🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_विहार बांधणे_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_“भंते नागसेन, भगवंत म्हणतात- 'भिक्षूंनो, अतिस्नेहाने भय उत्पन्न होते, गृहस्थीमुळे आसक्ती निर्माण होते. तेव्हा अतिस्नेहही करू नका व गृहस्थी जीवनाचाही अवलंब करू नका. मुनी लोकांची हीच इच्छा असते.' तरी पण दुसऱ्या एक ठिकाणी असेही म्हटले आहे की, *'सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वज्जनांना आश्रय द्यावा.*_
_"भंते जर अतिस्नेहाने भय निर्माण होते, इत्यादी भगवंताचे वचन खरे असेल तर 'सुंदरसुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वज्जनांना आश्रय द्यावा.' ही त्यांचीच वाणी खोटी ठरते. आणि सुंदरसुंदर विहारांचे निर्माण करून त्यांत विद्वज्जनांना आश्रय द्यावा' ही त्यांची वाणी खरी मानावी तर 'अतीस्नेहाने भय निर्माण होते,' इत्यादी त्यांचेच वचन खोटे ठरते. हेसुद्धा एक कोडे आपणापुढे ठेवीत आहे, त्यात खरे काय आहे, ते स्पष्ट करून सांगावे.”_
_"महाराज, भगवंताने असे जे म्हटले की, 'अति स्नेहाने भय उत्पन्न होते. इत्यादी वचनांत आणि सुंदरसुंदर विहारांचे निर्माण करावे, इत्यादी तथागताच्या वचनांत पूर्णतः सत्यता आहे. त्यात काही एक दूसरे जोडण्याची आवश्यकता नाही. याबद्दल शंका घेण्याचे कारणच नाही. *पण हे भिखूंसाठी अत्यंत उपयुक्त, भिक्षूचर्येस योग्य व उचित असेच आहे.* महाराज, *जंगलात राहणारा मृग कोणत्याही प्रकारे घराचा आश्रय न घेता स्वच्छंदपणे विहार करतो. जेथे इच्छा झाली तेथेच सुखपूर्वक झोप घेतो. याप्रमाणेच स्वच्छंदपणे विहार करण्यासाठी, भयमुक्त व आसक्ती रहित जीवन यापन करण्यासाठी भिक्षूकरिता हे एकदम उपयुक्त आहे.*_
_"महाराज, भगवंतानी असे जे म्हटले आहे की, 'सुंदरसुंदर विहारांचे निर्माण करून त्यांत विद्वज्जनांच्या राहण्याची सोय करावी' यामागे भगवंताचे दोन दृष्टीकोन आहेत. ते असे-_
_*(१) विहार बांधून ते दान करण्याची सर्वच बुद्धांनी स्तुती केली आहे. त्यासाठी अनुमती देऊन मुक्तकंठाने त्यांची प्रशंसा केली आहे. पुण्यवृद्धीसाठी हे महान विस्तीर्ण असे कार्य आहे, असे म्हटले आहे. याप्रमाणे विहार बांधून ते भिक्षूंना दान केल्याने जन्मापासून, वृद्धत्वापासून, आजारापासून आणि मरणापासून त्या दात्याची सुटका होते. विहार दानाचे पहिले फळ होय.*याशिवाय_
_*(२) विहार बांधलेले असल्यामुळे भिक्षूंना निवाऱ्याचे स्थळ लाभते. भिक्षूंचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्यांना उपासक उपासिकांना सहजासहजी दर्शनाचा लाभ होतो. जर भिक्षूंना राहण्यासाठी कोठेही विहार बनले नसेल तर त्यांची भेट घेणेच अत्यंत कठीण होऊन जाईल. विहार बांधून ते भिक्षूंना दान करण्याचे हे दुसरे फळ होय.*_
_*हेच दोन दृष्टीकोन पुढे ठेवून भगवंतानी सांगितले की, 'सुंदरसुंदर विहार बांधून त्यात विद्वज्जनांना राहण्याची सोय करावी." पण याचा अर्थ असा समजू नये की, विहारास भिक्षू लोक आपले घर समजतील.”*_
_"ठीक आहे, भंते नागसेन, आपले म्हणणे मी मान्य करतो."_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २१/१२/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) मिलिन्द प्रश्न_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_21.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment