Saturday, 10 October 2020

सिद्धार्थ गौतम आणि सहा दार्शनिक

 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

          *_सिद्धार्थ गौतम आणि सहा दार्शनिक_*
           
                   _सिद्धार्थाच्या वेळी ब्राह्मणमवादाव्यतिरिक्त आणखी ६२ दार्शनिक होते. त्यांपैकी *पूर्ण काश्यप, मक्खली गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कच्चायन, संजय वेलठ्ठीपुत्र आणि महावीर* हे सहा जण प्रमुख होते._

_*१) पूर्ण काश्यपाचे मत 'अक्रियावाद' नावाने प्रसिद्ध होते.* कोणी कितीही वाईट कर्म करो किंवा कितीही पुण्यप्रद कर्म करो, त्याचा आत्म्यावर परिणाम होत नाही. मेल्यावर काहीच उरत नसते, न आत्मा, न शरीर, *सिद्धार्थास हे मत पटले नाही.*_

_*२) मक्खली गोसालाचे मत 'नियतीवाद' या नावाने ओळखले जाई.* ते एक प्रकारचे *'पूर्ण निश्चयवादी'* होते. न कोणी काही करू शकतो, न कोणी काही व्हावयाचे थांबवू शकतो. घटना घडतात, दुःखाचा कोणीही नाश करू शकत नाही, त्यांचे प्रमाण कोणीही कमी-अधिक करू शकत नाही. *हे सिद्धार्थास मान्य नव्हते. त्यामुळे माणसाला केवळ भाग्यावर विसंबून राहावे लागेल, असे सिद्धार्थास वाटले.*_

_*३) अजित केसकम्बलाचा 'उच्छेदवाद म्हणजे एक प्रकारचा संपूर्ण नाशवाद.* त्याची शिकवण होती की, होम आदी यज्ञ व्यर्थ आहेत. कर्माची फळे आत्म्यावर कसलाही प्रभाव पाडू शकत नाही. *ना कुठे स्वर्ग आहे ना नरक.* कष्ट आणि दुःख एकाएकी समाप्त होईल. आत्म्यास चौऱ्यांशी लक्ष जन्म घ्यावे लागतील / योनीमधून जावे लागेल तेव्हाच त्याला दुःखापासून मुक्ती मिळेल. *सिद्धार्थास ते मत पटले नाही. कारण त्यानुसार खाणे-पिणे व मौज करणे याशिवाय काहीच उरत नाही.*_

_*४) पकुध कच्चायन नावाचा दार्शनिक 'अन्योन्यवादाचे' समर्थन करीत असे.* त्याचा म्हणण्यानुसार, प्राणीमात्रांचे सात तत्त्वांपासून निर्माण होते. ती तत्त्वे अशी - पृथ्वी, जल, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा. प्रत्येक तत्त्व स्वतंत्र असून संपूर्ण आणि नित्य आहे. त्याचा नाश होत नाही. कोणाचे शीर जरी कापले तरी त्याचा 'मृत्यू' होत नसतो. त्याने एवढेच होते की, शस्त्राने सात तत्त्वांमध्ये प्रवेश केला. *सिद्धार्थास हे सर्वथा अमान्य होते. कारण त्यानुसार माणसाने कोणतेही वाईट कर्म केले तरी त्याला दोष देता येणार नाही.*_

_*५) संजय वेलठ्ठीपुत्र नावाचा दार्शनिक 'विक्षेपवादी' होता.* तो म्हणे, 'कोणी मला विचारले की स्वर्ग कुठे आहे? मला जर वाटले की, आहे, तर मी म्हणेन होय आहे' त्याच्या मनास जसे योग्य वाटेल तेच तो म्हणेल असा त्याचा 'विक्षेपवाद' होता. त्याचे मत तर्कावर अधिष्टित नव्हते. *त्यामुळे सिद्धार्थास अमान्य होते कारण त्यामुळे माणसाचे जीवन निरुद्देश होऊन जाते.*_

_*६) निगण्ठनाथपुत्र महावीरांच्या मतास 'चातुर्यामसंवर वाद' म्हणतात.* त्यांचे म्हणणे असे की, आत्म्याला आपल्या पूर्वजन्माचे वाईट कर्म व या जन्माचे कर्म मिळून त्यानुसार पुढील जन्म ग्रहण करावा लागतो. त्यासाठी तपश्चर्येद्वारा पूर्वजन्माच्या कर्माचा नाश करायला हवा. या जन्मीच्या वाईट कर्माना थांबविण्याकरिता महावीरांनी धर्माचा उपदेश केलेला आहे. तो असा -_
*अ) हिंसा न करणे*
*ब) चोरी न करणे*
*क) खोटे न बोलणे*
*ड) ब्रह्मचर्याचे पालन करणे*
          _परंतु पूर्वजन्मीच्या वाईट कर्माची माहिती कोणासही नसते. या जन्मी देहदंडनाची तपश्चर्या केल्याने त्या वाईट कर्माचा नाश झाला किंवा नाही, किती कर्माचा नाश झाला व किती कर्मे अजून शिल्लक आहेत, याविषयी कोणासही माहिती नसते. *सिद्धार्थाला हे मंजूर नव्हते, कारण त्यामुळे माणसाचे जीवन काय-क्लेश व तपश्चर्या यांनाच समर्पित होऊन जाईल व माणसाच्या इच्छा आणि स्वाभाविक प्रवृत्ती यास काहींच वाव राहणार नाही.*_

           _*पूर्ण काश्यप, मक्खली गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कच्चायन, संजय वेलठ्ठीपुत्र आणि निगण्ठनाथपुत्र (महावीर) या सहा दार्शनीकांपैकी एकाचेही तत्त्वज्ञान सिद्धार्थास आवडले नाही. त्याला असे वाटले की, ते सर्वजण निराशावादी किंवा असहाय्य होते व त्यांना कोणत्याही चांगल्या - वाईट परिणामाची विशेष चिंता नव्हती.*_

*संकल्प :-*
*१)* भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
*२)* बौद्धधम्म जिज्ञासा

*संकलन : महेश कांबळे*
*११/१०/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...