🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अधम्म म्हणजे काय?_*
_*८. धम्मग्रंथ प्रमादातीत आहेत अशी श्रद्धा म्हणजे अधम्म होय*_
*_(समाप्त)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/08/blog-post_7.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*ब्राह्मणांनी असे घोषित केले की, वेद हे केवळ पवित्र ग्रंथच नाहीत तर ते स्वतःच प्रमाण आहेत. ब्राह्मणांनी वेदांना स्वतःच प्रमाण आहेत एवढेच घोषित केले नाही तर त्यांनी - अशीही घोषणा केली की वेद प्रमादातीत आहेत.*_
_*या मुद्यावर बुद्धांचे मत हे ब्राह्मणांच्या मतांच्या सर्वथा विरोधी होते. बुद्धांनी वेद प्रमाण आहेत हे नाकारले. वेद स्वतःच प्रमाण आहेत, वेद वाक्य अंतिम आहे हेही बुद्धांनी नाकारले.*_
_बुद्धांनी या मुद्यावर जी भूमिका स्वीकारली नेमकी तशीच भूमिका त्या काळच्या अनेक आचार्यांनी स्वीकारली होती. परंतु काळाच्या ओघात त्या आचार्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या तात्विक दर्शनाला मान्यता मिळावी, त्यांना ब्राह्मणांच्या नजरेत प्रतिष्ठा मिळावी, त्यांना ब्राह्मणांच्या सद्भावना अर्जित करता याव्यात, यासाठी आपली वेद विरोधी भूमिका त्यागली. बुद्धांनी मात्र या मुद्यावर कोणतीही तडजोड स्वीकारली नाही._
_*तेवीज्ज्य सुत्तात बुद्ध घोषित करतात की, वेद म्हणजे निर्जल मरुस्थल होय, पथविहीन अरण्य होय.* वास्तवात वेदाचा पथ हा विनाशपथ होय. नैतिक आणि बौद्धिक तृष्णेने तृषार्थ कोणताही माणूस आपल्या तृष्णातृप्तीसाठी वेदमागनि जाणार नाही. कारण त्या मार्गाने जाऊन आपली तृष्णातृप्ती होईल याची त्याला आशा नाही._
_वेद प्रमादातीत (निर्दोष) असण्याविषयी बुद्ध म्हणतात की, *काहीही प्रमादातीत नाही. वेदही प्रमादातीत नाहीत. त्यांचे म्हणणे असे की, प्रत्येक बाब परीक्षण आणि पुनर्परीक्षणासाठी खुली असली पाहिजे. प्रत्येक बाबीचे परीक्षण झालेच पाहिजे.* ही बाब बुद्धांनी कालामांना दिलेल्या प्रवचनात स्पष्ट केली आहे._
_एकदा तथागत मोठ्या भिक्खू संघासहित कोशल जनपदात चारिका करीत असताना केसपुत्तीय नगरीत आले. केसपुत्तीय नगरी ही क्षत्रिय कालामांची नगरी होती. तथागत त्यांच्या नगरीत आले आहेत हे कालामांना समजले. तेव्हा ते तथागत जेथे विहार करीत होते तेथे गेले आणि एका बाजूला आसनस्थ झाले. असे आसनस्थ झाल्यावर केसपुत्तीय कालाम तथागतांना म्हणाला,_
_"हे श्रमण गौतमा, आमच्या नगरीत काही श्रमण ब्राह्मण येतात. ते आपआपल्या मतांचे आग्रही स्पष्टीकरण करतात. ते आपआपल्या मतांची प्रस्थापना करतात. परंतु असे करताना ते दुसऱ्यांच्या मतांचे खंडन करतात. दुसऱ्यांच्या मतांचा विरोध करतात. दुसऱ्यांच्या मतांना हीन लेखतात. दुसऱ्यांच्या मतांना धिक्कारतात. तसेच हे तथागता, आमच्या नगरीत दुसरेही श्रमण ब्राह्मण येतात. ते सुद्धा आपल्या मतांचे उदात्तीकरण करतात. आपल्या मतांचे गुणगाण करतात. परंतु त्याच वेळी ते दुसऱ्यांच्या मतांचे खंडनही करतात. दुसऱ्यांच्या मतांना अपमानीत करतात. दुसऱ्याच्या मतांना नष्ट करण्याचा प्रयत्न करूनच ते आपल्या मताचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात._
_म्हणून हे तथागता, आम्ही अनिश्चय आणि भ्रमाच्या अवस्थेत आहोत. ह्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोण सत्य आणि कोण मिथ्या हे आम्हाला कळतच नाही._
_"हे कालामांनो, तुमच्या अनिश्चयासाठी समुचित (योग्य) कारणे आहेत. तुमच्या भ्रमित अवस्थेसाठी समुचित कारणे आहेत. हे कालामांनो, खरेच तुमच्या चित्तात योग्य समयी अनिश्चय आणि भ्रम उत्पत्र झाले आहेत" तथागत कथन करते झाले, "हे कालामांनो, यावे." तथागतांनी आपले कथन पुढे सुरूच ठेविले,_
१. _"जे काही श्रवण करण्यास मिळाले एवढ्याच कारणास्तव ते स्वीकारू नये._
२. _कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसऱ्याकडे आली एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये._
३. _सर्वसामान्यांना एखादी बाब स्वीकृत आहे एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये._
४. _धर्मग्रंथात एखादी बाब लिहिली आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये._
५. _एखादी बाब तर्काद्वारा प्रस्थापित आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये._
६. _एखादी बाब न्यायशास्त्राला धरून आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये._
७. _एखादी बाब सकृतदर्शनी स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये._
८. _मान्य श्रद्धा आणि विश्वासाच्या आधारावर कोणतीही बाब आपण स्वीकारू नये._
९. _एखादी बाब सकृतदर्शनी सत्य वाटते एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये._
१०. _एखादी बाब श्रेष्ठ आचार्यानी किंवा संन्याशानी कथन केली एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये."_
_"मग आम्ही काय करावे. एखादी बाब स्वीकारण्यासाठी आम्ही कोणत्या कसोट्या लावाव्यात" कालामांनी विचारणा केली._
_"या कसोट्या लावाव्या" तथागत उत्तरले._
१. _"स्वतःशीच प्रश्न विचारावा की, हे करणे अकुशल आहे काय?_
२. _हे स्वीकारणे अकुशल आहे काय ?_
३. _हे स्वीकारणे निंदनीय आहे काय?_
४. _ती बाब सुज्ञाद्वारा निषिद्ध मानली आहे काय?_
५. _ती बाब केल्यामुळे, स्वीकारल्यामुळे दुःख आणि कष्ट वाट्याला येतील काय?"_
_"कालामांनो, तुम्ही एक पाऊल पुढे जावे आणि विचारणा करावी. *जो सिद्धांत मांडला जातो, प्रस्थापित केला जातो तो सिद्धांत तृष्णा, घृणा, मोह, हिंसा यांच्या वृद्धीला तर कारण ठरणार नाही ना?*_
_"परंतु हे कालामांनो, हेही पर्याप्त नाही. *तुम्ही याच्याही पुढे जावे. तुम्ही हे जाणून घेण्याचे, समजून घेण्याचे प्रयास करावे की काय हा सिद्धांत माणसाला आपल्या तृष्णांचा दास तर करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला जीवमात्राच्या हिंसेला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला चौर्यकर्माला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला काम मिथ्याचाराला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला मिथ्या कथनाला तर प्रवृत्त करीत नाही ना? आणि काय हा सिद्धांत इतरांनीही तसेच करावे अशी प्रेरणा तर देत नाही ना?"*_
_*"आणि सरते शेवटी तुम्ही स्वतःशीच विचारणा करावी. काय या सर्वांचा परिणाम अंती दुःखात आणि कष्टात तर होणार नाही ना?"*_
_"आता कालामांनो, तुम्ही काय विचार करीत आहात?" "काय या सर्व बाबी मनुष्यमात्राकरिता हितकर आहेत की अहितकर आहेत?"_
_"तथागत, या सर्व बाबी मनुष्यमात्रा-साठी अहितकारी आहेत." कालाम उत्तरले._
_"आणि कालामांनो, तुम्ही काय विचार करीत आहात? या बाबी मनुष्यमात्रासाठी कुशल आहेत की अकुशल आहेत?"_
_"हे तथागत, या सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी अकुशल आहेत."_
_"काय सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी निंदनीय आहेत."_
_"होय तथागत, या सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी निंदनीय आहेत." कालाम उत्तरले._
_"काय या सर्व बाबी सुज्ञांनी स्वीकारल्या आहेत अथवा धिक्कारल्या आहेत?"_
_"या सर्व बाबी सुज्ञांनी धिक्कारल्या आहेत तथागत", कालाम उत्तरले._
_"यांच्या आचरणाने दुःख आणि कष्ट होतात काय?"_
_"यांच्या आचरणाने दुःख आणि कष्ट होतात तथागत." कालाम उत्तरले_
_*जे धर्मग्रंथ अशी देशना देतात. त्यांना अंतिम आणि प्रमादातीत म्हणून स्वीकारणे शक्य आहे काय?*_
_"नाही तथागत," कालाम उत्तरले._
_"परंतु कालामांनो, *मी तर हेच म्हणतो आहे. माझे कथन हेच आहे की, कोणतीही बाब ती तुम्ही श्रवण केली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसऱ्याकडे आली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. कोणतीही बाब अनेक लोकांनी स्वीकारली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. कोणतीही बाब एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये की तर्क समर्थित आहे. कोणती बाब सकृतदर्शनी स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. कोणतीही बाब प्रस्थापित श्रद्धा आणि विश्वास यावर आधारित आहे एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. कोणतीही बाब आचार्यांनी अथवा संन्याशांनीकथन केली आहे. एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये."*_
_"हे कालामांनो, *जेव्हा स्वानुभवाने तुम्ही हे जाणाल की, या बाबी अहितकर आहेत, या बाबी निंदनीय आहेत. या बाबी सुज्ञांनी धिक्कारल्या आहेत. यांच्या केल्याने दुःख आणि कष्ट होतात. तेव्हाच हे कालामांनो, तुम्ही या बाबींचा त्याग करावा."*_
_"अद्भुत आहे, तथागत, हे अद्भुत आहे. आम्ही तथागतांना, तथागतांच्या देशनेला शरण जातो. तथागतांनी आम्हाला आपले अनुगामी म्हणून स्वीकारावे. या क्षणापासून जीवनपर्यंत तथागतांनी आम्हाला आपला शरणागत मानावे. उपासक मानावे."_
_या युक्तिवादाचे सार स्पष्ट आहे. *कोणतीही देशना अधिकृतपणे स्वीकारण्यापूर्वी ती धर्मग्रंथात सांगितली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. ती बाब तर्काला अनुकूल आहे एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. सकृतदर्शनी ती स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. प्रस्थापित श्रद्धा आणि विश्वास यावर ती बाब आधारित आहे एवढ्याच कारणात्तव ती बाब स्वीकारू नये. ती बाब मान्यवरांच्या देशनेवर आधारित आहे एवढ्याच कारणास्तव ती बाब स्वीकारू नये. सकृतदर्शनी ती बाब सत्य प्रतीत होते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. श्रेष्ठ आचार्याची किंवा संन्याशांची त्या बाबीवर श्रद्धा आहे, विश्वास आहे एवढ्याच कारणास्तव ती बाब स्वीकारू नये.*_
_*परंतु तुम्ही याचा अवश्य विचार करावा की जे मत, जी आस्था, जो विश्वास तुम्ही स्वीकारू इच्छिता तो कुशल आहे अथवा अकुशल आहे. निंदनीय आहे अथवा वंदनीय आहे. कल्याणकारी आहे अथवा अकल्याणकारी आहे. याच आधारावर माणसाने कोणतीही देशना स्वीकारावी अथवा अस्वीकारावी.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०८/०८/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment