🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_शुभ कर्मांची / कुशल कर्मांची आवश्यकता_*
एके समयी भगवान भिक्खुंना म्हणाले,
*_"सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, ईप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म, सत्कर्माचा लाभ म्हणजे ईप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे नि त्याची ग्वाही मी देऊ शकतो."_*
_"मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे, तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे?"_
*_"आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की, हे तीन प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो तीन प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम ह्या तीन सत्कर्माचा परिपाक होय."_*
*_"शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात! तोच खरा शुभ दिन. तोच खरा सुखमय क्षण. जेव्हा सत्पात्री दान दिले जाते, ज्या वेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय"_*
*_"ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे."_*
*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment