🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अप्रमादी लोक शहाणे असतात_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_24.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अप्पमादो अमतपदं पमादो मच्चुनो पदं ।_*
*_अप्पमत्ता न मीयन्ति ये पमत्ता यथा मता ॥_*
_*अर्थ - दक्षता अमरत्व आहे. प्रमाद मृत्यूपद आहे. अप्रमत्व हे कधीच मरत नाहीत. परन्तु प्रमत्त हे मृतवतच आहेत.*_
_*कोशंबीचा राजा उदयनाची राणी मागन्दिय हिने तथागतांशी शत्रृत्व ठेऊन बुद्धांची भक्तिनी सामावति नावाच्या राज्याच्या दुसऱ्या राणीस आणि तीच्या पाचशे मैत्रीणीसहित अन्तःपुरास आग लाऊन जाळून टाकले.* भिक्षुंनी पिण्डपाताच्या वेळी हे पाहिले आणि ते बुद्धांकडे आले आणि त्यांनी त्यांना तिच्या गति बाबत विचारले. बुद्ध म्हणाले - *" भिक्षुंनो ! त्या उपासिकांमध्ये काही स्रोतापन्न, काही सकृतागामि आणि काही अनागामि होत्या. त्यांचा मृत्यू निष्फळ नाही. जे प्रव्रजित वा गृहस्थ प्रमादासह वागणारे असतात, ते हजारो वर्षे जगुनही मेल्यासारखे असतात. परंतु जे अप्रमादाने वावरणारे असतात ते मरूनही जिवंत असतात. मागन्दिय जिवन्त असुनही मेल्यासारखी होती. परन्तु ती आपल्या मैत्रीणीसह मरुनही जिवंतच आहे. सामावतीसारख्या मरत नसतात.* याचीच पृष्टि करतांना भगवंतांनी ही गाथा सांगितली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-२४/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - अप्पमादवग्ग, अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 -
No comments:
Post a Comment