🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मेण्डकारंभ कथा_*
*_बुद्ध पुजा_*
*पृथ्वीची उपमा*
_"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_
_"महाराज, पृथ्वीला अशी इच्छा असते का की आपणात सर्वच प्रकारचे बीज पेरले जावे?"_
_"नाही भंते, ती अशी इच्छा कशी करील?"_
_"मग पृथ्वीची इच्छा किंवा मान्यता नसताही बीज फुटून रोपटे वाढून मोठमोठ्या खोडांचे, विस्तीर्ण शाखांचे वृक्ष होऊन जमिनीत आपली मुळे रुतवून ताठ उभे राहतात, फुलतात, ते पृथ्वीच्याच आधाराने हे कसे घडते? त्यात बीज का पेरले जाते?"_
_"भंते, पृथ्वीकडून जरी मान्यता मिळाली नाही, हे खरे असले, तरी पण बीज फुटून रोपटे तयार होण्यासाठी व त्याच्या विकासासाठी पृथ्वीच आश्रय देते. पृथ्वीतच पेरलेले बीज उगवून ते विकसित होऊन शेवटी खोड तयार झाल्यानंतर फुले, फळे व विस्तीर्ण असा शाखासंभार धारण करणारे मोठे वृक्ष होतात."_
*_"महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मताच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप म्हणजे स्वीकार न करण्याप्रति केल्या जाणाऱ्या व्यवहारात कांहीच अर्थ नाही. हा एकदम अशिष्ट, निरर्थक आणि खोटा ठरतो."_*
*_"महाराज, भगवान अर्हत सम्यक सम्बुद्धांना या महान पृथ्वी समान समजले पाहिजे. या महान पृथ्वीप्रमाणे ते कशाचाही स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आश्रयाने बीज उगवून त्यांचेच मोठमोठे वृक्ष होतात, त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या शरीर धातूंच्या सुरक्षिततेसाठी विहार व स्तुपांची उभारणी करून त्या अवशेषांची पूजा व भगवंताच्या आदेशाचे पालन इत्यादींचा आश्रय घेऊन देवता आणि मनुष्यलोक पुण्य फळरूपी मुळांनी मजबूत पकडून समाधी-स्कंध, धर्म-सार आणि शीला (सदाचार) चा शाखा संभार केलेलं मोठमोठे वृक्ष तयार होतात आणि त्या वृक्षांना श्रामण्यरूपी फुले व विमुक्तीरूपी फळे येतात."_*
*_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले, तरी त्यांच्याप्रती केली जाणारी पूजा ही अचूक फळ देणारी ध्येयसिद्धीस कारण होणारी आहे."_*
*-क्रमशः*
*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment