🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अधम्म म्हणजे काय?_*
_*५. यज्ञयाग (आहुती बळी) यावर श्रद्धा म्हणजे अधम्म होय*_
*_(क्रमशः)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_4.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_ब्राह्मणीधर्म यज्ञयागावर आधारित आहे. *काही यज्ञयाग हे नित्यकर्म आणि काही यज्ञयाग हे नैमित्तिक कर्म म्हणून संबोधिले जातात. नित्य यज्ञयाग म्हणजे अनिवार्य कर्तव्ये. त्यांची फळे प्राप्त होवोत अथवा न होवोत ते केलेच पाहिजे. नैमित्तिक यज्ञयाग हे याजक ऐहिक सुख प्राप्तीची, इच्छापूर्तीची अपेक्षा करतो तेव्हा केले जातात. ब्राह्मणी यज्ञयागात सुरापान, पशुबळी आणि मौज मजा करणे यांचा समावेश होतो. तरीही या यज्ञयागांना धार्मिक कृत्य मानले जाते.*_
_*बुद्धांनी यज्ञयागावर आधारित धर्माला मान्यता दिली नाही. त्या धर्माला त्याने मानवाच्या कल्याणाचा धर्म मानले नाही.* बुद्ध यज्ञांना धर्माचे अंग का मानीत नाही याची कारणे त्यांनी या विषयावर विवाद करण्यासाठी गेलेल्या ब्राह्मणांशी झालेल्या संवादात स्पष्ट केली आहेत._
_या विषयावर तीन ब्राह्मणांनी बुद्धांशी विवाद केला असे दाखले आहेत. ते तीन ब्राह्मण म्हणजे *कूटदन्त, उज्जय आणि उदायी* हे होत._
*_१) ब्राह्मण कूटदन्त_*
_ब्राह्मण कूटदन्ताने, यज्ञयागाची उपयोगिता आणि महत्त्व याविषयी त्याचे काय विचार आहेत, ते कथन करावे अशी तथागतांना प्रार्थना केली._
₹तथागत उत्तरले, "बरे आहे, हे ब्राह्मणा, मी जे काही कथन करणार आहे ते तू सावधान चित्ताने श्रवण करावे."_
_कूटदन्त उत्तरला, "हे श्रमणा, - ठीक आहे." आणि तथागतांनी निम्न कथन केले._
_"हे ब्राह्मणा, प्राचीन काळी - महाविजेता नावाचा एक राजा होता. तो - महाप्रतापी राजा होता. तो धनधान्य संपन्न राजा होता. त्याच्या खजिन्यात अमाप सोने, - रूपे होते. त्याच्या स्वाधीन भोग विलासाची - सर्व साधने होती. त्याच्याकडे अमाप संपत्ती होती. त्याचा खजिना धनाने भरलेला होता. त्याची कोठारे धान्याने भरलेली होती."_
_"एकदा राजा महाविजेता एकटाच - चिंतन करीत बसला असताना त्याच्या चित्तात विचारांचे काहूर उठले. तो जीवनाचे सत्य - जाणून घेण्यास उत्सुक झाला. तो विचार - करू लागला. मर्त्य माणसास उपभोग्य आणि सुखदायी अशा अमाप वस्तू माझ्याकडे आहेत. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. ही पृथ्वी मी पादाक्रांत केली आहे. अशा स्थितीत मी जर माझ्या दीर्घकालीन सुखासाठी, कल्याणासाठी मोठ्ठा यज्ञ केला तर किती बरे होईल?"_
_"राजाचा ब्राह्मण पुरोहित होता. तो पुरोहित राजाला म्हणाला, 'राजा या समयी तुझी प्रजा हैराण आहे, दुःखीकष्टी आहे. तुझी प्रजा लुटली जात आहे. तुझ्या राज्यात मोठ्या संख्येने दरोडेखोर आहेत. त्यांनी नगरात आणि गावात लुटालूट माजविली आहे. त्यांच्यामुळे वाटा असुरक्षित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत महाराजांनी यज्ञाच्या निमित्ताने प्रजेवर एक नवीन कर आकारला तर निश्चितच ती चूक होईल.' ती कृती चुकीची कृती ठरेल."_
_"परंतु महाराज आपण असा विचार करण्याची संभावना आहे की, 'मी शीघ्रातिशीघ्र या दुष्टांच्या कारवाया प्रतिबंधित करीन, मी त्यांना हद्दपार करीन, मी त्यांना दंड करीन, मी त्यांना शिक्षा करीन. मी त्यांना देहांत शासन करीन.' परंतु महाराज हे ध्यानी घ्यावे की, या प्रकारे त्यांची स्वेच्छाचारिता रोखता येणार नाही. जे अदंडित राहतील ते लोकांना छळणारच. ते लोकांना दुःखी, कष्टी करणारच."_
_"ही सर्व दुरावस्था रोखण्याचा एकच मार्ग आहे. महाराजाच्या राज्यात जे पशुपालनाचा व्यवसाय करतात, जे कृषी करतात त्या सर्वांना महाराजांनी अन्न द्यावे, बी बियाणे द्यावे. महाराजांच्या राज्यात जे कोणी व्यापार उदीम करतात त्यांना महाराजांनी व्यापार उदीमासाठी धन द्यावे. महाराजांच्या राज्यात जे कोणी शासकीय सेवेत आहेत त्या सर्वांना महाराजांनी अन्न आणि वेतन द्यावे."_
_"याचा परिणाम म्हणून ही सर्व माणसे आपआपल्या व्यवसायात मग्न होतील. कोणीही प्रजेला हैराण करणार नाही. कोणीही प्रजेला दुःखीकष्टी करणार नाही. कोणीही राज्यात उत्पात करणार नाही. याचा परिणाम असा होईल की राज्याचा आगम वाढेल. राज्याची आय वृद्धी होईल. राज्यात शांतता नांदेल, राज्यात सुख नांदेल, प्रजा सुखी समृद्ध जीवन जगेल प्रजा आपल्या मुलाबाळांना कडे-खांद्यावर घेऊन नाचेल, बागडेल, प्रजा आनंदी होईल. प्रजा भयमुक्त होईल आणि प्रजा आपली घरेदारे उघडी ठेवून वावरू शकेल."_
_"हे ब्राह्मणा, राजा महाविजेताने आपल्या पुरोहिताचे कथन स्वीकारले आणि त्याने त्याप्रमाणेच कृती केली. राज्यातील प्रजा आपआपल्या उद्योग व्यवसायात मग्न - झाली. राज्यातील उत्पात संपला. राज्याच्या आगमात वृद्धी झाली. राज्यात सुख नांदू लागले. राज्यात शांती नांदू लागली. दुसऱ्या सोबत आनंदाने गुण्यागोविंदाने नांदू लागली. आणि मुलाबाळांना कडे-खाद्यांवर घेऊन नाचू लागली, बागडू लागली. प्रजा आपली घरेदारे मोकळी ठेवून वावरू लागली."_
_जेव्हा राज्यात आबादी आबाद झाली. राज्यात सुखशांती नांदू लागली तेव्हा राजा महाविजेताने आपल्या पुरोहिताला पुन्हा एकदा आमंत्रित केले आणि राजा - वदला, "अव्यवस्था संपली आहे. उत्पात थांबले आहेत. राज्यात सुख नांदते आहे. राज्यात शांती नांदते आहे. मी एक मोठा यज्ञ करू इच्छितो. मी माझ्या दीर्घकालीन सुखासाठी, कल्याणासाठी हा यज्ञ करू इच्छितो. आपण मला श्रद्धेय आहात. आपण मला, मी काय करावे हे सुचवावे."_
_पुरोहिताने राजाला उत्तर दिले, - "हे राजा, आता आपण यज्ञ करावा. या यज्ञाकरिता आपण नगरातून आणि समस्त प्रदेशातून क्षत्रियांना आमंत्रित करावे. श्रेष्ठीना आमंत्रित करावे. अमात्यांना आमंत्रित करावे. शासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित करावे सर्व ब्राह्मणांना आमंत्रित करावे, समस्त गृहस्थांना आमंत्रित करावे. आमंत्रित करताना असे म्हणावे की मी एक मोठा यज्ञ करू इच्छितो. मी दीर्घकालीन सुखासाठी, कल्याणासाठी हा महानतम यज्ञ करू इच्छितो. आपण आपली सहमती व्यक्त करावी."_
_"हे ब्राह्मणा, हे कूटदन्ता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा प्रस्ताव स्वीकारला. आणि त्याप्रमाणेच निमंत्रणे पाठविली. आमंत्रित क्षत्रियांनी, अमात्यांनी, ब्राह्मणांनी, श्रेष्ठीनी, गृहस्थांनी निमंत्रणास एकमेव प्रतिसाद दिला, 'हे राजा, तू हा महान यज्ञ अवश्य करावा. हीच वेळ या महान यज्ञाकरिता सर्वथा अनुकूल अशी आहे'._
_*राजा महाविजेता सुज्ञ होता. गुणवान होता. त्याला अनेक गुणांची देणगी होती. त्याचा पुरोहितही सुज्ञ होता, गुणवान होता.*_
_हे ब्राह्मणा, "यज्ञ आरंभ होण्यापूर्वी त्या पुरोहिताने यज्ञात कशा कशाचा समावेश होईल हे राजाला समजावून सांगितले."_
_"पुरोहित म्हणाला, 'हे राजा, असे तर होणार नाही ना की, यज्ञ आरंभ करण्यापूर्वी, यज्ञ आरंभ केल्यानंतर, यज्ञ करतेसमयी किंवा यज्ञाच्या समाप्तीनंतर तुझ्या मनात असा विचार उत्पन्न व्हावा की, अरे या यज्ञात तर माझ्या धनसंपत्तीचा मोठा भाग व्यय झाला आहे.' राजा सावधान चित्ताने श्रवण करावे, तुझ्या चित्ती असा विचार कदापिही येणे योग्य नाही."_
_"आणि हे ब्राह्मणा, यज्ञ आरंभ करण्यापूर्वीच राजाला नंतर कोणताही पश्चाताप होऊ नये म्हणून किंवा जे यज्ञात सहभागी होतील त्यांना पुढे कोणताही पश्चाताप होऊ नये म्हणून तो पुरोहित पुढे वदला, 'राजा तुझ्या या यज्ञात सर्व प्रकारचे लोक येतील. असेही लोक येतील की जे जीवहत्या करताहेत. असेही लोक येतील की जे जीवहत्या करीत नाहीत. असेही लोक येतील की जे चौर्य कर्म करतात. असेही लोक येतील की जे त्यापासून विरत आहेत. असेही लोक येतील की कामवासनेसंबंधी मिथ्याचार करतात. या यज्ञात असेही लोक येतील की जे मिथ्याचारापासून विरत आहेत. या यज्ञात असेही लोक येतील की जे मिथ्या कथन करतात. असेही लोक येतील की जे मिथ्या कथनापासून विरत आहेत. असेही लोक येतील की जे कुटाळकी करतात. असेही लोक येतील की जे त्यापासून विरत आहेत. असे लोक येतील जे व्यर्थ कथन करतात. असेही लोक येतील की जे त्यापासून विरत आहेत. असे लोक येतील की जे कटुवचन बोलतात. असेही येतील की जे त्यापासून विरत आहेत. असे लोक येतील की जे लोभी आहेत. असेही येतील की जे त्यापासून विरत आहेत. असे लोक येतील की जे इतरांचा द्वेष करतात. असेही येतील की जे द्वेषापासून विरत आहेत. असे लोक येतील ज्यांची दृष्टी मिथ्या आहे. असेही लोक येतील ज्यांची दृष्टी सम्यक आहे. यापैकी जे अकुशल आहेत त्यांना त्यांच्या अकुशलतेसहित वेगळेच असू द्यावे. आणि हे राजा, जे कुशल आहेत त्यांचा यथायोग्य आदरसत्कार करावा. हे राजा, त्यांना संतुष्ट करावे. यामुळे हे राजा, चित्ताला आंतरिक शांती प्राप्त होईल."_
_"आणि पुढे हे ब्राह्मणा, *त्या यज्ञात वृषभ वध केला गेला नाही. शेळीचा वध केला गेला नाही. पक्षांचा वध केला गेला नाही. सुकरांचा वध केला गेला नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही जिवंत प्राण्याचा वध केला गेला नाही. यज्ञा (वधस्तंभ) साठी वृक्षतोड केली गेली नाही. यज्ञस्थळी पसरविण्यासाठी दर्भाचा विनाश केला गेला नाही. यज्ञानिमित्त जे दास, संदेशवाहक आणि सेवक नियुक्त करण्यात आले होते ते दैहिक कष्टाने पीडित नव्हते. ते भयग्रस्त नव्हते. ते म्लानमुखाने नेत्री अश्रू घेऊन कार्यरत नवाते. ज्यांनी स्वेच्छेने उत्तरदायित्व स्वीकारले ते कार्यरत होते. ज्यांना स्वेच्छेने श्रम करावयाचे नव्हते ते कार्यरत नव्हते. ज्यांना जे करावेसे वाटले त्यांनी तेच केले. ज्यांना जे करावेसे वाटले नाही त्यांनी ते केले नाही. घृत, लोणी, तेल, मधु, शर्करा यांचाच फक्त यज्ञ साध्य करण्यासाठी उपयोग करण्यात आला."*_
_"ब्राह्मणा, *तुझा यज्ञसुद्धा राजा महाविजेत्याच्या यज्ञासारखा असावा. जर तुझी यज्ञ करावयाची इच्छा असेल तर यज्ञ असाच असावा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. पशुवध ही निर्दयता आहे. म्हणून यज्ञ हा धर्माचे अंग होऊच शकत नाही. जो धर्म असे सांगतो की, प्राण्यांचा वध करून तुम्हाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते असे सांगणारा धर्म हा धमचि निकृष्टतम रूप होय."*_
_*मला असे विचारावेसे वाटते की, "हे श्रमण गौतमाः पशुवध न करताही, कुशल फल प्राप्तीचा अधिक कल्याणकारी असा दुसरा कोणता यज्ञ आहे काय?"*_
*_"होय, हे ब्राह्मणा, असा यज्ञ आहे."_*
_"आणि हे श्रमण गौतमा, तो यज्ञ कसा असतो ?"_
_*"जेव्हा मनुष्य श्रद्धायुक्त चित्ताने असा संकल्प करतो की, मी जीव हत्येपासून विरत राहीन, चौर्य कर्मापासून विरत राहीन, काम-तृष्णेसंबंधी मिथ्याचारापासून विरत राहीन, मिथ्या कथनापासून विरत राहीन. मी सुरा, मेरय, मद्य आदींच्या सेवनापासून विरत राहीन तर हा यज्ञ असा आहे की, खूप मोठा खर्च करून केलेल्या कोणत्याही यज्ञापेक्षा श्रेष्ठ यज्ञ आहे. हा यज्ञ निरंतर दान देण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा यज्ञ भिक्खूंकरिता विहार बांधण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा यज्ञ धम्मोपदेश ग्रहण करण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे."*_
_तथागतांनी असे कथन केल्यावर, कूटदन्त, तो ब्राह्मण, तथागतांना वदला, "अति उत्तम, हे श्रमण गौतमा, तुझ्या मुखातून व्यक्त झालेले हे कथन अति उत्तम आहे. हे कथन सर्वश्रेष्ठ आहे."_
_*२) ब्राह्मण उज्जय*_
_तेव्हा ब्राह्मण उज्जय तथागतांना म्हणाला, *"श्रमण गौतमा, आपण यज्ञाचे प्रशंसक आहात काय?"*_
_*"नाही ब्राह्मणा, मी प्रत्येक यज्ञाचा प्रशंसक नाही. मी प्रत्येक यज्ञाला सदोषही मानीत नाही. ज्या यज्ञात गोवध होतो. शेळ्यामेंढ्याचा वध केला जातो. पशुपक्षांचा आणि इतर जिवंत प्राण्यांचा वध केला जातो. त्यांचा विनाश केला जातो, हे ब्रह्मणा ज्या यज्ञात हत्याच हत्या आहे, मी अशा यज्ञांचा प्रशंसक नाही. मी अशा पक्षांची प्रशंसा का करावी ?"*_
_*"हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात हत्या अनिवार्य आहे, अशा यज्ञात श्रेष्ठजन सहभागी होत नाहीत किंवा श्रेष्ठतम मार्गावर मार्गक्रमण करणारेही अशा यज्ञात सहभागी होत नाहीत."*_
_*परंतु ज्या यज्ञात गोवध होत नाही. जीवित प्राणिमात्रांचा विनाश होत नाही, ज्या यज्ञात हत्या अनिवार्य नाही अशा यज्ञांचा मी प्रशंसक आहे. उदा. ज्या यज्ञात चिरस्थापित दान, अथवा कुटुंबाचा दीर्घकालीन कल्याणाच्या हेतूने करावयाच्या त्यागाचा संकल्प आहे, असे यज्ञ निश्चितच प्रशंसनीय आहेत.*_
_"आणि असे का?" कारण ब्राह्मणा, *ज्या यज्ञात हत्या अनिवार्य नाही अशा यज्ञात श्रेष्ठजन सहभागी होतात. श्रेष्ठतम मार्गावर मार्ग क्रमणा करणारे अशा यज्ञात सहभागी होतात."*_
*_३) उदायी ब्राह्मण_*
_उदायी ब्राह्मणानेही तथागतांना तोच प्रश्न विचारला जो प्रश्न ब्राह्मण उज्जयीने तथागतांना केला होता._
_"काय श्रद्धेय गौतम यज्ञाचा प्रशंसक आहे? बुद्धांनी उज्जयीला जे उत्तर दिले तेच उत्तर याही ब्राह्मणाला दिले._
_ते म्हणाले, "असे यज्ञ जे समयोचित आहेत, असे यज्ञ जे निर्दयतेपासून मुक्त आहेत._
_*"असे यज्ञ ज्यात श्रेष्ठजीवी सहभागी होतात असे यज्ञ ज्यात ज्यांची दृष्टी स्वच्छ आहे ते सहभागी होतात. जे कालातीत आहेत ते जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त आहेत. जे प्राज्ञ आहेत. जे कुशला आहेत ते अशा यज्ञाची प्रशंसा करतात. यज्ञ अथवा श्रद्धायुक्त कर्मात श्रद्धायुक्त चित्ताने पुण्यक्षेत्रात जे बीज रुजविले जाते, अथवा जे श्रेष्ठजीवी आहेत त्यांना जे दान दिले जाते. त्याने देवता प्रसन्न होतात. या प्रकारच्या दानाने सुज्ञांना विद्येचा लाभ होतो. तथा ते दुःखमुक्त होतात. ते सुखद अवस्थेला प्राप्त होतात.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०५/०८/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment