🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_बौद्धधम्माचे मौलिक ग्रंथ_*
_बौद्धधम्माचे मौलिक ग्रंथ *त्रिपिटक* ह्या नावांनी प्रसिद्ध आहेत. *ह्या ग्रंथात भगवान बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे.*_
_*'पिटक', म्हणजे 'पेटारा' अर्थात 'त्रिपिटक' म्हणजे 'तीन पेटारे' ते पिटक येणेप्रमाणे १) सुत्तपिटक २) विनयपिटक आणि ३) अभिधम्मपिटक*
*१) सुत्तपिटक -* _भगवंतांनी निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या परिस्थितीमध्ये जे उपदेश दिले होते, त्यांचा संग्रह 'सुत्तपिटकात' केला आहे._
*२) विनयपिटक -* _विनय पिटकात भिक्खुंच्या राहणीच्या व वागण्याच्या नियमांचा संग्रह केलेला आहे. आचार्यांप्रति शिष्यांची कर्तव्ये, शिष्यांप्रति आचार्याची कर्तव्ये, गुरुबंधूप्रति भिक्खुंची कर्तव्ये, तसेच मठात राहण्याचे नियम इ. विनय पिटकात दिली आहेत._
*३) अभिधम्म पिटक -* _अभिधम्माचे ग्रंथ फार गहन व गंभीर आहेत. सूत्रात जे तत्त्व भगवंतांनी सोप्यात सोपे करून सांगितले आहे, त्यालाच विश्लेषणात्मक प्रकारे, पारिभाषिक शब्दात स्पष्ट केले आहे. त्यांचे महत्त्व फार मोठे आहे. *अभिधम्माचे वाचन व मनन केल्याशिवाय बुद्धधम्माचे निश्चित किंवा पक्के ज्ञान होऊ शकत नाही.* ह्यात चार धातूंचे वर्णन केले आहे - (१) चित्त (२) चैतसिक (३) रूप आणि (४) निर्वाण._
_चित्ताचे विश्लेषण फारच उत्तम आहे. आधुनिक मनोविज्ञानाबरोबर त्याचे अध्ययन करणे फार उपयुक्त ठरेल. धम्मसंगणीवर अट्ट सालिनी नावाचे भाष्य लिहिताना *आचार्य बुद्ध घोष* लिहितात की, "अभिधम्मात कोणतीच नवीन गोष्ट सांगितली गेली नाही की, जी सूत्रात वर्णन केलेली नाही."_
*_बौद्धधम्माच्या साहित्य सृजनामध्ये हातभार लावणाऱ्या महाश्रमणांची नावे येणेप्रमाणे_*
*१) नागसेन (इ.स.१५०) -* मिलिंद प्रश्न
*२) नागार्जुन (इ. स. १७५) -* ते विदर्भातील होते. नागार्जुनाची शून्यवाद साहित्यकृती -
*अ)* आध्यात्मिक कारीक
*आ)* युक्तीषठिका
*इ)* प्रमाणविध्वंस
*ई)* उपायकौशल्य
*उ)* विग्रह व्यर्तनी
*३) असंग आणि वसुबंधु (इ.स. ३५०)* त्यांचा जन्म पेशावरमध्ये ब्राह्मण कुळात झाला. त्याचे प्रमुख ग्रंथ येणेप्रमाणे -
*अ)* महायानीत्तर तंत्र
*आ)* सूत्रालंकार
*इ)* योगाचार भूमी
*ई)* वस्तुसंग्रहणी
*उ)* बोधिसत्त्व पिटकाववाद
_यामधील योगाचारभूमी हा विशाल ग्रंथ सतरा भूमीमध्ये विभागलेला आहे._
_*भारतीय तत्त्वज्ञानास आपल्या सर्वोच्च विकासाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी प्रथम जोरदार प्रयत्न असंग आणि वसुबंधु या पठाण बंधूंनी केला.* जेष्ठ बंधू असंग याने योगाचार भूमी उत्तरतन्यसारख्या ग्रंथाना रचून विज्ञानवादाचे समर्थन केले. कनिष्ठ बंधू वसुबंधुची प्रतिभा आणखीच बहुमुखी होती. त्यांनी एकीकडे *अभिधम्मकोष* आणि त्यावर एक मोठे भाष्य लिहिले आणि दुसरीकडे *'विज्ञप्तीमात्रता सिद्दीकी'* ची रचना करून आपल्या जेष्ठ बंधूंचे उत्तम समर्थन केले. तिसरे कार्य *'वाद विधान'* नावाचा न्याय ग्रंथ लिहिला. *त्यांनी ज्याला 'भारतीय मध्ययुगीन न्यायाचा पिता' म्हणविल्या जाणाऱ्या दिग्नागला शिकवले. आद्य शंकराचार्य नव्हे तर त्यांचे आजोबा गुरु गौडपाद यांची मांडुक्य कारिका, 'अलात शांती प्रकरण', प्रकट रूपाने एक बौद्धविज्ञानवादी ग्रंथ आहे.* विज्ञानवाद स्वतःच्या नावाने अधिक प्रसिद्ध नसून *'योगाचार दर्शन'* या नावाने अधिक प्रसिद्ध आहे._
*४) दिग्नाग (इ.स.४२५) -* ते वसुबंधूंचे विद्यार्थी होते. त्यांचे प्रमुख ग्रंथ - *न्यायमुख, प्रमाण समुचय. ते तामिळ देशाचे होते.
*५) धम्मकीर्ती (इ.स. ६००) -* त्यांचा जन्म उत्तर तामिळ देशात तिरूमलै गावी झाला. त्यांचे ग्रंथ येणेप्रमाणे -
*१) प्रमाणवर्त्तिक*
*२) प्रमाण विनिश्चय*
*३) न्यायबिंदू*
*४) हेतुबिंदू*
*५) संबंध परीक्षा*
*६) वाद - न्याय*
*७) सन्तान्तर - सिद्धी*
*८) टिकावृत्ती*
*_प्रमाणवर्त्तिक १४५५ श्लोकांचे पद्य आहे. त्यांनी उद्योतकर (इ.स.५५०) च्या 'न्यायवर्तिक' ला छिन्नभिन्न केले. वाचस्पतीने (इ.स.८४१) एक कीर्ती टीका लिहून धम्मकीर्तीच्या सुनीपुण बुद्धीची प्रशंसा केली व त्यांना 'जगदभीभवधीर' अशी पदवी दिली आणि उद्योतकरांच्या अत्यंत म्हाताऱ्या गाईचा धम्मकिर्तींनी उद्धार केला असा शेरा दिला. श्रीहर्ष (इ.स. १९१२) यांनी धम्मकीर्तीच्या तर्कपथास 'दुराबाध' म्हणून त्याची प्रशंसा केली._*
*६) अश्वघोष (इ.स. ५०) -* यांचे कर्मक्षेत्र गंधार (पेशावर) होते. त्यांचे ग्रंथ येणेप्रमाणे -
*१) महायान श्रद्धोत्पाद*
*२) बुद्धचरित्र*
*३) सौन्दरानन्द*
*४) सारिपूत्त प्रकरण*
*_अश्वघोषाचा जीवनकाळ इ.स. पूर्व ५० ते इ.स. नंतर १०० पर्यंत मानला जातो. संस्कृतमधील एक महाकवी, नाटककार आणि बौद्ध तत्त्वज्ञ. याच्या ग्रंथांतील व्यक्तिगत निर्देशांवरून याची काही माहिती मिळते. हा साकेत (अयोध्या) येथे राहणारा. याच्या आईचे नाव सुवर्णाक्षी. यास ‘आचार्य’, ‘भदंत’, ‘महाकवी’ आणि ‘महावादी’ या पदव्या होत्या. उपनिषदे, भगवद्गीता, सांख्यादी दर्शने आणि रामायणादी पूर्वकालीन काव्ये यांचा त्याने उत्तम अभ्यास केला होता. त्याच्या कृतींमध्ये दिसून येणारे ब्राह्मण धर्म व संस्कृतीचे सखोल ज्ञान, तत्संबंधीचा आदर आणि धर्मपरिवर्तनाच्या कथा यांवरून तो जन्माने ब्राह्मण असून पुढे त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला असावा, असा तर्क केला जातो. हा कनिष्काचा धर्मविषयक सल्लागार असून त्याच्या कारकिर्दीत झालेल्या बौद्धधर्मपरिषदेचा उपसभापती होता, अशी पारंपरिक समजूत आहे. हा हीनयान पंथाचा होता._*
*बुद्धचरित, सौदरनंद, शारिपुत्रप्रकरण (सारिपुत्रप्रकरण किंवा शारद्वतीपुत्रप्रकरण), वज्रसूची, गण्डीस्तोत्रगाथा, सूत्रालंकार, महायान श्रद्धोत्पादशास्त्रइ. ग्रंथ अश्वघोषाचे म्हणून सांगण्यात येतात. तथापि "बुद्धचरित" व सौदरनंद ही महाकाव्ये आणि शारिपुत्रप्रकरण हे नाटक, एवढे तीनच ग्रंथ निर्विवादपणे अश्वघोषाचे आहेत.*
बुद्धचरिताचे मूळ अठ्ठावीस सर्ग असावेत, असे त्याच्या चिनी व तिबेटी आवृत्त्यांवरून दिसते. आज मात्र त्या मूळ संस्कृत महाकाव्याचे फक्त चौदाच सर्ग उपलब्ध आहेत. त्यांतही पहिल्या सर्गाचे सु. तीन पाद आणि चौदाव्या सर्गाच्या पहिल्या पादातील ३१ श्लोकच मिळतात. एकोणिसाव्या शतकात अमृतानंद नावाच्या एका नेपाळी पंडिताने चौदा ते सतरा हे सर्ग स्वतःच लिहून काढले. अंशत:च उपलब्ध असलेल्या या महाकाव्यात बुद्धाच्या आत्मसाक्षात्कारापर्यंतची कथा आलेली आहे.
राजपुत्र सर्वार्थसिद्धीची नगरयात्रा त्याला पाहण्यासाठी जमलेला स्त्रियांचा मेळावा रोग, वार्धक्य आणि मृत्यू यांची दृश्ये राजपुत्राला सर्वसंगपरित्यागापासून परावृत्त करण्यासाठी राजपुरोहिताने केलेले युक्तिवाद इत्यादींच्या वर्णनांतून अश्वघोषाची वेधक कथनशैली आणि निरनिराळ्या व्यक्ती व प्रसंग रंगविण्याचे कौशल्य प्रत्ययास येते. हे काव्य रचताना बुद्धासंबंधीच्या अधिकृत माहितीचाच उपयोग करण्याकडे त्याची प्रवृत्ती दिसते. तसेच, आवश्यक तेथे त्याने परंपरेला मान दिला आहेच.
बौद्धधर्मतत्त्वांचा प्रचार हे या काव्याचे उद्दिष्ट असले, तरी अश्वघोषाने हे काव्य रुक्ष होऊ दिले नाही. सौदरनंदाचे एकूण १८ सर्ग असून ते उपलब्ध आहेत. बुद्धाने नंद या आपल्या सावत्र भावाचे धर्मांतर कसे घडवून आणले, हा या काव्याचा विषय आहे. नंद हा अत्यंत देखणा असल्यामुळे ‘सुंदर’ या नावानेच ओळखला जाई. त्याची पत्नी सुंदरी हीसुद्धा अतिशय रूपवान होती. तिच्यासह सुखोपभोगात तो मग्न असे. बुद्धाने त्याचे डोळे उघडले आणि संसारलालसा सोडून तो बुद्धाचा अनुयायी झाला, असे या महाकाव्यात दाखविले आहे. *सौदरनंदात* काव्याबरोबर तत्त्वचर्चाही आली आहे. धर्मोपदेशक अश्वघोष या काव्यात अधिक प्रकर्षाने जाणवतो. *शारिपुत्रप्रकरण ह्या नाटकात शारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे बुद्धाने घडवून आणलेले धर्मांतर दाखविले आहे.* तथापि हे नाटक अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे या धर्मांतराची महावग्गासारख्या ग्रंथांतून आढळणारी कथा या नाटकात अश्वघोषाने कशी मांडली होती, यासंबंधीची नीटशी कल्पना येऊ शकत नाही.
*_सर्वसामान्यांना बौद्ध धर्माचे महत्त्व पटवून देण्यासाठीच अश्वघोष काव्य-नाटकांसारख्या ललितरचनेकडे वळला._* ‘कडू औषध मधाबरोबर दिले की घेववते त्याचप्रमाणे मोक्षधर्माचा उपदेशही काव्यबंधाने मनोरम ठरतो’ अशा आशयाचे उद्गार सौदरनंदाच्या अखेरीस त्याने काढले आहेत. काव्याच्या तंत्रकौशल्याकडे त्याने फारसे लक्ष पुरविले नाही. तथापि त्याच्या साध्या, सरळ, पण मधुर भाषेनेच त्याच्या काव्याला एक आकर्षक रूप प्राप्त करून दिले आहे. *अश्वघोष आणि कालिदास यांच्या काव्यांत काही लक्षणीय साम्यस्थळे आढळतात. त्यांवरून त्याच्या काव्याचा कालिदासाने उत्तम अभ्यास केला असावा, असे मत अनेक विद्वानांनी व्यक्त केले आहे. याच्या उलट अश्वघोषाचा काळ कालिदासानंतरचा असून त्यानेच कालिदासाचे अनुकरण केले असावे, असाही विचार काही विद्वानांनी मांडला आहे. तथापि अश्वघोष हा कालिदासचा पूर्वसूरी होय हेच मत सर्वसाधारणतः मान्य केले जाते.*
_त्यांच्या मधुर गायनाने घोडे मंत्रमुग्ध होत असत, त्यामुळे त्यांचे नाव अश्वघोष पडले._ ते महाराज कनिष्क यांचे गुरू होते. *कनिष्काने बोलाविलेल चतुर्थ बौद्ध संगीतिमध्ये ते उपसभापती होते.*
*_ते संगितज्ञ भिक्खु होते व आपल्या संगीतास त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचाराचे साधन बनविले. ते विणेचे अत्यंत कुशल वादक होते. त्यांनी "रास्तवर" नावाच्या वाद्ययंत्राचा आविष्कार केला._*
*७) योगाचार आणि इतर बौद्ध तत्त्वज्ञान*
*८) महाश्रमण बुद्धघोष -*
_*महावंश सिंहली ग्रंथाच्या १०० व्या अध्यायामधील ३७ व्या अध्यायात बुद्धघोषांच्या चरित्रांचे वर्णन आहे. बौद्धधम्माच्या अग्रगण्य प्रचारकांत बुद्धघोषांचे नाव घेतले जाते.* मगध देशात गयेजवळ ब्राह्मणकुळात त्यांचा जन्म ५ व्या शताब्दीमध्ये झाला. ते वेद आणि शास्त्रात पारंगत झाले. बौद्ध भिक्खुंसोबत झालेल्या वादविवादात हरल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांचा स्वर भगवान बुद्धाप्रमाणे धीरगंभीर, स्निग्ध आणि बुलंद असल्यामुळे त्यांना लोक 'बुद्धघोष' म्हणू लागले. त्यांनी *'ज्ञानोदयची'* रचना केली. *भिक्खु रेवत'* यांच्या आग्रहावरून ते श्रीलंकेस गेले आणि *सिंहली भाषेतून अठ्ठकथा आणि जातक कथांचे पाली भाषेत भाषांतर केले. त्यांनी विशुद्धीमार्गाची देखील रचना केली.*_
*संदर्भ :-*
*१)* बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास
*२)* बौद्धधर्म
*३)* बौद्धधम्मावरील चार निबंध
*४)* बौद्धधम्म जिज्ञासा
*संकलन : महेश कांबळे*
*१८/१०/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment