🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_उपासकाने सदैव भिक्षुचा आदर केला पाहिजे_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_“भंते नागसेन, *भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, 'हे वाशिष्ठ, जगात धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे, मग तो या जन्मी असो की कोणत्याही जन्मी असो,' तरी पण श्रोतापन्नपदाचा लाभ केलेला एखादा गृहस्थ म्हणजे ज्यांचे आता आपल्या त्या पदावरून पतन होणे शक्य नाही, असे जाणून घेतले आहे. परंतु असे असूनही तो एखाद्या अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामणेराला प्रणाम करतो आणि त्यांचे उठून उभे राहून स्वागत करतो. भंते नागसेन, 'धर्म हाच जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तो मग या लौकी असो को कोणत्याही लोकी असो.' हे जर खरे असले तर धर्माचरणानेच श्रोतापन्नपद प्राप्त केलेला एखादा गृहस्थ एकदमच अज्ञानी भिक्षुला किंवा श्रामणेरला प्रणाम करतो आणि उठून उभा राहून त्याचे स्वागत करतो, हे शोभनीय वाटत नाही. आणि जर श्रोत्तापन्न गृहस्थांनी एखाद्या अज्ञानी भिक्षूस किंवा श्रामणेरास प्रणाम करणे व यथार्थत: योग्य असेल तर 'धर्म हाच जगात सर्वश्रेष्ठ आहे' असे मानणे चुकीचे ठरते. हेही एक कठीणच कोडे आहे.* भंते, कृपाकरून यांचे स्पष्टीकरण करून सांगा, जेणे करून विरोधकांना सडेतोड उत्तर देता येईल."_
_"महाराज, *जगात धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि श्रोतापन्न नामक उच्चपदी पोचलेल्या उपासकाने एखाद्या अज्ञानी भिक्षुला किंवा श्रामणेराला प्रणाम केला पाहिजे व उठून उभे राहून त्यांचे स्वागत केले पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी अगदी संयुक्तीकच आहेत.* महाराज, असे करण्याचे कोणते बरे ते कारण आहे ?_
_"महाराज, *श्रमण (भिक्षु) होण्यासाठी वीस श्रेष्ठ गुण आणि बाहेरील दोन लक्षणे असावे लागतात. त्यामुळेच ते अज्ञानी असले तरी श्रोतापन्नपद प्राप्त केलेले उपासक किवा दुसरे लोक त्यांना आदराने प्रणाम करतात व उठून उभे राहून त्यांचे स्वागत करतात.* ते वीस गुण आणि दोन बाहेरील लक्षणे कोणते आहेत ते ऐका-
*_श्रमणांचे गुण व लक्षणे_*
_*१)* ते अरण्य, वृक्ष व एकांत अशा तीन श्रेष्ठ ठिकाणी वास्तव्य करीत असतात_
_*२)* ते सर्वच चांगल्या गोष्टीत अग्रेसर असतात,_
_*३)* ते आपले अधिष्ठान नियमानुसार ठेवीत असतात_
_*४)* ते सदाचारी असतात_
_*५-६)* शांत आणि संयमाने विहार करतात_
_*७)* परम संयमी असतात_
_*८)* क्षमाशील असतात_
_*९)* उत्तम कार्यात मग्न राहतात,_
_*१०)* आचार विचाराने श्रेष्ठ असतात,_
_*११)* उच्च व पवित्र इच्छा बाळगतात,_
_*१२)* विवेकशील असतात,_
_*१३)* पापांची लाज - भीती बाळगतात,_
_*१४)* प्रयत्नशील असतात,_
_*१५)* अप्रमादी असतात,_
_*१६)* शिक्षापदाचा अभ्यास करण्यात सदैव तत्पर असतात,_
_*१७)* धर्माचे ज्ञान मिळविण्यासाठी सदैव तत्पर असतात,_
_*१८)* शीलाचे पालन करण्यात तत्पर असतात,_
_*१९)* तृष्णवेर विजय मिळविणारे_ आणि
_*२०)* ते शिक्षापदाचा अभ्यास पूर्ण करतात._
_हेच त्यांचे स्वतःचे विशेष असे वीस गुण आहेत. असेच_
*_१) काषायवस्त्र धारण करणारे_* व
_*२) डोक्याचे मुंडण करणारे ते असतात,*_
*_ही त्यांची दोन बाह्य लक्षणे होत._*
_"महाराज, *भिक्षु लोक वर सांगितलेल्या गुणांवर आरुढ होऊन धर्माचे पालन करतात व त्यायोगे अर्हंतपद सुद्धा लाभ करून घेतात. म्हणूनच श्रोतापन्नपद प्राप्त केलेले गृहस्थ उपासक एखाद्या अज्ञानी भिक्षुस प्रणाम करतात आणि त्याचे उठून उभे राहून स्वागत करतात. 'आश्रव क्षीण पावल्यामुळे त्यांनी भिक्षु जीवनाचा अंगीकार केला आहे, असे पवित्र जीवन करण्याप्रत अजून माझी अवस्था नाही.' असा विचार करूनच श्रोतापन्न पद प्राप्त केलेले गृहस्थ उपासक कोणत्याही भिक्षूना प्रणाम करतात आणि त्यांचे उभे उठून स्वागत करतात. त्यांनी भिक्षु जीवनाचा अंगीकार करून श्रेष्ठ अशा सज्जन लोकांच्या समुहात स्थान मिळविले आहे. परंतु मला मात्र अजून तेथे स्थान लाभलेले नाही, त्यांनी प्रतिमोक्षाचा उपदेश ऐकण्याइतपत योग्यता प्राप्त केली आहे; परंतु माझी ती अवस्था नाही, ते इतरांना प्रव्रजित व उपसंपन्न करून बुद्ध शासनाची वृद्धी करू शकतात, परंतु माझी अजून तरी ती योग्यता नाही, ज्यांचे मी पालन करू शकत नाही, अशा पुष्कळ पवित्र शिक्षापदांचे ते पालन करतात, त्यांनी भगवान बुद्धांनाच आपला एकमात्र आधार देणारे गुरु मानून भिक्षु जीवनाचा अंगीकार केला आहे, त्याच्या काखेत मोठमोठ घाण केस नाहीत, ते अंजन लावीत नाहीत की दुसरा कोणताही साजश्रृंगार करीत नाहीत, तर सदाचारांचा सुगंध हेच एकमात्र त्यांचे साजश्रृंगाराचे प्रसाधन आहे; परंतु मी मात्र अनेक प्रकारच्या प्रसाधनाने साजश्रृंगार करीत आहे. महाराज याशिवाय जे वीस सर्वोच्च गुण आणि दोन बाहेरील लक्षणे, ही सर्वथा भिक्षु लोकांतच पहावयास मिळतात. तसेच भिक्षु लोक दुसऱ्याही अनेक शिक्षापदांचे निष्ठेने पालन करतात. परंतु अजूनपर्यंत माझा त्या शिक्षापदांशी काहीच संबंध आलेला नाही. असा विचार करूनच श्रोतापन्न पदाचा लाभ केलेले गृहस्थ उपासक कोणत्याही भिक्षूंना प्रणाम करतात आणि त्यांचे उडून उभे राहून स्वागत करतात आणि असे करणे आवश्यकही आहे.*_
_"महाराज, राजकुमार पुरोहिताजवळच क्षत्रियांना आवश्यक त्या सर्व विद्यांचे शिक्षण घेतो. त्यानंतर तो तरुण झाल्यावर योग्यवेळी राजसिंहासनावर बसतो, *त्याला राजपदाचा लाभ होतो. तरीपण तो आपल्या आचार्यांना प्रणाम करतो व उटून उभा राहून त्यांचे आदराने स्वागत करतो. कारण त्यास असे वाटते की, 'हे माझे गुरु आहेत, यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळेच मला ही योग्यता प्राप्त झाली आहे'. महाराज, याचप्रमाणे भिक्षु लोक अशाच शिकवण देण्याच्या महान पिढीतील आहेत. असा विचार करूनच श्रोतापन्न पदाचा लाभ केलेले गृहस्थ उपासक कोणत्याही भिक्षुंना प्रणाम करतात आणि आपल्या आसनासवरून उठून उभे राहून त्यांचे स्वागत करतात.*_
_“महाराज, *एवढ्यावरूनच आपण समजून घ्यावयास पाहिजे की, भिक्षुंचां दर्जा किती महान आहे.* महाराज, समजा *एखाद्या श्रोतापन्न गृहस्थाला अर्हत्पदाचा लाभ झालाच तर त्यावेळी त्याला दोनच गती प्राप्त होऊ शकतात, तिसरी गती लाभणे संभवच नाही - एक तर तात्काळ त्यादिवशी परिनिर्वाण किंवा दूसरे भिक्षु जीवनाचा अंगीकार. पण ही स्थिती भिक्षूची नाही कारण भिक्षुभाव अत्यंत अचल, उत्तम व श्रेष्ठ असतो."*_
“_भंते, नागसेन, ही गोष्ट आता मला समजली. आपल्यासारख्या बुद्धीमान व्यक्तीकडूनच असा प्रश्न चांगल्याप्रकारे स्पष्ट केला जाऊ शकतो. आपणास वगळता दुसरा कोणीही याप्रमाणे समजावून सांगू शकत नाही."_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २६/१२/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) मिलिन्द प्रश्न_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_26.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment