🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*
*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_25.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भाग ४_*
*_महिलांचे कुपोषण_*
_त्याच्यानंतर एका वेगळ्या मुद्याकडे आपण वळू. आजही *भारतामधल्या कुपोषित महिलांचं प्रमाण जवळजवळ ५७ टक्के आहे. या महिलांच्या अंगामध्ये पुरेसं रक्त नसतं. त्याला आपण ऍनिमिया म्हणतो.* या ऍनिमिक स्त्रियांना स्वतःची दैनंदिन कामं पार पाडत असताना अनेक प्रकारच्या थकव्यांना, आजारांना तोंड द्यावं लागतं. तेव्हा एका बाजूला ही स्त्री कुपोषित असते; घरामध्ये ती सगळ्यात शेवटी जेवते; 'जे शिल्लक असेल, उरलेलं सुरलेलं असेल, तेच तिने खायचं', असा नियम असतो._
_आज लग्नाचं वयाचं अधिकृतपणे १८ असतानाही महाराष्ट्रातली जवळजवळ ३५ टक्के ते ४० टक्के लग्नं १६व्या आणि १७व्या वर्षीच होतात. त्याच्यानंतर ती स्त्री गरोदर राहते. तिच्या शरीराची पुरेशी वाढ झालेली नसते; गर्भाशयाची पुरेशी वाढ झालेली नसते; मनाची पुरेशी वाढ झालेली नसते. अशा वेळी तिच्या शरीरावर गरोदरपणाचा ताण येतो. त्याच्यानंतर ती प्रसूत होते. *आजही भारतामध्ये गरोदरपणात मृत पावणाऱ्या महिलांची संख्या शेजारच्या टीचभर बांग्लादेशापेक्षाही जास्त आहे आणि प्रसूत झाल्यानंतर जन्माला आलेल्या नवजात अर्भकांच्या मृत्यूची संख्या (शून्य ते एक या वर्षाच्या कालावधीचा विचार करता) शेजारच्या टीचभर श्रीलंकेपेक्षा आजही जास्त आहे.*_
_हे सगळं सांगण्यामागचं कारण स्त्रीच्या आरोग्याचा पंचनामा करणं नसून, ज्या वेळेला अशा स्वरूपाची मानसिकता समाजात अस्तित्वात असते, त्या वेळेला वर सांगितलेल्यापैकी प्रत्येक गोष्ट या स्त्रीला अंधश्रद्धेकडे ढकलत असते, हे आहे. म्हणजे स्त्रिया जे उपवास करतात, ते सगळे उपवास कशाकरता असतात ? एकतर चांगला नवरा मिळावा म्हणून असतात किंवा मुलाचं कल्याण व्हावं म्हणून असतात. त्यामुळे 'आपल्याला लवकर मूल व्हावं, त्या वेळी गरोदरपण झेपावं, मुलगाच जन्माला यावा' ही सगळी तिच्या व्रतवैकल्यांमागची कारणं असतात. या सगळ्या संदर्भात आज एक प्रचंड प्रकारची अस्थिरता अस्तित्वात आहे. त्यामुळे ही सर्व भौतिकता त्या बाईला या अस्थिरतेकडे आणि अस्थिरतेमधनं अंधश्रद्धेकडे ढकलत असते. म्हणजे *आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की, मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे खरं म्हटलं तर पुरुषापासून बाईला जी रंगसूत्रं-गुणसूत्रं मिळतात, त्यांच्यावर अवलंबून असतं.* पण तरीदेखील, बाई गरोदर राहिल्यानंतर 'मुलगाच व्हायला पाहिजे', या हट्टापायी अजूनही तिची सोनोग्राफी केली जाते आणि नंतर भ्रूणहत्या केली जाते. ही पुन्हा एकदा तिच्या दुय्यमत्वाची साक्ष आहे. तसंच 'गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे, हे आम्हांला बघायचं आहे आणि जर मुलगी असेल, तर ती आम्हांला नको', असा अनेक स्त्रियादेखील दुर्दैवाने आजही आग्रह धरतात. आणि म्हणून, हे सगळं टळावं म्हणून त्यांचे उपासतापास चालू असतात._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-२५/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment