Monday, 8 July 2024

ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_8.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

नवयुग : आंबेडकर विशेषांकासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी दिलेला संदेश

                   _माझ्या पंचावन्नाव्या वाढदिवशी तुम्ही खास अंक काढीत आहात. त्यासाठी तुम्हाला संदेश पाहिजे आहे. *आपल्या या हिंदुस्थानामध्ये राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषाप्रमाणे मान दिला जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानाबाहेर केवळ महापुरुषांच्याच जयंत्या साजऱ्या केल्या जातात. पण हिंदुस्थानांत अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात. हैं असें असावें ही दुःखाची गोष्ट आहे. व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळींच आवडत नाही. मी लोकशाहीचां कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूतिपूजा कशी आवडेल ? विभूतिपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याबद्दल कौतुक, प्रेम, आदर ह्या भावना बाळगायला हरकत नाही. तथापि तेवढ्यानेच त्या पुढाऱ्याऱ्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे समाधान व्हावयास हवे. पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा करणें ही गोष्ट मला बिलकूल मान्य नाही. त्यामुळे त्या पुढाऱ्याबरोबर त्याच्या भक्तांचाही अधःपात होतो.* पण हे ह्या ठिकाणी सांगून काय फायदा ? राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषांच्या आसनावर एकदा चढवून बसविले म्हणजे त्याला तें आपलें सोंग उत्तम तन्हेने पार पाडलेच पाहिजे आणि आपल्या अनुयायांना संदेश हा दिलाच पाहिजे !_

_अस्पृश्यांना मी काय संदेश देऊ बरे ? संदेश देण्याऐवजी मी त्यांना ग्रीक पुराणांतील एक गोष्ट सांगतो. डिमेटर ह्या ग्रीक देवतेवर होमरने लिहीलेल्या स्तोत्रांत ही गोष्ट आलेली आहे._

                _ही डिमेटर देवी आपल्या मुलीच्या शोधार्थ हिंडत केलीओसच्या राज्यांत आली तिने दाईचा वेष घेतला होता. म्हणून तिला कोणी ओळखले नाही. राणी मेहोनैराने आपले डिमोफून नांवाचे तान्हे मूल सांभाळण्यासाठी तिची नेमणूक केली. रोज रात्री राजवाड्यांतली सर्व मंडळी झोपली म्हणजे दारे बंद करून डिमेटर देवी ह्या मुलाला पाळण्यांतून हळूच बाहेर काढी आणि त्याचे कपडे उतरून ती त्याला जळत्या निखाऱ्यावर ठेवी ऐकणाराला कदाचित हे क्रूर वाटेल. पण त्या लहान मुलाला देव करण्याच्या महान तळमळीनें आणि प्रेमानें ती हे करीत असे. हळूहळू जळत्या निखाऱ्याची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झालें. त्याचे बळ वाढू लागले. त्याच्यामध्ये कांही तरी तेजस्वी, दिव्य, अतिमानुष अंश विकसित होऊ लागला. पण एके रात्री त्याची आई एकाएकी खोलीत शिरली आणि आपल्या मुलाचा नारायण करण्याचा देवतेने चालविलेला तो प्रयोग बघतांच तिने त्या देवतेला ढकलून दिले. आणि निखाऱ्यावरून मूल एकदम उचलले. अर्थात तिचे मूल तिला मिळाले, पण एका अतिमानुष पुत्राला, एका देवाला मात्र ती मुकली._

              _ही गोष्ट काय सांगते? हेंच की, *विस्तवातून गेल्यावाचून पौरुष किंवा देवपणा प्राप्त होत नाही। अग्नीमधून गेल्यावांचून माणसाची शुद्धी होत नाही. आणि त्याचे बळ वाढत नाही.*_

                   _म्हणून *पददलित माणसांना हालअपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्निदिव्यांतून गेल्यावांचून मोठेपणा प्राप्त होणार नाही! आपला भविष्यकाळ घडविण्यासाठी त्यांना वर्तमानकाळातील सुखांचा आणि गरजांचाही त्याग करावयाला पाहिजे.*_

                 _बायबलमध्ये सांगितले आहे की, आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते, पण फार मोठे लोक त्यातून उत्तीर्ण होतात. असे कां ? त्याचें कारण हेंच की *भविष्याच्या गरजेसाठी वर्तमानातल्या विलासांचा त्याग करायला लागणारे धैर्य किंवा निर्धार पद्दलित माणसाजवळ नसतो. म्हणून आयुष्याच्या शर्यतीमध्ये त्यांना मोठेपणा मिळत नाही.* ह्या ग्रीक गोष्टीपेक्षां अधिक महान संदेश कोणता आहे ?_

              _माझ्या मते अस्पृश्यांना तर हा सर्वोत्कृष्ट संदेश आहे. त्यांच्या झगड्यांची आणि हालांची मला जाणीव आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी माझ्याहीपेक्षा त्यांनी छळ सोसला आहे. असें असूनही मी त्यांना हाच संदेश देतो आहे की, *झगडा, आणखी झगडा, त्याग करा. आणखी त्याग करा त्यागाची आणि हालाची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ति मिळेल! जागे होऊन प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ति वाढली पाहिजे । आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढ विश्वास पाहिजे. आपलें ध्येय हस्तगत करण्याचा त्यांनी संघटितपणे निर्धार केला पाहिजे.*_

 अस्पृश्यांचे कार्य इतके महान आहे. आणि त्यांचे ध्येय इतके उदात्त आहे की, त्यांनी एकमुखाने अशी प्रार्थना करावी की : "ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणें आपलें कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत । गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन, मन, धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत. आणि अत्स्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे बऱ्याची वाईटाची सुखाची, दुःखाची, संकटाची, वादळाची, मानाची, अपमानाची पर्दा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होत

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २०*_

*_२) नवयुग, आंबेडकर विशेषांक, १३ एप्रिल १९४७_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 


No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...