Sunday, 31 October 2021

अधम्म

                🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   *_अधम्म_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

     *_अधम्म कशाला म्हणावे?_*
*१) अनैसर्गिक गोष्टींवर विश्वास ठेवणे, या अधम्म म्हणावे.*
*२) ईश्वरावर विश्वास ठेवणे, याला अधम्म म्हणावे.*
*(३) ब्रह्म सायुज्यावर (ब्रह्माच्या अस्तित्वावर) आधारित धम्मास अधम्म म्हणावे.*
*(४) आत्म्यावर विश्वास ठेवण्याला अधम्म म्हणावे.*
*(५) धम्माच्या पुस्तकांचे केवळ वाचन करून, आचरण न करणे, यास अधम्म म्हणावे.*
*(६) धार्मिक पुस्तकांना अचूक असल्याचे गृहीत धरणे, यास अधम्म म्हणावे.*
*(७) यज्ञकर्म करणे, यास अधम्म म्हणावे.*
*(८) कल्पनाश्रित विश्वास ठेवण्यास, अधम्म म्हणावे.*



*१) अनैसर्गिक गोष्टींवर विश्वास ठेवणे, या अधम्म म्हणावे.*
                _परा-प्राकृतिक वादाचे खंडन करण्यात भगवंतांचे तीन हेतू होते :-_
*(अ)* _पहिला हेतू हा की, मनुष्य बुद्धिवादी बनला पाहिजे._
*(आ)* _दुसरा हेतू असा की, मनुष्याने स्वातंत्र्यपूर्वक सत्याचा शोध घेतला पाहिजे._
*(क)* _तिसरा हेतू असा की, मिथ्या-विश्वासाच्या मुख्य कारणाला समूळ नष्ट करायला पाहिजे._
             _हा *'हेतुवाद (कारण असतेच असे कथन)'* बुद्धधम्माचा प्रमुख सिद्धांत आहे. *भगवंतांनी मल्लांची नगरी अनुपिय येथे विहार करीत असताना भग्गव परिव्राजकांना खालील गोष्टी सांगितल्या. त्यापूर्वी त्यांनी सुनक्खतासही हेच स्पष्ट केले होते की -*_
*(अ) _ते सामान्य माणसाच्या शक्तीच्या बाहेरील पराप्राकृतिक चमत्कार दाखवीत नसतात._*
*(आ) _ते सृष्टीच्या आरंभाचे रहस्य सांगावयाची हमी देत नाहीत._*
*(इ) _त्यांचा धम्म त्यांच्या स्वतःच्या बुद्धत्वामुळे निर्माण झाला आणि दुःखाचा अंत करावयास त्या धम्मानुसार आचरण करावे लागते._*

*२) ईश्वरावर विश्वास ठेवणे, याला अधम्म म्हणावे.*
             _भगवान बुद्ध म्हणतात, 'ईश्ववराश्रित धर्म कल्पनाश्रित आहे'. *धम्माची धुरा ईश्वर व मनुष्यातील संबंध नसून, मनुष्य व मनुष्य यांच्यातील संबंध आहे. मनुष्याने मनुष्याशी कसा व्यवहार करावा, ह्याचे निवेदन म्हणजेच धम्म होय; जेणेकरून सर्वजण सुखी राहू शकतील.* भगवान बुद्ध धार्मिक अवडंबराचे विरोधक होते. कारण त्या सर्वांच्या मुळाशी मिथ्या विश्वास असतो व अंधश्रद्धा असते. तथागतांचा आर्य अष्टांगिक मार्गाचा सम्यक दृष्टी हा महत्वाचा भाग असून मिथ्या विश्वास हा त्याचा शत्रू आहे._

*(३) ब्रह्म सायुज्यावर (ब्रह्माच्या अस्तित्वावर) आधारित धम्मास अधम्म म्हणावे.*
             _तथागटांच्या वेळी *'वेदान्त'* प्रचलित होता. त्यांत ब्रह्म व जीव एकच असल्याचे मानलेले आहे. भगवंतांचे म्हणणे असे की, प्रत्येक गोष्टीला काहींना काही प्रमाण असायलाच पाहिजे. प्रमाण दोन प्रकारचे :-_
*(१) प्रत्यक्ष प्रमाण*
*(२) अनुमान प्रमाण*
              _ब्रह्माला कोणीच प्रत्यक्ष पाहिले नाही आणि ब्रह्माचे अस्तित्व आहे, ह्याचे अनुमान करणेही अशक्य आहे. यास्तव धर्म ब्रह्मावर आधारित आहे, असे म्हणणे मूर्खपणाचे व आंधळेपणाचे होय. ब्रह्मच यथार्थ नसल्यामुळे *'ब्रह्माश्रित धर्म'* व्यर्थ आहे._

*(४) आत्म्यावर विश्वास ठेवण्याला अधम्म म्हणावे.*
                    _भगवान बुद्धांनी म्हटलेले आहे की, जो धर्म आत्म्यावर आधारित आहे, *त्याला कल्पनाश्रित धर्म* म्हणावे. *आजपर्यंत कोणीच आत्म्याला पाहिलेले नाही. तो अज्ञात व अदृश्य आहे.* मन किंवा चित्त वास्तव आहे, आत्मा नाही. *आत्म्यावरील विश्वाससुद्धा 'ब्राह्मणि' धर्माचेच अंग होय.* त्यानुसार 'आत्मा' अमर असुन दुसऱ्या जन्मात तो दुसरे शरीर धारण करतो. *'आत्म्याविषयी' लोकांत नाना प्रकारची मते व नाना प्रकारच्या कल्पना आहेत. आत्म्याचे अस्तित्व नाकारून भगवंतांनी 'नामरूपाचा' सिद्धान्त पुढे मांडळा आहे. हा सिद्धांत म्हणजे मानवाचा अतिशय सूक्ष्म, कठोर विश्लेषणाचा परिणाम होय. 'नामरूप' एका प्राण्याचे सामूहिक (म्हणजे त्याच्या सर्व इंद्रियांना एकत्रित धरून ठेवलेले) नाव आहे.*_
               *_प्रत्येक प्राणी काही भौतिक व काही मानसिक तत्त्वांच्या संमिश्रणाने बनलेला आहे. त्या तत्त्वांनाच 'स्कंध' म्हणतात. पृथ्वी, जल, वायू व अग्नी ह्या चार भौतिक तत्त्वांच्या परिणामांनी शरीर बनलेले आहे. याव्यतिरिक्त ज्याच्यायोगे प्राण्यांची रचना होते, तिला 'चेतना (नाम-स्कंध) म्हणतात. नाम स्कंधाच्या अंतर्गत वेदना (सहा इंद्रिये व त्यांच्यापासून होणारी अनुभूती), संज्ञा व संस्कार आहेत. ह्या तीनमध्ये विज्ञानाचाही (चेतनेचा) समावेश होतो. जेव्हा विज्ञानाचा (चित्ताचा, चेतनेचा) उदय होतो, तेव्हा मनुष्यात जीव निर्माण होतो. म्हणजेच चित्त मनुष्याच्या जीवनात प्रधान वस्तू आहे. चित्ताची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामुलक व क्रियाशील असते. मनुष्य किंवा प्राणी ज्या क्रिया करतो, त्या चित्ताद्वारे पूर्ण केल्या जातात. तथागत म्हणतात की, सर्व कार्य चित्ताद्वारे केले गेल्यावर आत्म्याची आवश्यकताच काय? आणि ज्याचे 'कार्यच' नाही, असा 'आत्मा' मानणे कितपत संयुक्तिक आहे? अशा प्रकारे आत्म्याचे अस्तित्व भगवंतांनी असिद्ध केले असून आत्म्याचा स्वीकार करणे अधम्म होय, असे म्हटले आहे._*

*(५) धम्माच्या पुस्तकांचे केवळ वाचन करून, आचरण न करणे, यास अधम्म म्हणावे.*
              _मनुष्य अनेक ग्रंथांचे वाचन करू शकतो, पण ते जर त्याला काही समजलेच नाही तर त्याचे वाचन निष्प्रयोजन आहे. व्यर्थ विषयांच्या हजार श्लोकांपेक्षा धम्माचा केवळ एकच श्लोक जाणला, परंतु त्यानुसार आचरण केले, तर त्यास मोक्षाचा मार्ग म्हणता येईल._

*_सहस्समपि चे वाचा अनत्थपदसंहिता ।_*
*_एकं अत्थपदं सेय्यो यं सुत्वा उपसम्मति ।।_*

*(६) धार्मिक पुस्तकांना अचूक असल्याचे गृहीत धरणे, यास अधम्म म्हणावे.*
                   _*तथागत कालामांना उपदेश करताना म्हणाले*, "कालामांनो! एखादी गोष्ट केवळ ह्याकरिता तुम्ही तिला खरी मानू नका ती केवळ परंपरेने प्राप्त झाली म्हणून, केवळ पुष्कळसे लोक तिचे समर्थक आहेत म्हणून, केवळ ग्रंथात लिहिलेली आहे म्हणून, केवळ वरवर पाहता ती पटणारी दिसते म्हणून, केवळ ती विश्वास करण्यास अनुकूल आहे म्हणून, केवळ ती पाहिली असता खरी वाटते म्हणून, किंवा केवळ ती एखाद्या पूज्य आचार्यांनी सांगितलेली आहे म्हणून खरी मानू नका."_
            _"कालामांनो! जेव्हा तुम्ही केवळ स्वतःच्या अनुभवाने हे जाणाल की, "ह्या गोष्टी अहितकर आहेत, निंदनीय आहेत, सद्गुणी पुरुषांद्वारा निषिध्द मानल्या गेल्या आहेत, ह्या गोष्टी केल्याने कष्ट होतात, दुःख होते'. तेव्हा हे कालामांनो! तुम्ही त्यांचा त्याग केला पाहिजे."_

*(७) यज्ञकर्म करणे, यास अधम्म म्हणावे.*
                 _ब्राह्मणी धर्म यज्ञावर अवलंबित होता. यज्ञामध्ये सुरापान, पशूंचे बळी आणि हर प्रकारचा आमोद-प्रमोद असे; परंतु त्यांना धर्मामध्ये सम्मीलित केले गेलेले होते. तथागतांस हे सर्वथा नामंजूर होते. कूटदन्त, उज्जय आणि उदायी या ब्राह्मणांशी झालेल्या संभाषणात तथागतांनी ते स्पष्ट केलेले आहे._

*(८) कल्पनाश्रित विश्वास ठेवण्यास, अधम्म म्हणावे.*
               _अशा तऱ्हेचे प्रश्न त्यावेळी विचारले जात असत :-_
*१)* मी पूर्वी होतो काय?
*२)* मी पूर्वी नव्हतो काय?
*३)* मी पूर्वी काय होतो?
*४)* मी कशापासून कसा झालो?
*५)* मी भविष्यात काय होईन?
         _त्याचप्रमाणे संदेहशील प्रश्न विचारले जातात :-_
*१)* मी आहे का?
*२)* मी नाही का?
*३)* प्राणी कुठून आले आणि कुठे जातील?
       _त्याचप्रमाणे आत्म्याविषयीचे तसेच प्रश्न विचारले जातात आणि विश्वाच्या आरंभाविषयी व अंताविषयी प्रश्न विचारले जात._
           _*तथागतांचे म्हणणे असे होते की, या प्रकारचे प्रश्न 'अव्याकृत' आहेत.* म्हणजे त्यांचा जाणूनबुजून उलगडा केलेला नाही. त्या प्रश्नाचे उत्तर माणूस सर्वज्ञ असेल, तोच देऊ शकतो; परंतु अशी कोणतीही व्यक्ती राहूच शकत नाही. म्हणून आशा तऱ्हेच्या प्रश्नांना तथागतांनी धम्मापासून दूरच ठेवले._

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ :*

*१) The Buddha & His Dhamma*

*२) बौद्धधम्म जिज्ञासा*

*संकलन : महेश कांबळे*

*३१/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Saturday, 30 October 2021

भगवान बुद्ध आणि कमलपुष्प

 *भगवान बुद्ध आणि कमलपुष्प* 

*Buddha and Lotus Flower*


या पृथ्वीतलावर भगवान बुद्धांचे शिल्प किंवा प्रतिमा ही नेहमीच कमळावर म्हणजेच पद्मावर आसनस्थ दाखविली जाते. कारण कमलपुष्प आणि बुद्धरूप यांचा अतूट बंध आहे. पद्म विरहित बुद्धमूर्ती सुद्धा असतात. पण जी शुद्धता, पवित्रता कमलपुष्पाने दृग्गोचर होते तशी परिमाणकता पद्म विरहित बुद्धमूर्तीत साधली जात नाही. किंवा अशी बुद्धमूर्ती कमलपुष्प शिल्प किंवा प्रतिमेत ठेवली तरी चालते. मात्र जर बुद्धमूर्ती दुसऱ्या कुठल्या पुष्पात विराजमान केली असेल तर त्या शिल्पकाराला किंवा चित्रकाराला बुद्धांविषयी बिलकूल ज्ञान नाही असे खुशाल समजावे. भगवान बुद्ध आणि कमलपुष्प यांचा काय संबंध आहे हे बऱ्याच भारतीयांना अद्याप ज्ञात नाही. चला तर स्वतः भगवान बुद्धांनी 'बुद्ध आणि कमलपुष्प' यांचा परस्पर काय संबध आहे याबद्दल एका सुत्तात सांगितले आहे ते पाहूया.


एके समयी भगवान उक्कठ्ठ आणि सेतव्य या गावांनां जोडणाऱ्या रस्त्याने जात होते. त्याचवेळी एक द्रोण ब्राह्मण सुद्धा त्याच रस्त्याने चालला होता. तेव्हा द्रोण ब्राह्मणाने जमिनीवर उठलेले पायाचे ठसे पाहिले. या ठशांवरती आऱ्यासहित, धावेसहित व नाभिसहित परिपूर्ण चक्र असल्याचे त्यास दिसले. ते पाहून त्यास आश्चर्य वाटले. हे अद्भुत आहे. हे माणसाचे पायाचे ठसे नसावेत असे त्याला वाटले. त्याचवेळी भगवान बुद्ध रस्ता सोडून एका वृक्षाखाली आसनस्थ होऊन शरीर सरळ ठेवून जागृत बसले असताना द्रोण ब्राह्मण भगवंतांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत तेथे आला. त्याने भगवंतांना एका वृक्षाखाली प्रसन्न, शांत, दमन-शमनयुक्त, अलिप्त, शुद्ध आणि निर्वाणयुक्त मुद्रेत पाहिले. तेव्हा तो आदराने भगवान बुद्ध यांच्या जवळ गेला व म्हणाला..


'आपण देव असाल ?'

'ब्राह्मण मी देव नाही.'

'आपण गंधर्व असाल ?'

'ब्राह्मण मी गंधर्व नाही.'

'आपण यक्ष असाल ?'

'ब्राह्मण मी यक्ष नाही.'

'आपण मनुष्य असाल ?'

'ब्राह्मण मी मनुष्य नाही ?'


तेव्हा द्रोण ब्राह्मण बुचकळ्यात पडला. तो पुढे म्हणाला 'आपण देव असाल' असे विचारल्यावर म्हणता, हे ब्राह्मण ! मी देव नाही, 'आपण गंधर्व असाल' असे विचारल्यावर म्हणता 'हे ब्राह्मण ! मी गंधर्व नाही', 'आपण यक्ष असाल' असे विचारल्यावर म्हणता 'हे ब्राह्मण ! मी यक्ष नाही', 'आपण मनुष्य असाल' असे विचारल्यावर म्हणता 'हे ब्राह्मण ! मी मनुष्य नाही', तर मग आपण कोण आहात ?


तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले 'हे ब्राह्मण !  ज्या आस्त्रवांच्या असण्यामुळे मला 'देव' म्हटले जाऊ शकले असते ते माझे आस्रव समूळ नाश पावलेले आहेत, तोडलेल्या ताड वृक्षाप्रमाणे झालेले आहेत, अभाव प्राप्त झालेले आहेत, भविष्यात उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही. हे ब्राह्मण ! ज्या आस्त्रवांच्या असण्यामुळे मला 'गंधर्व' म्हटले जाऊ शकले असते, 'यक्ष' म्हटले जाऊ शकले असते, 'मनुष्य' म्हटले जाऊ शकले असते, ते माझे आस्रव समूळ नाश पावले आहेत, तोडलेल्या ताड वृक्षाप्रमाणे झाले आहेत, अभाव प्राप्त झालेले आहेत, भविष्यात उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही. ब्राह्मण ! ज्याप्रमाणे उत्पल असते, पद्म असते वा पुंडरीक असते, ते पाण्यात उत्पन्न होत असते. पाण्यात वाढत असते परंतु ते पाण्यापासून अलिप्त राहुन पाण्याच्या वर असते. त्याचप्रमाणे ब्राह्मणा ! मी जगात उत्पन्न झालो आहे, जगात वाढलेला आहे, परंतु या विकारयुक्त जगाला जिंकून त्यापासून अलिप्त राहून विहार करीत असतो. अरे ब्राह्मणा ! मला 'बुद्ध' समज.


याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे सुंदर कमलपुष्प पाण्याने या जगात लिप्त होत नाही त्याचप्रमाणे 'बुद्ध' सुद्धा विकारयुक्त दलदलीच्या जगामध्ये वावरून विकार लिप्त होत नाहीत. सर्वांपासून ते अलिप्त आहेत. म्हणूनच ते बुद्ध आहेत. यामुळेच बुद्धांची प्रतिमा साकारताना, त्यांचे शिल्प साकारताना पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून ते कमलपुष्पावरती साकारले जाते. 

( संदर्भ :- अंगुत्तर निकाय - द्रोण सुत्त )


--- संजय सावंत ( www.sanjaysat.in )


🟦🟦🟦

धम्मोपदेशकाची कर्तव्ये

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

_*धम्मोपदेशकाची कर्तव्ये*_

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

            _*भगवंतांनी धम्मोपदेशकाची पुढील कर्तव्ये सांगितलेली आहेत :-*_

*१)* धम्मोपदेशकाने मोकळ्या मनाने सत्य विचारार्थ पुढे मांडले पाहिजे.
*२)* एखाद्याचे मन वळविण्यास लागणारा संघशक्तीचा सद्गुण त्याच्या नसानसात भिनलेला असावा.
*३)* त्याने आपली योग्य ती मर्यादा राखावी व आपल्या वागणुकीत ठाम रहावे. 
*४)* थोरांची मैत्री संपादन करण्याच्या प्रयत्नात राहून आपल्या अहंपणाला चालना न देण्याचा प्रयत्न करावा.
*५)* अनैतिक वागणाऱ्या व्यक्तींशी संगत करू नये.
*६)* जे श्रवण करावयास येतात, त्यांचे त्याने सदिच्छापूर्वक स्वागत करावे.
*७)* धम्मोपदेश द्वेषरहित असला पाहिजे.
*८)* दुसऱ्यांचे बारीकसारीक दोष काढू नये.
*९)* लोकोपवादाची चर्चा करू नये.
*१०)* कटू शब्दांची पेरणी करू नये.
*११)* दुसऱ्या शिष्यांची निर्भस्तना करू नये आणि त्यांचा आचरणाची खरडपट्टी काढताना त्यांचे व्यक्तिगत नाव घेऊ नये.
*१२)* दोषरहीत मनाने संपूर्ण जगाविषयी प्रेमभाव ठेवावा.
*१३)* भांडणाप्रत चाललेल्या विवादात भाग घेऊ नये *अशा वेळी शांत व स्वस्थ रहावे.*
*१४)* आपल्या कार्यात उत्कंठपणे मन घालावे. ते उत्साहाने व हर्षभरित आशेने परिपूर्ण असायला हवे.
*१५)* पाण्याच्या शोधार्थ जो एखाद्या रुक्ष प्रदेशात विहीर खोदतो, त्या मनुष्यासारखेच राहावे. जोपर्यंत लोक त्याचे शब्द लक्षपूर्वक श्रवण करीत नाहीत तोपर्यंत त्याने जाणावे की, त्याला त्यांच्या हृदयात खोल खणावे लागेल.
*१६)* ज्यांना समाधान देणारे व कल्याणकारी असे धम्मप्रवचन लक्षपूर्वक ऐकणे प्रिय वाटते अशा श्रोत्यांना त्यांनी आपल्या भोवती गोळा करावे. 
*१७)* अविश्वास बाळगणाऱ्यांना वर उचलून धरावे व त्यांना सत्य स्वीकारावयास जागृत करावे. त्यांना हर्षभरित व आनंदित करून त्यांना प्रज्वलित करावे व नीतीचा बोध करावा.
*१८)* त्याने स्वतःला तथागतांचा सैनिक समजून दुष्ट मारायला आपला शत्रू समजावे व त्यावर विजय मिळविण्याचा सदोदित प्रयत्न करावा.
           
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ :-*

*१) तथागताची सत्यगाथा *

*२) बौद्धधम्म जिज्ञासा*

*संकलन : महेश कांबळे*

*३१/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


Wednesday, 27 October 2021

महाकस्सपत्थेरबोज्झंगं

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*_महाकस्सपत्थेरबोज्झंगं_*  

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


*_यं महाकस्सपत्थेरो, परित्तं मुनिसन्तिका ।_*
*_सुत्वा तस्मिं खणे येव, अहोसि निरुपद्दवो ।_*
*_बोज्झङ्गबलसंयुत्तं, परित्तं तं भणामहे ।।_*
              *_जो रक्षणमंत्र बुद्धमुनींच्या तोंडून ऐकताक्षणीच महाकाश्यप स्थविर उपद्रवरहित झाले, त्या बोधीज्ञानाच्या अंगांनी / विविध घटकांनी युक्त अशा रक्षणमंत्राचे आम्ही पठन करीत आहोत._*

*_एवं मे सुत्तं, एकं समयं भगवा राजगहे विहरती वेलूवने कलन्दकनिवापे । तेन खो पन समयेन आयस्मा महाकस्सपो पिप्फलीगुहायं विहरति आबाधिको दुक्खितो बाल्हगिलानो । अथ खो भगवा सायन्हसमयं पितसल्लाना वुट्ठितो, येनायस्मा महाकस्सपो तेनुपसङ्कमित्वा पञ्ञत्ते आसने निसीदि । निसज्ज खो भगवा आयस्मन्तं महाकस्सपं एतदवोच - कच्चि? ते कस्सप, खमनियं, कच्चि? यापनीयं, कच्चि? दुक्खा वेदना पटिक्कमन्ति नो अभिक्कमन्ति, पटिक्कमोसानं पञ्ञायति नो अभिक्कमोति_*
               *_मी असे ऐकले आहे की, एकदा भगवान बुद्ध राजगृहात वेळूवनात कलन्दकनिवापात (खारींना चारा घालण्याच्या जागी) राहात होते. त्यावेळी आयुष्यमान महाकाश्यप पिफ्फलित गुहेत राहत होते व रोगग्रस्त, व्याधीग्रस्त व पीडित अवस्थेत होते. तेव्हा एक दिवस सायंकाळी भगवान स्थितीतून उठून आयुष्यमान महाकाश्यपांकडे गेले व तेथे पोहोचल्यावर तेथील आसनावर बसले. तेथे बसल्यानंतर भगवंतांनी आयुष्यमान महाकाश्यपांना म्हटले, काश्यप, तुझी प्रकृती बरी आहे ना? तुझी पीडा कमी होत आहे ना? तुझे बरे चालले आहे ना? जास्त वाढत तर नाही ना? व्याधीची तीव्रता कमी वाटते आहे ना? की तीव्रता जास्त वाटते आहे?_*

*_न मे भन्ते खमनियं, न यापनीयं, बाल्हा मे दुक्खा वेदना, अभिक्कमन्ति नो पटिक्कमन्ति, अभिक्कमोसानं पञ्ञायति नो पटिक्कमोति ।_*
              _*भगवान, माझी प्रकृती बरी नाही. माझे स्वास्थ ठी नाही. मला तीव्र वेदना होत आहेत. वेदना वाढतच आहेत. कमी होत नाहीत. व्याधीची तीव्रता वाढत आहे. कमी होत नाही.*_

*_सत्तिमे कस्सप! बोज्झङ्गा मया सम्मदक्खाता भाविता बुहलीकता अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तन्ति, कतमे सत्त?_*
             *_काश्यप, मी हे सात बोध्यंगे (बोधिज्ञानाची अंगे) समजावून सांगितली आहेत की ज्यांची भावना केल्याने (मनात बाणविल्याने) व त्यांच्या आचरणात आणल्याने, अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते. कोणते सार बोध्यंगे?_*

*_सति सम्बोज्झङ्गो खो कस्सप मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बानाय संवत्तति ।_*
          _*स्मृती बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते.*_

*_धम्मविचय सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
             *_धर्मविचय बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._*

*_विरिय सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
             *_वीर्य बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._*

*_पीति सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
             *_प्रीती बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._*

*_पस्सध्दि सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
             *_प्रश्रब्धि बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._*

*_समाधि सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
             *_समाधी बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._*

*_उपेक्खा सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
              *_उपेक्षा बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._*

*_इमे खो कस्सप ! सत्त बोज्झङ्गा मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तन्तिति ।_* 
*_तग्घ भगव! बोज्झङ्गा तग्घ सुगत! बोज्झङ्गाती।_*
*_काश्यप, मी हे जे सात सम्माबोध्यंगेचांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._*
*_"तर भगवान, हीच बोध्यंगे आहेत, तर सुगत हीच बोध्यंगे आहेत."_*

*_इदमवो च भगवा ! अत्तमनो आयस्मा महाकस्सपो भगवतो भासितं अभिनन्दि ।_*
           *_भगवान, बुद्धांनी अशी शिकवणूक दिली व संतुष्ट होऊन महाकाश्यपाने भगवंतांच्या भाषणाचे अनुमोदन केले._*

*_उट्ठाहि चायस्मा महाकस्सपो तम्हा आबाधा । तथा पहीनो चायस्मतो महाकास्सपस्स सो आबाधो अहोसीति ।_*
            *_आयुष्यमान महाकाश्यप त्या आजारातून उठला, अशा रीतीने आयुष्यमान महाकाश्यप त्या व्याधीतून मुक्त झाला._*
                   
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ : संयुत्तनिकाय*
*संकलन : महेश कांबळे*
*२७/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Tuesday, 26 October 2021

विहार आणि त्याचे सामान

               🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

                   *_विहार आणि त्याचे सामान_*

               🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

                   _त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळूवनातील कलदक निवापात विहार करीत होते. *त्यावेळेपर्यंत भगवान बुद्धांनी भिक्खुंसाठी शयन आसनाचे विधान केले नव्हते आणि भिक्खू जिकडे-तिकडे अरण्यात, वृक्षाखाली, पर्वत, गिरी, कदर, गुफा, स्मशान, चौडे चौडे मैदान किंवा पुआलाच्या गजीचे विहार करीत असत. त्यातच राहणे, चारीकेसाठी जाणे, खाली मान करून ईर्यापथ (चांगली रहन-सहन) युक्त होऊन निघत असत.*_

             _त्यावेळी राजगृहाच्या मुख्य धनिक श्रेष्टी दुपारी बागेकडे गेला असता भिक्खुंना पाहून त्याच्या मनात असा विचार आला की, हे भिक्खू किती सभ्यतेने चालले आहेत किती ते चांगले दिसत आहेत, ते पाहून त्याचे मन भरून गेले, प्रसन्न झाले. तो राजगृहक श्रेष्टी भिक्खुंजवळ जाऊन त्यांना म्हणाला की, तो त्यांच्यासाठी *विहार बांधून ते भिक्षु संघासाठी दान देऊ इच्छितो.* भिक्खुंनी त्याला सांगितले की, *भगवंतांनी विहाराचे विधान केले नाही आहे* श्रेष्टीने त्या भिक्षु संघास विनंती केली की, आपण भगवंतांना माझी ईच्छा सांगा, भिक्षु संघाने त्याला सांगितले की, तूझी इच्छा आम्ही भगवंतांस सांगतो._
      _ते भिक्खू भगवान बुद्ध होते तेथे गेले. जाऊन त्यांना त्रिवार अभिवादन करून एकीकडे बसून त्यांनी भगवंतांना विचारले, *"भगवान! राजगृहक श्रेष्टी विहार बनवू इच्छितो, त्यासाठी आपले काय म्हणणे आहे?"_
              _भगवंतांनी ह्यासंबंधी ह्याच प्रकरणात धार्मिक कथा सांगून भिक्खुंना म्हणाले -*"भिक्खुंनो! मी अनुमती देतो पाच प्रकारच्या लेण्या (लयनो निवास स्थानो) ची" -*
*१) विहार*
*२) अड्ढयोग (गरुळकीसारखे तिरपट घर)*
*३) प्रासाद (महाल)*
*४) हर्म्य (दोन मजली घर)*
*५) गुहा (लेणी-गुफा)*
          *_लेण्या-गुफा ह्या चाफा प्रकारच्या असतात १) विटांची गुफा २) दगडाची गुफा ३) लाकडाची गुफा ४) मातीची गुफा_*
            _दुसऱ्या दिवशी राजगृहक श्रेष्टीला भिक्खू संघाने सांगितले की, "गृहपती! भगवंतांनी विहाराची आज्ञा दिली आहे आत्ता जसे तुम्हाला योग्य वाटेल ते कार्य करा." तेव्हा श्रेष्टीने *साठ विहार बांधले* आणि भगवंतांजवळ जाऊन त्यांना अभिवादन करून भोजनासाठी निमंत्रित केले आणि ते भगवंतांनी मौन होऊन स्वीकारले. भगवंतांस आणि भिक्षु संघास जेवण वाढल्यानंतर आज जेवण पूर्ण झाल्यानंतर श्रेष्टी भगवंतांस म्हणाला, "भन्ते! पुण्याच्या इच्छेने मी हे साठ विहार बांधले आहेत. तरी भगवान! मला त्या विहाराच्या विषयी काय करावयास पाहिजे ते सांगाल काय?"_

*_त्रिकाल आणि चारही दिशांच्या संघास विहाराचे दान_*
            _*"तर गृहपती! तू त्या साठ विहारांना आगत-अनागत तीनही काळ आणि चारही दिशा अर्थात अखिल विश्वाच्या भिक्खू संघासाठी प्रतिष्ठापित कर."*_
            _*"होय भन्ते" म्हणून राजगृहाच्या श्रेष्टीने भगवंतांस उत्तर देऊन त्या साठ विहाराला आगत-अनागत चातुर्दिश संघाला प्रदान केले.* तेव्हा भगवंतांनी श्रेष्टीच्या दानाचे स्वीकार केला._
           _लोकांनी ऐकले की, भगवंतांनी आता विहाराची अनुमती दिली आहे आणि ते सत्कारासहित विहार बांधावयास लागले. त्यावेळी ते सर्व विहार दारा आणि खिडक्याशिवाय उघडेच असत. सर्प, विंचू, गोमी त्यात घुसत असत. म्हणून भगवंतांनी भिक्खुंना बोलावून सांगितले की -_

*_विहाराचे दरवाजे_*
                _"भिक्खुंनो! मी अनुमती देतो *विहाराला कवाडे लावण्याची, दरवाजा चौकटयुक्त, त्याला उदुखली, उत्तर पाशक, पिट्ठिसंघाट (चवकट), अविजन छिद्र, अविजन दोर, अग्गलवट्टिक, त्याला अरगळ, कपी सीस (चटकणी), घटिक (बोम), कुलूप - ताले लावण्याची. कुलूप तीन प्रकारची होती - १) लोखंडाचे कुलूप २) लाकडाचे कुलूप ३) सिंकेचे कुलूप, नंतर यंत्र कुलुप, त्याला सुचिका (चाबी, कुंजी) काही विहार गवताचे असावे, तेव्हा त्यात वारंवार थंडी किंवा उन्ह येऊ नयेत म्हणून त्याला लिपन्यासाठी ओगुम्बन (सिमेंटसारखी वस्तू) लावण्याची अनुमती दिली."*_

*_विहाराला खिडक्या_*
        *_खिडक्या तीन प्रकारच्या लावाव्या -_*
*१) वेदिका वातायाण*
*२) जाळीदार वातायाण*
*३) छडांची वातायाण*
           *_खिडक्यांना पडदे असावे (चक्कलिका), भिसिका (छज्जा)._*

*_विहारात बाज (खाट) चौकी_*
              *_मीड (चटाई) पण असावी. तसेच बाज, मस्सारक (गादीदार बाज), बुदीका (चादरवाली बाज), कुलीर पादक बाज, आसन्दीका बाज, आहक पाद (गादिदार चौकी), सप्तांग (कुर्सी), भद्रपीठ (बेताची चौकी), एरळ पादक (गादीदार अमलक वटीका) (आवळ्याच्या आकाराची गोल बऱ्याच पायाची), काच्छक (खसमुज)._*

*_खूब आणि अंथरूण_*
             _कापसाचे (तुलीका) प्रकार_
*१) वृक्ष तुलीका*
*२) लत्ता तुलीका (मदारचा ऋचिका कापूस)*
*३) पोटकी तुल (कापूस),
          _त्यापासून बनणारे सामान - बाज विणण्यासाठी सुताचे सुंब, अष्पदक (सतरंजी), उशी (विम्बोहक) गाद्या इत्यादि_

*_विहाराची रंगाई व विहारात नाना प्रकारचे कमरे_*
             _*विहाराला पांढरा, गेरूआ किंवा काळा रंग देण्याची अनुमती, विहारात जातक कहाण्याच्या चित्राची पेंटिंग, पायऱ्या, कोठरी, आलिंद, ओसरी, उपस्थान शाळा, पाणी शाळा, विहार, परिवेण, आराम, प्रासादछत, विहाराच्या प्रांगणात परकोट नसल्याने विहारात गुरेढोरे येत असत आज लावलेले चांगले चांगले झाड गुरेढोरे खात असत. तेव्हा भगवंतांनी पाहिले आणि त्यांनी विहाराला परकोट करण्यासाठी वेळूचा अथवा कूप लावण्याची अनुमती दिली. पण त्यातूनही जनावरे येत होती. मग भगवंतांनी विहाराला पक्क्या ईटांचा पक्का परकोट करून त्याला भव्य प्रवेशद्वार करण्याची व त्याला मोठे फाटक लावण्याचीपण अनुमती दिली*_



🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ :*

*१) सेनासन क्खन्धक (चूल्लवग्ग)*

*२) विनय पिटक*

*संकलन : महेश कांबळे*

*२७/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Monday, 25 October 2021

बौद्धधम्मातील देवांचे अस्तित्व

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*_बौद्धधम्मातील देवांचे अस्तित्व_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                 _ईश्वर या अर्थाने देवी-देवतांच्या अस्तित्त्वाचे कोणतेच प्रमाण  नाही. त्याअर्थी मनुष्याच्या मनाची ती केवळ कल्पना आहे असे समजावे. बौद्ध वाङमयात संपूर्ण विश्वातील भिन्नभिन्न प्रकारच्या जीवांचे जे प्रकार सांगितले आहेत, ते पुढीलप्रमाणे :-_

*१)* _ब्रह्मा किंवा महान दैवी शक्ती (मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा यांची मूर्ती)_

*२)* _देवता किंवा सामान्य दैवी शक्ती किंवा उत्तम माणूस_

*३)* _मानवजात_

*४)* _पशु_

*५)* _पाण्यातील जीव (जलचर)_

*६)* _आकाशातील जीव (पक्षी वगैरे)_

*७)* _कृमी, कीटक_

*८)* _प्रेत अथवा संतप्त प्राणी, संतप्त जीव_

*९)* _असुरक, अथवा अति शोकार्त दैवी प्राणी_

*१०)* _नैर्यिक अथवा नरक लोकांतील प्राणी (नरक म्हणजे या पृथ्वीवरील अति वाईट स्थिती.)_              

_*देवांचे प्रकार*_

            _देव तीन प्रकारचे आहेत,_

*१)*  _*"कामावचार"* म्हणजे अजूनही ज्यांचे मनोविकार सुटले नाहीत._

*२)* _*"रूपावचार"* म्हणजे उच्च स्थितीला प्राप्त; तथापी ज्यांचे रुप अजूनही कायम आहे._

*३)* _*"अरूपावचार"* जे सर्वात उच्चतम अशा पवित्र अवस्थेला पोहोचले असून भौतिक रूपाच्या विरहीत असतात, असे_

_*महामंगल-सुत्तांत* असे नमूद केले आहे की साऱ्या जेतवनाला प्रकाशित करीत एक *'देव'* भगवान बुद्धांसमोर उपस्थित झाला. हे कथन यथार्थच होते._

            _*महामंगल-सुत्तांत* ज्या देवाचा उल्लेख आहे, त्याला आपण *सत्पुरुष समजावे.* सध्याच्या काळीसुद्धा जेव्हा आपल्याला एखाद्या सद्गृहस्थाची प्रशंसा करावयाची असते, *'तेव्हा तो मनुष्य नाही, देव आहे',* असे आपण म्हणत असतो की नाही? *ब्रह्मदेव म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा यांचे मूर्तिमंत प्रतिक.* भगवंतांना *विषादयोग नष्ट करून धम्मप्रसार करा, अशी विनंती करणारा ब्रह्मासहम्पती म्हणजेच ब्रह्मविहारपैकी एक मनोवृत्ती*_


*_तिट्ठचर निसिन्नो वा सयानो वा यावतस्स विगतमिद्धो ।_*

*_एतं सतिं अधिट्ठेय्य ब्रम्हमेतं विहारं इधमाहु ।।_*

    

  *मराठी अर्थ :-*         

            *_उभे असता, चालत असता, बसले असता किंवा अंथरुणावर पडल्यावर जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत ही मैत्रीची भावना जागृत ठेवावी. कारण तिलाच ब्रह्मविहार असे म्हणतात._*

          *_ब्रह्मदेव म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता किंवा उपेक्षा यांपैकी एखादी मनोवृत्ती होय. ज्या ब्रह्मदेवाला लोक पितामह म्हणतात, तो दुसरा कोणी नसून या चार मनोवृत्तींची साक्षात मूर्ती होय. तेव्हा आत्ता बुध्दांजवळ ब्रह्मदेव आला म्हणजे काय? तर या चार मनोवृत्ती त्यांच्या मनात विकास पावल्या. ब्रह्मदेवाची प्रार्थना त्यांनी ऐकली म्हणजे काय? तर त्यांच्या अंतःकरणात वास करणाऱ्या अमर्याद प्रेमाने, अगाध करुणेने, सज्जनांविषयी मुदितेने आणि जे कोणी त्यांचे ऐकणार नाहीत व अकारण शत्रू होतील अशांच्या उपेक्षेने त्यांना सद्धम्माचा प्रसार करावयास प्रवृत्त केले._*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ :*

*१) बौद्धधम्मावरील चार निबंध*

*२) Intelligent Man's Guide to Buddhism*

*३) Buddhist Catechism*

*४) बौद्धधम्म जिज्ञासा*

*संकलन : महेश कांबळे*

*२५/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Sunday, 24 October 2021

धम्म

               🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   *_धम्म_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

     *_धम्म कशाला म्हणावे?_*
*१)* जीवनाला पवित्र ठेवणे, याला धम्म म्हणावे.
              _जीवहिंसा, चोरी व मिथ्याचारापासून मनुष्य विरक्त झाला तर त्यास त्याची शारीरिक पवित्रता समजावी. तो खोटे बोलण्यापासून विरक्त झाला तर त्यास त्याच्या वाणीची पवित्रता समजावी. कामछन्द, व्यापाद / द्वेष आणि आळस यांच्यापासून विरक्त झाला तर त्यास त्याची मानसिक पवित्रता समजावी. अशा प्रकारे *जो शरीर, वाणी व मन ह्यांनी पवित्र झालेला असेल, त्यालाच लोक निष्कलंक म्हणतात.*_

*२)* जीवनात पूर्णता प्राप्त करणे, याला धम्म म्हणावे.
               _शरीराची, वाणीची आणि मनाची पूर्णता प्राप्त करणे म्हणजेच संपूर्ण जीवनात पूर्णता प्राप्त करणे होय. *चित्तमलांचा पूर्णपणे क्षय करून चित्त-विमुक्तीचा अनुभव करणे ह्यालाच मनाची पूर्णता म्हणतात.*_
                _भगवंतांनी सुभूतीला उपदेश करताना सांगितले, 'चित्ताच्या सर्व अवस्थांना लक्षात ठेवून कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता बोधिसत्व दान देतो, हीच बोधिसत्वाची *'दान-पारमिता'* होय. तो स्वतः दहा कुशल मार्गांचा अवलंब करीत विचरण करतो आणि दुसऱ्यांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो, हीच त्याची *'शील पारमिता'* होय. तो स्वतः क्षमाशील होऊन दुसऱ्यांनाही क्षमाशील राहण्याची प्रेरणा देतो, ती त्याची *'क्षांती पारमिता'* होय. तो सतत पाच पारमितांची पुर्ती करण्यातच मग्न असतो व दुसऱ्यांनाही तसाच उपदेश करतो, ही त्याची *'वीर्य पारमिता'* होय. तो कौशल्याने समाधीचा लाभ घेतो व पुन्हा जन्म घेत नाही, म्हणजे त्याचे मन स्थिर होते ही त्याची *'समाधी पारमिता'* होय. तो भौतिक व अभौतिक वस्तुंमध्ये न गुरफटता स्वभाव धर्माविषयी विचार करतो व दुसऱ्यांनाही तसेकंग करण्याची प्रेरणा देतो, ही त्याची *'प्रज्ञा पारमिता'* होय. ह्या सर्व पारमितांचा विकास करणे ह्यालाच धम्म म्हटलेले आहे.

*३)* निर्वाण प्राप्त करणे, याला धम्म म्हणावे.
             _भगवंतांनी म्हटले आहे की, *'निर्वाणापेक्षा अधिक सुखद काहीच नाही'.* त्यांच्या उपदेशात निर्वाणाला प्रमुख स्थान आहे. त्यांच्या पुर्वीचे लोक *'आत्म्याचा मोक्ष'* यालाच निर्वाण समजत असत. *आत्म्याला मोक्ष मिळवून द्यावयाच्या चार पद्धती होत्या :-* *१)* लौकिक (खाणे, पिणे व मौज करणे) *२)* यौगिक *३)* ब्राह्मणी *४)* औपनिषदीक. परंतु भगवान बुद्धांनी विशद केलेल्या निर्वाणाचे स्वरूप त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलेल्या स्वरूपाहुन सर्वथा भिन्न होते._
          _भगवंत म्हणतात, *'राग-द्वेष प्रज्वलित अग्नी समान असून ते मनुष्याला जाळून टाकतात. मनुष्य राग, द्वेष, मोह, लोभ यांच्यापासून मुक्त झाला तर त्याला दुःख, पीडा व मानसिक वेदना यांची अनुभूती होणार नाही. तो त्यांच्यापासून मुक्त होऊन ह्याच जीवनात निर्वाण प्राप्त करू शकतो, निर्वाण ह्याच जीवनात प्राप्य आहे; ते सर्वोत्तम व आकर्षक आहे. बुद्धिमान श्रावक ते हस्तगत करू शकतो.'*_
             _शब्दाच्या व्यत्पत्तींचे दृष्टीने 'निर्वाण' शब्दाचा अर्थ 'विझणे' असा आहे. परंतु *'रागाग्नी, मोहग्नी व द्वेषाग्नीचे' विझणे होय. निर्वाणाचा अर्थ आहे आपल्या प्रवृत्तींवर एवढा ताबा ठेवणे, जेणेकरून मनुष्य पूर्णतः धम्माच्या मार्गावर चालू शकेल. याशिवाय अधिक ह्याचा अर्थ नाही. निर्वाणाचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. निर्वाण प्राप्त करावयास आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. निष्कलंकतेचा मार्ग म्हणजे निर्वाणाचा मार्ग. *याप्रमाणे निर्वाण व परिनिर्वाण ह्यात फार मोठा फरक आहे. परिनिर्वाण म्हणजे शरीर, मन, चेतना ह्यांची सर्व प्रकारची प्रक्रिया बंद होणे; म्हणजे पूर्णपणे विझून जाणे; अर्थात मनुष्याचा अंत होणे.*_


*४)* तृष्णेचा त्याग करणे, याला धम्म म्हणावे.
                   _*'आरोग्य सर्वांत मोठा लाभ असून संतोष सर्वांत मोठे धन आहे', असे भगवंतांनी धम्मपदात म्हटलेले आहे.* त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय हाच होता की, मनुष्याने लोभाच्या आहारी जाऊ नये. लोभाला ताब्यात ठेवले पाहिजे. लोभाच्या इच्छेतूनच तृष्णेचा जन्म होतो व लोभ वाढत जातो. तृष्णा व लोभ ह्यांच्यामुळेच पुष्कळशी वाईट कर्मे मनुष्याच्या हातून घडतात. तृष्णा कधीच नष्ट न होणारी आहे. यास्तव संतोष सर्वात मोठे धन असून 'तृष्णा' व 'लोभ' ह्यांना वशीभूत केल्याने प्राप्त होते, असे भगवान बुद्धांचे सांगणे आहे.*_

*५)* सर्व संस्कार अनित्य आहे असे मानणे, याला धम्म म्हणावे.
           _अनित्यतेच्या सिद्धांताचे तीन भाग पडतात :-_
*१)* _अनेक तत्त्वांच्या मिश्रणाने वस्तू बनलेल्या असून सर्वच वस्तू अनित्य आहेत._
*२)* _व्यक्तिशः प्राणी अनित्य आहे_
*३)* _प्रतित्यसमुत्पन्न वस्तूंचे 'आत्मतत्त्व' अनित्य आहे._
      _प्रत्येक वस्तू हेच व प्रत्ययांपासून उत्पन्न होते. कोणत्याही वस्तूला स्वतंत्र अस्तित्व नाही. हेतू-प्रत्ययांचा उच्छेद झाल्यावर वस्तूंचे अस्तित्व नष्ट होते. *पृथ्वी, जल, अग्नी व वायू या चार महाभूतांपासून प्राण्यांचे शरीर उत्पन्न होते. ह्या चार महाभूतांचे पृथक्करण झाले की प्राणी नष्ट होतो. ह्याचा सारांश असा की, मानव निरंतर परिवर्तनशील आहे, निरंतर संवर्धनशील आहे. तो आपल्या जीवनाच्या दोन भिन्न क्षणांतही एकच नसतो.* सर्व वस्तू अनित्य असून परिवर्तनशील आहेत. असे नसते तर जीवनाचा विकासच थांबला असता. मानवजातीची प्रगती सर्वथा थांबली असती. यास्तव कोणत्याही वस्तुविषयी आसक्ती ठेवू नये, हीच शिकवण मिळते. संपत्ती, नातलग, मित्रमंडळी आणि परिचित लोक ह्यांच्याविषयी अनासक्ती बाळगा. कारण सर्व वस्तू अनित्य आहेत._    


*६)* कर्माला मानव जीवनाच्या नैतिक कर्माचा आधार मानणे याला धम्म म्हणावे. 
            _विश्वाच्या नैतिक क्रमांना बनविणारा कोणी 'ईश्वर' नाही. कर्मनियमानुसार विश्वाचा नैतिक क्रम बनलेला आहे. भगवंतांच्या उपदेशानुसार विश्वाचा नैतिक क्रम चांगला असो वा वाईट असो, तो सर्वथा मनुष्यावर अवलंबून आहे. नैतिक क्रम वाईट असल्यास मनुष्य अकुशल कर्म करतो. नैतिक क्रम चांगला असल्यास मनुष्य कुशल कर्म करतो. आणि ज्याप्रमाणे रात्र दिवसाचा पाठलाग करते, त्याचप्रमाणे मनुष्याच्या कर्माचा परिणाम / कर्म- विपाक त्याचा पाठलाग करते, ह्यालाच कर्माचा नियम म्हटलेले आहे. कुशल कर्माने प्रत्येकाला लाभ होतो व अकुशल कर्माने प्रत्येकाची हानी होते. कर्म व त्याचा विपाक ह्यांच्यात काळाचे कमीअधिक अंतर होऊ शकणे शक्य आहे. यास्तव भगवान बुद्धांचा उपदेश आहे की, सदासर्वदा कुशल कर्म करावे. म्हणजे नैतिक क्रम चांगला होऊन मानवतेचा लाभ होईल._
        _ह्या दृष्टीने पहाता कर्मांचे प्रकार येणेप्रमाणे :-_
*१)* _दिट्ठधम्मवेदनीय कर्म - ह्याच जन्मात लवकरच फळ देणारे कर्म_
*२)* _उपपज्जवेदनीय कर्म - उत्पन्न झाल्यावर कालांतराने फळ देणारे कर्म_
*३)* _अपरापरियवेदनीय कर्म - अनिश्चित काळी फळ देणारे कर्म_
*४)* _अहोसी कर्म - फल न देणारे अति दुर्बल कर्म_
    
               _व्यक्ती जगात येतात आणि जातात, परंतु विश्वाचा नैतिक क्रम टिकून राहतो आणि त्याच्याबरोबर कर्म नियमसुद्धा टिकून राहतो. ह्याच कारणामुळे अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान आहे, तेच भगवान बुद्धांच्या धम्मात नैतिकतेला आहे. 'विश्वाचा नैतिक क्रम' टिकून ठेवणे सर्वथा 'कर्म नियमाच्या सिद्धांतावर' अवलंबून आहे. ह्यामुळेच 'कर्माचा नियम' धम्माचे एक महत्वपूर्ण अंग आहे._

*_बोधिपक्षीय धम्म_*
     _त्यावेळी भगवंतांच्या महापरिनिर्वाणाच्या तीन महिने पूर्वी भगवान कुटागार शाळेमध्ये निवास करीत होते. त्यांनी वैशालीच्या जवळपास जेवढे भिक्खु विहार करीत होते, त्या सर्वांना एकत्रित करविले. *त्यांना आपली शेवटची अनुशासनपर देशना दिली.* भगवंतांनी भिक्खुंना संबोधित करून म्हटले *"भिक्खूनो, मी बोधिपक्षीय धम्माचा जो उपदेश दिलेला आहे तो चांगल्याप्रकारे शिकून ग्रहण करा, तशी भावना करा, चिंतन - मनन करून विकसित करा, जेणेकरून हे श्रेष्ठ जीवन मंगलमय होईल आणि ह्याने अनेकांचे कल्याण होऊन अनेकांना सुखाचा लाभ होईल."*_

         त्याचे सविस्तर विवरण करताना भगवंतांनी म्हटले -

*_"भिक्खुंनो, मी चार स्मृती उपस्थांनाचा उपदेश दिला आहे, चार सम्यक - प्रयासांचा उपदेश दिला आहे, चार ऋद्धिपादांचा, पाच इंद्रियांचा उपदेश दिला आहे, पाच बलांचा उपदेश दिला आहे, सात बोध्यांगाचा उपदेश दिला आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला आहे."_*

          _"भिक्खुंनो, संस्कार अनित्य आहेत, तुम्ही अप्रमादी राहून आपल्या उद्देश प्राप्तिकरिता सतत प्रयत्नशील राहा. थोड्याच दिवसात तथागतांचे परिनिर्वाण होईल. आजपासून तीन महिन्यानंतरच तथागत परिनिवृत्त होतील."_

_*हे सर्व धम्म एकूण सदतीस आहेत म्हणून ह्यांना 'सदतीस बोधिपक्षीय' धम्म म्हणतात.*_

● *चार स्मृती उपस्थान*

*१)* कायानुपश्यना

*२)* वेदनानुपश्यना

*३)* चित्तानुपश्यना

*४)* धर्मानुपश्यना


● *सम्यक प्रयास चार आहेत*

*१)* अकुशल धर्माची उत्पत्ती न व्हावी म्हणून प्रयत्न करणे

*२)* उत्पन्न झालेल्या अकुशलांचा नाश करण्याकरिता प्रयत्न करणे

*३)* उत्पन्न न झालेल्या कुशल धम्माची प्राप्ती करण्याकरिता प्रयत्न करणे

*४)* उत्पन्न झालेल्या कुशल धम्माची जोपासना करण्याकरिता प्रयत्न करणे


● *चार ऋद्धिपाद*

*१)* छंद

*२)* चित्त

*३)* वीर्य

*४)* विमर्श


● *पाच इंद्रिये*

*१)* चक्षु

*२)* श्रवणेन्द्रिय

*३)* नासिका

*४)* जिव्हा

*५)* त्वचा

            _यांशिवाय येथे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा हेही अभिप्रेत आहेत. त्यांनादेखील 'इंद्रिये' च म्हणतात._

● *पाच बल*

*१)* श्रद्धा बल

*२)* वीर्य बल

*३)* स्मृती बल

*४)* समाधी बल

*५)* प्रज्ञा बल

● *सात बोध्यंग*

                _सात बोध्यांगात स्मृती, वीर्य आणि समाधीचा समावेश केला जातो._ आणि बाकीचे चार आहेत -

*१)* धर्म

*२)* विनय

*३)* प्रीतीप्रश्रंधि

*४)* उपेक्षा

● *आर्य अष्टांगिक मार्ग*

*१)* सम्यक दृष्टी

*२)* सम्यक संकल्प

*३)* सम्यक वाचा

*४)* सम्यक कर्मान्त

*५)* सम्यक आजिविका

*६)* सम्यक व्यायाम

*७)* सम्यक स्मृती

*८)* सम्यक समाधि

             _अशारितीने जर ह्या सदतीस बोधी पक्षीय धम्माची एकूण मोजदाद केली तर त्यांची वास्तविक संख्या सदतीस न होता एकूण पंचवीस होते. ह्या बोधिपक्षीय धम्मांद्वारे बौद्ध धम्माचा सारांश विशद केलेला आहे. नाहीतर भगवंतांनी अथवा संगितिकारांनी ह्यांना इतके महत्व दिले नसते._            


*_शील, श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी हे पुण्य धम्म आहेत._*

_*१) शील*_
           _सदाचरणाचा आधार शील आहे. ज्ञानी मनुष्य शिलाच्या आधाराने दृढ राहून आपल्या चित्ताला वश करून घेतात. संयमी व बुद्धिमान भिक्खू शीलाच्या आधारेच तृष्णेला नष्ट करतो. शीलाचे पालन करणे हे सर्वप्रथम कर्तव्य होय. भगवंतांचा धम्म, त्याचे मौलिक रूप प्रतित्य समुत्पादाच्या रूपाने अत्यंत क्रांतिकारी स्वरूपाचा होता. संसार, समाज, मनुष्य ह्या सर्वांना त्याने क्षणोक्षणी परिवर्तनशील असल्याचे घोषीत केले. परिवर्तनानुसार आपले व्यवहार आणि आपल्या समाजाच्या परिवर्तनासाठी नेहमीच तयार राहावयाची शिकवण तो देत असे. भगवंतांनी स्वतःचे सगळ्यात महत्वाचे असे तत्वज्ञान म्हणजेच धम्म, यासदेखील केवळ एका नावेसमान उपमा दिली आणि त्यापासून फक्त फायदा तेवढा घ्या अशी शिकवण दिली. एवढेच नव्हे तर, जोवर धम्म लोकोपयोगी राहील तोपर्यंतच त्याचा वापर करा, अशी निग्रहाची शिकवण दिली._

*_२) श्रद्धा_*
              _मनात प्रसन्नता निर्माण करणे श्रद्धेची ओळख आहे. चित्तास सर्व बाधांपासून अलिप्त, स्वच्छ, प्रसन्न आणि निर्मळ करून मनात उच्च महत्वकांक्षा निर्माण करणे श्रद्धेचे कार्य आहे. एखादा मनुष्य अप्राप्त गोष्टीला प्राप्त करण्याकरिता प्रयत्न व परिश्रम करतो. कारण त्याच्या मनात ती गोष्ट प्राप्त करण्याची महत्वकांक्षा असते. ही महत्वकांक्षा श्रद्धेमुळे निर्माण झालेली असते. भगवंतांनी *'संयुक्त निकायात'* असे म्हटले आहे. *'श्रद्धेमुळे मनुष्य नदीच्या प्रवाहाला पार करून जातो', अधिक प्रयत्नशील राहून तो पुढे सागराला पार करण्याची आकांक्षा बाळगतो, दृढ संकल्पाने दुःखाचा नाश करतो, आणि प्रज्ञेने तो दुःखमुक्त होतो.'*_

*_३) वीर्य_*
              _*'दृढ करणे' वीर्याची ओळख आहे.* वीर्य म्हणजे प्रयत्न. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पडत असलेल्या घराला खांबाचा आधार देऊन घराला पडण्यापासून वाचवितो, म्हणजेच घराला दृढ करतो. त्याप्रमाणे विर्यापासून दृढ केले गेलेले सर्व धर्म ढळत नाहीत. *भगवंतांनी म्हटले आहे, 'भिक्खुंनो! विर्यवान आर्यश्रावक पाप सोडून पुण्य ग्रहण करतो, दोष सोडून दोषरहीत होण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःला शुद्ध करीत असतो'.*_

*_४) स्मृती_*
              _अगदी 'बरोबर आठवण ठेवणे' आणि 'स्वीकार करणे' ह्यालाच स्मृती म्हणतात. स्मृती आठवण करून देत असते की अमुक - अमुक कुशल आहे, हे अकुशल आहे. हे दोषयुक्त आहे, हे दोषयुक्त नाही. हे वाईट, हे चांगले. हे कृष्ण, हे शुक्ल, ही चार स्मृतीप्रस्थान आहेत, हे सारे सम्यक प्रयत्न आहेत, ह्या चार रिद्धी आहेत, ही पाच इंद्रिये आहेत, हे पाच बळ, ही सात बोध्यांगे, हा आर्य अष्टांगिक मार्ग, ही शमथ, ही विदर्शना, ही विद्या आणि ही विमुक्ती. स्मृती उत्पन्न होऊन शोध घेते की कोणते धर्म हितकर आहेत आणि कोणते अहितकर. हे धर्म फायद्याचे आणि हे धर्म नुकसानकारक, असा शोध घेऊन सांगते. त्यामुळे योगी अहितकारक धर्मांना सोडून देतो आणि हितकारक धर्मांचा स्वीकार करतो. येणेप्रमाणे स्वीकार करणे, यासच स्मृतीची ओळख म्हटलेले आहे._

*_५) समाधी_*
         _*'प्रमुख असणे'ही समाधीची ओळख आहे. जेवढे पुण्यधर्म आहेत ते सर्व समाधीच्या प्रमुख असण्यामुळे असतात. समाधिकडेच झुकतात, समाधिकडेच घेऊन जातात आणि समाधीमध्येच स्थित होतात. ज्याप्रमाणे एखादी मिनार असते तिच्या सर्वच पायऱ्या सर्वांत वरच्या माळ्याकडे प्रमुख नेणाऱ्या असतात, वरच्या माळ्याकडेच जातात, तिथेच जाऊन अंत पावतात, तिथेच शेवटास जातात. *भगवंतांनी म्हटलेच आहे, "भिक्खुंनो! समाधीचा अभ्यास करा. समाधी लागल्याने खरे ज्ञान प्राप्त होते."*_
                _कुशल चित्ताची एकाग्रता होणे, म्हणजेच सम्यक-समाधी होय. समाधी शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. जसे - श्वासोच्छ्वास रोखुन धरणे, काही दिवस किंवा तांसाकरीता जिवंतपणी स्वतःला जमिनीत गाडून घेणे, श्वासोच्छ्वास चालू असला तरी जागृतीविहिन होणे, प्राणांन्त होणे इत्यादींनाही 'समाधी' म्हणतात. परंतु अशा समाधीशी 'सम्यक समाधीचा' काहीच संबध नाही. कोणत्याही एका चांगल्या विषयावर  चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक समाधी; स्वभावात मन / चित्त चंचल आहे यास्तव त्याला एकाग्र-चित्त करणे म्हणजेच समाधी होय. जेवढे पुण्यधर्म आहेत ते सर्व समाधिकडे घेऊन जाणारे आहेत. अशा तऱ्हेने समाधी प्रमुख आहे. समाधीचा अभ्यास केल्याने व समाधी लागण्यानेच खरे ज्ञान होते._

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ :*

*१) मिलिंद प्रश्न*

*२) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म*

*३) बोद्ध दर्शन*

*४) बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन*

*५) बौद्धधम्म जिज्ञासा*


*संकलन : महेश कांबळे*

*२५/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

उपासकांचे दहा गुण

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

              *_उपासकांचे दहा गुण_*


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               *_उपासकाच्या अंगी दहा सद्गुण असले पाहिजे, तरच तो योग्य उपासक बनू शकतो. ते दहा गुण असे -_*


*१)* उपासकाने आपल्या भिक्षुविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगावी

*२)* धर्माला सर्वश्रेष्ठ मानावे

*३)* भिक्षुस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये

*४)* धर्माचा लोप पावत आहे असे दिसून आल्यास धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी पराकाष्टेचे प्रयत्न केले पाहिजेत

*५)* तो त्रिरत्नाप्रति योग्य विचारसरणी ठेवीत असतो

*६)* असा उपासक केवळ जिज्ञासेपायी सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मतात न जाता धर्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो

*७)* असा उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो

*८)* तो शांतता प्रिय असतो

*९)* ऐकतेचा प्रशंसक असतो

*१०)* असा शिष्य केवळ धर्माचे दिखाऊ अवडंबर माजवीत नाही, तर तो यथार्थाने बुद्ध, धर्म व संघाचे ठाई त्याची नितांत श्रद्धा व निष्ठा असते.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*              

*संकलन : महेश कांबळे*

http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 23 October 2021

बौद्धधम्मासंबंधी चुकीचे समज

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   *_बौद्धधम्मासंबंधी चुकीचे समज_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


                 *_बौद्धधम्मासंबंधी चुकीच्या गोष्टी काही लोकांनी प्रचलित केलेल्या आहेत. त्या संक्षेपाने पुढील प्रमाणे :-_*

*१)* _*काही लोक म्हणतात की बौद्धधम्म हा धर्मच नव्हे ते केवळ एक तत्वज्ञान आहे* हा प्रश्न पाश्चात्य पंडितांनी मांडला आहे. *वस्तुतः बौद्धधम्म जेवढा तत्त्वज्ञानमय आहे, तेवढाच तो 'धर्म' या संज्ञेसदेखील पात्र आहे. एवढेच नव्हे तर, धर्म, नीती आणि तत्वज्ञान या तिहींचा यांत सुंदर संगम आहे.*_

             _तो ह्या सृष्टीचे स्वरूप आणि तिला चालना देणाऱ्या शक्तींचे ज्ञान करवितो. माणसाला त्याच्या अंतस्थ नितीतत्त्वांचे ज्ञान करवितो आणि त्याच्या उन्नतीच्या पराकाष्टेचा मार्ग दाखवितो. माणसाच्या गूढ नैतिक प्रवृत्तींवर प्रकाश टाकून, त्यांना जागृत करून, त्याला सन्मार्गाकडे घेऊन जातो._

             *_लोकांची ही धारणा आहे की, माणसाच्या ज्ञानेंद्रियांच्या आकलन शक्तीच्या मर्यादेपलीकडे जे अज्ञेय आहे, त्याचे आकलन करविणे, हेच धम्माचे कार्य होय. म्हणून ते ईश्वर, अलौकिक चमत्कार, ईश्वरी कृपा इत्यादींना धर्माशी जोडतात._*


*२)* _*बौद्धधम्म निरीश्वरवादी अर्थात नास्तिक आहे - ज्याच्या कृपेने वा इच्छेने हे सारे विश्व निर्माण झाले आहे, तो अस्तित्त्वांत आहे की त्याचा विनाश झाला आहे असा कोणी 'पुरुष', तो ईश्वर या अर्थाने बौद्धधम्म ईश्वराच्या अस्तित्वास नाकारतो.*_

                  _*बौद्धधम्म ख्रिश्चन लोकांच्याप्रमाणे पिता, पुत्र किंवा पवित्र आत्म्यास मानीत नाही.* तो संभोग काया, निर्माण काया आणि धम्मकायेस मानतो. बौद्धधम्म सांगतो की सृष्टीची निर्मिती किंवा क्षय ह्या गोष्टी अनादी आहेत. कोणत्याही समयी संपूर्ण सृष्टी नव्हे, परंतु तिचा एखादा भाग त्याच्या पूर्वसंचित कर्मानुसार नष्ट होऊन, त्या ठिकाणी नवीन भाग तयार होतो. *कर्मानुसार अनुबंधीत होणें, हेच सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण होय. कोण्या "ईश्वराच्या इच्छेमुळे" नव्हे.* याचा अर्थ कोण्या मूर्तीमान व्यक्तिरूप परमेश्वरास बौद्धधम्म मानीत नाही._

             _*भगवान बुद्धांनी ईश्वराला प्रसन्न करावयाच्या ब्राह्मणी धर्माने दाखविलेल्या मार्गाचा त्याग करून शील आणि नीतीयुक्त आचारणास प्राधान्य दिले. त्यामुळे तो धर्मच नव्हे, 'तो केवळ एक नास्तिक पंथ' आहे, असा आरोप बौद्धधम्मावर केला जातो. माणूस आपल्या सुख-दुःखाच्या कर्तृत्वाची जबाबदारी ईश्वरावर सोपवू इच्छितो, हे योग्य नाही. माणसाची एक स्वतंत्र इच्छाशक्ती आहे आणि आपल्या चांगल्या-वाईट कर्माना तो जबाबदार आहे.*_

                _दुसरे कारण असे की ईश्वर श्रद्धागम्य / श्रद्धेने जाणता येणारा आहे, असे इतर धर्म मानतात. परंतु बौद्धधम्म तिला अंधश्रद्धा समजून तिचा त्याग करतो. बौद्धधम्मामध्ये ज्ञानानेच श्रद्धेची जागा घेतलेली आहे. ह्या जगात दुःखे आहेत आणि त्या दुःखाचा नाश करायला पाहिजे आणि त्याचे उपाय मनुष्याच्या हाती आहेत. ह्यात ईश्वराचा संबंध कुठेही नाही. *बौद्धधम्माची मनुष्याच्या कर्तृत्वावर आस्था आहे, म्हणून त्याला 'नास्तिक' म्हणणे चुकीचे आहे.*_


*३)* _पुष्कळसे इतर धर्मीय म्हणतात - *बौद्धधम्म शून्यवादी आहे.* आदि शंकारांचार्यांचे मतसुद्धा असेच होते. परंतु भगवान बुद्धांनी शून्यवादाचा उपदेश कधीही केला नाही. *शून्यवादाचा अर्थ आहे - हे सारे विश्व, सर्वच सचेतन सृष्टी शून्यातून निर्माण झाली आणि त्यांचा विलयदेखील शून्यातच होईल.* परंतु भगवंतांनी सांगितलेले आहे की -_


_*सेय्यथापि भिक्खवे महासमुद्दो एकरसो लोणरसो, एकमेव खो भिक्खवे अयं धम्मो एकरसो विमुत्तिरसो ।। (उदान)*_

मराठी अर्थ : _*भिक्खुंनो! ज्याप्रमाणे महासागर एकरस असतो, म्हणजे संपूर्ण पाणी खारटच असते, त्याचप्रमाणे धम्मदेखील विमुक्ती-रसमय आहे.*_            

            _*याचा अर्थ असा होतो की, धम्म ही आध्यात्मिक वस्तू आहे आणि त्याचा उद्देश केवळ मुक्ती किंवा निर्माण आहे. हे निर्वाण ह्याच जन्मी मिळविल्या जाऊ शकते. निर्वाणाची स्थिती अत्यंत सुखमय असते. तिचे वर्णन करणे कठीण असते. तिला केवळ अनुभवानेच जाणता येऊ शकते. निर्वाण म्हणजे शून्यत्व नाही. त्याचा अर्थ अविद्येचा नाश होणे, राग - द्वेष - मोह यांचा नाश होणे, कामतृष्णा - भवतृष्णा आणि विभवतृष्णेचा नाश होणे.*_


*४)* _असे म्हटले जाते की, *बौद्धधम्म पूर्ण प्रकारे निराशावादी आहे; आणि दुःख भोगणे यांतच पुरुषार्थ आहे अशी शिकवण देतो.* हे पूर्णपणे चूक आहे. *बौद्धधम्म ह्या सत्याला उघड करून सांगतो की, जगात दुःखच दुःख आहे आणि त्यासोबतच त्या दुःखापासून मुकतो मिळविण्याचा मार्गदेखील दाखवितो. एवढेच नव्हे तर त्या मार्गावर चालणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे . तो मार्ग आहे मनाच्या शुद्धीकरणाचा मार्ग. हाच मार्ग आर्य - अष्टांगिक मार्ग होय.*_

              _भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले की जगातील दुःखापासून सुटका मिळवून घेण्यास देहदंडाचा, तपश्चर्येचा किंवा अरण्यात निवास करण्याचा मार्ग चुकीचा आहे. *भगवंतांनी मध्यममार्गाची शिकवण दिली - देहदंडाला पूर्णपणे समर्पित न होता किंवा पूर्ण वासनामय आणि तृष्णामय मार्गाचा अवलंब न करता, मनास विकृतीपासून दूर ठेवीत आणि त्यावर यथार्थ दृष्टीने अंकुश लावीत, अष्टांगिक मार्गाने गेल्याने दुःखापासून मुक्ती मिळू शकते.*_

             _भगवंतांनी ह्या गोष्टीस पुर्णतः उघड करून सांगितले की, दुःखाची उत्पत्ती कोण्या ईश्वराच्या प्रकोपामुळे होत नसते. दुःखे माणसाच्या स्वतःच्या अविद्येमुळे निर्माण होतात. माणसाला त्याच्या कर्माच्या अनुसार सुख किंवा  दुःखाचा अनुभव येतो. आपल्या दुःखापासून मुक्ती मिळविण्याची गुरुकिल्ली त्याच्या स्वतःजवळच असते आणि निराश व्हायची अजिबात गरज नाही. या उपदेशाद्वारे भगवंतांनी माणसाच्या मनात एक नवीन आशा, नवीन अपेक्षा आणि नवीन भवितव्याचा संचार केला आहे. हा आशावादी दृष्टिकोन आहे._


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ :*

*१) Buddhism & it's critics*

*२) बौद्ध धर्माचा साध्यंत इतिहास*

*३) बौद्धधम्म जिज्ञासा*


*संकलन : महेश कांबळे*

*२४/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Friday, 22 October 2021

परदेशात बौद्ध धम्माचा प्रसार

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
  
 *_परदेशात बौद्ध धम्माचा प्रसार_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
                
           _परदेशात *सर्वप्रथम बौद्ध धम्म श्रीलंकेमध्ये पोहोचला, ते इसवी सनापूर्वीचे २०६ वे वर्ष होते.* केवळ *ब्रह्मदेशच सुवर्णभूमी आहे असे नाही, तर जावा, सुमात्रा आदी देशांचा सर्व भुभागच प्राचीन "सुवर्ण-दीप" आहे.* भारतीयांनी ह्या प्रदेशाला सुवर्णभूमी किंवा सुवर्णद्वीप नाव ह्यासाठी दिले की, तेथील व्यापाराने त्यांना सर्वात जास्त लाभ होत असे. ते तेथे इतक्या जास्त संख्येने पोहोचले की, ह्या सर्व प्रदेशाला दुसरे नावच *हिंद-चीन* पडले ते जेथे जेथे स्वाभाविकपणे आपला धम्म आपल्याबरोबर घेऊन गेले. *६८४ इ. मध्ये बौद्ध राजा जयनाग विजय हा सुमात्राचा शासक होता.*_

👉🏽 _*यव द्वीप / जावा*_
                  _सुमात्रापासून पुढे यव द्वीप म्हणजे आजचे जावा होय इ.स. ४१४-१५ मध्ये भारतातून सिलोनमध्ये जाऊन तेथून परतताना *फाहियान पाच महिने यव द्विपामध्ये राहिला होता.* त्यावेळी जावामध्ये बौद्धधम्म अत्यंत ओजपूर्ण अवस्थेत अस्तित्वात होता._

👉🏽 _*बाली द्वीप*_
           _यवद्विपापुढे बाली द्वीप आहे. ७ व्या शताब्दीच्या उत्तरार्धात जेव्हा *ईचिडने* बाली द्विपाची यात्रा केली होती, तेव्हा त्याच्या लिखाणाच्या अनुसार बालीमध्ये बौद्धधम्माच्या *मूळ सर्वस्तीवाद निकाय* ह्याचा प्रचार होता._

👉🏽 _*बोर्निर्यों*_
            _यव द्विपाच्या पुढील प्रदेश *बोर्निर्योंसुद्धा* बौद्ध धम्मापासून अलिप्त राहू शकला नाही. ह्याचे प्रमाण तेथील वास्तुशिल्प आहे._

👉🏽 *_चंपा_*
           _हिंद-चीनचा एक प्रदेश *'चंपा'* नावाने प्रसिद्ध होता. ७ शतकाच्या उत्तरार्धात प्रवासी *ईचिड* चंपाविषयी लिहितो - ह्या देशात अधिकांश *बौद्ध आर्य-सम्मितीय निकायाचे आहे.* पण काही लोक *सर्वस्तीवादि-निकायाचे* आहेत. असे वाटते की, ९ व्या शतकापूर्वीच तेथे सर्वस्तीवादाचा प्रचार होता._

👉🏽 *_फुनान_*
              _चंपा प्रदेशाच्या पश्चिमेकडे एक दुसरा प्रदेश होता. त्याला चिनी लोक *'फुनान'* म्हणत असत. फुनानच्या समृद्धीच्या काळात सयामदेखील त्यात समाविष्ट झालेला होता. तेथील ४ थ्या शतकातील शिलालेखावरून स्पष्ट होते की, समुद्र किनाऱ्यावरही कित्येक बौद्ध केंद्रे होती._

👉🏽 _*कम्बोज / कंबोडिया*_
               _कम्बोज / कंबोडिया ह्या बौद्धधम्म आणि ब्राह्मण धर्म ह्यांचे जणूकाही विवादस्थळच होते. वर्णाश्रमधर्माची विजयपताका फडकविल्यानंतर बोद्ध धम्म टिकू शकला नाही. कम्बोज / कंबोडिया मधील जगप्रसिद्ध *अंगोर वट हा पूर्वीचा बौद्ध विहार होता.* कम्बोज / कंबोडियामध्ये बौद्धधम्माला पुष्कळच बरे-वाईट दिवस पाहावे लागले. *त्यावेळी तेथे स्थविरवाद स्थापन झाला होता.*_

👉🏽 _*सयाम / थायलँड*_
            _ब्रह्मदेशाच्या पूर्व भागाला आणि माया द्विपाच्या उत्तरेला सध्याचे *थायलँड* आहे, ज्याचे नाव पूर्वी *सयाम* असे होते. हे सांगणे कठीण आहे की, तेथे बौद्धधम्माचा प्रवेश कधी झाला मागील २००० वर्षांत काही काळ थायलंडमध्ये *महायान पंथ* प्रामुख्याने होता, तर काही काळ *स्थविरवाद* प्रमुख राहिला. *सध्या स्थविरवादि बौद्धधम्म तेथील राजकीय-धम्म आहे.*_
             
                 _बौद्धधम्माचा प्रचार *पश्चिम एशियामध्येही* झाला. *स्वेन - चाङच्या* वेळी समरकन्दमध्ये बौद्ध विहार होते. *बाख्तरचा बौद्ध विहार* अतिशय विशाल आणि प्रसिद्ध होता. भारताच्या उत्तर-पूर्वेला *काशगर, कुचा, खोतन, तुफिन वगैरे नगर आणि प्रदेशांतही बौद्धधम्म अजूनही अस्तित्वात आहे.* इ.स.च्या ३ ऱ्या शतकामध्ये *कुचा हे बौद्ध धम्माचे फार मोठे केंद्र होते.* तेथे १००० मंदिरे आणि विहार होते. विहार तर फारच सुंदर कलेचे माहेरघर होते. विद्याध्यायन करण्याकरिता परदेशातील विद्यार्थी भारतात येत असत._
             
👉🏽 _*युनानी / ग्रीक*_
                 _ग्रीक संस्कृती भारतीय संस्कृतीप्रमाणेच एक मोठी संस्कृती होती. नीतिशास्त्र, कला, व्यापार, राजनीती या सर्व क्षेत्रांमध्ये ती भारतीयांच्या मागे तर नव्हेच, परंतु मूर्तिकला, नाट्यकला यांसारख्या काही क्षेत्रांमध्ये त्यांची संस्कृती भारतीयांपेक्षाही सरस होती. नंद राजांच्या शेवटच्या राज्यकाळात सिकंदरने पंजाबवर चढाई केली. त्यावेळी जरी ग्रीक लोकांचे राज्यशासन सुदृढ झालेले नव्हते, तरीदेखील भारतामध्ये ग्रीक व्यापारी आणि सैनिक लाखोंच्या संख्येने वास्तव्य करू लागले होते. *त्या अभिमानी 'म्लेंछ' लोकांना भारतीय बनविण्याकरिता बौद्धांनीच पुढाकार घेतला होता. परकीय (यवन) मिनान्डर आणि शक कनिष्क यांच्यासारख्या प्रतापी राजांनी बौद्धधम्माचा स्वीकार केला त्या घटनेला आकस्मिक घटना म्हणता येणार नाही. एवढेच नव्हे तर जनपद आणि एकसत्ताक राज्य तसेच आर्य आणि म्लेंछ यांच्यातील अंतर नाहीसे करावयास बौद्ध धम्माची खूपच मदत झाली*_*सम्राट मिनान्डरचा* काळ प्रथम शताब्दीचा मानला जातो. *सम्राट मिनान्डरच्या निमंत्रणावरून आलेले तेथिल प्रथम बौद्धधम्म प्रचारक, भिक्खू मातङ व भिक्खू धम्मरत्न हे होते.

👉🏽 *_युरोपियन देशात बौद्ध धम्म_*
                _*सोव्हियत-रशियातील* कित्येक गणतंत्र राज्ये अशी आहेत की, जेथे बौद्ध धम्माची प्राचीन परंपरा आपापल्या स्वरूपांत कमी-अधिकपणे अजूनही विद्यमान आहेत. हल्ली इंग्लंड, जर्मनी, फ्रांस इ. सर्व देशांत बौद्धधम्माच्या प्रचाराचे कार्य चालू आहे._

👉🏽  *_कोरिया आणि जपान_*
               _चीनमधून *इ स ३७२ च्या साली बौद्धधम्म कोरियात पोहोचला.* कोरियामधून *इ स ५५२ मध्ये तो जपानमध्ये पोहोचला. ह्या देशामध्ये बौद्धधम्माचे महायानी रूपच अस्तित्वात आहे.* कित्येक जपानी भिक्खू धम्म प्रचाराचे कार्य अतिशय आवडीने करतात. भारतात व अमेरिकेत बौद्धधम्माच्या प्रचारास त्यांचा बराच हातभार लाभलेला आहे._

👉🏽 *_पूर्व एशिया आणि एशिया_*
            _इ स  ४ थ्या आणि ५ व्या शतकात बौद्धधम्म *इंडोचीन, चीन, फारमोसा, जावा, मंगोलिया, यार्कंन्द,  बॉक, बोखारा, अफगाणिस्तान येथे पसरला. पुढे श्रीलंकेमधून इ स  नंतर ४५० साली ब्रह्मदेशात पोहोचला. त्यांनतर क्रमाक्रमाने आराकान, कम्बोडिया व पेगुमध्ये तो पोहोचला.* अजूनही बौद्धधम्म तेथे प्रचलित असून तेव्हापासूनच बौद्धधम्म तेथील *राष्ट्रधर्म* झालेला आहे._

👉🏽 *_तिबेट_*
              _*तिबेटमध्ये बौद्धधम्माचा प्रचार ७ व्या शताब्दीमध्ये झाला.* तिबेट चिनपेक्षा भारताच्या अधिक जवळ असूनही तेथे बौद्धधम्माचा प्रचार उशिरा होण्याचे कारण मुख्यतः तेथील जातींची भटकीवृत्ती असावी, असे म्हटले जाते. *तिबेटी भाषेमध्ये बुद्ध-वचनाला 'कंजूर' म्हटले जाते. 'कं' चा अर्थ 'बुद्ध' आणि 'जूर' चा अर्थ 'शास्त्र'.* बौद्धधम्माचा प्रवेश झाल्यावर सुमारे १०० वर्षांनंतर तिबेटचा प्रसिद्ध विहार 'समये' निर्माण झाला. *शाक्य महापंडित आनंदध्वजांनी १३ व्या शतकात मंगोलियामध्ये जाऊन धम्मप्रचार केला त्यावेळी भारतात बौद्धधम्माचा दीप केवळ टिमटिमत होता.*_

👉🏽 *_मेक्सिको आणि अमेरिका_*
              _*इ स सनाच्या ५ व्या शताब्दीमध्ये पाच बौद्ध भिक्खू रशियाच्या उत्तर सीमेकडून कालक्रमना करीत कामश्चाटका द्वीपसमूहातून जात, पॅसिफिक महासागरांतून प्रवास करीत अलासकामार्गे अमेरिकेस पोहोचले आणि दक्षिणेस मेक्सिकोपर्यंत पोहोचले.* मेक्सिकोमधील मूळ रहिवाशांचे आचार-विचार बौद्धांशी मिळतेजुळते आहेत. मेक्सिकोमधील *'आगवे'* नावाच्या वृक्षापासून तयार केलेले कापड, तेथील राहण्याच्या चालीरीती, वस्त्र विणण्याच्या पद्धती, कागद तयार करावयाच्या पद्धती ई. वर्णन *चिनी प्रवासी ह्यूएन* कडून चिनमधील ५ व्या शताब्दीमधील *याना युआनच्या* कारकिर्दीतील वर्णनावरून माहिती मिळते._

👉🏽 *_ग्वाटेमाला_*
            _ग्वाटेमाला येथे *गौतम आणि शाक्य* ही दोन्ही नावे अनेक नावाशी मिळतीजुळती आहेत. *ग्वातिमाला हा "गौतमालय" शब्दाचा अपभ्रंश आहे.* त्यांच्या *पुरोहितास 'ग्वाटेमोट-विज'* म्हणतात. तो शब्द गौतम शब्दाशी संलग्न आहे. *यास्काका, शाकाटापेक, जाकाटलाम, शाकापुलास हे शब्द 'शाल्क' शब्दाशी संलग्न आहेत*. *पोलेस्के* येथे एक बुद्धमूर्ती आहे जिला *'शाकमोल' म्हणजे 'शाक्य मुनी'* म्हणतात. *कोलोरॅडो नदीच्या पात्रात* एक द्वीप आहे ज्याच्या एका पुरोहिताचे नाव *गौतुशाका (गौतम शाक्य)* असे आहे. येथे पुष्कळ बुद्धमूर्ती, भिक्खूमूर्ती, हत्तींचे पुतळे, चीनच्या पॅगोडा सारखी मंदिरे, स्तूप, विहार इ. पाहावयास मिळतात. *खरे म्हणजे तेथे हत्ती कधीच नव्हते, तरीपण हत्तींचे पुतळे बघावयास मिळतात._
                  *_या सर्व गोष्टीमुळे हे सिद्ध होते की १४०० वर्षांपूर्वी बौद्धभिक्खू अमेरिकेस गेले होते आणि त्यांनी तेथे धम्माचा प्रसार केला म्हणजे कोलंबसापूर्वी १००० वर्षांपूर्वीच बौद्ध भिक्खू तेथे पोहोचले होते._*
                  _ज्या देशात बौद्ध नाहीत तेथे आत्ता बौद्धधम्मास अनुकूल वातावरणाची लक्षणे दिसत आहेत. बौद्ध धम्माच्या प्रमुख ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध होत आहेत. अनेक लेख समालोचनांत, मासिकांत व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत आणि प्रतिष्ठित लेखकांद्वारे उत्कृष्ट प्रकारे संपादित पुस्तके नावाजलेल्या छापखान्यातून छापून निघत आहे. यांशिवाय बौद्धधम्मीयच नव्हे तर इतर प्राध्यापकांनीही जनतेसमोर वेळोवेळी बौद्धधम्मावर व्याख्याने देण्याचे कार्यक्रम पाश्चिमात्य देशांत सुरू केले आहेत. *जपानी भिक्खुंच्या 'शिन श्यु' ह्या संप्रदायाने होनोलुलु, सानफ्रान्सिस्को सॉक्रॉमेन्टो आणि अमेरिकेतील इतर ठिकाणी धम्मप्रसारांच्या कार्यामध्ये धम्मप्रसारक मंडळे स्थापित केलेली आहेत.* बौद्ध धम्मातील कर्माची व पुनर्जन्माची कल्पना पाश्चिमात्य देशांची मनाची पकड घेत आहे. मानवाच्या न्यायाविषयीच्या नैसर्गिक प्रवृत्तीला ही तत्त्वे सहजपणे पटणारी असल्यामुळे आणि ती अगदी योग्य असल्याचे त्वरित दृष्टीस येते, त्यामुळे त्यांचा झपाट्याने प्रसार व स्वीकार होत आहे._
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ :*
*१) Buddhist Discovery of America, Harper's Magazine for July 1901*
*२) Intelligent Man's Guide to Buddhism*
*३) बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन*
*४) Buddhist Catechism*
*५) बौद्ध धर्माचा साध्यंत इतिहास*
*६) बौद्धधम्म जिज्ञासा*

*संकलन : महेश कांबळे*
*२३/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Thursday, 21 October 2021

दसबल

 


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

_*दसबल*_

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

            _सम्यक संबुद्धाला दहा गोष्टींचे ज्ञान किंवा बळ प्राप्त झालेले असते.

*१)* बुद्ध स्थानाला स्थान समजून, अस्थानाला अस्थान असे यथार्थपणे जाणतात.
*२)* बुद्ध सर्वागामिनी प्रतिपदेला (मार्ग, ज्ञान) यथार्थ जाणतात.
*३)* बुद्ध भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळांत केलेल्या कर्माचे परिणाम ह्यांना स्थान आणि हेतुपूर्वक जाणतात. 
*४)* बुद्ध अनेक धातू (ब्रह्माण्ड), नाना धातू असलेल्या लोकांना (देवलोक वगैरे) यथार्थ जाणतात. (सर्वच ज्ञान एकेवेळी सदा सर्वदा उपलब्ध नसते, परंतु आवश्यकता भासल्यास त्यांचे ज्ञान त्यांना त्वरीतच होते.)
*५)* बुद्ध विविध प्रकारचे स्वभाव किंवा गुणधर्म असलेल्या प्राण्यांना जाणतात.
*६)* बुद्ध इतर प्राण्यांच्या इंद्रियांचे परत्व-अपरत्व (प्रबलता-दुर्बलता) ह्यांना यथार्थच जाणतात.
*७)* बुद्ध ध्यान, विमोक्ष, समाधी, समापत्तीचे मळ आणि व्यवदान (निर्मळ कारण) आणि त्यांचे उत्थान यांना समग्रपणे जाणतात.
*८)* बुद्ध आपल्या पूर्वजन्मींच्या घटनांचे स्मरण करू शकतात.
*९)* बुद्ध अमानवीय विशुध्द दिव्य चक्षूंद्वारे प्राण्यांचे उत्पन्न होणे, मरणे, स्वर्गलोकास प्राप्त होणे, यांचे दर्शन करू शकतात. (स्वर्ग लोक या पृथ्वीवरील आनंदमय अवस्थेला म्हणतात.)
*१०)* बुद्ध आश्रवांच्या क्षयामुळे आश्रवरहित (बंधनरहित) झाल्यामुळे चित्ताची मुक्ती आणि प्रज्ञेची मुक्ती ह्यांचा साक्षात्कार त्यांना घडतो.

               _भगवान प्रत्येक क्षणी संसारातील सर्वच गोष्टींचे ज्ञान स्वतःजवळ साठवून ठेवीत नसत. परंतु त्यांची सर्वज्ञता यातच होती की, ज्या क्षणी त्यांना कसलेही ज्ञान जाणावेसे वाटले, तर त्या विषयावर ध्यान केल्याबरोबर त्यांना त्याचे ज्ञान होत असे ह्यालाच *'आवर्जन-प्रतिबद्ध'* सर्वज्ञता म्हणतात.


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ :-*

*१) बोद्धधम्मावरील चार निबंध*

*२) बौद्धधम्म जिज्ञासा*

*संकलन : महेश कांबळे*

*२२/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


मार्गावरील वाटचाल

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*_मार्गावरील वाटचाल_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

                 _उत्तर भारतातील श्रावस्ती या शहरी भगवान बुद्धांचे फार मोठे साधना केंद्र होते. खूप लोक तेथे ध्यानासाठी व धर्मावरील व्याख्याने ऐकण्यासाठी येत असत. ही व्याख्याने ऐकून एक तरुण रोज संध्याकाळी होणाऱ्या धर्मचर्चेसाठी पण येत असे. वर्षानुवर्षे हा क्रम चालू होता. *बुद्धांची व्याख्याने तो नियमितपणे श्रवण करीत असे. पण ती त्याने कधीही व्यवहारात आणली नव्हती.*_
                     _काही वर्षांनी एकदा हा तरुण, व्याख्यानासाठी नेहमीपेक्षा जरा लवकर आला. तेव्हा बुद्धांना एकटे बसलेले बघून तो त्यांना भेटला व म्हणाला, "गुरुवर्य, मला एक प्रश्न सतत सतावत असतो व माझ्या मनात शंका निर्माण करीत असतो."_
          _'हो का! धर्माच्या मार्गावर चालताना कोणत्याही प्रकारची शंका राहता उपयोगाची नाही, ती निरसन करून घ्या. कोणता प्रश्न आहे तुम्हाला?'_
                _'गुरुवर्य! अनेक वर्षे मी आपल्या व्याख्यानाला येतो आहे. मी बघतो आहे की, आपल्या सभोवताली घरदार सोडून आलेले बरेच भिक्षु, भिक्षुनी व बऱ्याच मोठ्या प्रमाणात सामान्य संसारी स्त्री-पुरुषही येतात. मी वर्षानुवर्षे त्यांना बघतो आहे. त्यातील काहींना नक्कीच निर्वाणाचा साक्षात्कार झालेला असणार हे मला जाणवते आहे. काहींची तर या मार्गावर बरीच प्रगती झालेली मी स्वतः बघतो आहे. काहींना निर्वाणाचा साक्षात्कार झालेला नसला तरी, त्यांच्या आयुष्यात बराच बदल झालेला दिसतो आहे, आणि गुरुवर्य, त्याचबरोबर मी असगी बरीच माणसे बघतो आहे की, त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही. त्यांच्यात माझाही समावेश आहे. काही तर चक्क घसरलेले दिसतात. त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही किंवा चांगला बदल होण्याची चिन्हेही दिसत नाहीत. गुरुवर्य, हे असे का व्हावे? *आपल्यासारख्या सामर्थ्यशाली, निर्वाणाचा साक्षत्कार झालेला महापुरुष, करूणहृदय संत त्यांना मार्गदर्शक लाभला असताना असे का व्हावे? आपण आपले सामर्थ्य व करुणा यांचा उपयोग करून त्यांना मुक्त का करीत नाही?*'_
                 _भगवान बुद्धांनी हसत त्या तरुणाला विचारलं, 'आपण राहता कुठे? आपले मूळ गाव कोणते?'_
            _'गुरुवर्य, मी या कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती येथेच राहतो.'_
               _'हो पण, आपल्या चेहरेपट्टीवरून आपण या प्रदेशातले रहिवासी वाटत नाहीत. मग आपण मूळचे कुठले?'_
            _'गुरुवर्य, मी मूळचा मगध देशाची राजधानी राजगिरि येथील आहे. काही वर्षांपूर्वीच मी श्रावस्ती येथे येऊन स्थायिक झालो आहे.'_
              _'मग काय आपण राजगिरीचे संबंध तोडून टाकलेत का?'_
           _'नाही गुरुवर्य, माझे अनेक नातेवाईक तेथे आहेत, माझा मित्रपरिवार तेथे आहे आणि माझा व्यापारपण तेथे आहे.'_
           _'मग नक्कीच श्रावस्तीहून अनेकदा राजगिरीस जात असणार?'_
           _'हो गुरुवर्य, वर्षातून अनेकदा राजगिरीस जातो व श्रावस्तीला परत येतो.'_
              _'अनेकवेळा एकाच रस्त्याने राजगिरीस जाऊन, त्याच मार्गाने परत श्रावस्तीला आल्यामुळे, ह्या मार्गाची आपल्याला खंडान खडा माहिती झालेली असणार! हो ना?'_
               _'होय गुरुवर्य, मला हा मार्ग पुर्णपणे पाठ आहे. मी जरी डोळे झाकून या मार्गाने गेलो तरी तो अचूक सांगू शकेन असे म्हटले तर वावगे होणार नाही, कारण इतक्या वेळा मी या रस्त्यावरून आलो गेलो आहे.'_
            _'आणि आपल्या अनेक मित्रांना तुम्ही राजगिरीहून येऊन येथे स्थायिक झालात हे नक्कीच माहीत असणार! तुम्ही नेहमीच येथून राजगिरीस जाता व येथून राजगिरीला जाण्याचा मार्ग ही तुम्हाला चांगलाच माहीत आहे, ह्याचीही त्यांना चांगली कल्पना असणार! होय ना?'_
           _'होय गुरुवर्य, माझे सगळे जवळचे मित्र, नातेवाईक हे जाणून आहेत की, मला राजगिरीला जाणाऱ्या रस्त्याचे पूर्ण ज्ञान आहे.'_
           _'मग ज्या वेळेला ह्या मंडळींना राजगिरीला जायचे असते, तेव्हा ती या मार्गाबद्दल तुम्हाला नक्कीच विचारत असतील, तेव्हा तुम्ही काही गोष्टी लपवून ठेवता का? की हा मार्ग त्यांना समजेल अशा स्पष्टपणे समजावून सांगता?'_
              _'त्यात लपवण्यासारखे आहे काय गुरुवर्य! मी तर त्यांना मला शक्य आहे तितक्या स्पष्टपणे समजावून सांगतो. तुम्ही पूर्वेकडे चालायला सुरुवात केलीत म्हणजे बनारसला पोहोचाल, तसेच पुढे गेलात म्हणजे गया येथे पोहोचाल व तसेच पुढे गेलात की राजगिरि येथे जाल. असे अगदी साध्या व समजेल अशा शब्दांत मी त्यांना सांगतो.'_
                _'आणि ज्यांना ज्यांना तुम्ही स्पष्ट व समजेल अशा शब्दांत हा मार्ग दाखवता ते सर्व राजगिरीस जाऊन पोहोचतात का?'_
                  _गुरुवर्य, हे सांगणे जरा अवघड आहे. जे जे हा मार्ग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी सांगितला आहे त्याचप्रमाणे चालतात, तेच राजगिरीला पोहोचू शकतील.'_
             _'*तरुण गृहस्था! हेच तर मला तुला सांगायचे आहे. अनेक लोक मी येथून निर्वाणापर्यंत जाऊन आलो आहे, मला हा मार्ग पुर्णपणे माहीत आहे म्हणून माझ्याकडे येतात. निर्वाणापर्यंत, मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता, म्हणून मला विचारतात आणि त्यात लपवण्यासारखे काय आहे? मी त्यांना स्पष्टपणे "हाच तो मार्ग" म्हणून सांगतो! जर कोणी नुसतेच आपले डोके हलवीत म्हणाला, छान! फारच छान! फारच कल्याणकारी मार्ग! फारच छान मार्ग आहे! पण मी त्यावर एक पाऊलही चालणार नाही! त्यावर चालण्याचा त्रासही घेणार नाही! तर मग अशी माणसे हे उद्दिष्ट, ध्येय कसे बरे गाठू शकतील?*'_
              _'*मी कोणालाही ह्या अंतिम ध्येयापर्यंत माझयाया खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही. कोणीही कोणालाही अंतिम उद्दिष्टापर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही. फार तर अत्यंत प्रेमाने व करुणेने म्हणता येईल, 'होय, हाच तर्क मार्ग' आणि अशा प्रकारे मी या मार्गावर चाललो, तुम्हीपण या मार्गाचा अवलंब करा. त्यावर चाला म्हणजे अंतिम उद्दिष्टांपर्यंत नक्कीच पोहोचाल.*'_
            _*'प्रत्येक माणसाला स्वतःलाच या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे. एक एक पाऊल उचलले पाहिजे. जे जे या मार्गावर एक पाऊल चालले, ते आपल्या उद्दिष्टाच्या एक पाऊल जवळ गेले आहेत. ज्यांनी या मार्गानी शंभर पावले पुढे टाकली, ते उद्दिष्टाच्या शंभर पावले जवळ आले आहेत. ज्यांनी हा सर्व मार्ग पादाक्रांत केला, त्यांनी अंतिम ध्येय गाठले. महत्वाचे म्हणजे, तुम्हाला स्वतःच या मार्गावर चालले पाहिजे.'*_

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ : जगण्याची कला*

*संकलन : महेश कांबळे*

*२२/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Wednesday, 20 October 2021

करणीय मेत्त सुत्तं

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*_करणीय मेत्त सुत्तं / कर्तव्यदक्ष मैत्री सूत्र_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

यस्सानुभावतो यक्खा, नेव दस्सेन्ति भिंसनं ।
यम्हि चे वानुयुञ्जन्तो, रत्ति दिवं अतन्दितो ।
सुखं सुपति सुत्तो च, पापं किञ्चि न पस्सति ।
एवं आदिगुणोपेतं, परित्तं तं भणामहे ।।
     
                _ज्याच्या प्रभावामुळे यक्ष हिंसेचे प्रदर्शन करीत नाहीत, ज्याचे रात्रंदिवस दक्षतेने पालन न केल्याने माणूस सुखाने झोपू शकतो व झोपेत काहीही वाईट स्वप्ने पाहात नाही, अशा प्रकारचे गुण धारण करणाऱ्या रक्षण सूत्रांचे आम्ही पठन करीत आहोत._

करणीयमत्थ कुसलेन,
यं तं सन्तं पदं अभिसमेच्च ।
सक्को उजू च सुजू च,
सुवचो चस्स मुदु अनतिमानी ।।१।।
           
               _*स्वहित साधण्यात कुशल / आत्मविश्वास माणसाने निर्वाणाच्या शांत पदाची प्राप्ती ज्ञानमार्गाने प्राप्त करून घेण्यासाठी समर्थ, ऋजुमार्गी, गोड बोलणारा, मृदू आणि निरभिमानी / निगर्वी असावे / व्हावे.*_

सन्तुस्सको च सुभरोच,
अप्पकिच्चोच सल्लहुकवुत्ति ।
सन्तिन्द्रियो च निपको च,
अप्पगब्भो कुलेसु अनुगिध्दो ।।२।।
              
           *_तो संतोषी, भरणपोषण करण्यास सुलभ, अधिक उलाढाल्या न करणारा, साधेपणाने वागणारा, शांत इंद्रियांचा, हुशार, अप्रगल्भ व कुटुंबाविषयी जास्त लोभ न बाळगणारा असावा._*

न च खुद्दं समाचरे किञ्चि,
येन विञ्ञू परे उपवदेय्युं ।
सुखिनो वा खेमिनो होन्तु,
सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता ।।३।।
             
              *_ज्या कारणाने सुज्ञ माणसे इतरांना दोष देतात, असे क्षुद्र आचरण त्याने करू नये, सर्व प्राणी सुखी, भयमुक्त व आनंदित होवोत._*

ये केचि पाणभूतत्थि,
तसा वा थावरा व अनवसेसा ।
दीघा वा ये व महन्ता वा,
मज्झिमा रस्सकाणुकथूळा ।।४।।

             *_या जगात जे कोणी चर / जंगम किंवा स्थावर, लांब किंवा मोठे, मध्यम आकारांचे, लहान आकारांचे, सूक्ष्म आणि स्थूल प्राणी......_*

दिट्ठा वा येव अदिट्ठा,
येचदूरे वसन्ति अविदूरे ।
भूता वा सम्भवेसी वा,
सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता ।।५।।

               *_जे दृष्टीस पडणारे किंवा दृष्टीस न पडणारे असतात, जे दूर राहणारे किंवा जवळ राहणारे असतात, जे उत्पन्न झालेले / जन्मास आलेले किंवा उत्पन्न होणारे / जन्मास येणारे असतात, ते सर्व प्राणी आनंदात / सुखात राहोत._*

न परो परं निकुब्बेथ,
नातिमञ्ञेथ कत्थचिनं कञ्चि ।
ब्यारोसना पटिघसञ्ञा,
नाञ्ञमञ्ञस्स दुक्खमिच्छेय्य ।।६।।

           *_माणसे एकमेकांना न फसवोत, ते कोठेही एकमेकांची अवज्ञा न करोत / अपमान न करोत, ते रागामुळे किंवा द्वेष बुद्धीने एकमेकांना दुःख देण्याची इच्छा न करोत._*

माता यथा नियंपुत्तं,
आयुसा एकपुत्त मनुरक्खे ।
एवम्पि सब्ब भूतेसु,
मानसं भावये अपरिमाणं ।।७।।

             *_ज्याप्रमाणे आई आपल्या स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राचे आपले आयुष्य / आपला जीव धोक्यात घालूनही रक्षण करते, त्याचप्रमाणे माणसाने सर्व प्राणिमात्रांविषयी अमर्याद प्रेम बाळगावे._*

मेत्तं च सब्ब लोकस्मिं,
मानसं भावये अपरिमाणं ।
उद्धं अधो च तिरियञ्च
असम्बाधं अवेर असपत्तं ।।८।।

              *_माणसाने अखिल जगातील प्राण्यांविषयी वर आकाशात, खाली पाताळात व चोहोबाजूला निवास करणाऱ्या सर्व प्राणिमात्रांविषयी वैरभावविरहित, शत्रुत्वहीन मैत्रीची अमर्याद भावना वाढवावी._*

तिट्ठं चरं निसिन्नोवा,
सयानो वा यावतस्स विगतमिद्धो ।
एतं सतिं अधिट्ठहेय्य,
ब्रम्हमेतं विहारं इधमाहु ।।९।।

                 *_माणसाने उभे असण्याच्या स्थितीत, चालत असतांना, बसलेला असतांना, अथवा अंथरुणात पहुडलेल्या स्थितीत असतांना, जोपर्यंत तो निद्रावश झालेला नसतो, तोपर्यंत ही मैत्री भावनेची स्मृती कायम ठेवावी. ह्या स्मृतीलाच इहलोकी ब्रह्मजीवन म्हणतात._*

दिट्ठिञ्च अनुपगम्म,
सीलवा दस्सनेन सम्पन्नो ।
कामेसु विनेय्य गेधं,
न हि जातु गब्भसेय्यं पुनरेतीति ।।१०।।

                *_माणसाने मिथ्या दृष्टीचा अवलंब न करता, शीलवान व ज्ञानसंपन्न होऊन, कामसुखाविषयीच्या आसक्तीचा त्याग केल्यास त्याला खात्रीने पुनर्जन्म प्राप्त होत नाही._*

          

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ : खुद्दकनिकाय - खुद्दकपाठ*

*संकलन : महेश कांबळे*

*२१/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

दस पारमिता

 🌷 आओ, दस पारमिताओं को समझे 🌷 


"दानं शीलं च नेक्खमं, वीरियं पञ्ञा च पंचमं ।

खन्ति मेत्ता अधिट्ठानं, सच्च उपेक्खा च दसमं ॥" 


[ दान, शील, निष्क्रमण, वीर्य, प्रज्ञा 

  क्षांति, मैत्री, अधिष्ठान, सत्य, उपेक्षा ] 


दस पारमिताएं हैं जिन्हें हर एक को अंतिम लक्ष्य की प्राप्ति के लिए पूरा करना अनिवार्य है। अंतिम लक्ष्य है अहंकार, ममकार से शून्य होना । दस पारमिताएं ऐसे गुण हैं जिन्हें बढ़ाकर, पूरा कर मनुष्य अपने अहं को मिटा सकता है और अहं को मिटाकर ही मनुष्य मुक्ति या मोक्ष या निर्वाण के निकट पहुंचता है। विपश्यना शिविर में इन दस पारमिताओं को विकसित करने का अवसर मिलता है। 


🌷 नैष्क्रम्य अर्थात निष्क्रमण 🌷 


पहली पारमिता है नैष्क्रम्य अर्थात निष्क्रमण । जो व्यक्ति भिक्षु या भिक्षुणी बनता है वह गृहस्थ का जीवन त्याग कर बनता है, उसके पास अपना कुछ भी नहीं होता। उसे अपना भोजन भी भिक्षा मांगकर करना होता है। यह सब कुछ किया जाता है अपने अहंकार, ममकार को मिटाने के लिए। यह गुण एक गृहस्थ कैसे विकसित कर सकता है? ऐसे शिविरों में आकर उसे, इसे विकसित करने का अवसर प्राप्त होता है। 


चूंकि यहां उसे दूसरे के दान पर निर्भर रहना पड़ता है। जैसा भोजन मिला, जैसी रहने की जगह मिली और जैसी अन्य सुविधाएं मिली उन्हें स्वीकार कर वह संन्यास या नैष्क्रम्य का गुण विकसित करता है। यहां जो भी प्राप्त होता है उसका वह सदुपयोग करता है और बहुत परिश्रम कर अपने चित्त को निर्मल बनाता है, सिर्फ अपने हित के लिए नहीं बल्कि उस अनजान व्यक्ति के लिए भी जिसने उसके लिए दान दिया। 


🌷 शील 🌷 


दूसरी पारमिता है शील | सब समय शिविर के दौरान तथा दैनंदिन जीवन में पांच शिक्षापदों का पालन कर वह इस गुण को विकसित करता है। गृहस्थ जीवन में शील पालन करने में बहुत-सी कठिनाइयां आती हैं। लेकिन यहां विपश्यना के दौरान शील भंग करने का अवसर ही नहीं आता, क्योंकि यहां बड़ा ही व्यस्त कार्यक्रम है और यहां का अनुशासन बड़ा ही कड़ा । बात-चीत करने में शीलभंग का अवसर आ सकता है। इस कारण प्रथम नौ दिनों के लिए मौनव्रत धारण किया जाता है इस तरह कम से कम शिविर के दौरान किसी को शीलपालन करने में कठिनाई नहीं होती। 


🌷 वीर्य 🌷 


तीसरी पारमिता है वीर्य की। वीर्य का अर्थ प्रयत्न होता है। दैनंदिन जीवन में जीविकोपार्जन के लिए मनुष्य प्रयत्न करता है परंतु यहां जो प्रयत्न किया जाता है वह चित्त शुद्धि के लिए तथा स्मृतिमान और सम्प्रज्ञ रहने के लिए किया जाता है। यह सम्यक प्रयत्न है जो मुक्ति की ओर ले जाता है। 


🌷 प्रज्ञा 🌷 


चौथी पारमिता है प्रज्ञा की पारमिता। बाहरी दुनिया की जो प्रज्ञा है वह पुस्तकें पढ़कर या दूसरों की बातें सुनकर प्राप्त की जाती है। यह सिर्फ चिंतन मनन से प्राप्त प्रज्ञा है। सच्ची प्रज्ञा पारमिता वह है जो अपने अन्दर विकसित होती है। ध्यान करते समय स्वानुभव से प्राप्त अनित्य, दुःख तथा अनात्म के आत्म- निरीक्षण से प्राप्त प्रत्यक्ष ज्ञान ही प्रज्ञा है। सत्य के इस प्रत्यक्ष अनुभव से मनुष्य दुःख से मुक्त हो जाता है। 


🌷 क्षांति 🌷 


पांचवी पारमिता क्षांति की पारमिता है। क्षांति का अर्थ सहिष्णुता है। ऐसे शिविर में जहां किसी को समूह में रहना पड़ता है, हो सकता है उसे दूसरे व्यक्तियों के कार्य-कलाप अच्छे न लगें और वह चिड़चिड़ा अनुभव करे। लेकिन शीघ्र ही उसे यह बोध होता है कि दूसरा जो कुछ कर रहा है वह निर्बोध है, जान-बूझकर नहीं कर रहा है या रोगी है। यह सोचकर उसकी चिड़चिड़ाहट जाती रहती है और उस व्यक्ति के प्रति उसके मन में प्रेम और करुणा उमड़ती है। इस तरह वह व्यक्ति क्षांति विकसित करने के पथ पर आरूढ़ हो जाता है। 


🌷 सत्य 🌷 


छठी पारमिता है सत्य की पारमिता । शील पालन कर कोई वाचसिक धरातल पर सत्य बोलने के ब्रत का पालन करता है। लेकिन सत्य बोलना सिर्फ ऊपरी-ऊपरी नहीं होना चाहिए, बल्कि इसका अभ्यास एक गहरे अर्थ में करना चाहिए। मार्ग पर उठाया गया एक-एक कदम सत्य पर आधारित होना चाहिए, चाहे सत्य स्थूल हो या सूक्ष्म या परम सत्य । यहां कल्पना की गुंजाइश नहीं है। वर्तमान में जो सच्चाई है, प्रत्यक्ष अनुभूत हो रही है, उसी के साथ सदा रहना चाहिए। 


🌷 अधिष्ठान 🌷 


सातवीं पारमिता अधिष्ठान की है। अधिष्ठान का अर्थ दृढ़संकल्प है। जब कोई विपश्यना शिविर में बैठता है तो दृढ़ संकल्प करता है कि वह शिविर पूरा करके ही उठेगा, बीच में नहीं छोड़ेगा। शिक्षा पदों के पालन करने का दृढ़ संकल्प करता है, आर्य मौन पालन करने का, अनुशासन में रहने का दृढ़ संकल्प करता है। 


जब विपश्यना दी जाती है तो वह दृढ़ संकल्प करता है कि सामूहिक साधना के दौरान वह एक घंटे तक बिना आंख खोले तथा बिना हाथ और पैर को खोले एक आसन में पूरे एक घंटे तक साधना करेगा। बाद में यह पारमिता बड़े महत्त्व की होती है। जब कोई निर्वाण का साक्षात्कार करने के निकट होता है तो उसे बिना, हिले-डुले निर्वाण की प्राप्ति तक बैठे रहने के लिए दृढ़ संकल्पित होना चाहिए। 


🌷 मैत्री 🌷 


आठवीं पारमिता है मैत्री की पारमिता। मैत्री का अर्थ है शुद्ध और निःस्वार्थ प्रेम । अतीत में किसी ने दूसरों के प्रति प्रेम और सद्भाव रखने की कोशिश की लेकिन यह सिर्फ चेतन चित्त के स्तर पर संभव हुआ। अचेतन मन में पुराना वैर ज्यों का त्यों रहा । जब किसी का सारा मन, चेतन तथा अचेतन मन विकारों से रहित हो जाता है तब उसे पूरे शुद्ध मन से दूसरे के सुख की कामना करनी चाहिए। यह सच्चा प्रेम है। यह अपना हित तो करता ही है, दूसरों का भी करता है। 


🌷 उपेक्षा 🌷 


नौवीं पारमिता उपेक्षा पारमिता है। कोई स्थूल तथा अप्रिय संवेदनाओं को अनुभव करते हुए ही तटस्थ नहीं रहता, शरीर के उन अंगों का निरीक्षण करते हुए, जहां कोई संवेदना नहीं मिलती तब भी तटस्थ नहीं रहता बल्कि तब भी तटस्थ रहता है जब सारे शरीर में उसे सूक्ष्म एवं प्रिय संवेदनाएं अनुभूत होती हैं। हर स्थिति में वह जानता है कि उस क्षण का अनुभव अनित्य है और यह उत्पन्न हुआ है जाने के लिए। ऐसा अनुभव कर वह तटस्थ रहता है, उपेक्षा भाव जगाता है। 


🌷 दान 🌷 


अंतिम पारमिता दान की पारमिता है। गृहस्थ के लिए तो यह धर्म पथ पर चलने के लिए प्रथम आवश्यक कदम है। गृहस्थ का यह कर्त्तव्य है कि वह सम्यक रूप से आजीविका अर्जित कर अपने और उस पर निर्भर रहने वाले औरों का भरण-पोषण करे। लेकिन अपने अर्जित धन पर वह जब लोभ पैदा करता है तो वह अहंकार विकसित करता है। इसलिए अपनी कमाई का एक भाग दूसरे की भलाई में अवश्य दिया जाना चाहिए। 


अगर वह ऐसा करता है तो वह अहंकार पैदा नहीं करेगा, चूंकि वह समझता है कि धनार्जन सिर्फ अपने लिए नहीं औरों के लिए भी किया जाता है। दूसरों की चाहे जिस तरह से हो, सहायता करने की उसकी चेतना जगती है। और वह स्वानुभव से यह समझने लगता है कि औरों की सबसे बड़ी सहायता वही होती है जो उसे दुःख से मुक्त करता है।

🌸🌸🌸 


ऐसे शिविरों में पारिमिताएं पूरा करने का स्वर्णिम अवसर मिलता है। जो कुछ भी किसी को यहां प्राप्त है वह दूसरों का दिया गया दान है। न तो रहने-खाने का पैसा लगता है और न तो विद्या सिखाने की फीस देनी पड़ती है। बदले में यहां दूसरों के लिए दान देने का अवसर मिलता है। दान मनुष्य की आर्थिक शक्ति के अनुपात में कम या अधिक हो सकता है। 


स्वभावतः एक धनी व्यक्ति अधिक दान देने की इच्छा करेगा, लेकिन शुद्ध चेतना से दी गयी छोटी राशि भी दान पारमिता विकसित करने में बहुमूल्य होगी। बदले में कुछ भी पाने की, बिना आशा रखे कोई इस चेतना से दान देता है कि उसकी तरह दूसरे भी धर्म से होने वाले लाभ को प्राप्त करें और दुःख से मुक्त हों। 


यहां आपको सभी दस पारमिताओं को विकसित करने का सुअवसर प्राप्त होता है। जब आप इन सभी दस पारमिताओं को पूरा कर लेंगे तो अंतिम लक्ष्य की प्राप्ति कर लेंगे। इन्हें थोड़ा-थोड़ा विकसित करने का अभ्यास करते रहें। धर्म पथ पर प्रगति करते रहें, सिर्फ अपने कल्याण और मुक्ति के लिए नहीं, बल्कि बहुतों के कल्याण तथा मुक्ति के लिए। 


सभी दुःखी प्राणियों को शुद्ध धर्म मिले और वे सभी मुक्त हों।

 🙏🙏🙏


✍ श्री सत्य नारायण गोयनका जी 

पुस्तक: प्रवचन सारांश । 

विपश्यना विशोधन विन्यास ।। 

भवतु सब्ब मंगलं !!

🙏🙏🙏

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...