Friday, 30 October 2020

नियमितपणाचा आणि अनियमितपणाचा परिणाम

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*_नियमितपणाचा आणि अनियमितपणाचा परिणाम_*

  *_(खारादिय जातक आणि तिपल्लत्थमिग जातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  

                 _एके काळी बोधिसत्त्व मुगकुळामध्ये जन्मला होता तो मृगमायेत अत्यंत निपुण होता, त्यामुळे त्याच्या दोन बहिणींनी आपल्या मुलांना मृगविद्या शिकण्यासाठी त्याच्याकडे पाठविले. पण त्यापैकी *खारादिया नावाच्या बहिणीचा मुलगा* बोधिसत्त्वाने ज्या वेळेत मृगविद्या शिकविण्यास बोलाविले तेव्हा तो त्याच्याकडे गेला नाही, पण *दुसऱ्या बहिणीचा मुलगा तिपल्लथ* मामाने सांगितलेल्या वेळेत जाऊन त्याच्याकडून ती विद्या शिकत असे._

            _खारादियेचा मुलगा मामाने बोलावलेल्या वेळी जंगलात भटकत असे. एके दिवशी पारध्याने लावलेल्या जाळ्यात तो सापडला व मोठ्याने आरडाओरडा करू लागला. त्याच्या आईला ही गोष्ट समजली तेव्हा ती धावत धावत आपल्या भावाकड़े गेली आणि आपल्या मुलाला सोडवण्याची विनंती करू लागली._

         _बोधिसत्त्व म्हणाला, 'खारादिये, तुझ्या मुलाला मी कित्येक वेळा सांगून ही तो माझ्याकडे शिकायला न येता जंगलात भटकत असे. आता तो पारध्यांच्या जाळ्यात सापडल्यावर तेथे जाण्यात काही अर्थ नाही, पारधी त्याला मारणारच आणि मी तिकडे गेलो तर माझा जीव धोक्यात घालण्यासारखा होईल."_

          _खारादिया रडत रडत आपल्या मुलाला पाहायला गेली  पण ती पोहचण्यापूर्वीच पारध्याने त्याला मारून तेथून उचलून नेले होते._

         _काही दिवस लोटल्यावर तिपल्लत्थ जाळ्यात सापडला. तेव्हा त्याची आई बोधिसत्त्वाला त्याला वाचवण्याची विनंती करू लागली. बोधिसत्त्व म्हणाला, "तू मुळीच घाबरू नकोस. तुझा मुलगा माझ्याकडे नियमितपणे येऊन शिकला आहे. तो अशा शंभर जाळ्यातून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो."_

           _इकडे तो पारधी तेथे येण्यापूर्वी तिपल्लत्थाने आपले पोट फुगवून, डोळे वटारून आणि हातपाय ताणून मेल्याचे सोंग केले. पारधी तिकडे आला आणि तिपल्लत्थाच्या पोटावर दोन टिचक्या मारून व त्याच्या तोंडावाटे निघालेला फेस पाहून स्वतःशीस म्हणाला, "जा जाळ्यात अडकून बराच वेळ झाला असेल, आत्ता याचे मास तयार करण्याला उशीर लागला तर ते खराब होईल. तेव्हा हितेच याचे मांस कापून टोपलीत भरून घेऊन जावे."_

            _असे बोलून तिपल्लत्थाला मोकळे केले आणि आपली सूरी साफ करायला पार्ध्याने घेतले. इतक्यांत तिपल्लत्थ उठून उभा राहिला आणि बाणाच्या वेगाने पळून जाऊन आपल्या आईला भेटला._


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*

*३१/१०/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 29 October 2020

जिभेचे बंधन

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

                          *_जिभेचे बंधन_*

                  *_(वातमिग जातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  


                 _आपला बोधिसत्त्व रकडा वाराणसीच्या राजाच्या पट्टराणीच्या पोटी जन्माला आला आणि राजाच्या मरणानंतर वाराणसीचा राजा झाला. त्याच्याकडे संजय नावाचा एक माळी होता. एके दिवशी बोधिसत्त्व त्याला म्हणाला, "तुझ्या बागेत एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवशील का?" त्यावर संजय राजाला म्हणाला, "मला लागेल तेवढा मध देण्याचा आपण जर हुकूम केला तर मी आपणांस थोड्याच दिवसात आश्चर्यकारक गोष्ट दाखवीन." राजाने आपल्या कोठारातुन संजयला जेवढा मध लागेल तेवढा पुरविण्याचा आदेश दिला._

            _त्या बागेत रोज एक *वातमृग* येत असे, पण वातमृगच तो - संजयाची चाहूल लागताच तो बानासारखा पळत सुटे. संजयाने राजाच्या कोठारातून आणलेला मध बागेतील गवंतांवर लावला. हळूहळू त्या वातमृगाला त्या गवताची इतकी गोडी लागली की, तो संजयाच्या जवळ जाऊन देखील गवत खाऊ लागला. काही दिवस झाल्यावर संजय राजाला म्हणाला, "महाराज, आज दुपारी तुम्ही बागेत या मी तुम्हाला बागेतील आश्चर्यकारक गोष्ठ दाखवणार आहे."_

           _नंतर संजय बागेत गेला आणि त्याने गवताला मध लावले ते खाण्यासाठी वातमृग आला ते पाहिल्यावर संजयाने हळूहळू गवताला मध लावण्याचे काम राजवाड्यातील जवळच्या गवतांना लावले. ते गवत खात खात वातमृग राजवाड्यात गेला तसे संजयाने बाहेरचा रस्ता बंद केला आणि तो राजाला म्हणाला, "वातमृग माणसाच्या छायेलादेखील उभे राहत नाही, हे आपण जाणताच, असे असतानाही मी ह्या वातमृगाला येथपर्यंत आणून सोडले ही आश्चर्यकारक गोष्ट नाही का?"_

              _राजा म्हणाला, "वातमृग माणसाच्या वाऱ्याला उभा राहत नाही ही गोष्ट खरी *परंतु रसतृष्णा मोठी बळकट आहे. आपल्या जिभेला जर हा वातमृग वश झाला नसता तर तो तुझ्या ताब्यात कधीही आला नसता. पण जिभेच्या मागे लागल्यामुळे तू नेशील तिकडे त्याला जाणे भाग पडले. जिभेचे बंधन बळकट खरे !!*_"

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*

*३०/१०/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 28 October 2020

सुखी संन्याशी

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

                          *_सुखी संन्याशी_*

                  *_(सुखविहारी जातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  

_एक तटस्थ मानसी | एक सहजची आळशी ||१||_

_दोन्ही दिसती सारखी | वर्म जाणें तो पारखी ||२||_

_एक ध्यानी करिती जप | एक बैसुनी घेती झोप ||३||_

_एका सर्वस्वाचा त्याग | एका पोटासाठी जग ||४||_

_एका भक्ती पोटासाठी | एका देवासाठी गांठी ||५||_

_वर्म पोटीं एका | फळें दोन म्हणे तुका ||६||_

                           *_संत तुकाराम_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

                _एका काळी बोधिसत्त्व औदिच्य ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता. तो वयांत आल्यावर गृहस्थाश्रमाला कंटाळून परिव्राजक झाला व हिमालय पर्वतावर राहू लागला. त्याच्याजवळ तेथे बरीच शिष्यशाखा जमली. एका वर्षाऋतुत तो फिरत फिरत काशीला आला व तेथील राजाच्या उद्यानांत त्याने राजाच्या आग्रहास्तव पावसाळ्याचे चार महिने घालविले. पावसाळा संपल्यावर तो आपल्या शिष्यासह पुनः हिमालयावर जाण्यास सिद्ध झाला._

               _तेव्हा राजा त्याला म्हणाला, "आत्ता तुम्ही वृद्ध झाला आहात, हिमालय पर्वताच्या टेकड्यांवरून चढण्या उतरण्यास तुम्हाला अतिशय क्लेश होतील. तेव्हा तुम्ही येथेच रहा व आपल्या शिष्यांना हिमालयावरील आश्रमात पाठवा."_

           _बोधिसत्त्वाला राजाचे म्हणणे पसंत पडले आणि आपल्या एका प्रमुख शिष्याबरोबर सर्व परिव्राजकांना हिमालयावरील आश्रमात पाठवून तो एकटाच त्या उद्यानांत राहू लागला. काशीच्या राजाने त्याची व्यवस्था चांगली ठेवली._

            _बोधिसत्त्वाचा तो जेष्ठ शिष्य काही काळ सर्व परिव्राजकांसह हिमालयावरील आश्रमात राहिल्यावर आपल्या सतीर्थ्यांना म्हणाला, "गुरूला पाहून पुष्कळ दिवस झाले. आता मी एकटाच जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही एकमताने वागून आपल्या तपश्चर्येची अभिवृद्धी करा."_

            _तो अनुक्रमे काशीला येऊन गुरूला भेटला, व संध्याकाळच्या वेळी आश्रमाच्या ओसरीवर चटई टाकून विश्रांतीसाठी पडून राहिला. इतक्यात काशीराजा बोधिसत्त्वाच्या दर्शनासाठी तेथे आला. तो आश्रमात आला असता त्याला पाहून हा आगंतुक तापस उठला तर नाहीच पण *'अहो सुखं, अहो सुखम्'* असे उद्गारला. राजाला या तापसाने आपला योग्य मान न ठेविल्याबद्दल फार वाईट वाटले. पण बोधिसत्त्वाच्या मर्यादेस्तव आपला राग आवरून तो आश्रमात शिरला आणि बोधिसत्त्वाला नमस्कार करून एका बाजूस बसला व म्हणाला, "भदंत, आज आपल्या आश्रमात रक आगंतुक तापस आला आहे असे वाटते. पण तो खरा तापस नसावा अशी माझी समजूत झाली आहे. हा मनुष्य मी आश्रमापाशी पोहोचलो तरी न उठता खुशाल चटईवर लोळत होता व मी जवळ आल्यावर *'अहो सुखं, अहो सुखम्'* असे ओरडला. मला वाटते तो फार आळशी असल्यामुळे आकंत जेवून निजला असावा व त्यातच त्याला स्वर्गसुख वाटत असावे."_

               _बोधिसत्त्व म्हणाला, "महाराज, आपली गैरसमजुत झाली आहे. हा तापस यथेच्छ खाऊन अजगरासारखा इतस्ततः लोळण्यात सुख मानणारा मनुष्य नव्हे. पूर्वी तो आपल्यासाख्याच उत्तरेकडील एका प्रदेशाचा राजा होता. हिमालयावर माझे जे शिष्य आहेत त्यांत हाच प्रमुख होय. आजच तो येथे येऊन पोहोचला. मार्गात फार श्रम झाल्यामुळे विश्रांतीसाठी तो जरा ओसरीवर पडला आहे. आता त्याने जे उद्गार काढिले त्याचे कारण आपल्या लक्षांत आले नाही. जेव्हा तो आपल्या राजवाड्यात राहत होता  तेव्हा आपल्याप्रमाणेच त्याचे शिपाई त्याचे रक्षण करीत असत आणि तो आपल्या जीवाला धोका न पोहोचावा म्हणून दुसऱ्या लोकांवर सक्त नजर ठेवीत असत.  हांजी हांजी करणाऱ्या आणि लांगूनचालन करणाऱ्या लबाड धूर्त लोकांनी त्याला घेरले होते. आपल्या अंतःपुरातील स्त्रियांवरदेखील विश्वास ठेवणे त्याला इष्ट वाटत नसे. अर्थात राजवाड्यातील सुखाला कंटाळून त्याने त्या बंधनागाराचा त्याग केला; आणि तो हिमालयावर माझ्या आश्रमांत येऊन राहिला. आता जेव्हा त्याने तुम्हाला पाहिले, तेव्हा आपण अशा राज संपत्तीरूप विपत्तीतुन पार पडलो, याची पुनःएकवार आठवण झाली असावी व त्याने *'अहो सुखं, अहो सुखम्'* उद्गार काढले असावे."_

                _राजाला बोधिसत्त्वाचे भाषण ऐकून फार आश्चर्य वाटले, व आपण तापसाविषयी भलतीच कल्पना केली याबद्दल तो खजील झाला. बाहेर जाऊन त्याने तापसाला वंदन केले आणि त्याला त्याचे वृत्त विचारले. तापसाने आपण राजवाड्यातील सुखांना कसे कंटाळत गेलो; पण त्यांची सवय झाल्यामुळे त्यांचा पुढे हिमालय पर्वतावरील आपल्या गुरूच्या मोकळ्या आश्रमात राहू लागल्यापासून आपणाला किती सुख वाटले इत्यादी सर्व वृत्त राजाला सांगितले, आणि तो म्हणाला, "महाराज, आज जेव्हा मी हा तुमचा मोठा लवाजमा पाहिला तेव्हा माझ्या राजवाड्यातील विपत्तीची मला आठवण झाली, व सहजासहजी *'अहो सुखं, अहो सुखम्'* हे उद्गार माझ्या तोंडातून निघाले."_

             _राजा म्हणाला, "भो तापस, आपण मला क्षमा करा. मी राज्यसुखांत दंग झाल्यामुळे आपल्यासारख्या सत्पुरुषांची मला पारख करता येत नाही. ज्याने त्याने मला मान द्यावा असे मला वाटते, व जर काही एखाद्या माणसाकडून स्वतंत्रतेचे वर्तन घडले तर त्याचा मला ताबडतोब तिटकारा येतो. मघाशी आपण मला पाहून उठला नाही याबद्दल मला राग आला आणि त्यामुळे आपल्या उद्गारांचा मी भलताच अर्थ केला. आपल्या उदारचरिताचा यापुढे माझ्या आचरणावर इष्ट परिणाम होईल अशी मला आशा आहे."_

           _*तापसाने राजाला धर्मन्यायाने राज्य चालविण्याविषयी उपदेश केला, तेव्हा राजा त्याला वंदन करून निघून गेला.*_

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*

*२९/१०/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 27 October 2020

लोभाचा परिणाम

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


                       *_लोभाचा परिणाम_*

                  *_(सेरिववाणिज जातककथा)_*


*_इध चे चे हिनं निरोधेसि सद्धम्मस्स नियामतं |_*

*_चिरं त्वं अनुतपेस्सासि सेरिवायंव वाणिजो ||_*


               _तैलवाह नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते. तेथे एक प्रख्यात श्रेष्टी राहत असे. कालांतराने ह्या श्रेष्टीची धनदौलत नष्ट झाली; आणि घरांतील सर्व पुरुष मंडळी मरून गेली, एक भोळसर बाई आणि तिची नात एवढीच काय त्या दोघी श्रेष्टीच्या कुळांत शिल्लक राहिली. आपल्या वाड्याच्या मोडक्यातोडक्या भागांत त्या दोघी मोलमजुरी करून आपला निर्वाह करीत राहत असत._

             _त्या काळी आमचा बोधिसत्त्व एका वण्याच्या कुळांत जन्मला होता. वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरिवा नांवाच्या फेरीवाल्या वाण्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे. एकदा फिरत फिरत ते आंध्रपूरला आले. तेथे आपसामध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी त्या शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या. ज्याच्या वाट्याला जे रस्ते आले असतील ते त्याने फिरून संपविल्यावाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपलं माल विकण्यासाठी फिरू नये, असा त्यांनी निर्बंध केला. बोधिसत्त्वाने आपल्या वाट्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करून पाचशे कार्षापणांची विक्री केली._

          _सेरिवा आपल्या हिश्श्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करीत असता त्या श्रेष्टीच्या मोडक्या वाड्यावरून "मणी घ्या, मणी घ्या, नानातऱ्हेचे जिन्नस घ्या," असे मोठ्याने ओरडत चालला होता. ते ऐकून त्या घरांत राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली, "आज्जी आज्जी, हा व्यापारी आपल्या घराजवळून जात आहे, त्याच्याकडून कांचेचे मणी किंवा दुसरा एखादा जिन्नस माझ्यासाठी विकत घे."_

           _आजीबाई म्हणाली, "मुली, आपल्याला मिळणाऱ्या मोलमजुरीने आपला निर्वाह देखील नीटपणे होत नाही. मग आपल्याला मणी वगैरे जिन्नस घेणे शक्य आहे काय?"_

          _मोडक्यातोडक्या सामानामध्ये एक भले मोठे ताट पडले होते. ते त्या नातीने आपल्या आज्जीजवळ आणून ती म्हणाली, "आज्जी, ह्या ताटाचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. मी आज किती दिवस पाहतेय, हे ताट त्या मोडक्या सामानांत पडून राहिले आहे. हे देऊन तो व्यापारी काही जिन्नस देत असला तर आपण घेऊ."_

          _आज्जीने सेरिवा वाण्याला बोलावून आणून एका आसनावर बसावयास सांगितले, आणि ती त्याला म्हणाली, "आमच्या घरांत हे जुने ताट पडून राहिले आहे, याचा आम्हाला सध्या काहीच उपयोग होत नाही. ह्याच्या मोबदल्यात माझ्या नातीसाठी एखादी मण्याची माळ द्याल तर मी हे ताट तुम्हास देईन."_

            _सेरिवा वाण्याने ते ताट हातात घेतले. त्याच्या वजनावरूनच ते सोन्याचे असावे अशी त्याला शंका आली आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली. पण त्या आज्जीला काही एक समजू न देता तो म्हणाला, "हे भिकार ताट येथे कश्याला आणले? ह्याची किंमत एक पै देखील होणार नाही. ह्याच्या मोबदल्यात मण्याची माळ मला कशी देता येईल? उगाच मला त्रास दिलात!"_

              _असे उद्गार काढून आणि ते ताट तेथेच जमिनीवर फेकून देऊन सेरिवा त्या वाड्यातून चालता झाला. वाटेत तो स्वतःशीच म्हणाला, "त्या ताटाची खरी किंमत म्हटली म्हणजे एक लाख कार्षापण असली पाहिजे आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर तीन चार हजार कार्षापण असू शकेल. तेव्हा माझा सर्व माल देऊन ते ताट मिळाले असते तरीदेखील माझा पुष्कळच फायदा झाला असता परंतु ज्या अर्थी त्या म्हातारीला त्या ताटाची किंमत माहीत नाही, त्याअर्थी मण्याची एक माळ तरी का खर्च करा! संध्याकाळच्या वेळी पुनः येऊन अर्धा कार्षापण किंमतीचे काही मोडके कांचेचे मणी देऊन मला ते ताट सहज उपटता येण्यासारखे आहे. आमच्या व्यापारी लोकांचे हेच तत्त्व आहे की, जेथे अर्ध्या कार्षापणाने काम होत असेल, तेथे पाउण कार्षापण देखील खर्च करू नये."_

             _अशा विचारतरंगात गर्क होऊन सेरिवा त्या गल्लीतून बाहेर पडला. बोधिसत्त्वाच्या हिश्श्याला आलेले सर्व रस्त्यातून फेरी करून झाल्यावर, तो सेरिवा ज्या गल्ल्यातून फेरी करून निघाला त्या गल्ल्यांत शिरला. अनुक्रमे तो त्या आज्जीच्या वाड्याजवळ आला. तेव्हा त्या आज्जीची नात आज्जीला म्हणाली, "आज्जी, हा दुसरा एक वाणी ह्या रस्त्याने जात आहे, त्याला ते ताट देऊन तो काही देत असल्यास पाहू." आज्जी म्हणाली, "त्या पहिल्या वाण्याने आपली निर्भत्सना केली तेवढी पुरे नाही का झाली? आता पुनः ह्यांच्याकडून फजिती करून घेण्याची तुझी इच्छा आहे का?"_

           _नात म्हणाली, "आज्जी, मुखचर्येवरून हा वाणी पूर्वीच्या वाण्यासारखा कर्कश दिसत नाही. आपल्या ताटाची किंमत कवडीची नसली, तरी तो आपल्याबरोबर सभ्यपणाने वागेल असे मला वाटते."_

            _आज्जीने नातीच्या आग्रहास्तव बोधिसत्त्वाला हाक मारली आणि ओसरीवर मांडलेल्या एका आसनावर बसावयास सांगितले. तो खाली बसल्यावर ती त्याला म्हणाली "ह्या जुन्या ताटाची काही तरी किंमत असावी असे मला वाटते, कारण एकेकाळी आम्ही फार श्रीमंत होतो, त्या काळाचे हे ताट आहे. पण तुमच्या आधी येथे येऊन गेलेला वाणी याची काहीच किंमत नाही असे म्हणाला. तुम्ही हे एकवार नीट तपासून पहा आणि जर याची काही किंमत होत असेल तर ह्याच्या मोबदल्यात माझ्या नातीसाठी एखादा मण्याचा अलंकार द्या."_

             _बोधिसत्त्वाने ते ताट कसोटीला लावून पाहिले, आणि तो त्या आज्जीला म्हणाला, "आज्जी, ह्या ताटाची किंमत एक लाख कार्षापण आहे, माझ्या जवळ अवघे पाचशे कार्षापण आहेत आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर तीन साडेतीन हजार कार्षापण भरेल तेव्हा ह्या ताटाच्या मोबदल्यात देण्याजोगे माझ्याजवळ काही नाही."_

           _बोधिसत्त्वाचे सचोटीचे वर्तन पाहून त्या आज्जीस फार संतोष झाला. ती म्हणाली, "व्यापारी लोकांत तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस विरळा. आम्ही जर हे ताट बाजारात विकायला नेले तर आमच्या ह्या दारिद्रावस्थेत आमच्यावर चोरीचा आळ येण्याचा संभव आहे. तेव्हा तुला जे काही देणे शक्य असेल तेवढे देऊन हे ताट घेऊन जा. तुझ्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हे तुला बक्षीस आहे असे आम्ही समजू."_

            _बोधिसत्त्व म्हणाला, "माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोख रक्कम ह्या ताटाच्या मोबदल्यात मी तुम्हाला देतो, मात्र मला ह्या रक्कमेपैकी आठ कार्षापण आणि मालांपैकी माझी तराजू मला द्या."_

        _आज्जीला हा सौदा पसंत पडला. बोधिसत्त्व ते ताट, आपली तराजू आणि आठ कार्षापण घेऊन नदीच्या काठी आला व ते कार्षापण देऊन त्याने नावाड्याला विलंब न लावता आपणाला परतीरी पोचविण्यास सांगितले._

          _इकडे सेरिवा सर्व शहर हिंडल्यावर पुन्हा त्या आज्जीच्या घरी गेला व तिला म्हणाला, "आज्जी, ते ताट आण पाहू. त्या ताटाची जरी किंमत काहीच नाही, तरी तुझ्यासारख्या गरीब म्हाताऱ्या बाईला वाईट वाटू देणे मला योग्य वाटले नाही, म्हणून पुनः येथे येण्याची मी तसदी घेतली."_

        _आज्जी म्हणाली, "वा! वा! तू मोठा धूर्त दिसतोस. जणू काय आमच्यावर उपकार करण्यासाठीच येथे आला आहेस. पण हे पहा, आमच्या ताटाची किंमत एक लाख होती आणि त्याच्या मोबदल्यात पाच आठ कार्षापण किंमतीची एखादी मण्याची माळ देखील तुला देणे कठीण पडले. म्हणजे जवळजवळ आमचे ताट तू फुकटच घेऊ पाहत होतास. परंतु तुझ्या धन्याच्या योग्यतेचा दुसरा एक सज्जन वाणी येथे आला, आणि त्याने त्या ताटाची खरी किंमत आम्हास सांगितली व आपणाजवळ होता नव्हता तो सर्व माल आणि पैसा आम्हास देऊन तो ते ताट घेऊन गेला. तू जर त्या वेळी आम्हास एकादी मण्याची माळ दिली असतीस, तर ते ताट तुलाच मिळाले असते! *पण अति शहाण्याचा बैल रिकामा!*"_

           _त्या आज्जीचे ऐकताच सेरिवा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा उन्मत्त झाला. त्याने आपला माल व पैसे त्या आज्जीच्या दरवाज्यात इतस्ततः फेकून दिले व एक भले मोठे दांडके घेऊन तो नदीवर धावला. बोधिसत्त्व नदीच्या मध्यभागी पोचला होता त्याला पाहून सेरिवा अत्यंत संतप्त झाला, व 'नाव परत आणा, नाव मागे आणा' असे मोठमोठ्याने ओरडू लागला. कोणी काही सांगितले तरी नाव न फिरवता आपणाला त्वरेने परतिरी पोचविले पाहिजे, असा बोधिसत्त्वाने आगाऊच करार केला होता तेव्हा नावाड्यांनी सेरिवा वण्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता वेगाने नाव पुढे चालविली. सेरिवा ओरडून थकला व घेरी येऊन तेथेच पडला!_


*_अतिलोभे धर्मनया मोहूनिया कष्ट फार भोगाल |_*

*_तो सेरिवा बुडाला, तेवी तुम्ही शोक सागरी व्हाल ||_*



*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*

*२७/१०/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 25 October 2020

प्रयत्नांचे फळ

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


                       *_प्रयत्नांचे फळ_*

                  *_(वण्णुपथ जातककथा)_*


_अकिलासुनो वाण्णुपथे खणन्ता उदंगणे तत्थ पयं अविन्दुं |_

_एवं मुनी विरियबलूपपन्नो अकिलासु विन्दे हद्यस्य सन्ति ||_


*_वाळूच्या कांतारी यत्न करुनि लागले तयां पाणी |_*

*_साधु स्वयत्नें मिळवी शांतीची मानसीं तशी खाणी ||_*


            _आमचा बोधिसत्त्व काशीराष्ट्रामध्ये सार्थवाह कुळांत जन्माला येऊन वयांत आल्यावर आपल्या पित्याचा धंदा करीत असे. एकदा तो व्यापारासाठी मरुमंडळात जात असतां वाटेत एका साठ योजनें लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला. ह्या मैदानांतील वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील राहत नसे. सकाळी पहिल्या प्रहारानंतर ह्या मैदानांतून प्रवास करण्याची सोय नव्हती. सूर्यकिरणांनी वाळू संतप्त होऊन जात असल्यामुळे तिच्यावरून माणसाला आगर जनावराला चालत जाणें शक्यच नव्हते._

        _बोधिसत्त्वाने ह्या मैदानाजवळ आल्यावर एक वाटाड्या घेतला. हा एक वाळूचा मोठा समुद्रच असल्यामुळे वाटाड्यावाचून तरून जाता आला नसता. तो वाटाड्या पुढच्या गाडीत एका चौरंगावर बसून आकांशातील ताऱ्यांच्या अनुरोधाने त्या लोकांना रस्ता दाखवीत असे. सर्व रात्र प्रवास करून सुर्योदयाचे वेळी सर्व गाड्या एका ठिकाणी वर्तुळाकार ठेवीत असत, व त्यावर तात्पुरता मंडप करून त्या खाली सगळी माणसे आणि जनावरे दिवसभर विश्रांती घेत असत._

             _याप्रमाणे आमचा बोधिसत्त्व व त्याबरोबर असलेले लोक त्या वालुकाकांतारांतून जात असता दुसऱ्या टोकाला आले. आता जवळची गावर एका मुक्कामाच्या पल्ल्यावर राहिली होती. तेव्हा तो वाटाड्या म्हणाला, "आपण वाळूच्या मैदानांतून गांवाच्या नजीक येऊन पोहचलों. आज रात्री ह्या मुक्कामाहून निघालो म्हणजे उद्या सकाळी आपण एका संपन्न गावाला पोहचू. आता पाणी आणि लाकडे बरोबर घेण्याचे काही कारण राहिले नाही."_

           _त्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे बोधिसत्त्वाच्या लोकांनी सर्पण आणि पाणी तेथेच टाकून देऊन ते पुढल्या प्रवासाला निघाले._

            _एक दोन आठवडे वाट्याड्याला रात्री मुळीच झोप न मिळाल्यामुळे तो अगदी थकून गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास बसल्या ठिकाणीच त्याला झोप आली आणि त्याची गाडी भलत्याच मार्गाने वळली हे त्याला समजले देखील नाही. अवशेष रात्र बैल चालत जाऊन पुनः मागल्या मुक्कामावर आले. वाटाड्याच्या गाडीच्या मागोमाग इतर गाड्या चालत असल्यामुळे त्या सर्व तेथे येऊन पोहोचल्या. पहाटेच्या सुमारास वाटाड्या जागा होऊन पाहतो तो त्याला आपण पूर्वीच्याच ठिकाणी येऊन पोहोचल्याचे समजून आले, आणि तो मोठ्याने ओरडला, "गाड्या मागें फिरवा, मागे फिरवा"_

           _त्या मंडळींत फारच गडबड उडून गेली. आपण कोठे पोहचलो, हे कोणास समजेना. वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे गाड्या माघाऱ्या वळवण्यात आल्या. परंतु इतक्यात सूर्योदय झाला. गाड्या वर्तुळाकार करून त्यावर मंडप घालून ते लोक आपआपल्या गाडीत खाली शोकाकुल होऊन पडले. जो तो म्हणाला, "काय हो आपण पानु फेकून दिले आणि आता पाण्यावाचून तळमळून मरण्याची पाळी आपल्यावर आली आहे."_

         _पण बोधिसत्त्वाचा धीर मात्र खचला नाही. सकाळच्याच प्रहरी त्याने आसपासची जमीन तपासून पाहिली. जवळच्या रका लहानशा झुडुपाखाली त्याच्या पाहण्यात दुर्वा आल्या. तेव्हा त्याने अनुमान केलें की, खाली असलेल्या पाण्याच्या झऱ्याच्या ओलाव्याने त्या जिवंत राहिल्या असाव्या. तो आपल्या लोकांजवळ येऊन त्यांना म्हणाला, "गड्यांना, आता निजण्यात अर्थ नाही, आपण जर हताश होऊन पडलो, तर आपणाला मरणोत्तरदेखील सद्गती मिळावयाची नाही. मृत्यू यावयाचाच असला तर तो प्रयत्नांनी येऊ द्या. *हताश होऊन मरणे हे शुराला शोभण्यासारखे कृत्य नाही.* चला, आपल्याजवळ जेवढ्या कुदळी, खोरी आणि पाट्या असतील तेवढ्या घेऊन आपण त्या पलीकडच्या झुडुपाजवळ खणून पाहू. तेथे पाणी लागण्याचा संभव आहे."_

            _त्या मनुष्यांनी त्या झुडुपाजवळ एक मंडप उभारला व त्याखाली खोदायला सुरुवात केली. पुष्कळ खोल खड्डा खणण्यात आला; तथापि पाण्याचा पत्ता लागेना; इतक्यात एकाची कुदळ जाऊन दगडावर आदळली, तेव्हा त्या साऱ्यांची पूर्ण निराशा झाली. परंतु बोधिसत्त्व मात्र डगमगला नाही. तो त्या खड्यात खाली उतरला आणि त्या खडकाला त्याने कण लावून पाहिला. तो खडक इतका पातळ होता जी, त्याच्या खालून वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. बोधिसत्त्व आपल्या स्वतःच्या नोकरांस हांक मारून म्हणाला, "गड्या पहार घेऊन इकडे ये आणि या दगडावर चार धक्के मार, आता हातपाय गळून बसण्याची वेळ नव्हे. ऊठ चल लवकर"._

           _नोकराने भली मोठी पहार घेऊन त्या दगडावर जोराने चार पाच प्रहार केले. तेव्हा तो दगड दुभंग होऊन खालच्या झऱ्यात पडला. झऱ्याचा प्रवाह अडवला गेल्यामुळे पाण्याची धार एकदम वर उडाली. सगळ्या लोकांनी स्नान केले व खाऊनपिऊन ते संतृप्त झाले. बोधिसत्त्वाच्या धीराची जो तो प्रशंसा करू लागला. पाणी हे असे दर्शविण्यासाठी त्या ठिकाणी ध्वज उभारून ते लोक बोधिसत्त्वाबरोबर त्या कांतारातून सुरक्षितपणे पार पडले._


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*

*२६/१०/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

चक्रवर्ती सम्राट अशोक

 🌷🌿☘️🌼🌷🌿☘️🌼🌷🌿☘️

*_चक्रवर्ती सम्राट अशोक_*

🌷🌿☘️🌼🌷🌿☘️🌼🌷🌿☘️

                _चक्रवर्ती सम्राट अशोक  जन्म: इ.स.पू. ३०४ - मृत्यू इ.स.पू. २३२ हे मौर्य घराण्यातील सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. हा भारतीय समाजातील सर्वात महत्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. अनेकांच्या मतानुसार, सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. *सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’.* जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या._

            _अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. *त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व आज पटणा म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती.* काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. *कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.*_

               _*सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणीली यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे.* अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शीलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. *अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते.*_

        _*सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख वाचता आले.* ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. अशोकाचे शिलालेख हे ब्राह्मी, खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राम्ही लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्या विषयीची सखोल माहिती ही अभ्यासकांना मिळालेली आहे *अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला 'देवानाम प्रिय' असे संबोधले आहे. कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्धधर्म, बौद्ध धर्माची तत्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय.* सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला, विशाल आणि एकछत्री केंद्रीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट यांनी केला यामध्ये चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांची कार्य खूप महत्त्वपूर्ण राहिलेली आहे अशोकाने बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्याने चालना दिले त्यासाठी शासकीय अधिकारी नेमले स्वतःच्या मुलांना त्याने धर्म प्रसारासाठी पाठवले._

_*बालपण व सुरुवातीची कारकीर्द*_

              _अशोक हा बिंदुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिंदुसार यांना अनेक पत्‍नी होत्या, त्यातील धर्मा ही अशोकची आई होती. अशोक हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरा होता. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुःस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला, त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकाने आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते, हे काम त्याने सहज पार पाडले. अशोकाच्या आईचे नाव काही ठिकाणी चंपा असे आले आहे आणि ती ब्रह्मनाची मुलगी होती असा उल्लेख काही लेखक करतात. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवती सम्राट म्हणून अशोकाला मान्यता मिळालेले आहे तत्कालीन अशोकाचे शिलालेख वस्तू हे याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण साधने आहेत._

 _*राज्यारोहण*_

               _अशोक जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुस्वासही वाढत गेला. अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर कीर्ती दुमदुमत लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिंदुसार अशोकला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम हा अशोकचा दुस्वास करण्यात आघाडीवर होता. सुसीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी जेथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे, तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकची कीर्ती अजून वाढत गेली. (त्या भागात पुन्हा उठाव झाला परंतु तो क्रूरतेने चिरडला गेला.)_

              _अशोकच्या यशाने त्याच्या भावांचा दुस्वास अजून वाढला, घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुसीमने बिंदुसारला अशोकाविरुद्ध भडकावले, या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला, तो त्याने पाळला. या काळात अशोकने कलिंगमध्ये जाउन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली. ती नंतर अशोकची दुसरी अथवा तिसरी पत्‍नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत._

           _मध्यंतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिंदुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेला व एका लढाईत घायाळ झाला. त्या काळात असे मानतात की सुसीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले, जे परतावून लावण्यात आले. *अशोकची शुश्रूषा करण्यासाठी बौद्धधर्मी परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारिका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी ही विदिशा येथील एका व्यापा‍ऱ्याची मुलगी होती.* ती बौद्धधर्मी असल्याने बिंदुसाराला हा विवाह पसंत पडला नाही. त्याने अशोकला पाटलीपुत्रमध्ये रहाण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले._

             _पुढील काही वर्षे अशोकची शांततामय गेली. बिंदुसारचे इसवी सनपूर्व २७३ मध्ये निधन झाले व सुसीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्‍नांत देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेल्या अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाटलीपुत्रचा पाडाव केला. आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली. मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड-अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मा अशी त्याची ओळख तयार होऊ लागली._

            _राज्यरोहण झाल्यानंतर आठ वर्षांच्या काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान-इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळ पर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य उभारणार चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकाच्या नावाचा उल्लेख करावा लागतो *रोमिला थापर* यांनी अशोकाच्या कार्याचा विशेष गौरव केलेला आहे._

_*बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार*_

       _अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? *ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धर्मीयांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात.* ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले. अशी कलिंगचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. *बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले अग्नीय अशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले त्याचप्रमाणे अशोकाने अनेक सोई निर्माण करण्यावर भर दिला उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध उपचार मिळावे याची त्यांनी सोय केली होती अनेक नवे रस्ते बांधले प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली नव्या धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या अशा प्रकारे त्याने अनेक लोक उपयोगी आणि कल्याणकारी कार्य केलं होतं त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार आणि प्रचार करण्याचे कामही अशोकाने केले.*_

             _*१९७१ साली सम्राट अशोकाचा एक लघु शिलालेख मध्य प्रदेशातील पांगुरारीया (प्रत्यक्षात नक्तितालाई) या खेड्याजवळ सापडला. या शिलालेखातील मजकुराचे योग्य भाषांतर जर्मनीतील प्राध्यापक हॅरी फाल्क यांनी केल्यानंतर वरील समजुतीला छेद मिळाला असून सम्राट अशोक तरुणपणापासूनच बौद्ध विचारधारा मानणारा होता हे सिद्ध झाले आहे. राजकुमार अशोक उज्जैन प्रांताचा अधिकारी असताना आपल्या मैत्रिणीसोबत (नक्तितालाई) येथे सहलीला आला होता असे या शिलालेखात लिहिलले आढळले आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षु संघाचे वास्तव्य होते याचे अनेक पुरावे आजही येथे पहायला मिळतात.*_

             _अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली.  *अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली.* असे मानतात की अशोकाने बौद्धधर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकिर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातिधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रिपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली._

       *_अशोकाने आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधाऱ्या माणसांना मान देणे, संतांना, ब्राह्मणांना, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचारतत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही._*

              _अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्य याच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते._

_*अशोकाचे स्तंभ व शिलालेख*_

          _अशोकाने भारतीय इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा दिला म्हणजे त्याने त्याच्या राज्यात सर्वत्र लिहिलेले शिलालेख. अशोकाअगोदरच्या व नंतरच्या भारतीय राजांच्या फारश्या नोंदी आढळत नाहीत त्यामुळे तत्कालीन ऐतिहासिक मिळवणे जिकरीचे होते. अशोकाने आपल्या राज्याच्या सीमेवर महत्त्वाच्या शहरांमध्ये शिलालेखांद्वारे आपले विचार प्रकट केले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनुसार आजवर सापडलेल्या शिलालेखांपेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने शिलालेख बांधले असावेत व ते काळाच्या ओघात लुप्त झाले, अजूनही उत्खननांमध्ये स्तंभ व शिलालेख सापडण्याची शक्यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणे *अशोका संदर्भात बरीचशी माहिति शिलालेखांवरुन व स्तंभांवरुन आलेली आहे. अशोकाला मुख्यत्वे "देवानांपिय पियदसी" (पालीमध्ये) अथवा संस्कृतमध्ये प्रियदर्शी असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ "देवांचा प्रिय व चांगले दाखविणारा" असा होतो.* त्याच्या सर्व लेखांमध्ये त्याची महानता जाणवते, अशोकाने हे सर्व शिलालेख आपल्या साम्राज्यातील मार्गांवर मुख्य चौकांमध्ये स्‍थापित केले होते, जेणेकरून प्रजेला तसेच बाहेरच्या देशातून येणाऱ्याला अशोकाच्या राज्यातील आचारविचार कळावेत. अशोक आपल्या प्रजेला आपली मुले असे संबोधत असे व अहिंसेबद्द्ल व बौद्ध धर्माच्या तत्त्वांवर (धम्म व योग्य आचरणावर) त्याचा भर असे. *अशोकाच्या लेखांमध्ये त्याच्या स्तुतीपर अनेक सुमने आहेत. ते अशोकाने मिळवलेल्या प्रदेशाची माहिती देतात. तसेच त्यांत शेजारच्या राज्याबद्दलची माहितीही आहे. एका स्तंभामध्ये कलिंग युद्धाचे वर्णन आहे त्यात अशोकाची साहाय्यक राज्ये व नागरी व्यवस्थापनेवरही माहिती कोरली आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वांत प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वालुकाश्माचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे. इतिहासकारांसाठी व शास्त्रज्ञांसाठी अशोक कालीन चिन्हे, लेख, स्तंभांचा हा खूप महत्त्वपूर्ण ठेवा आहे. तो मौर्य साम्राज्याबद्दल अनेक गोष्टी उद्धृत करतो. अशोकाच्या चिन्हांवरुन त्याला भावी पिढ्यांनी त्याच्याबद्दल काय विचार करावा, त्याला कोणत्या गुंणांसाठी त्याला लक्षात ठेवावे यामागची त्याची तळमळ लक्षात येते.*_

_*सम्राट अशोकांबद्दल इतरांनी केलेल्या नोंदी*_

*१)* ‘‘काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते; पण अलेक्झांडरसारखा अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वत:च्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते.’’

                *— माधव कोंडविलकर (ग्रंथ - ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’*)

*२)* भारताच्या इतिहासात एकच असा 'एकमेव' म्हणण्यासारखा कालखंड आहे, जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय.

             *— डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ग्रंथ - ॲनिहिलेशन ऑफ कास्ट)*

*३)* “जगाच्या इतिहासात असे हजारो राजे आणि सम्राट होऊन गेले जे स्वत:ला ‘हिज हायनेस’, ‘हिज मॅजेस्टीज’, ‘हिज एक्झॉल्टेड मॅजेस्टीज’ आणि अशा त्यांचे उच्चपद दर्शवणाऱ्या इतर अनेक पदव्या लावून घेत असत. हे सगळेजण काही काळापुरते प्रसिद्ध झाले आणि मग झटकन विस्मृतीतही गेले; पण सम्राट अशोक! ते मात्र एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे सतत तळपतच राहिले आहे, अगदी आजपर्यंत.”

          *— एच्.जी. वेल्स (ग्रंथ - आऊलटाईट ऑफ हिस्टरी)*

*४)* “इतिहासातल्या पानापानांवर हजारो राजांच्या नावांची अक्षरश: गर्दी झाली आहे; पण त्या गर्दीमध्येही सम्राट अशोकांचे नाव झळकत असलेले दिसते. खरं तर त्यांचे एकट्याचेच नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकते आहे.”

              *— ब्रिटीश इतिहासतज्ज्ञ एच्.जी. वेल्स*

*५)* “आजपर्यंत होऊन गेलेले सम्राट आणि इतर प्रभावशाली व्यक्तींमध्ये सम्राट अशोक हे नक्कीच असे एकमेव सम्राट होते, ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर असा निश्चय केला होता की, भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करायचे नाही.”

            *— जवाहरलाल नेहरू (ग्रंथ- द डिस्कव्हरी ऑफ इंडिया)*

*६)* “सम्राट अशोक हे इतिहासातील असे एक महान बादशाह होते, ज्यांची सत्ता अफगाणिस्तानपासून मद्रासपर्यंत अशी प्रचंड मोठी होती आणि तरीही ते असे वेगळेच बादशहा होते, जे उत्तम लढवय्ये असूनही, ज्यांनी कलिंग देशावर विजय मिळवल्यानंतर, युद्ध करणं पूर्णपणे बंदच करून टाकलं होतं. ख्रिस्तपूर्व २५५ मध्ये, मद्रासच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या कलिंग देशावर त्यांनी आक्रमण केले, तेव्हा भारतीय द्वीपकल्पाचा अगदी शेवटच्या टोकापर्यंतचा सगळा भाग जिंकून घ्यायचा, हाच कदाचित त्यांचा हेतू होता. ही त्यांची मोहिम फत्ते झाली; पण त्या युद्धातील क्रुरपणा आणि भयानकपणा पाहून अशोकांच्या मनात युद्धाबद्दल आत्यंतिक तिरस्कार, कमालीचा तिटकारा निर्माण झाला. अजूनही उपलब्ध असलेल्या त्यांच्या काही शिलालेखांवरून असे दिसते की, त्या युद्धानंतर त्यांनी असे जाहीरच करून टाकले की, त्यापुढे ते कधीही युद्ध करून इतरांवर विजय मिळवणार नाही, तर धम्माच्या मार्गाने जाऊन इतरांची मने जिंकून घेईल आणि खरोखरच तिथून पुढचं सगळं आयुष्य त्यांनी बौद्ध धर्माचा जगभर प्रसार करण्यातच व्यतीत केलं. त्यानंतर त्यांच्या अवाढव्य साम्राज्यावर त्यांनी अतिशय शांततेने आणि कर्तृत्व पणाला लावून राज्य केले. तरी ते नुसचेच धर्मवेडे नव्हते. लोकांच्या खऱ्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सम्राट अशोक अठ्ठावीस वर्षे अगदी मनापासून आणि समजूतदारपणे झटले. इतिहासाच्या पानांपानावर ज्यांच्या नावांची अक्षरश: गर्दी झाली आहे, ज्यांच्या वैभवाची, ऐश्वर्याची, दयाळूपणाची प्रसन्न व्यक्तिमत्त्वांची, त्यांच्या राजेशाही बिरूदांची आणि अनेक गोष्टींची रकाने भरभरून माहिती दिलेली आहे, अशा हजारों राजांमधल्या निवडक दहा राजांमध्येसुद्धा सम्राट अशोकाचं नाव तळपळतच राहिलं आहे, बहुधा त्यांचं एकट्याचंच नाव एखाद्या तेज:पुंज लक्षवेधी ताऱ्यासारखं चमकत राहिलं आहे. व्होल्यापासून थेट जपानपर्यंत अजूनही त्यांचं नाव आदराने घेतले जातं. चीन, तिबेट आणि अगदी भारतातसुद्धा अजूनही त्यांचे महत्त्व मानले जाते. आत्ता हयात असणाऱ्या बऱ्याच लोकांनी, कॉन्स्टेंटाईन किंवा चार्लेमॅन यांची नावेही कदाचित ऐकली नसतील; पण सम्राट अशोकांच्या आठवणी मात्र त्यांच्या मनात अजूनही आहेत.”

           *— एच्. जी. वेल्स (ग्रंथ - ‘द आऊटलाईन ऑफ हिस्टरी’)*

*७)* “अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की, एखाद्या देशातले सगळेच लोक जर अहिंसेने वागत असतील, तर त्या देशाचे संरक्षण कसे केले जाईल ? अशा काल्पनिक प्रश्नाचं उत्तर देणं खरं तर जरासं अवघडही आहे; पण ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात, एका सम्राटाने, ‘अहिंसा आणि अनुकंपा’ या तत्त्वांचा अवलंब करून भारतावर राज्य केले होते. त्यांचे नाव सम्राट अशोक – शांती आणि सामाजिक न्याय यांचा सम्राट. जुलूम–जबरदस्ती करून, स्वत:च्या ऐषारामासाठी सुख-समाधानासाठीच फक्त तजवीज करून किंवा स्वत:चा डामडौल मिरवत त्यांनी राज्य केले नाही तर स्वत:च्या ऐहिक सुखोपभोगांचा त्याग करत आणि स्वत:च्या प्रजेला समानतेने आणि न्यायाने वागवत त्यांनी राज्यकारभार पाहिला. आत्ताच्या जगात शांती, न्याय आणि एकोपा प्रस्थापित करण्यासाठी, आत्ताचे राज्यकर्ते, प्रशासक, राजकारणी लोक, मुलकी कर्मचारी, धार्मिक नेते आणि सर्वसामान्य लोक, या सर्वांनाच, सम्राट अशोकांचे हे आदर्श असे उदाहरण मार्गदर्शक ठरू शकेल.”

          *— दुली चंद्र जैन आणि सुनीता जैन (ग्रंथ- ‘अशोका एम्परर ऑर मॉन्क’)*

*८)* “सम्राट अशोक हे शांततेसाठी वाहून घेतलेला महामानव होते आणि इतिहासात ते असे एकमेव सम्राट होऊन गेले, ज्यांनी कलिंगच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पुन्हा कुठलेच युद्ध न करण्याचा निर्धार केला होता. स्वत:चं उरलेलं पूर्ण आयुष्य फक्त आपल्या प्रजेच्याच नाही तर तमाम मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं. या सेवाव्रतात दिसलेला त्यांचा दानशूरपणा, उपकारबुद्धी, मनाचा मोठेपणा आणि दिलदार वृत्ती, संपूर्ण इतिहासात अगदी अभावानेच दिसून येते. भारतीय इतिहासात सम्राट अशोकांनी खरोखरच एक सवर्णकाळ निर्माण करून दाखवला.”

           *— डॉ. कीर्तीसिंघे*

_*आपणांस व आपल्या। कुटुंबास धम्मदीक्षा दिनाच्या, अशोक विजयादशमी दिनाच्या व धम्म विजय दिनाच्या मनःपूर्वक खूप सार्‍या शुभेच्छा!!*_

🌷🌿☘️🌼🌷🌿☘️🌼🌷🌿☘️

*संकलन : महेश कांबळे*

*दिनांक : २५/१०/२०२०* 

https://mikamblemahesh.blogspot.com/2020/10/blog-post_25.html

🌷☘️🌿🌼🌷☘️🌿🌼🌷☘️🌿

Saturday, 17 October 2020

बौद्धधम्माचे मौलिक ग्रंथ

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                     *_बौद्धधम्माचे मौलिक ग्रंथ_*

           

                 _बौद्धधम्माचे मौलिक ग्रंथ *त्रिपिटक* ह्या नावांनी प्रसिद्ध आहेत. *ह्या ग्रंथात भगवान बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे.*_

                _*'पिटक', म्हणजे 'पेटारा' अर्थात 'त्रिपिटक' म्हणजे 'तीन पेटारे' ते पिटक येणेप्रमाणे १) सुत्तपिटक २) विनयपिटक आणि ३) अभिधम्मपिटक*


*१) सुत्तपिटक -* _भगवंतांनी निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या परिस्थितीमध्ये जे उपदेश दिले होते, त्यांचा संग्रह 'सुत्तपिटकात' केला आहे._


*२) विनयपिटक -* _विनय पिटकात भिक्खुंच्या राहणीच्या व वागण्याच्या नियमांचा संग्रह केलेला आहे. आचार्यांप्रति शिष्यांची कर्तव्ये, शिष्यांप्रति आचार्याची कर्तव्ये, गुरुबंधूप्रति भिक्खुंची कर्तव्ये, तसेच मठात राहण्याचे नियम इ. विनय पिटकात दिली आहेत._


*३) अभिधम्म पिटक -* _अभिधम्माचे ग्रंथ फार गहन व गंभीर आहेत. सूत्रात जे तत्त्व भगवंतांनी सोप्यात सोपे करून सांगितले आहे, त्यालाच विश्लेषणात्मक प्रकारे, पारिभाषिक शब्दात स्पष्ट केले आहे. त्यांचे महत्त्व फार मोठे आहे. *अभिधम्माचे वाचन व मनन केल्याशिवाय बुद्धधम्माचे निश्चित किंवा पक्के ज्ञान होऊ शकत नाही.* ह्यात चार धातूंचे वर्णन केले आहे - (१) चित्त (२) चैतसिक (३) रूप आणि (४) निर्वाण._ 

             _चित्ताचे विश्लेषण फारच उत्तम आहे. आधुनिक मनोविज्ञानाबरोबर त्याचे अध्ययन करणे फार उपयुक्त ठरेल. धम्मसंगणीवर अट्ट सालिनी नावाचे भाष्य लिहिताना *आचार्य बुद्ध घोष* लिहितात की, "अभिधम्मात कोणतीच नवीन गोष्ट सांगितली गेली नाही की, जी सूत्रात वर्णन केलेली नाही."_


*_बौद्धधम्माच्या साहित्य सृजनामध्ये हातभार लावणाऱ्या महाश्रमणांची नावे येणेप्रमाणे_*

*१) नागसेन (इ.स.१५०) -* मिलिंद प्रश्न

*२) नागार्जुन (इ. स. १७५) -* ते विदर्भातील होते. नागार्जुनाची शून्यवाद साहित्यकृती - 

      *अ)* आध्यात्मिक कारीक

      *आ)* युक्तीषठिका

       *इ)* प्रमाणविध्वंस

       *ई)* उपायकौशल्य

       *उ)* विग्रह व्यर्तनी

*३) असंग आणि वसुबंधु (इ.स. ३५०)* त्यांचा जन्म पेशावरमध्ये ब्राह्मण कुळात झाला. त्याचे प्रमुख ग्रंथ येणेप्रमाणे -

       *अ)* महायानीत्तर तंत्र

       *आ)* सूत्रालंकार

        *इ)* योगाचार भूमी

        *ई)* वस्तुसंग्रहणी

        *उ)* बोधिसत्त्व पिटकाववाद

       _यामधील योगाचारभूमी हा विशाल ग्रंथ सतरा भूमीमध्ये विभागलेला आहे._


            _*भारतीय तत्त्वज्ञानास आपल्या सर्वोच्च विकासाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी प्रथम जोरदार प्रयत्न असंग आणि वसुबंधु या पठाण बंधूंनी केला.* जेष्ठ बंधू असंग याने योगाचार भूमी उत्तरतन्यसारख्या ग्रंथाना रचून विज्ञानवादाचे समर्थन केले. कनिष्ठ बंधू वसुबंधुची प्रतिभा आणखीच बहुमुखी होती. त्यांनी एकीकडे *अभिधम्मकोष* आणि त्यावर एक मोठे भाष्य लिहिले आणि दुसरीकडे *'विज्ञप्तीमात्रता सिद्दीकी'* ची रचना करून आपल्या जेष्ठ बंधूंचे उत्तम समर्थन केले. तिसरे कार्य *'वाद विधान'* नावाचा न्याय ग्रंथ लिहिला. *त्यांनी ज्याला 'भारतीय मध्ययुगीन न्यायाचा पिता' म्हणविल्या जाणाऱ्या दिग्नागला शिकवले. आद्य शंकराचार्य नव्हे तर त्यांचे आजोबा गुरु गौडपाद यांची मांडुक्य कारिका, 'अलात शांती प्रकरण', प्रकट रूपाने एक बौद्धविज्ञानवादी ग्रंथ आहे.* विज्ञानवाद स्वतःच्या नावाने अधिक प्रसिद्ध नसून *'योगाचार दर्शन'* या नावाने अधिक प्रसिद्ध आहे._

*४) दिग्नाग (इ.स.४२५) -* ते वसुबंधूंचे विद्यार्थी होते. त्यांचे प्रमुख ग्रंथ - *न्यायमुख, प्रमाण समुचय. ते तामिळ देशाचे होते.

*५) धम्मकीर्ती (इ.स. ६००) -* त्यांचा जन्म उत्तर तामिळ देशात तिरूमलै गावी झाला. त्यांचे ग्रंथ येणेप्रमाणे -

     *१) प्रमाणवर्त्तिक*

     *२) प्रमाण विनिश्चय*

     *३) न्यायबिंदू*

     *४) हेतुबिंदू*

     *५) संबंध परीक्षा*

     *६) वाद - न्याय*

     *७) सन्तान्तर - सिद्धी*

     *८) टिकावृत्ती*

      

          *_प्रमाणवर्त्तिक १४५५ श्लोकांचे पद्य आहे. त्यांनी उद्योतकर (इ.स.५५०) च्या 'न्यायवर्तिक' ला छिन्नभिन्न केले. वाचस्पतीने (इ.स.८४१) एक कीर्ती टीका लिहून धम्मकीर्तीच्या सुनीपुण बुद्धीची प्रशंसा केली व त्यांना 'जगदभीभवधीर'  अशी पदवी दिली आणि उद्योतकरांच्या अत्यंत म्हाताऱ्या गाईचा धम्मकिर्तींनी उद्धार केला असा शेरा दिला. श्रीहर्ष (इ.स. १९१२) यांनी धम्मकीर्तीच्या तर्कपथास 'दुराबाध' म्हणून त्याची प्रशंसा केली._*

*६) अश्वघोष (इ.स. ५०) -* यांचे कर्मक्षेत्र गंधार (पेशावर) होते. त्यांचे ग्रंथ येणेप्रमाणे -

       *१) महायान श्रद्धोत्पाद*

       *२) बुद्धचरित्र*

       *३) सौन्दरानन्द*

       *४) सारिपूत्त प्रकरण*


                        *_अश्वघोषाचा जीवनकाळ इ.स. पूर्व ५० ते इ.स. नंतर १०० पर्यंत मानला जातो. संस्कृतमधील एक महाकवी, नाटककार आणि बौद्ध तत्त्वज्ञ. याच्या ग्रंथांतील व्यक्तिगत निर्देशांवरून याची काही माहिती मिळते. हा साकेत (अयोध्या) येथे राहणारा. याच्या आईचे नाव सुवर्णाक्षी. यास ‘आचार्य’, ‘भदंत’, ‘महाकवी’ आणि ‘महावादी’ या पदव्या होत्या. उपनिषदे, भगवद्‌‌गीता, सांख्यादी दर्शने आणि रामायणादी पूर्वकालीन काव्ये यांचा त्याने उत्तम अभ्यास केला होता. त्याच्या कृतींमध्ये दिसून येणारे ब्राह्मण धर्म व संस्कृतीचे सखोल ज्ञान, तत्संबंधीचा आदर आणि धर्मपरिवर्तनाच्या कथा यांवरून तो जन्माने ब्राह्मण असून पुढे त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला असावा, असा तर्क केला जातो. हा कनिष्काचा धर्मविषयक सल्लागार असून त्याच्या कारकिर्दीत झालेल्या बौद्धधर्मपरिषदेचा उपसभापती होता, अशी पारंपरिक समजूत आहे. हा हीनयान पंथाचा होता._*


    *बुद्धचरित, सौदरनंद, शारिपुत्रप्रकरण (सारिपुत्रप्रकरण किंवा शारद्वतीपुत्रप्रकरण), वज्रसूची, गण्डीस्तोत्रगाथा, सूत्रालंकार, महायान श्रद्धोत्पादशास्त्रइ. ग्रंथ अश्वघोषाचे म्हणून सांगण्यात येतात. तथापि "बुद्धचरित" व सौदरनंद ही महाकाव्ये आणि शारिपुत्रप्रकरण हे नाटक, एवढे तीनच ग्रंथ निर्विवादपणे अश्वघोषाचे आहेत.*


           बुद्धचरिताचे मूळ अठ्ठावीस सर्ग असावेत, असे त्याच्या चिनी व तिबेटी आवृत्त्यांवरून दिसते. आज मात्र त्या मूळ संस्कृत महाकाव्याचे फक्त चौदाच सर्ग उपलब्ध आहेत. त्यांतही पहिल्या सर्गाचे सु. तीन पाद आणि चौदाव्या सर्गाच्या पहिल्या पादातील ३१ श्लोकच मिळतात. एकोणिसाव्या शतकात अमृतानंद नावाच्या एका नेपाळी पंडिताने चौदा ते सतरा हे सर्ग स्वतःच लिहून काढले. अंशत:च उपलब्ध असलेल्या या महाकाव्यात बुद्धाच्या आत्मसाक्षात्कारापर्यंतची कथा आलेली आहे.


        राजपुत्र सर्वार्थसिद्धीची नगरयात्रा त्याला पाहण्यासाठी जमलेला स्त्रियांचा मेळावा रोग, वार्धक्य आणि मृत्यू यांची दृश्ये राजपुत्राला सर्वसंगपरित्यागापासून परावृत्त करण्यासाठी राजपुरोहिताने केलेले युक्तिवाद इत्यादींच्या वर्णनांतून अश्वघोषाची वेधक कथनशैली आणि निरनिराळ्या व्यक्ती व प्रसंग रंगविण्याचे कौशल्य प्रत्ययास येते. हे काव्य रचताना बुद्धासंबंधीच्या अधिकृत माहितीचाच उपयोग करण्याकडे त्याची प्रवृत्ती दिसते. तसेच, आवश्यक तेथे त्याने परंपरेला मान दिला आहेच.   

       बौद्धधर्मतत्त्वांचा प्रचार हे या काव्याचे उद्दिष्ट असले, तरी अश्वघोषाने हे काव्य रुक्ष होऊ दिले नाही. सौदरनंदाचे एकूण १८ सर्ग असून ते उपलब्ध आहेत. बुद्धाने नंद या आपल्या सावत्र भावाचे धर्मांतर कसे घडवून आणले, हा या काव्याचा विषय आहे. नंद हा अत्यंत देखणा असल्यामुळे ‘सुंदर’ या नावानेच ओळखला जाई. त्याची पत्‍नी सुंदरी हीसुद्धा अतिशय रूपवान होती. तिच्यासह सुखोपभोगात तो मग्न असे. बुद्धाने त्याचे डोळे उघडले आणि संसारलालसा सोडून तो बुद्धाचा अनुयायी झाला, असे या महाकाव्यात दाखविले आहे. *सौदरनंदात* काव्याबरोबर तत्त्वचर्चाही आली आहे. धर्मोपदेशक अश्वघोष या काव्यात अधिक प्रकर्षाने जाणवतो. *शारिपुत्रप्रकरण ह्या नाटकात शारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे बुद्धाने घडवून आणलेले धर्मांतर दाखविले आहे.* तथापि हे नाटक अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे या धर्मांतराची महावग्गासारख्या ग्रंथांतून आढळणारी कथा या नाटकात अश्वघोषाने कशी मांडली होती, यासंबंधीची नीटशी कल्पना येऊ शकत नाही.


       *_सर्वसामान्यांना बौद्ध धर्माचे महत्त्व पटवून देण्यासाठीच अश्वघोष काव्य-नाटकांसारख्या ललितरचनेकडे वळला._* ‘कडू औषध मधाबरोबर दिले की घेववते त्याचप्रमाणे मोक्षधर्माचा उपदेशही काव्यबंधाने मनोरम ठरतो’ अशा आशयाचे उद्गार सौदरनंदाच्या अखेरीस त्याने काढले आहेत. काव्याच्या तंत्रकौशल्याकडे त्याने फारसे लक्ष पुरविले नाही. तथापि त्याच्या साध्या, सरळ, पण मधुर भाषेनेच त्याच्या काव्याला एक आकर्षक रूप प्राप्त करून दिले आहे. *अश्वघोष आणि कालिदास यांच्या काव्यांत काही लक्षणीय साम्यस्थळे आढळतात. त्यांवरून त्याच्या काव्याचा कालिदासाने उत्तम अभ्यास केला असावा, असे मत अनेक विद्वानांनी व्यक्त केले आहे. याच्या उलट अश्वघोषाचा काळ कालिदासानंतरचा असून त्यानेच कालिदासाचे अनुकरण केले असावे, असाही विचार काही विद्वानांनी मांडला आहे. तथापि अश्वघोष हा कालिदासचा पूर्वसूरी होय हेच मत सर्वसाधारणतः मान्य केले जाते.*


         _त्यांच्या मधुर गायनाने घोडे मंत्रमुग्ध होत असत, त्यामुळे त्यांचे नाव अश्वघोष पडले._ ते महाराज कनिष्क यांचे गुरू होते. *कनिष्काने बोलाविलेल चतुर्थ बौद्ध संगीतिमध्ये ते उपसभापती होते.* 


       *_ते संगितज्ञ भिक्खु होते व आपल्या संगीतास त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचाराचे साधन बनविले. ते विणेचे अत्यंत कुशल वादक होते. त्यांनी "रास्तवर" नावाच्या वाद्ययंत्राचा आविष्कार केला._*


*७) योगाचार आणि इतर बौद्ध तत्त्वज्ञान*

*८) महाश्रमण बुद्धघोष -*

            _*महावंश सिंहली ग्रंथाच्या १०० व्या अध्यायामधील ३७ व्या अध्यायात बुद्धघोषांच्या  चरित्रांचे वर्णन आहे. बौद्धधम्माच्या अग्रगण्य प्रचारकांत बुद्धघोषांचे नाव घेतले जाते.* मगध देशात गयेजवळ ब्राह्मणकुळात त्यांचा जन्म ५ व्या शताब्दीमध्ये झाला. ते वेद आणि शास्त्रात पारंगत झाले. बौद्ध भिक्खुंसोबत झालेल्या वादविवादात हरल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांचा स्वर भगवान बुद्धाप्रमाणे धीरगंभीर, स्निग्ध आणि बुलंद असल्यामुळे त्यांना लोक 'बुद्धघोष' म्हणू लागले. त्यांनी *'ज्ञानोदयची'* रचना केली. *भिक्खु रेवत'* यांच्या आग्रहावरून ते श्रीलंकेस गेले आणि *सिंहली भाषेतून अठ्ठकथा आणि जातक कथांचे पाली भाषेत भाषांतर केले. त्यांनी विशुद्धीमार्गाची देखील रचना केली.*_


*संदर्भ :-*

*१)* बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास

*२)* बौद्धधर्म

*३)* बौद्धधम्मावरील चार निबंध

*४)* बौद्धधम्म जिज्ञासा



*संकलन : महेश कांबळे*

*१८/१०/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Friday, 16 October 2020

बौद्ध उपासक

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                     *_बौद्ध उपासक_*

           

                 _*बौद्ध गृहस्थाला बौद्ध उपासक आणि बौद्ध स्त्रीला बौद्ध उपासिका म्हणतात. "तपस्सु व भल्लिक हे दोघे व्यापारी केवळ द्विशरण उपासक होते."* भगवंतांना संबोधी प्राप्त झाल्यावर त्यांनी सात दिवसापर्यंत बोधिवृक्षाखाली बसून सात वेळा पुनःपुन्हा श्रेष्ठ सुखाचा आस्वाद घेतला. ज्यावेळी तपस्सु व भल्लिक नावाचे दोन व्यापारी प्रवास करीत करीत जवळच्या रस्त्याने जाऊ लागले, त्यांनी त्या धीरगंभीर व उदात्त श्रमणाला पाहिले व त्यांच्याजवळ जाऊन आदरपूर्वक त्यांना पोळी व शहद अर्पण केले. *तेच संबोधी प्राप्त झाल्यानंतरचे प्रथम अन्नदान होते.* त्यानंतर  भगवंतांनी त्यांना मुक्तीचा मार्ग समजावून सांगितला. भगवंतांच्या परमपावित्र्याची जाणीव झाल्याने ते दोघेही व्यापारी मोठ्या आदरयुक्त भावाने नतमस्तक झाले व म्हणाले, "भगवन्, आम्ही आपल्याला व आपण सांगितलेल्या धम्माला शरण जातो". *त्यावेळी संघाची स्थापना झालेली नव्हती, म्हणून ते द्विवाचिक उपासक झाले.*_

         _*वाराणशीमधील एका श्रीमंत व्यापाऱ्याचा 'यश' नावाचा मुलगा सर्वप्रथम त्रिशरण घेऊन प्रव्रजित झाला. त्यानंतर त्याचा पिता त्रिशरण ग्रहण करून 'उपासक' झाला. हाच पहिला त्रिश्ररणागत उपासक होय.* त्यापुढे यशाचे चार मित्र - विमल, सुबाहु, पूर्णजित आणि गवाम्पति यांनीही भगवंतांकडे जाऊन दीक्षा ग्रहण केली. *वारणाशीचा तरुण  कुलपुत्र यश याची माता व पत्नी ह्या सर्वप्रथम उपासिका व शरणागत स्त्रिया होत.*_


*_भिक्खु आणि उपासक यांच्यातील मुख्य भेद_*

            _पंचशीलाचे नियम भिक्खु आणि उपासक दोघांनाही पाळावयाचे असतात. परंतु भिक्षुला ते व्रतरुप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो.उपासकाकरिता ते अनुकरणीय असतात. *भिक्खु म्हणजे बुद्धांच्या आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश होय आणि भिक्खुंच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे, हे उपासकांचे ध्येय असते. भिक्खु स्वतःच चारित्र्यवान, धार्मिक ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे आणि ह्यासाठी त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा केली पाहिजे आणि उपासकाने त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.*_

                _*दोन तऱ्हेच्या दीक्षा - प्रथम दीक्षा भिक्खूची त्यांना सामूहिक रूपाने संघ म्हणतात. दुसरी दीक्षा उपासकाची म्हणजे गृहस्थ बौद्धाची.* भिक्खु व उपासक यांच्या जीवनांत प्रामुख्याने चार फरक आहेत -_

*१)* उपासक गृहस्थच राहतो, परंतु भिक्खु गृहत्यागी परिव्राजक होतो

*२)* भिक्खूकरिता व्रत आहेत व त्यांचे पालन न केल्याने शिक्षा मिळू शकते.उपासकाकरिता केवळ शील आहेत, ज्यांचे तो आपल्या सामर्थ्यानुसार अधिकात अधिक पालन करायचे प्रयत्न करतो.

*३)* उपासक संपत्ती ठेवू शकतो. परंतु भिक्खु संपत्तीचा मालक होऊ शकत नाही.

*४)* उपासक बनावयास कोण्या संस्काराची आवश्यकता नाही. भिक्खूकरिता उपसंपन्न होणे आवश्यक असते. उपासकास जेव्हा वाटेल तेव्हा तो भिक्खु होऊ शकतो.


             _*भगवंतांनी गृहस्थांना आणि भिक्खुंना दिलेले उपदेश भिन्नभिन्न आहेत.* एकदा जेतवनारामामध्ये थांबले असताना *धम्मीक नावाचा उपासक पाचशे इतर उपासकांसह भगवंतांकडे आला व भिक्खुंचे आणि गृहस्थांचे शील काय आहे* असे विचारू लागला. भगवंतांनी असे स्पष्ट केले की, *भिक्खुंचे शील येणेप्रमाणे आहे -*_

*१)* मध्यान्हानंतर पिण्डपाताकरिता जाऊ नका, असमय पिण्डपात करण्यासाठी जाळे पसरलेले असते.

*२)* पिण्डपातास निघण्यापूर्वी आपल्या मनास रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श यांच्या आसक्तीपासून मुक्त करा.

*३)* पिण्डपातानंतर एकटेच परत येऊन एकांतात स्थिर चित्ताने चिंतन करा.

*४)* सज्जनांशी बोलचाल करताना केवळ धम्माविषयी बोला.

*५)* भिक्षा, विहार, शयनासन व पाण्याने साफसफाई करणे इत्यादी गोष्टींना साधनापेक्षा अधिक महत्व देऊ नका.

*६)* जर कोणी भिक्खु अनासक्त ह्या सर्व गोष्टींचा उपयोग करील, तर तो पाण्यात राहूनही त्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे अलिप्त राहील.

           _*त्यानंतर त्यांनी गृहस्थांसाठी उपदेशिलेल्या शिलांचे वर्णन केले, ते असे -*_

*१)* प्राणीहिंसा करू नका, चोरी करू नका, खोटे बोलु नका व्यभिचार करू नका आणि मादक पदार्थांचे सेवन करू नका.

*२)* उपोसथांच्या दिवशी उपोसथव्रत ग्रहण करून अष्टशिलांचे पालन करा.

*३)* प्रातःकाळच्या पवित्र समयी श्रद्धायुक्त चित्ताने अष्टशील ग्रहण करून त्यांचा बुद्धिपरस्पर व्यवहार करा.

*४)* भिक्खुंना यथासामर्थ्य भोजन आणि पेय पदार्थांचे दान करा.

*५)* आपल्या मातापित्याची सेवा करा, जीविकेचे चांगले साधन ठेवा.

*६)* या प्रकारे जो गृहस्थ दृढतापूर्वक धम्माचे पालन करील त्यास दिव्य लोक प्राप्त होईल. यावरून हे स्पष्ट होते की, भिक्खु आणि गृहस्थांचा एकच धर्म आहे. 


          *_भिक्खुंकरिता शील व्रतांप्रमाणे अनिवार्य आहे, परंतु गृहस्थांकरिता ते स्वच्छेने ग्रहण केलेलं आहेत._*


            *_उपासकांचे दहा गुण_*


               *_उपासकाच्या अंगी दहा सद्गुण असले पाहिजे, तरच तो योग्य उपासक बनू शकतो. ते दहा गुण असे -_*


*१)* उपासकाने आपल्या भिक्षुविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगावी

*२)* धर्माला सर्वश्रेष्ठ मानावे

*३)* भिक्षुस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये

*४)* धर्माचा लोप पावत आहे असे दिसून आल्यास धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी पराकाष्टेचे प्रयत्न केले पाहिजेत

*५)* तो त्रिरत्नाप्रति योग्य विचारसरणी ठेवीत असतो

*६)* असा उपासक केवळ जिज्ञासेपायी सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मतात न जाता धर्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो

*७)* असा उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो

*८)* तो शांतता प्रिय असतो

*९)* ऐकतेचा प्रशंसक असतो

*१०)* असा शिष्य केवळ धर्माचे दिखाऊ अवडंबर माजवीत नाही, तर तो यथार्थाने बुद्ध, धर्म व संघाचे ठाई त्याची नितांत श्रद्धा व निष्ठा असते


*संदर्भ :-*

*१)* बौद्ध प्रश्नोत्तरी

*२)* बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन

*३)* तथागताची सत्यगाथा

*४)* भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म

*५)* बौद्धधम्म जिज्ञासा

*६)* मिलिन्द प्रश्न


              

*संकलन : महेश कांबळे*

*१७/१०/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Thursday, 15 October 2020

धम्मोपदेशकाची कर्तव्ये

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                     *_धम्मोपदेशकाची कर्तव्ये_*

           


              *_भगवंतांनी धम्मोपदेशकाची पुढील कर्तव्ये सांगितलेली आहेत -_*


*१)* _धम्मोपदेशकाने मोकळ्या मनाने सत्य विचारार्थ पुढे मांडला पाहिजे._

*२)* _एखाद्याचे मन वळविण्यास लागणारा संयमशक्तिचा सद्गुण त्याच्या नसानसांत भिनलेला असावा._

*३)* _त्याने आपली योग्य ती मर्यादा राखावी व आपल्या वागणुकीत ठाम राहावे._

*४)* _थोरांची मैत्री संपादन करण्याच्या प्रयत्नात राहून आपल्या अहंपणाला चालना न देण्याचा त्याने प्रयत्न करावा. (अनैतिकपणे वागणाऱ्या व्यक्तीशी संगत करू नये.)_

*५)* _जे श्रवण करावयास येतात, त्यांचे त्याने सदिच्छापूर्वक स्वागत करावे. धम्मोपदेश द्वेषरहित असला पाहिजे._

*६)* _दुसऱ्यांचे बारीकसारीक दोष काढू नये. लोकापवादाची चर्चा करू नये. कटुशब्दांची पेरणी करू नये. दुसऱ्या शिष्यांची निर्भर्स्तना करू नये आणि त्यांच्या आचरणाची खरडपट्टी काढताना त्यांचे व्यक्तिगत नाव घेऊ नये._

*७)* _दोषरहीत मनाने संपूर्ण जगाविषयी प्रेमभाव ठेवावा._

*८)* _भांडणाप्रत चाललेल्या विवादात भाग घेऊ नये अशा वेळी शांत व स्वस्थ राहावे._

*९)* _आपल्या कार्यात उत्कंठतेने मन घालावे. ते उत्साहाने व हर्षभरित आशेने परिपूर्ण असायला हवे._

*१०)* _पाण्याच्या शोधार्थ जो एखाद्या रुक्ष प्रदेशात विहीर खोदतो, त्या मनुष्यासारखे राहावे. जोपर्यंत लोक त्याचे शब्द लक्षपूर्वक श्रवण करीत नाहीत तोपर्यंत त्याने जाणावे की, त्याला त्यांच्या हृदयात खोल खणावे लागेल._

*११)* _ज्यांना समाधान देणारे व कल्याणकारी असे धम्मप्रवचन लक्षपूर्वक ऐकणे प्रिय वाटते अशा श्रोत्यांना त्यांनी आपल्या भोवती गोळा करावे. अविश्वास बाळगणाऱ्यांना वर उचलून धरावे व त्यांना सत्य स्वीकारावयास जागृत करावे. त्यांना हर्षभरित व आनंदित करून त्यांना प्रज्वलित करावे व नीतीचा बोध करावा._

*१२)* _त्याने स्वतःस तथागताचा सैनिक समजून दुष्ट माराला आपला शत्रू समजावे व त्यावर विजय मिळविण्याचा सदोदित प्रयत्न करावा._



*संदर्भ :-*

*१)* तथागताची सत्यगाथा

*२)* बौद्धधम्म जिज्ञासा



*संकलन : महेश कांबळे*

*१६/१०/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

महासागराचे गुण

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                     महासागराचे गुण

            

           *_महासागराचे आठ गुण भगवंतांनी पुढीलप्रमाणे स्पष्ट केले -_*

*१)* महासागर आणि भगवंतांची शिकवण दोन्ही हळूहळू अधिकाधिक खोल होत जातात.

*२)* सर्व प्रकारच्या परिवर्तनांतही आपल्या व्यक्तिमत्त्वाचे संरक्षण करतात

*३)* मृत शरीरांना बाहेर शुष्क भूमीवर फेकून देतात

*४)* ज्याप्रमाणे विशाल सरिता महासागराला जाऊन मिळाल्यावर आपापल्या नावांना मुकतात व तेव्हापासून पुढे त्या महासागरामध्येच त्यांची गणना होते; तद्वतच सर्व जाती आपापल्या वंशावळी सोडून देऊन संघात प्रवेश करतात, भिक्षु होतात व शाक्यमुनींचे पुत्र म्हणून गणले जातात.

*५)* सर्व प्रवाहांचे महासागर हेच ध्येय असते. तथापि, त्याला कधीच पूर येत नाही, तो कधी रिकामाही होत नाहो. त्याचप्रमाणे धम्माला कोट्यवधी लोकांनी स्वीकारले तरी त्याची वाढ होत नाही किंवा तो कमी होत नाही.

*६)* ज्याप्रमाणे महासागराच्या जलास एकच म्हणजे खारट स्वाद असतो, त्याचप्रमाणे बौद्धधम्माला एकच सुवास आहे; तो म्हणजे उद्धार होय. 

*७)* महासागर आणि धम्म दोघेही रत्न, मोती व अमूल्य जडजवाहीर यांचे भंडार होय.

*८)* दोघेही प्रबळ असून प्राणीमात्रांना निवासस्थानाप्रमाणे आश्रय देतात.


*_बौद्धधम्माची तत्त्वे महासागरासारखी असावयास खालील आश्चर्यकारक गुण कारणीभूत आहेत._*


*१)* धम्माची शिकवण शुद्ध असून ती उच्चकुलीन किंवा हीन कुलीन, श्रीमंत वा दरिद्री असा दुजाभाव करीत नाही.

*२)* धम्माची शिकवण स्वच्छ जलासारखी आहे, जी भेदभाव न करता सर्वांना स्वच्छ करते.

*३)* धम्माची शिकवण त्या अग्निसारखी आहे की, जो स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या अंतरामध्ये असणाऱ्या लहानमोठ्या सर्व वस्तूंना भस्मसात करतो.

*४)* ती अनेक स्वर्गांसारखी आहे; कारण येथे अमर्याद जागा आहे. सर्वच लोक स्त्री - पुरुष, मुली - मुले, महाप्रबळ व अतिशूद्र अशा सर्वांच्या स्वागताकरिता भरपूर जागा आहे.


*टीप :* _स्वर्ग म्हणजे मनाची अशी अवस्था ज्या ठिकाणी इतरांबद्दल मैत्री, करुणा इत्यादी भावना असते. (इतर मान्यवरांनी ही यावर माहिती द्यावी ही विनंती)_


*संदर्भ :-*

*१)* तथागताची सत्यगाथा

*२)* मिलिंद प्रश्न

*३)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

*१५/१०/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Tuesday, 13 October 2020

चैत्यांचा अलौकिकपणा

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                     *_चैत्यांचा अलौकिकपणा_*

            

             _*निर्वाणाचा साक्षात्कार केलेल्या सर्वच लोकांच्या चैत्यामध्ये अलौकिकपणा असतोच असे नाही, त्यातील काही जणांच्या चैत्यामध्ये अलौकिकपणा असतो तर काही जणांमध्ये नसतो. तीन अधिष्ठांनांपैकी निदान एकाचेतरी अधिष्ठान करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतात, अशाच भिक्षूंच्या चैत्यामध्ये अलौकिकपणा असतो.*_ ते तीन अधिष्ठान असे -

*१)* _कोणी अर्हत आपल्या जिवंतपणी देवता आणि मनुष्यावर अनुकंपा करून असे अधिष्ठान करतो की, "माझ्या चैत्यामध्ये अलौकिकपणा यावा". त्यांनी असे अधिष्ठान करतांना संकल्प केल्यामुळे त्याच्या चैत्यात अलौकिकपणाचा असा गुण येत असतो. याप्रमाणे अर्हतांनी अधिष्ठान करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतल्यामुळे त्यांच्या चैत्यामध्ये अलौकिक शक्ती दिसून येते._


*२)* _देवता आणि मनुष्यावर अनुकंपा करून ज्या भिक्षूंनी निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतला आहे, त्यांच्या चैत्यामध्ये अलौकिक चमत्कार दिसून येत असतात, त्यामुळे चमत्कार पाहून लोकांत धर्मश्रद्धा कायम रहावी आणि इतर लोकांनीसुद्धा आपल्या मनात श्रद्धा जागवून अधिकाधिक पुण्यकार्य करावे. याप्रमाणे देवतांचे अधिष्टान करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या अर्हतांच्या चैत्यामध्ये अलौकिक चमत्कार दिसून येते._


*३)* _कोणी श्रद्धावान, भक्त, पंडित, समजदार आणि बुद्धिमान पुरुष असो की, स्त्री असो निर्मळ व पवित्रमनाने गंध, माळा, वस्त्र किंवा अन्य दुसऱ्या वस्तू चढवून 'असे होवो' असा संकल्प करून अधिष्ठान करतो. त्यामुळे तसेच घडून येते. याप्रमाणे अधिष्ठान केल्यामुळे निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या अर्हत भिक्षूंच्या चैत्यांत अलौकिक गोष्टी दिसून येतात._


             _याच तीन अधिष्ठांपैकी कोणते ना कोणते अधिष्ठान करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या अर्हत भिक्षूंच्या चैत्यामध्ये अलौकिकशक्ती येत असते. ज्यांच्या निर्वाणाच्या साक्षात्कारात या अधिष्ठांनांपैकी कोणतेही अधिष्ठान नसेल, तर सहा अभिज्ञाप्राप्त क्षीणाश्रयाच्या पुर्णपणे आपल्या चित्ताला वश करून घेणाऱ्या भिक्षुच्याही चैत्यामध्ये अलौकिक गोष्टी दिसून येत नाही. *अशा जरी अलौकिक गोष्टी त्यांच्या चैत्यात दिसून येत नसल्या तरीपण त्यांच्या पवित्र जीवनाकडे पाहून त्यांच्या चैत्यांची पुजाअर्चा करावयास गेले पाहिजे, ह्या अर्हतांनी निर्वाणाचा साक्षात्कार केला आहे, हे धन्य होत, असे स्मरण करून त्यांच्याप्रती गौरवभाव मनात ठेवला पाहिजे.*_


*संदर्भ :-*

*१)* मिलिंद प्रश्न


*महत्वपूर्ण टीप :* _मुद्दा क्रमांक २ संदर्भात अतिरिक्त माहिती कोणाकडे असल्यास माहिती द्यावी._


*संकलन : महेश कांबळे*

*१४/१०/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Monday, 12 October 2020

समाधी

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                     *_समाधी_*

            

                     _*कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे, म्हणजेच सम्यक - समाधी होय.* समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. *जसे - श्वासोच्छ्वास रोखुन धरणे, काही दिवस किंवा तासाकरिता जिवंतपणी स्वतःला जमिनीत गाडून घेणे, श्वासोच्छ्वास चालू असता तरी जागृतीविहिन होणे, प्राणान्त होणे इत्यादींनाही 'समाधी' म्हणतात.* परंतु अशा समाधीचा 'सम्यक समाधीचा' काहीच संबंध नाही. कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे 'सम्यक समाधी', स्वभावतः मन (चित्त) चंचल आहे. यास्तव त्याला एकाग्र - चित्त करणे म्हणजेच समाधी होय. जेवढे पुण्यधर्म आहेत ते सर्व समाधिकडे घेऊन जाणारे आहेत. अशा तऱ्हेने समाधी प्रमुख आहे. समाधीचा अभ्यास केल्याने व समाधी लागल्यानेच खरे ज्ञान होते._


*समाधीचे प्रकार*

*१) लौकिक (लोकीय) -* कामभूमी, रूपभूमी आणि अरुपभूमी ह्यांच्या कुशल चित्तांच्या एकाग्रतेच्या अवस्था.

*२) लोकोत्तर (लोकूत्तर) -* प्रज्ञा भावनेने निर्वाणाचा साक्षात्कार

*३) उपचार -* क्षीण ध्यानाची अवस्था

*४) अर्पणा (अप्पणा) -* दृढ ध्यानाची अवस्था


*समाधीत येणारी पाच प्रकारची विघ्ने*

*१) कामच्छन्द -* विषयांत अनुराग, लोभ, मोह, कामवासनेने व्याकुळ

*२) व्यापाद -* द्वेष, हिंसा, घृणा करणे

*३) त्यान मिद्ध ( थिन मिद्ध) -* बेहोशी, आळस, तंद्रा, निद्रा

*४) औधत्य - कौकृत्य (उद्धच्च कुकुच्च) -* बेचैनी, व्याकुळता, प्रक्षुब्ध होणे, पश्चाताप

*५) विचिकित्सा (विचिकिच्छा) -* संदेह, शंका करणे


*समाधीमध्ये ध्यानाची अंगे*

*१)* वितर्क (वितक्क)

*२)* विचार

*३)* प्रीती (पिती)

*४)* सुख

*५)* एकाग्रता (एकाग्गता)


            _*बुद्ध समाधी लावत कारण की,* समाधीमध्ये पुष्कळ गुण आहेत. समाधीनेच बुद्धत्व प्राप्त होऊ शकते आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरही समाधीच्या उत्तम गुणांना स्मरण करण्याकरिता ते समाधी लावीत असत._

         *_समाधीचे २८ गुण आहेत._*

*१)* आपली रक्षा होते

*२)* जीवन दीर्घ होते

*३)* बळ वाढते

*४)* अवगुणांचा नाश होतो

*५)* अपयश दूर होते

*६)* यशाची वृद्धी होते

*७)* असंतोष दूर होतो

*८)* पूर्ण संतोष राहतो

*९)* भय दूर होते

*१०)* निर्भयता येते

*११)* आळशीपणा दूर होतो

*१२)* उत्साह वाढतो

*१३, १४, १५)*  राग, द्वेष, मोह नष्ट होतात

*१६)* खोटा अभिमान दूर होतो

*१७)* सर्व संदेह दूर होतात

*१८)* चित्ताची एकाग्रता वाढते

*१९)* मन सुंदर होते

*२०)* मन सदा प्रसन्न होते

*२१)* गंभीरता येते

*२२)* मोठा लाभ होतो

*२३)* नम्रता येते

*२४)* प्रीती येते

*२५)* प्रमोद होतो

*२६)* सर्व संस्कारांच्या क्षणिकतेचे दर्शन होते

*२७)* पुनर्जन्मापासून सुटका होते

*२८)* श्रमणभावाचे यथार्थ फळ प्राप्त होते


             _*सर्वच बुद्ध समाधीत मग्न होतात याची चार कारणे अशी आहेत -*_

*१)* आपदरहित सुखमय जीवन

*२)* सर्वश्रेष्ठ गुणांचा वास

*३)* उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग

*४)* सर्वच बुद्धांनी मुक्त कंठाने केलेली समाधीची प्रशंसा

            *_याच कारणाने तथागत नेहमी समाधी - भावनेत मग्न होत असत. तथागत बुद्धांस काही करावयाचे शिल्लक राहिले होते म्हणून नव्हे, तर समाधीचे अमाप गुणधर्म पाहूनच ते समाधीचे चिंतन करीत असत._*



*संकल्प :-*

*१)* बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन

*२)* दुःख मुक्ती की साधना

*३)* मिलिंद प्रश्न

*४)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

*१३/१०/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बोधिसत्त्व

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                     *_बोधिसत्त्व_*

            

                _*'बोधी' म्हणजे महान ज्ञान आणि 'सत्त्व' म्हणजे प्राणी. 'बोधिसत्त्व' म्हणजे जो कधी ना कधी निश्चितपणे बुद्ध किंवा महाज्ञानी बनेल असा बुद्धत्व प्राप्तिकरिता प्रयत्नशील माणूस.* बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी सिद्धार्थाला बोधिसत्त्वच म्हणत असत._

                  _बोधिसत्त्वाला सतत दहा जन्मापर्यंत 'बोधिसत्त्व' राहावे लागते. *जन्म म्हणजे मानसिक परिवर्तन* (जन्म म्हणजे कायेचा मृत्यू होऊन पुनः जन्म घेणे नव्हे.)_


           _पहिल्या जन्मी तो *'मुदिता'* प्राप्त करून आपल्या चित्ताची अशुद्धता दूर करतो व प्रमादरहित झाल्यावर त्याच्या मनात सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाची उत्कट इच्छा उत्पन्न होते._


            _दुसऱ्या जन्मी *'विमला - भूमी'* अवस्थेला प्राप्त होऊन कामचेतनेपासून मुक्त होतो. तो सर्वांप्रति कारुणीक होतो._


             _तिसऱ्या जन्मी *'प्रभाकारी - भूमी'* प्राप्त झाल्यावर बोधिसत्त्वाची प्रज्ञा दर्पणासारखी स्वच्छ होते. तो अनात्म व अनित्यतेच्या सिद्धांताला पूर्णपणे समजून घेऊन त्यास आत्मसात करतो. उच्च प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी तो मोठ्यात मोठा त्याग करण्यास सिद्ध होतो._


         _चौथ्या जन्मी तो *'अर्चिष्मती - भूमीला'* प्राप्त करतो. यावेळी त्याचे लक्ष अष्टांगिक मार्गावर केंद्रित होतो._


             _पाचव्या जन्मी तो *'सुदूर्जया - भूमीला'* प्राप्त करून सापेक्ष व  निरपेक्षातील संबंधाला उत्तम प्रकारे आत्मसात करतो._


             _सहाव्या जन्मी *'अभिमुखी - भूमीला'* प्राप्त करून बोधिसत्त्व बारा निदाने आत्मसात करतो. अभिमुखी नावाच्या विद्येमुळे त्याच्या मनात अविद्याग्रस्त प्राण्यांप्रति असीम करुणा निर्माण होते._


            _सातव्या जन्मी बोधिसत्त्व *'दूरङ्गमा - भूमी'* ला प्राप्त करतो. त्याला देशकालाचे बंधन राहत नाही. तो तृष्णामुक्त होतो. तो दानशील, क्षमाशील, कुशल, वीर्यवान, बुद्धिमान आणि प्रज्ञावान होतो._


            _आठव्या जन्मी *'अचल'* होऊन बोधिसत्त्व कृतकृत्य होतो. त्यांच्याकडून अनासायेच कुशल कर्म घडतात व तो प्रत्येक कामात सफल होतो._


           _नवव्या जन्मज *'साधुमती - भूमी'* प्राप्त करून बोधिसत्त्व सर्व धम्म पद्धती, दिशा व काळाच्या सीमांना जिंकून पार करतो._


            _दहाव्या जन्मी बोधिसत्त्व *'धम्म - मेध'* बनतो. त्याला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते._


*संकल्प :-*

*१)* बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन

*२)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

*१२/१०/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Saturday, 10 October 2020

सिद्धार्थ गौतम आणि सहा दार्शनिक

 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

          *_सिद्धार्थ गौतम आणि सहा दार्शनिक_*
           
                   _सिद्धार्थाच्या वेळी ब्राह्मणमवादाव्यतिरिक्त आणखी ६२ दार्शनिक होते. त्यांपैकी *पूर्ण काश्यप, मक्खली गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कच्चायन, संजय वेलठ्ठीपुत्र आणि महावीर* हे सहा जण प्रमुख होते._

_*१) पूर्ण काश्यपाचे मत 'अक्रियावाद' नावाने प्रसिद्ध होते.* कोणी कितीही वाईट कर्म करो किंवा कितीही पुण्यप्रद कर्म करो, त्याचा आत्म्यावर परिणाम होत नाही. मेल्यावर काहीच उरत नसते, न आत्मा, न शरीर, *सिद्धार्थास हे मत पटले नाही.*_

_*२) मक्खली गोसालाचे मत 'नियतीवाद' या नावाने ओळखले जाई.* ते एक प्रकारचे *'पूर्ण निश्चयवादी'* होते. न कोणी काही करू शकतो, न कोणी काही व्हावयाचे थांबवू शकतो. घटना घडतात, दुःखाचा कोणीही नाश करू शकत नाही, त्यांचे प्रमाण कोणीही कमी-अधिक करू शकत नाही. *हे सिद्धार्थास मान्य नव्हते. त्यामुळे माणसाला केवळ भाग्यावर विसंबून राहावे लागेल, असे सिद्धार्थास वाटले.*_

_*३) अजित केसकम्बलाचा 'उच्छेदवाद म्हणजे एक प्रकारचा संपूर्ण नाशवाद.* त्याची शिकवण होती की, होम आदी यज्ञ व्यर्थ आहेत. कर्माची फळे आत्म्यावर कसलाही प्रभाव पाडू शकत नाही. *ना कुठे स्वर्ग आहे ना नरक.* कष्ट आणि दुःख एकाएकी समाप्त होईल. आत्म्यास चौऱ्यांशी लक्ष जन्म घ्यावे लागतील / योनीमधून जावे लागेल तेव्हाच त्याला दुःखापासून मुक्ती मिळेल. *सिद्धार्थास ते मत पटले नाही. कारण त्यानुसार खाणे-पिणे व मौज करणे याशिवाय काहीच उरत नाही.*_

_*४) पकुध कच्चायन नावाचा दार्शनिक 'अन्योन्यवादाचे' समर्थन करीत असे.* त्याचा म्हणण्यानुसार, प्राणीमात्रांचे सात तत्त्वांपासून निर्माण होते. ती तत्त्वे अशी - पृथ्वी, जल, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा. प्रत्येक तत्त्व स्वतंत्र असून संपूर्ण आणि नित्य आहे. त्याचा नाश होत नाही. कोणाचे शीर जरी कापले तरी त्याचा 'मृत्यू' होत नसतो. त्याने एवढेच होते की, शस्त्राने सात तत्त्वांमध्ये प्रवेश केला. *सिद्धार्थास हे सर्वथा अमान्य होते. कारण त्यानुसार माणसाने कोणतेही वाईट कर्म केले तरी त्याला दोष देता येणार नाही.*_

_*५) संजय वेलठ्ठीपुत्र नावाचा दार्शनिक 'विक्षेपवादी' होता.* तो म्हणे, 'कोणी मला विचारले की स्वर्ग कुठे आहे? मला जर वाटले की, आहे, तर मी म्हणेन होय आहे' त्याच्या मनास जसे योग्य वाटेल तेच तो म्हणेल असा त्याचा 'विक्षेपवाद' होता. त्याचे मत तर्कावर अधिष्टित नव्हते. *त्यामुळे सिद्धार्थास अमान्य होते कारण त्यामुळे माणसाचे जीवन निरुद्देश होऊन जाते.*_

_*६) निगण्ठनाथपुत्र महावीरांच्या मतास 'चातुर्यामसंवर वाद' म्हणतात.* त्यांचे म्हणणे असे की, आत्म्याला आपल्या पूर्वजन्माचे वाईट कर्म व या जन्माचे कर्म मिळून त्यानुसार पुढील जन्म ग्रहण करावा लागतो. त्यासाठी तपश्चर्येद्वारा पूर्वजन्माच्या कर्माचा नाश करायला हवा. या जन्मीच्या वाईट कर्माना थांबविण्याकरिता महावीरांनी धर्माचा उपदेश केलेला आहे. तो असा -_
*अ) हिंसा न करणे*
*ब) चोरी न करणे*
*क) खोटे न बोलणे*
*ड) ब्रह्मचर्याचे पालन करणे*
          _परंतु पूर्वजन्मीच्या वाईट कर्माची माहिती कोणासही नसते. या जन्मी देहदंडनाची तपश्चर्या केल्याने त्या वाईट कर्माचा नाश झाला किंवा नाही, किती कर्माचा नाश झाला व किती कर्मे अजून शिल्लक आहेत, याविषयी कोणासही माहिती नसते. *सिद्धार्थाला हे मंजूर नव्हते, कारण त्यामुळे माणसाचे जीवन काय-क्लेश व तपश्चर्या यांनाच समर्पित होऊन जाईल व माणसाच्या इच्छा आणि स्वाभाविक प्रवृत्ती यास काहींच वाव राहणार नाही.*_

           _*पूर्ण काश्यप, मक्खली गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कच्चायन, संजय वेलठ्ठीपुत्र आणि निगण्ठनाथपुत्र (महावीर) या सहा दार्शनीकांपैकी एकाचेही तत्त्वज्ञान सिद्धार्थास आवडले नाही. त्याला असे वाटले की, ते सर्वजण निराशावादी किंवा असहाय्य होते व त्यांना कोणत्याही चांगल्या - वाईट परिणामाची विशेष चिंता नव्हती.*_

*संकल्प :-*
*१)* भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
*२)* बौद्धधम्म जिज्ञासा

*संकलन : महेश कांबळे*
*११/१०/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Friday, 9 October 2020

बोधिपक्षीय धर्म

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                     *_बोधिपक्षीयधर्म_*

            

                _त्यावेळी भगवंतांच्या महापरिनिर्वाणाच्या तीन महिने पूर्वी भगवान कुटागार शाळेमध्ये निवास करीत होते. त्यांनी वैशालीच्या जवळपास जेवढे भिक्खु विहार करीत होते, त्या सर्वांना एकत्रित करविले. *त्यांना आपली शेवटची अनुशासनपर देशना दिली.* भगवंतांनी भिक्खुंना संबोधित करून म्हटले *"भिक्खूनो, मी बोधिपक्षीय धम्माचा जो उपदेश दिलेला आहे तो चांगल्याप्रकारे शिकून ग्रहण करा, तशी भावना करा, चिंतन - मनन करून विकसित करा, जेणेकरून हे श्रेष्ठ जीवन मंगलमय होईल आणि ह्याने अनेकांचे कल्याण होऊन अनेकांना सुखाचा लाभ होईल."*_

         त्याचे सविस्तर विवरण करताना भगवंतांनी म्हटले -

*_"भिक्खुंनो, मी चार स्मृती उपस्थांनाचा उपदेश दिला आहे, चार सम्यक - प्रयासांचा उपदेश दिला आहे, चार ऋद्धिपादांचा, पाच इंद्रियांचा उपदेश दिला आहे, पाच बलांचा उपदेश दिला आहे, सात बोध्यांगाचा उपदेश दिला आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला आहे."_*

          _"भिक्खुंनो, संस्कार अनित्य आहेत, तुम्ही अप्रमादी राहून आपल्या उद्देश प्राप्तिकरिता सतत प्रयत्नशील राहा. थोड्याच दिवसात तथागतांचे परिनिर्वाण होईल. आजपासून तीन महिन्यानंतरच तथागत परिनिवृत्त होतील."_


_*हे सर्व धम्म एकूण सदतीस आहेत म्हणून ह्यांना 'सदतीस बोधिपक्षीय' धम्म म्हणतात.*_


● *चार स्मृती उपस्थान*

*१)* कायानुपश्यना

*२)* वेदनानुपश्यना

*३)* चित्तानुपश्यना

*४)* धर्मानुपश्यना


● *सम्यक प्रयास चार आहेत*

*१)* अकुशल धर्माची उत्पत्ती न व्हावी म्हणून प्रयत्न करणे

*२)* उत्पन्न झालेल्या अकुशलांचा नाश करण्याकरिता प्रयत्न करणे

*३)* उत्पन्न न झालेल्या कुशल धम्माची प्राप्ती करण्याकरिता प्रयत्न करणे

*४)* उत्पन्न झालेल्या कुशल धम्माची जोपासना करण्याकरिता प्रयत्न करणे


● *चार ऋद्धिपाद*

*१)* छंद

*२)* चित्त

*३)* वीर्य

*४)* विमर्श


● *पाच इंद्रिये*

*१)* चक्षु

*२)* श्रवणेन्द्रिय

*३)* नासिका

*४)* जिव्हा

*५)* त्वचा

            _यांशिवाय येथे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा हेही अभिप्रेत आहेत. त्यांनादेखील 'इंद्रिये' च म्हणतात._


● *पाच बल*

*१)* श्रद्धा बल

*२)* वीर्य बल

*३)* स्मृती बल

*४)* समाधी बल

*५)* प्रज्ञा बल


● *सात बोध्यंग*

                _सात बोध्यांगात स्मृती, वीर्य आणि समाधीचा समावेश केला जातो._ आणि बाकीचे चार आहेत -

*१)* धर्म

*२)* विनय

*३)* प्रीतीप्रश्रंधि

*४)* उपेक्षा


● *आर्य अष्टांगिक मार्ग*

*१)* सम्यक दृष्टी

*२)* सम्यक संकल्प

*३)* सम्यक वाचा

*४)* सम्यक कर्मान्त

*५)* सम्यक आजिविका

*६)* सम्यक व्यायाम

*७)* सम्यक स्मृती

*८)* सम्यक समाधि


             _अशारितीने जर ह्या सदतीस बोधी पक्षीय धम्माची एकूण मोजदाद केली तर त्यांची वास्तविक संख्या सदतीस न होता एकूण पंचवीस होते. ह्या बोधिपक्षीय धम्मांद्वारे बौद्ध धम्माचा सारांश विशद केलेला आहे. नाहीतर भगवंतांनी अथवा संगितिकारांनी ह्यांना इतके महत्व दिले नसते._


*संकल्प :-*

*१)* बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन

*२)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

*१०/१०/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Thursday, 8 October 2020

दहा संयोजन बंधने आणि प्रगतीच्या चार अवस्था

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


*_दहा संयोजन बंधने आणि प्रगतीच्या चार अवस्था_*


                _*दहा संयोजन बंधने म्हणजे चित्ताची दहा बंधने होत. श्रेष्ठ जीवन जगण्याकरिता भगवान बुद्धांनी धम्म आवश्यक असल्याचे सांगितले आहे, ते धम्म असे १) श्रोतापन्न होणे २) सकृदागामी होणे ३) अनागामी होणे आणि ४) अर्हत होणे*_


*दहा संयोजन बंधने :-*

*१)* सक्काय दृष्टी _आत्मा हा भिन्न पदार्थ नसून तो नित्य आहे अशी दृष्टी_

*२)* विचिकित्सा  _बुद्ध, धम्म आणि संघ याविषयी शंका किंवा अविश्वास_

*३)* शिलवव्रत / सिलब्बत परामर्श  _स्नानादी व्रतांनीच मुक्ती मिळेल असा विश्वास_

*४)* काम-राग _कामवासना_

*५)* व्यापाद / पटिघ्घ _क्रोध_

*६)* रुपराग _ब्रह्मलोकादी प्राप्तीची इच्छा_

*७)* अरुपराग  _अरुप - देवलोक प्राप्तीची इच्छा_

*८)* मान _अहंकार_

*९)* स्वार्थ  / उद्धच्चं _भ्रांतचित्तता_

*१०)* अविद्या 


*प्रगतीच्या चार अवस्था :-*

*१) श्रोतापन्न :*

               _*"चार आर्यसत्यांचे" स्पष्टपणे ज्ञान झाल्यानंतर 'आर्य अष्टांगिक मार्गाचा' अवलंब करणे, म्हणजेच श्रोतापन्न अवस्था होय.*  ज्या मनुष्याच्या पहिल्या तीन संयोजनांचा म्हणजे *'सक्काय दृष्टी, विचिकित्सा आणि शिलव्रत परामर्श'* यांचा पूर्णपणे क्षय झालेला असेल त्याला श्रोतापन्न म्हणतात._


*२) सकृदागामी :*

              _श्रोतापन्न अवस्थेनंतर पुढच्या मार्गावर अग्रेसर असणाऱ्याला सकृदागामी असे म्हणतात. *म्हणजे ज्याने तृष्णा, द्वेष आणि भ्रम यावर इतपत विजय मिळविला आहे की, त्याला पुढे निर्वाण प्राप्त होण्याची बरीच शक्यता असते.* सकृदागामी अर्थात शुभ कर्मांचे अनुसरण करणारा पहिल्या *तीन संयोजनांसह आणखी दोन संयोजनांवर म्हणजे काम - राग व व्यापाद यांच्यावर ज्याने विजय मिळविला आहे*, त्याला सकृदागामी म्हणतात._


*३) अनागामी :*

              _सकृदागामी व्यक्तीने आपल्या मार्गावर बरीच वाटचाल केल्यानंतर *"अहं"* वर इतका विजय मिळविलेला असतो की तो पुढे *'अर्हत* होऊ शकेल, अशा व्यक्तीचा मार्ग तो ब्रह्म-लोकाची स्थिती प्राप्त करून निर्वाणाप्रत पोहचावयाच्या मार्गाने वाटचाल करीत असती. *चित्ताच्या उच्च अवस्थेलाच पर्यायी शब्दाने "ब्रह्मलोक" म्हटलेले आहे.*_


*४) अर्हत :*

                _जो स्वतः सम्यक संबोधी आनंद उपभोगण्यास समर्थ म्हणजेच अज्ञानी आणि दुःखितांकरिता अपार करुणेने परिपूर्ण आणि संपूर्ण प्राणीमात्रांप्रति अमर्याद प्रेम बाळगण्यास समर्थ झालेला असतो, ती पवित्र आणि आदरणीय अवस्था होय. *ज्याने सर्वच दहा संयोजनांवर विजय मिळविलेला आहे व सर्व चित्तमलांपासून जो मुक्त झाला आहे, त्याला "अर्हत" असे म्हणतात.* अर्हताला इच्छाही नसते व अनिच्छाही नसते. तो इच्छा व अनिच्छेपासुन मुक्त झालेला असतो. अर्हत शरीरात उत्पन्न झालेली वेदना अनुभव करतो. पण चित्ताची वेदना अनुभव करीत नाही कारण चित्त वेदनेपासून मुक्त झालेले असते._


*संकल्प :-*

*१)* Buddhist Catechism

*२)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

*०९/१०/२०२०*



🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Wednesday, 7 October 2020

तेजस्वी आभा

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                    *_तेजस्वी आभा_*


                _*भगवान बुद्धांच्या शरीरातून तेजस्वी आभा (शरीर रश्मी) प्रकट होत असल्याविषयीच्या उल्लेख झालेला आढळतो.* भगवान बुद्धांच्या पावित्र्याच्या सामार्थ्यामुळे त्यांच्या शरीरातून तेजस्वी आभा प्रकट होत असे. आजही आपल्यास कधी-कधी तेजस्वी चेहरे पाहावयास मिळतात. *त्यांस 'बुद्धरश्मी', बुद्धांची प्रकाशकिरणे असे म्हटले जाते.*_

             _*त्यात सहा रंग जोडीने दिसायचे. निलवर्ण, पितवर्ण, लोहितवर्ण, अवदतवर्ण, मंगस्तवर्ण, प्रभस्ववर्ण. सर्वच अर्हतांची आभा तेजस्वी असे.* ज्या व्यक्तीचा आध्यात्मिक विकास अधिक असेल, तिची आभाही तशीच तेजस्वी असायची. त्यास इतर धर्मीय तेजोवलय म्हणतात व युरोपियन लोक मानवी प्रभावलय म्हणतात. ख्रिश्चन चित्रकारांनी काढलेल्या श्रेष्ठ आणि पवित्र अशा व्यक्तींच्या सर्वच चित्रांमध्ये प्रभावलयाचा प्रकाश दाखविलेला आहे._


              _जेथे जेथे भगवान बुद्धांची रंगीत चित्रे काढलेली आहेत, त्या सर्वच विहारात आपणांस हे रंग पाहावयास सापडतात. *प्रथम सिलोनमध्ये बनविलेल्या आणि नंतर सर्वच बौद्ध देशांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारलेल्या बौद्ध धम्माच्या ध्वजांच्या पट्ट्यांमध्ये सुद्धा ते रंग पाहावयास मिळतात.*_


                 _*महापरिनिर्वाण सूत्रात* भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण समयी त्यांचा शिष्य आयुष्यमान आनंद ह्याने आपल्या गुरूच्या शरीरातून अत्यंत तेजस्वी आभा फाकली असल्याचे पाहून त्याबद्दल विचारले असतात भगवान बुद्ध म्हणाले, दोन प्रसंगी ते अलौकिक तेज प्रकट होत असते. प्रथमतः तथागताने सम्यक संबोधीची दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यानंतर आणि  दुसर्यांदा त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या रात्री. सुमेध आणि दिपांकार बुद्धांच्या कथेत जातक कथा ह्या ग्रंथांच्या निदानकथांमध्ये ह्याविषयी आढळते._


             _*प्रभावलयाचे अस्तित्व विज्ञानाच्या प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे. बरोन व्हॅन रिचेनबॉक The Baron Von Reichenbach ह्या शास्त्रज्ञाने केलेल्या प्रयोगाचे सविस्तरपणे केलेले वर्णन त्यांच्या संशोधन पुस्तिकेमध्ये आलेले असून त्याचा आढावा इ. स. १८४४-४५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता. डॉ. बोराडूक Dr. Boraduc ह्या पॅरिसमध्ये राहणाऱ्या शास्त्रज्ञाने इ.स. १८९० च्या सुमारास प्रभावलयाचे हुबेहूब छायाचित्र घेतले होते. प्रभावलय ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. असे सिद्ध झालेले आहे की, सर्व मानवी प्राणिमात्रात नव्हेत तर गुरेढोरे, वृक्ष, रोपटी आणि दगडामध्येसुद्धा प्रभावलय दिसून येते. ते अत्यंत सूक्ष्म असते.*_


            _*इतर प्राणिमात्र व वस्तू ह्यांच्या प्रभावलयापेक्षा भगवान बुद्धांचे किंवा कुणा अर्हतांचे प्रभावलय अत्यंत तेजस्वी आणि अधिक प्रमाणात पसरलेले असते. त्यांनी प्राप्त केलेल्या इद्धीच्या सामर्थ्याची आणि त्यांच्या श्रेष्ठ नैतिक विकासांची ती साक्ष होय.*_


             _*ख्रिश्चन चित्रकारांनी काढलेल्या श्रेष्ठ आणि पवित्र अशा व्यक्तींच्या सर्वच चित्रांमध्ये प्रभावलयाचा प्रकाश दाखविलेला आहे. तीच श्रद्धा इतर धर्मामध्येही अस्तित्वात असलेली आढळते.*_


*संदर्भ :-*

*१)* Buddhist Catechism (बौद्ध प्रश्नोत्तरी)

*२)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

*०८/१०/२०२०*


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Tuesday, 6 October 2020

धुतांग / धुताङ्ग

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                       #धुतांग / #धुताङ्ग


               _धुतांग / धुताङ्ग म्हणजे धुतगुण. धुतगुणांनी चित्त शुद्धी केल्याशिवाय धर्मतत्त्वांमध्ये प्रवेश करता येत नाही. भिक्खुकरिता धुताङ्ग - व्रत फार उपयुक्त आहे. धुताङ्ग म्हणजे चिवर धारण करून प्रव्रजित होणे होय. धुताङ्ग साधन करून शांत परम निर्वाणाचा साक्षात्कार करावयाच्या उद्देशाने भिक्खु धुताङ्ग धारण करतात._ 

           *_धुतगुणांनी मनःशुद्धी केल्याशिवाय धम्माचे मर्म समजत नाही. असे धुताङ्ग तेरा आहेत -_*

*१)* पॉसुकुलीक

*२)* तेचीवरिक

*३)* पिण्डपातिक

*४)* सपदानचारिक

*५)* एकासनिक

*६)* पात्र पिण्डक

*७)* पञ्ञाभक्तिक

*८)* आरंजक

*९)* रुखमुलिक

*१०)* अब्थोकासिक

*११)* सोसानिक

*१२)* सथासन्यतिक

*१३)* नेकज्जिक

             *_धुताङ्गामुळे भिक्खु आनंदविभोर होतो, रूप व अरुप आठ प्रकारच्या समधींचा लाभ करतो, सर्व रिद्धी प्राप्त होतात, श्रवणशक्ती दिव्य होते, पूर्वजन्मातील (याच जन्मातील जुन्या भूतकाळातील) गोष्टींचे स्मरण होऊ लागते, चित्ताविषयी ज्ञान होते, दिव्यचक्षु प्राप्त होतात आणि सर्व आश्रव (आसक्ती) क्षीण होतात. ह्या तेरा धुताङ्ग-व्रताचे पालन करून आर्य - श्रावक तीस गुणांनी युक्त होतो._*


             *धुताङ्ग पालन करावयाचे गुण*

*१)* धुताङ्ग पालन करणारांची जीविका शुद्ध असते

*२)* धुताङ्ग पालन करणारांना सुखद फळांचा लाभ होतो

*३)* धुताङ्ग पालन करणारात कोणताही दोष रहात नाही

*४)* तो कोणालाही कष्ट देत नाही

*५)* तो निर्भय राहतो

*६)* धुताङ्ग पालन करीत असता दुसऱ्या कोणालाही कष्ट होत नाही

*७)* धुताङ्गाचे साधन धर्माकडे घेऊन जाणारे असते

*८)* धुताङ्ग पालन करणाराचे कधी अधःपतन होत नाही

*९)* धुताङ्ग पालन करणारास कधी अपयश येत नाही

*१०)* धुताङ्ग माणसाचे रक्षण करते

*११)* धुताङ्ग पालन करणारा इच्छित वस्तूचा तात्काळ लाभ करून घेऊ शकतो

*१२)* धुताङ्गाचे पालन करणारा सर्व प्राण्यांना आपल्या वश करू शकतो

*१३)* धुताङ्गाचे पालन करून मनुष्य आत्मसंयम करणे शिकतो

*१४)* धुताङ्गाचे जीवन भिक्षूंच्या अनुकूल असते

*१५)* धुताङ्गाचे पालन करणारा कोणावर भार व्यर्थ ठरत नाही

*१६)* धुताङ्ग पालन करणारा मुक्त आणि स्वतंत्र राहतो

*१७)* धुताङ्ग सांसारिक तृष्णेचा नाश करते

*१८)* द्वेष दूर करतो

*१९)* मोहाचे पाश तोडतो

*२०)* धुताङ्ग पालन करणारात अभिमान राहत नाही

*२१)* धुताङ्ग पालन करणाराचे वाईट विचार नष्ट होतात

*२२)* शंका दूर होतात

*२३)* आळस नष्ट होतो

*२४)* असंतोष नाहीसा होतो

*२५)* सहन शक्तीची वाढ होते

*२६)* त्यांचे पुण्य अतुल्य आहे

*२७)* त्यांचे पुण्य अनंत आहे

*२८)* धुताङ्ग सुखदुःखाचा नाश करून निर्वाणापर्यंत नेऊन पोहचवितो. 


              *_धुताङ्ग पालन करणाऱ्यास अठरा गुणांचा साक्षात्कार होतो._*

*१)* त्याचा आचार पवित्र व शुद्ध असतो

*२)* त्याच्यासमोर मार्ग निश्चित असतो

*३)* त्याचे शरीर व वचन संयमित असते

*४)* त्याचे मन पवित्र राहते

*५)* त्याचा उत्साह कायम राहतो

*६)* तो निर्भय राहतो

*७)* त्याची आतदृष्टि नष्ट होते

*८)* त्याच्यातील हिंसक प्रवृत्ती एकदमच शांत होते

*९)* त्याच्यात मैत्री भावना सतत जागृत असते

*१०)* त्याचा आहार प्रमाणबद्ध असतो

*११)* सर्वच प्राण्यात तो प्रतिष्ठित होतो

*१२)* विचारपूर्वक तो भोजन करतो

*१३)* तो सदैव जागृत असतो

*१४)* तो गृहत्यागी असतो

*१५)* चांगल्या देवताच्या वासस्थानीच त्याचे वास्तव्य असते

*१६)* तो पापाची घृणा करतो

*१७)* त्याला विवेकात आनंद वाटतो

*१८)* सदा सर्वकाळ तो सावध असतो

            *_जे  धुताङ्गाचे चांगल्याप्रकारे पालन करतात, त्यांच्या अंगी वरील अठरा गुण येत असतात._*


        *_दहा प्रकारचे लोक धुताङ्ग पालन करण्यास योग्य असतात. धुताङ्ग पालन करण्यायोग्य १० व्यक्ती_*

*१)* जो श्रद्धावान आहे

*२)* पापभिरू

*३)* धैर्यवान

*४)* खोटी दिखावट न करणारा

*५)* ध्येयवादी

*६)* निर्लोभी

*७)* जिज्ञासू

*८)* दृढसंकल्पि

*९)* चिडखोर नसलेला

*१०)* मैत्रिभाव जागृत ठेवणारा

           *_ह्या दहा प्रकारच्या व्यक्ती धुताङ्ग पालन करण्याजोग्या असतात._*


*संदर्भ :*

*१)* मिलिंद प्रश्न

*२)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

अहिंसा

 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


                          *_अहिंसा_*


           _*अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे, हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.* भिक्खूचा कोणत्याही प्रकारे प्राणिहत्येशी संबंध नसावा. परंतु त्यास मांसाचे दान मिळाले तर ती त्यांचा निरपेक्षभावाने स्वीकार करू शकतो. यज्ञयागामधील पशुबली ही जीवहिंसा करावयाची चेतना आहे, त्यामुळे ती त्याज्य आहे. *बौद्ध धम्मातील अहिंसेचा अर्थ असा की, जेथे जीवहत्या करणे अत्यंत आवश्यक असेल, तेथेच ती करावी. परंतु जेथे जीवहत्या करावयाची चेतना असेल (यज्ञयागात सांगितल्याप्रमाणे) मनाची केवळ इच्छा असेल, ती हिंसा एकदम त्याज्य होय.*_


             _*न्याय्य कारणासाठी केलेले युद्ध किंवा हिंसा यांस तथागतांनी मनाई केलेली नाही आहे.* तथागतांनी सिंह सेनापतीला केलेल्या उपदेशात ह्याचे पूर्णतः स्पष्टीकरण केलेले आहे. *जो शिक्षेस पात्र आहे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तथापि तसे करताना सर्वांप्रति पुर्णपणे प्रेम आणि करुणेने ओतप्रोत राहावे, असे तथागत शिकवितात.* त्या दुष्ट शक्ती, त्या मानवी असोत, दैवी असोत वा नैसर्गिक असोत, तथागत त्यांच्याशी धैर्याने संघर्ष करावयाचा उपदेश देतात. तथागत म्हणाले, 'हे सेनापती सिंह ! तू धैर्याने संघर्ष कर आणि पूर्ण उत्साहाने लढ, परंतु सत्याचा सैनिक हो म्हणजे तथागत तुला आशिर्वाद देतील'._


              _*अहिंसा परमो धर्म: हा आत्यंतिक सिद्धान्त जैन धर्मात आहे; बौद्ध धर्मात नाही.* भिक्खुंना 'त्रिकोटी परिशुद्ध' मांसोळीचे मांस ग्रहण करण्याची अनुज्ञा 'विनय पिटकात' आहे त्यामुळे त्यांच्यासाठी शाकाहार अनिवार्य नाही. *अहिंसा किंवा जीवहिंसा न करणे, हे भगवंतांच्या धम्माचे एक महत्वपूर्ण अंग आहे. अहिंसेचा करुणा व मैत्रीशी अत्यंत जवळचा संबंध आहे.* परंतु प्रश्न असा आहे की, ते केवळ 'शील' होते की तो एक नियम होता? अहिंसेला निरपेक्ष असे बंधन मानल्यास, अहिंसेमुळे वाईटासाठी चांगुलपणाचे बलिदान करावे लागेल, किंवा दुर्गुणासाठी सद्गुणांचे. श्रीलंकेतील बौद्ध भिक्खु विदेशी आक्रमणकर्त्यांवर तुटून पडले व त्यांनी लोकांनाही लढावयास उध्यत केले. दुसरीकडे ब्रह्मदेशातील भिक्खुंनि तसे करावयास मनाई केली व तो देश परतंत्र झाला. ब्रह्मदेशातील लोक अंडी खातात, परंतु मासोळी खात नाहीत. जर्मनीमधील बौद्ध समितीने असा प्रस्ताव केला की, पंचशीलांपैकी ते प्रथम शील सोडून केवळ चार शिलांचेच पालन करतील._

           _परंतु *भगवंतांनी अहिंसेला शील म्हणून ग्रहण केले, नियम म्हणून नाही.* त्यांनी अहिंसेला जीवनाचा एक मार्ग मानले. म्हणून जेथे सद्गुणांचा बचाव करावयाचा असेल व हिंसेशिवाय ते शक्य नसेल, तेथेच नाईलाज म्हणून हिंसा करावी लागेल, असा उपदेश करतांना भगवंतांनी प्रज्ञासंगत फारच उत्तम शिकवण दिलेली आहे._


            _*भगवान बुद्धांनी मांस व मांस भोजन ह्यांतील भेद स्पष्ट केला आहे.*_ 

                 _भगवंतांनी म्हटले आहे की, 'प्राणी हिंसा करणे, मारणे, पिटणे, बांधून ठेवणे, चोरी, मृषावाद, कपट करणे, फसविणे, व्यभिचार ही सर्व मुर्दार-मांस भोजनेच होत ज्यामुळे मनुष्य अपवित्र होतो. काम-भोग, अपवित्र जीवन, निर्दयता, विश्वासघात, गर्वांधता तसेच कृपणता, ही सर्व मुर्दार मांस भोजने आहेत, ज्यामुळे मनुष्य अपवित्र होतो. क्रोध, विद्रोह, ईर्ष्या, फुशारकी, अहंकार, ही सर्व मुर्दार मांस भोजने आहेत,ज्यामुळे मनुष्य अपवित्र होतो. विशिष्ट अन्न सेवन केल्याने मनुष्य पवित्र होत नाही, तद्वतच मांसाचे सेवन केल्याने मनुष्य अपवित्र होत नाही. इंद्रियांवर प्रभुत्व मिळवून, संयम करून, सत्वाची कास धरून करुणामय होऊन, बंधनयुक्त होऊनच मनुष्य पवित्र होतो व दुःखावर विजय मिळवितो._


          _*बौद्ध धम्मात मांसाहार सर्वथा निषिद्ध नाही आहे.* लंकावतार सारख्या महायान बौद्ध धम्मग्रंथामध्ये मांसाहार करणे, सर्वथा निषिद्ध सांगितलेले आहे. परंतु पालि बौद्ध वाङ्मयामध्ये प्राणघात करणे निषिद्ध आहे, मांसाचा व्यापार निषिद्ध आहे. परंतु मांसाहाराचा निषेध नाही. *बौद्धगृहस्थ पशुघात करीत नाही आणि भिक्खूदेखील अशा मांसाचे सेवन करीत नाहीत, जे विशेषकरून व्यक्तिगत रूपाने त्यांच्यासाठीच तयार केले असते.* तिबेटमध्ये अन्नधान्ये व फळे, भाजीपाला इ. फार कमी उत्पन्न होतात. तेथे जैविकेसाठी मांसाहार आवश्यक असल्यामुळे तेथील बौद्ध लोक मांसाहार करतात. *कालमान व परिस्थितीनुसार मांसाहार आवश्यक असल्यास तो निषिद्ध नाही.*_


           *_भगवान बुद्धांची अहिंसा ही त्यांच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे बुद्धाचे तत्त्व आणि नियम यांत भेद केलेला आहे. त्यांनी अहिंसेला नियमांचे रूप दिलेले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्यांनी तिचे विवेचन केले आहे. आणि असे करण्यात ते अत्यंत शहाणपणाने वागले यात शंका नाही. तत्त्वामध्ये तुम्हांला तद्नुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य  असते, नियमांत नसते. नियम तुम्हांला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता._*


*संदर्भ :*

*१)* बुद्ध आणि त्यांचा धम्म

*२)* बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन

*३)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

*०६/१०/२०२०*


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...