Sunday, 31 March 2024

स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - ९

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_49.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग ९_*

*_बुद्धीचे बोन्सॉय_*

                 _म्हणजे आपल्याकडे स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात. हे व्रत त्या दोन गोष्टींसाठी करतात. एक गोष्ट म्हणजे, नवऱ्याला दीर्घ आयुरारोग्य मिळावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जन्मोजन्मी सात जन्मी तोच पती मिळावा. *खरं म्हटलं तर ज्याप्रमाणे सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, ही गोष्ट जर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत होत असती, तर आम्हा डॉक्टरांची फार सोय झाली असती. आम्ही रुग्णालयाच्या दारामध्ये वडाचं एक झाड लावलं असतं आणि ज्या वेळेला पेशंटला शस्त्रक्रियेसाठी घेतलं असतं, त्या वेळी त्याच्या बायकोच्या हातामध्ये सुताची एक गुंडी दिली असती आणि तिला सांगितलं असतं, 'तू झाडाभोवती सूत गुंडाळ. तू हे व्रत कर. कारण त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे. एका बाजूला आमची शस्त्रक्रिया, दुसऱ्या बाजूला तुझं व्रत; डबल इंजीन लावू या. कशाने का होईना, पण निश्चित प्रकारे गुण येईल'. परंतु या सगळ्यातला फोलपणा कळत असतानादेखील आजही सुशिक्षित स्त्री अशी सगळ्या प्रकारची व्रतं विशेषतः वटसावित्रीचं व्रत करते. आणि कसं करते? - म्हणजे वडाची झाडं आता कुठेतरी गावाच्या बाहेर असणार; मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये तर तीही सोय नाही. मग सर्रास वडाच्या फांद्या तोडल्या जातात, त्या विक्रीला आणल्या जातात आणि वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होते. कशाकरता? तर वटसावित्रीचं वट पुजायचंय म्हणून.*_

                     _म्हणजे बॉन्साय हा प्रकार आपल्याला माहीत असेल. मोठी मोठी झाडं छोटी छोटी करून ठेवण्याची ती एक जपानी कला आहे. त्यामुळे वडाचं झाड २० वर्षांचं असतं, तरी छोट्या कुंडीतच असतं. *मुंबईच्या उच्चविद्याविभूषित विदुषी मला एकदा त्यांच्या घरातलं वडाचं बॉन्साय दाखवत होत्या. ते दाखवताना त्या म्हणाल्या, "डॉक्टर, या वडाच्या झाडाचं वय २२ वर्ष आहे, पण त्याचा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे, आमच्या इमारतीमधल्या बायका वटसावित्रीच्या दिवशी दुसरीकडे कुठेही न जाता माझ्या घरी येतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात. मी त्यांना म्हणालो, "याचा अर्थ एवढाच की, तुमच्या झाडाचं बॉन्साय तर आहेच, पण तुमच्या कॉलनीमधल्या किंवा इमारतीमधल्या महिलांच्या बुद्धीचदेखील बॉन्साय झालेल आहे. असं बोललेलं लोकांना आवडत नाही. याचं कारण, आपल्या रूढीपरंपरा आपण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तपासाव्यात, असं लोकांना वाटतच नाही.*_

                    _*वटसावित्रीची कथा किती जणांना माहिती आहे, असा प्रश्न मी ज्या वेळी विचारतो, त्या वेळी महिला समुदायामध्येदेखील कोणीही ती कथा नीट सांगू शकत नाही, असा माझा अनुभव आहे.* कथा काय आहे? अश्वपती नावाचा एक राजा निःसंतान असतो. मूल व्हावं म्हणून तो देवीची पूजा करतो. १८ वर्ष तप आणि व्रत केल्यानंतर त्याला एक सुरेख मुलगी होते. तिचं नाव असतं सावित्री. ही सावित्री म्हणणे इतकी रूपवान असते, इतकी देखणी असते की, तिला वरायला, तिच्याशी लग्न करायला कुणी धजावत नसतं. शेवटी सावित्रीने स्वतःचा वर स्वतःच निवडावा म्हणून एका वृद्ध अमात्याला बरोबर देऊन राजा तिला पाठवतो. सावित्री या राज्यातनं त्या राज्यात, या जंगलातनं त्या जंगलाकडे जात असते. कारण दोन राज्यांना जोडणारी जंगलंच त्या वेळेला असायची._

                  _आणि एका जंगलामध्ये तिला सत्यवान दिसतो. सत्यवान हा राज्य गेल्याने परागंदा झालेला राजा असतो. त्याचे वडील महाराज असतात. तेही त्या वेळी जंगलातच राहत असतात. ते आंधळे झालेले असतात; आणि राज्य गेल्यामुळे जंगलात राहण्याची वेळ, म्हणजे हा विजनवास त्यांच्या पदरी आलेला असतो. अशा वेळी मातीचे हत्ती आणि घोडे करून सत्यवान त्यांच्याशी खेळत असतो. त्याला बघितल्यानंतर सावित्री म्हणते, "मी याच्याशीच लग्न करणार". ज्या वेळेला तिच्या वडलांना हे कळतं, त्या वेळी तिच्या वडलांना आनंद होतो की, 'चला, आपल्या मुलीने आपला वर निवडला' त्याच्यानंतर प्रत्यक्षात लग्न होण्याच्या आधी नारद येतो आणि नारद सावित्रीच्या वडलांना सांगतो की, "बाबा रे, तुझ्या मुलीने जो वर निवडलेला आहे, तो एक वर्षानंतर निश्चितपणे मरणार आहे. एक वर्षानंतर तुझी मुलगी विधवा होणार आहे. तेव्हा हे लग्न तू करू नकोस"; परंतु तरीदेखील जंगलामध्ये जाऊन अत्यंत आनंदाने, थाटामाटात अश्वपती आपल्या मुलीचं लग्न लावून देतो. त्याच्यानंतर एक वर्ष होतं. एक वर्ष झाल्यानंतर यम येतो. यम सत्यवानाला घेऊन जायला लागतो. त्याच्या मागोमाग सावित्री जाते. यम तिला परोपरीने परत पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही बधत नाही. शेवटी, यम तिला तीन वर मागायला सांगतो. पहिला वर ती मागते, "माझ्या सासऱ्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळण्याचं आणि परत मिळालेलं राज्य पाहाण्याच भाग्य लाभू दे"; दुसरा वर मागते, "माझ्या निःसंतान पित्याला शंभर पुत्र होऊ दें। तिसरा वर मागते, "आम्हा उभयतांना दीर्घ आयुरारोग्य लाभून माझा संसार सुखाचा होऊ दे", आणि मग यम "तथास्तु" म्हणतो._

              _आता ही सगळी कल्पना काय आहे, असा प्रश्न तुम्ही कधी विचारला का? समजा, आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला एक अत्यंत देखणी मुलगी आहे आणि तिच्या लग्नाला जर चटकन सांगून मुलं येत नाहीयेत, तर वडील स्वतः आणखी व्यापक प्रयत्न करतील की एका वृद्ध अमात्याला घेऊन तिलाच देशोदेशी स्वतःच्या स्वयंवरासाठी पाठवतील? त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की, एक वर्षान तिचा नवरा मरणार असल्याचं निश्चितपणे कळलं - ते आज कळू शकतं. उदाहरणार्थ, कुणी जर येऊन सांगितलं की, 'अहो, तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय, पण तुम्हांला माहीत आहे का की, नवऱ्या मुलाच्या लिव्हरचं अमुक अमुक डॅमेज आहे. त्याला लिव्हरचा अमुक अमुक आजार आहे. तो एक वर्षाच्या वर जगणार नाहीये तर ते लग्न ती मुलगी करेल का? आणि तिचे आईवडील ते करू देतील का? किंवा आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं, तर धंद्यामध्ये पूर्ण संपत्ती गेलेली असल्याने एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि त्याच्या आंधळ्या बापालाही भविष्यात सांभाळावं लागणार असणाऱ्या मुलाशी आजच्या काळातली एखादी मुलगी लग्न करेल का? आणि ती 'लग्न करते' म्हणाली, तरी तिचे आईबाप त्या लग्नाला होकार देतील का?_

                _अश्वपती राजानेही आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जंगलात का लावून दिलं ? त्याने ते लग्न राजधानीमध्ये का नाही लावलं ? आणि ते लावल्यानंतर त्याने आपल्या मुलीच्या सासरकडच्यांना मदत का केली नाही? त्याने आपल्या जावयाला आणि आपल्या व्याह्यांना आणून राजधानीमध्ये का ठेवलं नाही? हे प्रश्नदेखील हे व्रत करणाऱ्या लोकांना पडत नाहीत. या कथेत जे सगळं घडलं, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, *ज्या मुलीला भाऊ नसे, तिचं लग्न त्या काळात होत नसे.* त्यामुळे 'एवीतेवी हिचं लग्न होणारच नव्हतं, पण कसं का असेना, आता एकदा हिचं लग्न तरी होतंय', या भावनेने अश्वपती सावित्रीचं लग्न लावून द्यायला उत्सुक होता. लग्न करायला कदाचित परंपरेच्या दडपणाने ती उत्सुक होती. परंपरेचं हे दडपण इतकं जास्त होतं की, तिने यमाला काय मागितलं ? पहिला वर, स्वतःच्या सासऱ्यासाठी मागितला. दुसरा वर, स्वतःच्या वडलांसाठी मागितला आणि तिसरा वर स्वतःच्या नवऱ्यासाठी मागितला म्हणजे तिने तीनही गोष्टी पुरुषांसाठी मागितल्या. त्यामुळे हे सबंध व्रत तुम्ही ज्या वेळी करता, त्या वेळी त्यातला गर्भितार्थ असा की, बाईने आपल्या सगळ्या सुखाचं समर्पण पुरुष वर्गाशी संबंधित असलेल्या बाबींसाठी मग कदाचित वडील असतील, कदाचित सासरे असतील किंवा नवरा असेल - केलं पाहिजे. हे सगळंच्या सगळं आजच्या आधुनिक विचाराशी पूर्णपणे विसंगत आहे!_

                 _आता ही विसंगती अनेक वेळा किती हास्यास्पद ठरते। म्हणजे कोल्हापूरकडच एक उदाहरण आहे. एका गावामध्ये वटसावित्रीच्या दिवशी गावातल्या बायका जमून वटसावित्रीची पूजा करत होत्या; वडाला सूत गुंडाळत होत्या; हळदीकुंकू वाहून वडाची पूजा करत होत्या. लग्न होऊन दोन वर्ष झालेली एक बाई हे सगळं करत असताना अचानकपणे एक जीप आली. त्या जीपमधनं एक माणूस उतरला. त्याने या बाईचा हात धरला; ओढला; तिला जीपमध्ये बसवलं आणि जीप भरधाव वेगाने निघून गेली._

              _याने गावात एकच हलकल्लोळ माजला. सगळे म्हणायला लागले, 'हा काय प्रकार आहे! आमच्या गावामध्ये देवाची पूजा करणाऱ्या, वडाची पूजा करून वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या बाईला दिवसाढवळ्या कुणीतरी माणूस या पद्धतीने घेऊन जातो! पळवून नेतो! मग या जीपचा पाठलाग करण्यात आला. गाडी काही भरधाव वेगाने चाललेली नव्हती. मग गाडी अडवण्यात आली; त्या माणसाला उतरवण्यात आलं. त्याला दमात घेऊन 'हा सगळा काय प्रकार आहे! तू स्वतःला कोण समजतोस! आमच्या गावातली मुलगी तू अशी पळवून का नेलीस?' असं विचारण्यात आलं. *त्यावर तो माणूस अत्यंत शांतपणे म्हणाला, "ती बाई कोण आहे, हे तुम्हांला माहिती आहे का?" त्यावर गावकरी म्हणाले, 'कोण आहे ती ? आमच्या गावची मुलगी आहे!' तो म्हणाला, "बरोबर आहे, पण ती माझी बायको आहे. आमचं लग्नं होऊन दोन वर्षं झाली आहेत". आता आश्चर्यचकित होण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती. ते म्हणाले, 'अरे भल्या गृहस्था, मग ती चांगली वटसावित्रीची पूजा करत होती; 'जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती पाहिजे' असं म्हणत होती; मग तुला तिला पळवून नेण्याची काय गरज होती? तिची पूजा झाल्यानंतर तू तिला घेऊन जाऊ शकला असतास, तो म्हणाला, "अहो, लग्र होऊन दोन वर्ष झाली. ही बाई सात दिवसदेखील नांदली नाही. आता ही म्हणतीये की, 'सात जन्मी हाच पती पाहिजे. मी दोन वर्ष असाच राहिलो. आता सात जन्मपण असाच राहू का?"*_

                  _आता ज्या बाईला माहेरीच राहावंसं वाटत होतं; सासरी संसार करावासा वाटत नव्हता, ती विनाकारण कशाकरता ते वटसावित्रीचं वट करत होती? लक्षात घ्या, या सगळ्या प्रकारात एक प्रकारची सक्ती निर्माण होते. *वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या दीड हजार सुशिक्षित बायकांचं ज्या वेळेला आम्ही सर्वेक्षण केलं, त्या वेळेला त्यांच्यातल्या ७० टक्के बायका हे व्रत करणाऱ्या होत्या. आम्ही त्यांना विचारलं, 'तुम्ही हे व्रत का करता? याच्यावर तुमचा विश्वास आहे का?' त्या म्हणाल्या, 'नाही, आमचा काही तसा विश्वास नाही'. आम्ही म्हणालो, 'मग का करता?' त्या म्हणाल्या, 'पण समजा, जर आम्ही एखाद्या वर्षी व्रत केलं नाही आणि नेमक्या त्याच वर्षी यांना काही गंभीर आजार झाला, तर घरचे लोक म्हणतील, 'केलं असतं व्रत, तर काही बिघडलं असतं का?' त्याच्यामुळे व्रत केलेलं बरं, म्हणून आम्ही व्रत करतो'. रूढीपरंपरांची ही गुलामी किती खोलवर आपल्या मनामध्ये रुजलेली असते, हे कळण्यासाठी म्हणून मी आपल्याला हा सगळा तपशील सांगितला.*_

                   _*लक्षात घ्या, याचबरोबर या सगळ्यातून स्वतःचीच फसवणूक करण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे मी मागच्या वर्षी एका ठिकाणी गेलो होतो. ज्या घरी होतो, त्या ठिकाणची सुशिक्षित बाई वडाची व्यवस्थित पूजा करून आलेली होती. तिला तो सगळा प्रकार फारसा आवडलेला नसल्याचं मला कळत होतं, पण घरच्या दबावामुळे तिच्यापुढे काही पर्याय नव्हता. म्हणून मी थोडं गमतीने तिला म्हणालो, "काय वहिनी, वडाची पूजा केलीत की नाही? सात फेऱ्या घातल्यात की नाही? 'जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा', असं म्हणालात की नाही?" मी कुठल्या अर्थाने हे म्हणत होतो, ते त्या बाईला कळत होतं. ती म्हणाली, "होऽ वडाची यथास्तित पूजा केली; हळदकुंकू वाहिलं ; वडाला सात फेऱ्या घातल्या; त्याला सूत गुंडाळलं आणि म्हणाले, 'जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा, पण हा त्याचा सातवा जन्म असावा' ".*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-३१/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

शरीर मृगजळासारखे आहे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शरीर मृगजळासारखे आहे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_31.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_फेणूपमं कायमिमं विदित्वा मरीचिधम्मं अभिसम्बुधानो ।_* 

*_छेत्वान मारस्स पपुप्फकानि अदस्सनं मच्चुराजस्स गच्छे ॥_*

*_अर्थ - ह्या शरीरास फेसा प्रमाणे व मृगजळा प्रमाणे क्षणभंगुर जाणून कामदेवाच्या आकर्षणाला छाटून मृत्यूराजाच्या दृष्टीतून सुटुन जावे._*

          _श्रावस्तीमध्ये एक भिक्षु भगवंतांजवळ कम्मस्थान घेऊन जंगलात गेला. खुप प्रयत्न करूनही, तो अर्हत्वपद प्राप्त करू शकला नाही. परततांना रस्त्यात मृगजळ पाहून त्याच्या असारत्वाचा विचार करून अचिरवती नदीत अंघोळ करून काठावर बसला. *नदीतील पाण्याचा फेस तयार होत होता पुन्हा फुटत होता यावर विचार करू लागला. ज्या प्रमाणे हा फेस उत्पन्न होऊन नष्ट होतो तसेच ह्या शरीराचेही आहे. तथागतांनी गन्धकुटीत बसुन त्या भिक्षुच्या विचारास जाणून "भिक्षु हे शरीर असेच आहे. फेस आणि मृगजळासमान, उत्पन्न आणि नाश पावणाऱ्या स्वभावाचे आहे."* असे म्हणाले आणि ही गाथा सांगितली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-३१/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - पुप्फवग्गो,_*

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 30 March 2024

स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - ८

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_83.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग ८_*

*_अंधश्रद्धेची बळी बाईच का?_*

                    _*आपण असा विचार केला पाहिजे की, अंधश्रद्धेची जास्त बळी बाईच का?* बाईच्या अंगामध्येच का येतं? भानामतीचे जे वगवेगळे प्रकार असतात, त्यांच्यामध्ये बहुधा बाईच एजंट कशी सापडते? म्हणजे आपोआप कपडे फाटणं, अंगावर बिब्ब्याचे डाग उठणं, आपोआप कपडे जळणं, घरावर दगडं येणं, अन्नामध्ये विष्ठा मिसळणं या भानामतीच्या बहुसंख्य प्रकारांमध्ये बहुधा स्त्रीच मागं असते, असं आपल्याला दिसतं._

                   _*या सगळ्या गोष्टी बाईच्या संदर्भात घडण्यामागचं साधं कारण म्हणजे, आपल्या समाजामध्ये बाईला दिल्या जाणाऱ्या गौणत्वामुळे बाईच्या मनातलं दुःखाचं धरण लवकर भरतं. धरण भरल्यानंतर जर धरणाचे दरवाजे उघडले नाहीत आणि पाण्याचा निचरा झाला नाही, तर पाण्याच्या दबावाने धरणाची भिंत कोसळते. त्याच पद्धतीने, अनेकविध सामाजिक कारणांनी बाईच्या मनातलं दुःखाचं धरण लवकर भरतं आणि त्यानंतर तिच्यासाठी दोनच मार्ग शिल्लक राहतात. एकतर स्वतःचं व्यक्तिमत्त्व छिन्नविछिन्न करून घेणं किंवा त्या दबावाने स्वतःच्या अंतर्मनाचे दरवाजे उघडणं - मग कधी हिस्टेरिकल कॉनव्हर्जन्स, कधी मगाशी सांगितलेलं अंग उडण्याचं लक्षण, कधी भानामतीचे प्रकार असं सगळं घडायला लागतं - आणि स्वतःचा ताण कमी करणं.*_

              _त्यामुळे स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयाचा आपण ज्या वेळी विचार करतो, त्या वेळी धर्माने तिला अंधश्रद्धेकडे किती लोटलेलं आहे, तिच्या शारीरिक भौतिकतेच्या असलेल्या दुर्लक्षामुळे ती अंधश्रद्धेकडे किती लोटली गेली आहे, तिच्या मानसिकतेमुळे ती अंधश्रद्धेकडे किती लोटली गेली आहे आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एक मानसिक गुलामगिरी निर्माण करून तिला पवित्र्य मानायला कसं शिकवलेलं आहे, असा सगळा नीट विचार आपण करायला पाहिजे._

               _*याचं अतिशय चांगलं उदाहरण, म्हणजे आपल्याकडची व्रतवैकल्यं. व्रतवैकल्य तरी कशाला, आपण सतीसारखी प्रथा घेऊ. पतीच्या निधनानंतर त्याचं शव मांडीवर घेऊन सती जाण्याची एक घटना १९८७ साली राजस्थानमध्ये देवराला इथे घडली. त्याच्यानंतर या जागी सतिस्थळ उभारणार होते. मात्र त्या कार्यक्रमावर त्या वेळच्या केंद्र सरकारने बंदी घातली, आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की, ती बंदी झुगारून हजारो स्त्री-पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी 'सती माता की जय' म्हणत त्या स्थळाकडे गेल्या. म्हणजे ती सती गेली, नवऱ्याच्या शवाबरोबर ती जाळली गेली याच्यामध्ये अन्याय वाटण्याऐवजी ती अभिमानाची गोष्ट असल्याचं मानलं गेलं. याच पद्धतीने आपण जी अनेक व्रतवैकल्यं करतो, तीही माणसं अभिमानाची बाब समजतात.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-३०/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

चतुर शिष्यच सुदेशित धम्म ग्रहण करील

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_चतुर शिष्यच सुदेशित धम्म ग्रहण करील_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_30.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_को इमं पठविं विजेस्सति यमलोकञ्च इमं सदवकं ।_*

 *_को धम्मपदं सुदेसितं कुसलो पुप्फमिव पचेस्सति ॥_*

*_अर्थ - या पृथ्वीला आणि देवलोकासहीत यम लोकाला कोण जिंकेल ? सुन्दन रीतीने उपदेशिलेल्या धर्मपदाला कोण कुशल पुरुष पुष्पाप्रमाणे वेचिल._*

                _पाचशे भिक्षु जनपदाच्या चारिकेवरून परतून सायंकाळी जेतवनाच्या आसन शाळेत बसून आपल्या प्रवासातील प्रदेशातील पृथ्वी सम्बन्धी बोलत होते. - " तेथील पृथ्वी काळी आहे, तेथील पृथ्वी पिवळी आहे." इत्यादी... तथागतांनी येऊन चर्चेच्या विषयासंबंधी विचारले - "भिक्षुंनो ! ही बाह्य पृथ्वी आहे, तुम्ही सर्वांनी आध्यात्मिक पृथ्वीत परिकर्म करावयास पाहिजे." असे म्हणाले व ह्या दोन गाथा सांगितल्या._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-३०/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - पुप्फवग्गो,_*

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Friday, 29 March 2024

पाली भाषेचे व्याकरण

  🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली भाषेचे व्याकरण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_84.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

पाठ पहिला : वर्णमाला व मूळाक्षरे


पाली भाषेच्या व्याकरणाच्या अनेक परंपरा असून त्यातील 'कच्चायन' आणि मोग्गलान' या दोन प्रमुख आचार्याच्या व्याकरण परंपरा महत्त्वाच्या मानल्या जातात. कच्चायन व्याकरण परंपरेतील एकूण वर्णसंख्या (मुळाक्षरे) काही भाषा तज्ञांच्या व विचारवंतांच्या मते ४० तर काहींच्या मते ४१ आहे. कारण काही ठिकाणी 'अ' या स्वर असलेल्या मूळाक्षरावर अनुस्वार देऊन 'अं' हे एक अतिरिक्त मूळाक्षर तयार केलेले असून त्यास व्यंजन मानले गेले आहे. त्यामुळे त्यात एक मुळाक्षर जास्तीचे मानले गेल्याने एकूण वर्णसंख्या ४१ झाली आहे. मोग्गलान व्याकरण परंपरेत मात्र एकूण ४३ वर्ण सांगितलेले आहेत. कच्चायन व्याकरण परंपरेतील वर्णमालेतील मुळाक्षरे अधिक प्रचलीत व मान्यताप्राप्त आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.


स्वर : कच्चायन व्याकरणातील स्वराक्षरे: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ.


व्यंजन : कच्चायन व्याकरणातील एकूण व्यंजनाक्षरे काही ठिकाणी ३२ तर काही ठिकाणी ३३ दिलेले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत


क,


ख,


ग,



ट, ठ,


ड,


घ,


च,


छ,


ज,


द,


झ, ञ


ढ,



त, थ,


ध, न


प, फ, ब,


भ,



य, र, ल,


व,


स, ह,


अं


ळ,


मराठी भाषेतील मुळाक्षरांमधील 'अं' हे वर्णाक्षर 'स्वर' आहे; परंतु पाली भाषेत मात्र ते व्यंजन मानले जाते. अशा अनेक गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या असल्यामुळे पाली भाषेच्या अध्ययनास प्रारंभ करताना सर्व प्रथम पाली भाषेचे प्राथमिक ज्ञान दर्शविणारी मूळ वर्णमाला जाणून घेणे आवश्यक आहे. स्वराक्षराच्या वर्णमालेप्रमाणे व्यंजनांच्या वर्णमालेतही प्रत्येकी आठ अक्षरे आहेत. ज्याप्रमाणे मराठीतील व्यंजनाक्षरास स्वराक्षर जोडले म्हणजे त्याचे पूर्ण अक्षर तयार होते. त्याच प्रमाणे पालीत सुद्धा व्यंजनास स्वर जोडून पूर्ण अक्षर तयार होत असतेः व त्यानुसार मूळाक्षरांची संपूर्ण वर्णमाला बनते. स्वराक्षरांप्रमाणे व्यंजनाक्षरांचे रूप देखील पाली भाषेत बदलत असल्याचे दिसून येते.



*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२९/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

अप्रमादीचे पतन होत नाही.

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्रमादीचे पतन होत नाही_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_84.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्पमादरतो भिक्खु पमादे भयदस्सि वा ।_*

*_अभब्बो परिहानाय निब्बानस्सेव सन्तिके ॥_*

*_अर्थ - जो भिक्षु अप्रमादात आनन्द मानतो व प्रमादाला भितो, तो निर्वाणाजवळ जातो. त्याचे पतन होणे संभवत नाही._*

           _श्रावस्ती जवळच्या निगम नावाच्या गावातील तिस्सस्थविर प्रव्रजित झाल्यापासुन नेहमी आपल्या गावातच पिण्डपाताकरिता जात असे. एके दिवशी भिक्षु बुद्धांस म्हणाले तो भिक्षु गृहस्थांमध्ये मिळून - मिसळून विहरतो, अन्यत्र भोजनाकरीता जात सुद्धा नाही. तथागतांनी त्याला बोलावुन विचारले - काय हे सत्य आहे, तू गृहस्थामध्ये मिळून - मिसळून विहरत असतो ? तो आपली बाजु मांडतांना म्हणाला - " भन्ते ! मला जेथे शीळे वाळले मिळते, त्यातच समाधान मानतो, पुन्हा अन्यत्र भोजनाकरीता घरे धुंडाळत नाही. गृहस्थांमध्ये मिळून मिसळून काय साध्य करीन ? " तेव्हा तथागत म्हणाले -_*'साधु "! भिक्षु !! तुझ्या सारखेच इतर भिक्षुंनी करावयास पाहिजे. अशा भिक्षुंचे मार्ग - फळा-पासून कधीच पतन होत नाही, तर तो निर्वाणाच्या अधिक जवळ जात असतो."* याच संदर्भात त्यांनी पुढील गाथा म्हणाले._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२९/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - ७

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_29.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग ७_*

*_मनाविकारामागील अंधश्रद्धा_*

                    _हे झाले शारीरिक आरोग्यव्यवस्थेचे प्रश्न, *परंतु मानसिक आजाराची जी अभिव्यक्ती बायकांमध्ये होते, ते निश्चितपणे अंधश्रद्धेचेच प्रकार मानले जातात. म्हणजे अचानकपणे बाईची छाती धडधडायला लागते, अंग कापायला लागतं, अंग उडायला लागतं, गळा आवळल्यासारखा वाटायला लागतो; काही काळ हे चालतं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी हे आपोआप बरं होतं किंवा काही वेळाने ते आपोआप बरं होतं; डॉक्टरकडे नेलं तरी बरं होतं; डॉक्टरकडे नेलं तरी ते परत परत उद्भवतं; मांत्रिकाकडे नेलं तरी ते बरं होतं; मांत्रिकाकडे नेलं तरी ते परत परत उद्भवतं; आणि त्यामुळे 'हे काहीतरी बाहेरचं आहे आणि हे अचानकपणे उद्भवलेलं आहे', अशी एक कल्पना निर्माण होते.*_

                _किंवा *याच्याही पुढची गोष्ट म्हणजे, अनेकदा अचानकपणे स्त्रीची वाचा जाते; तिला दिसेनासं होतं; हातपाय लुळे पडतात, परंतु हे सगळं घडण्यामागचं कारण न कळल्यामुळे - ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये हिस्टेरिकल कन्व्हर्जन्स म्हणतात-* पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन उपाय केले जातात. म्हणजे मला आठवतं, मी ज्या वेळी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होतो, त्या वेळी सहा-सहा बेड्सवरचे रुग्ण आम्हांला तपासायला दिलेले असायचे. *एकदा माझ्याकडे असलेल्या बेडवर एक १८-१९ वर्षांची सुस्वरूप तरुणी आली. तिला अर्धांगवायू झालेला होता. तिचं अर्धं अंग पूर्णपणे लुळं पडलेलं होतं. आता अर्धांगवायू हा १८-१९व्या वर्षी होण्यासारखा आजार नाही. त्यामुळे तिला अर्धांगवायू का झाला असवा, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये फार कुतूहल होतं. तिच्या हृदयामध्ये एक बारीक भोक होतं. त्यामुळे असं निदान करण्यात आलं की, रक्ताची गुठळी मेंदूमध्ये अडकल्यामुळे तिला अर्धांगवायू झाला.* अर्धांगवायू झाल्यावर काही दिवसांनंतर त्याच्यावर होण्यासारखे उपचार खूपच कमी असतात आणि त्या काळात तर ते आणखी कमी होते. त्यामुळे ज्या आजारावर उपचार शक्य नसतात, असा आजार झालेल्या रुग्णाला अॅडमिट करून ठेवण्यात काही अर्थ नसतो. म्हणून शेवटी तिला घरी पाठवायचं ठरलं._

           _*आम्हा तरुण मित्रांना वाटत होतं की, 'अरे, या बाईचं उभं आयुष्य कसं जाईल!' म्हणून त्या वेळेचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. देप सिकदार यांना आम्ही म्हणालो, "सर, तिचं सायकोनार्कोसिस करा किंवा नॉर्कोअॅनालिसिस करा". सायकोनार्कोसिस किंवा नार्कोअॅनालिसिस करताना सोडियम पेंटथॉल नावाचं एक विशिष्ट द्रव्य रुग्णाला दिलं जानं. ते दिल्यानंतर रुग्णाच्या बाह्य मनावरचा ताण कमी होतो आणि अंतर्मनामध्ये लपलेल्या गोष्टी रुग्ण बोलायला लागतो. ज्या वेळी या मुलीचं नार्कोसिस केलं, त्या वेळी काय लक्षात आलं ? - तिला हे लग्न अजिबात करायचं नव्हतं. तिचं एका दुसऱ्या तरुणावर प्रेम होतं. घरच्यांच्या दबावाखाली तिचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर तिचा नवरा तिचा कायदेशीर पती बनला. कायदेशीर पती बनल्यामुळे तिचा त्याच्याशी शरीरसंबंध आला. हा शरीरसंबंध नाकारण्याची कोणतीच योजना तिच्याकडे नव्हती, पण तिला तो शरीरसंबंध इतका नकोसा वाटत होता की, तिच्या शरीराने तो नाकारला आणि तिच्या शरीराची अर्धी बाजू लुळी पडली.*_

               _*म्हणजे आजार होता मानसिक; त्याचं दृश्य चित्र झालं शारीरिक. त्यामुळे उपचार या मुलीच्या 'मनावर' करायला हवा होता. त्याप्रमाणे मनावर उपचार केल्यानंतर अर्धांगवायू झालेली ती मुलगी पुढच्या आठ दिवसांमध्ये खडखडीत बरी झाली; पण जर हीच बाई बाहेर एखाद्या मांत्रिकाकडे, भगताकडे, देवऋषिकडे, बाबा-बुवाकडे गेली असती आणि त्याच्या औषधाने आणि अंगाऱ्याने बरी होऊ शकली असती, कारण तिच्या तुटलेल्या मनाला त्याने योग्य तो आधार दिला असता, तर आपण म्हणालो असतो की, 'बाहेरची बाधा असते आणि ती बाधा मांत्रिकाला, देवऋषिला दूर करता येते. या बाधेसाठी डॉक्टरांचा काही फायदा होत नाही'. हे सगळं जे मी आपल्याला सांगतोय, याचा अर्थ असा की, बाईचं मन आजारी पडतं.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२९/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Thursday, 28 March 2024

अप्रमादीच (भिक्षु ) प्रगती करतो.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्रमादीच (भिक्षु ) प्रगती करतो._*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_36.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्पमादरतो भिक्खु पमादे भयदस्सि वा ।_*

*_संयोजनं अणुं थूलं डहं अग्गी व गच्छति ॥_*

*_अर्थ - जो भिक्षु अप्रमादात आनन्द मानतो व प्रमादाला भितो तो अग्नी प्रमाणे लहानमोठ्या बन्धनांना जाळीत पूढे जातो._*

जेतवनातील एक भिक्षु तथागतांजवळ कम्मट्ठान शिकून अरण्यात निघुन गेला. प्रयत्नांची पराकाष्ठा करून जेव्हा तो अर्हतपद प्राप्त करू शकला नाही, तेव्हा तो पुन्हा परत भगवंताकडे यावयास निघाला. मार्गात दावाग्नी भडकला होता. भीतीने तो एका छोट्या पर्वतावर चढला आणि त्या आगीकडे पहात विचार करू लागला - *"ज्या प्रमाणे ही आग लहान मोठ्या सर्व तृणास जाळत चालली आहे, त्याचप्रमाणे श्रेष्ठ मार्गाचे ज्ञान लहान मोठा सर्व क्लेशास जाळत असावे."* बुद्धांनी गंधकुटीत बसुन त्याचे विचार जाणून - "असेच आहे भिक्षु ! असेच आहे भिक्षु ! *ज्ञानाच्या अग्निने ह्या लहान मोठ्या सर्व क्लेशांना जाळून टाकावे जेणेकरून ते पुन्हा उत्पन्न होण्याच्या योग्य राहणार नाहीत."* असे म्हणाले.

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२९/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - ६

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_28.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग ६_*

*_मूल होण्याचे दडपण_*

                 _स्त्रीला मूल होण्या-न होण्यापासून या व्यापकत्वाची सुरुवात होते. म्हणजे मला या संदर्भातली चळवळीतली एक घटना आठवते. *नगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामधला मालचौंडी गावामधला डोह. 'संतती नसलेल्या बायकांनी जर तिथे येऊन अंघोळ केली, तर त्यांना मूल होतं', अशी त्या डोहाची प्रसिद्धी आहे. कृष्णा बाजीराव रेपाळे, म्हणजे बाजीराव रेपाळे यांची दुसरी बायको. त्यांच्या पहिल्या बायकोला १० वर्षं मूल नव्हतं. मग त्यांनी दुसरी बायको केली. दुसऱ्या बायकोलाही पुन्हा दोन वर्ष मूल झालं नाही. मग त्यांनी तिला मालचौंडीच्या डोहामध्ये आणायचं ठरवलं. जो डोह दिवसा बघतानादेखील आपल्याला भीती वाटते, त्या डोहाच्या जवळ ती बाई आली. ती बाई त्या डोहामध्ये अंघोळीला उतरली आणि काही वेळाने म्हणाली की, "मी आता या डोहामध्येच सात दिवस राहणार आहे आणि सातव्या दिवशी तुम्ही मला न्यायला या". आणि बघता बघता त्या डोहामध्ये ती गरागरा फिरायला लागली. काही काळ गेला. त्याच्यानंतर ती पाण्यावर तरंगायला लागली आणि किनाऱ्यापासून वीसेक फुटांवर एका बाजूला येऊन पाण्यावर तरंगणारा तिचा देह दिसायला लागला. काय झालं असेल, हे आपण समजू शकता. परंतु लोकांनी असं मानलं की, ही बाई अशीच पाण्यावर सात दिवस तप करणार आहे.*_

                 _मग बघता बघता त्या डोहाला धर्मस्थळाचं स्वरूप प्राप्त झालं. तिथे अनेक लोक बैलगाड्या करून, जीप करून, टॅक्सी करून यायला लागले आणि त्या बाईचं दर्शन घ्यायला लागले. *तेव्हा आम्ही पोलिसांकडे गेलो. पोलीस म्हणाले, 'तुम्हा लोकांचा कशावरच विश्वास नाही. बघा तुम्ही, सात दिवसांनी ती ज्या वेळी जिवंत होईल किंवा ती जिवंतच आहे आणि तप करतीये, हे तुमच्या लक्षात येईल, त्या वेळी तुम्हांला कळेल'. त्याच्यानंतर हे प्रकरण फारच पेटलं. शेवटी आमच्या दबावामुळे डीएसपीला कारवाई करावी लागली. इंग्रजी वृत्तपत्रांनी हे प्रकरण उचलून धरलं. त्यामुळे डीएसपीची काहीशी बदनामी झाली.*_

                 _त्याच्यानंतर नगरच्या डीएसपीने पोलिसांचं एक प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं. त्या प्रशिक्षण शिबिराला मी गेलो होतो. त्या *प्रशिक्षण शिबिरामध्ये ४००-५०० पोलिसांसमोर बोलताना मी म्हणालो की, "तुमच्या हे लक्षात आलं का की, त्या तप करणाऱ्या बाईच्या, म्हणजे उषा बाजीराव रेपाळेच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत?" तर ते पोलीस एकमेकांकडे पाहायला लागले की, 'आपला संबंध काय! ती बाई अंधश्रद्धाळू होती आणि त्या अंधश्रद्धेपायी तिने स्वतःचा जीव गमावला', पण तिने स्वतःचा जीव का गमावला ? कारण तिला मूल नव्हतं; मूल होण्याची शक्यता नव्हती; नवरा तपासून घ्यायला तयार नव्हता; आणि मूल नसलेल्या बाईला समाजामध्ये ज्या स्वरूपाची मानहानीची वागणूक मिळते, ती सोसण्याची तिची तयारी नव्हती. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की, स्त्रीच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे संबंध त्या खीला कळत-नकळत, पण निश्चितपणे अंधश्रद्धेच्या मानसिक गुलामगिरीकडे ढकलत असतात.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२८/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Wednesday, 27 March 2024

उद्योगी आणि जागृत माणूस आळशी माणसाच्या पुढे जा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_उद्योगी आणि जागृत माणूस आळशी माणसाच्या पुढे जातो_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/29.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्पमत्तो पमत्तेसु सुत्तेसु बहुजागरो ।_*

*_अबलस्सं व सीघस्सो हित्वा याति सुमेधसो ॥_*

*_अर्थ - वेगवान घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून जसा सरसावतो त्याचप्रमाणे बुद्धिमान पुरूष प्रमत्त लोकात अप्रमत्त व झोपी गेलेल्यामध्ये जागरणशील राहुन पुढे जातो._*

         _जेवणामध्ये दोन मित्र भगवंतांजवळ प्रव्रजित होऊन ध्यान धारणेसाठी - अभ्यासासाठी अरण्यात निघुन गेले. त्यातील एकाने सतत प्रयत्नाने थोड्याच दिवसात अर्हतपद प्राप्त केले. दुसरा आपला सारा वेळ अग्निने आपले शरीर तापवुन खाने - पिणे व झोपणे यात घालवित होता. जेव्हा वर्षावासानंतर ते तथागताकडे आले तेव्हा तथागतांनी विचारले "अप्रमादाने श्रमणधर्म केला की नाही" ? हे एकूण दुसरा म्हणाला - " भन्ते ! हा अप्रमादी कुठे ? जाण्याच्या क्षणापासुन आळसात झोपेत कुशी बदलत वेळ घालवित होता. " " परन्तु तू भिक्षु " ? " भन्ते ! मी भल्या सकाळीसच लाकडे आणून ते जाळत प्रथम प्रहरात आंग तापत बसून न झोपता वेळ घालवीत होतो. तेव्हा तथागताने तू प्रमत्त होवून वेळ घालविला आणि अप्रमत्त आहो असे म्हणतोस आणि अप्रमत्तास प्रमत्त म्हणत आहेस. तू माझ्या पुत्रांपुढे दुर्बल घोड्याप्रमाणे आहेस, परन्तु हा तुझ्यापुढे वेगवान घोड्यासारखा आहे. असे म्हटले आणि त्यांनी ही गाथा म्हटली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२७श८/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

स्त्रिया आणि अंधश्रध्दा निर्मूलन - ५

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_27.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग ५_*

*_कुपोषणाचे महत्त्वाचे कारण उपवास_*

                _मात्र हे उपासतापास करताना नेमकं काय घडतंय, याचा कार्यकारणभाव आपण कधीच विसरलेला असतो. म्हणजे मला आठवतं की, एकदा माझ्या दवाखान्याचा जिना चढून एक बाई वर आली. ती घामाने डबडबलेली होती. तिला धाप लागलेली होती. तिला बराच मोठा आजार झाला असावा, असं तिच्या घरच्यांना वाटत होतं. माझ्या पत्नीने तिला टेबलवर झोपवलं; तपासलं आणि माझ्या पत्नीच्या लक्षात आलं की, तिला कुठलाच आजार झाला नव्हता, तर तिच्या खाण्यापिण्याची दीर्घ काळ आबाळ झालेली होती. तिच्या अंगातलं रक्त खूप कमी झालेलं होतं आणि तिला होणार त्रास त्या अशक्तपणामुळे, रक्त कमी झाल्यामुळे होत होता. अशा रुग्णाला अर्थातच औषधं लिहून देण्याच्या आधी योग्य प्रकारचा आहार देण्याची गरज असते. *त्याच्यामुळे तो आहार जर द्यायचा असेल, तर स्वाभाविकपणे एकतर त्या बाईच्या सासूला सांगावं लागतं; नाहीतर तिच्या 'ह्यांना' सांगावं लागतं. कारण सासुरवाशिण स्वतःच्या हातांनी घरात चांगल्याचुंगल्या गोष्टी करून खाऊ शकेल, असं वास्तव आजही नाही.* त्याच्यामुळे मी तिच्या 'ह्यांना' बोलवलं आणि त्यांना सांगितलं की, "हे बघा, एक गोष्ट चांगली आहे की, तुमच्या पत्नीला कुठलाही आजार झालेला नाही; मात्र तिच्या खाण्यापिण्याची दीर्घ काळ आबाळ झालेली आहे. त्यामुळे यापुढे तीन महिने तरी तिला रोज घट्ट डाळीचं वरण द्यायचं. म्हणजे तिला प्रथिनं मिळतील; मोड आलेली कडधान्यं द्यायची. म्हणजे तिला अमायनो अॅसिड्स मिळतील. तिला सकाळ- संध्याकाळ एकेक कप दूध द्यायचं. म्हणजे तिला कॅल्शिअम मिळेल; सकाळ- संध्याकाळ एकेक अंड द्यायचं. म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटिन्स मिळतील. आठवड्यातनं दोनदा तरी तिला मांसाहार द्यायचा. आणि हे तुम्हांला परवडत नसलं, तरी तीन महिने तुमच्या पत्नीसाठी हा खर्च तुम्ही केला पाहिजे". आता अनुभव असा की, असं काही सांगितलं की, रुग्णाचे नातेवाईक ऐकतात आणि मान डोलावतात. कारण ते डॉक्टरांचं ऐकायलाच डॉक्टरकडे आलेले असतात. इथं मात्र विपरीत अनुभव आला._

             _*तो नवरा उसळून म्हणाला, "डॉक्टर, परवडण्याचा प्रश्नच नाही. आमच्याकडे मोप दूधदुभतं आहे. आमच्याकडे अंडी-कोंबड्या आहेत. आम्ही हिला रोज मांसाहार देऊ शकतो; पैसाअडक्याची काहीही अडचण नाही. पण हिचा सोमवारचा उपवास असणार; मंगळवारचा असणार; गुरुवारचा असणार; शुक्रवारचा असणार. हिचे आत्ता सोळा श्रावणी सोमवार संपले. त्याच्यानंतर मग नवरात्राचे नऊ उपवास झाले. आता हिचे सूर्यनारायणाचे उपवास येणार. हिचे उपवास संपणार कवा, ही जेवणार कवा आणि हिची तब्येत सुधारणार कवा!" म्हणजे, खायला मिळत नाही म्हणून अशक्तपणा आहे, हे वाईटच आहे, पण खायला मिळण्याची शक्यता असूनदेखील कुठल्या ना कुठल्या चुकीच्या कल्पनेमुळे, अंधश्रद्धेपोटी, सातत्याने चालू असलेल्या उपवासांमुळे स्वतःच्या तब्येतीची बरबादी होणं, हे मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे. या प्रश्नामागचं हे व्यापकत्व आपण समजून घेतलं पाहिजे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२७/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Tuesday, 26 March 2024

शहाणे लोक अप्रमादाचे धनासारखे रक्षण करतात.

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शहाणे लोक अप्रमादाचे धनासारखे रक्षण करतात_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_26.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पमादमनुयुञ्जन्ति बाला दुम्मेधिनो जना ।_* 

*_अप्पमादंच मेधावी धनं सेट्ठं व रक्खति ॥_*

*_अर्थ - मुर्ख, असमंजस लोक आळसात मग्न राहतात. बुद्धिमान पुरूष श्रेष्ठ धनाप्रमाणे आपल्या उत्साह शीलतेचे रक्षण करतात._*

                  _त्या काळी भारतातील काही भागात अशी एक प्रथा होती की सातदिवस केवळ मौजेसाठी म्हणून कुणाविषयी ही कठोर भाषा वापरण्यास मुभा होती, *त्याला ते बाल-नक्षत्र म्हणत असे (हाच सण पुढे जाऊन होळी म्हणून प्रचलित झाला असे माझे वैयक्तिक मत आहे... कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे)* त्या काळात बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांना उपासक विहारातून बाहेर पडू नका अशी विनंती करीत असे तसेच त्या सर्व काळात उपासक - उपासिका स्वतःहुन भगवंत आणि त्यांच्या शिष्यांसाठी भोजन घेऊन विहारात जात असत._

                 _श्रावस्तीमद्ये बाल-नक्षत्राची घोषणा झाली. एक आठवड्या पर्यन्त उपासक उपासिका घराबाहेर पडले नाही तसेच भिक्षु पिण्डपाता करीता नगरात गेले नाही. *आठवडा संपल्यावर आठव्या दिवशी तथागतांबरोबरच भिक्षुसंघाला महादान देतांना उपासक तथागतांना म्हणाले " भन्ते ! हे दिवस आमचे फारच दुःखात गेले. मुर्खांच्या शिव्या ऐकणाऱ्याचे कान फुटल्यासारखे होत होते, कोणीही कशाचीही लज्जा बाळगीत नव्हता."*_

          _तथागतांनी त्यांचे ऐकले आणि त्यावर ते म्हणाले - *मुर्ख आणि गावंढळाचे काम असेच असते, परन्तु बुद्धिवान लोक श्रेष्ठ धनाच्या समान अप्रमादाचे रक्षण करून अमृत महानिर्वाण सम्पत्तिस प्राप्त करतात.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२७/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  

Monday, 25 March 2024

स्वतः करिता व्दीप बनवावे

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्वतःच्या उद्धाराकरिता द्वीप बांधावे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_92.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_उट्ठानेनप्पमादेन सञ्ञमेन दमेन च ।_*

*_दीपं कयिराथ मेधावी यं ओघो नाभिकीरति ॥_*

*_अर्थ - मेधावी पुरूष उद्योग, अप्रमाद, संयम आणि नियंत्रणाने स्वतः करिता असे व्दीप बनवितो ज्याला ओघ बुडवू शकत नाही._*

                 _राजगृहातील वेणुवन विहारात महापन्थक आणि चुल्लपन्थक नावाचे दोन भाऊ भिक्षु होते. महापन्थक भिक्षु होऊन फारच थोड्या दिवसात अर्हत झाला. चुलपन्थक मन्दबुद्धीचा होता. तो एका गाथेस चार महिन्यात सुद्धा कण्ठस्थ करू शकला नाही. म्हणून महापन्थकाने त्याला विहारातुन निघुन जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तो विहारातुन निघुन जात असतांना तथागतांनी त्याला थांबवुन उपदेश केला आणि सकाळपासुन दुपार पर्यन्तच विपश्यना करून प्रतिसम्भिदासहित त्याने अर्हतपद प्राप्त केले. सायंकाळी भिक्षु बुद्धांस म्हणाले - "भन्ते ! चुलपन्थक तर चार महिण्यात एक गाथा सद्धा स्मरणात ठेऊ शकला नाही आणि तो आजच काही अवधीतच अर्हत झाला ?" तेव्हा बुद्ध म्हणाले भिक्षुंनो ! उद्योगी पुरूष लोकोत्तर धर्मास प्राप्त करितच असतो. असे म्हणुन त्यांनी हि गाथा सांगितली.

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२६/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  


स्त्रिया आणि अंधश्रध्दा निर्मूलन - ४

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_25.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग ४_*

          *_महिलांचे कुपोषण_*

                      _त्याच्यानंतर एका वेगळ्या मुद्याकडे आपण वळू. आजही *भारतामधल्या कुपोषित महिलांचं प्रमाण जवळजवळ ५७ टक्के आहे. या महिलांच्या अंगामध्ये पुरेसं रक्त नसतं. त्याला आपण  ऍनिमिया म्हणतो.* या ऍनिमिक स्त्रियांना स्वतःची दैनंदिन कामं पार पाडत असताना अनेक प्रकारच्या थकव्यांना, आजारांना तोंड द्यावं लागतं. तेव्हा एका बाजूला ही स्त्री कुपोषित असते; घरामध्ये ती सगळ्यात शेवटी जेवते; 'जे शिल्लक असेल, उरलेलं सुरलेलं असेल, तेच तिने खायचं', असा नियम असतो._

               _आज लग्नाचं वयाचं अधिकृतपणे १८ असतानाही महाराष्ट्रातली जवळजवळ ३५ टक्के ते ४० टक्के लग्नं १६व्या आणि १७व्या वर्षीच होतात. त्याच्यानंतर ती स्त्री गरोदर राहते. तिच्या शरीराची पुरेशी वाढ झालेली नसते; गर्भाशयाची पुरेशी वाढ झालेली नसते; मनाची पुरेशी वाढ झालेली नसते. अशा वेळी तिच्या शरीरावर गरोदरपणाचा ताण येतो. त्याच्यानंतर ती प्रसूत होते. *आजही भारतामध्ये गरोदरपणात मृत पावणाऱ्या महिलांची संख्या शेजारच्या टीचभर बांग्लादेशापेक्षाही जास्त आहे आणि प्रसूत झाल्यानंतर जन्माला आलेल्या नवजात अर्भकांच्या मृत्यूची संख्या (शून्य ते एक या वर्षाच्या कालावधीचा विचार करता) शेजारच्या टीचभर श्रीलंकेपेक्षा आजही जास्त आहे.*_

                 _हे सगळं सांगण्यामागचं कारण स्त्रीच्या आरोग्याचा पंचनामा करणं नसून, ज्या वेळेला अशा स्वरूपाची मानसिकता समाजात अस्तित्वात असते, त्या वेळेला वर सांगितलेल्यापैकी प्रत्येक गोष्ट या स्त्रीला अंधश्रद्धेकडे ढकलत असते, हे आहे. म्हणजे स्त्रिया जे उपवास करतात, ते सगळे उपवास कशाकरता असतात ? एकतर चांगला नवरा मिळावा म्हणून असतात किंवा मुलाचं कल्याण व्हावं म्हणून असतात. त्यामुळे 'आपल्याला लवकर मूल व्हावं, त्या वेळी गरोदरपण झेपावं, मुलगाच जन्माला यावा' ही सगळी तिच्या व्रतवैकल्यांमागची कारणं असतात. या सगळ्या संदर्भात आज एक प्रचंड प्रकारची अस्थिरता अस्तित्वात आहे. त्यामुळे ही सर्व भौतिकता त्या बाईला या अस्थिरतेकडे आणि अस्थिरतेमधनं अंधश्रद्धेकडे ढकलत असते. म्हणजे *आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की, मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे खरं म्हटलं तर पुरुषापासून बाईला जी रंगसूत्रं-गुणसूत्रं मिळतात, त्यांच्यावर अवलंबून असतं.* पण तरीदेखील, बाई गरोदर राहिल्यानंतर 'मुलगाच व्हायला पाहिजे', या हट्टापायी अजूनही तिची सोनोग्राफी केली जाते आणि नंतर भ्रूणहत्या केली जाते. ही पुन्हा एकदा तिच्या दुय्यमत्वाची साक्ष आहे. तसंच 'गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे, हे आम्हांला बघायचं आहे आणि जर मुलगी असेल, तर ती आम्हांला नको', असा अनेक स्त्रियादेखील दुर्दैवाने आजही आग्रह धरतात. आणि म्हणून, हे सगळं टळावं म्हणून त्यांचे उपासतापास चालू असतात._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२५/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Sunday, 24 March 2024

अप्रमादयाची यश वृद्धी होते

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_नियमीत ध्यान करणाऱ्यांना निर्वाण पद प्राप्त होते_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_0.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_ते झायिनो साततिका निच्चं दळ्ह परक्कमा ।_*

*_फुसन्ति धीरा निब्बानं योगक्खेमं अनुत्तरं ॥_*

*_अर्थ - जे नियमीत ध्यानाचा अभ्यास करणारे, नित्य पराक्रमी वीर पुरूष परमश्रेष्ठ, योगश्रेय निर्वाण पद प्राप्त करतात._*

               _राजगृह नगरात कुम्भघोसक नावाचा एक सावकाराचा मुलगा रहात होता. त्याचे आई - वडील बालपणीच त्याला खजिन्याची माहिती देवून अहिघातक आजाराने मृत्यू पावले. कुम्भघोसक मोठा झाल्यावरही त्या खजिण्याचा उपभोग न घेता मजूरी करूनच आपला उदरनिर्वाह करीत होता. जेव्हा राजा बिम्बिसारास त्या खजिण्याची माहिती मिळाली तेव्हा त्याने तो खजिना आणून त्या श्रेष्ठी पुत्रास कन्या देऊन त्याला श्रेष्ठी केले. एके दिवशी बिम्बिसार राजा कुम्भघोसका सोबत तथागतांकडे आले आणि हा सारा वृत्तान्त सांगितला. *बुद्ध म्हणाले - "महाराज असे जगणाऱ्याचे जीवन धार्मिक असते. जो पापकर्म टाळुन पुण्य सम्पादून सम्यक् आजिविकेने जगतो. त्याची यश वृद्धी होतच असते."* त्यानंतर त्यांनी ही गाथा सांगितली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२५/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  


स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - ३

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_51.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग ३_*

*_कावेबाज धर्म_*

             _एवढं गौणत्व एवढं दीर्घ काळ कसंकाय चाललं? या प्रश्नाचा शोध घेताना माझ्या असं लक्षात आलं की, हा स्त्रियांच्या बाबत धर्मांचा कावेबाजपणा आहे. म्हणजे *सगळ्याच धर्मांनी स्त्रीला दुय्यमत्व दिलं, याचं कारण, सगळेच धर्म पुरुषांनी लिहिलेले आहेत.* यहुदी धर्मामध्ये म्हटलेलं आहे की, 'भाकरी करताना करपली, तर बाईला घटस्फोट द्यावा'. आता न करपवता जन्मभर भाकरी करणारी बाई अजून जन्माला यायची आहे.

                _किंवा इस्लाममध्ये म्हटलेलं आहे की, 'नवऱ्याने जर तीन वेळेला (फोनवरूनदेखील) आपल्या पत्नीला 'तलाक दिया, तलाक दिया, तलाक दिया' असं सांगितलं, तर तलाक दियाच'. म्हणजे बायकोचा काहीही दोष नसताना नवरा- बायकोचं नातं संपुष्टात येतं; आणि तिला जी पोटगी मिळण्याची तरतूद या धर्मात होती, तीही नंतर नाकारण्यात आली. कारण मुस्लीम मुल्लामौलवी म्हणाले की, 'हिंदूंमध्ये 'लग्न' हा संस्कार आहे. कसा का असे ना, दारू पिऊन लाथ का घालेना, परंतु जन्मोजन्मी त्योच नवरा पाहिजे. मात्र मुसलमानांमध्ये 'लग्न' हा करार आहे; घरमालक आणि भाडेकरू यांचा असतो तसा. घरमालक भाडेकरूला म्हणू शकतो की, 'मी तुला घराच्या बाहेर काढलं'. भाडेकरू घरमालकाला म्हणू शकतो, 'मी तुझं घर सोडलं'. घरमालक दुसरा भाडेकरू ठेवायला मोकळा असतो; भाडेकरू दुसरं घर बघायला मोकळा असतो. त्यामुळे आमच्या धर्माच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमच्या धर्मातल्या महिलांना तलाक दिल्यानंतर पोटगी देणं लागत नाही'._

               _किंवा ख्रिश्चन धर्माच्या सांगण्यानुसार, मुळातच जगाची निर्मिती कशी झालेली आहे? अॅडम आणि इव्हपासून झालेली आहे; पण अॅडम'नंतर' इव्हची निर्मिती झालेली आहे. लक्षात घ्या, ती अॅडमपासून, अॅडमच्या एका बरगडीपासून आणि अॅडमच्या नंतर झालेली आहे. म्हणजे, या धर्मानुसार स्त्री ही पुरुषाच्या 'नंतर' आली; पुरुषाच्या 'साठी' आली आणि पुरुषाच्या एका बरगडीपासून तिची निर्मिती होऊ शकेल, एवढीच तिची योग्यता आहे. आणि मग ते जे कोणतं स्वर्गामधलं अत्यंत सुंदर झाड होतं... आणि 'त्या झाडावरची फळं खायची नाहीत', अशी जी आकाशातल्या बापाची आज्ञा होती, ती आकाशातल्या बापाची आज्ञा मोडण्याचा मोह त्या बाईला झाला, म्हणजे इव्हला झाला, तिने अॅडमकडे तसा आग्रह धरला आणि ते जे ज्ञानाचं फळ खाण्याचा आग्रह तिने धरला, त्या आद्य पापामुळे जगाची निर्मिती झाली. म्हणजे पुन्हा ख्रिश्चन धर्मामध्येदेखील स्त्रीला दुय्यमत्व आहे._

              _किंवा दिगंबर जैन धर्मामध्ये स्त्रीला मोक्षाचा अधिकार देण्यात आलेला नाही. पती कसा का असेना, दारू का पिईना, जुगार का खेळेना, वेश्येकडे का जाईना, पण हिंदू धर्मामध्ये 'पती हाच पमरेश्वर आहे', असं एका बाजूला मानायला सांगितलं गेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुळशीदासांसारख्यांनीदेखील म्हटलेलं आहे -_

*_ढोल, गंवार, शूद्र, पशु, नारी सकल ताड़ना के अधिकारी_*

                  _गवार, म्हणजे अडाणी माणूस. क्षुद्र, म्हणजे दलित. पशु, म्हणजे प्राणी आणि नारी, म्हणजे स्त्री. या सगळ्यांना काठीने मारणं (ताडन करणं) यात धार्मिकदृष्ट्या काहीही चुकीचं नाही, अशा स्वरूपाची एक स्पष्ट नोंद तुळशीदासाने केलेली आहे. हे सगळं जर आपण नीट बघितलं, तर स्त्रीला अंधश्रद्धेमध्ये लोटणाऱ्या गौणत्वाची सुरुवात धर्मापासून कशी होते, हे आपल्याला समजू शकेल._


*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२५/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर *_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 23 March 2024

अप्रमादी लोक शहाणे असतात.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्रमादी लोक शहाणे असतात_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_24.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्पमादो अमतपदं पमादो मच्चुनो पदं ।_*

*_अप्पमत्ता न मीयन्ति ये पमत्ता यथा मता ॥_* 

_*अर्थ - दक्षता अमरत्व आहे. प्रमाद मृत्यूपद आहे. अप्रमत्व हे कधीच मरत नाहीत. परन्तु प्रमत्त हे मृतवतच आहेत.*_

                  _*कोशंबीचा राजा उदयनाची राणी मागन्दिय हिने तथागतांशी शत्रृत्व ठेऊन बुद्धांची भक्तिनी सामावति नावाच्या राज्याच्या दुसऱ्या राणीस आणि तीच्या पाचशे मैत्रीणीसहित अन्तःपुरास आग लाऊन जाळून टाकले.* भिक्षुंनी पिण्डपाताच्या वेळी हे पाहिले आणि ते बुद्धांकडे आले आणि त्यांनी त्यांना तिच्या गति बाबत विचारले. बुद्ध म्हणाले - *" भिक्षुंनो ! त्या उपासिकांमध्ये काही स्रोतापन्न, काही सकृतागामि आणि काही अनागामि होत्या. त्यांचा मृत्यू निष्फळ नाही. जे प्रव्रजित वा गृहस्थ प्रमादासह वागणारे असतात, ते हजारो वर्षे जगुनही मेल्यासारखे असतात. परंतु जे अप्रमादाने वावरणारे असतात ते मरूनही जिवंत असतात. मागन्दिय जिवन्त असुनही मेल्यासारखी होती. परन्तु ती आपल्या मैत्रीणीसह मरुनही जिवंतच आहे. सामावतीसारख्या मरत नसतात.* याचीच पृष्टि करतांना भगवंतांनी ही गाथा सांगितली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२४/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  -

स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - २

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_23.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग २_*

 *_स्त्रीचे जीवन पुरुषाधारित_*

                  _हा सगळा आंतरविरोध आपण नीट समजून घ्यायला हवा. एकाच वेळेला स्त्रीची जी दोन विदारक रूपं आपल्यासमोर येतात, त्यांच्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं बहुआयामित्व लक्षात येतं आणि स्त्री अजूनही वामांगीच, म्हणजे डाव्या बाजूला, कमअस्सल बाजूला, अपवित्र बाजूला बसलेलीच का मानण्यात आलेली आहे, हे आपण जर शोधायला लागलो, तर 'स्त्रिया आणि अंधश्रद्धा' या प्रश्नाचं व्यापकत्व आपल्या लक्षात येतं. म्हणजे कुठलीही स्त्री 'कुमारी' असते. तिचं लग्न उशिरा झालं, तर ती 'प्रौढ कुमारी' बनते. लग्न ठरलं की, तीच 'सौभाग्यकांक्षिणी' बनते; लग्नं झालं की, 'सौभाग्यवती' बनते; नवऱ्याने घटस्फोट दिला, तर 'घटस्फोटिता' बनते; नवऱ्याने टाकून दिलं, तर 'परित्यक्ता' बनते; नवरा मरण पावला, तर 'विधवा' बनते. म्हणजे प्रत्येक वेळेला ती पुरुषाच्या संदर्भातच असते; ती स्वतः कोणी नसतेच. म्हणजे परित्यक्ता या शब्दामध्ये 'नवऱ्याने बायकोला टाकून देणं' गृहीत आहे. 'बायकोने नवऱ्याला टाकून देणं' या कृतीला मराठीमध्ये शब्ददेखील नाही._

                _*याचा अर्थच असा की, स्त्रीचं सगळं जीवन पुरुषांशी संबंधित असतं.* म्हणजे तिचा नवरा जिवंत आहे की नाही, याच्याशी तिचा थेट संबंध नसतो. कधी तो लढाईमध्ये मारला जातो, कधी तो अपघातामध्ये मरण पावतो, कधी दारू पिऊन तो स्वतःच्या तब्येतीची बरबादी करून घेतो आणि मरण पावतो; *परंतु एकदा स्त्रीचा पती मरण पावला की, मग ना तिला कुठल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवलं जातं, घराची पायाभरणी वगैरे मंगल कार्यं ना तिच्या हातून केली जातात किंवा ज्या मुलीला या स्त्रीने स्वतःच्या पोटात नऊ महिने वाढवलेलं असतं, त्या मुलीच्या कन्यादानाचा अधिकारही या स्त्रीला मिळत नाही. आता कन्यादान करावं का करू नये, याचं साधं उत्तर असंच आहे की, कन्या ही काही दान करण्याची वस्तू नाही, त्यामुळे दान करूच नये, 'पण तू बाई आहेस आणि तुझा नवरा जिवंत नाही, म्हणून कन्यादान करण्याचा अधिकार तुला नाही', असं म्हणणं, याचा अर्थ, स्त्रीला सर्व बाजूंनी गौणत्व देण्यात आलेलं आहे, असाच आहे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२३/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर *_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...