🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बुद्ध धर्माचा काळ_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_'भंते नागसेन, *भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, 'आनंद' माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील'. तसेच सुभद्राने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापरिनिर्वाणापूर्वी असेही सांगितले की, 'सुभद्र, भिक्षु लोक जर धर्मनियमानुसार आचरण करीत राहिले, तर या जगात अर्हंतांची कधी कमी पडणार नाही.'* हे विधान सर्व ठिकाणी लागू पडणारे आहे. हे विधान खोटे ठरविण्यास कोठेही पुरावा असा सापडत नाही, यावर कोणत्याच प्रकारे आक्षेप घेता येण्यासारखा नाही. तथापि, *'हे आनंद, माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंत सुस्थितीत राहिल', भगवान बुद्धाचे हे वचन जर खरे मानावे तर, 'हा संसार अर्हताशिवाय कधी खाली राहणार नाही', नाही', हे वचन एकदम खोटे ठरते, आणि हा संसार अर्हतावाचून कधी खाली राहणार नाही', हे वचन खरे मानावे तर हे आनंद, माझा धर्म पाचशे वर्षेपर्यतच सुस्थितीत राहील', असे भगवान बुद्धाने केलेले कथन खोटे पडते.*_
_"भंते, हाही प्रश्न अत्यंत कोड्यात टाकणारा आहे. अत्यंत गूढ, जबर आणि किचकट आहे. म्हणूनच मी आपल्या कानावर घातला आहे. जसे सागरातील मगर दाखवावा तद्वतच येथे आपण आपल्या ज्ञानशक्तीचा प्रताप दाखवावा."_
_“महाराज, *भगवान बुद्धांनी वर सांगितलेली दोन्ही विधाने यथार्थ आहेत. परंतु भगवान बुद्धाने वेगवेगळ्या प्रसंगी केलेले कथन त्यांतील भाव आणि अर्थाच्या दृष्टीने वेगवेगळे असतात. त्यांतील एक बुद्ध धर्माचे शासन किती दिवसपर्यंत राहील, याकडे निर्देश करतो, तर दुसरे धर्माचे फळ नेहमी एकसारखे कसे मिळते; म्हणजे आचरणासंबंधीचा निर्देश करतो.* ज्याप्रमाणे जमीन व आकाश यांतीत फरक, स्वर्ग व नरक यांतील फरक, पाप व पुण्य बांतील फरक आणि सुख व दुख यांतील फरक आहे, त्याप्रमाणे ह्या दोन्ही विधानांतील फरक आहे. वरील *दोन्ही विधानांचे स्वरूप एक दुसऱ्यापासून अगदीच भिन्न आहे.* तरी पण आपण विचारलेला प्रश्न व्यर्थ जाऊ नये म्हणून मी यामधील मूलभूत संबंध कशाप्रकारचा आहे, यावर विशेष विवेचन करणार आहे._
_“महाराज, *'माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंतच सुस्थितीत राहील', असे जे भगवान बुद्धांनी सांगितले, ते केवळ धर्म शासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते. जसे- इतक्या वर्षानंतर धर्माचा लोप होईल असा त्याचा अर्थ होता. कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की 'आनंद, भिक्षु संघात जर स्त्रियांना प्रव्रजित केले नाही, तर माझा धर्म एक हजार वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील; परंतु त्या प्रब्रजित झाल्याने केवळ पाचशे वर्षेपर्यतच राहण्याची शक्यता आहे."*_
_"आता तुम्हीच सांगा की, अशाप्रकारे भगवान बुद्धाला धर्मशासन टिकून राहण्याचा काळ दर्शविण्याचे होते की, धर्म वाईट म्हणून त्याची निंदा करावयाची होती ?_
_"नाहीं भंते, त्यांना धर्माची निंदा करावयाची नव्हती."_
*_"महाराज धर्म लोप पावण्याचा तो एक इशारा मात्र होता. म्हणजे धर्म-शासनास कोणत्या गोष्टींचे भय आहे, ते त्यांनी सांगितले आहे. जर सावध राहिले नाही तर जे आहे ते आणखी किती काळ टिकू शकेल, हेच त्यांना सांगावयाचे होते._"
_ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचे उत्पन्न अधिक प्रमाणांत घटले असता, आपल्या जवळ आता किती शिल्लक आहे व तो आणखी किती दिवस चालेल हे जसे त्यांनी इतर लोकांना सांगावे, तसेच केवळ धर्म शासन एवढ्याच प्रयत्नावर किती काळ टिकून राहू शकेल, याप्रमाणे *धर्माची मर्यादा भगवान बुद्धास सांगावयाची होती, जेणेकरून ते पुढे सावध राहतील.* तथापि आपल्या महापरिनिर्वाणापूर्णी सुभद्र नामक परिव्राजकास आपल्या श्रमणांची (भिक्षूची) प्रशंसा करीत असता भगवान बुद्ध म्हणाले होते की-_
_"हे सुभद्र, *भिक्षु लोक जर धर्मानुसार आचरण करीत राहिले, तर हा संसार अर्हतावाचून कधी खाली राहणार नाही.' यात धर्माचरणाच्या प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितले आहे. म्हणजे धर्म कशावर अवलंबून आहे, हे या दुसऱ्या विद्यानात सांगितले आहे."*_
_"एखादी वस्तू टिकण्याचा काळ आणि तिच्या स्वरूपाचे वर्णन, ह्या दोन्ही बाबींची भेसळ करून तुम्ही अधिक प्रश्नाला गंभीर करून टाकले, परंतु आपण विचारीतच आहात, त्याअर्थी या दोन्हीबाबींचा काय संबंध आहे ते मी अधिक विस्ताराने सांगणार आहे आपण लक्षपूर्वक व विश्वासाने नीट ऐकावे."_
*१-* _"समजा स्वच्छ व शीतल पाण्याने भरलेला एक तलाव आहे. त्याच्या सभोवार सुंदर घाट वजा तटबंदी (पार) आहे. त्याचे क्षेत्र मर्यादित असून सतंत धार पाऊस येतच आहे, आता तुम्हीच सांगा अशा स्थितीत त्या तलावाचे पाणी कामी होईल किंवा संपेल काय ?"_
_"नाही भंते, हे कसे शक्य आहे"_
_"ते का बरे ?"_
_"का की, सतत मुसळधार पाऊस पडत आहे."_
_"त्याचप्रमाणे महाराज, *भगवान बुद्धाने उपदेश केलेला सद्धर्म हा सुद्धा एका तलावाप्रमाणेच आहे. शुद्ध जीवनाच्या विनय, सदाचार आणि नीतीच्या पाण्याने तो तुडूंब भरलेला आहे. याचे पाणी सतत स्वर्गापेक्षा ऊंच अशा लाटांनी ओसंडून वहात असते. यात जर बुद्धानुयायी कर्तव्य (विनय) पालन, सदाचार (शील), पुण्य आणि पावित्र्य यांची संततधार वृष्टी करीत राहिले, तर हा सद्धर्मरूपी तलाव प्रदीर्घ काळ टिकून राहील. तेव्हा संसार अर्हतावाचून कधीही ओस पडणार नाही. 'हे सुभद्र, भिक्षु लोक जर चांगल्याप्रकारे धर्माचे आचरण करीत राहिले तर संसारात अर्हतांचा कधीच तुटवडा पडणार नाही.' याप्रमाणे भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे._
*२-* _"लोक जर एखाद्या ज्वालामय धुनीत गोवऱ्या, वाळलेली लाकडे आणि वाळलेली पाने टाकू लागले तर अशाने तो धुनीतील अग्नी विझेल काय ?"_
_"नाही भंते, अशाने तो आणखी उफाळून पेटू लागेल व त्याच्या ज्वाला अधिकच भडकतील."_
_“बरोबर. त्याचप्रमाणे *शुद्ध जीवनाचे नियम आणि सदाचाराचे पालन सदोदित करीत राहिल्यास या दहा हजार लोकधातू पेक्षाही ऊंच भगवान बुद्धाच्या सद्धर्माच्या ज्वाला सतत उठत राहतील. महाराज, याशियाय जर भगवान बुद्धाचे बुद्धपुत्र (अनुयायी) दृढनिश्चयाने, शौर्याने, चिंतनात तत्पर होऊन ध्यान सुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेत. अधिशील शिकवण, अधिचित शिकवण आणि अधिप्रज्ञा शिकवण या तिन्ही प्रकारच्या शिकवणींचे पालन करीत असता स्वतःवर पूर्णतःसंयम बाळगीत राहिले तर बुद्ध शासन अधिक काळपर्यंत चिरस्थायी होऊन प्रभावी बनल्यावाचून राहाणार नाही. तेव्हा या संसारात कधीच अर्हतांचा तुटवडा पडणार नाही.* महाराज, भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे._
*३-* _“समजा एखाद्या स्वच्छ, सुंदर, चांगल्यारीतीने साफ गळगुळीत आणि चमकदार आरशाला जर कोणी एकदम बारीक वस्त्रगाळ गेरूच्या चुर्णाने वेळोवेळी पुसून - चोळून साफ करीत राहिले तर त्यावर धुळीचे डाग पडून घाण पसरेल काय ?"_
_"नाही भंते, असे केल्याने तो तर अधिकच चमकदार होईल."_
_“याप्रमाणेच *भगवान बुद्धाचा धर्म स्वतःच क्लेशरूपी समस्त मळ नाश पावल्याने अगदी निर्मळ आहे. तरीपण बुद्धपुत्र (अनुयायी) त्याला आपल्या जीवनाच्या पावित्र्यांचे विनय, शील इत्यादी सद्गुण चुर्णाने आणखी स्वच्छ करीत राहिले, तर तो अनेक वर्षेपर्यंत स्थिर राहू शकेल. त्यामुळे संसार अर्हतांचून कधी ओस पडणार नाही.* महाराज, *याच उद्देशाने भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितले की, 'सुभद्र, भिक्षूलोक जर धर्मानुसार आपले पवित्र आचरण राखण्यास प्रयत्नशील राहिलेत तर, संसार कधीही अर्हतावाचून ओस पडणार नाही. महाराज, धर्माची मुळे चारित्र्यात आहेत; आणि जोपर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही, तोपर्यंत भगवान बुद्धाच्या धर्माचा कधीही लोप होणार नाही.* महाराज, *यासाठी निष्ठापूर्वक कसून धर्माचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यासात व आचरणातच बुद्ध धर्माचे मूळ सार आहे आणि अभ्यासाच्याच अधिष्ठानावर तो पूर्णतः टिकून आहे."*_
_“भंते, नागसेन, "आपण सद्धर्माच्या लोपासंबंधी उल्लेख करता तेव्हा त्याचे कारण काय ?"*_
_“महाराज, "कोणत्याही धर्माचा लोप होण्याची तीन कारणे आहेत.* ती म्हणजे_
*_अ) धर्मज्ञानाचा खरोखर अभिप्राय काय, याचा विसर पडल्यामुळे व त्यासाठी योग्य प्रयत्नांचा अभाव,_*
_*ब) कोणीही धर्मानुसार आचरण करीत नसतील तर धर्माचरणाचा हास होतो* आणि_
*_क) त्यांची सर्व चिन्हे. लोप पावल्यामुळे. धर्मज्ञानाचा खरा अभिप्राय काय, याचा विसर पडल्यामुळे त्यानुसार आचरण करणारास देखील त्याचा योग्य बोध होत नाही._*
_*धर्मानुसार कोणीही आचरण करीत नसल्यामुळे धर्माचा लोप होतो. कारण धर्म हा आचरणात आहे, अशा स्थितीत फक्त त्याची चिन्हे मात्र शिल्लक राहतात, आणि जेव्हा क्रमाक्रमाने ही चिन्हे देखील सर्वथा लोप पावतात, तेव्हा थोडाफार उरलेला धर्मसुद्धा पूर्णतः लोप पावतो."*_
_"भंते नागसेन, आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले. बुद्धिभ्रंश करणारा हा प्रश्न, परंतु अत्यंत सफाईने त्याचा उलगडा करून दिला. गुंतलेले धागे कापून काढलेत. धर्म विरोधकांच्या युक्तीवादाचे एकदम निर्मूलन करून त्यांना निस्तेज केले. आपण खरोखरच सर्व गणाचार्यात सर्वश्रेष्ठ आहात._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १९/१२/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) मिलिन्द प्रश्न_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_18.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼