Wednesday, 27 December 2023

दुर्लक्षणीय प्रश्न

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_दुर्लक्षणीय प्रश्न_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                    _"भंते नागसेन, *भगवान बुद्धांनी म्हटले की, 'हे आनंद धर्मोपदेश करीत असता तथागत इतर पंथांच्या आचार्यांप्रमाणे काहीही लपवून ठेवीत नाहीत.' तरीपण स्थविर मालुंक्य पुत्रांनी प्रश्न विचारले असता तथागतांनी काहीच उत्तरे कशी दिली नाहीत ?* यात दोनच कारणे असू शकतात-_

*_१) कदाचित त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहित नसेल_* किंवा 

*_२) माहित असूनही दुसर्यांपासून त्यांना काहीतरी लपवून ठेवण्याची इच्छा असेल._*

                     _“भंते नागसेन, धर्मोपदेश करीत असता तथागत काहीही लपवून ठेवीत नाहीत हे जर खरे असेल, तर मालुंक्य पुत्राच्या प्रश्नांचे उत्तर तथागतास माहीत नसेल म्हणूनच ते चूप राहिले असावेत आणि जर त्याचे माहीत असेल, तर ते त्यांच्यापासून लपवून ठेवण्याचा दोष त्यांचेकडे येतो. भंते, हे सुद्धा एक कोडे आपल्यापुढे मी ठेवीत आहे. तरी आपण याची सविस्तर उकल करून द्यावी."_

           _"महाराज, तथागत धर्मोपदेश करीत असता काही एक लपवून ठेवीत नाहीत, असे आनंदाजवळ बोलले होते, हे खरे आहे. तसेच *स्थविर मालुंक्य पुत्राच्या प्रश्नांची त्यांनी काहीही उत्तरे दिली नाहीत, हेही खरे आहे. परंतु त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना अवगत नव्हती किंवा त्यांना ते लपवून ठेवावयाचे होते, हे त्याचे कारण नव्हते.*

_महाराज, कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याच्या या चार पद्धती आहेत-_

_*१)* एखादा प्रश्न असा असतो की, त्याचे उत्तर सरळ व तडक दिले जाते,_

_*२)* एखादा प्रश्न असा असतो की त्याचे उत्तर विभाजन करून दिले जाते,_ 

_*३)* एखादा प्रश्न असा असतो की, त्याचे उत्तर प्रतिप्रश्न करून देण्यात येते_ आणि 

_*४)* एखादा प्रश्न असा काही असतो की, त्याचे उत्तर मौनानेच द्यावे लागते. म्हणजे दुर्लक्षिला जातो._

_*१- "कोणत्या प्रश्नाचे उत्तर सरळ व तडक दिले जाते ? तर रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे अनित्य आहेत काय ? या प्रश्नाचे उत्तर होय."*_

_*२-"कोणत्या प्रश्नाचे उत्तर विभाजन करून दिले जाते ? तर, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे याप्रमाणे अनित्य आहेत काय? या प्रश्नांची उत्तरे होते."*_

*_३-"कोणत्या प्रश्नाचे उत्तर प्रतिप्रश्न करून दिले जाते ? तर, डोळ्यांनी सर्वच वस्तूंचे ज्ञान होते काय ? या प्रश्नांचे होय."_*

*_४-"कोणत्या प्रश्नाचे उत्तर मौनाने (उपेक्षा करून) दिले जाते ? तर, संसार नित्य आहे काय ? संसाराचा शेवट होईल काय ? संसाराचा शेवट कोठे आहे ? संसाराचा शेवट कोटेच नाही काय ? संसाराचा कोठे शेवट आहे ? आणि कोठे शेवट नाही, असे आहे काय ? ज्यास जीव (आत्मा) म्हणतात, तेच शरीर होय काय ? जीव (आत्मा) दुसरा आणि शरीर दूसरे आहे काय ? तथागतास महापरिनिर्वानंतर अस्तित्व असते काय ? तथागतास महापरिर्वानानंतर अस्तित्व नसते काय ? तथागतास महापरिनिर्वाणांनतर अस्तित्व असते आणि नसतेही असे आहे काय ? तथागतास महापरिनिर्वाणांनतर अस्तित्वच नसते नी अस्तित्व नसणेच योग्य होय. असे आहे काय? हे ते दुर्लक्षित केले जाणारे प्रश्न होत._*

               _"महाराज, *मालुंक्य पुत्राच्या प्रश्नाचे असेच दुर्लक्ष करून उत्तर दिले जाऊ शकत होते. याच कारणाने भगवान बुद्धाने काहीच उत्तर दिले नाही. असा कसा तो प्रश्न होता की, ज्याच्याकडे एकदमच दुर्लक्ष करणे योग्य होते ? कारण अशा प्रश्नाचे उत्तर देण्यात काहीही अर्थ निघत नाही किंवा त्यापासून काही कार्यभागही साधला जाऊ शकत नाही. म्हणून त्या प्रश्नास एकदम त्याज्य ठरविणेच योग्य होते. अर्थहीन, ज्ञानशुन्य अशा गोष्टी कधी तथागत करीत नाहीत"*_

_"बरोबर आहे भंते, आपले म्हणणे. मालुक्य पुत्राचा प्रश्न असाच होता, हे मी मान्य करतो."_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २७/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) मिलिन्द प्रश्न_*

*_२) मज्झिम निकाय - मालुंक्य सुत्त_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_27.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...