Thursday, 17 September 2020

भगवान बुद्ध समाधी का लावतात?

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
        *_भगवान बुद्ध समाधी का लावतात?_*
           *"_भगवान बुद्धाने बोधिवृक्षाखालीच सर्वे कार्ये समाप्त केले होते आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर देखील ते तीन महिनेपर्यंत समाधी लावून बसले होते, ह्या दोन्ही बाबी खऱ्या आहेत. समाधी अंतर्गत पुष्कळ काही चांगले गुणधर्म आहेत. सर्व बुद्धांनी समाधीच्या योगायोगानेच बुद्धत्वाचाच लाभ करून घेतला आहे. म्हणूनच ते बुद्धत्व लाभ घेतल्यानंतर सुद्धा समाधीच्या चांगल्या गुणांचे सदैव स्मरण करताना पुन्हा पुन्हा समाधीचा ते उपयोग करतात._"*
            _"समजा कोणी एका माणसाने राजाची सेवा केली. त्यामुळे खुष होऊन राजाने त्यास फार मोठे इनाम दिले. आपल्या कर्तुत्वनिष्टेमुळे लाभलेल्या बक्षिसाचे स्मरण करून तो अधिकच सेवेमध्ये तत्पर झाला, अथवा कोणी दीर्घ आजारी पुरुष आपल्या आजाराची योग्य प्रकारे सुश्रुषा व्हावी म्हणून कोणी एका वैद्यास चांगली रक्कम देण्याचे कबूल करून त्याची सेवासुद्धा निष्ठार्वक करतो. तसा त्याला गुणही चांगलाच घडून येतो व अल्पावधीतच तो चांगला निरोगी होतो; परंतु निरोगी झाल्यावर देखील त्या वैद्याच्या उपकारांचे स्मरण करून तो आणखीही सेवा करतो. याप्रमाणेच, *सर्व बुद्धांनी समाधीच्या योगानेच बुद्धत्वाचा लाभ करून घेतला आहे.* त्या त्या समाधीच्या गुणांचे स्मरण करून बुद्धत्व लाभ केल्यानंतर देखील ते त्या समाधीची सेवा करतात."_
       *समाधीचे २८ असं चांगले गुण आहेत. ते पाहूनच सर्व बुद्ध अव्याहत त्या समाधीची सेवा करतात.* ते अठ्ठावीस गुण असे -
*१)* समाधी जीवनाचे रक्षण करते
*२)* दीर्घायुष्य प्राप्त होते
*३)* दिव्य बळ लाभते
*४)* दोषमुक्त होतो
*५)* अपयश धुऊन निघतात
*६)* यशाची वृद्धी होते
*७)* असंतुष्टपणाचा नाश होतो
*८)* पूर्णतः संतोष लाभ होतो
*९)* भीती नाश पावते
*१०)*  निर्भयतेचा लाभ होते
*११)* आळस नष्ट होतो
*१२)* उत्साहात भर पडते
*१३ - १५)* लालसा, द्वेष आणि मलूलपणाचा नाश होतो
*१६)* मिथ्या गर्वहरण होतो
*१७)* समस्त शंकांपासून निवारण होते
*१८)* चित्त एकाग्र होते
*१९)* सदैव मन प्रसन्न राहते
*२०)* मन एकदम पवित्र व निर्मळ बनते
*२१)* गांभीर्य प्राप्त होते
*२२)* मोठा लाभ होतो
*२३)* अपूर्व नम्रतेचा लाभ होतो
*२४)* प्रीती उत्पन्न होते
*२५)* प्रमोद प्राप्त होतो
*२६)* समस्त संस्कार खिळखिळे करण्याचे ज्ञान होते
*२७)* पुनर्जन्माचा शेवट होतो
*२८)* श्रमण जीवनाचे यथार्थ फळ प्राप्त होते
                _ह्याच समाधीच्या अठ्ठावीस गुणांस अनुलक्षून सर्व बुद्ध तिची सेवा करतात. चित्त एकाग्र होताच जी प्रीती उत्पन्न होते, तिचा आनंद आगळा असतो, म्हणून तृष्णा नाश करून सर्वच बुद्ध समाधीत मग्न राहतात._
     *_सर्वच बुद्ध समाधीत मग्न होतात याची चार कारणे अशी आहेत-_*
*१)* आपदरहीत सुखमय जीवन
*२)* सर्वश्रेष्ठ गुणांचा वास
*३)* उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग
*४)* सर्वच बुद्धांनी मुक्त कंठाने केलेली समाधीची प्रशंसा
        _याच कारणाने *तथागत नेहमी समाधी भावनेत मग्न होत असत.* तथागत बुद्धांस काही करावयाचे शिल्लक राहिले होते म्हणून नव्हे, तर समाधीचे अमाप गुणधर्म पाहूनच ते समाधीचे चिंतन करीत असत._

*संदर्भ :* 
*मिलिंद प्रश्न, खंड ४,* 
*मेण्डक प्रश्न (क) महावर्ग*

*संकलन :* *महेश कांबळे*

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...