🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अधम्म म्हणजे काय?_*
_*६. कल्पनाविलासाश्रित श्रद्धा हा अधम्म होय*_
*_(क्रमशः)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_5.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_चित्तात असे प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे._*
१. _मी गतसमयी होतो काय ?_
२. _मी गतसमयी नव्हतो काय ?_
३. _गतसमयी मी कोण होतो ?_
४. _मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत गेलो ?_
५. _मी भावी काळात असणार काय ?_
६. _मी भावी काळात नसणार काय?_
७. _मी भावी काळात कोण असणार?_
८. _मी भावी काळात कसा असणार?_
९. _मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत जाणार?_
*_त्याचप्रमाणे मनुष्य आपल्या वर्तमानविषयी, स्वतःविषयी संदिग्ध आहे. द्विधा आहे. संदेहशील आहे. तो स्वतःशीच विचारणा करतो की,_*
१. _मी आहे काय ?_
२. _मी नाही काय ?_
३. _मी काय आहे ?_
४. _मी कसा आहे?_
५. _हा माझा जीव कोठून आला?_
६. _हा कोठे जाणार?_
_*या विश्वासाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यापैकी काही खालीलप्रमाणे, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली? काय या विश्वाचे अस्तित्वच चिरंतन आहे?*_
_*पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात काही म्हणतात संपूर्ण सृष्टी ब्रह्माद्वारा उत्पत्र झाली आहे. तर इतर काही म्हणतात सृष्टीची उत्पत्ती प्रजापतीद्वारा झाली आहे.*_
_*दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात काही म्हणतात विश्व चिरंतन आहे. इतर काही म्हणतात विश्व चिरंतन नाही. काही म्हणतात विश्व ससीम आहे. इतर काही म्हणतात विश्व असीम आहे.*_
_*या प्रश्नांची दखल घेण्यास बुद्धांनी नकार दिला. त्यांच्या मते अशा प्रश्नांची विचारणा करणारे आणि अशा प्रश्नांची दखल घेणारे दोघेही विकृत बुद्धीचे लोक असावेत. अशा प्रश्नांचे उत्तर देणारा सर्वज्ञ असावा लागतो आणि अशी सर्वज्ञता कोणाच्याही ठायी नाही.*_
_त्यांचे म्हणणे असे होते की, *अशाप्रकारे उत्तर देण्यासाठी कोणीही सर्वज्ञ नाही. कोणीही असा दावा करू शकत नाही की जे काही आम्ही जाणू इच्छितो ते सर्वकाही त्याला ज्ञात आहे. आणि कोणी असाही दावा करू शकत नाही की, कोणत्याही समयी आम्ही जे जाणू इच्छितो ते त्याला सर्व समयी ज्ञात आहे. नेहमी काही ना काही अज्ञात असतेच.*_
_याच कारणास्तव बुद्धांनी अशा सिद्धांतांना आपल्या धम्मातून वगळले. धम्मापासून दूर ठेवले. *त्यांची अशी मान्यता होती को, जो धर्म या सर्व बाबींना अंगिकारतो तो धर्म स्वीकारण्यायोग्य नाही.*_
_बुद्धांच्या समकालीनांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार मानले त्या सिद्धांताचा संबंध दोन विषयांशी होता._
१. *_आत्मा आणि_*
२. *_विश्वाची उत्पत्ती._*
_त्यांनी आत्म्याविषयी काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारणा केली._
१. _मी गतसमयी होतो काय ?_
२. _मी गतसमयी नव्हतो काय ?_
३. _गतसमयी मी कोण होतो ?_
४. _मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत गेलो ?_
५. _मी भावी काळात असणार काय ?_
६. _मी भावी काळात नसणार काय?_
७. _मी भावी काळात कोण असणार?_
८. _मी भावी काळात कसा असणार?_
९. _मी कोणत्या अवस्थेतून कोणत्या अवस्थेत जाणार?_
*_माणूस स्वतःच्या वर्तमानाविषयीही संदिग्ध आहे. संदेहाच्या स्थितीत आहे. म्हणून तो स्वतःशीच प्रश्न विचारतो;_*
१. _मी आहे काय ?_
२. _मी नाही काय ?_
३. _मी काय आहे ?_
४. _मी कसा आहे?_
५. _हा माझा जीव कोठून आला?_
६. _हा कोठे जाणार?_
_इतरांनी विश्वाच्या उत्पत्तीविषयी प्रश्न उपस्थित केले. काही म्हणतात हे विश्व ब्रह्माची उत्पत्ती आहे. काही म्हणतात प्रजापत्तीने स्वतः ची आहुती देऊन हे विश्व उत्पन्न केले. इतर आचार्यांनी इतर प्रश्न उपस्थित केले. हे विश्व चिरंतन आहे? हे विश्व चिरंतन नाही? हे विश्व ससीम आहे? हे विश्व असीम आहे? ही काया म्हणजेच जीव? काया वेगळी आहे आणि जीव वेगळा आहे? सत्यज्ञाता मृत्यूनंतरही अस्तित्वात असतो? सत्यज्ञाता मृत्यूनंतर अस्तित्वात नसतो? सत्यज्ञाता मृत्यूनंतर अस्तित्वात असतो आणि नसतोही ? तो मृत्यूनंतर अस्तित्वात नसतो? आणि तो नसतो असेही नाही?"_
_अशा प्रश्नांची संभावना करताना बुद्ध म्हणतात की, असे प्रश्न विकृतबुद्धी माणसेच विचारू शकतात. *या सिद्धांतांची बुद्धाने निंदा करण्याची तीन कारणे आहेत.*_
१. *_प्रथम कारण असे की, या सिद्धांतांना धर्माचे अंग बनविण्याचे काहीही कारण नाही. काहीही प्रयोजन नाही._*
२. *_दुसरे कारण असे की या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी माणूस सर्वज्ञ असावा लागतो आणि कोणीही सर्वज्ञ नाही. त्याने आपल्या संबोधनात यावर भर दिला आहे._*
_त्याचे असे म्हणणे होते की, विशिष्ट समयी आणि त्याच समयी कोणालाही सर्व बाबी दिसत नाही, कोणालाही सर्व बाबीचे ज्ञान असणे शक्य नाही. ज्ञानाला कोठेही अंत नाही. काही ना काही जाणण्यायोग्य नेहमीच शिल्लक राहणार._
३. *_या सिद्धांताविरुद्ध तिसरा तर्क असा होता की, हे सर्व सिद्धांत नुसते कल्पनाविलास आहेत. त्यांचे 'सत्य परीक्षाग झाले नाही. ना ही त्यांच्या सत्याची परीक्षा शक्य आहे._*
_*हे सिद्धांत केवळ स्वैर कल्पना- विलासाचा परिणाम होत. त्यांच्या पाठीमागे कोणताही यथार्थ नाही. याशिवाय कल्पनाविलासाश्रित या सिद्धांताची माणसामाणसांतील परस्पर संबंधाबाबत उपयोगिता काय ? त्यांची काहीही उपयोगिता नाही. विश्वाची निर्मिती झाली या धारणेवर बुद्धाचा विश्वासच नव्हता. विश्व उत्क्रांत झाले अशी त्याची धारणा होती.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०६/०८/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment