🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अहिंसा_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_9.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अहिंसा किंवा जीवहत्या न करणे हे बुद्धांच्या देशनेचे महत्त्वपूर्ण अंग आहे. या तत्त्वाचा करुणा आणि मैत्री या तत्त्वांशी अत्यंत निकटचा असा संबंध आहे._*
_तरीही असा प्रश्न उपस्थित केला जातो की, काय बुद्धांची अहिंसा अनिवार्यतः निरपेक्ष होती अथवा सापेक्ष होती. काय अहिंसा एक शील होती अथवा तो एक नियम होता._
_जे लोक बुद्धांची देशना स्वीकारतात त्यांना अहिंसा हे एक अनिवार्य निरपेक्ष तत्त्व आहे हे स्वीकारणे कठीण जाते. त्यांची अशी मान्यता आहे की अहिंसेला अनिवार्य निरपेक्ष तत्त्व म्हणून स्वीकारले तर अकुशलासाठी कुशलाचे बलिदान होईल किंवा दुर्गुणास्तव सद्गुणांचा त्याग करावा लागेल. या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे. अहिंसा विषयासंबंधी जेवढा गोंधळ आहे तेवढा गोंधळ अन्य कोणत्याही विषयासंबंधी नाही._
_बौद्ध राष्ट्रातील लोकांनी अहिंसा कशी समजून घेतली आणि कशी आचरणात आणली ? हा महत्त्वाचा प्रश्न असून त्यावर गंभीरतेने विचार होणे आवश्यक आहे._
१. श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू विदेशी आक्रमकांविरुद्ध स्वतः लढले आणि लोकांनाही त्यांनी लढण्यास प्रवृत्त केले.
२. तर दुसरीकडे ब्रह्मदेश येथील भिक्खू स्वतः विदेशी आक्रमकांविरुद्ध लढले नाहीत आणि त्यांनी लोकांनाही लडण्यापासून परावृत्त केले.
३. ब्रह्मदेशचे लोक अंडे खातात पण मासे खात नाहीत.
अहिंसेला समजून घेणे आणि ता आचरणात आणणे याविषयी स्थिती ही अशी आहे.
४. नुकतेच जर्मन भिक्खू महासंघाने पंचशीलापैकी अहिंसेसंबंधी प्रथम शील आहे ते सोडून सर्व शीलांच्या स्वीकारण्याचा प्रस्ताव पारित केला._
*_अहिंसेच्या सिद्धांताविषयी स्थिती वो ही अशी आहे._*
*_अहिंसेचा खरा अर्थ_*
*_बुद्धांनी कोठेही अहिंसेची व्याख्या दिली नाही. वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी क्वचितच निश्चित शब्दावलीत या विषयाची चर्चा केली आहे._*
_म्हणून परिस्थितीजन्य साक्षीच्या आधारावरच बुद्धांना याविषयी काय अपेक्षित होते. काय अभिप्रेत होते हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. *प्रथम परिस्थितीजन्य साक्ष अशी उपलब्ध आहे की, जर भिक्षेत मांस मिळाले तर ते ग्रहण करण्यात बुद्धाला कोणतीही आपत्ती नव्हती, आक्षेप नव्हता.*
_भिक्खू दानात मिळालेले मांस ग्रहण करू शकत होते. पण ते त्या प्राण्याच्या हत्येत सहभागी नसावे. त्या हत्येशी त्यांच्या संबंधित नसावा._
१. *भिक्खूंना भिक्षा म्हणून मिळालेलं मांस ग्रहण करण्यापासून प्रतिबंधित करावे या देवदत्ताच्या आग्रही प्रस्तावाचा बुद्धांनी विरोध केला.*
२. या संबंधी दुसरी साक्ष उपलब्ध आहे ती ही की, *त्यांचा फक्त यज्ञात प्राण्यांच्या हत्येला, वधाला विरोध होता आणि हे त्यांनी स्वतःच कथन केले आहे.*
*_अहिंसा परमोधर्म हा पराकोटीचा सिद्धांत आहे. हा जैनांचा सिद्धांत आहे. हा बुद्धांचा सिद्धांत नाही._*
३. आणखी एक प्रत्यक्ष साक्ष आहे. ती परिस्थितीजन्य असण्यापेक्षा प्रत्यक्ष असल्याने ती अहिंसेची व्याख्याच म्हणावी लागेल. ते असे म्हणतात की, *सर्वांशी मैत्री करा. सर्वांवर प्रेम करा म्हणजे तुम्हाला कोणाचाही वध करण्याची इच्छाच होणार नाही. अहिंसेच्या सिद्धांताची सकारात्मक मांडणी करण्याचाच हा प्रकार आहे.*
_यावरून हे स्पष्ट होते की अहिंसेचा सिद्धांत असे म्हणत नाही की, वध करू नका. तो असे म्हणतो की सर्वांप्रती प्रेम करावे. सर्वांप्रती मैत्रीभावना असावी._
*_या विधानाच्या प्रकाशात बुद्धांच्या अहिंसेचा अर्थ काय? त्यांच्या अहिंसेचा अभिप्राय काय? हे समजून घेणे सोपे आहे. शक्य आहे._* यावरून हे स्पष्ट होते की *बुद्धांनी "जीवहत्या करण्याची चेतना" आणि "जीवहत्या करण्याची आवश्यकता" यात भेद केला आहे.*_
*_जेथे जीवहत्या करण्याची आवश्यकता आहे तेथे त्यांनी जीव हत्या प्रतिबंधित केली नाही. जेथे जीवहत्या जीवहत्येच्या चेतनेचा परिणाम म्हणून घडते तेथे त्यांनी जीवहत्या प्रतिबंधित केली._*
_अशाप्रकारे हा सिद्धांत समजून घेतला, तर बुद्धांच्या अहिंसेचा सिद्धांत समजून घेताना कोणताही गोंधळ होण्याचे काहीही कारण नाही. हा सिद्धांत पूर्णाशाने भक्कम असा नैतिक सिद्धांत आहे. त्याचा प्रत्येकाने आदर केलाच पाहिजे._
_*जीवहत्या आवश्यक आहे अथवा नाही याचा निर्णय त्यांनी व्यक्तिविशेषावरच सोडला आहे यात शंका नाही. नाहीतर मग त्यांनी हा निर्णय कोणावर सोपविला असता. *माणसाला प्रज्ञा आहे आणि त्याने प्रज्ञेचा उपयोग केलाच पाहिजे.*_
_योग्यसमयी व्यावच्छेदक रेषा नीतिमान माणसाला आखता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवलाच पाहिजे. *ब्राह्मणी धर्मात जीव हिंसेच्या चेतनेला स्थान आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याच्या चेतनेला स्थान आहे.. बुद्धांची अहिंसा ही त्यांच्या मध्यम मार्गानुरूप आहे.*_
_वेगळ्या प्रकारे मांडावयाचे झाल्यास बुद्धांनी शील आणि नियम यात भेद केला आहे. *त्यांनी अहिंसेला शील मानले. जीवनाचा पथ मानले.* या संदर्भात ते अत्यंत सुज्ञपणे वागले यात शंकाच नाही._
_*शील तुम्हाला कार्य करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते. नियमात हे स्वातंत्र्य नसते. एकतर नियम तुम्हाला मोडतो किंवा तुम्ही नियमाला मोडता.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०९/०७/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment