🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा आठ व्यक्ती_*
*_भंते नागसेन, चर्चेचा विषय बिघडवून अर्थाचा अनर्थ करणारे आठ प्रकारचे लोक असतात. म्हणून महत्वपूर्ण चर्चा करीत असता त्यांचा संग टाळला पाहिजे," ते आठ प्रकारचे लोक असे -_*
*१)* लालसी
*२)* द्वेषी म्हणजे दुष्ट
*३)* भ्रमिष्ट
*४)* गर्विष्ठ
*५)* लोभी
*६)* आळशी
*७)* एकच कल्पना धरून ठेवणारी हट्टी
*८)* मूर्ख
_स्थविर म्हणाले, "महाराज, या आठ प्रकारच्या लोकांत कोणते दोष आहेत की, जेणेकरून त्याचा संग त्याज्य मानला आहे?_
*_भंते, लालसी व्यक्ती लालसेपायी, दुष्ट व्यक्ती आपल्या दुष्टपणाने, भ्रमिष्ट व्यक्ती अभिभूत स्वभावामुळे म्हणजे भ्रामक कल्पनांमुळे, गर्विष्ठ व्यक्ती गर्वाभिमाने, लोभी व्यक्ती लोभाच्या कारणाने, आळशी मनुष्य आळसामुळे, एकच कल्पना धरून ठेवणारा हट्टी मनुष्य संकुचितपणाने आणि मूर्ख व्यक्ती मुर्खपणामुळे एकदमच अर्थाचा विचका करून टाकतो."_*
*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment