🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*बौद्धाचार्यांची निर्मिती*_
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_अस्पृश्य महार समाज हिंदु धर्माच्या अंमलाखाली क्षुद्र देव-देवतांची पूजा अर्चा करीत असे. *त्याकाळात जातीच्या खाणाखुणा जपण्याच्या हेतूने व्रतवैकल्ये, कडक उपासतापास, पापाक्षलनासाठी बकरे कोंबड्याचा बळी देणे, विवाह, अपत्यप्राप्ती आदि चांगले क्षण साजरे करताना दारुची सरबत्ती उडविणे, मयताच्या अंत्यविधीनंतर घरच्या मंडळीना दारू पाजणे वगैरे धार्मिक विधी केले जात होते.*_
_परंतु *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीनंतर पूर्वाश्रमीचा महार समाज जागृत झाला. त्याने रुढी परंपरागत गावकीची कामे, जातीदर्शक चालीरीती, मृतमांस खाणे, गावात भिक्षा मागणे वगैरे हीन दर्जाची कामे करण्याचे व पतीत जीवन जगण्याचे तो नाकारू लागला.*_
_*या कालखंडात अनिष्ट रुढी, पुराणमतवादी परंपरा, दुष्ट चालीरीती, याविरोधी तत्कालीन महार समाज सेवा संघाने कोकणप्रांतात जनजागृती केली होती. आणि समाजसुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. महार समाजात विवाह किंवा पूर्वापार जुन्या पद्धतीचे संस्कार विधी महारांनी ब्राह्मणांच्या हाताने कधी करुन घेतले नाहीत. त्याकाळात आपल्या समाजातील पूर्वीचे जोशी (बुवा) यांच्या हस्ते संस्कारविषयक विधी करुन घेत असत.* त्यानंतर महार ज्ञाती पंचायतीने आरंभी धार्मिक संस्कार विधी पार पाडण्यासाठी पुरोहित पद्धतीचा अवलंब केला._
_*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितोध्दाराची चळवळ सुरु करण्यापूर्वी महार लोकांचे विवाहादि संस्कारविधि पूर्वापार जुन्या पध्दतीने केले जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या समाजपरिवर्तनाच्या चळवळीनंतर सुमारे १९२८ सालापासून महारांचे विवाह वैदिक पध्दतीने केले जाऊ लागले. परंतु यात वैशिष्ट्य असे की, वैदिक पध्दतीचे किंवा पूर्वापार जुन्या पध्दतीचे विवाह व इतर संस्कार महारांनी ब्राम्हणाचे हातून कधीच केले नाहीत.*_
_*आपल्याच समाजातील पूर्वी चे बुवा (जोशी) यांच्या हातून ते संस्कारविषयक विधि करुन घेत असत. पंचायत समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील संस्कार विधि पार पाडण्यासाठी 'पुरोहित' पध्दतीचा अवलंब केला व आयु. धयवीलकर बुवा, आयु. शिमोणकर बुवा, आयु. कासारेबुवा, आयु. रावढळकरबुवा, आयु. वडवलकर जोशी इत्यादिना पुरोहित नेमले. या पुरोहितांचे हातून संस्कारविधिचे कार्यक्रम करण्यात येऊ लागले.*_
_*बौध्द धम्माच्या स्विकारानंतर बौध्दजन पंचायत समितीने बौध्दांचे संस्कार विधि पार पाडण्याकरिता 'बौध्दाचार्य' संस्थेची निर्मिती केली. या बौध्दाचार्यांना बौध्द पध्दतीने संस्कार विधि करण्याचे प्रशिक्षण दिले, आणि २८ फेब्रुवारी १९६२ रोजी परिपत्रक क्रमांक १२ प्रसिध्द करुन त्यांत मुंबईकरिता २८ बौध्दाचार्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. त्यानंतर याच परिपत्रकाची पुरवणी दिनांक १ फेब्रुवारी १९६४ रोजी प्रसिद्ध करुन मुंबईत आणखी एक असे एकूण २९ व ग्रामीण भागासाठी २ बौध्दाचार्याची नियुक्ती जाहिर केली.
_*जागेअभावी मुंबईतील बौध्दाचार्यांची नामावली येथे देणे शक्य होत नाही. तरी सुध्दा ग्रामीण भागासाठी नेमलेल्या दोन बौध्दाचार्यांची नावे माहितीसाठी देत आहोत.*_
१) आयु. तानु गोपाळ जाधव, मु. चाफे, ता. रत्नागिरी
२) आयु. भागुराम नामदेव कदम, मु. रामपुर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी*_
_आज रोजी हजारोच्या - संख्येने बौद्धाचार्य निष्ठापूर्वक धम्म संस्कार व प्रसार करीत आहेत, धम्म चळवळीचे प्रबोधन करीत आहेत._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
*_टीप :- ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी बोद्धजन पंचायत समिती, भोईवाडा, परेल येथील कार्यालयाशी, तसेच संपर्क करावा_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ३१/१२/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) समाजक्रांतीचे अपत्य बोद्धजन पंचायत समिती लेखक - वि. ल. मोहिते_*
_*२) बौद्धाचार्य माहिती पुस्तिका - बौद्धजन पंचायत समिती*_
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_41.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment