🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_श्रेष्ठ दानाचे विश्लेषण_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_एकदा 'भगवानांनी आपल्या एका पूर्व-जन्मातील गोष्ट सांगताना म्हटले- *तेव्हा ते बोधिसत्व होते, बुद्ध बनले नव्हते. अनेक जन्मांपर्यंत बोधिसत्वाचे जीवन जगत-जगत, आपल्या दहा पारमितांना पूर्ण करत-करतच कोणी बुद्ध बनतो, सम्यक संबुद्ध बनतो.*_
_*दानाचीही एक खूप मोठी पारमी असते.* त्यांनी सांगितले की कोणत्या एका जीवनात ते खूप मोठ्या देशाचे राजा होते. *चित्तामध्ये दानाची चेतना जागली तेव्हा जितका राज्यकोष होता, जितके काही त्यांच्याजवळ होते, ते दान करणे सुरू केले.* हजारो, लाखो लोकांना दान दिले. सात वर्षांपर्यंत सतत दानाचा कार्यक्रम चालतच राहिला. अन्नाचे दान, वस्त्रांचे दान, औषधांचे, वाहनांचे आणि निवासस्थानांचे दान दिले. लोकांच्या ज्या-ज्या सांसारिक गरजा होत्या त्या सर्व गोष्टींची पूर्तता केली गेली. कोणा व्यक्तीला कोणत्या सांसारिक गोष्टींची कमतरता पडू दिली नाही. अशी सात वर्षे खूप दान दिले. *इतके पुण्यशाली तसेच पारमी वाढविणारे दान देखील जर कोणा एका स्रोतापन्न व्यक्तीला एक वेळेचे भोजन दिले, तर ते एका वेळेचे भोजन-दान त्यापेक्षा कितीतरी अधिक पुण्यशाली होते. म्हणजे, पात्र कसे आहे? कुठे बीज रोपले गेले आपल्या पुण्य-कर्माचे ? जमिन सुपीक असेल तर फळ अधिक चांगले येईल.*_
_*तो स्रोतापन्न व्यक्ती जो साधना करत-करत, शील, समाधी, प्रज्ञेमध्ये पुष्ट होत-होत अनार्यापासून आर्य बनला, ज्याने पहिल्यांदा निर्वाणाचा साक्षात्कार केला, मुक्तीच्या चार पायऱ्यांपैकी पहिल्या पायरीपर्यंत पोहोचला. धर्मपथाचा पहिला सोपान प्राप्त केला. असा स्रोतापन्न झालेला व्यक्ती मुक्तीच्या स्रोतात पड़ला.*_
_*प्रत्येक दानाचा लाभ होतच असतो,* पण कोणाला दान द्यावे? तेव्हा सांगितले की त्या वेळी धरतीवर कोणी स्रोतापन्न नव्हतेच, कारण विपश्यना नव्हती. कारण लोकांजवळ निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी कोणते तंत्रच नव्हते. अशा परिस्थितीत जे होते त्यांनाच दान दिले गेले. पण त्याच्या तुलनेत *एका स्रोतापन्न व्यक्तीला केवळ एका वेळेचे भोजन दिले गेले तर ते त्याहूनही अधिक लाभदायक होते.*_
_असे का होते, हे समजून घेऊ ! *कोणत्याही प्राण्याला भोजन दिले तर त्याला आपण एक दिवसाचे जीवन आणखी देत आहोत. त्या भोजनाच्या बळावर त्याची जीवन-धारा अजून थोडी पुढे जाईल. पण कोणाला देत आहोत? एखादा कोणता हिंसक पशू आहे- समजा एखादा सिंह आहे, चित्ता आहे, आणि दुसरीकडे एक गाय आहे. एक दिवसाचे भोजन आपण दोघांना दिले. पण गायीला दिलेले भोजन अधिक पुण्यशाली का ? सिंह किंवा चित्त्याला एक दिवस अधिक जगवून तो इतर प्राण्यांना कष्टच देईल. गाय एक दिवस अधिक जगली तर इतर प्राण्यांना लाभच देईल. म्हणून, या दोन्हींच्या तुलनेने गायीला दिलेले एक दिवसाचे भोजन अधिक फलदायी आहे, अधिक कल्याणकारी आहे.*_
_असेच *गायीच्या तुलनेने एका सामान्य मनुष्याला दिलेले भोजन अधिक कल्याणकारी होईल, कारण मनुष्य आहे. पशुंच्या तुलनेत मनुष्याजवळ अशी शक्ती आहे की तो अंतर्मुखी, आत्ममुखी, सत्यमुखी होऊन आपल्या गाठी उलगडणे शिकला तर मुक्त होऊ शकतो. हे काम पशू करू शकत नाहीत. ती गाय जीवनभर जगूनही आपल्या स्वतःला मुक्त करू शकत नाही. तिला निसर्गाने ती शक्ती दिलेली नाही. या मनुष्याला जर आपण एक दिवस अजून जगवले तर कोण जाणे त्या एका दिवसात त्याचा शुद्ध धर्माशी संपर्क होऊन जाईल. त्याला असा विधी मिळून जाईल ज्यामुळे तो आत्ममुखी होऊन आपल्या गाठी उलगडून टाकेल. या दोघांच्या तुलनेत त्या व्यक्तीला दिलेले भोजन अधिक कल्याणकारी आहे.*_
_एक सामान्य व्यक्ती ज्याला धर्माचा मार्ग मिळाला नाही, सारे जीवन दुराचाराचेच जीवन जगतो, त्याच्या तुलनेने एक व्यक्ती जो सदाचाराचे जीवन जगत आहे, धर्माच्या मार्गाला लागलेला आहे. या दोघांमधून जर भोजनाचे दान त्या सदाचारीला दिले तर त्याला दिलेले भोजनाचे दान अधिक कल्याणकारी आहे ते यासाठी की त्याचे एक दिवसही अधिक जगणे त्याला सन्मार्गाकडे घेऊन जाण्यात सहायता करेल. आणि खरोखरच तो धर्माच्या मार्गावर पुढे जात जात मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू शकेल. खूप मोठा लाभ मिळेल त्याचा, कारण तो सन्मार्गावर म्हणजे, धर्माच्या मार्गावर चालणारा व्यक्ती आहे._
_परंतु *अजूनपर्यंत ज्याला निर्वाणाचा साक्षात्कार झालेला नाही, त्याच्या तुलनेत ज्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला आहे, त्याला एका दिवसाचे भोजन दिले तर ते अधिक पुण्यशाली आहे. कारण तो व्यक्ती एक दिवस अधिक जगून केवळ आपलेच कल्याण करत नाही, तर आता जे तरंग निर्माण करत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासाबरोबर त्याच्यात जे तरंग निर्माण होत आहेत, ते आसपासच्या साऱ्या वातावरणाला धर्माच्या तरंगांनी भरून टाकतील. न जाणे कित्येक लोकांच्या कल्याणाचे कारण बनून जातील.*_
*_म्हणूनच म्हटले की इतक्या लोकांना जे मी दान दिले त्याच्या तुलनेने एका - स्रोतापन्न व्यक्तीला, केवळ एका वेळेच्या भोजनाचे दान दिले तर ते कित्येक पटींनी अधिक कल्याणकारी होईल, अधिक पुण्यशाली होईल._*
_त्याचप्रमाणे *अनेक स्रोतापन्न व्यक्तींना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका सकदागामी व्यक्तीला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल, कितीतरी अधिक बलशाली होईल. अनेक सकदागामिंना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका अनागामीला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल. अनेक अनागार्मिना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात केवळ एका अरहंताला दिलेले भोजन कितीतरी अधिक कल्याणकारी होईल. अनेक अरहंतांना दिलेल्या भोजनाच्या मुकाबल्यात सम्यक संबुद्धांना दिलेले भोजन कित्येक पटींनी अधिक, खूप अधिक कल्याणकारी होईल. कोणा सम्यक संबुद्धांना भोजन दिले आणि त्याच्या मुकाबल्यात तप करणाऱ्या संघाला भोजन दान दिले, तर सम्यक संबुद्धांना दिलेल्या भोजनापेक्षाही ते अधिक कल्याणकारी झाले. आणि पुन्हा म्हटले, कितीही मोठ्या तप करणाऱ्या संघाला भोजन-दान देऊन, कितीही मोठे पुण्य अर्जित केले तरीही, त्याच्या मुकाबल्यात साधना करणाऱ्यांसाठी जर कोणी सुविधा बनवून दिल्या, कोणी शून्यागार बनवून दिले, ज्याच्यात बसून कोणी व्यक्ती तप करून आपल्या मुक्तीचा मार्ग शोधू शकतो तेव्हा त्या साऱ्या पुण्यापेक्षाही हे महान सर्वोच्च पुण्य अधिक कल्याणकारी आहे.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १६/१२/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) विपश्यना साधक" बुद्धवर्ष २५६६, चैत्र पौर्णिमा, ६ एप्रिल, २०२३ वर्ष ७ अंक १_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/12/blog-post_16.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment