🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मेण्डकारंभ कथा_*
*_बुद्ध पुजा_*
*पोटातील कृमींची उपमा*
_"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_
_"उंट, बैल, गाढवे, बकरे तसेच इतर जनावरे आणि मनुष्यप्राणी आपल्या उदरात कृमींनी उत्पन्न व्हावे म्हणून सम्मती देतात काय?"_
_"नाही भंते, तशी सम्मती ते कशी काय देणार?"_
*_"तर मग महाराज, हे कृमी त्यांची मान्यता न घेताच त्यांच्या उदरात जन्मास येतात आणि असे ठाण मांडून बसतात की, जणू त्यांचीच हक्काची भूमी आहे. तेवढ्या वरच ते थांबत नाही तर संतती देखील इतकी जन्मास घालतात की, विचारच करीत रहावे लागते."_*
_"भंते, असे त्या प्राण्यांच्या वाईट कर्माने घडते."_
*_"महाराज, अगदी याच उदाहरणाप्रमाणे जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले आणि संसारातून एकदम आपली सुटका करून घेतली तरी पण त्यांच्याप्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येयसिद्धीस कारण होणारी ठरते."_*
*-क्रमशः*
*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment