Sunday, 31 December 2023

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये नेमका काय फरक

_*प्रश्न ३ -* तुम्ही आत्ता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंनिसची चतुःसूत्री सांगितलीत, परंतु *अनेकांच्या मनामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्याबद्दल संभ्रम असतो. अनेकांना असंही वाटतं की, श्रद्धा अंध असू शकत नाही. तर तुम्ही आणि अंनिस श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये नेमका काय फरक करता ?*

_*उत्तर -* हे तुम्ही चांगलं विचारलंत. *काही जणांना असं वाटतं की, प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. दुसरे काही जण म्हणतात की, श्रद्धा ही कधीच अंधश्रद्धा नसते. तिसरे काही जण म्हणतात की, श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी आणि चौथे काहीजण म्हणतात की, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये अतिशय धूसर सीमारेषा आहे. हे सगळे जण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या व्याख्या न करता, ही शेरेबाजी करत असतात.*_

_*याच्या स्पष्टीकरणासाठी आपण तीन शब्द घेऊ- विश्वास, अंधश्रद्धा आणि श्रद्धा.*_

                _मी जर असं म्हटलं की, हा ध्वनिक्षेपक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवेल, अशी माझी श्रद्धा आहे. त्यावर तुम्ही म्हणाल की, जर या हॉलचा विद्युतपुरवठा खंडित झाला आणि पर्यायी विद्युतपुरवठ्याची सोय नसेल, तर तुम्ही श्रद्धेनं साष्टांग नमस्कार घातलात, तरी ध्वनिक्षेपक तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. *यात कार्यकारणभाव स्पष्ट आहे. याला आपण 'विश्वास' म्हणतो.*_

                 _*अंधश्रद्धा म्हणजे कार्यकारणभावाचा अभाव आणि मानसिक गुलामीमुळे पावित्र्य लाभलेल्या शोषणाचा प्रभाव.* अंधश्रद्धेची खरी भयानकता ही आहे की, कार्यकारणभाव स्पष्ट होऊनही मानसिक गुलामीमुळे माणसं त्या शोषणाला पावित्र्य देतात. उदाहरणार्थ एखादी मुलगी जेव्हा घरी येऊन सांगते की, 'मी माझं लग्न ठरवलंय. माझा भावी नवरा दुसऱ्या जातीतला आहे.' तेव्हा तिचा शास्त्राचा पदवीधर असलेला प्राध्यापक बाप म्हणतो- 'बेटी, तूने ये क्या किया ? पुरे खानदान की इज्जत मिट्टी में मिला दी।' ती जर त्याला म्हणाली की, 'अहो बाबा, तुम्हाला माहीत नाहीये का की, जवळपास सगळ्या माणसांच्या जीनोमचा पॅटर्न एकच आहे!' तर त्या बापाकडे त्याचं उत्तर नसतं. कारण *मानसिक गुलामी असं सांगते की, काही जाती उच्च असतात, काही जाती नीच असतात आणि या सांगण्याला पावित्र्य लाभलेलं असतं. त्यामुळे आजही आंतरजातीय लग्नांना टोकाचा विरोध होतो. म्हणजे अंधश्रद्धेमध्ये शोषण असतं.*_

           _*मग श्रद्धा म्हणजे काय? तर उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती. मित्रहो, ही व्याख्या न्यायमूर्ती रानडेंनी केलेली आहे.* श्रद्धेचा पहिला निकष 'उत्कटता' हा असतो. कारण आपण सगळे जण भावनाप्रधान आहोत. *आपल्या मेंदूतल्या दोनतृतीयांश मिडब्रेनमध्ये भावना निर्माण होते. म्हणजे जैविकदृष्ट्या आपण भावनाप्रधान आहोत. श्रद्धेचं दुसरं वैशिष्ट्य असतं कृतिशीलता.* श्रद्धा कृतिशीलच असते. तिचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, ती मानवी मूल्यविवेक उन्नत करते. याउलट मानवी मूल्यविवेक अवनत करते, ती अंधश्रद्धाच असते. उदाहरणार्थ, माझ्या गल्लीमध्ये एक गुंड सगळ्यांना त्राही भगवान करतोय. मी जर त्याच्याशी लढाई करण्याचं ठरवलं, तर सगळे मला सांगायला लागतील की, 'अरे, तू काय वेडाबिडा आहेस का? तुला माहीत नाही का, त्याच्याकडे माफिया आहेत, मनीपावर आहे, त्याचे पोलिसांशी संबंध आहेत, पुढारी त्याच्या बाजूने आहेत आणि त्याचे प्रसारमाध्यमांमध्येही लागेबांधे आहेत. त्याच्या विरोधात तू कशाला जातोस ?' त्यावर मी असं म्हणतो, 'हे सगळं मला माहीत आहे, पण माझी अशी श्रद्धा आहे की, अंतिम विजय सत्याचाच होतो. किंवा माझी अशी श्रद्धा आहे की, देवाच्या कृपेनं अंतिम विजय सत्याचाच होतो.' देव कृपा करतो की नाही, माहीत नाही. अंतिम विजय सत्याचाच होतो असाही इतिहास नाही. पण त्या गुंडाविरुद्ध लढण्यासाठी मला जी कार्यशक्ती एकवटायची असते, त्यासाठी मी असं म्हणतो की, *'होय, अंतिम विजय सत्याचाच होतो.' कारण माझा मूल्यविवेक मला तसे सांगत असतो. त्यामुळे मूल्यविवेक, कृतिशीलता आणि भावनाप्रधानता ही श्रद्धेची वैशिष्ट्यं असतात.*_ 

       _हे जर नीटपणे समजून घेतलं, तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, हे निश्चितपणे कळून येईल._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ३१/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_31.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 30 December 2023

बौद्धाचार्याची निर्मिती

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*बौद्धाचार्यांची निर्मिती*_

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               _अस्पृश्य महार समाज हिंदु धर्माच्या अंमलाखाली क्षुद्र देव-देवतांची पूजा अर्चा करीत असे. *त्याकाळात जातीच्या खाणाखुणा जपण्याच्या हेतूने व्रतवैकल्ये, कडक उपासतापास, पापाक्षलनासाठी बकरे कोंबड्याचा बळी देणे, विवाह, अपत्यप्राप्ती आदि चांगले क्षण साजरे करताना दारुची सरबत्ती उडविणे, मयताच्या अंत्यविधीनंतर घरच्या मंडळीना दारू पाजणे वगैरे धार्मिक विधी केले जात होते.*_ 

              _परंतु *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीनंतर पूर्वाश्रमीचा महार समाज जागृत झाला. त्याने रुढी परंपरागत गावकीची कामे, जातीदर्शक चालीरीती, मृतमांस खाणे, गावात भिक्षा मागणे वगैरे हीन दर्जाची कामे करण्याचे व पतीत जीवन जगण्याचे तो नाकारू लागला.*_

            _*या कालखंडात अनिष्ट रुढी, पुराणमतवादी परंपरा, दुष्ट चालीरीती, याविरोधी तत्कालीन महार समाज सेवा संघाने कोकणप्रांतात जनजागृती केली होती. आणि समाजसुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. महार समाजात विवाह किंवा पूर्वापार जुन्या पद्धतीचे संस्कार विधी महारांनी ब्राह्मणांच्या हाताने कधी करुन घेतले नाहीत. त्याकाळात आपल्या समाजातील पूर्वीचे जोशी (बुवा) यांच्या हस्ते संस्कारविषयक विधी करुन घेत असत.* त्यानंतर महार ज्ञाती पंचायतीने आरंभी धार्मिक संस्कार विधी पार पाडण्यासाठी पुरोहित पद्धतीचा अवलंब केला._ 

          _*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितोध्दाराची चळवळ सुरु करण्यापूर्वी महार लोकांचे विवाहादि संस्कारविधि पूर्वापार जुन्या पध्दतीने केले जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या समाजपरिवर्तनाच्या चळवळीनंतर सुमारे १९२८ सालापासून महारांचे विवाह वैदिक पध्दतीने केले जाऊ लागले. परंतु यात वैशिष्ट्य असे की, वैदिक पध्दतीचे किंवा पूर्वापार जुन्या पध्दतीचे विवाह व इतर संस्कार महारांनी ब्राम्हणाचे हातून कधीच केले नाहीत.*_

          _*आपल्याच समाजातील पूर्वी चे बुवा (जोशी) यांच्या हातून ते संस्कारविषयक विधि करुन घेत असत. पंचायत समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील संस्कार विधि पार पाडण्यासाठी 'पुरोहित' पध्दतीचा अवलंब केला व आयु. धयवीलकर बुवा, आयु. शिमोणकर बुवा, आयु. कासारेबुवा, आयु. रावढळकरबुवा, आयु. वडवलकर जोशी इत्यादिना पुरोहित नेमले. या पुरोहितांचे हातून संस्कारविधिचे कार्यक्रम करण्यात येऊ लागले.*_

           _*बौध्द धम्माच्या स्विकारानंतर बौध्दजन पंचायत समितीने बौध्दांचे संस्कार विधि पार पाडण्याकरिता 'बौध्दाचार्य' संस्थेची निर्मिती केली. या बौध्दाचार्यांना बौध्द पध्दतीने संस्कार विधि करण्याचे प्रशिक्षण दिले, आणि २८ फेब्रुवारी १९६२ रोजी परिपत्रक क्रमांक १२ प्रसिध्द करुन त्यांत मुंबईकरिता २८ बौध्दाचार्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. त्यानंतर याच परिपत्रकाची पुरवणी दिनांक १ फेब्रुवारी १९६४ रोजी प्रसिद्ध करुन मुंबईत आणखी एक असे एकूण २९ व ग्रामीण भागासाठी २ बौध्दाचार्याची नियुक्ती जाहिर केली. 

         _*जागेअभावी मुंबईतील बौध्दाचार्यांची नामावली येथे देणे शक्य होत नाही. तरी सुध्दा ग्रामीण भागासाठी नेमलेल्या दोन बौध्दाचार्यांची नावे माहितीसाठी देत आहोत.*_

१) आयु. तानु गोपाळ जाधव, मु. चाफे, ता. रत्नागिरी

२) आयु. भागुराम नामदेव कदम, मु. रामपुर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी*_

             _आज रोजी हजारोच्या - संख्येने बौद्धाचार्य निष्ठापूर्वक धम्म संस्कार व प्रसार करीत आहेत, धम्म चळवळीचे प्रबोधन करीत आहेत._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

*_टीप :- ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी बोद्धजन पंचायत समिती, भोईवाडा, परेल येथील कार्यालयाशी, तसेच संपर्क करावा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ३१/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) समाजक्रांतीचे अपत्य बोद्धजन पंचायत समिती लेखक - वि. ल. मोहिते_*

_*२) बौद्धाचार्य माहिती पुस्तिका - बौद्धजन पंचायत समिती*_

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_41.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

अंधश्रद्धा निर्मूलनाची चतुःसूत्री

_*प्रश्न २ - तुमच्याकडून आणि तुमच्या कार्यकर्त्यांकडून सतत अंधश्रद्धा निर्मूलनाची चतुःसूत्री मांडली जाते. ती नेमकी काय आहे आणि तिचं अंधश्रद्धा निर्मूलनामधलं नेमकं योगदान काय आहे?*_

_उत्तर - अंधश्रद्धा निर्मूलनाची चतुःसूत्री अशी आहे-_

_*१. शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं.*_

_*२. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार आणि अंगीकार करणं.*_

_*३. धर्माची कृतिशील, विधायक आणि प्रसंगी कठोर चिकित्सा करणं.*_

_*४. व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं.*_

              _शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं म्हणजे काय? अशा कुठल्या अंधश्रद्धा आहेत ? यांतलं एक उत्तर महाराष्ट्राची विधानसभा जो कायदा आता पास करणार आहे, त्यात आहे आणि दुसरं उत्तर माझ्या *एका तरुण कार्यकर्त्यानं 'अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय' याचा एक मंत्र केला होता त्यात आहे. तो मंत्र असा-*_

           _*'बुवाबाजी, भूत, भानामती, शकुन-अपशकुन, नशीब, ज्योतिष, चमत्कार, चकवा, दृष्ट लागणे, मूठ मारणे, देवी अंगात येणे ये सब थोतांड; २१ लाख का है जाहीर आव्हान!'*_

          _या मंत्रात सांगितलेल्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि त्यांच्याशी संघर्ष करणं हे चतुःसूत्रीतलं पहिलं सूत्र._

_*दुसरं सूत्र- वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार आणि अंगीकार करणं.* त्यासाठी अंनिस सर्व पातळ्यांवर काम करते. उदाहरणार्थ, अंनिसनं मोठ्या प्रमाणांवर शिक्षकांची शिबिरं घेतलेली आहेत. त्यांच्यामार्फत अडीच-तीन लाख विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण केलं आहे. फिरती नभांगणं आणि फिरती तारांगणं यांच्यासारखे उपक्रम घेतले आहे._

_*तिसरं सूत्र- धर्माची कृतिशील, विधायक आणि कठोर चिकित्सा करणं.* मला स्वतःला असं वाटतं की, आज महाराष्ट्रामध्ये कृतिशीलपणे चिकित्सा करणारी अंनिसखेरीज दुसरी संघटना नाही. उदाहरणार्थ... *महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारणपणे एक-दीड कोटी गणपती बसतात, ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असतात, त्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, पण त्यावरचे रासायनिक रंग विरघळून प्रदूषण होतं. ही धर्मचिकित्सा आहे. २१व्या शतकामध्ये शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात महिलांना का प्रवेश नाही? ही धर्मचिकित्सा आहे. महाराष्ट्रातल्या तीन-चार हजार जत्रा-यात्रांमध्ये मिळून पाच-सहा लाख बोकड मारले जातात. ते कसे थांबवता येईल, ही धर्मचिकित्सा आहे. आज विज्ञान इतकं पुढे गेलं असताना आंतरजातीय लग्नं का होत नाहीत? ही अशी धर्मचिकित्सा विधायक आणि कृतिशील पद्धतीनं करणं हे अंनिसचं तिसरं सूत्र आहे.*_

_*चौथं सूत्र- व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं. 'अंधश्रद्धा निर्मूलन एके अंधश्रद्धा निर्मूलन' असं करून आमची चळवळ यशस्वी होणार नाही. त्याला व्यापक समाजपरिवर्तनाची जोड द्यावी लागेल आणि व्यापक समाजपरिवर्तनासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मदतीची ठरेल.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ३०/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_30.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 29 December 2023

वैज्ञानिक दृष्टिकोन

 _*प्रश्न १-* पहिलाच प्रश्न असा आहे की, अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल चर्चा करताना *'वैज्ञानिक दृष्टिकोन'* हा शब्द सातत्याने पुढे येतो. तर *'वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आग्रह अंनिसकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात का धरला जातो?*_

_*उत्तर - 'वैज्ञानिक दृष्टिकोन' याचा अर्थ जगाचा एका वेगळ्या दृष्टीनं अर्थ लावणं. कोपर्निकसनं पहिल्यांदा सांगितलं की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसत असलं, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपण त्याला 'कोपर्निकस रिव्होल्यूशन' म्हणतो.* कोपर्निकसच्या या शोधामुळे जगाचा केंद्रबिंदू बदलला. त्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक शोध लागत गेले आणि मग हळूहळू 'वैज्ञानिक दृष्टिकोन' ही संज्ञा आकाराला आली. गेल्या शतकात तर हा दृष्टिकोन इतका महत्त्वाचा ठरला की, *भारतीय राज्यघटनेतल्या नागरिकांच्या कर्तव्यामध्येही त्याचा समावेश केला गेला; शिक्षणाच्या गाभाघटकांमध्ये, मूल्यशिक्षणामध्ये त्याचा समावेश झाला. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अवघ्या चारशे-पाचशे वर्षांपूर्वी जगामध्ये आला आणि धर्माचा इतिहास मात्र या देशामध्ये पाच-सहा हजार वर्षांपासून आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी १९५३ मध्ये लोकसभेत वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. आणि राज्यघटनेत असं म्हटलंय की, It is a duty of every Indian citizen to promote scientific temperament.* लक्षात घ्या, 'पाच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या धर्माचा आणि अध्यात्माचा प्रचार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं काम आहे' असं राज्यघटनेत म्हटलेलं नसून, 'नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा' असं म्हटलेलं आहे. पण म्हणजे नेमकं काय ? चार मुद्दे सांगता येतील._

_*१. 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या संज्ञेचा एका शब्दात अर्थ सांगायचा तर, कार्यकारणभाव. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं. त्यामागे देव, दैव, नशीब, प्राक्तन, संचित, प्रारब्ध असं काहीही नसतं.*_

_*२. ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. या देशामध्ये असं सांगण्यात आलं की, 'तू ओबीसी आहेस, तुला एवढंच समजेल. तू दलित आहेस, तुला काहीच समजणार नाही. तू स्त्री आहेस, तुला शिकण्याचा अधिकारच नाही.'*_

_*३. जगातल्या सगळ्याच कार्यांमागची कारणं समजत नाहीत. उदा. कॅन्सर का होतो, याचं कारण आज माहीत नाही. पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो. तो असं मानतो की, आम्ही सत्याचा शोध अखंड चालू ठेवू. तो कधीही धर्मासारखा अंतिम सत्यावर उभा नसतो.*_

_*४. 'वैज्ञानिक दृष्टिकोन' हा आजतरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला सापडलेला सर्वांत खात्रीचा मार्ग आहे. ग्रंथप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, कुणीतरी कुणाच्यातरी डोक्यावर हात ठेवल्यामुळे मिळालेलं ज्ञान, या सगळ्या ज्ञानाच्या मार्गांना आता नकार मिळालेला आहे. त्यामुळे 'वैज्ञानिक दृष्टिकोनाचा' स्वीकार ही मानवी जीवनातली महत्त्वाची बाब आहे आणि या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीची पूर्वअटदेखील आहे.*_ 

_म्हणून अंनिस 'वैज्ञानिक दृष्टिकोनाचा' एवढा आग्रह धरते._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २९/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_29.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


Wednesday, 27 December 2023

दुर्लक्षणीय प्रश्न

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_दुर्लक्षणीय प्रश्न_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                    _"भंते नागसेन, *भगवान बुद्धांनी म्हटले की, 'हे आनंद धर्मोपदेश करीत असता तथागत इतर पंथांच्या आचार्यांप्रमाणे काहीही लपवून ठेवीत नाहीत.' तरीपण स्थविर मालुंक्य पुत्रांनी प्रश्न विचारले असता तथागतांनी काहीच उत्तरे कशी दिली नाहीत ?* यात दोनच कारणे असू शकतात-_

*_१) कदाचित त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहित नसेल_* किंवा 

*_२) माहित असूनही दुसर्यांपासून त्यांना काहीतरी लपवून ठेवण्याची इच्छा असेल._*

                     _“भंते नागसेन, धर्मोपदेश करीत असता तथागत काहीही लपवून ठेवीत नाहीत हे जर खरे असेल, तर मालुंक्य पुत्राच्या प्रश्नांचे उत्तर तथागतास माहीत नसेल म्हणूनच ते चूप राहिले असावेत आणि जर त्याचे माहीत असेल, तर ते त्यांच्यापासून लपवून ठेवण्याचा दोष त्यांचेकडे येतो. भंते, हे सुद्धा एक कोडे आपल्यापुढे मी ठेवीत आहे. तरी आपण याची सविस्तर उकल करून द्यावी."_

           _"महाराज, तथागत धर्मोपदेश करीत असता काही एक लपवून ठेवीत नाहीत, असे आनंदाजवळ बोलले होते, हे खरे आहे. तसेच *स्थविर मालुंक्य पुत्राच्या प्रश्नांची त्यांनी काहीही उत्तरे दिली नाहीत, हेही खरे आहे. परंतु त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना अवगत नव्हती किंवा त्यांना ते लपवून ठेवावयाचे होते, हे त्याचे कारण नव्हते.*

_महाराज, कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याच्या या चार पद्धती आहेत-_

_*१)* एखादा प्रश्न असा असतो की, त्याचे उत्तर सरळ व तडक दिले जाते,_

_*२)* एखादा प्रश्न असा असतो की त्याचे उत्तर विभाजन करून दिले जाते,_ 

_*३)* एखादा प्रश्न असा असतो की, त्याचे उत्तर प्रतिप्रश्न करून देण्यात येते_ आणि 

_*४)* एखादा प्रश्न असा काही असतो की, त्याचे उत्तर मौनानेच द्यावे लागते. म्हणजे दुर्लक्षिला जातो._

_*१- "कोणत्या प्रश्नाचे उत्तर सरळ व तडक दिले जाते ? तर रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे अनित्य आहेत काय ? या प्रश्नाचे उत्तर होय."*_

_*२-"कोणत्या प्रश्नाचे उत्तर विभाजन करून दिले जाते ? तर, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे याप्रमाणे अनित्य आहेत काय? या प्रश्नांची उत्तरे होते."*_

*_३-"कोणत्या प्रश्नाचे उत्तर प्रतिप्रश्न करून दिले जाते ? तर, डोळ्यांनी सर्वच वस्तूंचे ज्ञान होते काय ? या प्रश्नांचे होय."_*

*_४-"कोणत्या प्रश्नाचे उत्तर मौनाने (उपेक्षा करून) दिले जाते ? तर, संसार नित्य आहे काय ? संसाराचा शेवट होईल काय ? संसाराचा शेवट कोठे आहे ? संसाराचा शेवट कोटेच नाही काय ? संसाराचा कोठे शेवट आहे ? आणि कोठे शेवट नाही, असे आहे काय ? ज्यास जीव (आत्मा) म्हणतात, तेच शरीर होय काय ? जीव (आत्मा) दुसरा आणि शरीर दूसरे आहे काय ? तथागतास महापरिनिर्वानंतर अस्तित्व असते काय ? तथागतास महापरिर्वानानंतर अस्तित्व नसते काय ? तथागतास महापरिनिर्वाणांनतर अस्तित्व असते आणि नसतेही असे आहे काय ? तथागतास महापरिनिर्वाणांनतर अस्तित्वच नसते नी अस्तित्व नसणेच योग्य होय. असे आहे काय? हे ते दुर्लक्षित केले जाणारे प्रश्न होत._*

               _"महाराज, *मालुंक्य पुत्राच्या प्रश्नाचे असेच दुर्लक्ष करून उत्तर दिले जाऊ शकत होते. याच कारणाने भगवान बुद्धाने काहीच उत्तर दिले नाही. असा कसा तो प्रश्न होता की, ज्याच्याकडे एकदमच दुर्लक्ष करणे योग्य होते ? कारण अशा प्रश्नाचे उत्तर देण्यात काहीही अर्थ निघत नाही किंवा त्यापासून काही कार्यभागही साधला जाऊ शकत नाही. म्हणून त्या प्रश्नास एकदम त्याज्य ठरविणेच योग्य होते. अर्थहीन, ज्ञानशुन्य अशा गोष्टी कधी तथागत करीत नाहीत"*_

_"बरोबर आहे भंते, आपले म्हणणे. मालुक्य पुत्राचा प्रश्न असाच होता, हे मी मान्य करतो."_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २७/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

*_२) मज्झिम निकाय - मालुंक्य सुत्त_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_27.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 26 December 2023

उपासकाने सदैव भिक्षुचा आदर केला पाहिजे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_उपासकाने सदैव भिक्षुचा आदर केला पाहिजे_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  _“भंते नागसेन, *भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, 'हे वाशिष्ठ, जगात धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे, मग तो या जन्मी असो की कोणत्याही जन्मी असो,' तरी पण श्रोतापन्नपदाचा लाभ केलेला एखादा गृहस्थ म्हणजे ज्यांचे आता आपल्या त्या पदावरून पतन होणे शक्य नाही, असे जाणून घेतले आहे. परंतु असे असूनही तो एखाद्या अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामणेराला प्रणाम करतो आणि त्यांचे उठून उभे राहून स्वागत करतो. भंते नागसेन, 'धर्म हाच जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तो मग या लौकी असो को कोणत्याही लोकी असो.' हे जर खरे असले तर धर्माचरणानेच श्रोतापन्नपद प्राप्त केलेला एखादा गृहस्थ एकदमच अज्ञानी भिक्षुला किंवा श्रामणेरला प्रणाम करतो आणि उठून उभा राहून त्याचे स्वागत करतो, हे शोभनीय वाटत नाही. आणि जर श्रोत्तापन्न गृहस्थांनी एखाद्या अज्ञानी भिक्षूस किंवा श्रामणेरास प्रणाम करणे व यथार्थत: योग्य असेल तर 'धर्म हाच जगात सर्वश्रेष्ठ आहे' असे मानणे चुकीचे ठरते. हेही एक कठीणच कोडे आहे.* भंते, कृपाकरून यांचे स्पष्टीकरण करून सांगा, जेणे करून विरोधकांना सडेतोड उत्तर देता येईल."_

_"महाराज, *जगात धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि श्रोतापन्न नामक उच्चपदी पोचलेल्या उपासकाने एखाद्या अज्ञानी भिक्षुला किंवा श्रामणेराला प्रणाम केला पाहिजे व उठून उभे राहून त्यांचे स्वागत केले पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी अगदी संयुक्तीकच आहेत.* महाराज, असे करण्याचे कोणते बरे ते कारण आहे ?_

_"महाराज, *श्रमण (भिक्षु) होण्यासाठी वीस श्रेष्ठ गुण आणि बाहेरील दोन लक्षणे असावे लागतात. त्यामुळेच ते अज्ञानी असले तरी श्रोतापन्नपद प्राप्त केलेले उपासक किवा दुसरे लोक त्यांना आदराने प्रणाम करतात व उठून उभे राहून त्यांचे स्वागत करतात.* ते वीस गुण आणि दोन बाहेरील लक्षणे कोणते आहेत ते ऐका-

*_श्रमणांचे गुण व लक्षणे_*

_*१)* ते अरण्य, वृक्ष व एकांत अशा तीन श्रेष्ठ ठिकाणी वास्तव्य करीत असतात_

_*२)* ते सर्वच चांगल्या गोष्टीत अग्रेसर असतात,_ 

_*३)* ते आपले अधिष्ठान नियमानुसार ठेवीत असतात_

_*४)* ते सदाचारी असतात_ 

_*५-६)* शांत आणि संयमाने विहार करतात_ 

_*७)* परम संयमी असतात_

_*८)* क्षमाशील असतात_ 

_*९)* उत्तम कार्यात मग्न राहतात,_

_*१०)* आचार विचाराने श्रेष्ठ असतात,_ 

_*११)* उच्च व पवित्र इच्छा बाळगतात,_

_*१२)* विवेकशील असतात,_

_*१३)* पापांची लाज - भीती बाळगतात,_ 

_*१४)* प्रयत्नशील असतात,_

_*१५)* अप्रमादी असतात,_

_*१६)* शिक्षापदाचा अभ्यास करण्यात सदैव तत्पर असतात,_

_*१७)* धर्माचे ज्ञान मिळविण्यासाठी सदैव तत्पर असतात,_ 

_*१८)* शीलाचे पालन करण्यात तत्पर असतात,_

_*१९)* तृष्णवेर विजय मिळविणारे_ आणि 

_*२०)* ते शिक्षापदाचा अभ्यास पूर्ण करतात._

_हेच त्यांचे स्वतःचे विशेष असे वीस गुण आहेत. असेच_

*_१) काषायवस्त्र धारण करणारे_* व 

_*२) डोक्याचे मुंडण करणारे ते असतात,*_

 *_ही त्यांची दोन बाह्य लक्षणे होत._*

            _"महाराज, *भिक्षु लोक वर सांगितलेल्या गुणांवर आरुढ होऊन धर्माचे पालन करतात व त्यायोगे अर्हंतपद सुद्धा लाभ करून घेतात. म्हणूनच श्रोतापन्नपद प्राप्त केलेले गृहस्थ उपासक एखाद्या अज्ञानी भिक्षुस प्रणाम करतात आणि त्याचे उठून उभे राहून स्वागत करतात. 'आश्रव क्षीण पावल्यामुळे त्यांनी भिक्षु जीवनाचा अंगीकार केला आहे, असे पवित्र जीवन करण्याप्रत अजून माझी अवस्था नाही.' असा विचार करूनच श्रोतापन्न पद प्राप्त केलेले गृहस्थ उपासक कोणत्याही भिक्षूना प्रणाम करतात आणि त्यांचे उभे उठून स्वागत करतात. त्यांनी भिक्षु जीवनाचा अंगीकार करून श्रेष्ठ अशा सज्जन लोकांच्या समुहात स्थान मिळविले आहे. परंतु मला मात्र अजून तेथे स्थान लाभलेले नाही, त्यांनी प्रतिमोक्षाचा उपदेश ऐकण्याइतपत योग्यता प्राप्त केली आहे; परंतु माझी ती अवस्था नाही, ते इतरांना प्रव्रजित व उपसंपन्न करून बुद्ध शासनाची वृद्धी करू शकतात, परंतु माझी अजून तरी ती योग्यता नाही, ज्यांचे मी पालन करू शकत नाही, अशा पुष्कळ पवित्र शिक्षापदांचे ते पालन करतात, त्यांनी भगवान बुद्धांनाच आपला एकमात्र आधार देणारे गुरु मानून भिक्षु जीवनाचा अंगीकार केला आहे, त्याच्या काखेत मोठमोठ घाण केस नाहीत, ते अंजन लावीत नाहीत की दुसरा कोणताही साजश्रृंगार करीत नाहीत, तर सदाचारांचा सुगंध हेच एकमात्र त्यांचे साजश्रृंगाराचे प्रसाधन आहे; परंतु मी मात्र अनेक प्रकारच्या प्रसाधनाने साजश्रृंगार करीत आहे. महाराज याशिवाय जे वीस सर्वोच्च गुण आणि दोन बाहेरील लक्षणे, ही सर्वथा भिक्षु लोकांतच पहावयास मिळतात. तसेच भिक्षु लोक दुसऱ्याही अनेक शिक्षापदांचे निष्ठेने पालन करतात. परंतु अजूनपर्यंत माझा त्या शिक्षापदांशी काहीच संबंध आलेला नाही. असा विचार करूनच श्रोतापन्न पदाचा लाभ केलेले गृहस्थ उपासक कोणत्याही भिक्षूंना प्रणाम करतात आणि त्यांचे उडून उभे राहून स्वागत करतात‌ आणि असे करणे आवश्यकही आहे.*_

           _"महाराज, राजकुमार पुरोहिताजवळच क्षत्रियांना आवश्यक त्या सर्व विद्यांचे शिक्षण घेतो. त्यानंतर तो तरुण झाल्यावर योग्यवेळी राजसिंहासनावर बसतो, *त्याला राजपदाचा लाभ होतो. तरीपण तो आपल्या आचार्यांना प्रणाम करतो व उटून उभा राहून त्यांचे आदराने स्वागत करतो. कारण त्यास असे वाटते की, 'हे माझे गुरु आहेत, यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळेच मला ही योग्यता प्राप्त झाली आहे'. महाराज, याचप्रमाणे भिक्षु लोक अशाच शिकवण देण्याच्या महान पिढीतील आहेत. असा विचार करूनच श्रोतापन्न पदाचा लाभ केलेले गृहस्थ उपासक कोणत्याही भिक्षुंना प्रणाम करतात आणि आपल्या आसनासवरून उठून उभे राहून त्यांचे स्वागत करतात.*_

                 _“महाराज, *एवढ्यावरूनच आपण समजून घ्यावयास पाहिजे की, भिक्षुंचां दर्जा किती महान आहे.* महाराज, समजा *एखाद्या श्रोतापन्न गृहस्थाला अर्हत्पदाचा लाभ झालाच तर त्यावेळी त्याला दोनच गती प्राप्त होऊ शकतात, तिसरी गती लाभणे संभवच नाही - एक तर तात्काळ त्यादिवशी परिनिर्वाण किंवा दूसरे भिक्षु जीवनाचा अंगीकार. पण ही स्थिती भिक्षूची नाही कारण भिक्षुभाव अत्यंत अचल, उत्तम व श्रेष्ठ असतो."*_

                “_भंते, नागसेन, ही गोष्ट आता मला समजली. आपल्यासारख्या बुद्धीमान व्यक्तीकडूनच असा प्रश्न चांगल्याप्रकारे स्पष्ट केला जाऊ शकतो. आपणास वगळता दुसरा कोणीही याप्रमाणे समजावून सांगू शकत नाही."_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २६/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_26.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 24 December 2023

स्मृतीच्या उत्पत्तीचे सोळा प्रकार

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्मृतीच्या उत्पत्तीचे प्रकार_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_राजा म्हणाला, "भंते, किती प्रकाराने स्मृती उत्पन्न होते ?"_*

_“महाराज, सोळा प्रकारांनी स्मृतीचा उगम होतो ते सोळा प्रकार असे :-_

_*१. अभिज्ञेमुळे (पूर्वज्ञानामुळे) स्मृती उत्पन्न होते :-* आयुष्मान आनंद, उपासिका खुजुत्तरा अगर ज्यांना अशी अभिज्ञा शक्ती प्राप्त झाली होती, असे लोक आपल्या पूर्वजन्मातील गोष्टीचेसुद्धा स्मरण करीत होते._

_*२. बाह्य गोष्टीमुळे स्मृती उत्पन्न होते :-* जे विसराळू असतात, त्यांना वेळोवेळी सांगत असल्यामुळे त्यास स्मरण होते._

_*३. एखादा मोठा प्रसंग घडला असता स्मृती उत्त्पन्न होते :-* जसे, राजांच्या अभिषेकाची व्यवस्था चालली असता त्यांना स्मरण होते, किंवा स्वतःच्या श्रोतापत्ती फळाच्या प्रसंगामुळे स्मरण होते._

_*४. आनंदाच्या प्रसंगानेसुद्धा स्मृती उत्पन्न होते :-* अमक्यावेळी त्या गोष्टीने अतिशय आनंद झाला अशा स्मरणाने स्मृती उत्पन्न होते._

_*५. दुःखद प्रसंगामुळे स्मृती उत्पन्न होते :-* अमक्या ठिकाणी त्याप्रसंगाने फार दुःख भोगावे लागले होते. अशी आठवण होताच स्मरण होते._

_*६. साम्य आढळून आल्यामुळे स्मृती उत्पन्न होते :-* जसे आपल्या आई, वडील, भाऊ, बहीण इत्यादी समान दुसऱ्या व्यक्तीस पाहून स्मरण होते किंवा एखाद्या उंट, बैल, गाढव वगैरे समान दुसऱ्या उंट, बैल किंवा गाढव दृष्टीस पडले असता स्मरण होते._

_*७. असमानतेमुळे स्मृती उत्पन्न होते :-* जसे अमक्याचे रूप असे आहे, शब्द असा आहे, सुगंध असा आहे, स्वाद असा व स्पर्श असा आहे व यांचा नाही असे दोन वस्तूंच्या असमानतेसंबंधी विचार करीत असता स्मरण होते._

_*८. दुसऱ्यांनी सांगितल्यामुळे स्मृती उत्पन्न होते :-* अमक्या ठिकाणी असे घडले होते, असे सांगताच आपणास स्मरण होते._

_*९. एखादी खूण पाहून स्मृती उत्पन्न होते  :-* एखादी खूण पाहून एखाद्या बैलासंबंधी स्मरण होते._

_*१०. प्रयत्न केल्याने स्मृती उत्पन्न होते :-* एखाद्या विसराळू मनुष्यास दुसऱ्याने 'आठवण करा, आठवण करा' असे म्हटल्यानंतर तो प्रयत्न करतो आणि त्या गोष्टीचे त्याला स्मरण होते._

_*११. विचार करीत असता स्मृती उत्पन्न होते :-* अमक्या वाक्यानंतर अमके वाक्य लिहावयास पाहिजे असे उत्तम लेखकाला चटकन समजून येते._

_*१२. मोजणी करीत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते :-* हिशेबात प्रवीण असलेले मुनीम मोठमोठे गणित आणि बेरजा चटकन करून घेतात._

_*१३. मुखोद्गत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते :-* पुन्हाः पुन्हाः घोकून पाठ करणाऱ्या लोकांना त्या गोष्टी चटकन आठवतात._

_*१४. चिंतनामुळे स्मृती उत्पन्न होते :-* भिक्षु लोक चिंतनाच्या (समाधीच्या) बळाने आपल्या पूर्वजन्मीच्या अनेक गोष्टीचे स्मरण करतात. एका जन्मीच्या असोत की अनेक जन्मीच्या परंतु स्थळ, काळ, योनी व आकार इत्यादी सर्व प्रकारच्या स्थितींचे त्यांना स्मरण होते._

_*१५. संदर्भामुळेही स्मृती उत्पन्न होते :-* कोणी वकील आपल्या शागीर्दास म्हणतो की 'ते पुस्तक आण' त्यानंतर पुस्तक पाहतो व त्याला त्या कायद्याचे स्मरण होते._

_*१६. कोणाकडे ठेवलेल्या वस्तूत पाहून यासाठी केलेल्या कराराची आठवण होते.*_

_*१७. पूर्वानुभवामुळे स्मृती उत्पन्त होते :-* पाहिलेल्या रूपाचे, ऐकलेल्या शब्दांचे, उपभोगलेल्या सुगंधाचे, चाखलेल्या स्वादाचे, केलेल्या स्पर्शाचे व झालेल्या अनभूतीचे स्मरण होते.

_“महाराज याच सोळा *(शब्द प्रयोगात १६ स्मृत्या आल्या असल्या तरी त्या अनुक्रमाने १७ आहेत)* प्रकारांनी स्मृतीचा उगम होतो."_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_24.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 22 December 2023

लोमस काश्यपाची गोष्ट

                   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                        *_लोमस काश्यपाची गोष्ट_*

                            *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

                     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                 _"भंते नागसेन, *भगवान बुद्धानी सांगितले आहे की, पृर्वी लाभलेल्या अनंत अशा मनुष्य जन्मांपासूनच मी अहिंसेचा अभ्यास केला होता.' यासोबतच दुसऱ्या एके ठिकाणी त्यांनीच सांगितले आहे की, 'ज्यावेळी मी लोमस काश्यप' नावाचा ऋषी होऊन विचरण करीत होतो त्यावेळी मी शेकडो प्राण्यांचा वध करवून वाजपेय्य नावाचा महायज्ञ केला होता."*_

           _"भंत नागसेन, *अनंत जन्मांपासून अहिंसेचे पालन करण्याची गोष्ट खरी मानावी तर लोमस ऋषीच्या जन्मातील यज्ञात शेकडो प्राण्यांच्या वधाची गोष्ट खोटी ठरते. आणि यज्ञातील प्राणी खरा मानावा तर अहिंसेबद्दल सांगितलेले वचन खोट ठरते.* हेसुद्धा एक भयंकर कोडे आहे. तेव्हा कृपाकरून आपणच ते उकलून द्यावे."_

            _"महाराज, *अहिंसेच्या अभ्यासाची गोष्टही सत्यच आहे. आणि यज्ञातील शेकडो प्राण्यांच्या केलेल्या वधाची गोष्ट सुद्धा खरीच आहे. तथापि हे लोमस तापसाच्या जन्मातील विकाराच्या आहारी जाऊन अज्ञानवश केलेले कृत्य होय; विचापूर्वक कलेले सकृत्य नव्हें."*_

_"भंते नागसेन, *आठ प्रकारचे लोक हिंसा करीत असतात.* ते आठ प्रकार असे- _

_*१)* रागीट मनुष्य रागाने बेभान झाल्यामुळे,_

_*२)* द्वेषी मनुष्य आपल्या मत्सरी स्वभावामुळे,_

_*३)* मुढता मनुष्य आपल्या मोहाग्नीमुळे_

_*४)* अहंकारी आपल्या अहंकाराच्या वंशामुळे_

_*५)* लोभी मनुष्य लोभामुळे,_ 

_*६)* निर्धन मनुष्य आपली उपजीविका चालविण्यासाठी,_

_*७)* मूर्ख मनुष्य केवळ करमणूक म्हणून आणि_

_*८)* राजे लोक दंड देण्यासाठी जीवहिंसा करतात._ 

         _भंते, हेच आठ प्रकारचे लोक जीवहिंसा करतात. परंतु भंते नागसेन, बोधिसत्वाने या कारणांवाचून स्वाभाविकपणे जीवहिंसा केली नसेल काय ?"_

            _"नाही महाराज, *बोधिसत्वाने स्वाभाविकपणे जीवहिंसा केली नव्हती.* महाराज, जर बोधिसत्वाने स्वाभाविकपणे महायज्ञ करून जीवहिंसा केली असती तर असे कदापि म्हटले नसते की, हे सह्य, तू निश्चित समजून घे की, 'चारही बाजूंनी सागरापर्यंत विस्तार पावलेल्या ज्या पृथ्वीला सागराचे संरक्षण मिळाले आहे, त्या संपूर्ण पृथ्वीवर मी निंदेचा विषय व्हावा हे मला मुळीच मान्य नाही.”_

         _“महाराज, त्यांनी जरी असे म्हटले असले तरी *बोधिसत्व काश्यप चंद्रावती नावाच्या राजकुमारीला पाहून तिच्या प्रेमात पडून मनाचा तोल सांभाळू न शकल्या- मुळे ते स्वतःला विसरून गेले. तिच्याविषयी मनात असलेल्या उत्कंठेमुळे आणि विरहामुळे त्यावेळी त्यांच्यावर वेडा होण्याची पाळी आली असता. एखाद्या भटकलेल्या किंवा भुललेल्या माणसाप्रमाणे त्यांनी घाईघाईने महायज्ञ केला. या यज्ञात अनेक पशुंचा बळी देण्यात आला होता. पशुंच्या माना कापल्यामुळे रक्ताचा जणू काही ओघळ वाहू लागला होता.*_

          *_“महाराज, ज्यांचा मेंदू ताळ्यावर नाही असा वेडा माणूस कधी कधी जळत असलेला अग्नीसुद्धा हातात पकडतो, चिडलेला सापसुद्धा पकडतो, मदोन्मत्त हत्तीच्या सुद्धा पुढे जातो, अथांग समुद्रातसुद्धा उडी टाकती, विहिरीतही उडी घालतो. काटेरी जागेतही जातो, पहाडाच्या उंच कड्याहून देखील उडी टाकतो, घाण खातो, रस्याने नग्न अवस्थेतच फिरतो, याशिवाय अशाच अनेक लीला करतो. महाराज, याप्रमाणेच बोधिसत्व काश्यपाचे इंद्रावती नामक राजकुमारीला पाहून तिच्यावर प्रेम जडले. आणि मनाचा तोल न सांभाळता आल्यामुळे ते स्वतःलाच विसरून गेले. तिच्याविषयी मनात असलेल्या उत्कंठेमुळे व विरहामुळे त्यावेळी त्यांच्यावर वेड लागण्याची पाळी आली असता एखाद्या भटकलेल्या किंवा भुललेल्या माणसाप्रमाणं त्यांनी घाईघाईने अविचारानं महायज्ञ केला._*

*_"महाराज, राजदंड विधानानुसार वेड्या माणसांचे अपराध तेवढे दंडनीय मानले जात नाहीत. तसेच पारलौकिक बाबींतही समजले जाते."_*

 _"महाराज, एखाद्या वेड्या माणसाने कोणाला ठार मारले तर तुम्ही त्याला कोणता दंड द्याल ?_ 

*_“भंते, वेड्या माणसाला दंड तो काय देणार ? त्याला ठोकपिट करून सोडून देण्यात येते. त्याच्यासाठी एवढाच दंड पुरेसा असतो."_*

            _"महाराज, खरी बाब तर ही आहे की, *वेड्या माणसाला दंडच नसतो. वेड्या माणसाचा अपराध म्हणजे अपराधच मानला जात नाही; त्याला क्षमा करण्यात येते. महाराज, याप्रमाणेच बांधिसत्व राजकुमारी चंद्रावतीला पाहताच तिच्यावर मन जडल्याने ते बेभान झाले आणि स्वतःला विसरून गेले होते. तिच्यावरील प्रेमामुळे मनास लागलेली उत्कंठा व विरहामुळे त्यांच्यावर वेड लागण्याची पाळी आली. अशा भटकलेल्या मनस्थितीत घाईघाईने त्यांनी अविचाराने महायज्ञ केला.*_

                *_"परंतु जेव्हा ती प्रेमाची नशा उतरली आणि मनस्थिती ठिकाणावर आली तेव्हा ते प्रव्रजित होऊन पाचही अभिज्ञाप्राप्त करून त्यांनी ब्रह्मलोकास गमन केले." "ठीक आहे._*

_भंते नागसेन, आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले."_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

*_२) लोमस काश्यप जातक-४३३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_22.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 21 December 2023

विहार बांधणे


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_विहार बांधणे_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_“भंते नागसेन, भगवंत म्हणतात- 'भिक्षूंनो, अतिस्नेहाने भय उत्पन्न होते, गृहस्थीमुळे आसक्ती निर्माण होते. तेव्हा अतिस्नेहही करू नका व गृहस्थी जीवनाचाही अवलंब करू नका. मुनी लोकांची हीच इच्छा असते.' तरी पण दुसऱ्या एक ठिकाणी असेही म्हटले आहे की, *'सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वज्जनांना आश्रय द्यावा.*_

_"भंते जर अतिस्नेहाने भय निर्माण होते, इत्यादी भगवंताचे वचन खरे असेल तर 'सुंदरसुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वज्जनांना आश्रय द्यावा.' ही त्यांचीच वाणी खोटी ठरते. आणि सुंदरसुंदर विहारांचे निर्माण करून त्यांत विद्वज्जनांना आश्रय द्यावा' ही त्यांची वाणी खरी मानावी तर 'अतीस्नेहाने भय निर्माण होते,' इत्यादी त्यांचेच वचन खोटे ठरते. हेसुद्धा एक कोडे आपणापुढे ठेवीत आहे, त्यात खरे काय आहे, ते स्पष्ट करून सांगावे.”_

_"महाराज, भगवंताने असे जे म्हटले की, 'अति स्नेहाने भय उत्पन्न होते. इत्यादी वचनांत आणि सुंदरसुंदर विहारांचे निर्माण करावे, इत्यादी तथागताच्या वचनांत पूर्णतः सत्यता आहे. त्यात काही एक दूसरे जोडण्याची आवश्यकता नाही. याबद्दल शंका घेण्याचे कारणच नाही. *पण हे भिखूंसाठी अत्यंत उपयुक्त, भिक्षूचर्येस योग्य व उचित असेच आहे.* महाराज, *जंगलात राहणारा मृग कोणत्याही प्रकारे घराचा आश्रय न घेता स्वच्छंदपणे विहार करतो. जेथे इच्छा झाली तेथेच सुखपूर्वक झोप घेतो. याप्रमाणेच स्वच्छंदपणे विहार करण्यासाठी, भयमुक्त व आसक्ती रहित जीवन यापन करण्यासाठी भिक्षूकरिता हे एकदम उपयुक्त आहे.*_

_"महाराज, भगवंतानी असे जे म्हटले आहे की, 'सुंदरसुंदर विहारांचे निर्माण करून त्यांत विद्वज्जनांच्या राहण्याची सोय करावी' यामागे भगवंताचे दोन दृष्टीकोन आहेत. ते असे-_ 

_*(१) विहार बांधून ते दान करण्याची सर्वच बुद्धांनी स्तुती केली आहे. त्यासाठी अनुमती देऊन मुक्तकंठाने त्यांची प्रशंसा केली आहे. पुण्यवृद्धीसाठी हे महान विस्तीर्ण असे कार्य आहे, असे म्हटले आहे. याप्रमाणे विहार बांधून ते भिक्षूंना दान केल्याने जन्मापासून, वृद्धत्वापासून, आजारापासून आणि मरणापासून त्या दात्याची सुटका होते. विहार दानाचे पहिले फळ होय.*याशिवाय_

_*(२) विहार बांधलेले असल्यामुळे भिक्षूंना निवाऱ्याचे स्थळ लाभते. भिक्षूंचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्यांना उपासक उपासिकांना सहजासहजी दर्शनाचा लाभ होतो. जर भिक्षूंना राहण्यासाठी कोठेही विहार बनले नसेल तर त्यांची भेट घेणेच अत्यंत कठीण होऊन जाईल. विहार बांधून ते भिक्षूंना दान करण्याचे हे दुसरे फळ होय.*_ 

_*हेच दोन दृष्टीकोन पुढे ठेवून भगवंतानी सांगितले की, 'सुंदरसुंदर विहार बांधून त्यात विद्वज्जनांना राहण्याची सोय करावी." पण याचा अर्थ असा समजू नये की, विहारास भिक्षू लोक आपले घर समजतील.”*_ 

_"ठीक आहे, भंते नागसेन, आपले म्हणणे मी मान्य करतो."_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २१/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_21.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 20 December 2023

धर्मोपदेश केल्यानंतर भोजन करू नये

              🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धर्मोपदेश केल्यानंतर भोजन करू नये_* 

                         *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

                 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  _"भंते नागसेन, *भगवंतानी सांगितले आहे की, आधी धर्मोपदेश करून तेथे भोजन करू नये.* 'हे ब्राह्मण, ज्ञानी लोक असे कधी नाही. *धर्मोपदेशांच्या मोबदल्यात काही घ्यावयास भगवान बुद्ध कधी आपले सहमत देत नाहीत.* हे ब्राह्मण धर्मानुसार आचरण करणाराचे असेच असते.' तथापि लोकांना धर्मोपदेश करीत असता सर्वप्रथम भूमिकेचा विस्तार करताता भगवान बुद्ध दानाचीच खूप प्रशंसा करीत असतात. त्यानंतरच शीलाविषयी काही उपदेश करतात. सर्व लोकेश्वर त्या भगवंताच्या उपदेशाने प्रभावित झालेले देवता आणि मनुष्य सर्वच खूप दान देतात. तेव्हा त्यांनी आणिलेले दान सर्व भिक्षू आनंदाने ग्रहण करतात._

           _"भंते *'धर्मोपदेश करून भोजन करू नये.' ह्या भगवंताच्या वचनात जर यथार्थ सत्य असेल, तर 'धर्मोपदेश करीत असता भगवंत सर्वप्रथम दानाची प्रशंसा करीत होते.' असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही. आणि जर 'धर्मोपदेशाची सुरवात सर्वप्रथम भगवंत दानाच्या प्रशंसेने करीत असतील तर धर्मोपदेश करून तेथे भोजन घेऊ नये, असे ते कधीच म्हणू शकत नाही. ते का, तर भंते, जो दानास खरोखरच पात्र आहे, तो जर श्रद्धावान गृहस्थासमोर दानाची प्रशंसा करू लागला तर ते आणखी अधिक दान देणारच. आणि ते दान जो ग्रहण करील ते त्या धर्मोपेशाचाच मोबदला ठरल्यावाचून कसे राहील? हा गुंतागुतीचाच प्रश्न आहे. कृपाकरून स्पष्ट करून सांगावे."_

           _"महाराज, *'धर्मोपदेश करून भोजन स्वीकारू नये का की, ज्ञानी लोक ते उचित मानीत नाहीत. धर्मोपदेश करावयाच्या मोबदल्यात काही घेण्याकरीता बुद्ध कधी संमती देत नाहीत. हे ब्राह्मण, धर्म विनयानुसार आचरण करणारे असेच वागतात.' असे भगवंत म्हणाले ते सत्य आहे. आणि हे सुद्धा सत्य आहे की, भगवंत उपदेश सुरु करीत असता सर्वप्रथम दानाची प्रशंसा करीत होते. असे करून ते प्रथम त्यांच्या चित्ताला प्रभावीत करीत असत व नंतरच शील पालनाचा उपदेश करीत असत. ही सर्व बुद्धापासून चालत आलेली परंपरा आहे.*_

            _"महाराज, लहान मुलास सर्वप्रथम एखादी बाहुली, विटी दांडू, बाबागाडी, चक्री, पेला, धनुष्य इ. खेळावयास देतात आणि इच्छेनुसार त्याजकडून कार्य करवून घेतात. *महाराज, याप्रमाणे सर्वप्रथम भगवान बुद्ध दानाची प्रशंसा करून श्रोत्यांचे चित्त आकर्षित करून घेऊन नंतरच शील पालन करावयाचा उपदेश देत असतात.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २०/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_20.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 19 December 2023

अहिंसेचा निग्रह

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_अहिंसेचा निग्रह_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  _“भते नागसेन, *भगवान बुद्धांनी असे म्हटले आहे की, 'कोणाचाही घातपात न करता आपसांत प्रेमपूर्वक मिळून, मिसळून, गोडीगुलाबीने रहावे.' याउलट असेही म्हटले आहे की, 'जो शिक्षेस पात्र असेल, त्यास शिक्षा द्यावी; जो सहकार्य देण्यास योग्य असेल, त्यास सहकार्य द्यावे.' भंते, हातपाय कापणे, जीवे मारणे, कारागृहात टाकणे, हालहाल करून मारणे किंवा देशाबाहेर हाकलून लावणे, हाच ना शिक्षा देण्याचा अर्थ आहे ? तथागतांनी असा आदेश द्यायला नको होता; आणि ते देऊच शकत नाही. कारण त्यांनीच जर 'कोणाचाही घातपात न करता आपसात प्रेमपूर्वक मिळून मिसळून गोडीगुलाबीने रहावे.' असे म्हटले आहे. तेव्हा तेच तथागत असे म्हणूच शकत नाही की, 'जे शिक्षेस पात्र असतील, त्यास शिक्षा द्यावी. समजा त्यांनी शिक्षा देण्याचा आदेश दिला असेल तर त्यानी असे तरी म्हटले नसेल की, 'कोणाचाही घातपात न करता आपसात सलोख्याने रहावे.' हे सुद्धा कोंडीत टाकणारे असेच कोडे आहे. आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या कोड्याची आपण उकल करून द्यावी व विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा."*_

_"महाराज, *'कोणाचा घातपात न करता आपसांत सलोख्याने वागावे,' असे जे तथागतांनी म्हटले आहे ते योग्यच आहे. शिवाय 'शिक्षेस पात्र असतील, त्यांस शिक्षा द्यावी आणि सहकार्यास पात्र असतील त्यांस सहकार्य द्यावे.' असा ममतेने दिलेला सल्ला देखील अनाठाई नव्हे. तर योग्यच आहे. महाराज, आजपर्यंत सर्व बुद्धांनी असाच सल्ला दिला आहे. याच विधानातून धर्म काय आहे व धर्मोपदेश कसा करावा, ते समजून येते. कोणालाही अपाय न करता अहिंसेने वागण्याची शिक्षा देतो, हेच तर तथागतांच्या धर्माचे मुख्य लक्षण आहे.झ बुद्धांची ही स्वाभाविक वचने होत. आणि महाराज, *त्यांनी 'शिक्षेस पात्र असतील त्यांना शिक्षा द्यावी,' असे जे म्हटले आहे. त्याचा वेगळाच अर्थ आहे. तो म्हणजे उद्धट चित्ताचे दमन करावे, शांत पावलेल्या चित्ताची जोपासना करावी, वाईट विचारांचे दमन करावे, चांगल्या विचारांची जोपासना करावी, मनाचा कलुषितपणा काढून टाकावा व त्यास शुद्ध ठेवण्यांची शिकस्त करावी. खोट्या सिद्धांताच्या आहारी कधी जाऊ नये, खऱ्या धर्म सिद्धांतापासून कधी पाठ फिरवू नयें वाईट संगतीचा त्याग करावा आणि सन्मार्गी विद्वानांची संगत धरावी. चोरांचे दमन करावे आणि सज्जनांचे रक्षण करावे, हा याचा खरा अर्थ आहे."*_

_“भंते नागसेन, हं आता तुम्ही माझ्या सापळ्यात पूर्णतः सांपडलेत, मला जे विचारावयाचे होते, त्याचा अर्थ आता आपोआपच बाहेर आला. भंते, चोरांचे दमन करावे हे तर ठीक आहे पण ते कोणत्या प्रकारे ?"_

_*"महाराज, चोराला धमकी देणे उचित असेल तर धमकी द्यावी. शिक्षा करणे उचित असेल तर त्यास शिक्षा करावी. देशातून हाकलून देणे योग्य असेल तर देशा- बाहेर हाकलून द्यावे आणि एवढेच नव्हे तर त्यास फाशी देणे योग्य असेल तर फाशी सुद्धा द्यावी."*_

*_“भंते, पण फाशी देण्यासारखी कृती बौद्ध धर्माच्या सिद्धांताला अनुकूल आहे काय ?”_*

_-"नाही महाराज !”_

_“तर मग बौद्ध धर्माच्या सिद्धांताला अनुकूल ठरेल त्यासाठी चोरांचे कसे दमन करावे ?_

*_"महाराज चोरांना जी शिक्षा दिली जाते ती बुद्धधर्माचा आदेश आहे म्हणून नव्हे, तर त्याच्या स्वतःच्याच वाईट कृत्यामुळे होय. महाराज, कोणत्याही बुद्धिमान निरपराधी रस्त्याने जाणाऱ्या माणसांना पकडून ठार करा, असा आदेश बुद्धधर्म देतो काय ?”_*

_"मुळीच नाही भंते !”_

_"का नाही ?"_

_"का की, त्याने कोणताही अपराध केला नाही."_

_*“त्याचप्रमाणे महाराज, चोरांना जी शिक्षा केली जाते ती, बुद्ध धर्माचा आदेश आहे म्हणून नव्हे तर त्याच्या स्वतःच्याच वाईट कृत्यामुळे होत. यात बुद्ध धर्माचा काय दोष ?"*_

*_"नाही भंते ! आम्हाला पाहण्यात येते की, भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण सर्वथा उपयुक्त व कल्याणकारी अशीच आहे. भंते, आपण सांगितले ते योग्य असेच आहे. हेच मला कळून आले._"

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 18 December 2023

बुद्ध धर्माचा काळ

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_बुद्ध धर्माचा काळ_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                _'भंते नागसेन, *भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, 'आनंद' माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील'. तसेच सुभद्राने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापरिनिर्वाणापूर्वी असेही सांगितले की, 'सुभद्र, भिक्षु लोक जर धर्मनियमानुसार आचरण करीत राहिले, तर या जगात अर्हंतांची कधी कमी पडणार नाही.'* हे विधान सर्व ठिकाणी लागू पडणारे आहे. हे विधान खोटे ठरविण्यास कोठेही पुरावा असा सापडत नाही, यावर कोणत्याच प्रकारे आक्षेप घेता येण्यासारखा नाही. तथापि, *'हे आनंद, माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंत सुस्थितीत राहिल', भगवान बुद्धाचे हे वचन जर खरे मानावे तर, 'हा संसार अर्हताशिवाय कधी खाली राहणार नाही', नाही', हे वचन एकदम खोटे ठरते, आणि हा संसार अर्हतावाचून कधी खाली राहणार नाही', हे वचन खरे मानावे तर हे आनंद, माझा धर्म पाचशे वर्षेपर्यतच सुस्थितीत राहील', असे भगवान बुद्धाने केलेले कथन खोटे पडते.*_

_"भंते, हाही प्रश्न अत्यंत कोड्यात टाकणारा आहे. अत्यंत गूढ, जबर आणि किचकट आहे. म्हणूनच मी आपल्या कानावर घातला आहे. जसे सागरातील मगर दाखवावा तद्वतच येथे आपण आपल्या ज्ञानशक्तीचा प्रताप दाखवावा."_

_“महाराज, *भगवान बुद्धांनी वर सांगितलेली दोन्ही विधाने यथार्थ आहेत. परंतु भगवान बुद्धाने वेगवेगळ्या प्रसंगी केलेले कथन त्यांतील भाव आणि अर्थाच्या दृष्टीने वेगवेगळे असतात. त्यांतील एक बुद्ध धर्माचे शासन किती दिवसपर्यंत राहील, याकडे निर्देश करतो, तर दुसरे धर्माचे फळ नेहमी एकसारखे कसे मिळते; म्हणजे आचरणासंबंधीचा निर्देश करतो.* ज्याप्रमाणे जमीन व आकाश यांतीत फरक, स्वर्ग व नरक यांतील फरक, पाप व पुण्य बांतील फरक आणि सुख व दुख यांतील फरक आहे, त्याप्रमाणे ह्या दोन्ही विधानांतील फरक आहे. वरील *दोन्ही विधानांचे स्वरूप एक दुसऱ्यापासून अगदीच भिन्न आहे.* तरी पण आपण विचारलेला प्रश्न व्यर्थ जाऊ नये म्हणून मी यामधील मूलभूत संबंध कशाप्रकारचा आहे, यावर विशेष विवेचन करणार आहे._

_“महाराज, *'माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंतच सुस्थितीत राहील', असे जे भगवान बुद्धांनी सांगितले, ते केवळ धर्म शासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते. जसे- इतक्या वर्षानंतर धर्माचा लोप होईल असा त्याचा अर्थ होता. कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की 'आनंद, भिक्षु संघात जर स्त्रियांना प्रव्रजित केले नाही, तर माझा धर्म एक हजार वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील; परंतु त्या प्रब्रजित झाल्याने केवळ पाचशे वर्षेपर्यतच राहण्याची शक्यता आहे."*_

_"आता तुम्हीच सांगा की, अशाप्रकारे भगवान बुद्धाला धर्मशासन टिकून राहण्याचा काळ दर्शविण्याचे होते की, धर्म वाईट म्हणून त्याची निंदा करावयाची होती ?_

_"नाहीं भंते, त्यांना धर्माची निंदा करावयाची नव्हती."_

*_"महाराज धर्म लोप पावण्याचा तो एक इशारा मात्र होता. म्हणजे धर्म-शासनास कोणत्या गोष्टींचे भय आहे, ते त्यांनी सांगितले आहे. जर सावध राहिले नाही तर जे आहे ते आणखी किती काळ टिकू शकेल, हेच त्यांना सांगावयाचे होते._"

_ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचे उत्पन्न अधिक प्रमाणांत घटले असता, आपल्या जवळ आता किती शिल्लक आहे व तो आणखी किती दिवस चालेल हे जसे त्यांनी इतर लोकांना सांगावे, तसेच केवळ धर्म शासन एवढ्याच प्रयत्नावर किती काळ टिकून राहू शकेल, याप्रमाणे *धर्माची मर्यादा भगवान बुद्धास सांगावयाची होती, जेणेकरून ते पुढे सावध राहतील.* तथापि आपल्या महापरिनिर्वाणापूर्णी सुभद्र नामक परिव्राजकास आपल्या श्रमणांची (भिक्षूची) प्रशंसा करीत असता भगवान बुद्ध म्हणाले होते की-_

_"हे सुभद्र, *भिक्षु लोक जर धर्मानुसार आचरण करीत राहिले, तर हा संसार अर्हतावाचून कधी खाली राहणार नाही.' यात धर्माचरणाच्या प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितले आहे. म्हणजे धर्म कशावर अवलंबून आहे, हे या दुसऱ्या विद्यानात सांगितले आहे."*_

_"एखादी वस्तू टिकण्याचा काळ आणि तिच्या स्वरूपाचे वर्णन, ह्या दोन्ही बाबींची भेसळ करून तुम्ही अधिक प्रश्नाला गंभीर करून टाकले, परंतु आपण विचारीतच आहात, त्याअर्थी या दोन्हीबाबींचा काय संबंध आहे ते मी अधिक विस्ताराने सांगणार आहे आपण लक्षपूर्वक व विश्वासाने नीट ऐकावे."_

*१-* _"समजा स्वच्छ व शीतल पाण्याने भरलेला एक तलाव आहे. त्याच्या सभोवार सुंदर घाट वजा तटबंदी (पार) आहे. त्याचे क्षेत्र मर्यादित असून सतंत धार पाऊस येतच आहे, आता तुम्हीच सांगा अशा स्थितीत त्या तलावाचे पाणी कामी होईल किंवा संपेल काय ?"_

_"नाही भंते, हे कसे शक्य आहे"_

_"ते का बरे ?"_

_"का की, सतत मुसळधार पाऊस पडत आहे."_

_"त्याचप्रमाणे महाराज, *भगवान बुद्धाने उपदेश केलेला सद्धर्म हा सुद्धा एका तलावाप्रमाणेच आहे. शुद्ध जीवनाच्या विनय, सदाचार आणि नीतीच्या पाण्याने तो तुडूंब भरलेला आहे. याचे पाणी सतत स्वर्गापेक्षा ऊंच अशा लाटांनी ओसंडून वहात असते. यात जर बुद्धानुयायी कर्तव्य (विनय) पालन, सदाचार (शील), पुण्य आणि पावित्र्य यांची संततधार वृष्टी करीत राहिले, तर हा सद्धर्मरूपी तलाव प्रदीर्घ काळ टिकून राहील. तेव्हा संसार अर्हतावाचून कधीही ओस पडणार नाही. 'हे सुभद्र, भिक्षु लोक जर चांगल्याप्रकारे धर्माचे आचरण करीत राहिले तर संसारात अर्हतांचा कधीच तुटवडा पडणार नाही.' याप्रमाणे भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे._

*२-* _"लोक जर एखाद्या ज्वालामय धुनीत गोवऱ्या, वाळलेली लाकडे आणि वाळलेली पाने टाकू लागले तर अशाने तो धुनीतील अग्नी विझेल काय ?"_

_"नाही भंते, अशाने तो आणखी उफाळून पेटू लागेल व त्याच्या ज्वाला अधिकच भडकतील."_

_“बरोबर. त्याचप्रमाणे *शुद्ध जीवनाचे नियम आणि सदाचाराचे पालन सदोदित करीत राहिल्यास या दहा हजार लोकधातू पेक्षाही ऊंच भगवान बुद्धाच्या सद्धर्माच्या ज्वाला सतत उठत राहतील. महाराज, याशियाय जर भगवान बुद्धाचे बुद्धपुत्र (अनुयायी) दृढनिश्चयाने, शौर्याने, चिंतनात तत्पर होऊन ध्यान सुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेत. अधिशील शिकवण, अधिचित शिकवण आणि अधिप्रज्ञा शिकवण या तिन्ही प्रकारच्या शिकवणींचे पालन करीत असता स्वतःवर पूर्णतःसंयम बाळगीत राहिले तर बुद्ध शासन अधिक काळपर्यंत चिरस्थायी होऊन प्रभावी बनल्यावाचून राहाणार नाही. तेव्हा या संसारात कधीच अर्हतांचा तुटवडा पडणार नाही.* महाराज, भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे._

*३-* _“समजा एखाद्या स्वच्छ, सुंदर, चांगल्यारीतीने साफ गळगुळीत आणि चमकदार आरशाला जर कोणी एकदम बारीक वस्त्रगाळ गेरूच्या चुर्णाने वेळोवेळी पुसून - चोळून साफ करीत राहिले तर त्यावर धुळीचे डाग पडून घाण पसरेल काय ?"_

_"नाही भंते, असे केल्याने तो तर अधिकच चमकदार होईल."_

_“याप्रमाणेच *भगवान बुद्धाचा धर्म स्वतःच क्लेशरूपी समस्त मळ नाश पावल्याने अगदी निर्मळ आहे. तरीपण बुद्धपुत्र (अनुयायी) त्याला आपल्या जीवनाच्या पावित्र्यांचे विनय, शील इत्यादी सद्‌गुण चुर्णाने आणखी स्वच्छ करीत राहिले, तर तो अनेक वर्षेपर्यंत स्थिर राहू शकेल. त्यामुळे संसार अर्हतांचून कधी ओस पडणार नाही.* महाराज, *याच उद्देशाने भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितले की, 'सुभद्र, भिक्षूलोक जर धर्मानुसार आपले पवित्र आचरण राखण्यास प्रयत्नशील राहिलेत तर, संसार कधीही अर्हतावाचून ओस पडणार नाही. महाराज, धर्माची मुळे चारित्र्यात आहेत; आणि जोपर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही, तोपर्यंत भगवान बुद्धाच्या धर्माचा कधीही लोप होणार नाही.* महाराज, *यासाठी निष्ठापूर्वक कसून धर्माचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यासात व आचरणातच बुद्ध धर्माचे मूळ सार आहे आणि अभ्यासाच्याच अधिष्ठानावर तो पूर्णतः टिकून आहे."*_ 

_“भंते, नागसेन, "आपण सद्धर्माच्या लोपासंबंधी उल्लेख करता तेव्हा त्याचे कारण काय ?"*_

_“महाराज, "कोणत्याही धर्माचा लोप होण्याची तीन कारणे आहेत.* ती म्हणजे_ 

*_अ) धर्मज्ञानाचा खरोखर अभिप्राय काय, याचा विसर पडल्यामुळे व त्यासाठी योग्य प्रयत्नांचा अभाव,_* 

_*ब) कोणीही धर्मानुसार आचरण करीत नसतील तर धर्माचरणाचा हास होतो* आणि_ 

*_क) त्यांची सर्व चिन्हे. लोप पावल्यामुळे. धर्मज्ञानाचा खरा अभिप्राय काय, याचा विसर पडल्यामुळे त्यानुसार आचरण करणारास देखील त्याचा योग्य बोध होत नाही._* 

_*धर्मानुसार कोणीही आचरण करीत नसल्यामुळे धर्माचा लोप होतो. कारण धर्म हा आचरणात आहे, अशा स्थितीत फक्त त्याची चिन्हे मात्र शिल्लक राहतात, आणि जेव्हा क्रमाक्रमाने ही चिन्हे देखील सर्वथा लोप पावतात, तेव्हा थोडाफार उरलेला धर्मसुद्धा पूर्णतः लोप पावतो."*_

_"भंते नागसेन, आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले. बुद्धिभ्रंश करणारा हा प्रश्न, परंतु अत्यंत सफाईने त्याचा उलगडा करून दिला. गुंतलेले धागे कापून काढलेत. धर्म विरोधकांच्या युक्तीवादाचे एकदम निर्मूलन करून त्यांना निस्तेज केले. आपण खरोखरच सर्व गणाचार्यात सर्वश्रेष्ठ आहात._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_18.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 17 December 2023

कर्माची प्रधानता

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_कर्माची प्रधानता_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_राजा म्हणाला, "भंते, डोळे, कान, नाक, जीभ व त्त्वचा ही पाच आयतने निरनिराळ्या कर्म फळामुळे उत्पन्न झालीत की, एकाच कर्मफळामुळे उत्पन्न झालीत?”_

*_"महाराज, अनेक कर्मफळामुळे झालीत, एका कर्मफळामुळे नव्हे."_*

*_“महाराज, समजा एखाद्या शेतामध्ये पाच प्रकारचे बीज पेरले, तर त्या विविध बीजांची फळे देखील विविध प्रकारची नाही का होणार ?"_*

_"होय भंते, विविध प्रकारच्या बीजांची फळे देखील विविध प्रकारचीच होतील. "_

*_“महाराज, याप्रमाणेच या पाच आयतनांची उत्पत्ती म्हणजे वेगवेगळ्या कर्माची फळे आहेत, एकाचीच नाहीत."_"

*_कर्माची प्रधानता_*

_राजा म्हणाला, *“भंते, सर्व मनुष्य सारखेच का होत नाहीत ? कोणी अल्पायुषी तर दीर्घायुषी; कोणी आजारी आहेत तर कोणी एकदम आरोग्यसंपन्न; कोणी कुरुप तर कोणी फारच सुंदर; कोणी एकदम प्रभावहीन तर कोणी अत्यंत प्रभावशाली; कोणी दरिद्री तर कोणी खूप श्रीमंत; कोणी हलक्या जातीत जन्मले तर कोणी उच्च कुळात जन्मलेले; कोणी मूर्ख तर कोणी अतिशय हुशार, असे का व्हावे ?"*_

_स्थविर म्हणाले, “सर्वच वनस्पती एकसारख्या नाहीत, असे का ? काही आंबट, काही खारट, काही तिखट, काही कडू, काही तुरट आणि काही तर अत्यंत गोड असतात, असे का बर व्हावे ?"_

_“भंते, बीजात भिन्नत्व असल्यामुळेच या वनस्पतींच्या चवीत भिन्नत्व दिसून येत असले पाहिजे, असा माझा अंदाज आहे."_

_*“महाराज, बरोबर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनुष्यमात्राचे आपापले कर्म वेगवेगळे असल्याकारणानेच ते सर्व एकसारखे नाहीत. कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी.... असे पहाण्यात येतात. महाराज, खुद्द भगवान बुद्धानेच म्हटले आहे की, हे मानव जीव सर्वच आपल्या कर्माचीच फळे भोगत असतात. सर्व जीव आपल्या कर्मफळाचे स्वतः मालक आहेत. आपल्या कर्मफळानुसारच भिन्न भिन्न योनीत जन्मास येतात. कर्म हेच खरे नातेवाईक व कर्म हेच आश्रयस्थानआहेत. कर्मामुळेच मनुष्य- मात्राची अशी विभागणी झाली आहे."*_

_*"भंते, आपण बरोबर सांगितले."*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १७/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न, खंड ३ प्रकरण पाहिले (ख) विमतिच्छेदन प्रश्न_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_17.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 16 December 2023

आमच्यात आत्मा नाही

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_आमच्यात आत्मा नाही_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*राजा म्हणाला, "भंते, 'आत्मा' म्हणून जाणणारा असा कोणी आहे काय?”*_ 

_“महाराज, हा जाणणारा कोण ?"_

_“भंते, ज्याप्रमाणे आम्ही येथे राजवाड्यात बसून इच्छेनुसार पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण इत्यादी बाजूच्या खिडकी मधून बाहेरचे दृष्य पाहू शकतो, त्याच प्रमाणे मनुष्याच्या शरीरात राहून डोळ्याद्वारे रूपे पाहतो, कानाद्वारे शब्द ऐकतो, नाकाद्वारे सुगंधाचा उपभोग घेतो, जीभेद्वारा आस्वाद घेतो, कातडींद्वारे स्पर्शाचा उपयोग घेतो आणि मनाद्वारे अनुभव करतो, असा जाणणारा (ज्ञाता) तो आत्मा."_

*_स्थविर म्हणाले, "महाराज, पाच दरवाजे कोणते ते मी सांगेन, तेव्हा आपण शांत चित्ताने ऐका."_*

*_“महाराज, आपण या राजवाड्यात बसून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण कोणत्याही खिडकीतून बाहेरील दृष्य पाहू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या शरीरात वास्तव्य करून बसलेला जीव, (आत्मा) डोळे, कान इत्यादी सर्व इंद्रियांद्वारे रूप पाहण्याची, शब्द ऐकण्याची, सुगंध घेण्याची, रसांचा आस्वाद घेण्याची, स्पर्श करण्याची म्हणजे डोळ्याने ऐकण्याची किवा कानाने पाहण्याची एकूण कोणत्याही इंद्रियाने कोणतेही कार्य करण्याची शिकस्त करीत असला पाहिजे, एवढे सामर्थ्य तर त्यास असावेच"_*

_"नाही भंते, असे कोणतेच सामर्थ्य त्यात नाही."_

_"महाराज, यावरून आपल्या प्रथम बोलण्याचा नंतरच्या बोलण्याशी व नंतरच्या बोलण्याचा प्रथम बोललेल्या वाक्याशी मुळीच तारतम्य जुळत नाही."_

_"महाराज, या सर्व खिडक्या उघडल्या असता येथे बसल्या बसल्याच बाहेरील सर्व दृष्यं म्हणजे ती झाडे, ती घरे, ते महाल पाहू शकतो. त्याचप्रमाणे *आमच्या शरीरात बसणारा आत्मा डोळेरूपी खिडकी उघडली असता म्हणजे डोळे एकदम काढून टाकले असता बाहेरील आकाश अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतो काय ?* कान, नाक, जीभ आणि त्वचारूपी सर्व खिडक्या एकदम उघडल्या असता आवाज ऐकण्याचे, सुगंध घेण्याचे, रसांचा आस्वाद घेण्याचे आणि स्पर्श करण्याचे कार्य शरीराबाहेर येऊन अधिक चांगल्याप्रकारे करीत असेल. कारण या राजवाड्याबाहेर अगदी खुल्या जागेत उभे राहून आपण बाहेरील सर्व दृष्य अधिक स्पष्टपणे पाहतोच की नाही ?"_

*_"नाही भंते, जीवा (आत्म्या) कडून हे होणे शक्य नाही."_*

_"महाराज, समजा, आपल्या हा दिन्न नामक सेनापती बाहेर जाऊन दरवाजा पाशी जर उभा राहिला तर याची जाणीव आपणास होणार नाही काय ?"_

_"होय भंते, अवश्य जाणीव होईल."_

_"महाराज, याप्रमाणे जीभेवर ठेवलेल्या बाहेरील वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा, आंबटपणा, तिखटपणा, कडूपणा व गोडपणा इत्यादींची जाणीव आपल्यामधील आत्म्यास होईल की, नाही ?"_

_"होय भंते, आवश्य होईल."_

_*"तद्वतच त्या रसाची चव तोंडातून पोटात (आत) गेली, तर त्या वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा, आंबटपणा, कडूपणा व गोडपणा इत्यादींची जाणीव आपल्या मधील आत्म्यास होईल की नाही ?"*_

*_"नाही भंते, या चवीची जाणीव त्यास मुळीच होणार नाही."_*

_“महाराज, समजा एखाद्या माणसाने शंभर घागरी मध मागवून एका रांजणात भरून ठेवला, यानंतर दुसऱ्या एका मनुष्याचे तोंड चांगले घट्ट बांधून त्यास त्या रांजणात सोडले, तर तो मनुष्य आपणास ज्या पदार्थाने भरलेल्या रांजणात सोडले त्या पदार्थाची चव, गोड, आहे की नाही, हे तो सांगू शकेल काय ?”_

_"नाही भंते, याची त्यास जाणीव होणार नाही."_

_"ते का बरे ?”_

_*"कारण मध त्या माणसाच्या तोंडात गेलाच नाही तेव्हा त्यास जाणीव व्हावी ती कशी !"*_

*_"महाराज, तर मग आपण प्रथम केलेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी व नंतर केलेल्या कथनाचा प्रथम केलेल्या कथनाशी मुळीच मेळ बसत नाही."_*

_“भंते, आपणासारख्या वादपटू पंडिताशी वादविवाद करावयास मी असमर्थ आहे. तेव्हा यातील खरी बाब काय आहे ते आपणच कृपाकरून सांगावे."_

*_यावर स्थविर म्हणाले, "महाराज, चक्षु व रूप यांच्या संयोगाने चक्षु विज्ञान (दृष्टी) उत्पन्न होते. यानंतर स्पर्श, सवेदना, संज्ञा, चेतना आणि एकाग्रता (ठाम निश्चय) एका मागे एक उत्पन्न होतात. दुसऱ्या इंद्रियासंबंधाने सुद्धा असेच घडते. एक उद्भवले की, त्यामागोमाग दुसरे अशी कारण व परिणामांची साखळी चालूच असते. यात ज्ञाता असलेला आत्मा असण्याचे काहीच कारण नाही."_*

*_"भंते, आपण उत्तरे देण्यात अत्यंत पटाईत आहात ? एवढा गुंतागुंतीचा प्रश्न पण उत्तम रीतीने समजावून सांगितला."_*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १७/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_95.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

श्रेष्ठ दानाचे विश्लेषण

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_श्रेष्ठ दानाचे विश्लेषण_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_एकदा 'भगवानांनी आपल्या एका पूर्व-जन्मातील गोष्ट सांगताना म्हटले- *तेव्हा ते बोधिसत्व होते, बुद्ध बनले नव्हते. अनेक जन्मांपर्यंत बोधिसत्वाचे जीवन जगत-जगत, आपल्या दहा पारमितांना पूर्ण करत-करतच कोणी बुद्ध बनतो, सम्यक संबुद्ध बनतो.*_

           _*दानाचीही एक खूप मोठी पारमी असते.* त्यांनी सांगितले की कोणत्या एका जीवनात ते खूप मोठ्या देशाचे राजा होते. *चित्तामध्ये दानाची चेतना जागली तेव्हा जितका राज्यकोष होता, जितके काही त्यांच्याजवळ होते, ते दान करणे सुरू केले.* हजारो, लाखो लोकांना दान दिले. सात वर्षांपर्यंत सतत दानाचा कार्यक्रम चालतच राहिला. अन्नाचे दान, वस्त्रांचे दान, औषधांचे, वाहनांचे आणि निवासस्थानांचे दान दिले. लोकांच्या ज्या-ज्या सांसारिक गरजा होत्या त्या सर्व गोष्टींची पूर्तता केली गेली. कोणा व्यक्तीला कोणत्या सांसारिक गोष्टींची कमतरता पडू दिली नाही. अशी सात वर्षे खूप दान दिले. *इतके पुण्यशाली तसेच पारमी वाढविणारे दान देखील जर कोणा एका स्रोतापन्न व्यक्तीला एक वेळेचे भोजन दिले, तर ते एका वेळेचे भोजन-दान त्यापेक्षा कितीतरी अधिक पुण्यशाली होते. म्हणजे, पात्र कसे आहे? कुठे बीज रोपले गेले आपल्या पुण्य-कर्माचे ? जमिन सुपीक असेल तर फळ अधिक चांगले येईल.*_

_*तो स्रोतापन्न व्यक्ती जो साधना करत-करत, शील, समाधी, प्रज्ञेमध्ये पुष्ट होत-होत अनार्यापासून आर्य बनला, ज्याने पहिल्यांदा निर्वाणाचा साक्षात्कार केला, मुक्तीच्या चार पायऱ्यांपैकी पहिल्या पायरीपर्यंत पोहोचला. धर्मपथाचा पहिला सोपान प्राप्त केला. असा स्रोतापन्न झालेला व्यक्ती मुक्तीच्या स्रोतात पड़ला.*_ 

_*प्रत्येक दानाचा लाभ होतच असतो,* पण कोणाला दान द्यावे? तेव्हा सांगितले की त्या वेळी धरतीवर कोणी स्रोतापन्न नव्हतेच, कारण विपश्यना नव्हती. कारण लोकांजवळ निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी कोणते तंत्रच नव्हते. अशा परिस्थितीत जे होते त्यांनाच दान दिले गेले. पण त्याच्या तुलनेत *एका स्रोतापन्न व्यक्तीला केवळ एका वेळेचे भोजन दिले गेले तर ते त्याहूनही अधिक लाभदायक होते.*_

_असे का होते, हे समजून घेऊ ! *कोणत्याही प्राण्याला भोजन दिले तर त्याला आपण एक दिवसाचे जीवन आणखी देत आहोत. त्या भोजनाच्या बळावर त्याची जीवन-धारा अजून थोडी पुढे जाईल. पण कोणाला देत आहोत? एखादा कोणता हिंसक पशू आहे- समजा एखादा सिंह आहे, चित्ता आहे, आणि दुसरीकडे एक गाय आहे. एक दिवसाचे भोजन आपण दोघांना दिले. पण गायीला दिलेले भोजन अधिक पुण्यशाली का ? सिंह किंवा चित्त्याला एक दिवस अधिक जगवून तो इतर प्राण्यांना कष्टच देईल. गाय एक दिवस अधिक जगली तर इतर प्राण्यांना लाभच देईल. म्हणून, या दोन्हींच्या तुलनेने गायीला दिलेले एक दिवसाचे भोजन अधिक फलदायी आहे, अधिक कल्याणकारी आहे.*_ 

_असेच *गायीच्या तुलनेने एका सामान्य मनुष्याला दिलेले भोजन अधिक कल्याणकारी होईल, कारण मनुष्य आहे. पशुंच्या तुलनेत मनुष्याजवळ अशी शक्ती आहे की तो अंतर्मुखी, आत्ममुखी, सत्यमुखी होऊन आपल्या गाठी उलगडणे शिकला तर मुक्त होऊ शकतो. हे काम पशू करू शकत नाहीत. ती गाय जीवनभर जगूनही आपल्या स्वतःला मुक्त करू शकत नाही. तिला निसर्गाने ती शक्ती दिलेली नाही. या मनुष्याला जर आपण एक दिवस अजून जगवले तर कोण जाणे त्या एका दिवसात त्याचा शुद्ध धर्माशी संपर्क होऊन जाईल. त्याला असा विधी मिळून जाईल ज्यामुळे तो आत्ममुखी होऊन आपल्या गाठी उलगडून टाकेल. या दोघांच्या तुलनेत त्या व्यक्तीला दिलेले भोजन अधिक कल्याणकारी आहे.*_

_एक सामान्य व्यक्ती ज्याला धर्माचा मार्ग मिळाला नाही, सारे जीवन दुराचाराचेच जीवन जगतो, त्याच्या तुलनेने एक व्यक्ती जो सदाचाराचे जीवन जगत आहे, धर्माच्या मार्गाला लागलेला आहे. या दोघांमधून जर भोजनाचे दान त्या सदाचारीला दिले तर त्याला दिलेले भोजनाचे दान अधिक कल्याणकारी आहे ते यासाठी की त्याचे एक दिवसही अधिक जगणे त्याला सन्मार्गाकडे घेऊन जाण्यात सहायता करेल. आणि खरोखरच तो धर्माच्या मार्गावर पुढे जात जात मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू शकेल. खूप मोठा लाभ मिळेल त्याचा, कारण तो सन्मार्गावर म्हणजे, धर्माच्या मार्गावर चालणारा व्यक्ती आहे._

_परंतु *अजूनपर्यंत ज्याला निर्वाणाचा साक्षात्कार झालेला नाही, त्याच्या तुलनेत ज्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला आहे, त्याला एका दिवसाचे भोजन दिले तर ते अधिक पुण्यशाली आहे. कारण तो व्यक्ती एक दिवस अधिक जगून केवळ आपलेच कल्याण करत नाही, तर आता जे तरंग निर्माण करत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासाबरोबर त्याच्यात जे तरंग निर्माण होत आहेत, ते आसपासच्या साऱ्या वातावरणाला धर्माच्या तरंगांनी भरून टाकतील. न जाणे कित्येक लोकांच्या कल्याणाचे कारण बनून जातील.*_ 

*_म्हणूनच म्हटले की इतक्या लोकांना जे मी दान दिले त्याच्या तुलनेने एका - स्रोतापन्न व्यक्तीला, केवळ एका वेळेच्या भोजनाचे दान दिले तर ते कित्येक पटींनी अधिक कल्याणकारी होईल, अधिक पुण्यशाली होईल._*

_त्याचप्रमाणे *अनेक स्रोतापन्न व्यक्तींना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका सकदागामी व्यक्तीला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल, कितीतरी अधिक बलशाली होईल. अनेक सकदागामिंना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका अनागामीला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल. अनेक अनागार्मिना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका अरहंताला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल. अनेक अरहंतांना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात सम्यक संबुद्धांना दिलेले भोजन कित्येक पटींनी अधिक, खूप अधिक कल्याणकारी होईल. कोणा सम्यक संबुद्धांना भोजन दिले आणि त्याच्या मुकाबल्यात तप करणाऱ्या संघाला भोजन दान दिले, तर सम्यक संबुद्धांना दिलेल्या भोजनापेक्षाही ते अधिक कल्याणकारी झाले. आणि पुन्हा म्हटले, कितीही मोठ्या तप करणाऱ्या संघाला भोजन-दान देऊन, कितीही मोठे पुण्य अर्जित केले तरीही, त्याच्या मुकाबल्यात साधना करणाऱ्यांसाठी जर कोणी सुविधा बनवून दिल्या, कोणी शून्यागार बनवून दिले, ज्याच्यात बसून कोणी व्यक्ती तप करून आपल्या मुक्तीचा मार्ग शोधू शकतो तेव्हा त्या साऱ्या पुण्यापेक्षाही हे महान सर्वोच्च पुण्य अधिक कल्याणकारी आहे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १६/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) विपश्यना साधक" बुद्धवर्ष २५६६, चैत्र पौर्णिमा, ६ एप्रिल, २०२३ वर्ष ७ अंक १_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_16.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 13 December 2023

आठ - विमुक्तती

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अट्ठ विमोक्खा_*

*_आठ- विमुक्तती_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_"आनंद ! आठ मुक्तता आहेत, आठ स्वातंत्र्ये आहेत, ती आठ कोणती?_

_*१. "जो सौंदर्यांत सौंदर्य पाहतो हे प्रथम स्वातंत्र्य आहे."*_

*_२. "जो शरिराच्या आत कोणतेही रूप नाही समजून, जो बाहेरील रूप ओळखतो ही दुसरी मुक्तता होय."_*

*_३. "शुभ्र पांढरे सर्व अगोदर विमुक्त असते ही तिसरी सुंदरता."_*

*_४. “सर्वसाधारणपणे सौंदर्याच्या विचारांना नाहीसे करून प्रतिकारांच्या विचारांपासून अलग राहून, विविध गोष्टीत मन घालतो; 'हे आकाश अनंत आहे' असा आकाशाचा विचार करीत जो राहतो, जीवन व्यतित करतो, ती चौथी मुक्तता होय."_*

*_५. "सर्व आकाशाचा विचार करीत असताना आकाशापेक्षा 'विज्ञान अनंत' आहे, असा जो विचार करतो ते पाचवे स्वातंत्र्य होय."_*

*_६. "विज्ञानानंतर काहीही नाही, असा विचार करीत जो जीवन जगतो, ते सहावे स्वातंत्र्य आहे."_*

*_७. "कशाचीही इच्छा नसलेल्या विचारांना ओलांडून मोकळ्या मनाने केलेला विहार हा सातवा विमुक्त आहे."_*

*_८. "जो नवे नाव धारण केलेल्यातून मुक्त होऊन त्याला जी अनुभूती, जो अनुभव मिळतो, त्या अनुभूतीत जो विहार करतो, त्या अनुभवात जो राहतो ते आठवे स्वातंत्र्य होय."_*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १३/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) महापरिनिब्बानसुत्त (मराठी अनुवादासह - संपादक आयु अरविंद भंडारे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_13.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...