Saturday, 30 March 2024

स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - ८

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_83.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग ८_*

*_अंधश्रद्धेची बळी बाईच का?_*

                    _*आपण असा विचार केला पाहिजे की, अंधश्रद्धेची जास्त बळी बाईच का?* बाईच्या अंगामध्येच का येतं? भानामतीचे जे वगवेगळे प्रकार असतात, त्यांच्यामध्ये बहुधा बाईच एजंट कशी सापडते? म्हणजे आपोआप कपडे फाटणं, अंगावर बिब्ब्याचे डाग उठणं, आपोआप कपडे जळणं, घरावर दगडं येणं, अन्नामध्ये विष्ठा मिसळणं या भानामतीच्या बहुसंख्य प्रकारांमध्ये बहुधा स्त्रीच मागं असते, असं आपल्याला दिसतं._

                   _*या सगळ्या गोष्टी बाईच्या संदर्भात घडण्यामागचं साधं कारण म्हणजे, आपल्या समाजामध्ये बाईला दिल्या जाणाऱ्या गौणत्वामुळे बाईच्या मनातलं दुःखाचं धरण लवकर भरतं. धरण भरल्यानंतर जर धरणाचे दरवाजे उघडले नाहीत आणि पाण्याचा निचरा झाला नाही, तर पाण्याच्या दबावाने धरणाची भिंत कोसळते. त्याच पद्धतीने, अनेकविध सामाजिक कारणांनी बाईच्या मनातलं दुःखाचं धरण लवकर भरतं आणि त्यानंतर तिच्यासाठी दोनच मार्ग शिल्लक राहतात. एकतर स्वतःचं व्यक्तिमत्त्व छिन्नविछिन्न करून घेणं किंवा त्या दबावाने स्वतःच्या अंतर्मनाचे दरवाजे उघडणं - मग कधी हिस्टेरिकल कॉनव्हर्जन्स, कधी मगाशी सांगितलेलं अंग उडण्याचं लक्षण, कधी भानामतीचे प्रकार असं सगळं घडायला लागतं - आणि स्वतःचा ताण कमी करणं.*_

              _त्यामुळे स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयाचा आपण ज्या वेळी विचार करतो, त्या वेळी धर्माने तिला अंधश्रद्धेकडे किती लोटलेलं आहे, तिच्या शारीरिक भौतिकतेच्या असलेल्या दुर्लक्षामुळे ती अंधश्रद्धेकडे किती लोटली गेली आहे, तिच्या मानसिकतेमुळे ती अंधश्रद्धेकडे किती लोटली गेली आहे आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एक मानसिक गुलामगिरी निर्माण करून तिला पवित्र्य मानायला कसं शिकवलेलं आहे, असा सगळा नीट विचार आपण करायला पाहिजे._

               _*याचं अतिशय चांगलं उदाहरण, म्हणजे आपल्याकडची व्रतवैकल्यं. व्रतवैकल्य तरी कशाला, आपण सतीसारखी प्रथा घेऊ. पतीच्या निधनानंतर त्याचं शव मांडीवर घेऊन सती जाण्याची एक घटना १९८७ साली राजस्थानमध्ये देवराला इथे घडली. त्याच्यानंतर या जागी सतिस्थळ उभारणार होते. मात्र त्या कार्यक्रमावर त्या वेळच्या केंद्र सरकारने बंदी घातली, आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की, ती बंदी झुगारून हजारो स्त्री-पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी 'सती माता की जय' म्हणत त्या स्थळाकडे गेल्या. म्हणजे ती सती गेली, नवऱ्याच्या शवाबरोबर ती जाळली गेली याच्यामध्ये अन्याय वाटण्याऐवजी ती अभिमानाची गोष्ट असल्याचं मानलं गेलं. याच पद्धतीने आपण जी अनेक व्रतवैकल्यं करतो, तीही माणसं अभिमानाची बाब समजतात.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-३०/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...