🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_*दसबल*_
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_सम्यक संबुद्धाला दहा गोष्टींचे ज्ञान किंवा बळ प्राप्त झालेले असते.
*१)* बुद्ध स्थानाला स्थान समजून, अस्थानाला अस्थान असे यथार्थपणे जाणतात.
*२)* बुद्ध सर्वागामिनी प्रतिपदेला (मार्ग, ज्ञान) यथार्थ जाणतात.
*३)* बुद्ध भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळांत केलेल्या कर्माचे परिणाम ह्यांना स्थान आणि हेतुपूर्वक जाणतात.
*४)* बुद्ध अनेक धातू (ब्रह्माण्ड), नाना धातू असलेल्या लोकांना (देवलोक वगैरे) यथार्थ जाणतात. (सर्वच ज्ञान एकेवेळी सदा सर्वदा उपलब्ध नसते, परंतु आवश्यकता भासल्यास त्यांचे ज्ञान त्यांना त्वरीतच होते.)
*५)* बुद्ध विविध प्रकारचे स्वभाव किंवा गुणधर्म असलेल्या प्राण्यांना जाणतात.
*६)* बुद्ध इतर प्राण्यांच्या इंद्रियांचे परत्व-अपरत्व (प्रबलता-दुर्बलता) ह्यांना यथार्थच जाणतात.
*७)* बुद्ध ध्यान, विमोक्ष, समाधी, समापत्तीचे मळ आणि व्यवदान (निर्मळ कारण) आणि त्यांचे उत्थान यांना समग्रपणे जाणतात.
*८)* बुद्ध आपल्या पूर्वजन्मींच्या घटनांचे स्मरण करू शकतात.
*९)* बुद्ध अमानवीय विशुध्द दिव्य चक्षूंद्वारे प्राण्यांचे उत्पन्न होणे, मरणे, स्वर्गलोकास प्राप्त होणे, यांचे दर्शन करू शकतात. (स्वर्ग लोक या पृथ्वीवरील आनंदमय अवस्थेला म्हणतात.)
*१०)* बुद्ध आश्रवांच्या क्षयामुळे आश्रवरहित (बंधनरहित) झाल्यामुळे चित्ताची मुक्ती आणि प्रज्ञेची मुक्ती ह्यांचा साक्षात्कार त्यांना घडतो.
_भगवान प्रत्येक क्षणी संसारातील सर्वच गोष्टींचे ज्ञान स्वतःजवळ साठवून ठेवीत नसत. परंतु त्यांची सर्वज्ञता यातच होती की, ज्या क्षणी त्यांना कसलेही ज्ञान जाणावेसे वाटले, तर त्या विषयावर ध्यान केल्याबरोबर त्यांना त्याचे ज्ञान होत असे ह्यालाच *'आवर्जन-प्रतिबद्ध'* सर्वज्ञता म्हणतात.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ :-*
*१) बोद्धधम्मावरील चार निबंध*
*२) बौद्धधम्म जिज्ञासा*
*संकलन : महेश कांबळे*
*२२/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment