Saturday, 3 August 2024

आत्म्यावर श्रद्धा हा अधम्म होय

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*४. आत्म्यावर श्रद्धा हा अधम्म होय*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_3.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*बुद्धांचे असे वचन आहे की, ज्या धर्माचा आधार आत्मा आहे तो धर्म कल्पनाश्रित धर्म होय.*_

कोणीही आत्मा पाहिला नाही. कोणीही आत्म्याशी वार्तालाप केला नाही. आत्मा अदृश्य आहे. अज्ञात आहे. ज्याचे अस्तित्व आहे तो आत्मा नव्हे ते मन आहे आणि मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. आत्म्याप्रती श्रद्धा ही अलाभदायी आहे. अनुपयोगी आहे. *आत्म्यावर आश्रित धर्म हा स्वीकारण्या योग्य धर्म नव्हे. अशा धर्माची परिणती मिथ्याविश्वासात होते. अंधश्रद्धेत होते.*_

_बुद्धांनी हा प्रश्न येथेच समाप्त केला नाही. त्यांनी या प्रश्नाची चर्चा सर्व अंगांनी केली. जशी ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा ही सर्वसामान्य बाब आहे तशीच आत्म्यावर श्रद्धा हीही सर्वसामान्य बाब आहे._

_*आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग आहे. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा, आत्मन् असे म्हणतात.*_ 

_*ब्राह्मणी धर्मात आत्मा म्हणजे असे तत्त्व की जे कायेपासून स्वतंत्र आहे. ज्याचे कायेपासून स्वतंत्र अस्तित्व आहे. पण तो कायेतच वास करतो. जन्माच्या क्षणापासून निरंतर त्याचे अस्तित्व कायेसहच असते.*_ 

_आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ही तद्नुषंगिक इतर श्रद्धांशी निगडित आहे. *काया मृत्यू पावते पण आत्मा मृत्यू पावत नाही. आत्मा दुसऱ्या जन्मात दुसरी काया धारण करतो. काया ही आत्म्याचे बाह्य परिधान होय.*_ 

_*बुद्धांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा होती काय? नाही. त्यांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा नव्हती. आत्म्यासंबंधी बुद्धांचा सिद्धांत अनात्मवाद म्हणूनच प्रचलित आहे.*_ 

_अशरीरी आत्म्याची संकल्पना स्वीकारल्यास अनेक प्रश्न उद्‌भवतात आत्मा काय आहे? आत्मा कोठून येतो? कायेच्या मृत्यूनंतर आत्म्यांचे काय होते? आत्मा कोठे जातो? काया विलीन झाल्यावर आत्मा परलोकी कोणत्या रूपात वास करतो? त्या रूपात तो किती काळ वास करतो? ज्यांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा होती त्यांना बुद्धांनी असे प्रश्न विचारले. त्यांना त्यांच्यापासून या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा होती._

_प्रथम बुद्धांनी आपल्या नेहमीच्या उलट तपासणीच्या पद्धतीनुसार आत्म्याची संकल्पना किती संदिग्ध आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला._

_ज्यांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा आहे त्यांना त्यांनी प्रश्न विचारला की आत्मा हा आकाराने कसा आहे? रूपाने कसा आहे?_ 

_आनंदाला बुद्धांनी सांगितले की आत्म्याविषयी नानाविध मते आहेत. काही असे घोषित करतात की, माझ्या आत्म्याला आकार आहे. तो अति सूक्ष्म आहे. काही असे घोषित करतात की, आत्म्याला रूप आहे. तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. इतर घोषित करतात की आत्मा अनंत आहे अरूप आहे._

_अशाप्रकारे हे आनंद, आत्म्याविषयी अनेकविध मतमतांतरे आहेत. ज्या लोकांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा आहे त्यांची आत्म्याची संकल्पना काय आहे असा दुसरा प्रश्न बुद्धांनी उपस्थित केला. यावर काही म्हणतात, माझा आत्मा म्हणजे संवेदना होय. काही म्हणतात, नाही. आत्मा म्हणजे संवेदना नाही. तो अचेतनही नाही. माझा आत्मा संवेदनक्षम आहे. सचेतन आहे. अशाप्रकारे अनेक लोक आत्याच्या अनेक संकल्पना मांडतात._ 

_जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवतात त्यांना बुद्धांनी असाही प्रश्न विचारला की, काया मृत्यूला प्राप्त झाल्यावर आत्म्याची स्थिती काय होते?_ 

_त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, काया मृत्यू पावल्यावर आत्मा दृश्य स्वरूपात व्यक्त होतों काय?_ 

_यावर त्यांना अनेकविध संदिग्ध विधाने आढळली, संदिग्ध उत्तरे मिळाली._

_काया मृत्यू पावल्यावरही आत्मा आपला आकार आपले रूप कायम ठेवतो यावर बुद्धांना आठ विविध काल्पनिक उत्तरे सापडली._

_काय आत्मा सुद्धा कायेसह मृत्यूला प्राप्त होतो? यावर अगणित कल्पना आढळल्या._ 

_काया मृत्यू पावल्यावर आत्मा सुखी होतो अथवा दुःखी होतो असाही प्रश्न बुद्धांनी उपस्थित केला. काया मृत्यू पावल्यावर आत्मा सुखी होतो यावरही योगी आणि ब्राह्मणांची मते भित्र भित्र आहेत. काहींच्या मते कायेच्या मृत्यूमुळे आत्म्याला अतीव दुःख होते. तर काहींच्या मते आत्म्याला सुख होते. काहींच्या मते त्याला सुखही होते आणि दुःखही होते. तर काहोंच्या मते आत्म्याला सुख होते. काहींच्या मते त्याला सुखही होते आणि दुःखही होते. काहींच्या मते त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही._

₹आत्म्याच्या अस्तित्वविषयक या सर्व सिद्धांतांना, मतमतांतरांना बुद्धांचे उत्तर एकच होते जे त्यांनी चुन्दाला दिले._

_बुद्ध चुन्दाला म्हणाले, "चुन्द, योगी आणि ब्राह्मण यापैकी कोणाच्याही मतावर ज्यांची श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे जे आचरण करतात त्यांच्यासंबंधी मी अशी विचारणा करतो की, 'मित्रांनो, काय आपली ही श्रद्धा, हे आचरण योग्य आहे?' आणि उत्तरात ते होय म्हणत असतील आणि त्यांचेच मत योग्य आहे असा त्यांचा आग्रह असेल तर, आणि त्यांचा असाही आग्रह असेल की. इतरांची मते त्याज्य आहेत म्हणून ते ती मते मान्य करणार नाहीत तर मी हे मान्य करणार नाही. या प्रश्नांवर अनेक व्यक्तीची अनेक मते आहेत. मी यापैकी कोणत्याही मताला, कोणत्याही सिद्धांताला माझ्या सिद्धांताच्या तोडीचे समजत नाही. माझ्या सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ समजण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही." *आता अति महत्त्वाचा प्रश्न, आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्ध त्यांनी कोणता युक्तिवाद केला आहे हा आहे.*_ 

_*ईश्वराच्या अस्तित्वाच्या नकारासाठी बुद्धाने जे तर्क दिले, सामान्यपणे तेच तर्क त्यांनी आत्म्याच्या नकारासाठीही दिले.*_

१. _त्यांनी असा युक्तिवाद केला की, ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची चर्चा जशी निष्फळ आहे तशीच आत्म्याच्या अस्तित्त्वाविषयीची चर्चाही निष्फळ आहे._

२. _त्यांनी असाही युक्तिवाद केला की ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा जशी सम्यक दूशीला बाधक होते तशीच आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धासुद्धा सम्यक दृष्टीला बाधक होते._ 

३. _त्यांनी असाही युक्तिवाद केला की ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धा जशी मिध्या विश्वासाची, अंधश्रद्धेची जननी आहे तद्वतच आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धासुद्धा मिथ्या विश्वासाची, अंधश्रद्धेची जननी आहे._ 

_*बुद्धांच्या मते आत्म्याच्या - अस्तित्वावरील श्रद्धा ही ईश्वराच्या अस्तित्वावरील श्रद्धेपेक्षा अधिक भयानक आहे, अधिक हानीकारक आहे. कारण आत्म्याच्या अस्तित्वावरील श्रद्धा ही पुरोहितवादाची जननी आहे. ही सर्व मिथ्या विश्वास आणि अंधश्रद्धेची जननी आहे. एवढेच नव्हे तर ही श्रद्धा माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्या संपूर्ण जीवनावर पुरोहितांचा एकाधिकार प्रस्थापित करते.*_

_*या सर्वसामान्य युक्तिवादामुळे असे म्हटले जाते की, बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाविषयी निश्चित असे मत व्यक्त केलेच नाही. काहींच्या मते बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचा सिद्धांत नाकारला नाही. काहीच्या मते बुद्धांनी या विषयाला सतत टाळण्याचाच प्रयत्न केला.*_

_ही सर्व विधाने असत्य आहेत. कारण *महालीला बुद्धांनी निश्चित आणि सुस्पष्ट शब्दात असे सांगितले की, आत्मा नावाची कोणतीही वस्तू नाही. म्हणून त्याच्या आत्म्याच्या अस्तित्वाविषयीचा सिद्धांत अनात्मवाद ओळखला जातो.*_ 

_आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्ध सर्वसामान्य तर्क तर बुद्धांनी दिलेच पण त्याच बरोबर आत्म्याचे अस्तित्व नाकारण्यासाठी काही विशेष तर्कही बुद्धांनी दिले. ते तर्क बुद्धांच्या मतानुसार या सिद्धांतांच्या समूळ उच्छेदासाठी कारणीभूत ठरतील._

_*आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांता-विरुद्ध बुद्धांनी मांडलेला सिद्धांत हा नामरूप सिद्धांत या नावानेही संबोधिला जातो.*_

_*हा नामरूप सिद्धांत "हा विभाज्य वादा" द्वारा परीक्षणांचा परिणाम होय. यात मानव अथवा मानव व्यक्तित्व ज्या सूक्ष्म तत्त्वांचे मिळून निर्मित आहे त्यांचे तीक्ष्ण, सूक्ष्म, कठोर विश्लेषण करण्यात आले आहे. नामरूप हे जिवंत प्राणिमात्रांना दिलेले सामान्य नाम आहे.*_

_*बुद्धांच्या विश्लेषणानुसार प्राणिमात्र हा काही भौतिक तत्त्वे आणि काही मानसिक तत्त्वांच्या संयोगाचा परिणाम होय. ही भौतिक आणि मानसिक तत्त्वे 'स्कंध' म्हणून ओळखली जातात.*_ 

_*'रूपस्कंध' प्राथमिक स्वरूपात भौतिक तत्त्वांचा संयोग असतो. यात पृथ्वी, जल, वायू आणि अग्नी ही तत्त्वे असतात. यांच्या संयोगाने काया किंवा रूप अस्तित्वात येते. रूपस्कंधाव्यतिरिक्त नामस्कंधाचेही अस्तित्व आहे. ज्यापासूनच जिवंत प्राण्याची रचना होते.*_

_*या नाम स्कंधाला विज्ञान (चेतना) असे म्हणतात. या नाम स्कंघात तीन मानसिक तत्त्वे अंतर्भूत आहेत, वेदना (सहा इंद्रिये आणि त्यांच्या संपर्काने उत्पन्न होणारी अनुभूती), संज्ञा (बोध) आणि संस्कार (चित्ताची अवस्था) यांचा यात समावेश आहे. बरेचदा विज्ञान (चेतना) या तत्त्वालाही पूर्ववर्ती तीन तत्त्वांसह एक तत्त्व मानले जाते किंवा तीन तत्त्वांपैकी एक तत्त्व मानले जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञही कदाचित याच मताचे आहेत की चेतना (विज्ञान) हाच मूळ स्रोत आहे. त्यातूनच इतर मानसिक क्रियांची उत्पत्ती होते. विज्ञान (चेतना) हे प्राणिमात्राच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे.*_

*_चेतना (विज्ञान) ही चार तत्त्वांच्या संयोगाचा परिणाम होय. ही तत्त्वे म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही होत._*

_*बुद्धांनी पुरस्कारलेल्या चेतना (विज्ञान) सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. जे या सिद्धांतावर आक्षेप घेतात ते विचारतात की, "चेतना (विज्ञान) कशी निर्माण होते?"*_ 

_*हे सत्य आहे की विज्ञान (चेतना) जन्मासोबतच जागृत होते आणि मृत्यूने विज्ञान (चेतना) विनाश पावते. परंतु विज्ञान (चेतना) हे चार मूलतत्त्वांच्या संयोगाचा परिणाम होय, असे कसे म्हणता येईल?*_ 

_*भौतिक तत्त्वाच्या संयोगाने अथवा सहअस्तित्वाने विज्ञान (चेतना) उत्पन्न होते अशी बुद्धांची मान्यता नाही. बुद्धांचे वचन एवढेच आहे की, जेथे रूप आहे, काया आहे तेथे नाम पण आहे. तेथे विज्ञान (चेतना) पण आहे.*_

_*आधुनिक विज्ञानाची उपमा द्यावयाची असेल तर, जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे चुंबकीय क्षेत्रही असतेच ह चुंबकीय क्षेत्र कसे निर्माण होते, कसे उगम पावते याचे कोणालाही ज्ञान नाही. परंतु चुंबकीय क्षेत्र विद्युत क्षेत्रासोबत अनिवार्य रूपाने अस्तित्वात येते, विद्यमान असते यात मात्र शंका नाही.*_ 

*_हेच सहसंबंध काया आणि विज्ञान (चेतना) यांच्यात अस्तित्वात येतात असे का म्हटले जाऊ नये, असे का स्वीकारले जाऊ नये. विद्युत क्षेत्राच्या संबंधात चुंबकीय क्षेत्राला विद्युत क्षेत्राद्वारा प्रेरित क्षेत्र असे म्हणतात. त्याचप्रमाणे रूपकायाच्या संबंधात. विज्ञान (चेतन) ही रूपकाया द्वारा प्रेरित आहे. असे का महटले जाऊ नये._*

_आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताविरुद्धचा बुद्धांचा तर्क येथेच पूर्ण होत नाही. त्यांना या संबंधात अधिक महत्त्वाचे असे काहीतरी पुढे सांगावयाचे आहे._

_*विज्ञान (चेतना) जागृत झाल्यावरच मनुष्य जिवंत प्राणी होतो. विज्ञान (चेतना) हे मनुष्य प्राण्याच्या जीवनातील प्रमुख तत्त्व आहे. विज्ञानाची (चेतनेची) प्रवृत्ती आणि प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील असते. जेव्हा विज्ञान आम्हाला काही ज्ञान देते, काही माहिती देते तेव्हा विज्ञान ज्ञानमूलक होते. ते ज्ञान, ती माहिती रूचिकर असू शकेल किंवा अरुचिकरही असू शकेल. ही रुची किंवा अरूची आपल्या आत घटणाऱ्या घटनांशी संबंधित असेल किंवा बाह्य वस्तू बाह्य घटनांशी संबंधित असेल.*_

_*विज्ञान (चेतना) भावनामूलक होते तेव्हा चित्तात अनुभूती उत्पन्न होतात. या अनुभूती अनुकूल असू शकतात किंवा प्रतिकूलही असू शकतात. हे भावनामूलक विज्ञान (चेतना) वेदनेच्या उत्पत्तीचे कारण असते.*_

_*विज्ञानाच्या (चेतनेच्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट हेतूच्या सिद्धीसाठी प्रयत्नशील होण्याची प्रेरणा मिळते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे आणि संकल्पाच्या पूर्तीसाठी आवश्यक प्रेरणेचे जनक आहे.*_

_*यावरून हे स्पष्ट होते की, जिवंत प्राण्याच्या ज्या काही क्रिया होतात त्या विज्ञानाद्वारे (चेतना) अथवा विज्ञानाच्या (चेतना) परिणाम स्वरूप होत असतात. या विश्लेषणानंतर बुद्ध असे प्रश्न विचारतात की, कोणते कार्य आहे जे आत्म्याने करण्यासाठी उरले आहे? आत्म्याची जी काही कार्ये मानली जातात ती कार्ये विज्ञानाद्वारा (चेतना) केली जातात, होतात. ज्याचे काहीच कार्य नाही, ज्याला काहीच कार्य नाही असा आत्मा म्हणजे एक उपाहासास्पद संकल्पनाच होय. अशाप्रकारे बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व असिद्ध केले आहे.*_

_*याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग होऊ शकत नाही. आत्म्याचे अस्तित्व स्वीकारणे म्हणजे अधम्म होय.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०४/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...