🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_समाधी_*
_*कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे, म्हणजेच सम्यक - समाधी होय.* समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. *जसे - श्वासोच्छ्वास रोखुन धरणे, काही दिवस किंवा तासाकरिता जिवंतपणी स्वतःला जमिनीत गाडून घेणे, श्वासोच्छ्वास चालू असता तरी जागृतीविहिन होणे, प्राणान्त होणे इत्यादींनाही 'समाधी' म्हणतात.* परंतु अशा समाधीचा 'सम्यक समाधीचा' काहीच संबंध नाही. कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे 'सम्यक समाधी', स्वभावतः मन (चित्त) चंचल आहे. यास्तव त्याला एकाग्र - चित्त करणे म्हणजेच समाधी होय. जेवढे पुण्यधर्म आहेत ते सर्व समाधिकडे घेऊन जाणारे आहेत. अशा तऱ्हेने समाधी प्रमुख आहे. समाधीचा अभ्यास केल्याने व समाधी लागल्यानेच खरे ज्ञान होते._
*समाधीचे प्रकार*
*१) लौकिक (लोकीय) -* कामभूमी, रूपभूमी आणि अरुपभूमी ह्यांच्या कुशल चित्तांच्या एकाग्रतेच्या अवस्था.
*२) लोकोत्तर (लोकूत्तर) -* प्रज्ञा भावनेने निर्वाणाचा साक्षात्कार
*३) उपचार -* क्षीण ध्यानाची अवस्था
*४) अर्पणा (अप्पणा) -* दृढ ध्यानाची अवस्था
*समाधीत येणारी पाच प्रकारची विघ्ने*
*१) कामच्छन्द -* विषयांत अनुराग, लोभ, मोह, कामवासनेने व्याकुळ
*२) व्यापाद -* द्वेष, हिंसा, घृणा करणे
*३) त्यान मिद्ध ( थिन मिद्ध) -* बेहोशी, आळस, तंद्रा, निद्रा
*४) औधत्य - कौकृत्य (उद्धच्च कुकुच्च) -* बेचैनी, व्याकुळता, प्रक्षुब्ध होणे, पश्चाताप
*५) विचिकित्सा (विचिकिच्छा) -* संदेह, शंका करणे
*समाधीमध्ये ध्यानाची अंगे*
*१)* वितर्क (वितक्क)
*२)* विचार
*३)* प्रीती (पिती)
*४)* सुख
*५)* एकाग्रता (एकाग्गता)
_*बुद्ध समाधी लावत कारण की,* समाधीमध्ये पुष्कळ गुण आहेत. समाधीनेच बुद्धत्व प्राप्त होऊ शकते आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरही समाधीच्या उत्तम गुणांना स्मरण करण्याकरिता ते समाधी लावीत असत._
*_समाधीचे २८ गुण आहेत._*
*१)* आपली रक्षा होते
*२)* जीवन दीर्घ होते
*३)* बळ वाढते
*४)* अवगुणांचा नाश होतो
*५)* अपयश दूर होते
*६)* यशाची वृद्धी होते
*७)* असंतोष दूर होतो
*८)* पूर्ण संतोष राहतो
*९)* भय दूर होते
*१०)* निर्भयता येते
*११)* आळशीपणा दूर होतो
*१२)* उत्साह वाढतो
*१३, १४, १५)* राग, द्वेष, मोह नष्ट होतात
*१६)* खोटा अभिमान दूर होतो
*१७)* सर्व संदेह दूर होतात
*१८)* चित्ताची एकाग्रता वाढते
*१९)* मन सुंदर होते
*२०)* मन सदा प्रसन्न होते
*२१)* गंभीरता येते
*२२)* मोठा लाभ होतो
*२३)* नम्रता येते
*२४)* प्रीती येते
*२५)* प्रमोद होतो
*२६)* सर्व संस्कारांच्या क्षणिकतेचे दर्शन होते
*२७)* पुनर्जन्मापासून सुटका होते
*२८)* श्रमणभावाचे यथार्थ फळ प्राप्त होते
_*सर्वच बुद्ध समाधीत मग्न होतात याची चार कारणे अशी आहेत -*_
*१)* आपदरहित सुखमय जीवन
*२)* सर्वश्रेष्ठ गुणांचा वास
*३)* उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग
*४)* सर्वच बुद्धांनी मुक्त कंठाने केलेली समाधीची प्रशंसा
*_याच कारणाने तथागत नेहमी समाधी - भावनेत मग्न होत असत. तथागत बुद्धांस काही करावयाचे शिल्लक राहिले होते म्हणून नव्हे, तर समाधीचे अमाप गुणधर्म पाहूनच ते समाधीचे चिंतन करीत असत._*
*संकल्प :-*
*१)* बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन
*२)* दुःख मुक्ती की साधना
*३)* मिलिंद प्रश्न
*४)* बौद्धधम्म जिज्ञासा
*संकलन : महेश कांबळे*
*१३/१०/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment