Wednesday, 21 August 2024

ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा

💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮

*_नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स_*

*_'ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा'_*

*_डॉ. योजना भगत_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_21.html

💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮

(मुंबई विद्यापीठाच्या पालि विभागाच्या दोन दिवसीय "ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा" या कार्यशाळेच्या निम्मिताने, हे या कार्यशाळेचे अकरावे वर्ष.)

_आतापर्यंत फक्त *पुरातत्व विभाग किंवा फार तर प्राचीन इतिहासाच्या विद्वानांचा आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा विषय असणारी 'ब्राह्मी लिपी'चा अभ्यास पालि भाषेच्या विद्यार्थ्यांनी केला.* ती लिपी पालिभाषेच्या किती जवळची आहे आणि त्यांचा संबंध किती पुर्वापार चालत आला आहे हे नुसते प्रस्थापितच केले नाही तर *प्रत्येक पालि भाषा शिकणाऱ्याला 'ब्राह्मी लिपी' वाचता आलीच पाहिजे असा आग्रहच धरला आहे.*_

_पलि भाषा का शिकावी या प्रश्नाला अजून एक उत्तर मिळाले आहे. *ब्राह्मी लिपी वाचण्यासाठी पालि भाषा येणं गरजेच आहे.* आतापर्यंतची परिस्थिति अशी आहे कि लिपी येते तर भाषा नाही आणि भाषा येते तर लिपी नाही. आता ही परिस्थिती बद‌लेल आणि पालि भाषेच्या अभ्यास आणि संशोधनाला गती मिळेल यात शंका नाही._

_*लिपी आणि भाषा: सर्वात प्रथम लिपी आणि भाषा यातील फरक समजून घेणे फार आवश्यक आहे. आपण मराठीत बोलतो ती भाषा आहे आणि आता मी ज्या अक्षरांनी लिहित आहे ती देवनागरी लिपी आहे. आपण मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहित असतो.*_

_साधारणपणे आपण कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहू शकतो. आपण नेहमी इंग्रजी भाषा रोमन लिपीत लिहितो. मी जेव्हा "बुद्धं सरणं गच्छामि" असे लिहिते तेव्हा मी पालि भाषा देवनागरी लिपीत लिहित असते आणि तेच शब्द जेव्हा मी Buddham saranam gacchāmi असे लिहिते तेव्हा मी पालि भाषा रोमन लिपीत असते._

_आजकाल आपण देवनागरी आणि रोमन लिपी अगदी सहज वापरतो. sms करताना भाषा मराठी असते आणि लिपी रोमन असते तर चित्रपटांची नावे हिन्दी भाषेतून असतात पण लिपी रोमन असते जसे "Hum aapke hain kaon?" आपण सहजपणे इंग्रजी भाषेतील शब्द देवनागरीत लिहित असतो जसे, माय नेम इज... इथे आपण इंग्रजी भाषा वापरली आहे पण लिपी मात्र देवनागरी आहे._

_आज आपण जेव्हा पालि भाषा शिकतो तेव्हा ती रोमन किंवा देवनागरी लिपी मधून लिहितो. *बर्मा या देशात पालि भाषा बर्मी लिपीत तर श्रीलंकेत सिंहल लिपीत लिहिली जाते.* मग प्रश्न असा पडतो कि देवनागरी ते फार नवीन लिपी आहे आणि *पालि भाषा तर २५०० वर्षाहून जुनी आहे. मग त्याकाळी कुठली लिपी होती ज्यात पालि भाषा लिहिली जायची?*_

_*ती लिपी आहे ब्राह्मी लिपी, भारतातील सर्व आणि आजूबाजूच्या अनेक देशाच्या लिपीची जननी अर्थात आई ही ब्राह्मी लिपीच आहे. आज ही लिपी आपल्याला शिलालेखांतून आणि लेण्यांतील प्रस्तर लेखांतून वाचता येते.*_

_*लेखन कला :* प्राचीन भारतात लेखन कला अवगत होती का? असा जर प्रश्न उपस्थित झाला तर त्याचे उत्तर 'हो' असेच द्यावे लागेल. *बुद्धांच्या काळात लेखन कला अवगत होती याचे अनेक पुरावे तिपिटकामध्ये सापडतात. परंतु लिखाण कुठल्या लिपीतुन व्हायचे याचा उल्लेख मात्र आढळत नाही. इसवीसन पुर्व तिसऱ्या शतकातील 'ललितविस्तार' या बौध्द ग्रंथात बुद्धाच्या काळी चौसष्ट लिपी अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. एक चीनी ग्रंथात मात्र भारतातील दोन लिपीचा उल्लेख आहे आणि त्या म्हणजे ब्राह्मी आणि खारोष्ठी लिपी, ब्राह्मी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि खारोष्ठी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते असाही उल्लेख सापडतो.*_

_*ग्रंथांमध्ये जरी चौसष्ट लिपींचा उल्लेख असला तर उत्खनानात फक्त दोनच लिपीचे पुरावे सापडतात. त्या म्हणजे ब्राह्मी आणि खारोष्ठी लिपी. खारोष्ठी लिपीतील लेख कंदहार, अफगाणिस्तान, तक्षशिला, मान्सेरा, लडाख, तुर्कस्तान अशा ठिकाणी सापडले परंतु हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेला या लिपीचा प्रसार झालेला दिसत नाही. शिवाय खारोष्ठी लिपी खुप पुर्वीच लोप पावली असावी कारण पुढे तिचा विकास झालेला दिसत नाही.*_

_*ब्राह्मी लिपीतील लेख मात्र आजच्या भारताच्या कानाकोपऱ्यात सापडतात आणि ब्राह्मी ही पुरातन लिपी पैकी एक आहे असे स्पष्ट होते. त्या काळातील भारतात म्हणजे जम्बुद्वीपातील बहुतेक लोकांना ब्राह्मी लिपी वाचता येत असावी असा अंदाज आहे कारण भारताच्या ज्या भागात ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती तिथे खारोष्ठी लिपी लिहिलेली आढळून आलेली आहे.*_

_या शिवाय ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपीची आई असल्यामुळे दक्षिण भारत काय किंवा उत्तर भारत काय सगळीकडे ब्राह्मी लिपी वाचता येतच असावी त्याशिवाय आजची अस्तित्वात असणारी लिपी कशी तयार झाली हा प्रश्न आहेच._

_*शिवाय ब्राह्मी लिपीची खासियत ही कि त्या लिपीत जशी पालि भाषा लिहिता येते तशी नंतरच्या काळात ब्राह्मी लिपीत संस्कृत भाषेचे शिलालेख सुद्धा लिहिलेले आढळून येतात.*_

_*ब्राह्मी लिपीचे वाचन :* पण ब्राह्मी लिपी जरी आपल्या सर्व लिपीची जननी असली तरी आपण भारतीय लोक ब्राह्मी लिपी वाचायचे विसरलो होतो. अगदी २०० वर्षापूर्वीपर्यंत भारतातील एकाही माणसाला ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती, इतिहासातील घटना याच्या साक्षीदार आहे._

_*सोळाव्या शतकात दिल्लीचा बाद‌शाह फिरोजशहा तुघलक याने मोठ्या परिश्रमाने ब्राह्मी शिलालेख असलेले स्तंभ पंजाब मधील टोपडा आणि मीरठ येथून दिल्लीत हलविले आणि अनेक ब्राम्हणी पंडितांना वाचायला लावले पण एकालाही ते वाचता आले नाही. अकबर बादशाहचे प्रयत्न देखील वाया गेले. १८३७ साली इंग्रज अभ्यासक जेम्स प्रिन्सेप ह्यांनी जवळ जवळ ७ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर पहिल्यांदा ब्राह्मी लिपी वाचली. त्यांनी ब्राह्मी लिपी कशी डेसिफर (decipher) केली किंवा वाचली, याची रोचक कथा आहे.*_

_*आपल्यावर इंडो ग्रीक राजांनी जेव्हा राज्य केले तेव्हा त्यांनी आपली नाणी काढली ती द्वीलिपिक होती म्हणजे ग्रीक आणि ब्राह्मी लिपीत नाण्यांवर राजांची नावे लिहिलेली असायची.* (असे आजच्या नोटांवर जवळ जवळ पंधरा लिपीत लिहिलेले असते) *ग्रीक लिपी वाचता येत असल्यामुळे ते नाव वाचता येऊ शकले. त्यामुळे बाह्मीची दोन तीन अक्षरे ओळखीची झाली.*_

_*३५-३६ वर्षे वयाचे जेम्स प्रिन्सेप स्वतः लिहितात कि जवळ जवळ सात वर्षे ते रोज सकाळी उठल्यावर ती ब्राह्मीची अक्षरे घेऊन बसायचे आणि वाचण्याचे प्रयत्न करायचे. सांचीच्या स्तुपाच्या वेदिके वरील तशीच अक्षरे जेव्हा ते वाचण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि शेवटची काही अक्षरे सारखीच आहेत. तेव्हा त्यांनी अंदाज केला कि हे काही पुस्तकातील उतारे नसून कदाचित दान देणाऱ्यांची नावे असावीत जसे इतर बौद्ध देशातील स्तुपांवर आढळून येतात. तेव्हा त्यांनी 'नं' हा अनुस्वार शोधला आणि 'न' आणि 'द' या अक्षरांचा शोध लागला. आणि अशाच एका सकाळी जेव्हा ते सर्व अक्षरे घेऊन बसले होते तेव्हा त्यांना ब्राह्मी लिपीचे रहस्य उलगडले आणि एका दिवसात त्यांनी दिल्लीतील बाह्मी लिपीचा शिलालेख वाचून काढला.*_

_नंतर त्यांनी ब्राह्मीतील शिलालेख वाचून काढण्याचा जणु सपाटाच लावला आणि भारताच्या इतिहासातील गहाळ झालेली पाने समोर येऊ लागली. परंतु आपल्या अथक प्रयत्नाने ब्राह्मी लिपी वाचुन ज्ञानाचे एक नवीन दालन उघडून देणाऱ्या या अभ्यासकाचे निधन वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी व्हावे ही शोकांतिकाच आहे._

_ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा जेम्स प्रिन्सेपने ब्राह्मी लिपी वाचली आणि ते लेख पुरातन प्राकृत भाषेत आहे असे समजले. वाचताना शिलालेखांवर देवानंपिय पियदस्सी राजा या नावाचा उल्लेख पुन्हा पुन्हा येताना पाहून सगळेजण हैराण झाले कि हा देवानंपिय पियदस्सी राजा कोण? एवढा मोठा राजा! ज्याचे शेजारी पर्शियन राजे, ज्याच्या राज्याच्या सीमा पार केरळ पासून तर अफगाणिस्तान पर्यंत पसरलेल्या. इतिहासात या राजाची नोंद कशी नाही? कोण हा राजा? कुणालाच कळेना. भारतातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मी लिपीतील शिलालेख सापडत होते आणि ते सर्व एकाच राजाचे होते आणि तो होता देवानंपिय पियदस्सी राजा._

_*रॉयल एशियाटिक सोसायटीतील नियतकालिकेच्या माध्यमातून ब्राह्मी लिपी आता वाचता येते आणि ती जेम्स प्रिन्सपने वाचली ही बातमी अभ्यासकांमध्ये पसरली. शिलालेख वाचतांना यावरील देवानंपिय पियदस्सी राजा कोण आहे हे माहित नाही ही बातमी देखील प्रसिद्ध झाली. हे कोडे भारतीयांना अजुन उलगडलेलं नाही असं श्रीलंकेत अभ्यास आणि सिविल सर्विसेस मध्ये काम करणाऱ्या श्री. चार्लस टरर्नोर ह्यांना कळले. त्यावेळी ते श्रीलंकेतील बौद्ध भिक्खुंच्या मदतीने 'महावंस' नावाचा एक पालि भाषेतील श्रीलंकेतील बौध्द धम्माचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथाचे वाचन आणि भाषांतर करीत होते. त्यांनी ताबडतोब भारतात कळविले कि अरे हा देवानंपिय पियदस्सी राजा दुसरा तिसरा कुणी नसून असोक राजा आहे ज्याने भारतातून प्रथम बौध्द धम्माचा प्रसार बाहेर देशात केला आणि अशा प्रकारे भारताला भारतीय राजाची ओळख पटली.*_

_ही ऐतिहासिक घटना इतिहासकारांनी नोंद‌विली आहे. *१८१२ साली डॉ. कोपलेस्टोन लिहितात कि "The history of the identification of Piyadassi with Asoka is one of the romantic chapters in the history of knowledge."*_

_ही घटना वाटते तितकी साधी नाहीय. या एका ओळखीने भारताचा इतिहास बदलून टाकला. *असोकाच्या शिलालेखांमुळे भगवान बुद्धांचा काळ निश्चित झाला आणि अंधातरी असणारा आपला इतिहास एका काळाच्या चौकटीत बसला.*_

*पालि भाषेचा आणि बाह्मी लिपीचा संबंध : खरे तर देवानंपिय पियदस्सी राजा हाच सम्राट असोक आहे हे ब्राह्मी लिपीतील लेख पालि भाषेतील ग्रंथाच्या आधारे कळणे म्हणजेच पालि भाषा आणि ब्राह्मी लिपीचा जवळचा संबंध प्रस्थापित करवून जातो.*

_परंतु ज्या पालि भाषेतील ग्रंथाच्या आधारे आपण इतिहास व्यवस्थित लिहू शकलो त्या पालि भाषेला श्रीलंकेत जरी मानसन्मान मिळाला तरी भारतामध्ये मात्र ति उपेक्षितच राहिली कारण दुर्दैवाने सुरवातीच्या काळात इंग्रजांना देखील पालि भाषा ही प्राकृत भाषेचा एक भाग वाटत आली आणि त्यांनी जिथे पालि भाषेतील शिलालेख होते ते प्राकृत समजूनच त्याचे वाचन केले आणि पालि भाषेचा आणि ब्राह्मी लिपीचा जो जवळचा संबंध होता त्याला दुरचा करून टाकला._

_भारतीय संशोधकांनी देखील इंग्रजांच्या पाऊलावर पाऊल ठेवत असोकाचे शिलालेखच नव्हे तर पुरातन ब्राह्मीचे सर्व शिलालेख हे प्राकृत भाषेत समजून त्यांचे वाचन केले आणि पुढे तीच पध्दत रूढ झाली. भारतातील पूर्वीचे शिलालेख प्राकृतमध्ये आणि नंतरचे संस्कृतमध्ये अशी धारणा धरूनच आतापर्यंत अभ्यास केला गेला आहे. असे शिलालेख वाचून नुसत्या चुकाच नाही केल्या तर बराच इतिहास लपवून ठेवलाय._

_परंतु जगभर पालि भाषेच्या अभ्यासाला जशी गती मिळाली तसे लक्षात यायला लागले आहे कि पालि भाषा ही प्राकृत भाषेचा भाग नसून एक स्वतंत्र भाषा आहे आणि तिचा अभ्यास एक स्वतंत्र भाषा म्हणून होऊ लागला._

_हे जगभरच्या अभ्यासकांनी मान्य केले असले तरीही भारतामध्ये ही मान्यता अजुन प्रस्थापित झालेली दिसत नाही. *असोकाचे ब्राह्मी लिपीतील शिलालेख हे कालपर्यंत प्राकृत भाषेतच असल्यासारखे वाचून हजारो अभ्यासकांनी आपली पुस्तके छापली आहेत. फक्त मुंबई विद्यापीठाच्या १९६० साली पहिली पाली भाषेतील पी. एचडी मिळवणाऱ्या ज्येष्ठ पालिच्या अभ्यासक प्रो. सौ मीना तालीम मॅडमने दहा वर्षे अथक प्रयत्न करून असोकाचे संपूर्ण भारतभर पसरलेले शिलालेख हे फक्त प्राकृत मध्ये नसून ७५ टक्यापेक्षा जास्त पालि भाषेत असून २०% प्राकृत व संस्कृत व उरलेले ग्रीक अरमाईक भाषेत आहेत हे नुसते सिद्धच केले नाही तर प्राकृत म्हणून वाचलेले शिलालेख पुन्हा पालि भाषेत वाचून दाखविले आहेत.*_

_*महाराष्ट्रात ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा शिकण्याची गरज :* महाराष्ट्रात तर हजारो बौद्ध लेण्यामधुन शेकड्याने ब्राह्मी शिलालेख, प्रस्तर लेख आहेत आणि दुर्दैवाने त्या सर्व शिलालेखांचे वाचन ते प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत असे समजून झाले आहे. पण वस्तुस्थिती तशी नसून *शिलालेखांपैकी जवळ जवळ ८०% पालि भाषेत असून बाकी प्राकृत आणि संस्कृत भाषेत आहेत.*_

_आतापर्यंत परिस्थिती अशी होती कि पालि भाषेचा अभ्यास संस्कृत भाषेच्या आधारेच चालायचा, त्यामुळे पालि भाषेला वेगळं अस्तित्वच नव्हतं. *ब्राह्मी लिपी पालिच्या अभ्यासकांना येण्याचा काही संबंधच नव्हता कारण बाह्मी लिपीचे पालि भाषेसोबत काही नाते असेल असे कधीच कुणाला वाटले नाही. आणखी एक कारण म्हणजे ज्यांना ब्राह्मी लिपीचे ज्ञान होते त्यांना पालि भाषा येत नाही आणि ज्यांना पालि भाषा येते त्यांना ब्राह्मी लिपीचे ज्ञान नाही.*_

*_मग ही परिस्थिती बदलणार कोण, कधी आणि कशी?_*

*_उत्तर सोपं आहे. आपण, आता आणि पालि भाषा शिकून !_*

_- आणि खरोखरच परिस्थिती बदलत आहे. निदान मुंबई विद्यापीठातील पालि विभागात शिकणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत तरी हे सत्य आहे. महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांना व असोकाच्या उभ्या स्तंभांना भेटी देऊन प्रत्यक्षात ब्राह्मी शिलालेख पाहिल्यानंतर फक्त एक दोन व्यक्तीच का ते वाचू शकतात, आम्ही का नाही असा खडा सवाल समोर आला आणि त्यातून जन्म झाला दोन दिवसीय "ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा" या कार्यशाळेचा, विद्यार्थ्यांच्या अपार मेहनतीचे फळ म्हणजे दोन दिवसात ब्राह्मी लिपी आत्मसात करण्याची ताकद, जी त्यांना पालि भाषेतील ज्ञानाने दिली._

_ब्राह्मी लिपीच्या अभ्यासाचे आणखी अनेक कांगोरे आहेत जे इथे मांडले नाहीत. *लिपीचा अभ्यास हा एक वैज्ञानिक तर्कशुद्ध अभ्यास असून लिखाणाच्या काळाची निश्चिती करणे, भाषेच्या उत्पती व प्रगतीचा आढावा घेणे असे अनेक विविध पैलू त्यात आहेत. त्यांचाही अभ्यास महत्वाचा असून ब्राह्मी लिपी आणि पालि भाषेचे विद्वान निर्माण होणे आणि जास्तीत जास्त संशोधन करणे फार गरजेचे आहे.*_

_*ब्राह्मी लिपी ही पुरातन लिपी न राहता प्रत्येक पालि शिकणाऱ्या व्यक्तीला ती वाचता आलीच पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचा ठरू नये असं वाटतं.*_

*_भवतु सब्ब मंगलं !_*

Saturday, 17 August 2024

बौद्ध धम्मातील पौर्णिमेचे महत्त्व

बौद्ध धम्मातील पौर्णिमेचे महत्त्व

वैशाख पौर्णिमा


बुद्ध जयंती


ज्ञानप्राप्ती


महापरिनिर्वाण दिन


वै शाख पौर्णिमा हा जगभरातील बौद्धांचा महान व मंगल दिन आहे. या पौर्णिमेला तीन मंगलमय घटना घडल्या आहेत. त्या आपण समजून घेणार आहोत. पहिले महत्व प्रसिद्ध आहे. इ. स. पूर्व काळात कपील वस्तू नगरीचा राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांना अनेक वर्षापासून मूल नव्हते. काही कालांतराने महामायेला गर्भधारणा झाली होती तेव्हा आपल्या पहिल्या प्रसूतिसाठी आपल्या माहेरी देवदहा नगरीला माहामायेला पालखीत बसवून घेऊन जात होते. नेपाळ प्रांतात तराईमध्ये लुंबिनी नावाचे प्रसिद्ध वन आहे. या स्थळी पालखी येताच महामाया आपल्या दास दासींना पालखी थांबविण्यास सांगितले. मला थोडी विश्रांती घ्यावयाची आहे आणि तुम्हालाही थोडी विश्रांती मिळेल. असा आदेश होताच नोकराने पालखी थांबविली. महामाया पालखीतून उतरली आणि दासी बरोबर बोलत बोलत शाल वृक्षाच्या शीतल छायेत उभी राहिली असता त्या शाल वृक्षाची एक फांदी खाली आलेली होती. ती महामायेने हातात धरली आणि बोलत असता हवेचा जोरात झोका आला त्या बरोबर शाल वृक्षाची फांदी वर उचलली गेली. त्यामुळे महामायेच्या शरीराला हेलकावा बसला आणि तिला प्रसूतिच्या वेदना होऊ लागल्या. त्या स्थळीच महामाया प्रसूत झाली. त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती. ऋतू ग्रीष्म, वार शुक्रवार, नक्षत्र विशाखा होते. अशा मंगल वेळी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. या मंगल प्रसंगाने ही पौर्णिमा पवित्र ठरली आहे. इ. स. पूर्व ५६३ ला ही मंगल घटना घडली आहे. जगात वैशाख पौर्णिमा पवित्र मानली जाते. राजाला ही गोड बातमी समजताच त्याला फार आनंद झाला. नगरीत सर्व लोकांत आनंदाचे वातावरण पसरले होते. बाळाला कपिलवस्तू नगरीला आणले जाते. पाचव्या दिवशी बाळाचे नांव ठेवले जाते सिद्धार्थ गौतम. हे पहिले महत्त्व वैशाख पौर्णिमेचे आहे.


वैशाख पौर्णिमेचे दुसरे महत्व असेच महान आहे. कपिलवस्तूचे शाक्य आणि बाजूच्या नगरीचे कोलीय या दोन संघात रोहीणी नदीच्या वाटपावरुन संघर्ष निर्माण झाला. तो युद्धाच्या विषयापर्यंत पोहोचला. सिद्धार्थ गौतमाने त्या युद्धाचा विरोध  केला. त्या कारणाने संघाने सिद्धार्थ गौतम संघाच्या विरुद्ध गेला म्हणून त्याला शिक्षा ठोठावली. त्या कारणाने गृह त्याग करावा लागला. गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या आश्रमात चिंतन मनन केले. वयाच्या ३५ व्या वर्षी इ. स. पूर्व ५२८ ला वैशाखी पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधि प्राप्त झाली. त्यादिवशी बुधवार होता. बोधी वृक्षाखाली सिद्धार्थ बसला असता वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे या दिनाला 'संबोधी दिन' असे म्हणतात- या कारणाने ही पौर्णिमा मंगल दिन म्हणून मानली जाते.


वैशाख पौर्णिमेला तिसरे महत्व विशेष महत्त्वाचे व प्रसिद्ध आहे. बुद्धतव प्राप्ती नंतर तथागत संपूर्ण मानवाच्या कल्याणाचा, हिताचा जीवन मार्ग आपल्या वाणीमधून सांगत फिरले. अनेक राजे, महाराजे, काही साधू, मुनी, ब्राह्मण, श्रमण तथागत भगवान बुद्धाला शरण आले. त्यांच्या धम्माचा स्वीकार केला. मानवाला देव, आत्मा, स्वर्ग, पुनर्जन्म या काल्पनिक गोष्टींपासून मुक्त केले. यज्ञयाग, कर्मकांड, उपवास, पूजापाठ, नवस, सायास या अज्ञानातून मानवास मुक्त केले. अंगुलीमालासारख्या खुनी माणसाला पवित्र जीवन जगण्याचा महान संदेश दिला. तसेच आम्रपाली या नर्तकीला-गणिकेला भिक्षुणी संघात सामील करुन घेऊन तिला निर्मळ जीवन जगून निर्वाण प्राप्त करून देण्याचे महान कार्य केले. अशी ४५ वर्षे पायी प्रवास केला आणि वयाच्या ८० व्या वर्षी इ. स. पूर्व ४८३ मध्ये वैशाख पौर्णिमेला कुशीनगर येथील शाल वनात दोन शाल वृक्षांच्यामध्ये महापरिनिर्वाण झाले. त्या दिवशी मंगळवार होता. जगाला शांततेचा, सदाचाराचा, सद्गुणाचा मार्ग दाखविणारे महान असे मार्गदाते भगवान बुद्ध ठरले. म्हणून ही पौर्णिमा महान 'मंगल दिन' म्हणून साजरी करतात. या दिवशी विहारात सर्व उपासक-उपासिका, लहान बाल- बालिका जमतात. बुद्ध पूजापाठ करतात, वंदन सूत्र पठण, प्रवचने, सभा सम्मेलने आयोजित केली जातात. या दिवशी उपोसथ व्रत धारण करुन अष्टशीलाचे पालन करावे. पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात असा मंगल दिन आहे. सण उत्सव आहे. जन्म, ज्ञान प्राप्ती, महापरिनिर्वाण या तीन घटना एकाच दिवशी घडलेल्या आहेत. म्हणून या पौर्णिमेला अनन्य साधारण स्थान प्राप्त झाले आहे. अशी ही मंगलमय वैशाखी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती असेही म्हणतात.


Wednesday, 7 August 2024

धम्मग्रंथ प्रमादातीत आहेत अशी श्रद्धा म्हणजे अधम्म होय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*८. धम्मग्रंथ प्रमादातीत आहेत अशी श्रद्धा म्हणजे अधम्म होय*_

*_(समाप्त)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_7.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*ब्राह्मणांनी असे घोषित केले की, वेद हे केवळ पवित्र ग्रंथच नाहीत तर ते स्वतःच प्रमाण आहेत. ब्राह्मणांनी वेदांना स्वतःच प्रमाण आहेत एवढेच घोषित केले नाही तर त्यांनी - अशीही घोषणा केली की वेद प्रमादातीत आहेत.*_

_*या मुद्यावर बुद्धांचे मत हे ब्राह्मणांच्या मतांच्या सर्वथा विरोधी होते. बुद्धांनी वेद प्रमाण आहेत हे नाकारले. वेद स्वतःच प्रमाण आहेत, वेद वाक्य अंतिम आहे हेही बुद्धांनी नाकारले.*_

_बुद्धांनी या मुद्यावर जी भूमिका स्वीकारली नेमकी तशीच भूमिका त्या काळच्या अनेक आचार्यांनी स्वीकारली होती. परंतु काळाच्या ओघात त्या आचार्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या तात्विक दर्शनाला मान्यता मिळावी, त्यांना ब्राह्मणांच्या नजरेत प्रतिष्ठा मिळावी, त्यांना ब्राह्मणांच्या सद्भावना अर्जित करता याव्यात, यासाठी आपली वेद विरोधी भूमिका त्यागली. बुद्धांनी मात्र या मुद्यावर कोणतीही तडजोड स्वीकारली नाही._ 

_*तेवीज्ज्य सुत्तात बुद्ध घोषित करतात की, वेद म्हणजे निर्जल मरुस्थल होय, पथविहीन अरण्य होय.* वास्तवात वेदाचा पथ हा विनाशपथ होय. नैतिक आणि बौद्धिक तृष्णेने तृषार्थ कोणताही माणूस आपल्या तृष्णातृप्तीसाठी वेदमागनि जाणार नाही. कारण त्या मार्गाने जाऊन आपली तृष्णातृप्ती होईल याची त्याला आशा नाही._

_वेद प्रमादातीत (निर्दोष) असण्याविषयी बुद्ध म्हणतात की, *काहीही प्रमादातीत नाही. वेदही प्रमादातीत नाहीत. त्यांचे म्हणणे असे की, प्रत्येक बाब परीक्षण आणि पुनर्परीक्षणासाठी खुली असली पाहिजे. प्रत्येक बाबीचे परीक्षण झालेच पाहिजे.* ही बाब बुद्धांनी कालामांना दिलेल्या प्रवचनात स्पष्ट केली आहे._ 

_एकदा तथागत मोठ्या भिक्खू संघासहित कोशल जनपदात चारिका करीत असताना केसपुत्तीय नगरीत आले. केसपुत्तीय नगरी ही क्षत्रिय कालामांची नगरी होती. तथागत त्यांच्या नगरीत आले आहेत हे कालामांना समजले. तेव्हा ते तथागत जेथे विहार करीत होते तेथे गेले आणि एका बाजूला आसनस्थ झाले. असे आसनस्थ झाल्यावर केसपुत्तीय कालाम तथागतांना म्हणाला,_ 

_"हे श्रमण गौतमा, आमच्या नगरीत काही श्रमण ब्राह्मण येतात. ते आपआपल्या मतांचे आग्रही स्पष्टीकरण करतात. ते आपआपल्या मतांची प्रस्थापना करतात. परंतु असे करताना ते दुसऱ्यांच्या मतांचे खंडन करतात. दुसऱ्यांच्या मतांचा विरोध करतात. दुसऱ्यांच्या मतांना हीन लेखतात. दुसऱ्यांच्या मतांना धिक्कारतात. तसेच हे तथागता, आमच्या नगरीत दुसरेही श्रमण ब्राह्मण येतात. ते सुद्धा आपल्या मतांचे उदात्तीकरण करतात. आपल्या मतांचे गुणगाण करतात. परंतु त्याच वेळी ते दुसऱ्यांच्या मतांचे खंडनही करतात. दुसऱ्यांच्या मतांना अपमानीत करतात. दुसऱ्याच्या मतांना नष्ट करण्याचा प्रयत्न करूनच ते आपल्या मताचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात._ 

_म्हणून हे तथागता, आम्ही अनिश्चय आणि भ्रमाच्या अवस्थेत आहोत. ह्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोण सत्य आणि कोण मिथ्या हे आम्हाला कळतच नाही._ 

_"हे कालामांनो, तुमच्या अनिश्चयासाठी समुचित (योग्य) कारणे आहेत. तुमच्या भ्रमित अवस्थेसाठी समुचित कारणे आहेत. हे कालामांनो, खरेच तुमच्या चित्तात योग्य समयी अनिश्चय आणि भ्रम उत्पत्र झाले आहेत" तथागत कथन करते झाले, "हे कालामांनो, यावे." तथागतांनी आपले कथन पुढे सुरूच ठेविले,_

१. _"जे काही श्रवण करण्यास मिळाले एवढ्याच कारणास्तव ते स्वीकारू नये._

२. _कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसऱ्याकडे आली एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये._

३. _सर्वसामान्यांना एखादी बाब स्वीकृत आहे एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये._ 

४. _धर्मग्रंथात एखादी बाब लिहिली आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये._ 

५. _एखादी बाब तर्काद्वारा प्रस्थापित आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये._

६. _एखादी बाब न्यायशास्त्राला धरून आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये._

७. _एखादी बाब सकृतदर्शनी स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये._

८. _मान्य श्रद्धा आणि विश्वासाच्या आधारावर कोणतीही बाब आपण स्वीकारू नये._

९. _एखादी बाब सकृतदर्शनी सत्य वाटते एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये._ 

१०. _एखादी बाब श्रेष्ठ आचार्यानी किंवा संन्याशानी कथन केली एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये."_ 

_"मग आम्ही काय करावे. एखादी बाब स्वीकारण्यासाठी आम्ही कोणत्या कसोट्या लावाव्यात" कालामांनी विचारणा केली._ 

_"या कसोट्या लावाव्या" तथागत उत्तरले._ 

१. _"स्वतःशीच प्रश्न विचारावा की, हे करणे अकुशल आहे काय?_

२. _हे स्वीकारणे अकुशल आहे काय ?_

३. _हे स्वीकारणे निंदनीय आहे काय?_ 

४. _ती बाब सुज्ञाद्वारा निषिद्ध मानली आहे काय?_ 

५. _ती बाब केल्यामुळे, स्वीकारल्यामुळे दुःख आणि कष्ट वाट्याला येतील काय?"_ 

_"कालामांनो, तुम्ही एक पाऊल पुढे जावे आणि विचारणा करावी. *जो सिद्धांत मांडला जातो, प्रस्थापित केला जातो तो सिद्धांत तृष्णा, घृणा, मोह, हिंसा यांच्या वृद्धीला तर कारण ठरणार नाही ना?*_

_"परंतु हे कालामांनो, हेही पर्याप्त नाही. *तुम्ही याच्याही पुढे जावे. तुम्ही हे जाणून घेण्याचे, समजून घेण्याचे प्रयास करावे की काय हा सिद्धांत माणसाला आपल्या तृष्णांचा दास तर करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला जीवमात्राच्या हिंसेला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला चौर्यकर्माला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला काम मिथ्याचाराला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला मिथ्या कथनाला तर प्रवृत्त करीत नाही ना? आणि काय हा सिद्धांत इतरांनीही तसेच करावे अशी प्रेरणा तर देत नाही ना?"*_

_*"आणि सरते शेवटी तुम्ही स्वतःशीच विचारणा करावी. काय या सर्वांचा परिणाम अंती दुःखात आणि कष्टात तर होणार नाही ना?"*_ 

_"आता कालामांनो, तुम्ही काय विचार करीत आहात?" "काय या सर्व बाबी मनुष्यमात्राकरिता हितकर आहेत की अहितकर आहेत?"_

_"तथागत, या सर्व बाबी मनुष्यमात्रा-साठी अहितकारी आहेत." कालाम उत्तरले._ 

_"आणि कालामांनो, तुम्ही काय विचार करीत आहात? या बाबी मनुष्यमात्रासाठी कुशल आहेत की अकुशल आहेत?"_ 

_"हे तथागत, या सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी अकुशल आहेत."_ 

_"काय सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी निंदनीय आहेत."_

_"होय तथागत, या सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी निंदनीय आहेत." कालाम उत्तरले._

_"काय या सर्व बाबी सुज्ञांनी स्वीकारल्या आहेत अथवा धिक्कारल्या आहेत?"_

_"या सर्व बाबी सुज्ञांनी धिक्कारल्या आहेत तथागत", कालाम उत्तरले._

_"यांच्या आचरणाने दुःख आणि कष्ट होतात काय?"_

_"यांच्या आचरणाने दुःख आणि कष्ट होतात तथागत." कालाम उत्तरले_

_*जे धर्मग्रंथ अशी देशना देतात. त्यांना अंतिम आणि प्रमादातीत म्हणून स्वीकारणे शक्य आहे काय?*_ 

_"नाही तथागत," कालाम उत्तरले._ 

_"परंतु कालामांनो, *मी तर हेच म्हणतो आहे. माझे कथन हेच आहे की, कोणतीही बाब ती तुम्ही श्रवण केली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसऱ्याकडे आली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. कोणतीही बाब अनेक लोकांनी स्वीकारली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. कोणतीही बाब एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये की तर्क समर्थित आहे. कोणती बाब सकृतदर्शनी स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. कोणतीही बाब प्रस्थापित श्रद्धा आणि विश्वास यावर आधारित आहे एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. कोणतीही बाब आचार्यांनी अथवा संन्याशांनीकथन केली आहे. एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये."*_ 

_"हे कालामांनो, *जेव्हा स्वानुभवाने तुम्ही हे जाणाल की, या बाबी अहितकर आहेत, या बाबी निंदनीय आहेत. या बाबी सुज्ञांनी धिक्कारल्या आहेत. यांच्या केल्याने दुःख आणि कष्ट होतात. तेव्हाच हे कालामांनो, तुम्ही या बाबींचा त्याग करावा."*_

_"अद्भुत आहे, तथागत, हे अद्भुत आहे. आम्ही तथागतांना, तथागतांच्या देशनेला शरण जातो. तथागतांनी आम्हाला आपले अनुगामी म्हणून स्वीकारावे. या क्षणापासून जीवनपर्यंत तथागतांनी आम्हाला आपला शरणागत मानावे. उपासक मानावे."_ 

_या युक्तिवादाचे सार स्पष्ट आहे. *कोणतीही देशना अधिकृतपणे स्वीकारण्यापूर्वी ती धर्मग्रंथात सांगितली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. ती बाब तर्काला अनुकूल आहे एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. सकृतदर्शनी ती स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. प्रस्थापित श्रद्धा आणि विश्वास यावर ती बाब आधारित आहे एवढ्याच कारणात्तव ती बाब स्वीकारू नये. ती बाब मान्यवरांच्या देशनेवर आधारित आहे एवढ्याच कारणास्तव ती बाब स्वीकारू नये. सकृतदर्शनी ती बाब सत्य प्रतीत होते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. श्रेष्ठ आचार्याची किंवा संन्याशांची त्या बाबीवर श्रद्धा आहे, विश्वास आहे एवढ्याच कारणास्तव ती बाब स्वीकारू नये.*_

_*परंतु तुम्ही याचा अवश्य विचार करावा की जे मत, जी आस्था, जो विश्वास तुम्ही स्वीकारू इच्छिता तो कुशल आहे अथवा अकुशल आहे. निंदनीय आहे अथवा वंदनीय आहे. कल्याणकारी आहे अथवा अकल्याणकारी आहे. याच आधारावर माणसाने कोणतीही देशना स्वीकारावी अथवा अस्वीकारावी.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०८/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Tuesday, 6 August 2024

केवळ धम्मग्रंथांचे पठन म्हणजे अधम्म होय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_* ७. केवळ धम्मग्रंथांचे पठन म्हणजे अधम्म होय*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_6.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_ब्राह्मणांनी सर्व भर विद्येवर दिला आहे. त्यांची अशी शिकवण आहे की विद्याच अथ (सुरवात) आहे आणि विद्याच इती (शेवट) आहे. यापुढे कशाचाही विचार करण्याची आवश्यकता नाही. याविरुद्ध *बुद्ध सर्वांकरिता विद्या, सर्वांना शिक्षा यांचे पक्षपाती होते. याशिवाय मनुष्य प्राप्त ज्ञानाचा, विद्येचा उपयोग कसा करतो यात बुद्धांना अधिक रुची होती. ज्ञानासाठी ज्ञान यात त्यांना काही गम्य नव्हते.*_

_*परिणामस्वरूप त्यांचा आग्रह होता की, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे शीलही असलेच पाहिजे. शीलाशिवाय ज्ञान म्हणजे अनर्थाला आमंत्रणच.*_ 

_भिक्खू पटीसेनाला बुद्धांनी जे सांगितले त्यात *बुद्ध प्रज्ञेच्या तुलनेने शीलाला अधिक महत्त्व देतात हे स्पष्ट आहे.* प्राचीन काळी बुद्ध श्रावस्ती येथे वास करीत होते तेव्हा त्याच वेळी श्रावस्ती येथे पटीसेन नावाचा वृद्ध याचक वास्तव्याला होता. तो प्रवृत्तीने मंदमती आणि मूढमती होता. त्याला एका गाथेचे अध्ययन करणेही कठीण होते._ 

_अशा स्थितीत बुद्धांनी पाचशे अर्हतांनी क्रमाक्रमाने एक एक दिवस त्याला शिकवावे अशी व्यवस्था केली. तीन वर्षे उलटून गेली तरीही त्याला गाथा मुखोद्गत करता आली नाही._

_तेव्हा त्या जनपदातील सर्वप्रकारचे लोक (चारही वर्गातील लोक) त्याचे अज्ञान जाणून त्याची निंदा करू लागले. त्याची टवाळी करू लागले. बुद्धांना त्याची दया आली. बुद्धांनी त्याला आपल्या निकट बोलाविले आणि मृदु मधुर स्वरात पुढील गाथा कथन केली._

*_"ज्याची वाणी संयत आहे. ज्याचे चित्त संयत आहे. जो कायेने कोणावरही आघात करीत नाही असे आचरण करणाऱ्या माणसाला निर्वाण प्राप्त होते."_* 

_पटीसेन तथागतांच्या करुणेने हेलावला. त्याचे चित्त प्रमुदित झाले. त्याने गाथा पुनरुक्त केली. मुखोद्गत केली. बुद्धांनी त्याला पुढे असा उपदेश केला की, "हे वृद्ध भिक्खू, तुला फक्त एकच गाथा अवगत आहे. इतरांना याची माहिती आहे. ते तुझी निंदा करतील. म्हणून मी तुला या गाथेचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करून सांगणार आहे. तू सावधान चित्ताने तो ग्रहण करावा.'_ 

_त्यानंतर *बुद्धांनी कायेचे तीन अकुशल कर्म, वाणीचे चार अकुशल कर्म आणि चित्ताचे तीन अकुशल कर्म त्याला स्पष्ट करून सांगितले. त्याला हेही स्पष्ट करून सांगितले की या अकुशल कर्मापासून विरत झाल्यास माणसाला निर्वाण प्राप्त होते. बुद्धांनी त्याला अशाप्रकारे देशना दिल्याने त्या भिक्खूला सत्याचे ज्ञान झाले. तो अर्हत पदास प्राप्त झाला.*_ 

_याचसमयी पाचशे भिक्खुनी विहारात वास्तव्याला होत्या. त्यांनी बुद्धांकडे आपणापैकी एकीला पाठविले आणि प्रार्थना केली की, त्यांना धम्मोपदेश देण्यासाठी भिक्खू पाठवावा. त्यांची प्रार्थना बुद्धांनी स्वीकारली. बुद्धांनी अशी मनीषा व्यक्त केली की पटीसेनाने त्यांच्याकडे जावे आणि त्यांना धम्मोपदेश द्यावा._ 

_ही व्यवस्था केली आहे हे ऐकल्यावर त्या सर्व भिक्खुनी हसू लागल्या. त्यांनी सर्वांनी असे ठरविले की, भिक्खू पटीसेन उद्या आल्यावर त्या गाथेचे उलटे पठन करावे म्हणजे तो वृद्ध भिक्खू गोंधळून जाईल व लज्जित होईल._ 

_दुसऱ्या दिवशी जेव्हा तो भिक्खू आला तेव्हा सर्व लहान थोर भिक्खूंनींनी त्याचे स्वागत केले. त्याला वंदन केले. असे करताना त्या एक दुसरीकडे पाहून स्मित करीत होत्या._ 

_त्यांनी त्या भिक्खुला आसन प्रदान केले. तो आसनस्थ झाल्यावर त्याला त्यांनी अन्नदान केले. अन्न ग्रहण करून कर प्रक्षालनानंतर त्यांनी त्या भिक्खूला धम्मोपदेश द्यावा अशी प्रार्थना केली._ 

_"भगिनींनो, मी अल्पबुद्धी आहे. माझे ज्ञान सीमित आहे. मला फक्त एकच गाथा अवगत आहे. मी ती गाथा आपणापुढे कथन करणार आहे. मी त्या गाथेचा अर्थही आपणास स्पष्ट करून सांगणार आहे. तुम्ही हा उपदेश सावधान चित्ताने ग्रहण करावा आणि समजून घ्यावा."_

_त्यानंतर सर्व युवा भिक्खुनींनी ती गाथा उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला. परंतु हे काय! त्यांच्या मुखातून शब्दच बाहेर पडले नाही. त्या लज्जित झाल्या. त्या दुःखीकष्टी झाल्या. त्यांच्या माना लज्जेने खाली वाकल्या._ 

_पटीसेनाने ती गाथा गायिली. ज्याप्रमाणे बुद्धांनी त्याला ती गाथा समजावून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद करून सांगितला. *सर्व भिक्खुनी त्याची वाणी श्रवण करून आश्चर्यचकित झाल्या. तो धम्मोपदेश श्रवण करून त्या प्रमुदित झाल्या. प्रसन्नता पावल्या. त्यांनी पटीसेनाला मनापासून वंदना केली. त्या सर्व अर्हत पदास प्राप्त जाहल्या.*_ 

_दुसऱ्या दिवशी राजा प्रसेनजिताने बुद्धांना त्यांच्या समस्त भिक्खुसंघासहित राजप्रासादी भोजनास्तव आमंत्रित केले. *बुद्धांनी पटीसेनाची विशेष उन्नत अवस्था जाणिली. त्याने अर्जित केलेली श्रद्धा जाणिली. पटीसेनाने त्यांचे भिक्षापात्र धारण करावे आणि त्याच्यासह असावे अशी बुद्धांनी मनीषा व्यक्त केली.*_

_ते सर्व राजप्रासादाच्या प्रवेशद्वारी आले. द्वारपाल पटीसेनाचा पूर्वपरिचित होता. त्याने *पटीसेनाला राजप्रासादी प्रवेश दिला नाही. द्वारपाल वदला, "ज्या भिक्खुला एकच गाथा अवगत आहे अशा भिक्खूचे आम्ही आतिथ्य करीत नाही. तुझ्यासारख्या सामान्य भिक्खुला येथे स्थान नाही. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भिक्खूंना वाट मोकळी कर आणि तू चालायला लाग."* त्यामुळे पटीसेन प्रवेशद्वारा- बाहेरच थांबला. तेथेच आसनस्थ झाला._ 

_बुद्ध आसनस्थ झाले. त्यांनी कर प्रक्षालन केले. परंतु हे काय? भिक्षापात्रासहित पटीसेनाचा हात तेथे उपस्थित झाला. राजा, त्याचे अमात्य आणि उपस्थित सर्व हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले आणि उद्‌गारले, "अरे हा कोण आहे?"_

_त्यावर बुद्ध उत्तरले, *"हा भिक्खू पटीसेन आहे. त्याला नुकतीच बोधी प्राप्त झाली आहे. त्याने माझे भिक्षापात्र धारण करावे आणि माझ्यासवे यावे हे मीच त्याला सुचविले होते. परंतु द्वारपालाने त्याला प्रवेश नाकारला."*_ 

_त्यानंतर पटीसेनाला प्रवेश दिला गेला आणि तोही भिक्खुसंघात सहभागी झाला. त्यानंतर राजा प्रसेनजित बुद्धांकडे वळून वदला, "मी असे ऐकिले आहे की पटीसेन हा अल्प क्षमतेचा भिक्खू आहे. त्याला फक्त एकच गाथा अवगत आहे. तर मग त्याला बोधी कशी प्राप्त झाली."_ 

_यावर बुद्ध उत्तरले, *"ज्ञान अधिक नसले तरीही चालेल पण ज्ञानापेक्षा शील अधिक महत्त्वाचे आहे."*_ 

_"या *भिक्खू पटीसेनाने एका गाथेचे मर्म जाणिले. त्याने ती गाथा हृदयस्थ केली. त्याची काया, वाचा आणि चित्त पूर्ण शांत पावले. माणूस खूप ज्ञानी असेल पण त्याचे आचरण त्या अनुसार नसेल तर त्याचे सारे ज्ञान त्याला विनाश पथापासून वाचवू शकत नाही. अशा ज्ञानाचे प्रयोजन काय ?*_ 

_त्यानंतर बुद्ध म्हणाले, *"एखादा माणूस हजार गाथांचे पठन करतो. परंतु तो ज्या गाथा उच्चारतो त्यापैकी एकाही गाथेचे मर्म तो जाणत नाही तर त्याचे हे पठन व्यर्थ आहे. एकच गाथा जी समजून उमजून पठन केली जाते आणि जिच्या पठनामुळे चित्त शांत होते अशा एका गाथेच्या पठनाची बरोबरी त्या हजार गाथा करू शकणार नाही. न समजता, न उमजता, हजार गाथा पठन केल्या तर त्याचे प्रयोजन काय? पण एकच गाथा श्रवण केली. समजली, उमजली, सत्य आकलन झाले आणि त्यानुसार आचरण केले तर माणसाला निर्वाण प्राप्त होते."*_ 

_*माणूस अनेक गाथांचे पठन करीत असेल पण त्या गाथा त्याला समजत नसतील. त्या त्याला समजावून सांगता येत नसतील तर ते पठन व्यर्थ आहे. परंतु धम्माचे एक पद जाणणे, त्यानुसार आचरण करणे हाच निर्वाण प्राप्तीचा मार्ग आहे.* हे वचन ऐकून ते दोनशे भिक्खू, तो राजा आणि त्याचे अमात्य प्रमुदित झाले. प्रसन्नता पावले._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०७/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Monday, 5 August 2024

कल्पनाविलासाश्रित श्रद्धा हा अधम्म होय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*६. कल्पनाविलासाश्रित श्रद्धा हा अधम्म होय*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_5.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_चित्तात असे प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे._

१. _मी गतसमयी होतो काय ?_ 

२. _मी गतसमयी नव्हतो काय ?_

३. _गतसमयी मी कोण होतो ?_

४. _मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत गेलो ?_

५. _मी भावी काळात असणार काय ?_

६. _मी भावी काळात नसणार काय?_ 

७. _मी भावी काळात कोण असणार?_ 

८. _मी भावी काळात कसा असणार?_ 

९. _मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत जाणार?_ 

*_त्याचप्रमाणे मनुष्य आपल्या वर्तमानविषयी, स्वतःविषयी संदिग्ध आहे. द्विधा आहे. संदेहशील आहे. तो स्वतःशीच विचारणा करतो की,_*

१. _मी आहे काय ?_

२. _मी नाही काय ?_ 

३. _मी काय आहे ?_ 

४. _मी कसा आहे?_ 

५. _हा माझा जीव कोठून आला?_ 

६. _हा कोठे जाणार?_

_*या विश्वासाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यापैकी काही खालीलप्रमाणे, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली? काय या विश्वाचे अस्तित्वच चिरंतन आहे?*_

_*पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात काही म्हणतात संपूर्ण सृष्टी ब्रह्माद्वारा उत्पत्र झाली आहे. तर इतर काही म्हणतात सृष्टीची उत्पत्ती प्रजापतीद्वारा झाली आहे.*_ 

_*दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात काही म्हणतात विश्व चिरंतन आहे. इतर काही म्हणतात विश्व चिरंतन नाही. काही म्हणतात विश्व ससीम आहे. इतर काही म्हणतात विश्व असीम आहे.*_

_*या प्रश्नांची दखल घेण्यास बुद्धांनी  नकार दिला. त्यांच्या मते अशा प्रश्नांची विचारणा करणारे आणि अशा प्रश्नांची दखल घेणारे दोघेही विकृत बुद्धीचे लोक असावेत. अशा प्रश्नांचे उत्तर देणारा सर्वज्ञ असावा लागतो आणि अशी सर्वज्ञता कोणाच्याही ठायी नाही.*_

_त्यांचे म्हणणे असे होते की, *अशाप्रकारे उत्तर देण्यासाठी कोणीही सर्वज्ञ नाही. कोणीही असा दावा करू शकत नाही की जे काही आम्ही जाणू इच्छितो ते सर्वकाही त्याला ज्ञात आहे. आणि कोणी असाही दावा करू शकत नाही की, कोणत्याही समयी आम्ही जे जाणू इच्छितो ते त्याला सर्व समयी ज्ञात आहे. नेहमी काही ना काही अज्ञात असतेच.*_

_याच कारणास्तव बुद्धांनी अशा सिद्धांतांना आपल्या धम्मातून वगळले. धम्मापासून दूर ठेवले. *त्यांची अशी मान्यता होती को, जो धर्म या सर्व बाबींना अंगिकारतो तो धर्म स्वीकारण्यायोग्य नाही.*_

_बुद्धांच्या समकालीनांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार मानले त्या सिद्धांताचा संबंध दोन विषयांशी होता._

१. *_आत्मा आणि_* 

२. *_विश्वाची उत्पत्ती._*

_त्यांनी आत्म्याविषयी काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारणा केली._

१. _मी गतसमयी होतो काय ?_ 

२. _मी गतसमयी नव्हतो काय ?_

३. _गतसमयी मी कोण होतो ?_

४. _मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत गेलो ?_

५. _मी भावी काळात असणार काय ?_

६. _मी भावी काळात नसणार काय?_ 

७. _मी भावी काळात कोण असणार?_ 

८. _मी भावी काळात कसा असणार?_ 

९. _मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत जाणार?_ 

*_माणूस स्वतःच्या वर्तमानाविषयीही संदिग्ध आहे. संदेहाच्या स्थितीत आहे. म्हणून तो स्वतःशीच प्रश्न विचारतो;_*

१. _मी आहे काय ?_

२. _मी नाही काय ?_ 

३. _मी काय आहे ?_ 

४. _मी कसा आहे?_ 

५. _हा माझा जीव कोठून आला?_ 

६. _हा कोठे जाणार?_

_इतरांनी विश्वाच्या उत्पत्तीविषयी प्रश्न उपस्थित केले. काही म्हणतात हे विश्व ब्रह्माची उत्पत्ती आहे. काही म्हणतात प्रजापत्तीने स्वतः ची आहुती देऊन हे विश्व उत्पन्न केले. इतर आचार्यांनी इतर प्रश्न उपस्थित केले. हे विश्व चिरंतन आहे? हे विश्व चिरंतन नाही? हे विश्व ससीम आहे? हे विश्व असीम आहे? ही काया म्हणजेच जीव? काया वेगळी आहे आणि जीव वेगळा आहे? सत्यज्ञाता मृत्यूनंतरही अस्तित्वात असतो? सत्यज्ञाता मृत्यूनंतर अस्तित्वात नसतो? सत्यज्ञाता मृत्यूनंतर अस्तित्वात असतो आणि नसतोही ? तो मृत्यूनंतर अस्तित्वात नसतो? आणि तो नसतो असेही नाही?"_

_अशा प्रश्नांची संभावना करताना बुद्ध म्हणतात की, असे प्रश्न विकृतबुद्धी माणसेच विचारू शकतात. *या सिद्धांतांची बुद्धाने निंदा करण्याची तीन कारणे आहेत.*_

१. *_प्रथम कारण असे की, या सिद्धांतांना धर्माचे अंग बनविण्याचे काहीही कारण नाही. काहीही प्रयोजन नाही._* 

२. *_दुसरे कारण असे की या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी माणूस सर्वज्ञ असावा लागतो आणि कोणीही सर्वज्ञ नाही. त्याने आपल्या संबोधनात यावर भर दिला आहे._*

_त्याचे असे म्हणणे होते की, विशिष्ट समयी आणि त्याच समयी कोणालाही सर्व बाबी दिसत नाही, कोणालाही सर्व बाबीचे ज्ञान असणे शक्य नाही. ज्ञानाला कोठेही अंत नाही. काही ना काही जाणण्यायोग्य नेहमीच शिल्लक राहणार._

३. *_या सिद्धांताविरुद्ध तिसरा तर्क असा होता की, हे सर्व सिद्धांत नुसते कल्पनाविलास आहेत. त्यांचे 'सत्य परीक्षाग झाले नाही. ना ही त्यांच्या सत्याची परीक्षा शक्य आहे._*

_*हे सिद्धांत केवळ स्वैर कल्पना- विलासाचा परिणाम होत. त्यांच्या पाठीमागे कोणताही यथार्थ नाही. याशिवाय कल्पनाविलासाश्रित या सिद्धांताची माणसामाणसांतील परस्पर संबंधाबाबत उपयोगिता काय ? त्यांची काहीही उपयोगिता नाही. विश्वाची निर्मिती झाली या धारणेवर बुद्धाचा विश्वासच नव्हता. विश्व उत्क्रांत झाले अशी त्याची धारणा होती.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०६/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Sunday, 4 August 2024

यज्ञयाग (आहुती बळी) यावर श्रद्धा म्हणजे अधम्म होय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*५. यज्ञयाग (आहुती बळी) यावर श्रद्धा म्हणजे अधम्म होय*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_4.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_ब्राह्मणीधर्म यज्ञयागावर आधारित आहे. *काही यज्ञयाग हे नित्यकर्म आणि काही यज्ञयाग हे नैमित्तिक कर्म म्हणून संबोधिले जातात. नित्य यज्ञयाग म्हणजे अनिवार्य कर्तव्ये. त्यांची फळे प्राप्त होवोत अथवा न होवोत ते केलेच पाहिजे. नैमित्तिक यज्ञयाग हे याजक ऐहिक सुख प्राप्तीची, इच्छापूर्तीची अपेक्षा करतो तेव्हा केले जातात. ब्राह्मणी यज्ञयागात सुरापान, पशुबळी आणि मौज मजा करणे यांचा समावेश होतो. तरीही या यज्ञयागांना धार्मिक कृत्य मानले जाते.*_ 

_*बुद्धांनी यज्ञयागावर आधारित धर्माला मान्यता दिली नाही. त्या धर्माला त्याने मानवाच्या कल्याणाचा धर्म मानले नाही.* बुद्ध यज्ञांना धर्माचे अंग का मानीत नाही याची कारणे त्यांनी या विषयावर विवाद करण्यासाठी गेलेल्या ब्राह्मणांशी झालेल्या संवादात स्पष्ट केली आहेत._ 

_या विषयावर तीन ब्राह्मणांनी बुद्धांशी विवाद केला असे दाखले आहेत. ते तीन ब्राह्मण म्हणजे *कूटदन्त, उज्जय आणि उदायी* हे होत._ 

*_१) ब्राह्मण कूटदन्त_*

_ब्राह्मण कूटदन्ताने, यज्ञयागाची उपयोगिता आणि महत्त्व याविषयी त्याचे काय विचार आहेत, ते कथन करावे अशी तथागतांना प्रार्थना केली._ 

₹तथागत उत्तरले, "बरे आहे, हे ब्राह्मणा, मी जे काही कथन करणार आहे ते तू सावधान चित्ताने श्रवण करावे."_

_कूटदन्त उत्तरला, "हे श्रमणा, - ठीक आहे." आणि तथागतांनी निम्न कथन केले._ 

_"हे ब्राह्मणा, प्राचीन काळी - महाविजेता नावाचा एक राजा होता. तो - महाप्रतापी राजा होता. तो धनधान्य संपन्न राजा होता. त्याच्या खजिन्यात अमाप सोने, - रूपे होते. त्याच्या स्वाधीन भोग विलासाची - सर्व साधने होती. त्याच्याकडे अमाप संपत्ती होती. त्याचा खजिना धनाने भरलेला होता. त्याची कोठारे धान्याने भरलेली होती."_ 

_"एकदा राजा महाविजेता एकटाच - चिंतन करीत बसला असताना त्याच्या चित्तात विचारांचे काहूर उठले. तो जीवनाचे सत्य - जाणून घेण्यास उत्सुक झाला. तो विचार - करू लागला. मर्त्य माणसास उपभोग्य आणि सुखदायी अशा अमाप वस्तू माझ्याकडे आहेत. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. ही पृथ्वी मी पादाक्रांत केली आहे. अशा स्थितीत मी जर माझ्या दीर्घकालीन सुखासाठी, कल्याणासाठी मोठ्ठा यज्ञ केला तर किती बरे होईल?"_ 

_"राजाचा ब्राह्मण पुरोहित होता. तो पुरोहित राजाला म्हणाला, 'राजा या समयी तुझी प्रजा हैराण आहे, दुःखीकष्टी आहे. तुझी प्रजा लुटली जात आहे. तुझ्या राज्यात मोठ्या संख्येने दरोडेखोर आहेत. त्यांनी नगरात आणि गावात लुटालूट माजविली आहे. त्यांच्यामुळे वाटा असुरक्षित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत महाराजांनी यज्ञाच्या निमित्ताने प्रजेवर एक नवीन कर आकारला तर निश्चितच ती चूक होईल.' ती कृती चुकीची कृती ठरेल."_ 

_"परंतु महाराज आपण असा विचार करण्याची संभावना आहे की, 'मी शीघ्रातिशीघ्र या दुष्टांच्या कारवाया प्रतिबंधित करीन, मी त्यांना हद्दपार करीन, मी त्यांना दंड करीन, मी त्यांना शिक्षा करीन. मी त्यांना देहांत शासन करीन.' परंतु महाराज हे ध्यानी घ्यावे की, या प्रकारे त्यांची स्वेच्छाचारिता रोखता येणार नाही. जे अदंडित राहतील ते लोकांना छळणारच. ते लोकांना दुःखी, कष्टी करणारच."_

_"ही सर्व दुरावस्था रोखण्याचा एकच मार्ग आहे. महाराजाच्या राज्यात जे पशुपालनाचा व्यवसाय करतात, जे कृषी करतात त्या सर्वांना महाराजांनी अन्न द्यावे, बी बियाणे द्यावे. महाराजांच्या राज्यात जे कोणी व्यापार उदीम करतात त्यांना महाराजांनी व्यापार उदीमासाठी धन द्यावे. महाराजांच्या राज्यात जे कोणी शासकीय सेवेत आहेत त्या सर्वांना महाराजांनी अन्न आणि वेतन द्यावे."_

_"याचा परिणाम म्हणून ही सर्व माणसे आपआपल्या व्यवसायात मग्न होतील. कोणीही प्रजेला हैराण करणार नाही. कोणीही प्रजेला दुःखीकष्टी करणार नाही. कोणीही राज्यात उत्पात करणार नाही. याचा परिणाम असा होईल की राज्याचा आगम वाढेल. राज्याची आय वृद्धी होईल. राज्यात शांतता नांदेल, राज्यात सुख नांदेल, प्रजा सुखी समृद्ध जीवन जगेल प्रजा आपल्या मुलाबाळांना कडे-खांद्यावर घेऊन नाचेल, बागडेल, प्रजा आनंदी होईल. प्रजा भयमुक्त होईल आणि प्रजा आपली घरेदारे उघडी ठेवून वावरू शकेल."_

_"हे ब्राह्मणा, राजा महाविजेताने आपल्या पुरोहिताचे कथन स्वीकारले आणि त्याने त्याप्रमाणेच कृती केली. राज्यातील प्रजा आपआपल्या उद्योग व्यवसायात मग्न - झाली. राज्यातील उत्पात संपला. राज्याच्या आगमात वृद्धी झाली. राज्यात सुख नांदू लागले. राज्यात शांती नांदू लागली. दुसऱ्या सोबत आनंदाने गुण्यागोविंदाने नांदू लागली. आणि मुलाबाळांना कडे-खाद्यांवर घेऊन नाचू लागली, बागडू लागली. प्रजा आपली घरेदारे मोकळी ठेवून वावरू लागली."_

_जेव्हा राज्यात आबादी आबाद झाली. राज्यात सुखशांती नांदू लागली तेव्हा राजा महाविजेताने आपल्या पुरोहिताला पुन्हा एकदा आमंत्रित केले आणि राजा - वदला, "अव्यवस्था संपली आहे. उत्पात थांबले आहेत. राज्यात सुख नांदते आहे. राज्यात शांती नांदते आहे. मी एक मोठा यज्ञ करू इच्छितो. मी माझ्या दीर्घकालीन सुखासाठी, कल्याणासाठी हा यज्ञ करू इच्छितो. आपण मला श्रद्धेय आहात. आपण मला, मी काय करावे हे सुचवावे."_ 

_पुरोहिताने राजाला उत्तर दिले, - "हे राजा, आता आपण यज्ञ करावा. या यज्ञाकरिता आपण नगरातून आणि समस्त प्रदेशातून क्षत्रियांना आमंत्रित करावे. श्रेष्ठीना आमंत्रित करावे. अमात्यांना आमंत्रित करावे. शासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित करावे सर्व ब्राह्मणांना आमंत्रित करावे, समस्त गृहस्थांना आमंत्रित करावे. आमंत्रित करताना असे म्हणावे की मी एक मोठा यज्ञ करू इच्छितो. मी दीर्घकालीन सुखासाठी, कल्याणासाठी हा महानतम यज्ञ करू इच्छितो. आपण आपली सहमती व्यक्त करावी."_ 

_"हे ब्राह्मणा, हे कूटदन्ता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा प्रस्ताव स्वीकारला. आणि त्याप्रमाणेच निमंत्रणे पाठविली. आमंत्रित क्षत्रियांनी, अमात्यांनी, ब्राह्मणांनी, श्रेष्ठीनी, गृहस्थांनी निमंत्रणास एकमेव प्रतिसाद दिला, 'हे राजा, तू हा महान यज्ञ अवश्य करावा. हीच वेळ या महान यज्ञाकरिता सर्वथा अनुकूल अशी आहे'._

_*राजा महाविजेता सुज्ञ होता. गुणवान होता. त्याला अनेक गुणांची देणगी होती. त्याचा पुरोहितही सुज्ञ होता, गुणवान होता.*_ 

_हे ब्राह्मणा, "यज्ञ आरंभ होण्यापूर्वी त्या पुरोहिताने यज्ञात कशा कशाचा समावेश होईल हे राजाला समजावून सांगितले."_

_"पुरोहित म्हणाला, 'हे राजा, असे तर होणार नाही ना की, यज्ञ आरंभ करण्यापूर्वी, यज्ञ आरंभ केल्यानंतर, यज्ञ करतेसमयी किंवा यज्ञाच्या समाप्तीनंतर तुझ्या मनात असा विचार उत्पन्न व्हावा की, अरे या यज्ञात तर माझ्या धनसंपत्तीचा मोठा भाग व्यय झाला आहे.' राजा सावधान चित्ताने श्रवण करावे, तुझ्या चित्ती असा विचार कदापिही येणे योग्य नाही."_ 

_"आणि हे ब्राह्मणा, यज्ञ आरंभ करण्यापूर्वीच राजाला नंतर कोणताही पश्चाताप होऊ नये म्हणून किंवा जे यज्ञात सहभागी होतील त्यांना पुढे कोणताही पश्चाताप होऊ नये म्हणून तो पुरोहित पुढे वदला, 'राजा तुझ्या या यज्ञात सर्व प्रकारचे लोक येतील. असेही लोक येतील की जे जीवहत्या करताहेत. असेही लोक येतील की जे जीवहत्या करीत नाहीत. असेही लोक येतील की जे चौर्य कर्म करतात. असेही लोक येतील की जे त्यापासून विरत आहेत. असेही लोक येतील की कामवासनेसंबंधी मिथ्याचार करतात. या यज्ञात असेही लोक येतील की जे मिथ्याचारापासून विरत आहेत. या यज्ञात असेही लोक येतील की जे मिथ्या कथन करतात. असेही लोक येतील की जे मिथ्या कथनापासून विरत आहेत. असेही लोक येतील की जे कुटाळकी करतात. असेही लोक येतील की जे त्यापासून विरत आहेत. असे लोक येतील जे व्यर्थ कथन करतात. असेही लोक येतील की जे त्यापासून विरत आहेत. असे लोक येतील की जे कटुवचन बोलतात. असेही येतील की जे त्यापासून विरत आहेत. असे लोक येतील की जे लोभी आहेत. असेही येतील की जे त्यापासून विरत आहेत. असे लोक येतील की जे इतरांचा द्वेष करतात. असेही येतील की जे द्वेषापासून विरत आहेत. असे लोक येतील ज्यांची दृष्टी मिथ्या आहे. असेही लोक येतील ज्यांची दृष्टी सम्यक आहे. यापैकी जे अकुशल आहेत त्यांना त्यांच्या अकुशलतेसहित वेगळेच असू द्यावे. आणि हे राजा, जे कुशल आहेत त्यांचा यथायोग्य आदरसत्कार करावा. हे राजा, त्यांना संतुष्ट करावे. यामुळे हे राजा, चित्ताला आंतरिक शांती प्राप्त होईल."_

_"आणि पुढे हे ब्राह्मणा, *त्या यज्ञात वृषभ वध केला गेला नाही. शेळीचा वध केला गेला नाही. पक्षांचा वध केला गेला नाही. सुकरांचा वध केला गेला नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही जिवंत प्राण्याचा वध केला गेला नाही. यज्ञा (वधस्तंभ) साठी वृक्षतोड केली गेली नाही. यज्ञस्थळी पसरविण्यासाठी दर्भाचा विनाश केला गेला नाही. यज्ञानिमित्त जे दास, संदेशवाहक आणि सेवक नियुक्त करण्यात आले होते ते दैहिक कष्टाने पीडित नव्हते. ते भयग्रस्त नव्हते. ते म्लानमुखाने नेत्री अश्रू घेऊन कार्यरत नवाते. ज्यांनी स्वेच्छेने उत्तरदायित्व स्वीकारले ते कार्यरत होते. ज्यांना स्वेच्छेने श्रम करावयाचे नव्हते ते कार्यरत नव्हते. ज्यांना जे करावेसे वाटले त्यांनी तेच केले. ज्यांना जे करावेसे वाटले नाही त्यांनी ते केले नाही. घृत, लोणी, तेल, मधु, शर्करा यांचाच फक्त यज्ञ साध्य करण्यासाठी उपयोग करण्यात आला."*_ 

_"ब्राह्मणा, *तुझा यज्ञसुद्धा राजा महाविजेत्याच्या यज्ञासारखा असावा. जर तुझी यज्ञ करावयाची इच्छा असेल तर यज्ञ असाच असावा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. पशुवध ही निर्दयता आहे. म्हणून यज्ञ हा धर्माचे अंग होऊच शकत नाही. जो धर्म असे सांगतो की, प्राण्यांचा वध करून तुम्हाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते असे सांगणारा धर्म हा धमचि निकृष्टतम रूप होय."*_

_*मला असे विचारावेसे वाटते की, "हे श्रमण गौतमाः पशुवध न करताही, कुशल फल प्राप्तीचा अधिक कल्याणकारी असा दुसरा कोणता यज्ञ आहे काय?"*_ 

*_"होय, हे ब्राह्मणा, असा यज्ञ आहे."_*

_"आणि हे श्रमण गौतमा, तो यज्ञ कसा असतो ?"_ 

_*"जेव्हा मनुष्य श्रद्धायुक्त चित्ताने असा संकल्प करतो की, मी जीव हत्येपासून विरत राहीन, चौर्य कर्मापासून विरत राहीन, काम-तृष्णेसंबंधी मिथ्याचारापासून विरत राहीन, मिथ्या कथनापासून विरत राहीन. मी सुरा, मेरय, मद्य आदींच्या सेवनापासून विरत राहीन तर हा यज्ञ असा आहे की, खूप मोठा खर्च करून केलेल्या कोणत्याही यज्ञापेक्षा श्रेष्ठ यज्ञ आहे. हा यज्ञ निरंतर दान देण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा यज्ञ भिक्खूंकरिता विहार बांधण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा यज्ञ धम्मोपदेश ग्रहण करण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे."*_

_तथागतांनी असे कथन केल्यावर, कूटदन्त, तो ब्राह्मण, तथागतांना वदला, "अति उत्तम, हे श्रमण गौतमा, तुझ्या मुखातून व्यक्त झालेले हे कथन अति उत्तम आहे. हे कथन सर्वश्रेष्ठ आहे."_

_*२) ब्राह्मण उज्जय*_

_तेव्हा ब्राह्मण उज्जय तथागतांना म्हणाला, *"श्रमण गौतमा, आपण यज्ञाचे प्रशंसक आहात काय?"*_

_*"नाही ब्राह्मणा, मी प्रत्येक यज्ञाचा प्रशंसक नाही. मी प्रत्येक यज्ञाला सदोषही मानीत नाही. ज्या यज्ञात गोवध होतो. शेळ्यामेंढ्याचा वध केला जातो. पशुपक्षांचा आणि इतर जिवंत प्राण्यांचा वध केला जातो. त्यांचा विनाश केला जातो, हे ब्रह्मणा ज्या यज्ञात हत्याच हत्या आहे, मी अशा यज्ञांचा प्रशंसक नाही. मी अशा पक्षांची प्रशंसा का करावी ?"*_

_*"हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात हत्या अनिवार्य आहे, अशा यज्ञात श्रेष्ठजन सहभागी होत नाहीत किंवा श्रेष्ठतम मार्गावर मार्गक्रमण करणारेही अशा यज्ञात सहभागी होत नाहीत."*_

_*परंतु ज्या यज्ञात गोवध होत नाही. जीवित प्राणिमात्रांचा विनाश होत नाही, ज्या यज्ञात हत्या अनिवार्य नाही अशा यज्ञांचा मी प्रशंसक आहे. उदा. ज्या यज्ञात चिरस्थापित दान, अथवा कुटुंबाचा दीर्घकालीन कल्याणाच्या हेतूने करावयाच्या त्यागाचा संकल्प आहे, असे यज्ञ निश्चितच प्रशंसनीय आहेत.*_

_"आणि असे का?" कारण ब्राह्मणा, *ज्या यज्ञात हत्या अनिवार्य नाही अशा यज्ञात श्रेष्ठजन सहभागी होतात. श्रेष्ठतम मार्गावर मार्ग क्रमणा करणारे अशा यज्ञात सहभागी होतात."*_

*_३) उदायी ब्राह्मण_

_उदायी ब्राह्मणानेही तथागतांना तोच प्रश्न विचारला जो प्रश्न ब्राह्मण उज्जयीने तथागतांना केला होता._

_"काय श्रद्धेय गौतम यज्ञाचा प्रशंसक आहे? बुद्धांनी उज्जयीला जे उत्तर दिले तेच उत्तर याही ब्राह्मणाला दिले._ 

_ते म्हणाले, "असे यज्ञ जे समयोचित आहेत, असे यज्ञ जे निर्दयतेपासून मुक्त आहेत._

_*"असे यज्ञ ज्यात श्रेष्ठजीवी सहभागी होतात असे यज्ञ ज्यात ज्यांची दृष्टी स्वच्छ आहे ते सहभागी होतात. जे कालातीत आहेत ते जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त आहेत. जे प्राज्ञ आहेत. जे कुशला आहेत ते अशा यज्ञाची प्रशंसा करतात. यज्ञ अथवा श्रद्धायुक्त कर्मात श्रद्धायुक्त चित्ताने पुण्यक्षेत्रात जे बीज रुजविले जाते, अथवा जे श्रेष्ठजीवी आहेत त्यांना जे दान दिले जाते. त्याने देवता प्रसन्न होतात. या प्रकारच्या दानाने सुज्ञांना विद्येचा लाभ होतो. तथा ते दुःखमुक्त होतात. ते सुखद अवस्थेला प्राप्त होतात.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०५/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 3 August 2024

आत्म्यावर श्रद्धा हा अधम्म होय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*४. आत्म्यावर श्रद्धा हा अधम्म होय*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_3.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*बुद्धांचे असे वचन आहे की, ज्या धर्माचा आधार आत्मा आहे तो धर्म कल्पनाश्रित धर्म होय.*_

कोणीही आत्मा पाहिला नाही. कोणीही आत्म्याशी वार्तालाप केला नाही. आत्मा अदृश्य आहे. अज्ञात आहे. ज्याचे अस्तित्व आहे तो आत्मा नव्हे ते मन आहे आणि मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. आत्म्याप्रती श्रद्धा ही अलाभदायी आहे. अनुपयोगी आहे. *आत्म्यावर आश्रित धर्म हा स्वीकारण्या योग्य धर्म नव्हे. अशा धर्माची परिणती मिथ्याविश्वासात होते. अंधश्रद्धेत होते.*_

_बुद्धांनी हा प्रश्न येथेच समाप्त केला नाही. त्यांनी या प्रश्नाची चर्चा सर्व अंगांनी केली. जशी ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा ही सर्वसामान्य बाब आहे तशीच आत्म्यावर श्रद्धा हीही सर्वसामान्य बाब आहे._

_*आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग आहे. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा, आत्मन् असे म्हणतात.*_ 

_*ब्राह्मणी धर्मात आत्मा म्हणजे असे तत्त्व की जे कायेपासून स्वतंत्र आहे. ज्याचे कायेपासून स्वतंत्र अस्तित्व आहे. पण तो कायेतच वास करतो. जन्माच्या क्षणापासून निरंतर त्याचे अस्तित्व कायेसहच असते.*_ 

_आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ही तद्नुषंगिक इतर श्रद्धांशी निगडित आहे. *काया मृत्यू पावते पण आत्मा मृत्यू पावत नाही. आत्मा दुसऱ्या जन्मात दुसरी काया धारण करतो. काया ही आत्म्याचे बाह्य परिधान होय.*_ 

_*बुद्धांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा होती काय? नाही. त्यांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा नव्हती. आत्म्यासंबंधी बुद्धांचा सिद्धांत अनात्मवाद म्हणूनच प्रचलित आहे.*_ 

_अशरीरी आत्म्याची संकल्पना स्वीकारल्यास अनेक प्रश्न उद्‌भवतात आत्मा काय आहे? आत्मा कोठून येतो? कायेच्या मृत्यूनंतर आत्म्यांचे काय होते? आत्मा कोठे जातो? काया विलीन झाल्यावर आत्मा परलोकी कोणत्या रूपात वास करतो? त्या रूपात तो किती काळ वास करतो? ज्यांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा होती त्यांना बुद्धांनी असे प्रश्न विचारले. त्यांना त्यांच्यापासून या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा होती._

_प्रथम बुद्धांनी आपल्या नेहमीच्या उलट तपासणीच्या पद्धतीनुसार आत्म्याची संकल्पना किती संदिग्ध आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला._

_ज्यांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा आहे त्यांना त्यांनी प्रश्न विचारला की आत्मा हा आकाराने कसा आहे? रूपाने कसा आहे?_ 

_आनंदाला बुद्धांनी सांगितले की आत्म्याविषयी नानाविध मते आहेत. काही असे घोषित करतात की, माझ्या आत्म्याला आकार आहे. तो अति सूक्ष्म आहे. काही असे घोषित करतात की, आत्म्याला रूप आहे. तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. इतर घोषित करतात की आत्मा अनंत आहे अरूप आहे._

_अशाप्रकारे हे आनंद, आत्म्याविषयी अनेकविध मतमतांतरे आहेत. ज्या लोकांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा आहे त्यांची आत्म्याची संकल्पना काय आहे असा दुसरा प्रश्न बुद्धांनी उपस्थित केला. यावर काही म्हणतात, माझा आत्मा म्हणजे संवेदना होय. काही म्हणतात, नाही. आत्मा म्हणजे संवेदना नाही. तो अचेतनही नाही. माझा आत्मा संवेदनक्षम आहे. सचेतन आहे. अशाप्रकारे अनेक लोक आत्याच्या अनेक संकल्पना मांडतात._ 

_जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवतात त्यांना बुद्धांनी असाही प्रश्न विचारला की, काया मृत्यूला प्राप्त झाल्यावर आत्म्याची स्थिती काय होते?_ 

_त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, काया मृत्यू पावल्यावर आत्मा दृश्य स्वरूपात व्यक्त होतों काय?_ 

_यावर त्यांना अनेकविध संदिग्ध विधाने आढळली, संदिग्ध उत्तरे मिळाली._

_काया मृत्यू पावल्यावरही आत्मा आपला आकार आपले रूप कायम ठेवतो यावर बुद्धांना आठ विविध काल्पनिक उत्तरे सापडली._

_काय आत्मा सुद्धा कायेसह मृत्यूला प्राप्त होतो? यावर अगणित कल्पना आढळल्या._ 

_काया मृत्यू पावल्यावर आत्मा सुखी होतो अथवा दुःखी होतो असाही प्रश्न बुद्धांनी उपस्थित केला. काया मृत्यू पावल्यावर आत्मा सुखी होतो यावरही योगी आणि ब्राह्मणांची मते भित्र भित्र आहेत. काहींच्या मते कायेच्या मृत्यूमुळे आत्म्याला अतीव दुःख होते. तर काहींच्या मते आत्म्याला सुख होते. काहींच्या मते त्याला सुखही होते आणि दुःखही होते. तर काहोंच्या मते आत्म्याला सुख होते. काहींच्या मते त्याला सुखही होते आणि दुःखही होते. काहींच्या मते त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही._

₹आत्म्याच्या अस्तित्वविषयक या सर्व सिद्धांतांना, मतमतांतरांना बुद्धांचे उत्तर एकच होते जे त्यांनी चुन्दाला दिले._

_बुद्ध चुन्दाला म्हणाले, "चुन्द, योगी आणि ब्राह्मण यापैकी कोणाच्याही मतावर ज्यांची श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे जे आचरण करतात त्यांच्यासंबंधी मी अशी विचारणा करतो की, 'मित्रांनो, काय आपली ही श्रद्धा, हे आचरण योग्य आहे?' आणि उत्तरात ते होय म्हणत असतील आणि त्यांचेच मत योग्य आहे असा त्यांचा आग्रह असेल तर, आणि त्यांचा असाही आग्रह असेल की. इतरांची मते त्याज्य आहेत म्हणून ते ती मते मान्य करणार नाहीत तर मी हे मान्य करणार नाही. या प्रश्नांवर अनेक व्यक्तीची अनेक मते आहेत. मी यापैकी कोणत्याही मताला, कोणत्याही सिद्धांताला माझ्या सिद्धांताच्या तोडीचे समजत नाही. माझ्या सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ समजण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही." *आता अति महत्त्वाचा प्रश्न, आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्ध त्यांनी कोणता युक्तिवाद केला आहे हा आहे.*_ 

_*ईश्वराच्या अस्तित्वाच्या नकारासाठी बुद्धाने जे तर्क दिले, सामान्यपणे तेच तर्क त्यांनी आत्म्याच्या नकारासाठीही दिले.*_

१. _त्यांनी असा युक्तिवाद केला की, ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची चर्चा जशी निष्फळ आहे तशीच आत्म्याच्या अस्तित्त्वाविषयीची चर्चाही निष्फळ आहे._

२. _त्यांनी असाही युक्तिवाद केला की ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा जशी सम्यक दूशीला बाधक होते तशीच आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धासुद्धा सम्यक दृष्टीला बाधक होते._ 

३. _त्यांनी असाही युक्तिवाद केला की ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा जशी मिध्या विश्वासाची, अंधश्रद्धेची जननी आहे तद्वतच आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धासुद्धा मिथ्या विश्वासाची, अंधश्रद्धेची जननी आहे._ 

_*बुद्धांच्या मते आत्म्याच्या - अस्तित्वावरील श्रद्धा ही ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धेपेक्षा अधिक भयानक आहे, अधिक हानीकारक आहे. कारण आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा ही पुरोहितवादाची जननी आहे. ही सर्व मिथ्या विश्वास आणि अंधश्रद्धेची जननी आहे. एवढेच नव्हे तर ही श्रद्धा माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्या संपूर्ण जीवनावर पुरोहितांचा एकाधिकार प्रस्थापित करते.*_

_*या सर्वसामान्य युक्तिवादामुळे असे म्हटले जाते की, बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाविषयी निश्चित असे मत व्यक्त केलेच नाही. काहींच्या मते बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचा सिद्धांत नाकारला नाही. काहीच्या मते बुद्धांनी या विषयाला सतत टाळण्याचाच प्रयत्न केला.*_

_ही सर्व विधाने असत्य आहेत. कारण *महालीला बुद्धांनी निश्चित आणि सुस्पष्ट शब्दात असे सांगितले की, आत्मा नावाची कोणतीही वस्तू नाही. म्हणून त्याच्या आत्म्याच्या अस्तित्वाविषयीचा सिद्धांत अनात्मवाद ओळखला जातो.*_ 

_आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्ध सर्वसामान्य तर्क तर बुद्धांनी दिलेच पण त्याच बरोबर आत्म्याचे अस्तित्व नाकारण्यासाठी काही विशेष तर्कही बुद्धांनी दिले. ते तर्क बुद्धांच्या मतानुसार या सिद्धांतांच्या समूळ उच्छेदासाठी कारणीभूत ठरतील._

_*आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांता-विरुद्ध बुद्धांनी मांडलेला सिद्धांत हा नामरूप सिद्धांत या नावानेही संबोधिला जातो.*_

_*हा नामरूप सिद्धांत "हा विभाज्य वादा" द्वारा परीक्षणांचा परिणाम होय. यात मानव अथवा मानव व्यक्तित्व ज्या सूक्ष्म तत्त्वांचे मिळून निर्मित आहे त्यांचे तीक्ष्ण, सूक्ष्म, कठोर विश्लेषण करण्यात आले आहे. नामरूप हे जिवंत प्राणिमात्रांना दिलेले सामान्य नाम आहे.*_

_*बुद्धांच्या विश्लेषणानुसार प्राणिमात्र हा काही भौतिक तत्त्वे आणि काही मानसिक तत्त्वांच्या संयोगाचा परिणाम होय. ही भौतिक आणि मानसिक तत्त्वे 'स्कंध' म्हणून ओळखली जातात.*_ 

_*'रूपस्कंध' प्राथमिक स्वरूपात भौतिक तत्त्वांचा संयोग असतो. यात पृथ्वी, जल, वायू आणि अग्नी ही तत्त्वे असतात. यांच्या संयोगाने काया किंवा रूप अस्तित्वात येते. रूपस्कंधाव्यतिरिक्त नामस्कंधाचेही अस्तित्व आहे. ज्यापासूनच जिवंत प्राण्याची रचना होते.*_

_*या नाम स्कंधाला विज्ञान (चेतना) असे म्हणतात. या नाम स्कंघात तीन मानसिक तत्त्वे अंतर्भूत आहेत, वेदना (सहा इंद्रिये आणि त्यांच्या संपर्काने उत्पन्न होणारी अनुभूती), संज्ञा (बोध) आणि संस्कार (चित्ताची अवस्था) यांचा यात समावेश आहे. बरेचदा विज्ञान (चेतना) या तत्त्वालाही पूर्ववर्ती तीन तत्त्वांसह एक तत्त्व मानले जाते किंवा तीन तत्त्वांपैकी एक तत्त्व मानले जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञही कदाचित याच मताचे आहेत की चेतना (विज्ञान) हाच मूळ स्रोत आहे. त्यातूनच इतर मानसिक क्रियांची उत्पत्ती होते. विज्ञान (चेतना) हे प्राणिमात्राच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे.*_

*_चेतना (विज्ञान) ही चार तत्त्वांच्या संयोगाचा परिणाम होय. ही तत्त्वे म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही होत._*

_*बुद्धांनी पुरस्कारलेल्या चेतना (विज्ञान) सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. जे या सिद्धांतावर आक्षेप घेतात ते विचारतात की, "चेतना (विज्ञान) कशी निर्माण होते?"*_ 

_*हे सत्य आहे की विज्ञान (चेतना) जन्मासोबतच जागृत होते आणि मृत्यूने विज्ञान (चेतना) विनाश पावते. परंतु विज्ञान (चेतना) हे चार मूलतत्त्वांच्या संयोगाचा परिणाम होय, असे कसे म्हणता येईल?*_ 

_*भौतिक तत्त्वाच्या संयोगाने अथवा सहअस्तित्वाने विज्ञान (चेतना) उत्पन्न होते अशी बुद्धांची मान्यता नाही. बुद्धांचे वचन एवढेच आहे की, जेथे रूप आहे, काया आहे तेथे नाम पण आहे. तेथे विज्ञान (चेतना) पण आहे.*_

_*आधुनिक विज्ञानाची उपमा द्यावयाची असेल तर, जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे चुंबकीय क्षेत्रही असतेच ह चुंबकीय क्षेत्र कसे निर्माण होते, कसे उगम पावते याचे कोणालाही ज्ञान नाही. परंतु चुंबकीय क्षेत्र विद्युत क्षेत्रासोबत अनिवार्य रूपाने अस्तित्वात येते, विद्यमान असते यात मात्र शंका नाही.*_ 

*_हेच सहसंबंध काया आणि विज्ञान (चेतना) यांच्यात अस्तित्वात येतात असे का म्हटले जाऊ नये, असे का स्वीकारले जाऊ नये. विद्युत क्षेत्राच्या संबंधात चुंबकीय क्षेत्राला विद्युत क्षेत्राद्वारा प्रेरित क्षेत्र असे म्हणतात. त्याचप्रमाणे रूपकायाच्या संबंधात. विज्ञान (चेतन) ही रूपकाया द्वारा प्रेरित आहे. असे का महटले जाऊ नये._*

_आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्धचा बुद्धांचा तर्क येथेच पूर्ण होत नाही. त्यांना या संबंधात अधिक महत्त्वाचे असे काहीतरी पुढे सांगावयाचे आहे._

_*विज्ञान (चेतना) जागृत झाल्यावरच मनुष्य जिवंत प्राणी होतो. विज्ञान (चेतना) हे मनुष्य प्राण्याच्या जीवनातील प्रमुख तत्त्व आहे. विज्ञानाची (चेतनेची) प्रवृत्ती आणि प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील असते. जेव्हा विज्ञान आम्हाला काही ज्ञान देते, काही माहिती देते तेव्हा विज्ञान ज्ञानमूलक होते. ते ज्ञान, ती माहिती रूचिकर असू शकेल किंवा अरुचिकरही असू शकेल. ही रुची किंवा अरूची आपल्या आत घटणाऱ्या घटनांशी संबंधित असेल किंवा बाह्य वस्तू बाह्य घटनांशी संबंधित असेल.*_

_*विज्ञान (चेतना) भावनामूलक होते तेव्हा चित्तात अनुभूती उत्पन्न होतात. या अनुभूती अनुकूल असू शकतात किंवा प्रतिकूलही असू शकतात. हे भावनामूलक विज्ञान (चेतना) वेदनेच्या उत्पत्तीचे कारण असते.*_

_*विज्ञानाच्या (चेतनेच्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट हेतूच्या सिद्धीसाठी प्रयत्नशील होण्याची प्रेरणा मिळते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे आणि संकल्पाच्या पूर्तीसाठी आवश्यक प्रेरणेचे जनक आहे.*_

_*यावरून हे स्पष्ट होते की, जिवंत प्राण्याच्या ज्या काही क्रिया होतात त्या विज्ञानाद्वारे (चेतना) अथवा विज्ञानाच्या (चेतना) परिणाम स्वरूप होत असतात. या विश्लेषणानंतर बुद्ध असे प्रश्न विचारतात की, कोणते कार्य आहे जे आत्म्याने करण्यासाठी उरले आहे? आत्म्याची जी काही कार्ये मानली जातात ती कार्ये विज्ञानाद्वारा (चेतना) केली जातात, होतात. ज्याचे काहीच कार्य नाही, ज्याला काहीच कार्य नाही असा आत्मा म्हणजे एक उपाहासास्पद संकल्पनाच होय. अशाप्रकारे बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व असिद्ध केले आहे.*_

_*याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग होऊ शकत नाही. आत्म्याचे अस्तित्व स्वीकारणे म्हणजे अधम्म होय.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०४/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Friday, 2 August 2024

ब्रह्माशी सायुज्य (एकाकार होणे) यावर आधारित धर्म हा मिथ्या धम्म होय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*३. ब्रह्माशी सायुज्य (एकाकार होणे) यावर आधारित धर्म हा मिथ्या धम्म होय*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_2.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_जेव्हा बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता. *त्याला वेदांत असे म्हणत असत.* या सिद्धांताची तत्त्वे मोजकीच आणि सरल होती._

१. _या विश्वाच्या पृष्ठभूमीत एक सर्वव्यापी जीवनतत्त्व विद्यमान आहे. *त्याला ब्रह्म किंवा ब्रह्मन् असे म्हणतात.* हे ब्रह्म सत्य आहे, यथार्थ आहे. *आत्मा आणि ब्रह्म यात काही अंतर नाही दोन्ही एकच आहेत.*_

२. _जीवात्माचे ब्रह्मात विलीन होणे, मिलन होणे म्हणजेच मानवाची मुक्ती हे त्यांचे दुसरे तत्त्व आहे._

_जेव्हा जीवात्म्याला याचे ज्ञान होते की, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे तेव्हाच जीवात्म्याचे ब्रह्माशी मिलन होते. आणि आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत याच्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग म्हणजे संसाराचा त्याग._

*_या सिद्धांताला वेदांत असे म्हणतात._*

_या सिद्धांताविषयी बुद्धांना काडीचाही आदर नव्हता. त्यांची मान्यता होती की हा सिद्धांत मिथ्या गृहितावर आधारित आहे. यातून काहीही फल निष्पत्ती नाही. म्हणून याची काहीही उपयोगिता नाहीं._

_बुद्धांनी वासेठ्ठ यांचेशी झालेल्या संवादात हे स्पष्ट केले आहे._ 

_*बुद्धांचा तर्क असा होता की कोणतीही बाब सत्य म्हणून स्वीकारावयाची असेल तर त्यासाठी प्रमाणाची आवश्यकता असते.* प्रमाण दोन प्रकारचे असतात._ 

१. अनुभूती आणि 

२. अनुमान.

_बुद्धांनी विचारणा केली, कोणाला ब्रह्माची अनुभूती झाली काय? कोणी ब्रह्म पाहिले आहे काय? कोणी ब्रह्माशी संवाद केला आहे काय? कोणी ब्रह्माचा गंध घेतला आहे काय?_ 

_वासेठ्ठ म्हणाला, "नाही."_

_"ब्रह्माच्या अस्तित्वविषयक अनुमानाधारित प्रमाणही अपर्याप्त आहेत."_

_बुद्धांनी विचारणा केली, "ब्रह्माच्या अस्तित्वाचे अनुमान कशाच्या आधारावर काढता येईल?"_

_काहींचा तर्क असा की, अदृश्य वस्तूंचेही अस्तित्व असते. त्यांच्या मते ब्रह्मा अदृश्य आहे पण त्याचे अस्तित्व आहे. हे एक ढोबळ मानाने केलेले अनुमान आहे. हे अशक्य, असंभव, गृहितावर आधारित अनुमान आहे. अदृश्य वस्तूचेही अस्तित्व असते हे आपण युक्तिवादाकरिता स्वीकारूया._

_याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विद्युत, विद्युत अस्तित्वात आहे पण ती अदृश्य आहे. पण एवढाच तर्क पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूने दृश्य स्वरूपात स्वतःला व्यक्त केलेच पाहिजे तेव्हाच ती वस्तू यथाथनि अस्तित्वात आहे हे स्वीकारता येईल. जर अदृश्य वस्तू अन्य रूपात दृश्य स्वरूपात व्यक्त होत नसेल तर ती वस्तू यथार्थाने अस्तित्वात नाही असे मानावे लागेल._

_विद्युत अदृश्य असूनही तिचे अस्तित्व आपण स्वीकारतो कारण ती दृश्य परिणाम उत्पन्न करते. विद्युत प्रकाश उत्पन्न करते. प्रकाशाच्या उपस्थितीमुळे विद्युत अदृश्य असूनही तिचे अस्तित्व आम्ही स्वीकारतो. *हे अदृश्य ब्रह्म काय उत्पन्न करते? हे अदृश्य ब्रह्म काही दृश्य परिणाम उत्पन्न करते काय ?*_

*_याचे उत्तर नकारात्मक आहे._

_दुसरे उदा. ही देता येईल. *विधी क्षेत्रात एखादे गृहित स्वीकारले जाते. एखादी कल्पना मान्य केली जाते. तिचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. पण ती सत्य आहे हे गृहित धरले जाते. अशी विधिसंमत धारणा आम्ही स्वीकारतो.*_ 

_परंतु अशी विधिसंमत धारणा का स्वीकारली जाते ? ही विधिसंमत धारणा स्वीकारण्याचे कारण, ही धारणा स्वीकारण्याने न्यायसंमत आणि उपयोगी परिणाम प्राप्त होतात._ 

*_ब्रह्म ही कल्पना आहे. पण या कल्पनेच्या स्वीकाराने कोणते उपयोगी परिणाम प्राप्त होतात ?_* 

_वासेठ्ठ आणि भारद्वाज मौनच राहिले._ 

_आपल्या तर्काला अधिक सुदृढ आधार प्राप्त व्हावा यासाठी बुद्ध वासेष्ठ्ठाकडे वळून विचारते झाले, "काय तू ब्रह्माला पाहिले आहेस?" तीनही वेदांच्या ज्ञाता ब्राह्मणात कोणी एक तरी असा ब्राह्मण आहे काय ज्याने प्रत्यक्ष ब्रह्माला पाहिले आहे._ 

_"नाही गौतमा, खरेच एकही नाही."_

_"तीनही वेदांच्या ज्ञाता ब्राह्मणांच्या आचायर्यापैकी एक तरी असा आचार्य आहे काय की ज्याने प्रत्यक्ष ब्रह्माला पाहिले आहे?"_

₹"नाही गौतमा, खरेच एकही असा नाही."_

_"वासेष्ठ्ठा, या ब्राह्मणांच्या पूर्ववर्ती सात पिढ्यांत एक तरी ब्राह्मण आहे काय की ज्याने ब्रह्माला प्रत्यक्ष पाहिले आहे.?"_ 

_"नाही गौतमा, खरेच एक ही असा नाही."_ 

_"तर मग वासेष्ठ्ठा, काय ब्राह्मणांच्या प्राचीन ऋषींनी कोठे असे म्हटले आहे काय की, आम्ही ब्रह्म जाणतो. आम्ही ब्रह्म पाहिले. आम्ही जाणतो की ते कोठे आहे? आम्ही जाणतो की ते कसे आहे?"_ 

_"नाही गौतमा, असे ते म्हणत नाहीत."_

_त्यांनी त्या ब्राह्मण युवकांना प्रश्न विचारणे सुरूच ठेवले. बुद्ध म्हणाले, "आता वासेठ्ठ, तुझा काय विचार आहे? यावरून हे स्पष्ट होत नाही काय की, ब्राह्मणांचे ब्रह्माशी एकाकार, एकरूप होण्याविषयीचे वचन मूर्खपणाची व्यर्थ बडबड आहे."_

_*"वासेठ्ठ, ज्याप्रमाणे दृष्टिहीनांची रांग एक दुसऱ्याचा हात धरून मार्ग क्रमण करते तेव्हा, सर्वात पुढे आहे त्याला काही दिसत नाही. मध्ये आहे त्यालाही काही दिसत नाही आणि अंती आहे त्यालाही दिसत नाही. दिसू शकत नाही. त्याचप्रमाणे ब्राह्मणांची ही वचने उपाहासास्पद आहेत. ते केवळ शब्द आहेत. निरर्थक आणि पोकळ शब्द मात्र."*_

_*हे वासेठ्ठ ज्याप्रमाणे एखाद्याने म्हणावे की, या भूप्रदेशातील सर्वात सुंदर स्त्रीवर मी प्रेम करतो. मी तिची कामना करतो आणि लोक त्याला विचारतील, "बरे आहे हे प्रिय मित्रा, या भूप्रदेशातील सर्वात सुंदर स्त्रीवर तू प्रेम करतोस, तिची कामना करतोस तर ती स्त्री क्षत्रिय आहे किंवा ती स्त्री ब्राह्मण आहे किंवा ती स्त्री वैश्य आहे, किंवा ती स्त्री शूद्र आहे याची तुला माहिती आहे काय?"*_

_*जेव्हा त्याला लोक असे विचारतील तेव्हा त्याचे उत्तर "नाहीं" असे असेल तर. आणि जेव्हा लोक त्याला विचारतील की, "हे प्रिय मित्रा, या भूप्रदेशातील सर्वात सुंदर स्त्रीवर तू प्रेम करतोस, तिची कामना करतोस, त्या स्त्रीचे नाव काय? तिचे गोत्र काय? तिचा बांधा उंच आहे, ठेंगणा आहे की मध्यम आहे? ती कृष्णवर्ण आहे अथवा शुक्लवर्ण आहे. अथवा कोणत्या गावात, नगरात किंवा शहरात ती वास्तव्य करते?" असे विचारल्यावर त्याचे उत्तर "नाही" असे असेल तर.*_ 

_आता वासेष्ठ्ठा, तुझा काय विचार आहे? त्या माणसाचे हे कथन मूर्खपणाचे आहे?_

_ते ब्राह्मण वदले, "खरेच श्रमण गौतमा, हे असेच आहे."_

_*याचे तात्पर्य असे की ब्रह्म सत्य नाही. आणि असत्यावर आधारित धर्म व्यर्थ आहे. अनुपयोगी आहे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०३/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Thursday, 1 August 2024

ईश्वरावर श्रद्धा हे धम्माचे अनिवार्य, आवश्यक अंग नव्हे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*२. ईश्वरावर श्रद्धा हे धम्माचे अनिवार्य, आवश्यक अंग नव्हे*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_सृष्टीचा निर्माता कोण? हा सर्वसामान्य प्रश्न आहे. या सामान्य प्रश्नाचे सामान्य उत्तर असे आहे की, सृष्टीचा निर्माता, रचियता ईश्वर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला विविध नावांनी संबोधिले जाते. त्याला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म किंवा महाब्रह्म आदी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे? तो कसा अस्तित्वात आला? या प्रश्नांना मात्र काहीही उत्तरे नाहीत. ज्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे ते म्हणतात, ईश्वर सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे. त्याने संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. तो सर्वज्ञ आहे, असे ते मानतात. ईश्वराच्या ठायी काही नैतिक गुण असल्याचेही सांगितले जाते. ईश्वर शिव (मंगल) आहे. ईश्वर न्यायी आहे. ईश्वर करुणाघन आहे आदी._

_*प्रश्न असा आहे की, तथागतांनी ईश्वराला सृष्टीचा निर्माता, रचियता म्हणून स्वीकारले आहे काय?  याचे उत्तर "नाही" असे आहे. त्याने ईश्वराला सृष्टीचा निर्माता, रचियता म्हणून स्वीकारले नाही. ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत नाकारण्याची अनेक कारणे आहेत.*_

१. _कोणीही ईश्वर पाहिला नाही. लोक ईश्वराविषयी फक्त बोलतात._

२. _ईश्वर अज्ञात आहे. अदृश्य आहे._ 

३. _ईश्वराने सृष्टी निर्माण केली हे कोणीही सिद्ध करू शकला नाही. वस्तुतः सृष्टी उत्क्रांत झाली. कोणीही निर्माण केली नाही._

४. _ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचे लाभ ते कोणते? यात कोणताही लाभ नाही. कोणाचाही लाभ नाही._ 

_*बुद्ध असे म्हणतात की, ईश्वरावर आश्रित धर्म हा धर्मच नव्हे. त्याचा असून आणि नसूनही काहीच उपयोग नाही. यामुळे केवळ मिथ्या विश्वास उत्पन्न होतो. अंधश्रद्धा उत्पन्न होतात.* बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडला नाही. त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंवर विचार केला. ज्या कारणास्तव बुद्धाने या सिद्धांताचा अस्वीकार केला ती कारणे अनेक आहेत._

_त्यांचा असा युक्तिवाद आहे न की, ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारित नाही. *बुद्धांनी त्यांचा हा तर्क वासेठ्ठ भारद्वाज या  ब्राह्मणाबरोबर झालेल्या संवादात सुस्पष्टपणे मांडला आहे.*_ 

_मुक्तीचा, मोक्षाचा सत्य पथ कोणता आणि मिथ्या पथ कोणता यावर या दोन ब्राह्मणांत विवाद उत्पन्न झाला होता. याच समयी तथागत कोशल - जनपदात चारिका करीत होते. त्यांच्या समवेत मोठा भिक्खू समुदाय होता. असे घडले की त्यावेळी *तथागत अचिरावती - नदीकाठी असलेल्या ब्राह्मणांची नगरी मनसाकद येथे आम्रवनात विहारास्तव थांबले.*_ 

_*वासेठ्ठ आणि भारद्वाज दोघेही मनसाकद नगरीचे रहिवासी.* जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्याच नगरीत वास्तव्याला आहेत तेव्हा ते तथागतांकडे गेले. प्रत्येकाने तथागतांसमक्ष आपआपला दृष्टिकोन कथन केला._

_भारद्वाज म्हणाला, "तरुख्ख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. हा मुक्तीचा प्रत्यक्ष मार्ग आहे. जो या मार्गाचे अनुसरण करतो त्याला हा मार्ग सरळच ब्रह्माशी एकात्म करतो. एकरूप करतो."_ 

_वासेठ्ठ म्हणाला, "हे श्रमण गौतमा, विविध ब्राह्मणांनी विविध मार्गांचा उपदेश केला आहे. अध्वर्य ब्राह्मण, तैत्तिरिय ब्राह्मण, कन्छोक्य ब्राह्मण आणि भिहुवर्गीय ब्राह्मण. हे सर्व त्यांच्या मताच्या मानणाऱ्यांना ब्रह्माशी एकात्म, एकरूप होण्याचा मार्ग दाखवितात. त्यांच्या मार्गाचे अनुसरण करणारा ब्रह्माशी एकात्म होतो, एकरूप होतो असा त्यांचा आग्रह आहे._

_जसे एखाद्या नगराच्या आसपास अनेक वाटा असतात पण त्या सर्वच वाटा त्या नगरालाच येऊन मिळतात. तद्वतच अनेक ब्राह्मणांनी मुक्तीचे अनेक मार्ग सांगितले असले तरीही ते सर्वच मार्ग त्या मार्गाचे अनुसरण करणाऱ्यांना ब्रह्मात विलीन करतात. ब्रह्मात एकरूप करतात._ 

_तथागतांनी प्रश्न केला, "वासेठ्ठ, ते सर्व मार्ग योग्य आहेत असे तुझे म्हणणे आहे काय?"_ 

_"होय हे श्रमण गौतमा, माझे तसेच म्हणणे आहे."_

_*"परंतु वासेठ्ठ, तीनही वेदांच्या ज्ञात्या ब्राह्मणांपैकी कोणी एकतरी असा आहे काय ज्याने ब्रह्माचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे."*_

_"नाही, खरेच हे श्रमण गौतमा, असा कोणीही नाही."_

_*"या तीनही वेदांच्या ज्ञात्या ब्राह्मणांच्या आचार्यांपैकी कोणी एक तरी असा आहे काय ज्याने ब्रह्माचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे."*_

_"नाही, खरेच हे श्रमण गौतमा, असा कोणीही नाही."_

*_"कोणीही ब्रह्माला साक्षात पाहिले नाही. कोणालाही ब्रह्माचे सविकल्प ज्ञान नाही." "होय असेच आहे."_*

_वासेष्ठ बोलला. "मग तुम्हाला असा विश्वास कसा आहे की, ब्रह्माचे अस्तित्व आहे हे ब्राह्मणांचे कथन सत्यावर आधारित आहे."_

_*"वासेठ्ठ, जसे करबद्ध, पंक्तिबद्ध दृष्टिहीनांची रांग असावी. त्यांच्यापैकी सर्वात पुढे आहे त्याला काही दिसत नाही. जो मध्ये आहे त्याला काही दिसत नाही आणि जो अंती आहे त्यालाही काही दिसत नाही. त्याचप्रमाणे हे वासेठ्ठ, माझ्या मते ब्राह्मणांचे कथनही अशा दृष्टिहींनाच्या रांगेसारखे आहे. अन्य काहीही नाही. या रांगेतील प्रथम आहे त्याला काही दिसत नाही. जो अंती आहे त्यालाही काही दिसत नाही. तसेच या ब्राह्मणांचे हे कथन असेच उपहासास्पद आहे. ते केवळ शब्द आहेत. पोकळ आणि निरर्थक शब्द."*_ 

*_"काय हे असे नाही का, की एखादा माणूस अशा स्त्रीच्या प्रेमात पडला आहे की ज्या स्त्रीला त्याने पाहिलेही नाही."_*

_"होय हे असेच आहे." वासेठ्ठ उत्तरला._

_*आता वासेठ्ठा, तुला काय वाटते. "जेव्हा लोक त्या माणसाला विचारतील की, ठीक आहे, प्रिय मित्रा, या भूप्रदेशातील अति सुंदर अशा ज्या स्त्रीच्या प्रेमात तू पडला आहेस, तू जिची कामना करतो आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय स्त्री आहे काय? किंवा ती ब्राह्मण स्त्री आहे काय? किंवा ती वैश्य स्त्री आहे काय? किंवा शूद्र स्त्री आहे काय?"*_

_*सृष्टीचा तथाकथित रचियता, निर्माता महाब्रह्म, त्याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करताना तथागत भारद्वाज आणि वासेठ्ठ या ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, "ज्या प्राण्याने प्रथम जन्म घेतला तो स्वतःविषयी विचार करू लागला की मी ब्रह्म आहे. मी महाब्रह्म आहे. मी निर्माता आहे. मी रचियता आहे. मीच प्रमुख आहे. मीच नियामक आहे. मीच नियंत्रक आहे. मी आपलाच स्वामी आहे. मीच सर्वांचा पिता आहे. जे आहेत त्यांचाही आणि जे होतील त्यांचाही. माझ्या मुळेच ही जीव सृष्टी उत्पन्न झाली आहे."*_

_*"याचा अर्थ असा की, ब्रह्मा हा सर्वांचा पिता आहे. जे आहेत त्यांचाही अणि जे होतील त्यांचाही.*_

*_"तुमचे असे म्हणणे आहे की, तो पूज्य आहे. तो विजेता आहे. तो अविजित आहे. जे आहेत त्यांचा तो पिता आहे. जे होतील त्यांचा तो पिता आहे. असा जो ब्रह्मा आहे तो स्थायी आहे. तो चिरंतर आहे. तो नित्य आहे. तो अपरिवर्तनशील आहे. आणि अनंतकाळपर्यंत तसाच राहणार आहे. तर मग आपण सर्व, ज्यांची उत्पत्ती ब्रह्माने केली, ज्यांची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली ते आम्ही सर्व अनित्य का आहोत? परिवर्तनशील का आहोत? अस्थिर का आहोत? अल्पजीवी का आहोत? मरणधर्मी का आहोत?"_* 

_याला वासेठ्ठाकडे कोणतेही उत्तर नव्हते._

*_तथागतांचा तिसरा तर्क ईश्वराच्या सर्वशक्तिमान असण्याशी संबंधित होता. "जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे, तो सृष्टीच्या उत्पत्तीचे निमित्त आहे म्हणून याच कारणास्तव माणसाच्या चित्तात काहीही करण्याची इच्छा उत्पन्न होण्याचे काहीही प्रयोजन नाही. तसेच त्याला काही करण्याचेही प्रयोजन नाही. त्याच्या चित्तात काही करण्याचा संकल्पही उत्पन्न होणार नाही. किंवा तो काही प्रयासही करणार नाही. याचा अर्थ माणसाला या जगात ज्याला काहीही करावे लागत नाही, करावे लागणार नाही असा निष्क्रिय निरीह प्राणी म्हणूनच वावरावे लागेल. हे असे आहे तर ब्रह्माने माणसाची उत्पत्ती का आणि कशासाठी केली?”_*

_याचेही वासेठ्ठाकडे काही उत्तर नव्हते._ 

_*त्यांचा चवथा तर्क असा होता की, जर ईश्वर शिव आहे, कल्याणस्वरूप आहे तर, माणूस हिंसक, वध करणारा, चोर, व्यभिचारी, मिथ्या कथन करणारा, चहाडी करणारा, व्यर्थ बडबड करणारा, निंदक, लोभी, द्वेषी आणि विकृत का आहे? या सर्वांचेही निमित्त ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप, कल्याणमयी ईश्वराचे अस्तित्व असताना हे सर्व शक्य आहे काय ?*_ 

_*तथागतांचा पाचवा तर्क ईश्वराच्या सर्वज्ञ, न्यायी आणि कृपावंत असण्याशी संबंधित होता.*_

_*कोणी महान सृष्टिकर्ता आहे. तो सर्वज्ञ आहे. तो न्यायी आहे, तो कृपावंत आहे. मग या सृष्टीत एवढा अन्याय का होतो आहे? तथागतांनी विचारणा केली, "ज्याला दृष्टी आहे, जो दुःखद क्लेशकारक स्थिती पाहू शकतो असा ब्रह्मा आपल्या रचनेला सुधारीत का नाही? जर तो सर्व शक्तिमान आहे, त्याच्या शक्तीला कोणत्याही सीमा नाहीत तरीही त्याचे कर क्वचितच कोणाच्या कल्याणासाठी पुढे येतात. त्याच्याद्वारा निर्मित सर्व प्राणिमात्र, संपूर्ण सृष्टी दुःख का भोगीत आहे. तो सर्वांना सुखी का ठेवीत नाही. या सृष्टीत छल, कपट, मिथ्या कथन, अज्ञान, अत्याचार का फोफावत आहेत ? सत्यावर असत्याचा विजय का होतो आहे? सत्य आणि न्याय यांना पराजित का व्हावे लागते? माझी अशी मान्यता आहे की ब्रह्मा हा असा आहे की ज्याने केवळ असत्याला, अन्यायाला आश्रय देण्यासाठीच ही सृष्टी रचिली आहे. म्हणून हा तुमचा ब्रह्माही अन्यायी ठरतो. अत्याचारी ठरतो."*_

_*जर सर्व प्राणिमात्रात तो सर्वशक्तिमान ईश्वर विद्यमान आहे तर, जो त्या प्राणिमात्रांना सुखी अथवा दुःखी करू शकतो. जो त्यांना पुण्यकर्म किंवा पापकर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो तर असा ईश्वरही पापाने कलंकित होतोच. एकतर मनुष्य त्याच्या आज्ञेप्रमाणे वागत नसावा. अथवा ईश्वर न्यायी वा शिव नसावा अथवा हा ईश्वर आंधळा तरी असावा.*_ 

_*ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच्या सिद्धांताविषयी त्यांचा पुढील तर्क असा होता की, "ईश्वराच्या अस्तित्वविषयक प्रश्नाची चर्चाच व्यर्थ आहे, निरर्थक आहे, निष्प्रयोजन आहे."*_

_*त्यांच्या मतानुसार धर्माचा केंद्रबिंदू हा मनुष्य आणि ईश्वर यांचे संबंध हा नाही. तर धर्माचा केंद्रबिंदू हा मानवामानवातील संबंध हा आहे. माणसाने माणसाशी कसे वागावे जेणे करून सर्वच सुखी होतील याचा उपदेश देणे, हाच धर्माचा हेतू आहे.*_

_तथागत ईश्वराचे अस्तित्व आहे या सिद्धांताचा विरोधी असण्याचे आणखीही एक कारण आहे._ 

_*ते धार्मिक कर्मकांडाचे घोर विरोधी होते. ते धर्मसंस्कारांचे विरोधी होते. ते कर्मकांड आणि धर्म संस्कार यांच्या विरोधी होते. - कारण त्यांच्या मते यातून अंधश्रद्धा उत्पन्न - पावते आणि मिथ्या विश्वास, अंधश्रद्धा ही - सम्यक दृष्टीची शत्रू आहे. आणि सम्यक दृष्टी ही आर्य अष्टांगिक मार्गाचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व आहे.*_

_*तथागतांच्या मते ईश्वरावर श्रद्धा असणे ही बाब सर्वात भयानक आहे. अतिशय धोकादायक आहे. कारण ईश्वरावर श्रद्धा ही ईश्वराची पूजा आणि प्रार्थना यावर असलेल्या विश्वासाची उत्पत्ती होय. ईश्वराची पूजा आणि प्रार्थना यातून पुरोहितपद उत्पन्न पावते. पुरोहित हा असा दुष्ट बुद्धी आहे की, तो मिथ्या विश्वास, अंधश्रद्धा निर्माण करतो. यामुळे सम्यक दृष्टीचा मार्ग अवरुद्ध होतो.*_

*_ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताच्या विरोधात दिल्या गेलेल्या तर्कापैकी काही व्यावहारिक होते. तर बहुतांश धर्मशास्त्रांशी संबंधित होते. तथागतांना याची - जाणीव होती की, त्याचे हे तर्क ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा - समूळ उच्छेद करण्यास पर्याप्त नाहीत._* 

*_याचा अर्थ असा समजू नये - की तथागतांनीही अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हावी - यासाठी तर्कच दिले नाहीत. त्यांनी असा एक तर्क दिला की जो, ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा - समूळ उच्छेद करावयास समर्थ आहे यात - शंकाच नाही. हा तर्क तथागतांच्या प्रतीत्य समुत्पादाच्या सिद्धांतात अंतर्भूत आहे. याच - सिद्धांताला "परस्पर निर्भर उत्पत्तीचा सिद्धांत असेही म्हणतात."_*

*_या सिद्धांतानुसार ईश्वराचे अस्तित्व आहे अथवा नाही हा काही महत्त्वाचा प्रश्न नाही. तसेच ईश्वराने सृष्टी रचिली अथवा नाही हाही खरा प्रश्न नाही. खरा प्रश्न असा आहे की या सृष्टीच्या रचियत्याने ही सृष्टी कशी रचिली. सृष्टीची निर्मिती कशी केली. या प्रश्नाचे योग्य उत्तर सापडले तर त्याच्या निष्कर्षाच्या परिणाम स्वरूप ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील श्रद्धेचे समर्थन होऊ शकेल._* 

_*महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काय ईश्वराने शून्यातून, अभावातून सृष्टीची रचना केली. अथवा त्याने भावातून सृष्टीची रचना केली. अभावातून, शून्यातून काही निर्माण होऊ शकते यावर विश्वास ठेवणे शक्य नाही.*_ 

_*जर तथाकथित ईश्वराने भावातून (काही तरी अस्तित्वात होते त्यातून) सृष्टी निर्माण केली असेल तर मग ते पूर्वी अस्तित्वात असलेले काहीतरी हे ईश्वराने सृष्टीची रचना करण्यापूर्वीही अस्तित्वात होते, असा याचा अर्थ होतो. याचा अर्थ असा आहे की, ईश्वर हा जे पूर्वी काहीतरी अस्तित्वात होते त्याचा रचियता आहे, असे मानणे शक्य नाही.*_

*_ईश्वराने कोणत्याही वस्तूची रचना करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी रचिले असेल तर, ईश्वराला सृष्टीच्या रचनेचे आदी कारण मानता येणार नाही._*

*_अशाप्रकारे ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील अंधश्रद्धेचा समूळ नाश करणारा तथागतांचा हा अंतिम पण निर्विवाद तर्क होता._*

 *_ईश्वर हा सृष्टीचा रचियता आहे यावर श्रद्धा ही चुकीच्या आणि तर्क दुष्टगृहितावर आधारित श्रद्धा आहे. म्हणून अशी श्रद्धा असणे म्हणजे अधम्म होय. ही श्रद्धा केवळ असत्यावरील श्रद्धा होय._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०२/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...