Friday, 22 December 2023

लोमस काश्यपाची गोष्ट

                   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                        *_लोमस काश्यपाची गोष्ट_*

                            *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

                     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                 _"भंते नागसेन, *भगवान बुद्धानी सांगितले आहे की, पृर्वी लाभलेल्या अनंत अशा मनुष्य जन्मांपासूनच मी अहिंसेचा अभ्यास केला होता.' यासोबतच दुसऱ्या एके ठिकाणी त्यांनीच सांगितले आहे की, 'ज्यावेळी मी लोमस काश्यप' नावाचा ऋषी होऊन विचरण करीत होतो त्यावेळी मी शेकडो प्राण्यांचा वध करवून वाजपेय्य नावाचा महायज्ञ केला होता."*_

           _"भंत नागसेन, *अनंत जन्मांपासून अहिंसेचे पालन करण्याची गोष्ट खरी मानावी तर लोमस ऋषीच्या जन्मातील यज्ञात शेकडो प्राण्यांच्या वधाची गोष्ट खोटी ठरते. आणि यज्ञातील प्राणी खरा मानावा तर अहिंसेबद्दल सांगितलेले वचन खोट ठरते.* हेसुद्धा एक भयंकर कोडे आहे. तेव्हा कृपाकरून आपणच ते उकलून द्यावे."_

            _"महाराज, *अहिंसेच्या अभ्यासाची गोष्टही सत्यच आहे. आणि यज्ञातील शेकडो प्राण्यांच्या केलेल्या वधाची गोष्ट सुद्धा खरीच आहे. तथापि हे लोमस तापसाच्या जन्मातील विकाराच्या आहारी जाऊन अज्ञानवश केलेले कृत्य होय; विचापूर्वक कलेले सकृत्य नव्हें."*_

_"भंते नागसेन, *आठ प्रकारचे लोक हिंसा करीत असतात.* ते आठ प्रकार असे- _

_*१)* रागीट मनुष्य रागाने बेभान झाल्यामुळे,_

_*२)* द्वेषी मनुष्य आपल्या मत्सरी स्वभावामुळे,_

_*३)* मुढता मनुष्य आपल्या मोहाग्नीमुळे_

_*४)* अहंकारी आपल्या अहंकाराच्या वंशामुळे_

_*५)* लोभी मनुष्य लोभामुळे,_ 

_*६)* निर्धन मनुष्य आपली उपजीविका चालविण्यासाठी,_

_*७)* मूर्ख मनुष्य केवळ करमणूक म्हणून आणि_

_*८)* राजे लोक दंड देण्यासाठी जीवहिंसा करतात._ 

         _भंते, हेच आठ प्रकारचे लोक जीवहिंसा करतात. परंतु भंते नागसेन, बोधिसत्वाने या कारणांवाचून स्वाभाविकपणे जीवहिंसा केली नसेल काय ?"_

            _"नाही महाराज, *बोधिसत्वाने स्वाभाविकपणे जीवहिंसा केली नव्हती.* महाराज, जर बोधिसत्वाने स्वाभाविकपणे महायज्ञ करून जीवहिंसा केली असती तर असे कदापि म्हटले नसते की, हे सह्य, तू निश्चित समजून घे की, 'चारही बाजूंनी सागरापर्यंत विस्तार पावलेल्या ज्या पृथ्वीला सागराचे संरक्षण मिळाले आहे, त्या संपूर्ण पृथ्वीवर मी निंदेचा विषय व्हावा हे मला मुळीच मान्य नाही.”_

         _“महाराज, त्यांनी जरी असे म्हटले असले तरी *बोधिसत्व काश्यप चंद्रावती नावाच्या राजकुमारीला पाहून तिच्या प्रेमात पडून मनाचा तोल सांभाळू न शकल्या- मुळे ते स्वतःला विसरून गेले. तिच्याविषयी मनात असलेल्या उत्कंठेमुळे आणि विरहामुळे त्यावेळी त्यांच्यावर वेडा होण्याची पाळी आली असता. एखाद्या भटकलेल्या किंवा भुललेल्या माणसाप्रमाणे त्यांनी घाईघाईने महायज्ञ केला. या यज्ञात अनेक पशुंचा बळी देण्यात आला होता. पशुंच्या माना कापल्यामुळे रक्ताचा जणू काही ओघळ वाहू लागला होता.*_

          *_“महाराज, ज्यांचा मेंदू ताळ्यावर नाही असा वेडा माणूस कधी कधी जळत असलेला अग्नीसुद्धा हातात पकडतो, चिडलेला सापसुद्धा पकडतो, मदोन्मत्त हत्तीच्या सुद्धा पुढे जातो, अथांग समुद्रातसुद्धा उडी टाकती, विहिरीतही उडी घालतो. काटेरी जागेतही जातो, पहाडाच्या उंच कड्याहून देखील उडी टाकतो, घाण खातो, रस्याने नग्न अवस्थेतच फिरतो, याशिवाय अशाच अनेक लीला करतो. महाराज, याप्रमाणेच बोधिसत्व काश्यपाचे इंद्रावती नामक राजकुमारीला पाहून तिच्यावर प्रेम जडले. आणि मनाचा तोल न सांभाळता आल्यामुळे ते स्वतःलाच विसरून गेले. तिच्याविषयी मनात असलेल्या उत्कंठेमुळे व विरहामुळे त्यावेळी त्यांच्यावर वेड लागण्याची पाळी आली असता एखाद्या भटकलेल्या किंवा भुललेल्या माणसाप्रमाणं त्यांनी घाईघाईने अविचारानं महायज्ञ केला._*

*_"महाराज, राजदंड विधानानुसार वेड्या माणसांचे अपराध तेवढे दंडनीय मानले जात नाहीत. तसेच पारलौकिक बाबींतही समजले जाते."_*

 _"महाराज, एखाद्या वेड्या माणसाने कोणाला ठार मारले तर तुम्ही त्याला कोणता दंड द्याल ?_ 

*_“भंते, वेड्या माणसाला दंड तो काय देणार ? त्याला ठोकपिट करून सोडून देण्यात येते. त्याच्यासाठी एवढाच दंड पुरेसा असतो."_*

            _"महाराज, खरी बाब तर ही आहे की, *वेड्या माणसाला दंडच नसतो. वेड्या माणसाचा अपराध म्हणजे अपराधच मानला जात नाही; त्याला क्षमा करण्यात येते. महाराज, याप्रमाणेच बांधिसत्व राजकुमारी चंद्रावतीला पाहताच तिच्यावर मन जडल्याने ते बेभान झाले आणि स्वतःला विसरून गेले होते. तिच्यावरील प्रेमामुळे मनास लागलेली उत्कंठा व विरहामुळे त्यांच्यावर वेड लागण्याची पाळी आली. अशा भटकलेल्या मनस्थितीत घाईघाईने त्यांनी अविचाराने महायज्ञ केला.*_

                *_"परंतु जेव्हा ती प्रेमाची नशा उतरली आणि मनस्थिती ठिकाणावर आली तेव्हा ते प्रव्रजित होऊन पाचही अभिज्ञाप्राप्त करून त्यांनी ब्रह्मलोकास गमन केले." "ठीक आहे._*

_भंते नागसेन, आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले."_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

*_२) लोमस काश्यप जातक-४३३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_22.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...