Monday, 12 October 2020

समाधी

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                     *_समाधी_*

            

                     _*कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे, म्हणजेच सम्यक - समाधी होय.* समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. *जसे - श्वासोच्छ्वास रोखुन धरणे, काही दिवस किंवा तासाकरिता जिवंतपणी स्वतःला जमिनीत गाडून घेणे, श्वासोच्छ्वास चालू असता तरी जागृतीविहिन होणे, प्राणान्त होणे इत्यादींनाही 'समाधी' म्हणतात.* परंतु अशा समाधीचा 'सम्यक समाधीचा' काहीच संबंध नाही. कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे 'सम्यक समाधी', स्वभावतः मन (चित्त) चंचल आहे. यास्तव त्याला एकाग्र - चित्त करणे म्हणजेच समाधी होय. जेवढे पुण्यधर्म आहेत ते सर्व समाधिकडे घेऊन जाणारे आहेत. अशा तऱ्हेने समाधी प्रमुख आहे. समाधीचा अभ्यास केल्याने व समाधी लागल्यानेच खरे ज्ञान होते._


*समाधीचे प्रकार*

*१) लौकिक (लोकीय) -* कामभूमी, रूपभूमी आणि अरुपभूमी ह्यांच्या कुशल चित्तांच्या एकाग्रतेच्या अवस्था.

*२) लोकोत्तर (लोकूत्तर) -* प्रज्ञा भावनेने निर्वाणाचा साक्षात्कार

*३) उपचार -* क्षीण ध्यानाची अवस्था

*४) अर्पणा (अप्पणा) -* दृढ ध्यानाची अवस्था


*समाधीत येणारी पाच प्रकारची विघ्ने*

*१) कामच्छन्द -* विषयांत अनुराग, लोभ, मोह, कामवासनेने व्याकुळ

*२) व्यापाद -* द्वेष, हिंसा, घृणा करणे

*३) त्यान मिद्ध ( थिन मिद्ध) -* बेहोशी, आळस, तंद्रा, निद्रा

*४) औधत्य - कौकृत्य (उद्धच्च कुकुच्च) -* बेचैनी, व्याकुळता, प्रक्षुब्ध होणे, पश्चाताप

*५) विचिकित्सा (विचिकिच्छा) -* संदेह, शंका करणे


*समाधीमध्ये ध्यानाची अंगे*

*१)* वितर्क (वितक्क)

*२)* विचार

*३)* प्रीती (पिती)

*४)* सुख

*५)* एकाग्रता (एकाग्गता)


            _*बुद्ध समाधी लावत कारण की,* समाधीमध्ये पुष्कळ गुण आहेत. समाधीनेच बुद्धत्व प्राप्त होऊ शकते आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरही समाधीच्या उत्तम गुणांना स्मरण करण्याकरिता ते समाधी लावीत असत._

         *_समाधीचे २८ गुण आहेत._*

*१)* आपली रक्षा होते

*२)* जीवन दीर्घ होते

*३)* बळ वाढते

*४)* अवगुणांचा नाश होतो

*५)* अपयश दूर होते

*६)* यशाची वृद्धी होते

*७)* असंतोष दूर होतो

*८)* पूर्ण संतोष राहतो

*९)* भय दूर होते

*१०)* निर्भयता येते

*११)* आळशीपणा दूर होतो

*१२)* उत्साह वाढतो

*१३, १४, १५)*  राग, द्वेष, मोह नष्ट होतात

*१६)* खोटा अभिमान दूर होतो

*१७)* सर्व संदेह दूर होतात

*१८)* चित्ताची एकाग्रता वाढते

*१९)* मन सुंदर होते

*२०)* मन सदा प्रसन्न होते

*२१)* गंभीरता येते

*२२)* मोठा लाभ होतो

*२३)* नम्रता येते

*२४)* प्रीती येते

*२५)* प्रमोद होतो

*२६)* सर्व संस्कारांच्या क्षणिकतेचे दर्शन होते

*२७)* पुनर्जन्मापासून सुटका होते

*२८)* श्रमणभावाचे यथार्थ फळ प्राप्त होते


             _*सर्वच बुद्ध समाधीत मग्न होतात याची चार कारणे अशी आहेत -*_

*१)* आपदरहित सुखमय जीवन

*२)* सर्वश्रेष्ठ गुणांचा वास

*३)* उच्च ध्येयाचा एकमेव मार्ग

*४)* सर्वच बुद्धांनी मुक्त कंठाने केलेली समाधीची प्रशंसा

            *_याच कारणाने तथागत नेहमी समाधी - भावनेत मग्न होत असत. तथागत बुद्धांस काही करावयाचे शिल्लक राहिले होते म्हणून नव्हे, तर समाधीचे अमाप गुणधर्म पाहूनच ते समाधीचे चिंतन करीत असत._*



*संकल्प :-*

*१)* बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन

*२)* दुःख मुक्ती की साधना

*३)* मिलिंद प्रश्न

*४)* बौद्धधम्म जिज्ञासा


*संकलन : महेश कांबळे*

*१३/१०/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...