🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*
*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_28.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भाग ६_*
*_मूल होण्याचे दडपण_*
_स्त्रीला मूल होण्या-न होण्यापासून या व्यापकत्वाची सुरुवात होते. म्हणजे मला या संदर्भातली चळवळीतली एक घटना आठवते. *नगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामधला मालचौंडी गावामधला डोह. 'संतती नसलेल्या बायकांनी जर तिथे येऊन अंघोळ केली, तर त्यांना मूल होतं', अशी त्या डोहाची प्रसिद्धी आहे. कृष्णा बाजीराव रेपाळे, म्हणजे बाजीराव रेपाळे यांची दुसरी बायको. त्यांच्या पहिल्या बायकोला १० वर्षं मूल नव्हतं. मग त्यांनी दुसरी बायको केली. दुसऱ्या बायकोलाही पुन्हा दोन वर्ष मूल झालं नाही. मग त्यांनी तिला मालचौंडीच्या डोहामध्ये आणायचं ठरवलं. जो डोह दिवसा बघतानादेखील आपल्याला भीती वाटते, त्या डोहाच्या जवळ ती बाई आली. ती बाई त्या डोहामध्ये अंघोळीला उतरली आणि काही वेळाने म्हणाली की, "मी आता या डोहामध्येच सात दिवस राहणार आहे आणि सातव्या दिवशी तुम्ही मला न्यायला या". आणि बघता बघता त्या डोहामध्ये ती गरागरा फिरायला लागली. काही काळ गेला. त्याच्यानंतर ती पाण्यावर तरंगायला लागली आणि किनाऱ्यापासून वीसेक फुटांवर एका बाजूला येऊन पाण्यावर तरंगणारा तिचा देह दिसायला लागला. काय झालं असेल, हे आपण समजू शकता. परंतु लोकांनी असं मानलं की, ही बाई अशीच पाण्यावर सात दिवस तप करणार आहे.*_
_मग बघता बघता त्या डोहाला धर्मस्थळाचं स्वरूप प्राप्त झालं. तिथे अनेक लोक बैलगाड्या करून, जीप करून, टॅक्सी करून यायला लागले आणि त्या बाईचं दर्शन घ्यायला लागले. *तेव्हा आम्ही पोलिसांकडे गेलो. पोलीस म्हणाले, 'तुम्हा लोकांचा कशावरच विश्वास नाही. बघा तुम्ही, सात दिवसांनी ती ज्या वेळी जिवंत होईल किंवा ती जिवंतच आहे आणि तप करतीये, हे तुमच्या लक्षात येईल, त्या वेळी तुम्हांला कळेल'. त्याच्यानंतर हे प्रकरण फारच पेटलं. शेवटी आमच्या दबावामुळे डीएसपीला कारवाई करावी लागली. इंग्रजी वृत्तपत्रांनी हे प्रकरण उचलून धरलं. त्यामुळे डीएसपीची काहीशी बदनामी झाली.*_
_त्याच्यानंतर नगरच्या डीएसपीने पोलिसांचं एक प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं. त्या प्रशिक्षण शिबिराला मी गेलो होतो. त्या *प्रशिक्षण शिबिरामध्ये ४००-५०० पोलिसांसमोर बोलताना मी म्हणालो की, "तुमच्या हे लक्षात आलं का की, त्या तप करणाऱ्या बाईच्या, म्हणजे उषा बाजीराव रेपाळेच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत?" तर ते पोलीस एकमेकांकडे पाहायला लागले की, 'आपला संबंध काय! ती बाई अंधश्रद्धाळू होती आणि त्या अंधश्रद्धेपायी तिने स्वतःचा जीव गमावला', पण तिने स्वतःचा जीव का गमावला ? कारण तिला मूल नव्हतं; मूल होण्याची शक्यता नव्हती; नवरा तपासून घ्यायला तयार नव्हता; आणि मूल नसलेल्या बाईला समाजामध्ये ज्या स्वरूपाची मानहानीची वागणूक मिळते, ती सोसण्याची तिची तयारी नव्हती. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की, स्त्रीच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे संबंध त्या खीला कळत-नकळत, पण निश्चितपणे अंधश्रद्धेच्या मानसिक गुलामगिरीकडे ढकलत असतात.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-२८/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment