🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_अधम्म_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ :*
*१) The Buddha & His Dhamma*
*२) बौद्धधम्म जिज्ञासा*
*संकलन : महेश कांबळे*
*३१/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_अधम्म_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ :*
*१) The Buddha & His Dhamma*
*२) बौद्धधम्म जिज्ञासा*
*संकलन : महेश कांबळे*
*३१/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*भगवान बुद्ध आणि कमलपुष्प*
*Buddha and Lotus Flower*
या पृथ्वीतलावर भगवान बुद्धांचे शिल्प किंवा प्रतिमा ही नेहमीच कमळावर म्हणजेच पद्मावर आसनस्थ दाखविली जाते. कारण कमलपुष्प आणि बुद्धरूप यांचा अतूट बंध आहे. पद्म विरहित बुद्धमूर्ती सुद्धा असतात. पण जी शुद्धता, पवित्रता कमलपुष्पाने दृग्गोचर होते तशी परिमाणकता पद्म विरहित बुद्धमूर्तीत साधली जात नाही. किंवा अशी बुद्धमूर्ती कमलपुष्प शिल्प किंवा प्रतिमेत ठेवली तरी चालते. मात्र जर बुद्धमूर्ती दुसऱ्या कुठल्या पुष्पात विराजमान केली असेल तर त्या शिल्पकाराला किंवा चित्रकाराला बुद्धांविषयी बिलकूल ज्ञान नाही असे खुशाल समजावे. भगवान बुद्ध आणि कमलपुष्प यांचा काय संबंध आहे हे बऱ्याच भारतीयांना अद्याप ज्ञात नाही. चला तर स्वतः भगवान बुद्धांनी 'बुद्ध आणि कमलपुष्प' यांचा परस्पर काय संबध आहे याबद्दल एका सुत्तात सांगितले आहे ते पाहूया.
एके समयी भगवान उक्कठ्ठ आणि सेतव्य या गावांनां जोडणाऱ्या रस्त्याने जात होते. त्याचवेळी एक द्रोण ब्राह्मण सुद्धा त्याच रस्त्याने चालला होता. तेव्हा द्रोण ब्राह्मणाने जमिनीवर उठलेले पायाचे ठसे पाहिले. या ठशांवरती आऱ्यासहित, धावेसहित व नाभिसहित परिपूर्ण चक्र असल्याचे त्यास दिसले. ते पाहून त्यास आश्चर्य वाटले. हे अद्भुत आहे. हे माणसाचे पायाचे ठसे नसावेत असे त्याला वाटले. त्याचवेळी भगवान बुद्ध रस्ता सोडून एका वृक्षाखाली आसनस्थ होऊन शरीर सरळ ठेवून जागृत बसले असताना द्रोण ब्राह्मण भगवंतांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत तेथे आला. त्याने भगवंतांना एका वृक्षाखाली प्रसन्न, शांत, दमन-शमनयुक्त, अलिप्त, शुद्ध आणि निर्वाणयुक्त मुद्रेत पाहिले. तेव्हा तो आदराने भगवान बुद्ध यांच्या जवळ गेला व म्हणाला..
'आपण देव असाल ?'
'ब्राह्मण मी देव नाही.'
'आपण गंधर्व असाल ?'
'ब्राह्मण मी गंधर्व नाही.'
'आपण यक्ष असाल ?'
'ब्राह्मण मी यक्ष नाही.'
'आपण मनुष्य असाल ?'
'ब्राह्मण मी मनुष्य नाही ?'
तेव्हा द्रोण ब्राह्मण बुचकळ्यात पडला. तो पुढे म्हणाला 'आपण देव असाल' असे विचारल्यावर म्हणता, हे ब्राह्मण ! मी देव नाही, 'आपण गंधर्व असाल' असे विचारल्यावर म्हणता 'हे ब्राह्मण ! मी गंधर्व नाही', 'आपण यक्ष असाल' असे विचारल्यावर म्हणता 'हे ब्राह्मण ! मी यक्ष नाही', 'आपण मनुष्य असाल' असे विचारल्यावर म्हणता 'हे ब्राह्मण ! मी मनुष्य नाही', तर मग आपण कोण आहात ?
तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले 'हे ब्राह्मण ! ज्या आस्त्रवांच्या असण्यामुळे मला 'देव' म्हटले जाऊ शकले असते ते माझे आस्रव समूळ नाश पावलेले आहेत, तोडलेल्या ताड वृक्षाप्रमाणे झालेले आहेत, अभाव प्राप्त झालेले आहेत, भविष्यात उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही. हे ब्राह्मण ! ज्या आस्त्रवांच्या असण्यामुळे मला 'गंधर्व' म्हटले जाऊ शकले असते, 'यक्ष' म्हटले जाऊ शकले असते, 'मनुष्य' म्हटले जाऊ शकले असते, ते माझे आस्रव समूळ नाश पावले आहेत, तोडलेल्या ताड वृक्षाप्रमाणे झाले आहेत, अभाव प्राप्त झालेले आहेत, भविष्यात उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही. ब्राह्मण ! ज्याप्रमाणे उत्पल असते, पद्म असते वा पुंडरीक असते, ते पाण्यात उत्पन्न होत असते. पाण्यात वाढत असते परंतु ते पाण्यापासून अलिप्त राहुन पाण्याच्या वर असते. त्याचप्रमाणे ब्राह्मणा ! मी जगात उत्पन्न झालो आहे, जगात वाढलेला आहे, परंतु या विकारयुक्त जगाला जिंकून त्यापासून अलिप्त राहून विहार करीत असतो. अरे ब्राह्मणा ! मला 'बुद्ध' समज.
याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे सुंदर कमलपुष्प पाण्याने या जगात लिप्त होत नाही त्याचप्रमाणे 'बुद्ध' सुद्धा विकारयुक्त दलदलीच्या जगामध्ये वावरून विकार लिप्त होत नाहीत. सर्वांपासून ते अलिप्त आहेत. म्हणूनच ते बुद्ध आहेत. यामुळेच बुद्धांची प्रतिमा साकारताना, त्यांचे शिल्प साकारताना पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून ते कमलपुष्पावरती साकारले जाते.
( संदर्भ :- अंगुत्तर निकाय - द्रोण सुत्त )
--- संजय सावंत ( www.sanjaysat.in )
🟦🟦🟦
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_*धम्मोपदेशकाची कर्तव्ये*_
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_*भगवंतांनी धम्मोपदेशकाची पुढील कर्तव्ये सांगितलेली आहेत :-*_
*संदर्भ :-*
*१) तथागताची सत्यगाथा *
*२) बौद्धधम्म जिज्ञासा*
*संकलन : महेश कांबळे*
*३१/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_विहार आणि त्याचे सामान_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ :*
*१) सेनासन क्खन्धक (चूल्लवग्ग)*
*२) विनय पिटक*
*संकलन : महेश कांबळे*
*२७/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_बौद्धधम्मातील देवांचे अस्तित्व_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_ईश्वर या अर्थाने देवी-देवतांच्या अस्तित्त्वाचे कोणतेच प्रमाण नाही. त्याअर्थी मनुष्याच्या मनाची ती केवळ कल्पना आहे असे समजावे. बौद्ध वाङमयात संपूर्ण विश्वातील भिन्नभिन्न प्रकारच्या जीवांचे जे प्रकार सांगितले आहेत, ते पुढीलप्रमाणे :-_
*१)* _ब्रह्मा किंवा महान दैवी शक्ती (मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा यांची मूर्ती)_
*२)* _देवता किंवा सामान्य दैवी शक्ती किंवा उत्तम माणूस_
*३)* _मानवजात_
*४)* _पशु_
*५)* _पाण्यातील जीव (जलचर)_
*६)* _आकाशातील जीव (पक्षी वगैरे)_
*७)* _कृमी, कीटक_
*८)* _प्रेत अथवा संतप्त प्राणी, संतप्त जीव_
*९)* _असुरक, अथवा अति शोकार्त दैवी प्राणी_
*१०)* _नैर्यिक अथवा नरक लोकांतील प्राणी (नरक म्हणजे या पृथ्वीवरील अति वाईट स्थिती.)_
_*देवांचे प्रकार*_
_देव तीन प्रकारचे आहेत,_
*१)* _*"कामावचार"* म्हणजे अजूनही ज्यांचे मनोविकार सुटले नाहीत._
*२)* _*"रूपावचार"* म्हणजे उच्च स्थितीला प्राप्त; तथापी ज्यांचे रुप अजूनही कायम आहे._
*३)* _*"अरूपावचार"* जे सर्वात उच्चतम अशा पवित्र अवस्थेला पोहोचले असून भौतिक रूपाच्या विरहीत असतात, असे_
_*महामंगल-सुत्तांत* असे नमूद केले आहे की साऱ्या जेतवनाला प्रकाशित करीत एक *'देव'* भगवान बुद्धांसमोर उपस्थित झाला. हे कथन यथार्थच होते._
_*महामंगल-सुत्तांत* ज्या देवाचा उल्लेख आहे, त्याला आपण *सत्पुरुष समजावे.* सध्याच्या काळीसुद्धा जेव्हा आपल्याला एखाद्या सद्गृहस्थाची प्रशंसा करावयाची असते, *'तेव्हा तो मनुष्य नाही, देव आहे',* असे आपण म्हणत असतो की नाही? *ब्रह्मदेव म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा यांचे मूर्तिमंत प्रतिक.* भगवंतांना *विषादयोग नष्ट करून धम्मप्रसार करा, अशी विनंती करणारा ब्रह्मासहम्पती म्हणजेच ब्रह्मविहारपैकी एक मनोवृत्ती*_
*_तिट्ठचर निसिन्नो वा सयानो वा यावतस्स विगतमिद्धो ।_*
*_एतं सतिं अधिट्ठेय्य ब्रम्हमेतं विहारं इधमाहु ।।_*
*मराठी अर्थ :-*
*_उभे असता, चालत असता, बसले असता किंवा अंथरुणावर पडल्यावर जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत ही मैत्रीची भावना जागृत ठेवावी. कारण तिलाच ब्रह्मविहार असे म्हणतात._*
*_ब्रह्मदेव म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता किंवा उपेक्षा यांपैकी एखादी मनोवृत्ती होय. ज्या ब्रह्मदेवाला लोक पितामह म्हणतात, तो दुसरा कोणी नसून या चार मनोवृत्तींची साक्षात मूर्ती होय. तेव्हा आत्ता बुध्दांजवळ ब्रह्मदेव आला म्हणजे काय? तर या चार मनोवृत्ती त्यांच्या मनात विकास पावल्या. ब्रह्मदेवाची प्रार्थना त्यांनी ऐकली म्हणजे काय? तर त्यांच्या अंतःकरणात वास करणाऱ्या अमर्याद प्रेमाने, अगाध करुणेने, सज्जनांविषयी मुदितेने आणि जे कोणी त्यांचे ऐकणार नाहीत व अकारण शत्रू होतील अशांच्या उपेक्षेने त्यांना सद्धम्माचा प्रसार करावयास प्रवृत्त केले._*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ :*
*१) बौद्धधम्मावरील चार निबंध*
*२) Intelligent Man's Guide to Buddhism*
*३) Buddhist Catechism*
*४) बौद्धधम्म जिज्ञासा*
*संकलन : महेश कांबळे*
*२५/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_धम्म_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_अनित्यतेच्या सिद्धांताचे तीन भाग पडतात :-_*१)* _अनेक तत्त्वांच्या मिश्रणाने वस्तू बनलेल्या असून सर्वच वस्तू अनित्य आहेत._*२)* _व्यक्तिशः प्राणी अनित्य आहे_*३)* _प्रतित्यसमुत्पन्न वस्तूंचे 'आत्मतत्त्व' अनित्य आहे._
त्याचे सविस्तर विवरण करताना भगवंतांनी म्हटले -
*_"भिक्खुंनो, मी चार स्मृती उपस्थांनाचा उपदेश दिला आहे, चार सम्यक - प्रयासांचा उपदेश दिला आहे, चार ऋद्धिपादांचा, पाच इंद्रियांचा उपदेश दिला आहे, पाच बलांचा उपदेश दिला आहे, सात बोध्यांगाचा उपदेश दिला आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला आहे."_*
_"भिक्खुंनो, संस्कार अनित्य आहेत, तुम्ही अप्रमादी राहून आपल्या उद्देश प्राप्तिकरिता सतत प्रयत्नशील राहा. थोड्याच दिवसात तथागतांचे परिनिर्वाण होईल. आजपासून तीन महिन्यानंतरच तथागत परिनिवृत्त होतील."_
_*हे सर्व धम्म एकूण सदतीस आहेत म्हणून ह्यांना 'सदतीस बोधिपक्षीय' धम्म म्हणतात.*_
● *चार स्मृती उपस्थान*
*१)* कायानुपश्यना
*२)* वेदनानुपश्यना
*३)* चित्तानुपश्यना
*४)* धर्मानुपश्यना
● *सम्यक प्रयास चार आहेत*
*१)* अकुशल धर्माची उत्पत्ती न व्हावी म्हणून प्रयत्न करणे
*२)* उत्पन्न झालेल्या अकुशलांचा नाश करण्याकरिता प्रयत्न करणे
*३)* उत्पन्न न झालेल्या कुशल धम्माची प्राप्ती करण्याकरिता प्रयत्न करणे
*४)* उत्पन्न झालेल्या कुशल धम्माची जोपासना करण्याकरिता प्रयत्न करणे
● *चार ऋद्धिपाद*
*१)* छंद
*२)* चित्त
*३)* वीर्य
*४)* विमर्श
● *पाच इंद्रिये*
*१)* चक्षु
*२)* श्रवणेन्द्रिय
*३)* नासिका
*४)* जिव्हा
*५)* त्वचा
_यांशिवाय येथे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा हेही अभिप्रेत आहेत. त्यांनादेखील 'इंद्रिये' च म्हणतात._
● *पाच बल*
*१)* श्रद्धा बल
*२)* वीर्य बल
*३)* स्मृती बल
*४)* समाधी बल
*५)* प्रज्ञा बल
● *सात बोध्यंग*
_सात बोध्यांगात स्मृती, वीर्य आणि समाधीचा समावेश केला जातो._ आणि बाकीचे चार आहेत -
*१)* धर्म
*२)* विनय
*३)* प्रीतीप्रश्रंधि
*४)* उपेक्षा
● *आर्य अष्टांगिक मार्ग*
*१)* सम्यक दृष्टी
*२)* सम्यक संकल्प
*३)* सम्यक वाचा
*४)* सम्यक कर्मान्त
*५)* सम्यक आजिविका
*६)* सम्यक व्यायाम
*७)* सम्यक स्मृती
*८)* सम्यक समाधि
_अशारितीने जर ह्या सदतीस बोधी पक्षीय धम्माची एकूण मोजदाद केली तर त्यांची वास्तविक संख्या सदतीस न होता एकूण पंचवीस होते. ह्या बोधिपक्षीय धम्मांद्वारे बौद्ध धम्माचा सारांश विशद केलेला आहे. नाहीतर भगवंतांनी अथवा संगितिकारांनी ह्यांना इतके महत्व दिले नसते._
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ :*
*१) मिलिंद प्रश्न*
*२) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म*
*३) बोद्ध दर्शन*
*४) बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन*
*५) बौद्धधम्म जिज्ञासा*
*संकलन : महेश कांबळे*
*२५/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_उपासकांचे दहा गुण_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_उपासकाच्या अंगी दहा सद्गुण असले पाहिजे, तरच तो योग्य उपासक बनू शकतो. ते दहा गुण असे -_*
*१)* उपासकाने आपल्या भिक्षुविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगावी
*२)* धर्माला सर्वश्रेष्ठ मानावे
*३)* भिक्षुस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये
*४)* धर्माचा लोप पावत आहे असे दिसून आल्यास धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी पराकाष्टेचे प्रयत्न केले पाहिजेत
*५)* तो त्रिरत्नाप्रति योग्य विचारसरणी ठेवीत असतो
*६)* असा उपासक केवळ जिज्ञासेपायी सर्वत्र प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मतात न जाता धर्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो
*७)* असा उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो
*८)* तो शांतता प्रिय असतो
*९)* ऐकतेचा प्रशंसक असतो
*१०)* असा शिष्य केवळ धर्माचे दिखाऊ अवडंबर माजवीत नाही, तर तो यथार्थाने बुद्ध, धर्म व संघाचे ठाई त्याची नितांत श्रद्धा व निष्ठा असते.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
*संकलन : महेश कांबळे*
http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_बौद्धधम्मासंबंधी चुकीचे समज_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_बौद्धधम्मासंबंधी चुकीच्या गोष्टी काही लोकांनी प्रचलित केलेल्या आहेत. त्या संक्षेपाने पुढील प्रमाणे :-_*
*१)* _*काही लोक म्हणतात की बौद्धधम्म हा धर्मच नव्हे ते केवळ एक तत्वज्ञान आहे* हा प्रश्न पाश्चात्य पंडितांनी मांडला आहे. *वस्तुतः बौद्धधम्म जेवढा तत्त्वज्ञानमय आहे, तेवढाच तो 'धर्म' या संज्ञेसदेखील पात्र आहे. एवढेच नव्हे तर, धर्म, नीती आणि तत्वज्ञान या तिहींचा यांत सुंदर संगम आहे.*_
_तो ह्या सृष्टीचे स्वरूप आणि तिला चालना देणाऱ्या शक्तींचे ज्ञान करवितो. माणसाला त्याच्या अंतस्थ नितीतत्त्वांचे ज्ञान करवितो आणि त्याच्या उन्नतीच्या पराकाष्टेचा मार्ग दाखवितो. माणसाच्या गूढ नैतिक प्रवृत्तींवर प्रकाश टाकून, त्यांना जागृत करून, त्याला सन्मार्गाकडे घेऊन जातो._
*_लोकांची ही धारणा आहे की, माणसाच्या ज्ञानेंद्रियांच्या आकलन शक्तीच्या मर्यादेपलीकडे जे अज्ञेय आहे, त्याचे आकलन करविणे, हेच धम्माचे कार्य होय. म्हणून ते ईश्वर, अलौकिक चमत्कार, ईश्वरी कृपा इत्यादींना धर्माशी जोडतात._*
*२)* _*बौद्धधम्म निरीश्वरवादी अर्थात नास्तिक आहे - ज्याच्या कृपेने वा इच्छेने हे सारे विश्व निर्माण झाले आहे, तो अस्तित्त्वांत आहे की त्याचा विनाश झाला आहे असा कोणी 'पुरुष', तो ईश्वर या अर्थाने बौद्धधम्म ईश्वराच्या अस्तित्वास नाकारतो.*_
_*बौद्धधम्म ख्रिश्चन लोकांच्याप्रमाणे पिता, पुत्र किंवा पवित्र आत्म्यास मानीत नाही.* तो संभोग काया, निर्माण काया आणि धम्मकायेस मानतो. बौद्धधम्म सांगतो की सृष्टीची निर्मिती किंवा क्षय ह्या गोष्टी अनादी आहेत. कोणत्याही समयी संपूर्ण सृष्टी नव्हे, परंतु तिचा एखादा भाग त्याच्या पूर्वसंचित कर्मानुसार नष्ट होऊन, त्या ठिकाणी नवीन भाग तयार होतो. *कर्मानुसार अनुबंधीत होणें, हेच सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण होय. कोण्या "ईश्वराच्या इच्छेमुळे" नव्हे.* याचा अर्थ कोण्या मूर्तीमान व्यक्तिरूप परमेश्वरास बौद्धधम्म मानीत नाही._
_*भगवान बुद्धांनी ईश्वराला प्रसन्न करावयाच्या ब्राह्मणी धर्माने दाखविलेल्या मार्गाचा त्याग करून शील आणि नीतीयुक्त आचारणास प्राधान्य दिले. त्यामुळे तो धर्मच नव्हे, 'तो केवळ एक नास्तिक पंथ' आहे, असा आरोप बौद्धधम्मावर केला जातो. माणूस आपल्या सुख-दुःखाच्या कर्तृत्वाची जबाबदारी ईश्वरावर सोपवू इच्छितो, हे योग्य नाही. माणसाची एक स्वतंत्र इच्छाशक्ती आहे आणि आपल्या चांगल्या-वाईट कर्माना तो जबाबदार आहे.*_
_दुसरे कारण असे की ईश्वर श्रद्धागम्य / श्रद्धेने जाणता येणारा आहे, असे इतर धर्म मानतात. परंतु बौद्धधम्म तिला अंधश्रद्धा समजून तिचा त्याग करतो. बौद्धधम्मामध्ये ज्ञानानेच श्रद्धेची जागा घेतलेली आहे. ह्या जगात दुःखे आहेत आणि त्या दुःखाचा नाश करायला पाहिजे आणि त्याचे उपाय मनुष्याच्या हाती आहेत. ह्यात ईश्वराचा संबंध कुठेही नाही. *बौद्धधम्माची मनुष्याच्या कर्तृत्वावर आस्था आहे, म्हणून त्याला 'नास्तिक' म्हणणे चुकीचे आहे.*_
*३)* _पुष्कळसे इतर धर्मीय म्हणतात - *बौद्धधम्म शून्यवादी आहे.* आदि शंकारांचार्यांचे मतसुद्धा असेच होते. परंतु भगवान बुद्धांनी शून्यवादाचा उपदेश कधीही केला नाही. *शून्यवादाचा अर्थ आहे - हे सारे विश्व, सर्वच सचेतन सृष्टी शून्यातून निर्माण झाली आणि त्यांचा विलयदेखील शून्यातच होईल.* परंतु भगवंतांनी सांगितलेले आहे की -_
_*सेय्यथापि भिक्खवे महासमुद्दो एकरसो लोणरसो, एकमेव खो भिक्खवे अयं धम्मो एकरसो विमुत्तिरसो ।। (उदान)*_
मराठी अर्थ : _*भिक्खुंनो! ज्याप्रमाणे महासागर एकरस असतो, म्हणजे संपूर्ण पाणी खारटच असते, त्याचप्रमाणे धम्मदेखील विमुक्ती-रसमय आहे.*_
_*याचा अर्थ असा होतो की, धम्म ही आध्यात्मिक वस्तू आहे आणि त्याचा उद्देश केवळ मुक्ती किंवा निर्माण आहे. हे निर्वाण ह्याच जन्मी मिळविल्या जाऊ शकते. निर्वाणाची स्थिती अत्यंत सुखमय असते. तिचे वर्णन करणे कठीण असते. तिला केवळ अनुभवानेच जाणता येऊ शकते. निर्वाण म्हणजे शून्यत्व नाही. त्याचा अर्थ अविद्येचा नाश होणे, राग - द्वेष - मोह यांचा नाश होणे, कामतृष्णा - भवतृष्णा आणि विभवतृष्णेचा नाश होणे.*_
*४)* _असे म्हटले जाते की, *बौद्धधम्म पूर्ण प्रकारे निराशावादी आहे; आणि दुःख भोगणे यांतच पुरुषार्थ आहे अशी शिकवण देतो.* हे पूर्णपणे चूक आहे. *बौद्धधम्म ह्या सत्याला उघड करून सांगतो की, जगात दुःखच दुःख आहे आणि त्यासोबतच त्या दुःखापासून मुकतो मिळविण्याचा मार्गदेखील दाखवितो. एवढेच नव्हे तर त्या मार्गावर चालणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे . तो मार्ग आहे मनाच्या शुद्धीकरणाचा मार्ग. हाच मार्ग आर्य - अष्टांगिक मार्ग होय.*_
_भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले की जगातील दुःखापासून सुटका मिळवून घेण्यास देहदंडाचा, तपश्चर्येचा किंवा अरण्यात निवास करण्याचा मार्ग चुकीचा आहे. *भगवंतांनी मध्यममार्गाची शिकवण दिली - देहदंडाला पूर्णपणे समर्पित न होता किंवा पूर्ण वासनामय आणि तृष्णामय मार्गाचा अवलंब न करता, मनास विकृतीपासून दूर ठेवीत आणि त्यावर यथार्थ दृष्टीने अंकुश लावीत, अष्टांगिक मार्गाने गेल्याने दुःखापासून मुक्ती मिळू शकते.*_
_भगवंतांनी ह्या गोष्टीस पुर्णतः उघड करून सांगितले की, दुःखाची उत्पत्ती कोण्या ईश्वराच्या प्रकोपामुळे होत नसते. दुःखे माणसाच्या स्वतःच्या अविद्येमुळे निर्माण होतात. माणसाला त्याच्या कर्माच्या अनुसार सुख किंवा दुःखाचा अनुभव येतो. आपल्या दुःखापासून मुक्ती मिळविण्याची गुरुकिल्ली त्याच्या स्वतःजवळच असते आणि निराश व्हायची अजिबात गरज नाही. या उपदेशाद्वारे भगवंतांनी माणसाच्या मनात एक नवीन आशा, नवीन अपेक्षा आणि नवीन भवितव्याचा संचार केला आहे. हा आशावादी दृष्टिकोन आहे._
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ :*
*१) Buddhism & it's critics*
*२) बौद्ध धर्माचा साध्यंत इतिहास*
*३) बौद्धधम्म जिज्ञासा*
*संकलन : महेश कांबळे*
*२४/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_*दसबल*_
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_सम्यक संबुद्धाला दहा गोष्टींचे ज्ञान किंवा बळ प्राप्त झालेले असते.
*संदर्भ :-*
*१) बोद्धधम्मावरील चार निबंध*
*२) बौद्धधम्म जिज्ञासा*
*संकलन : महेश कांबळे*
*२२/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ : जगण्याची कला*
*संकलन : महेश कांबळे*
*२२/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ : खुद्दकनिकाय - खुद्दकपाठ*
*संकलन : महेश कांबळे*
*२१/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷 आओ, दस पारमिताओं को समझे 🌷
"दानं शीलं च नेक्खमं, वीरियं पञ्ञा च पंचमं ।
खन्ति मेत्ता अधिट्ठानं, सच्च उपेक्खा च दसमं ॥"
[ दान, शील, निष्क्रमण, वीर्य, प्रज्ञा
क्षांति, मैत्री, अधिष्ठान, सत्य, उपेक्षा ]
दस पारमिताएं हैं जिन्हें हर एक को अंतिम लक्ष्य की प्राप्ति के लिए पूरा करना अनिवार्य है। अंतिम लक्ष्य है अहंकार, ममकार से शून्य होना । दस पारमिताएं ऐसे गुण हैं जिन्हें बढ़ाकर, पूरा कर मनुष्य अपने अहं को मिटा सकता है और अहं को मिटाकर ही मनुष्य मुक्ति या मोक्ष या निर्वाण के निकट पहुंचता है। विपश्यना शिविर में इन दस पारमिताओं को विकसित करने का अवसर मिलता है।
🌷 नैष्क्रम्य अर्थात निष्क्रमण 🌷
पहली पारमिता है नैष्क्रम्य अर्थात निष्क्रमण । जो व्यक्ति भिक्षु या भिक्षुणी बनता है वह गृहस्थ का जीवन त्याग कर बनता है, उसके पास अपना कुछ भी नहीं होता। उसे अपना भोजन भी भिक्षा मांगकर करना होता है। यह सब कुछ किया जाता है अपने अहंकार, ममकार को मिटाने के लिए। यह गुण एक गृहस्थ कैसे विकसित कर सकता है? ऐसे शिविरों में आकर उसे, इसे विकसित करने का अवसर प्राप्त होता है।
चूंकि यहां उसे दूसरे के दान पर निर्भर रहना पड़ता है। जैसा भोजन मिला, जैसी रहने की जगह मिली और जैसी अन्य सुविधाएं मिली उन्हें स्वीकार कर वह संन्यास या नैष्क्रम्य का गुण विकसित करता है। यहां जो भी प्राप्त होता है उसका वह सदुपयोग करता है और बहुत परिश्रम कर अपने चित्त को निर्मल बनाता है, सिर्फ अपने हित के लिए नहीं बल्कि उस अनजान व्यक्ति के लिए भी जिसने उसके लिए दान दिया।
🌷 शील 🌷
दूसरी पारमिता है शील | सब समय शिविर के दौरान तथा दैनंदिन जीवन में पांच शिक्षापदों का पालन कर वह इस गुण को विकसित करता है। गृहस्थ जीवन में शील पालन करने में बहुत-सी कठिनाइयां आती हैं। लेकिन यहां विपश्यना के दौरान शील भंग करने का अवसर ही नहीं आता, क्योंकि यहां बड़ा ही व्यस्त कार्यक्रम है और यहां का अनुशासन बड़ा ही कड़ा । बात-चीत करने में शीलभंग का अवसर आ सकता है। इस कारण प्रथम नौ दिनों के लिए मौनव्रत धारण किया जाता है इस तरह कम से कम शिविर के दौरान किसी को शीलपालन करने में कठिनाई नहीं होती।
🌷 वीर्य 🌷
तीसरी पारमिता है वीर्य की। वीर्य का अर्थ प्रयत्न होता है। दैनंदिन जीवन में जीविकोपार्जन के लिए मनुष्य प्रयत्न करता है परंतु यहां जो प्रयत्न किया जाता है वह चित्त शुद्धि के लिए तथा स्मृतिमान और सम्प्रज्ञ रहने के लिए किया जाता है। यह सम्यक प्रयत्न है जो मुक्ति की ओर ले जाता है।
🌷 प्रज्ञा 🌷
चौथी पारमिता है प्रज्ञा की पारमिता। बाहरी दुनिया की जो प्रज्ञा है वह पुस्तकें पढ़कर या दूसरों की बातें सुनकर प्राप्त की जाती है। यह सिर्फ चिंतन मनन से प्राप्त प्रज्ञा है। सच्ची प्रज्ञा पारमिता वह है जो अपने अन्दर विकसित होती है। ध्यान करते समय स्वानुभव से प्राप्त अनित्य, दुःख तथा अनात्म के आत्म- निरीक्षण से प्राप्त प्रत्यक्ष ज्ञान ही प्रज्ञा है। सत्य के इस प्रत्यक्ष अनुभव से मनुष्य दुःख से मुक्त हो जाता है।
🌷 क्षांति 🌷
पांचवी पारमिता क्षांति की पारमिता है। क्षांति का अर्थ सहिष्णुता है। ऐसे शिविर में जहां किसी को समूह में रहना पड़ता है, हो सकता है उसे दूसरे व्यक्तियों के कार्य-कलाप अच्छे न लगें और वह चिड़चिड़ा अनुभव करे। लेकिन शीघ्र ही उसे यह बोध होता है कि दूसरा जो कुछ कर रहा है वह निर्बोध है, जान-बूझकर नहीं कर रहा है या रोगी है। यह सोचकर उसकी चिड़चिड़ाहट जाती रहती है और उस व्यक्ति के प्रति उसके मन में प्रेम और करुणा उमड़ती है। इस तरह वह व्यक्ति क्षांति विकसित करने के पथ पर आरूढ़ हो जाता है।
🌷 सत्य 🌷
छठी पारमिता है सत्य की पारमिता । शील पालन कर कोई वाचसिक धरातल पर सत्य बोलने के ब्रत का पालन करता है। लेकिन सत्य बोलना सिर्फ ऊपरी-ऊपरी नहीं होना चाहिए, बल्कि इसका अभ्यास एक गहरे अर्थ में करना चाहिए। मार्ग पर उठाया गया एक-एक कदम सत्य पर आधारित होना चाहिए, चाहे सत्य स्थूल हो या सूक्ष्म या परम सत्य । यहां कल्पना की गुंजाइश नहीं है। वर्तमान में जो सच्चाई है, प्रत्यक्ष अनुभूत हो रही है, उसी के साथ सदा रहना चाहिए।
🌷 अधिष्ठान 🌷
सातवीं पारमिता अधिष्ठान की है। अधिष्ठान का अर्थ दृढ़संकल्प है। जब कोई विपश्यना शिविर में बैठता है तो दृढ़ संकल्प करता है कि वह शिविर पूरा करके ही उठेगा, बीच में नहीं छोड़ेगा। शिक्षा पदों के पालन करने का दृढ़ संकल्प करता है, आर्य मौन पालन करने का, अनुशासन में रहने का दृढ़ संकल्प करता है।
जब विपश्यना दी जाती है तो वह दृढ़ संकल्प करता है कि सामूहिक साधना के दौरान वह एक घंटे तक बिना आंख खोले तथा बिना हाथ और पैर को खोले एक आसन में पूरे एक घंटे तक साधना करेगा। बाद में यह पारमिता बड़े महत्त्व की होती है। जब कोई निर्वाण का साक्षात्कार करने के निकट होता है तो उसे बिना, हिले-डुले निर्वाण की प्राप्ति तक बैठे रहने के लिए दृढ़ संकल्पित होना चाहिए।
🌷 मैत्री 🌷
आठवीं पारमिता है मैत्री की पारमिता। मैत्री का अर्थ है शुद्ध और निःस्वार्थ प्रेम । अतीत में किसी ने दूसरों के प्रति प्रेम और सद्भाव रखने की कोशिश की लेकिन यह सिर्फ चेतन चित्त के स्तर पर संभव हुआ। अचेतन मन में पुराना वैर ज्यों का त्यों रहा । जब किसी का सारा मन, चेतन तथा अचेतन मन विकारों से रहित हो जाता है तब उसे पूरे शुद्ध मन से दूसरे के सुख की कामना करनी चाहिए। यह सच्चा प्रेम है। यह अपना हित तो करता ही है, दूसरों का भी करता है।
🌷 उपेक्षा 🌷
नौवीं पारमिता उपेक्षा पारमिता है। कोई स्थूल तथा अप्रिय संवेदनाओं को अनुभव करते हुए ही तटस्थ नहीं रहता, शरीर के उन अंगों का निरीक्षण करते हुए, जहां कोई संवेदना नहीं मिलती तब भी तटस्थ नहीं रहता बल्कि तब भी तटस्थ रहता है जब सारे शरीर में उसे सूक्ष्म एवं प्रिय संवेदनाएं अनुभूत होती हैं। हर स्थिति में वह जानता है कि उस क्षण का अनुभव अनित्य है और यह उत्पन्न हुआ है जाने के लिए। ऐसा अनुभव कर वह तटस्थ रहता है, उपेक्षा भाव जगाता है।
🌷 दान 🌷
अंतिम पारमिता दान की पारमिता है। गृहस्थ के लिए तो यह धर्म पथ पर चलने के लिए प्रथम आवश्यक कदम है। गृहस्थ का यह कर्त्तव्य है कि वह सम्यक रूप से आजीविका अर्जित कर अपने और उस पर निर्भर रहने वाले औरों का भरण-पोषण करे। लेकिन अपने अर्जित धन पर वह जब लोभ पैदा करता है तो वह अहंकार विकसित करता है। इसलिए अपनी कमाई का एक भाग दूसरे की भलाई में अवश्य दिया जाना चाहिए।
अगर वह ऐसा करता है तो वह अहंकार पैदा नहीं करेगा, चूंकि वह समझता है कि धनार्जन सिर्फ अपने लिए नहीं औरों के लिए भी किया जाता है। दूसरों की चाहे जिस तरह से हो, सहायता करने की उसकी चेतना जगती है। और वह स्वानुभव से यह समझने लगता है कि औरों की सबसे बड़ी सहायता वही होती है जो उसे दुःख से मुक्त करता है।
🌸🌸🌸
ऐसे शिविरों में पारिमिताएं पूरा करने का स्वर्णिम अवसर मिलता है। जो कुछ भी किसी को यहां प्राप्त है वह दूसरों का दिया गया दान है। न तो रहने-खाने का पैसा लगता है और न तो विद्या सिखाने की फीस देनी पड़ती है। बदले में यहां दूसरों के लिए दान देने का अवसर मिलता है। दान मनुष्य की आर्थिक शक्ति के अनुपात में कम या अधिक हो सकता है।
स्वभावतः एक धनी व्यक्ति अधिक दान देने की इच्छा करेगा, लेकिन शुद्ध चेतना से दी गयी छोटी राशि भी दान पारमिता विकसित करने में बहुमूल्य होगी। बदले में कुछ भी पाने की, बिना आशा रखे कोई इस चेतना से दान देता है कि उसकी तरह दूसरे भी धर्म से होने वाले लाभ को प्राप्त करें और दुःख से मुक्त हों।
यहां आपको सभी दस पारमिताओं को विकसित करने का सुअवसर प्राप्त होता है। जब आप इन सभी दस पारमिताओं को पूरा कर लेंगे तो अंतिम लक्ष्य की प्राप्ति कर लेंगे। इन्हें थोड़ा-थोड़ा विकसित करने का अभ्यास करते रहें। धर्म पथ पर प्रगति करते रहें, सिर्फ अपने कल्याण और मुक्ति के लिए नहीं, बल्कि बहुतों के कल्याण तथा मुक्ति के लिए।
सभी दुःखी प्राणियों को शुद्ध धर्म मिले और वे सभी मुक्त हों।
🙏🙏🙏
✍ श्री सत्य नारायण गोयनका जी
पुस्तक: प्रवचन सारांश ।
विपश्यना विशोधन विन्यास ।।
भवतु सब्ब मंगलं !!
🙏🙏🙏
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _'कोलित सुत...