Friday, 11 September 2020

मेण्डकारंभ कथा - बुद्ध पुजा _ वादळाची उपमा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                   *_मेण्डकारंभ कथा_*

                       *_बुद्ध पुजा_*

            *(१) वादळाची उपमा*

     

    _"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_


      _"महाराज, समजा, एकदा खूप मोठे वादळ आले आणि हळूहळू ते शांत झाले. तर ते एकदा शांत पावल्यानंतर पुनः फिरून येईल काय?"_

      _"नाही भंते, शांत पावलेले वादळ पुनः कसे काय फिरून येऊ शकेल?"_

        _"असे का होऊ नये?"_

        _"कारण की, वादळ म्हणजे अगदीच अचेतन वस्तू आहे. त्याला इच्छा ती कशी नसतेच."_

       _"महाराज, ते शांत पावल्यानंतरही त्यास वादळ नावानेच ओळखले जाते काय?"_

       _"नाही भंते, परंतु पंखा हेही एक वारा निर्माण करण्याचे साधन आहे. ज्या कोणाला उकाडा जाणवत असेल किंवा ताप आल्यामुळे वाऱ्याची गरज भासत असेल तर पंख्याच्या साहाय्याने वारा निर्माण करता येतो. काही प्रमाणात का होईना पण त्या वाऱ्यापासून उकाडा किंवा ताप या अवस्थेत आराम मिळविता येते."_


         _*"महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखणी करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप खोटा ठरतो की, 'पूजेचा स्वीकार न करणारांची पूजा व्यर्थ आहे."*_


         *_"महाराज, जसे वादळ आले, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा आपल्या शीतल, मधुर, शांत, सुखदायक आणि मैत्रिरूपी वायू लहरींनी या दहा हजार लोक धातूंवर वहात राहिले. ज्याप्रमाणे ते वादळ येऊन शांत झाले तद्वतच भगवान बुद्धाने निर्वाणाचा लाभ करून संसारातून मुक्ती प्राप्त करून घेतली. जसे शांत झालेले वादळ पुनः परत येण्याची इच्छा करीत नाही, तसेच या जगतावर महान उपकार करणारे तथागत स्वीकार किंवा अस्वीकाराच्या कामनेतून पुर्णतः मुक्त झाले. जसे ते मनुष्य गर्मीमुळे किंवा तापामुळे तळमळत होते, तसेच देवता आणि मनुष्य लोक लालसा, दुष्टपणा व भ्रमरूपी तापाने तळमळत आहेत. ज्याप्रमाणे पंखा हा वायू उत्पन्न करण्याचे साधन आहे तद्वतच भगवान बुद्धाचे शरीर-धातू-रत्न हे तिन्ही समापती आणण्याकरिता साधन आहेत. ज्याप्रमाणे गर्मी व तापाने तळमळणारे लोक पंखा हलवून वारा उत्पन्न करतात आणि ताप दूर करतात त्याचप्रमाणे देवता आणि मनुष्य लोक शरीर धातूंची पूजा करून व भगवान बुद्धाने सांगितलेल्या ज्ञान रत्न-मार्गाचे आचरण करून पुण्य लाभ करतात आणि लालसा, दुष्टपणा व भ्रमरूपी अग्नीच्या तापास दूर करतात._*


        *_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा ही तत्काळ फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी ठरते."_*


                      *-क्रमशः*


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...