🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_जिभेचे बंधन_*
*_(वातमिग जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_आपला बोधिसत्त्व रकडा वाराणसीच्या राजाच्या पट्टराणीच्या पोटी जन्माला आला आणि राजाच्या मरणानंतर वाराणसीचा राजा झाला. त्याच्याकडे संजय नावाचा एक माळी होता. एके दिवशी बोधिसत्त्व त्याला म्हणाला, "तुझ्या बागेत एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवशील का?" त्यावर संजय राजाला म्हणाला, "मला लागेल तेवढा मध देण्याचा आपण जर हुकूम केला तर मी आपणांस थोड्याच दिवसात आश्चर्यकारक गोष्ट दाखवीन." राजाने आपल्या कोठारातुन संजयला जेवढा मध लागेल तेवढा पुरविण्याचा आदेश दिला._
_त्या बागेत रोज एक *वातमृग* येत असे, पण वातमृगच तो - संजयाची चाहूल लागताच तो बानासारखा पळत सुटे. संजयाने राजाच्या कोठारातून आणलेला मध बागेतील गवंतांवर लावला. हळूहळू त्या वातमृगाला त्या गवताची इतकी गोडी लागली की, तो संजयाच्या जवळ जाऊन देखील गवत खाऊ लागला. काही दिवस झाल्यावर संजय राजाला म्हणाला, "महाराज, आज दुपारी तुम्ही बागेत या मी तुम्हाला बागेतील आश्चर्यकारक गोष्ठ दाखवणार आहे."_
_नंतर संजय बागेत गेला आणि त्याने गवताला मध लावले ते खाण्यासाठी वातमृग आला ते पाहिल्यावर संजयाने हळूहळू गवताला मध लावण्याचे काम राजवाड्यातील जवळच्या गवतांना लावले. ते गवत खात खात वातमृग राजवाड्यात गेला तसे संजयाने बाहेरचा रस्ता बंद केला आणि तो राजाला म्हणाला, "वातमृग माणसाच्या छायेलादेखील उभे राहत नाही, हे आपण जाणताच, असे असतानाही मी ह्या वातमृगाला येथपर्यंत आणून सोडले ही आश्चर्यकारक गोष्ट नाही का?"_
_राजा म्हणाला, "वातमृग माणसाच्या वाऱ्याला उभा राहत नाही ही गोष्ट खरी *परंतु रसतृष्णा मोठी बळकट आहे. आपल्या जिभेला जर हा वातमृग वश झाला नसता तर तो तुझ्या ताब्यात कधीही आला नसता. पण जिभेच्या मागे लागल्यामुळे तू नेशील तिकडे त्याला जाणे भाग पडले. जिभेचे बंधन बळकट खरे !!*_"
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*३०/१०/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment