टरला आपल्याला ग्लुकोजचे इंजेक्शन द्यावे लागेल. स्वाद तर तेव्हा जाणवेल जेव्हा जिभेचा संपर्क भोजनाशी होईल. जर आपण स्वादिष्ट भोजन करणे कमी कराल तर त्याविषयीचा लोभ किंवा तृष्णा कमी होत जाईल.

       आपण विपश्यना शिबिरात तृष्णेपासून सुटका मिळविण्यासाठी येत असतो, त्यासाठी तेथे असे वातावरण निर्माण केली जात नाही कि शिबिरार्थ्यांची तृष्णा वाढेल. प्रत्येक जन आपली तृष्णा वाढणार नाही याची काळजी घेतोय. आपण सर्व तृष्णेला डावलू इच्छितो, दूर करू इच्छितो. आपण सर्व एक तर तृष्णेला दूर करू किंवा स्वादिष्ट भोजन करून तिला वाढवूया. म्हणून शिबिरात संध्याकाळी जेवण दिले जात नाही. अशा प्रकारे विपश्यना शिबिरात तृष्णेला कमी करण्यात मदत केली जाते. हे सर्वांसाठी चांगले आहे, कारण कि, शिबिरात संध्याकाळी जेवण केल्यावर नक्कीच गुंगी येईल. आपण याशिवाय हि राहू शकतो. जर सकाळचा नाष्टा व दुपारचे जेवण व्यवस्थित घेतले तर आपल्या शरीराची गरज पूर्ण होईल.

*_५) माराची पाचवी सेना – स्त्यान व म्रुद्ध आहे (थिन आणि मिद्ध)_*

       शिबिरात सहभागी झालेले काही विद्यार्थी बसल्या-बसल्या झोपी जाऊ शकता. साधारणतः बसल्या बसल्या घोरायला लागणारे लोक खूप नसतात. परंतु काही शिबिरार्थी असे असतात कि जे बसल्या बसल्या घोरायला लागतात आणि काही वेळाने जागे होतात. यालाच थिन मिद्ध म्हणतात. याला टाळता येत नाही. जेव्हा स्मृती आणि संप्रज्ञान खुप तीक्ष्ण होईल तेव्हा निर्वाणाचे शांत स्वरूप अनुभवावर उतरेल आणि तेव्हा कुशल आणि अकुशल मध्ये दंव्द चालेल तेव्हा त्याच्या प्रतिक्रियेमुळे उष्णता निर्माण होईल व तेव्हा मनुष्याला गुंगी येऊ लागते, झोप येऊ लागते.

       जर आपल्याला कधी कधी गुंगी येऊ लागली तर जर जोराने श्वास घ्या कारण आपली समाधी तुटली आहे. हे आतून संस्काराचे उखडणे आहे, आपली समाधी भंग पावली आहे. कधी-कधी जेव्हा “अनित्य विद्या” बलवान होते तेव्हा आपण आपल्या शरीरावर होणार्या शारिरीक व मानसिक अनुभवाना बघू शकतो आणि आपले विपश्यना ज्ञान खूपच तीक्ष्ण आणि बलवान होते. तेव्हा कोठल्या दबलेल्या संस्काराचा मोठा प्रहर होतो आणि आपण अनित्यतेचे ज्ञान धाल्वून बसतो आणि पुन्हा आत्म विस्मृतींच्या स्थितीमध्ये येतो. जर असा प्रसंग अचानक घडला तर याचा साना करण्याचे दोन उपाय आहेत. एक उपाय तर हा आहे कि, आपल्या स्वतःला समाधी मध्ये स्थिर करणे म्हणजे आपण जी प्रतिक्रिया केली आहे ती निघून जाईल जेव्हा असे घडेल तेव्हा जावून झोपू नये. व्यावहारिक दृष्टीकोनातून हे महत्वाचे आहे कोणता आंधळेपणा तेव्हा येतो जेव्हा संस्कार वर येतात. तेव्हा दृढतापूर्वक आपल्याला अनित्यतेची भावना केली पाहिजे. नुसते अनित्य, अनित्य म्हणून उपयोग होणार नाही, हे म्हणणे दिखावटी नको, हे वस्तुतः संवेदनांच्या अनित्यतेच्या अनुभवाला जाणून केले पाहिजे. जर आपणा असे करू तर आपला विजय निश्चित आहे.     

_*६) माराची सहावी सेना – एकटे न राहण्याची इच्छा आणि एकांतवासाची भीती वाटणे*_

       काही जण एका खोलीत सुद्धा राहू शकत नाहीत, त्यांना कोणी सोबत मिळेल म्हणून खोली बदलत राहतात. एकट्या खोलीत त्यांना भीती वाटते. ध्यान करताना काही जण खोलीत लाईट चालू ठेवण्याची परवानगी मागतात आणि त्यांना ती परवानगी दिली जाते. इतकेच नाहीतर काहीजणांची इच्छा असते कि, ध्यान करताना त्यांच्याजवळ कोणीतरी बसावे. एकटे राहण्याचे धाडस ते करू शकत नाहीत. त्यातील जेव्हा एकटे असायचे तेव्हा त्यातील काही जणांचे शरीर लाल होत असे. शिबीर समाप्त झाल्यावर त्यांना बरे वाटले. दुसर्या शिबिरात ते अंधाऱ्या शुन्यागारात बसू लागले. भीती वाटणे भीतीचा अनुभव होणे यात काही जण अव्वल असतात परंतु शिबिरात बसल्यानंतर त्यांची भीती आता उडून गेली.

*_७) माराची सातवी सेना – विचिकित्सा आहे, संदेह आहे. जसे एखाद्याला या गोष्टीची शंका आहे कि, तो ध्यान भावनेमध्ये यशस्वी होईल अथवा नाही._*

       शंका प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे जी अशी चिंता करत राहते कि तिची साधना सफल होईल कि नाही? मुख्य गोष्ट हि आहे कि अकुशलाला दूर ठेवा, अनुशय क्लेशांना दूर ठेवा, त्यांना नष्ट करा हि मुख्य गोष्ट आहे.  

*_८) माराची आठवी सेना – जेव्हा ध्यान भावना सफल होऊ लागते तेव्हा व्यक्तीला गर्व येतो, त्यामध्ये उद्धटपण आणि आखडलेला येतो._*

       जेव्हा ध्यानभावनेत प्रगती होते, तेव्हा व्यक्तीला आतमध्ये जाणवू लागते. मनोविकार कमी होतात, त्यांची शक्ती कमी होते आणि व्यक्ती विचार करू लागते कि कोण दुसरा इतके चांगले ध्यान करत नाहीये जितके कि करत आहे, का मी त्याची मदत करू नको?जेव्हा काही जण परिश्रम करण्याची, कठोर परिश्रम करण्याची गोष्ट सांगत असे तेव्हा त्यांच्या गोष्टीमध्ये दंभ होता, घमेंड होती, अहंकार होता कि मी ठीक प्रकारे विपश्यना करीत आहे व हे इतर तर ठीक करत नाही आहेत. जेव्हा क्रोधि व्यक्तीचा, ज्याच्या शरीरात खूप उष्णता आहे, संस्कार उखडतो, तर शरीरावर ती उष्णता फुटून बाहेर पडते. दुसऱ्या दिवशी तो ध्यान करू शकत नाही, त्याला कोणतीही संवेदना जाणवली नाही आणि त्याला गुरुजींकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जावे लागते.

*_९) माराची नववी सेना – हे आचार्यांविषयी आहे, असे आचार्य ज्यांना खूप लाभ-सत्कार मिळत आहे._*

       मला खूप लाभ-सत्कार मिळाला, यामुळे माझ्यामध्ये घमंड येऊ देता कामा नये. तिला येण्यापासून थांबवले पाहिजे. एवढा सत्कार मिळाल्यावर कोणाला घमंड येणार नाही? मला स्वतःला सावधान ठेवले पाहिजे, माझी रक्षा केली पाहिजे.

*_१०) माराची दहावी सेना – कोणा धर्माचे, खोट्या धर्माचे अनुसरण करणे, एका नव्या अजून विशेष धर्माला स्थापित करणे, यासाठी करणे कि, खूप दान – दक्षिणा मिळेल, एकाची प्रशंसा आणि दुसर्यांची निंदा करणे._*

       काही आचार्यांना दान-दक्षिणेविषयी आसक्ती होते, ज्यामुळे त्यांच्याकडे अजून अधिक विद्यार्थी येतील, ते तेच शिकवतात जे विद्यार्थ्यांना आवडते. ते बुद्धांची शिकवण न देता खोटी शिकवण देतात कारण त्यांना दान-दक्षिणा, लाभ-सत्कार हवा असतो. ते सद्धर्माच्या गोष्टी करीत नाहीत, त्यानुसार साधना करीत नाहीत. काम करीत नाहीत. हीच माराची दहावी सेना आहे.

       धर्म दुःखाला, शोकाला दूर करतो आणि सुख प्रदान करतो. हे सुख कोण देते? हि आपल्या आत जागलेली अनित्य विद्या आहे, जी सुख देते. आपल्याला विपश्यनेचा अभ्यास केला पाहिजे ज्याने अनित्य विद्येचे ज्ञान नेहमी होत राहील, अनित्येचे दर्शन प्रतिक्षण होत राहील. त्यासाठी चार तत्त्वांवर ध्यान केंद्रित करून अभ्यास करावा :-

१)      *_शांत होऊन समाधीचा अभ्यास करताना शील भंग होऊ देता कामा नये._*

२)      *_खोटे बोलण्यापासून वाचले पाहिजे, कारण हे शील खूप लवकर तुटते._*

३)      मला दुसर्यापासून याचे भय नाही परंतु खोटे बोलून मी आपल्या शीलाचा आधार कमकुवत करतो, जेव्हा शील कमकुवत होते तेव्हा समाधी पण कमकुवत होते आणि प्रज्ञा सुद्धा कमकुवत होते.

४)      खरे बोला, नियमित काम करा, अभ्यास करा, समाधीला दृढ करां आणि यावर लक्ष दया कि, आपल्या शरीरावर काय होत आहे.

असे केल्याने अनित्यतेची प्रकृती स्वाभाविक रूपाने प्रकट होईल. खूप तीव्र अनुभव, सतत कापत राहणे, अस्तावस्त होणे, जळत राहणे, शरीराचा विनाश होने हीच अनित्यतेची लक्षणे आहेत. जे नित्य बदलत आहे, परिवर्तीत होत आहे.

एकदा जेव्हा ध्यानाचा अभ्यास होतो आणि शिबिरार्थी विद्यार्थी सावधान होऊन विपश्यना ज्ञानाने बघू लागतो तेव्हा जितके अकुशल मनोविकार आहेत ते अधिक काळापर्यंत राहू शकत नाहीत. त्यांना बाहेर पडावेच लागेल आणि जेव्हा ते अकुशल मनोविकार निघून जातात तेव्हा व्यक्ती स्थिर होतो, संयमित होतो आणि चांगले जीवन जगण्यायोग्य होतो.

निर्वाणाच्या अंतिम अवस्थेपर्यंत पोहोचणे, जेथे सर्व संस्कार नष्ट होतात, ती खुप दूरची गोष्ट आहे, पण त्यासाठी त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट, मेहनत करू इच्छित नाही आणि निर्वाणाची झळक ,मिळवू इच्छित नाही? निर्वाणाची अनुभूती मरणोपरांत नसून ती जिवंतपणी अनुभविण्याची गोष्ट आहे. आणि त्या अनुभूतीचा स्वाद चाखण्यासाठी देश विदेशातील शिबिरार्थी विद्यार्थी इतक्या दूर येतात. ह्या अभ्यासातून मिळण्यार्या सुख आणि शांतीचा अनुभव आपल्या परिचितांना, मित्रांना व्हावा म्हणून ते स्वःत हि येतात आणि त्यांना हि शिबिरात घेऊन येतात. हि महत्वपूर्ण गोष्ट आहे कि, धर्म रसाला चाखण्यासाठी आचार्यांची, गुरुजनांची आवश्यकता असते. परंतु अभ्यासकांना याचा स्वाद चाखायचा असेल तर त्यांना त्यासाठी मध्यम मार्गाने खूप मेहनत करावी लागते. या रसाला धर्म रस म्हणतात, जो सर्वात उत्तम आणि उदात्त रस आहे.

लेखाचा शेवट करताना बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म यात सिद्धार्थ गौतमावर माराच्या सेनेने केलेला हल्ला आणि त्यावर सिद्धार्थ गौतमाने कसा विजय प्राप्त केला हे पाहणे खूप अगत्याचे होईल.:-

वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची / कामाची मुले असे म्हणतात. ज्यांनी सिद्धार्थ गौतमाच्या मनावर आक्रमण केले होते, पण त्यावेळी सिद्धार्थ गौतमाने सगळे धैर्य एकवटून माराला म्हणाला ते खूप महत्वपूर्ण आहे – “माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे, आणि शहाणपण आहे, तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्याचे प्रवाह देखील वार्यामुळे कोरडे पडतील. पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते!” ह्या अश्या दृढ निश्चयामुळे सिद्धार्थ गौतमाने मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकले आणि मारावर विजय मिळविला आणि ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या आपल्या उद्देशावर ठाम राहून ज्ञान प्राप्ती केली, निर्वाण प्राप्त केले.

या निर्वाणाच्या रसाला चाखण्यासाठी आपल्या खूप मेहनत, परिश्रम घ्यावे लागणार आहे. ज्याप्रमाणे राजा सांसारिक सुखाचा आनंद घेतो, देव दिव्य सुखांचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे बुद्ध आणि अरहंत त्या धर्म रसाला चाखू शकतात, ज्याला त्यांनी प्राप्त केले आहे. आपल्याला सुद्धा त्यासाठी कठीण मेहनत, कष्ट करायचे आहेत जोपर्यंत आपण धर्म रस चाखणार नाही तोपर्यंत. त्यासाठी बुद्धांनी दिलेल्या मध्यम मार्गावर चालावे लागेल. बुद्धांचा मार्गच आपल्याला निर्णाण प्राप्ती कडे घेऊन जाणारा आहे. मनामध्ये असणारी श्रद्धा, शौर्य, आणि शहाणपण हे जे सिद्धार्थ गौतमाकडे होते त्याद्वारे त्यांनी मारावर विजय मिळवून भगवान बुद्ध झाले, तसेच आपण हि मनामध्ये श्रद्धा, शौर्य आणि शहाणपण जागृत करून दृढ निश्चयाने भगवान बुद्धांनी दिलेल्या या मार्गावर चालून आपण सर्व आपले आणि इतरांचे मंगल करू, सर्वांचे मंगल हो! 

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

*_- महेश कांबळे_*

(मुंबई)

१०/०७/२०२१

संदर्भ :

१) पधानसुत्त  

२) बौद्धधर्म – एक बुद्धिवादी अध्ययन

३) सयाजी उ बा खिन यांचे विपश्यना शिबिरातील प्रवचन

४) भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

1 comment:

  1. खूपच छान माहिती आहे. मी कधी विपश्यना केली नाही पण माझे
    पप्पा नेहमी जातात. आई ही गेली होती.धन्यवाद आणि अभिनंदन माहिती साठी.

    ReplyDelete

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...