💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮
*_नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स_*
*_'ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा'_*
*_डॉ. योजना भगत_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_21.html
💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮
(मुंबई विद्यापीठाच्या पालि विभागाच्या दोन दिवसीय "ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा" या कार्यशाळेच्या निम्मिताने, हे या कार्यशाळेचे अकरावे वर्ष.)
_आतापर्यंत फक्त *पुरातत्व विभाग किंवा फार तर प्राचीन इतिहासाच्या विद्वानांचा आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा विषय असणारी 'ब्राह्मी लिपी'चा अभ्यास पालि भाषेच्या विद्यार्थ्यांनी केला.* ती लिपी पालिभाषेच्या किती जवळची आहे आणि त्यांचा संबंध किती पुर्वापार चालत आला आहे हे नुसते प्रस्थापितच केले नाही तर *प्रत्येक पालि भाषा शिकणाऱ्याला 'ब्राह्मी लिपी' वाचता आलीच पाहिजे असा आग्रहच धरला आहे.*_
_पलि भाषा का शिकावी या प्रश्नाला अजून एक उत्तर मिळाले आहे. *ब्राह्मी लिपी वाचण्यासाठी पालि भाषा येणं गरजेच आहे.* आतापर्यंतची परिस्थिति अशी आहे कि लिपी येते तर भाषा नाही आणि भाषा येते तर लिपी नाही. आता ही परिस्थिती बदलेल आणि पालि भाषेच्या अभ्यास आणि संशोधनाला गती मिळेल यात शंका नाही._
_*लिपी आणि भाषा: सर्वात प्रथम लिपी आणि भाषा यातील फरक समजून घेणे फार आवश्यक आहे. आपण मराठीत बोलतो ती भाषा आहे आणि आता मी ज्या अक्षरांनी लिहित आहे ती देवनागरी लिपी आहे. आपण मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहित असतो.*_
_साधारणपणे आपण कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहू शकतो. आपण नेहमी इंग्रजी भाषा रोमन लिपीत लिहितो. मी जेव्हा "बुद्धं सरणं गच्छामि" असे लिहिते तेव्हा मी पालि भाषा देवनागरी लिपीत लिहित असते आणि तेच शब्द जेव्हा मी Buddham saranam gacchāmi असे लिहिते तेव्हा मी पालि भाषा रोमन लिपीत असते._
_आजकाल आपण देवनागरी आणि रोमन लिपी अगदी सहज वापरतो. sms करताना भाषा मराठी असते आणि लिपी रोमन असते तर चित्रपटांची नावे हिन्दी भाषेतून असतात पण लिपी रोमन असते जसे "Hum aapke hain kaon?" आपण सहजपणे इंग्रजी भाषेतील शब्द देवनागरीत लिहित असतो जसे, माय नेम इज... इथे आपण इंग्रजी भाषा वापरली आहे पण लिपी मात्र देवनागरी आहे._
_आज आपण जेव्हा पालि भाषा शिकतो तेव्हा ती रोमन किंवा देवनागरी लिपी मधून लिहितो. *बर्मा या देशात पालि भाषा बर्मी लिपीत तर श्रीलंकेत सिंहल लिपीत लिहिली जाते.* मग प्रश्न असा पडतो कि देवनागरी ते फार नवीन लिपी आहे आणि *पालि भाषा तर २५०० वर्षाहून जुनी आहे. मग त्याकाळी कुठली लिपी होती ज्यात पालि भाषा लिहिली जायची?*_
_*ती लिपी आहे ब्राह्मी लिपी, भारतातील सर्व आणि आजूबाजूच्या अनेक देशाच्या लिपीची जननी अर्थात आई ही ब्राह्मी लिपीच आहे. आज ही लिपी आपल्याला शिलालेखांतून आणि लेण्यांतील प्रस्तर लेखांतून वाचता येते.*_
_*लेखन कला :* प्राचीन भारतात लेखन कला अवगत होती का? असा जर प्रश्न उपस्थित झाला तर त्याचे उत्तर 'हो' असेच द्यावे लागेल. *बुद्धांच्या काळात लेखन कला अवगत होती याचे अनेक पुरावे तिपिटकामध्ये सापडतात. परंतु लिखाण कुठल्या लिपीतुन व्हायचे याचा उल्लेख मात्र आढळत नाही. इसवीसन पुर्व तिसऱ्या शतकातील 'ललितविस्तार' या बौध्द ग्रंथात बुद्धाच्या काळी चौसष्ट लिपी अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. एक चीनी ग्रंथात मात्र भारतातील दोन लिपीचा उल्लेख आहे आणि त्या म्हणजे ब्राह्मी आणि खारोष्ठी लिपी, ब्राह्मी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि खारोष्ठी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते असाही उल्लेख सापडतो.*_
_*ग्रंथांमध्ये जरी चौसष्ट लिपींचा उल्लेख असला तर उत्खनानात फक्त दोनच लिपीचे पुरावे सापडतात. त्या म्हणजे ब्राह्मी आणि खारोष्ठी लिपी. खारोष्ठी लिपीतील लेख कंदहार, अफगाणिस्तान, तक्षशिला, मान्सेरा, लडाख, तुर्कस्तान अशा ठिकाणी सापडले परंतु हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेला या लिपीचा प्रसार झालेला दिसत नाही. शिवाय खारोष्ठी लिपी खुप पुर्वीच लोप पावली असावी कारण पुढे तिचा विकास झालेला दिसत नाही.*_
_*ब्राह्मी लिपीतील लेख मात्र आजच्या भारताच्या कानाकोपऱ्यात सापडतात आणि ब्राह्मी ही पुरातन लिपी पैकी एक आहे असे स्पष्ट होते. त्या काळातील भारतात म्हणजे जम्बुद्वीपातील बहुतेक लोकांना ब्राह्मी लिपी वाचता येत असावी असा अंदाज आहे कारण भारताच्या ज्या भागात ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती तिथे खारोष्ठी लिपी लिहिलेली आढळून आलेली आहे.*_
_या शिवाय ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपीची आई असल्यामुळे दक्षिण भारत काय किंवा उत्तर भारत काय सगळीकडे ब्राह्मी लिपी वाचता येतच असावी त्याशिवाय आजची अस्तित्वात असणारी लिपी कशी तयार झाली हा प्रश्न आहेच._
_*शिवाय ब्राह्मी लिपीची खासियत ही कि त्या लिपीत जशी पालि भाषा लिहिता येते तशी नंतरच्या काळात ब्राह्मी लिपीत संस्कृत भाषेचे शिलालेख सुद्धा लिहिलेले आढळून येतात.*_
_*ब्राह्मी लिपीचे वाचन :* पण ब्राह्मी लिपी जरी आपल्या सर्व लिपीची जननी असली तरी आपण भारतीय लोक ब्राह्मी लिपी वाचायचे विसरलो होतो. अगदी २०० वर्षापूर्वीपर्यंत भारतातील एकाही माणसाला ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती, इतिहासातील घटना याच्या साक्षीदार आहे._
_*सोळाव्या शतकात दिल्लीचा बादशाह फिरोजशहा तुघलक याने मोठ्या परिश्रमाने ब्राह्मी शिलालेख असलेले स्तंभ पंजाब मधील टोपडा आणि मीरठ येथून दिल्लीत हलविले आणि अनेक ब्राम्हणी पंडितांना वाचायला लावले पण एकालाही ते वाचता आले नाही. अकबर बादशाहचे प्रयत्न देखील वाया गेले. १८३७ साली इंग्रज अभ्यासक जेम्स प्रिन्सेप ह्यांनी जवळ जवळ ७ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर पहिल्यांदा ब्राह्मी लिपी वाचली. त्यांनी ब्राह्मी लिपी कशी डेसिफर (decipher) केली किंवा वाचली, याची रोचक कथा आहे.*_
_*आपल्यावर इंडो ग्रीक राजांनी जेव्हा राज्य केले तेव्हा त्यांनी आपली नाणी काढली ती द्वीलिपिक होती म्हणजे ग्रीक आणि ब्राह्मी लिपीत नाण्यांवर राजांची नावे लिहिलेली असायची.* (असे आजच्या नोटांवर जवळ जवळ पंधरा लिपीत लिहिलेले असते) *ग्रीक लिपी वाचता येत असल्यामुळे ते नाव वाचता येऊ शकले. त्यामुळे बाह्मीची दोन तीन अक्षरे ओळखीची झाली.*_
_*३५-३६ वर्षे वयाचे जेम्स प्रिन्सेप स्वतः लिहितात कि जवळ जवळ सात वर्षे ते रोज सकाळी उठल्यावर ती ब्राह्मीची अक्षरे घेऊन बसायचे आणि वाचण्याचे प्रयत्न करायचे. सांचीच्या स्तुपाच्या वेदिके वरील तशीच अक्षरे जेव्हा ते वाचण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि शेवटची काही अक्षरे सारखीच आहेत. तेव्हा त्यांनी अंदाज केला कि हे काही पुस्तकातील उतारे नसून कदाचित दान देणाऱ्यांची नावे असावीत जसे इतर बौद्ध देशातील स्तुपांवर आढळून येतात. तेव्हा त्यांनी 'नं' हा अनुस्वार शोधला आणि 'न' आणि 'द' या अक्षरांचा शोध लागला. आणि अशाच एका सकाळी जेव्हा ते सर्व अक्षरे घेऊन बसले होते तेव्हा त्यांना ब्राह्मी लिपीचे रहस्य उलगडले आणि एका दिवसात त्यांनी दिल्लीतील बाह्मी लिपीचा शिलालेख वाचून काढला.*_
_नंतर त्यांनी ब्राह्मीतील शिलालेख वाचून काढण्याचा जणु सपाटाच लावला आणि भारताच्या इतिहासातील गहाळ झालेली पाने समोर येऊ लागली. परंतु आपल्या अथक प्रयत्नाने ब्राह्मी लिपी वाचुन ज्ञानाचे एक नवीन दालन उघडून देणाऱ्या या अभ्यासकाचे निधन वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी व्हावे ही शोकांतिकाच आहे._
_ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा जेम्स प्रिन्सेपने ब्राह्मी लिपी वाचली आणि ते लेख पुरातन प्राकृत भाषेत आहे असे समजले. वाचताना शिलालेखांवर देवानंपिय पियदस्सी राजा या नावाचा उल्लेख पुन्हा पुन्हा येताना पाहून सगळेजण हैराण झाले कि हा देवानंपिय पियदस्सी राजा कोण? एवढा मोठा राजा! ज्याचे शेजारी पर्शियन राजे, ज्याच्या राज्याच्या सीमा पार केरळ पासून तर अफगाणिस्तान पर्यंत पसरलेल्या. इतिहासात या राजाची नोंद कशी नाही? कोण हा राजा? कुणालाच कळेना. भारतातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मी लिपीतील शिलालेख सापडत होते आणि ते सर्व एकाच राजाचे होते आणि तो होता देवानंपिय पियदस्सी राजा._
_*रॉयल एशियाटिक सोसायटीतील नियतकालिकेच्या माध्यमातून ब्राह्मी लिपी आता वाचता येते आणि ती जेम्स प्रिन्सपने वाचली ही बातमी अभ्यासकांमध्ये पसरली. शिलालेख वाचतांना यावरील देवानंपिय पियदस्सी राजा कोण आहे हे माहित नाही ही बातमी देखील प्रसिद्ध झाली. हे कोडे भारतीयांना अजुन उलगडलेलं नाही असं श्रीलंकेत अभ्यास आणि सिविल सर्विसेस मध्ये काम करणाऱ्या श्री. चार्लस टरर्नोर ह्यांना कळले. त्यावेळी ते श्रीलंकेतील बौद्ध भिक्खुंच्या मदतीने 'महावंस' नावाचा एक पालि भाषेतील श्रीलंकेतील बौध्द धम्माचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथाचे वाचन आणि भाषांतर करीत होते. त्यांनी ताबडतोब भारतात कळविले कि अरे हा देवानंपिय पियदस्सी राजा दुसरा तिसरा कुणी नसून असोक राजा आहे ज्याने भारतातून प्रथम बौध्द धम्माचा प्रसार बाहेर देशात केला आणि अशा प्रकारे भारताला भारतीय राजाची ओळख पटली.*_
_ही ऐतिहासिक घटना इतिहासकारांनी नोंदविली आहे. *१८१२ साली डॉ. कोपलेस्टोन लिहितात कि "The history of the identification of Piyadassi with Asoka is one of the romantic chapters in the history of knowledge."*_
_ही घटना वाटते तितकी साधी नाहीय. या एका ओळखीने भारताचा इतिहास बदलून टाकला. *असोकाच्या शिलालेखांमुळे भगवान बुद्धांचा काळ निश्चित झाला आणि अंधातरी असणारा आपला इतिहास एका काळाच्या चौकटीत बसला.*_
*पालि भाषेचा आणि बाह्मी लिपीचा संबंध : खरे तर देवानंपिय पियदस्सी राजा हाच सम्राट असोक आहे हे ब्राह्मी लिपीतील लेख पालि भाषेतील ग्रंथाच्या आधारे कळणे म्हणजेच पालि भाषा आणि ब्राह्मी लिपीचा जवळचा संबंध प्रस्थापित करवून जातो.*
_परंतु ज्या पालि भाषेतील ग्रंथाच्या आधारे आपण इतिहास व्यवस्थित लिहू शकलो त्या पालि भाषेला श्रीलंकेत जरी मानसन्मान मिळाला तरी भारतामध्ये मात्र ति उपेक्षितच राहिली कारण दुर्दैवाने सुरवातीच्या काळात इंग्रजांना देखील पालि भाषा ही प्राकृत भाषेचा एक भाग वाटत आली आणि त्यांनी जिथे पालि भाषेतील शिलालेख होते ते प्राकृत समजूनच त्याचे वाचन केले आणि पालि भाषेचा आणि ब्राह्मी लिपीचा जो जवळचा संबंध होता त्याला दुरचा करून टाकला._
_भारतीय संशोधकांनी देखील इंग्रजांच्या पाऊलावर पाऊल ठेवत असोकाचे शिलालेखच नव्हे तर पुरातन ब्राह्मीचे सर्व शिलालेख हे प्राकृत भाषेत समजून त्यांचे वाचन केले आणि पुढे तीच पध्दत रूढ झाली. भारतातील पूर्वीचे शिलालेख प्राकृतमध्ये आणि नंतरचे संस्कृतमध्ये अशी धारणा धरूनच आतापर्यंत अभ्यास केला गेला आहे. असे शिलालेख वाचून नुसत्या चुकाच नाही केल्या तर बराच इतिहास लपवून ठेवलाय._
_परंतु जगभर पालि भाषेच्या अभ्यासाला जशी गती मिळाली तसे लक्षात यायला लागले आहे कि पालि भाषा ही प्राकृत भाषेचा भाग नसून एक स्वतंत्र भाषा आहे आणि तिचा अभ्यास एक स्वतंत्र भाषा म्हणून होऊ लागला._
_हे जगभरच्या अभ्यासकांनी मान्य केले असले तरीही भारतामध्ये ही मान्यता अजुन प्रस्थापित झालेली दिसत नाही. *असोकाचे ब्राह्मी लिपीतील शिलालेख हे कालपर्यंत प्राकृत भाषेतच असल्यासारखे वाचून हजारो अभ्यासकांनी आपली पुस्तके छापली आहेत. फक्त मुंबई विद्यापीठाच्या १९६० साली पहिली पाली भाषेतील पी. एचडी मिळवणाऱ्या ज्येष्ठ पालिच्या अभ्यासक प्रो. सौ मीना तालीम मॅडमने दहा वर्षे अथक प्रयत्न करून असोकाचे संपूर्ण भारतभर पसरलेले शिलालेख हे फक्त प्राकृत मध्ये नसून ७५ टक्यापेक्षा जास्त पालि भाषेत असून २०% प्राकृत व संस्कृत व उरलेले ग्रीक अरमाईक भाषेत आहेत हे नुसते सिद्धच केले नाही तर प्राकृत म्हणून वाचलेले शिलालेख पुन्हा पालि भाषेत वाचून दाखविले आहेत.*_
_*महाराष्ट्रात ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा शिकण्याची गरज :* महाराष्ट्रात तर हजारो बौद्ध लेण्यामधुन शेकड्याने ब्राह्मी शिलालेख, प्रस्तर लेख आहेत आणि दुर्दैवाने त्या सर्व शिलालेखांचे वाचन ते प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत असे समजून झाले आहे. पण वस्तुस्थिती तशी नसून *शिलालेखांपैकी जवळ जवळ ८०% पालि भाषेत असून बाकी प्राकृत आणि संस्कृत भाषेत आहेत.*_
_आतापर्यंत परिस्थिती अशी होती कि पालि भाषेचा अभ्यास संस्कृत भाषेच्या आधारेच चालायचा, त्यामुळे पालि भाषेला वेगळं अस्तित्वच नव्हतं. *ब्राह्मी लिपी पालिच्या अभ्यासकांना येण्याचा काही संबंधच नव्हता कारण बाह्मी लिपीचे पालि भाषेसोबत काही नाते असेल असे कधीच कुणाला वाटले नाही. आणखी एक कारण म्हणजे ज्यांना ब्राह्मी लिपीचे ज्ञान होते त्यांना पालि भाषा येत नाही आणि ज्यांना पालि भाषा येते त्यांना ब्राह्मी लिपीचे ज्ञान नाही.*_
*_मग ही परिस्थिती बदलणार कोण, कधी आणि कशी?_*
*_उत्तर सोपं आहे. आपण, आता आणि पालि भाषा शिकून !_*
_- आणि खरोखरच परिस्थिती बदलत आहे. निदान मुंबई विद्यापीठातील पालि विभागात शिकणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत तरी हे सत्य आहे. महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांना व असोकाच्या उभ्या स्तंभांना भेटी देऊन प्रत्यक्षात ब्राह्मी शिलालेख पाहिल्यानंतर फक्त एक दोन व्यक्तीच का ते वाचू शकतात, आम्ही का नाही असा खडा सवाल समोर आला आणि त्यातून जन्म झाला दोन दिवसीय "ब्राह्मी लिपी आणि पालि भाषा" या कार्यशाळेचा, विद्यार्थ्यांच्या अपार मेहनतीचे फळ म्हणजे दोन दिवसात ब्राह्मी लिपी आत्मसात करण्याची ताकद, जी त्यांना पालि भाषेतील ज्ञानाने दिली._
_ब्राह्मी लिपीच्या अभ्यासाचे आणखी अनेक कांगोरे आहेत जे इथे मांडले नाहीत. *लिपीचा अभ्यास हा एक वैज्ञानिक तर्कशुद्ध अभ्यास असून लिखाणाच्या काळाची निश्चिती करणे, भाषेच्या उत्पती व प्रगतीचा आढावा घेणे असे अनेक विविध पैलू त्यात आहेत. त्यांचाही अभ्यास महत्वाचा असून ब्राह्मी लिपी आणि पालि भाषेचे विद्वान निर्माण होणे आणि जास्तीत जास्त संशोधन करणे फार गरजेचे आहे.*_
_*ब्राह्मी लिपी ही पुरातन लिपी न राहता प्रत्येक पालि शिकणाऱ्या व्यक्तीला ती वाचता आलीच पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचा ठरू नये असं वाटतं.*_
*_भवतु सब्ब मंगलं !_*
No comments:
Post a Comment