🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_बौद्ध उपासक_*
_*बौद्ध गृहस्थाला बौद्ध उपासक आणि बौद्ध स्त्रीला बौद्ध उपासिका म्हणतात. "तपस्सु व भल्लिक हे दोघे व्यापारी केवळ द्विशरण उपासक होते."* भगवंतांना संबोधी प्राप्त झाल्यावर त्यांनी सात दिवसापर्यंत बोधिवृक्षाखाली बसून सात वेळा पुनःपुन्हा श्रेष्ठ सुखाचा आस्वाद घेतला. ज्यावेळी तपस्सु व भल्लिक नावाचे दोन व्यापारी प्रवास करीत करीत जवळच्या रस्त्याने जाऊ लागले, त्यांनी त्या धीरगंभीर व उदात्त श्रमणाला पाहिले व त्यांच्याजवळ जाऊन आदरपूर्वक त्यांना पोळी व शहद अर्पण केले. *तेच संबोधी प्राप्त झाल्यानंतरचे प्रथम अन्नदान होते.* त्यानंतर भगवंतांनी त्यांना मुक्तीचा मार्ग समजावून सांगितला. भगवंतांच्या परमपावित्र्याची जाणीव झाल्याने ते दोघेही व्यापारी मोठ्या आदरयुक्त भावाने नतमस्तक झाले व म्हणाले, "भगवन्, आम्ही आपल्याला व आपण सांगितलेल्या धम्माला शरण जातो". *त्यावेळी संघाची स्थापना झालेली नव्हती, म्हणून ते द्विवाचिक उपासक झाले.*_
_*वाराणशीमधील एका श्रीमंत व्यापाऱ्याचा 'यश' नावाचा मुलगा सर्वप्रथम त्रिशरण घेऊन प्रव्रजित झाला. त्यानंतर त्याचा पिता त्रिशरण ग्रहण करून 'उपासक' झाला. हाच पहिला त्रिश्ररणागत उपासक होय.* त्यापुढे यशाचे चार मित्र - विमल, सुबाहु, पूर्णजित आणि गवाम्पति यांनीही भगवंतांकडे जाऊन दीक्षा ग्रहण केली. *वारणाशीचा तरुण कुलपुत्र यश याची माता व पत्नी ह्या सर्वप्रथम उपासिका व शरणागत स्त्रिया होत.*_
*_भिक्खु आणि उपासक यांच्यातील मुख्य भेद_*
_पंचशीलाचे नियम भिक्खु आणि उपासक दोघांनाही पाळावयाचे असतात. परंतु भिक्षुला ते व्रतरुप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो.उपासकाकरिता ते अनुकरणीय असतात. *भिक्खु म्हणजे बुद्धांच्या आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश होय आणि भिक्खुंच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे, हे उपासकांचे ध्येय असते. भिक्खु स्वतःच चारित्र्यवान, धार्मिक ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे आणि ह्यासाठी त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा केली पाहिजे आणि उपासकाने त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.*_
_*दोन तऱ्हेच्या दीक्षा - प्रथम दीक्षा भिक्खूची त्यांना सामूहिक रूपाने संघ म्हणतात. दुसरी दीक्षा उपासकाची म्हणजे गृहस्थ बौद्धाची.* भिक्खु व उपासक यांच्या जीवनांत प्रामुख्याने चार फरक आहेत -_
*१)* उपासक गृहस्थच राहतो, परंतु भिक्खु गृहत्यागी परिव्राजक होतो
*२)* भिक्खूकरिता व्रत आहेत व त्यांचे पालन न केल्याने शिक्षा मिळू शकते.उपासकाकरिता केवळ शील आहेत, ज्यांचे तो आपल्या सामर्थ्यानुसार अधिकात अधिक पालन करायचे प्रयत्न करतो.
*३)* उपासक संपत्ती ठेवू शकतो. परंतु भिक्खु संपत्तीचा मालक होऊ शकत नाही.
*४)* उपासक बनावयास कोण्या संस्काराची आवश्यकता नाही. भिक्खूकरिता उपसंपन्न होणे आवश्यक असते. उपासकास जेव्हा वाटेल तेव्हा तो भिक्खु होऊ शकतो.
_*भगवंतांनी गृहस्थांना आणि भिक्खुंना दिलेले उपदेश भिन्नभिन्न आहेत.* एकदा जेतवनारामामध्ये थांबले असताना *धम्मीक नावाचा उपासक पाचशे इतर उपासकांसह भगवंतांकडे आला व भिक्खुंचे आणि गृहस्थांचे शील काय आहे* असे विचारू लागला. भगवंतांनी असे स्पष्ट केले की, *भिक्खुंचे शील येणेप्रमाणे आहे -*_
*१)* मध्यान्हानंतर पिण्डपाताकरिता जाऊ नका, असमय पिण्डपात करण्यासाठी जाळे पसरलेले असते.
*२)* पिण्डपातास निघण्यापूर्वी आपल्या मनास रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श यांच्या आसक्तीपासून मुक्त करा.
*३)* पिण्डपातानंतर एकटेच परत येऊन एकांतात स्थिर चित्ताने चिंतन करा.
*४)* सज्जनांशी बोलचाल करताना केवळ धम्माविषयी बोला.
*५)* भिक्षा, विहार, शयनासन व पाण्याने साफसफाई करणे इत्यादी गोष्टींना साधनापेक्षा अधिक महत्व देऊ नका.
*६)* जर कोणी भिक्खु अनासक्त ह्या सर्व गोष्टींचा उपयोग करील, तर तो पाण्यात राहूनही त्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे अलिप्त राहील.
_*त्यानंतर त्यांनी गृहस्थांसाठी उपदेशिलेल्या शिलांचे वर्णन केले, ते असे -*_
*१)* प्राणीहिंसा करू नका, चोरी करू नका, खोटे बोलु नका व्यभिचार करू नका आणि मादक पदार्थांचे सेवन करू नका.
*२)* उपोसथांच्या दिवशी उपोसथव्रत ग्रहण करून अष्टशिलांचे पालन करा.
*३)* प्रातःकाळच्या पवित्र समयी श्रद्धायुक्त चित्ताने अष्टशील ग्रहण करून त्यांचा बुद्धिपरस्पर व्यवहार करा.
*४)* भिक्खुंना यथासामर्थ्य भोजन आणि पेय पदार्थांचे दान करा.
*५)* आपल्या मातापित्याची सेवा करा, जीविकेचे चांगले साधन ठेवा.
*६)* या प्रकारे जो गृहस्थ दृढतापूर्वक धम्माचे पालन करील त्यास दिव्य लोक प्राप्त होईल. यावरून हे स्पष्ट होते की, भिक्खु आणि गृहस्थांचा एकच धर्म आहे.
*_भिक्खुंकरिता शील व्रतांप्रमाणे अनिवार्य आहे, परंतु गृहस्थांकरिता ते स्वच्छेने ग्रहण केलेलं आहेत._*
*_उपासकांचे दहा गुण_*
*_उपासकाच्या अंगी दहा सद्गुण असले पाहिजे, तरच तो योग्य उपासक बनू शकतो. ते दहा गुण असे -_*
*१)* उपासकाने आपल्या भिक्षुविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगावी
*२)* धर्माला सर्वश्रेष्ठ मानावे
*३)* भिक्षुस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये
*४)* धर्माचा लोप पावत आहे असे दिसून आल्यास धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी पराकाष्टेचे प्रयत्न केले पाहिजेत
*५)* तो त्रिरत्नाप्रति योग्य विचारसरणी ठेवीत असतो
*६)* असा उपासक केवळ जिज्ञासेपायी सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मतात न जाता धर्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो
*७)* असा उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो
*८)* तो शांतता प्रिय असतो
*९)* ऐकतेचा प्रशंसक असतो
*१०)* असा शिष्य केवळ धर्माचे दिखाऊ अवडंबर माजवीत नाही, तर तो यथार्थाने बुद्ध, धर्म व संघाचे ठाई त्याची नितांत श्रद्धा व निष्ठा असते
*संदर्भ :-*
*१)* बौद्ध प्रश्नोत्तरी
*२)* बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन
*३)* तथागताची सत्यगाथा
*४)* भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म
*५)* बौद्धधम्म जिज्ञासा
*६)* मिलिन्द प्रश्न
*संकलन : महेश कांबळे*
*१७/१०/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment