🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मेण्डकारंभ कथा_*
*_बुद्ध पुजा_*
*ढोलाची उपमा*
_"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_
_"महाराज, कोणी एका मनुष्याने ढोलावर थाप मारली असता आवाज निघून नंतर बंद झाला, तर काय तो बंद झालेला आवाज पुन्हा फिरून येण्याची इच्छा करील काय?"_
_"नाही भंते, शिवाय आवाजास विचार नाही की, कल्पना नाहीत. एकदा आवाज निर्माण होऊन बंद पडला म्हणजे पुनः निर्माण होण्याची त्याला इच्छा ती कशी व्हावी? ढोलाचा आवाज निर्माण होऊन बंद पडला की, तो कायमचाच बंद होतो. परंतु आवाज काढण्याकरिता ढोल हे एक साधन आहे. तेव्हा जर तसा प्रसंग आलाच तर कोणीही मनुष्य ढोलावर थाप मारून आवाज उत्पन्न करू शकतो."_
*_"महाराज, याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्ध शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती, विमुक्तीज्ञान आणि दर्शनाने परिभावीत शरीर धातुरुपी रत्ने, धर्म आणि विनय इत्यादी देऊन स्वतः निर्वाण लाभ करून संसारातून स्वतःची सुटका करून घेतली परंतु भगवान जरी मुक्त झाले असले तर तिन्ही समापत्तींचा लाभ काही थांबत नाही. सांसारिक दुःखाने त्रस्त झाल्यामुळे जे कोणी या तिन्ही समापत्तीचा लाभ करू इच्छितात, ते भगवान बुद्धांच्या विहारांची निर्मिती करून त्यात त्यांच्या शरीर धातूंची स्थापना करतात आणि श्रद्धाभावे त्या धातूंची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान मार्गाचे आचरण करून ते तिन्ही समापत्तींचा लाभ करून घेऊ शकतात."_*
*_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वानाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी आहे."_*
*_"महाराज, भगवंताने भविष्यात घडून येणारा हा प्रसंग तेव्हाच आपल्या दूरदृष्टीने जाणून घेतला होता. म्हणूनच त्यांनी समजावून सांगितले होते की -_*
*_आनंद, तुमच्यापैकी कोणाच्या तरी मनात असे विचार येऊ शकतात की, आम्हाला मार्गदर्शन करणारे शास्ता तर निघून गेले. आता आम्हाला सद्धर्माची वाट दाखविणारा गुरू कोणी उरला नाही. परंतु तुम्ही असे समजून घेऊ नये. आनंद, असे पश्चाताप करण्यासारखे काहीही कारण नाही. मी ज्या सद्धर्माचा आजपर्यंत उपदेश केला. संघासाठी पालन करावयाचे जे नियम सांगितले. माझ्यानंतर तेच तुम्हाला मार्ग दाखवतील म्हणून त्यांनाच तुम्ही माझ्यास्थानी मानले पाहिजे."_*
*_याही कारणाने जरी आता भगवान बुद्ध राहिले नाही व त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा निरर्थक होऊ शकत नाही. इतर पंथांच्या लोकांनी घेतलेले आक्षेप अगदी खोटे, अन्यायी, वस्तुस्थितीस सोडून आणि केवळ विरोधाभास निर्माण करणारे आहेत, हे आता सिद्ध झाले. हे दुःखाचे कारण आहे, कारण दुःख हे खोटेपणाचे फळ आहे व अध:पाताच्या मार्गाने नेणारे आहे."_*
*-क्रमशः*
*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment