Monday, 30 November 2020
तिस्सा (पहिली)
दांभिक कोल्हा
Sunday, 29 November 2020
मानमोडी’ लेणी (खोरे वस्ती)
Friday, 27 November 2020
पुण्णा (पूर्णा)
एकाला अपाय तो दुसर्यााला उपाय
Thursday, 26 November 2020
परदेशीं जाऊन डौल मारणें सोपें असतें
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_परदेशीं जाऊन डौल मारणें सोपें असतें_*
*_(कटाहकजातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदा
बोधिसत्त्व वाराणसी नगरींत अत्यंत धनाढ्य श्रेष्ठी जन्माला आला होता. वयांत
आल्यावर त्याला एक सुस्वरूप मुलगा झाला. त्याच दिवशीं त्याच्या दासीलाहि एक मुलगा
झाला. या *दासीपुत्राचें नांव कटाहक असें ठेवण्यांत आलें.* तो आपल्या मालकाच्या
मुलाबरोबरच वाढला. लहान मूल असल्यामुळें त्याला कोणी आडकाठी करीत नसत. पुढें
बोधिसत्त्वाच्या मुलाला अक्षर ओळख करून देण्यासाठीं एक शिक्षक ठेविला. तेव्हां
कटाहक देखील त्या शिक्षकाजवळ जाऊन आपल्या मित्राबरोबर लिहिण्यावाचण्यास शिकला.
त्याची हुषारी पाहून पुढें वयांत आल्यावर बोधिसत्त्वानें त्याला आपल्या तिजोरीचा
अधिकारी नेमिलें. तें काम तो मोठ्या दक्षतेनें करीत असे. तथापि त्याला अशी शंका
आली कीं, ''कितीहि झालें तरी
मी पडलों दासीपुत्र, माझा लहानसहान दोष देखील सर्वांना मोठा
वाटेल; व कदाचित् माझा छळहि करितील आणि पुनः माझ्याकडून
दासकर्म करवून घेतील. तेव्हां येथें रहाणें सुरक्षित वाटत नाहीं.''_
_दिवसें दिवस दुसर्या कोठेंतरी दूरच्या गांवी पळून जावें हा कटाहकाचा
विचार दृढ होत गेला. पण परक्या गांवीं निर्वाह कसा करावा याची त्यास पंचाईत पडली.
शेवटीं त्यानें एक युक्ति शोधून काढली. ती अशी- '' दूरच्या
एका लहानशा शहरांत श्रेष्ठीच्या ओळखीचा व्यापारी रहात असे. त्याचा आणि
बोधिसत्त्वाचा व्यापारासंबंधानें वारंवार पत्रव्यवहार होत असे. बोधिसत्त्वाच्या
तर्फे बहुधा कटाहकच हीं पत्रें लिहीत असे, व त्यांवर
बोधिसत्त्वाचा शिक्का मारून तीं रवाना करीत असे. अशाच एका प्रसंगीं त्यानें आपल्या
संबंधानें त्या व्यापार्याला पत्र लिहून त्यावर श्रेष्ठीचा शिक्का मारून तें बंद
करून आपल्या पदरीं ठेविलें व दोन चार दिवसांनीं वाराणसींतून पळ काढला. त्याच्याजवळ
जें द्रव्य होतें तें खर्चून वाटेंत त्यानें आपला निर्वाह चालविला आणि बरेंच दिवस
प्रवास करून व्यापारी रहात होता तें शहर गांठलें. व्यापार्यानें 'कोठून आलांत' असा प्रश्न केल्यावर तो म्हणाला,
''वाराणसी नगरींतील प्रसिद्ध श्रेष्ठीचा मी पुत्र आहें. माझ्या
थोरल्या भावामध्यें आणि मजमध्यें तंटा होऊं नये म्हणून माझ्या पित्यानें मला
आपणापाशीं पाठविलें आहे. आपणाला मुलगा नाहीं असें आम्हीं ऐकतों. तेव्हां आपण माझें
पुत्रवत् पालन करून आपल्या कन्येशीं माझा विवाह करून द्याल अशी माझ्या पित्याला
दृढ आशा वाटत आहे, व याचसाठीं मला त्यानें हें पत्र दिलें
आहे.'' असें म्हणून कटाहकानें तें पत्र त्या व्यापार्याला दिलें.
त्यांत हाच मजकूर होता. श्रेष्ठीनें आपला मुलगा बुद्धिमान असून व्यापारांत दक्ष
आहे, तेव्हां त्याला आपणाजवळ ठेऊन घेऊन आपला घरजांवई कराल
अशी आशा बाळगतों इत्यादि मजकूर लिहिला होता. तो वाचून त्या व्यापार्याला फारच
आनंद झाला. एवढ्या मोठ्या सावकाराचा मुलगा आपल्यासारख्या गरीब व्यापार्याचा
घरजांवई होणें मोठें भूषणास्पद आहे. तेव्हा पहिल्या मुहूर्तावर त्यानें कटाहकाशीं
आपल्या कन्येचें लग्न लावून दिलें._
_कटाहक जात्या
हुषार होता हें वर सांगितलेंच आहे. पण *आगंतुक श्रीमंतीमुळें त्याच्या अंगी एक
दुर्गुण शिरला होता.* तो ज्याच्या त्याच्या अंगावर तोंड टाकीत असे. लहानसहान
अपराधहि त्याला सहन होत नसे. भोजनसमयीं स्वयंपाकांत कांहीं कमतरता दिसून आली तर तो
आपल्या बायकोवर फार संतापत असे, व त्यामुळें त्या बिचारीला
उगाच त्रास सोसावा लागत असे. याशिवाय कटाहकाच्या वर्तनांत म्हणण्यासारखे दुसरे दोष
नव्हते._
_कटाहक पळून गेल्यावर श्रेष्ठीला वर्ष दोन वर्षे त्याचा पत्ता लागला नाहीं.
पण पुढें तो व्यापार्याच्या घरीं घरजांवई होऊन रहात आहे ही बातमी त्याला समजली,
व तिचा खरेपणा पाहण्यासाठीं त्यानें आपले हेर त्या शहरीं पाठविले.
त्यांनी जेव्हां बोधिसत्त्वाला कटाहकाचें इत्थंभूत वर्तमान सांगितलें, तेव्हां त्यानें तेथें जाऊन त्याची फजीति करून पुनः आपल्या घरीं आणण्याचा
निश्चय केला व त्याप्रमाणें आपल्याबरोबर मोठा सरंजाम घेऊन तो त्या शहरीं जाण्यास
निघाला. तो त्या शहरापासून कांहीं अंतरावर पोहोंचला नाहीं तों त्याच्या आगमनाचें
वर्तमान कटाहकाला समजलें, व तो अगदीं घाबरून गेला. श्रेष्ठी
या ठिकाणीं आला तर आपली पुरी फजीति होणार हें तो जाणून होता पण येथून दुसर्या
ठिकाणीं पळून जाणें हें देखील त्याला इष्ट वाटेना. कांहीं काळ कटाहक किंकर्तव्यमूढ
होऊन विवंचनेंत पडला. परंतु त्याच्या समयसूचकबुद्धीनें त्याला शेवटीं हात दिला. या
नवीन संकटांतून पार पडण्यास त्यानें नवीच युक्ति शोधून काढली. त्या दिवसापासून
आपल्या आप्तइष्टांजवळ तो पितृभक्तीचीं मोठमोठालीं वर्णनें करूं लागला. तो म्हणाला,
''अहो तुमचें हें शहर म्हणजे वाराणसीच्या मानानें नुसतें खेडेगांव
आहे. येथील लोकांना रीतरिवाज कांहींच माहीत नाहीं. पितृभक्ति कशी असते हें या
गांवढळ लोकांना कसें समजणार. तुम्ही एकदां वाराणसीला जाऊन पहा ! आम्हीं तेथें
आमच्या वडिलांसमोर कधींहि खालीं बसत नसतों. भोजनसमयीं त्यांची सर्व सेवा करतों.
पिकदाणी लागली तर आणून देतों. एवढेंच नव्हे तर वडील शौचाला जावयास निघाले; तर स्वतः त्यांजबरोबर त्यांच्या उपयोगासाठीं पाणी नेऊन ठेवितों. असलीं
कामें आम्ही आमच्या नोकरांवर मुळींच सोंपवित नसतों पण या गांवीं तुम्हाला अशा तर्हेनें
पितृसेवा करावी ही गोष्ट माहीत तरी आहे काय ?''_
_त्या शहरांतील
लोकांनीं वाराणसींत फार दिवस वास्तव्य केलें नसल्यामुळें व तेथील रीतिरिवाजाची
माहिती नसल्यामुळें कटाहक सांगेल तें त्यांना प्रमाण होऊन बसलें, व काशीच्या चालीरीतीसंबंधानें त्यांना एकप्रकारचा मोठा आदर वाटला._
_महाश्रेष्ठी
लवकरच त्या शहरीं पोहोंचणार हें जाणून कटाहक आपल्या सासर्याला म्हणाला, ''मामाजी, तुम्ही माझ्या पित्याच्या आदरातिथ्याची सर्व
तयारी करून ठेवा. मी पित्याच्या भेटीला आमच्या सामर्थ्यांप्रमाणें नजराणे घेऊन
जातों व मोठ्या गौरवानें त्याला तेथें घेऊन येतों. आपले वडील इतके जवळ आले आहेत
हें जाणून घरींच बसून राहणें हें वाराणसींतील कुलपुत्रांना अत्यंत अनुचित आहे.
तेव्हा मी आजच्या आज माझ्या पित्याच्या भेटीसाठीं जात आहे.''_
_बराच लवाजमा
बरोबर घेऊन तो महाश्रेष्ठीच्या दर्शनाला गेला. वाटेंत महाश्रेष्ठी एका ठिकाणीं
उतरला होता. तेथें कटाहकानें त्याची भेट घेऊन आपण आणलेले नजराणे दिले. श्रेष्ठीला
मोठा चमत्कार वाटला ! आपलें नांव ऐकल्याबरोबर कटाहकानें पलायन करावें किंवा
गर्भगळीत होऊन जावें, असें असतां हा दासीपुत्र मोठ्या
शौर्यानें आपल्याजवळ येऊन नजराणे देतो याचा अर्थ काय ? हें
त्याला समजेना. श्रेष्ठी या विचारांत गढून गेला असतां स्नानाची वेळ झाली, स्नानाच्यापूर्वी शौचविधीला जाण्याचा श्रेष्ठीचा परिपाठ असे. त्याप्रमाणें
श्रेष्ठी आपल्या ठाण्याजवळच्या जंगलांत जाण्यास निघाला. त्यावेळीं कटाहकानें
आपल्या लोकांना तेथेंच रहाण्यास सांगितलें, व तो उदकपात्र
घेऊन, श्रेष्ठीच्या मागोमाग गेला. वाराणसींतील कुलपुत्र
आपल्या पित्याची अनन्यभावें सेवा करीत असतात ही गोष्ट कटाहकाच्या सर्व नोकरांना
माहीत असल्यामुळें त्यांना त्याच्या या कृत्यानें मुळींच आश्चर्य वाटलें नाहीं.
श्रेष्ठी एकांत स्थानीं गेल्यावर कटाहकानें उदकपात्र खालीं ठेऊन त्याच्या पायावर
एकदम उडी टाकली; आणि म्हणाला, ''महाराज
मी जरी आपला दासीपुत्र आहें, तथापि आपल्या मुलासंगेंच माझें
आपण पालन केलें आहे. मी केलेले सर्व अपराध क्षमा करून येथें मला मुलाच्या
नात्यानें वागविल्यास माझ्यावर अत्यंत उपकार होईल. पण जर तुम्ही माझें कृत्य
उघडकीस आणाल तर त्यापासून कोणाचाच फायदा न होतां बिचार्या माझ्या सासर्याच्या
कुटुंबांत फारच गोंधळ उडून जाईल व त्यामुळें सर्वांना दुःख भोगावें लागेल.''_
_*बोधिसत्त्व फार
दयाळू होता.* त्याचें मन वळविण्यास कटाहकाला मुळीच आयास पडले नाहींत. शेवटीं
त्याजकडून आपलें दासीपुत्रत्व उघडकीला न आणण्याबद्दल अभिवचन घेऊन कटाहक तेथून
माघारा आला. त्या दिवसापासून तो श्रेष्ठीची दासाप्रमाणें सेवा करीत असे. श्रेष्ठी
व्यापार्याच्या घरीं आल्यावर देखील कटाहकानें त्याची सर्वप्रकारें सेवा केली व
त्याला प्रसन्न करून घेतलें._
_एके दिवशीं कटाहक कांहीं कामानिमित्त
बाहेर गेला असतां त्याची बायको बोधिसत्त्वाला भेटली. तेव्हां बोधिसत्त्व तिला
म्हणाला, ''काय सूनबाई, माझा मुलगा
तुम्हाला चांगल्या रीतीनें वागवतोना ?'' ती म्हणाली,
''मामंजी, आपल्या चिरंजीवाचा कोणताही दोष
नाहीं, त्यांचें माझ्यावर फार प्रेम आहे. केवळ भोजनप्रसंगीं
कधीं कधीं कांहीं पदार्थ वाईट लागला तर ते माझ्यावर संतापत असतात; हाच काय तो त्यांचा दोष आहे.'' ''मुली, माझा मुलगा लहानपणापासून असाच आहे. जेवण्याखाण्यांत त्याच्या फार खोडी
असतात पण तूं वाईट वाटूं देऊं नकोस. त्याचें तोंड बंद करण्याचा एक मंत्र मी तुला
शिकवून ठेवितों. तो तूं चांगला पाठ करून ठेव व जेव्हां माझा मुलगा तुझ्यावर
रागावेल तेव्हां तो म्हणत जा. एक दोनदां या मंत्राचा प्रयोग केला असतां माझ्या
मुलाची प्रकृति पाण्यापेक्षांहि थंड होईल हें मी तुला खात्रीनें सांगतों.''_
_श्रेष्ठी कांहीं
दिवस त्या व्यापार्याच्या घरीं राहून वाराणसीला जाण्यास निघाला. कटाहक
त्याच्याबरोबर बराच दूर अंतरावर गेला. व पुष्कळ नजराणे देऊन त्यानें त्याचा मोठा
गौरव केला; आणि मोठ्या आदरानें साष्टांग नमस्कार करून पुनः आपल्या
सासर्याच्या घरीं आला. या दिवसापासून त्याचा मान अधिकच वाढला. कां कीं, आतां त्याचें दासीपुत्रत्व उघडकीला येण्याचा संभव राहिला नाहीं. त्यामुळें
बिचार्या बायकोला भोजन प्रसंगीं अधिक त्रास होऊं लागला. एके दिवशीं आपल्या नवर्यासाठी
स्वहस्तानें चांगलें जेवण तयार करून तिनें वाढण्यास सुरुवात केली. पहिलाच पदार्थ
कटाहकाला आवडला नाहीं. तो फार संतापला. त्याच्या बायकोला सासर्यानें दिलेल्या
मंत्राची आठवण झाली व तिनें ताबडतोब त्याचा प्रयोग केला. ती म्हणाली ः-_
_*बहुंपि सो विकत्थेय्य अञ्ञं जनपदं गतो।*_
_*अन्वागन्त्वान दूसेय्य भुंज भोगे कटाहक॥*_
*अर्थ-* _दुसर्या देशांत जाऊन पुष्कळ बडबड
करतां येते. पण परत येऊन तो हें उघडकीस आणील. तेव्हां हे कटाहक मुकाट्यानें
मिळालेल्या पदार्थांचा उपभोग घे!_
_हा मंत्र कानीं पडल्याबरोबर कटाहक घाबरून
गेला. श्रेष्ठीनें आपल्या हीनत्वाबद्दल सर्व कांहीं हिला सांगून ठेविलें असलें
पाहिजे असें त्याला वाटलें. तेव्हांपासून बायकोवर संतापण्याची त्याची छाती झाली
नाहीं. इतकेंच नव्हें तर तो नम्र आणि सालस बनला, व किती वाईट
पदार्थ असला तरी त्यामुळें तो कधींहि चिडला नाहीं. जे काहीं मिळेल तेवढ्यानें
संतुष्ट राहून आपला वेळ त्यानें सत्कर्मी खर्च केला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२७/११/२०२०*
मुत्ता (मुक्ता)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२ मुत्ता (मुक्ता)*
_मुत्ताचा जन्म श्रावस्तीमधील
एका ब्राह्मण कुळांत झाला होता. वयाच्या विसाव्या वर्षीच तिने गृहत्याग केला होता.
तिने महापजापती गोतमीकडे प्रव्रज्जा घेऊन ती तिची शिष्या झाली होती. एके दिवशी दुपारचे
जेवण झाल्यावर एका निर्जन ठिकाणी ती ध्यानभावनेकरिता बसली असता शास्त्याने तिला उत्साहित
करण्यासाठी म्हटलेल्या गाथेला ती वारंवार म्हणत होती. त्यामुळे ही गाथा तिच्या नावाबरोबर
जोडण्यात आले.
*_मुत्ते! तू
राहुच्या ग्रहणापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे (सर्व) शृंखलातून मुक्त हो. विमुक्ती
– प्राप्त चित्ताने ऋणमुक्त होऊनच तू भिक्षान्न खा.||२||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२७/११/२०२०*
Wednesday, 25 November 2020
एक अज्ञात भिक्खुणी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१. *एक अज्ञात भिक्खुणी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वैशालींनगरीत क्षत्रीय कुळांत एका स्त्रीचा जन्म झाला. वयांत आल्यावर एका चांगल्या परिवारातील पुरुषाशी तिचा विवाह झाला. एके दिवशी *महापजापती गोतमीची धम्म देसना* ऐकून तिच्या मनात प्रवज्ज्या घेण्याची इच्छा निर्माण झाली. ती इच्छा तिने आपल्या पतीजवळ व्यक्त केली परंतु ते करण्यासाठी पतीने परवानगी न दिल्याने ती गृहणी राहूनच धम्माचे पालन करू लागली. तिचे चित्त धम्म चिंतंनाकडे लागले होते. एके दिवशी स्वयंपाक करीत असताना विस्तव जास्त झाल्याने कढईत शिजत असलेली भाजी करपून गेली. या घटनेने तिला *संसारातील सर्व वस्तूंच्या अनित्यतेचे गंभीर ज्ञान झाले.* त्यामुळे तिने मौल्यवान अलंकार वापरण्याचे सोडून दिले. पतीने यासंदर्भात विचारणा केली असता ती म्हणाली, “स्वामी! सांसारिक जीवन जगण्यास मी स्वतःला असमर्थ समजत आहे.” हे एकूण तिच्या पतीने महापजापती गोतमीकडे जाऊन विनंती केली की, “आर्ये! हिला प्रवज्या द्यावी.” तेव्हा महापजापती गोतमीने तिला प्रव्रज्ज्या देऊन शास्त्याकडे नेले. शास्त्याने तिची महान वैराग्यवृत्ती पाहून ज्या घटनेने तिच्यामधील अंतर्दुष्टी जागृत झाली ती लक्षात घेऊन पुढील गाथा म्हटली. हीच गाथा ती वारंवार स्वतःसाठी म्हणताना दिसत असे. त्यामुळे ही गाथा तिच्या नावाबरोबर जोडण्यात आली आहे._
*_थेरी! तू आपल्या हाताने तयार केलेले चिवर अंगावर घेऊन सुखाने झोप. कारण भांड्यात घातलेल्या सुकलेल्या भाजीप्रमाणे तुझा राग शांत झाला आहे. ||१||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*संकलन : महेश कांबळे*_
_*संदर्भ : थेरिगाथा*_
*दिनांक : २६.११.२०२०*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
परोपकाराचें फळ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_परोपकाराचें फळ_*
*_(अंबजातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदां बोधिसत्त्व ब्राह्मण कुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर ॠषिवेषानें तो हिमालयावर रहात असे. तेथें त्याचे पुष्कळ शिष्य होते. एका वर्षी हिमालयावर भयंकर उन्हाळा सुरू झाला व त्यामुळें पाण्याचे झरे वगैरे आटून गेले. मृगादिक प्राण्यांना पाणी मिळण्याची फार अडचण पडूं लागली. तेव्हां बोधिसत्त्वाच्या शिष्यांपैकीं एका तपस्व्यानें एक लाकडाची मोठी दोणी करून तेथील पशूंला पाणी पाजण्यास सुरुवात केली. पण त्यामुळें त्याला फलमुलें आणण्यासाठीं अवकाश मिळेनासा झाला, व उपाशीं पोटींच पशूंना पाणी पाजण्याची पाळी त्याच्यावर आली. तथापि त्यानें आपला प्रयत्न न सोडतां सर्व श्वापदांची तृप्ति करण्याचा क्रम तसाच पुढें चालविला. तें पाहून पशूंनीं *''हा तपस्वी आमच्यासाठीं फार कष्ट सहन करितो. तेव्हां याचे उपकार फेडणें अत्यंत आवश्यक आहे.''* असा विचार करून सर्वानुमतें हा ठराव पास केला, ''आजपासून जो प्राणी येथें पाणी पिण्यास येईल त्यानें रिकामें न येता आपल्या सामर्थ्याप्रमाणें एकतरी मनुष्योपभोगाला योग्य असें फळ घेऊन यावें. रिकाम्या हाताने येऊं नये.''_
_दुसर्या दिवसापासून बोधिसत्त्वाच्या आश्रमांत फळांचे नुसते ढीग पडूं लागले. पांचशें तपस्व्यांला दुसर्या ठिकाणीं फलमूलांचा शोध करण्यास गेल्यावांचून तेथल्या तेथें आहार मिळूं लागला. व त्यामुळें त्यांच्या तपश्चर्येला मोठी मदत झाली. त्या तपस्व्याच्या कृत्यानें बोधिसत्त्व खूष होऊन आपल्या शिष्यगणाला म्हणाला, *''तपस्वी हो, परोपकाराचें हें फल लक्षांत ठेवण्यासारखें आहे. आमच्यापैकीं एकानें परोपकरार्थ आपला देह झिजविल्यामुळें आमच्या तपश्चर्येला पुष्कळ मदत झाली आहे. म्हणून परोपकार करण्यास आपण सदोदित झटलें पाहिजे.''*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२६/११/२०२०*
Tuesday, 24 November 2020
कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाने मूर्ख शहाणा होऊ शकत नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाने मूर्ख शहाणा होऊ शकत नाही_*
*_(नंगलिस जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदा बोधिसत्त्व ब्राह्मण कुळांत जन्मला होता. वयांत आल्यावर तक्षशिला शहरात जाऊन त्याने सर्व शास्त्रांचे अध्ययन करून पुनः वाराणसी शहरात जाऊन आपल्या सद्गुणांनी उत्तम शिक्षक म्हणून आपली ख्याती करून घेतली. त्याच्याजवळ पुष्कळ विद्यार्थी राहत असत. त्यात एक विद्यार्थी आपल्या गुरूच्या सेवेत तत्पर असे; परंतु जडत्वामुळे शास्त्राध्ययनांत त्याचे पाऊल पुढे पडत नसे. एके दिवशी गुरूने जेवल्यानंतर त्याला आपली पाठ दाबण्यास सांगितले. ते काम झाल्यावर जाण्यास निघाला असता बोधिसत्त्व त्याला म्हणाला, "बाळा, या खाटेचे पाय वरखाली झाल्याने ती डलमळते. तेव्हा एका पायाला काही तरी टेका देऊन मग जा." शिष्याला दुसरा काही टेका भेटला नसल्याने खाटेच्या पायाला मांडीचा टेका देऊन त्याने सारी रात्र तिथेच काढली. सकाळी जेव्हा ही गोष्ट बोधिसत्त्वाला समजली तेव्हा त्याच्या मनाला ती फार लागली. "हा माझा विद्यार्थी माझ्यावर फार प्रेम करतो, माझ्याकडून ह्याचे काहीच हित होत नाही. बाकीचे विद्यार्थी पुढे पुढे जात असून याला अगदी सुरुवातीचे पाठ देखील येत नाहीत. याला शिकविण्याला काहीतरी मार्ग सापडेल काय?" अशा विचारात बोधिसत्त्व निमग्न होऊन गेला. आणि त्याने मोठ्या प्रयासाने एक युक्ती शोधून काढली._
_दुसऱ्या दिवशी दुपारी तो विद्यार्थी जंगलात गेला असता त्याला एक साप दिसला. घरी आल्यावर त्याने सर्व माहिती आपल्या गुरुस सांगितली. तेव्हा आचार्य म्हणाले, "तो साप कसा होता? एखादी उपमा देऊन त्याचे वर्णन कर." शिष्य म्हणाला, "तो नांगराच्या इसाडासारखा होता." आचार्याला शिष्याने केलेल्या उपमेने फार आनंद झाला. साप नांगराच्या इसाडासारखा असावयाचा तेव्हा शिष्याची अवलोकनशक्ती हळूहळू वृद्धिंगत होत जाईल अशी गुरूला बळकट आशा वाटू लागली._
_काही दिवसांनी शिष्याला जंगलात फिरत असता एक हत्ती दिसला. त्याने ताबडतोब गुरूला ही गोष्ट सांगितली. तेव्हा गुरूने हत्ती कसा असतो असा प्रश्न केला. शिष्याने रोकडा जबाब दिला की, नांगराच्या इसाडासारखा. बोधिसत्त्वाला वाटले की, हत्तीची सोंड नांगराच्या इसाडासारखी असते; परंतु मंदबुद्धीमूळे याने सर्वच हत्ती नांगराच्या इसाडासारखा असतो अशी उपमा केली असावी. विचार करिता करिता हा सुधारल्याशिवाय राहणार नाही._
_शिष्याने आपल्या मित्राबरोबर दुसऱ्या दिवशी एक उंस खाल्ला व घरी जाऊन ही गोष्ट आपल्या गुरूला सांगितली. बोधिसत्त्वाने उंस कसा असतो असा प्रश्न केल्यावर शिष्याने नांगराच्या इसाडासारखा असतो, असा आपला ठरीव जबाब दिला. उंसाचे आणि नांगराच्या इसाडाचे थोडेसे साम्य आहे असे जाणून बोधिसत्त्व काहीं न बोलता उगाच राहिला._
_एके दिवशी त्या शिष्याला आणि त्याच्या कांहीं सहाय्याला एका घरी आमंत्रण होते. त्या गृहस्थाने त्याला दूध, दही वगैरे पदार्थ यथेच्छ खाऊ घातले. शिष्याने ती गोष्ट घरी येऊन आपल्या गुरूला सगळे सांगितले, आचार्याने नेहमीचा प्रश्न विचारला असता शिष्याने त्याचे ठरलेले उत्तर दिले नांगराच्या इसाडासारखे, तेव्हा बोधिसत्त्वाची त्याच्या शिक्षणाबद्दल पूर्ण निराशा झाली. तो म्हणाला, "आजपर्यंत मला याची बुद्धी वृद्धिंगत होईल अशी थोडीबहुत आशा वाटत होती पण या मूर्खाला दही, दूध आणि नांगराचे इसाड यांची सांगड घालण्याला मुळीच दिक्कत वाटत नाही! जणू काय नांगराच्या इसाडाची उपमा याने कायमचीच बनवून ठेवली आहे!"_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२५/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
Monday, 23 November 2020
लोभीपणा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_लोभीपणा_*
*_(सिगाल जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वारणसींतील लोक उसत्वांत यक्षांना मत्स्यमासांदिकांचा बळी देत असत; व यक्षांना प्रसन्न करण्यासाठी मातीच्या भांड्यातून ठिकठिकाणी दारू ठेवीत असत. अशा एका उत्सवाच्या प्रसंगी वारणासीबाहेरील स्मशानात राहणारा एक कोल्हा मध्यरात्र उलटल्यानंतर गटाराच्या रस्त्याने आत शिरला व बलीकर्मासाठी ठेवलेल्या मत्स्यमांसादिकांवर यथेच्छ ताव मारून त्याने मातीच्या भांड्यातील सुरेचे आकंठ पान केले. त्यामुळे पुन्हा गटाराद्वारे बाहेर पडण्याची ताकद त्याच्यात राहिली नाही. तो एका पुन्नाग झाडाच्या झाडीत जाऊन पडला आणि सकाळ झाली तरी तो नशेत असल्याने तसाच झोपून राहिला. एक ब्राह्मण त्या रस्त्याने प्रातः स्नानासाठी चालला होता. त्याला पाहून कोल्हा म्हणाला, "अहो! तुमच्यापाशी माझे काही काम आहे. जरा एका बाजूला याला तर ते तुम्हाला सांगेन. तुमच्याच फायद्याचे आहे, तेव्हा वेळ गेल्यावर तुम्हाला वाईट वाटणार नाही." ब्राह्मण त्याच्या जवळ गेल्यावर तो त्याला म्हणाला, "तुमची वस्त्रे पाहून तुम्ही दारीद्रावस्थेत गांजले आहात असे वाटते. तुमची ही परिस्थिती पाहून मला तुमची फार दया आली आणि माझ्याजवळ असलेले दोनशे कार्षापण तुम्हाला दान करावे असा मी निश्चय केला आहे. पण दिवसा ढवळ्या मला तुमच्या बरोबर शहरांतील रस्त्यावरून जाता येणार नाही. तुम्ही जर तुमच्या उपरण्यात गुंडाळून मी सांगितलेली ठिकाणी घेऊन जाल, तर आजच्या आज ते कार्षापण तुमच्या हवाली करतो."_
_त्या लोभी ब्राह्मणाला दारुड्या कोल्ह्याचे म्हणणे खरे वाटले. त्याने आपल्या उपरण्यातुन त्याला गावाबाहेर स्मशानात नेले. तेथे खाली ठेविल्याबरोबर उपरण्यात देहधर्म करून कोल्ह्याने जंगलांत पळ काढला._
_त्याठिकाणी बोधिसत्त्व राहत होता. तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, "हे कोल्ह्यावर विश्वास ठेवून तू आपली फजिती करून घेतलीस. त्याच्यापाशी शंभर कवड्याही मिळावयाच्या नाहीत मग दोनशे कार्षापण कोठून असणार? आत्ता तुझे उपरणे धुऊन मुकाट्याने चालता हो आणि द्रव्यलोभामुळे पुनः असा फसू नकोस."_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२३/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
वाईट परिस्थितीत वाढलेला प्राणी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_वाईट परिस्थितीत वाढलेला प्राणी_*
*_(अकालरावी जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदा बोधिसत्त्व औदीच्य कुळांत जन्मला होता. वयांत आल्यावर शास्त्राध्ययन करून वाराणसीत उत्तम आचार्य म्हणून तो प्रसिद्धीस आला. त्याच्याजवळ पाचशे विद्यार्थी अध्ययन करीत असत. त्या विद्यार्थ्यांजवळ वेळेवर आरवणारा कोंबडा होता. त्याच्या आरवण्याने ते जागे होत आणि अध्ययनाला सुरुवात करीत असत. तो कोंबडा काही काळानंतर मरण पावला. तेव्हा दुसऱ्या एखाद्या कोंबड्याच्या शोधात त्यांनी काही दिवस घालविले. एके दिवशी त्यातील एक तरुण विद्यार्थी स्मशानाच्या जवळ लाकडे गोळा करीत असताना त्याला तिथे एक सुंदर कोंबडा सापडला. त्याला आणून त्या विद्यार्थ्यांनी त्या कोंबड्याला आणून आपल्या जागेत ठेवले आणि त्याची उत्तम काळजी घेतली. पण हा कोंबडा कोणत्याही वेळी आरवून त्यांना त्रास देऊ लागला. एखाद्या वेळी तो मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्याने ओरडत असे आणि विद्यार्थ्यांना पहाट झाली समजून ते जागे होऊन अभ्यासाला लागत. आणि नंतर जेव्हा त्यांच्या गुरुजवळ ते शिकत तेव्हा त्यांचे डोळे झोपेने जड होत असे. एखाद्या वेळेत तो सकाळ झाली तरी ओरडत नसे आणि विद्यार्थ्यांना वाटे अजून पहाट झाली नाही म्हणून ते तसेच झोपून राहत असत. सकाळी गुरुजवळ जाऊन अभ्यास करावा तर त्यांची तशी तयारी झालेली नसते. हा प्रकार होऊ लागला तेव्हा त्यांनी त्या कोंबड्याला मारून टाकले आणि आपल्या आचार्यांजवळ जाऊन ते म्हणाले, "गुरुजी, काही दिवसांपूर्वी आणलेल्या कोंबड्याने आम्हाला फार त्रास दिला, भलत्याच वेळी आरवण्यामुळे आमच्या अभ्यासात फारच व्यत्यय येत होता."_
_आचार्यांनी तो कोंबडा कोठून आणला याची सर्व माहिती विचारून घेतली आणि ते म्हणाले, *"हा कोंबडा आईबापाशिवाय वाढलेला. आचार्याचा सहवास त्याने कधीही केला नाही. तेव्हा काल आणि अकाल तो जाणत नसला तर त्यात नवल कोणते? योग्यायोग्य जाणण्यास प्राणी चांगल्या परिस्थितीतच जन्मला असला पाहिजे."*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२४/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
Sunday, 22 November 2020
अतिपांडित्याचा परिणाम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_अतिपांडित्याचा परिणाम_*
*_(फूटवाणिज जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदा बोधिसत्त्व वाराणसी नगरींत वाणिजकुळात जन्मला होता. त्याचे पंडित नाव ठेवण्यात आले. दुसरा एक अतिपंडित नावाचा समानवयस्क वाराणसीत राहत होता. वयांत आल्यावर बोधिसत्त्वाने त्याचा भागीदार होऊन उद्योग धंदा करण्यास सुरुवात केली. त्या दोघांना उद्योगात बराच नफा झाला, परंतु जेव्हा नफ्याची वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा अतिपंडित म्हणाला, "मला दोन हिस्से मिळायला पाहिजे, आणि तुला एकच हिस्सा मिळायला हवा."_
_बोधिसत्त्व म्हणाला, "हे कसे! आपण दोघांनी सारखीच मेहनत केली आणि आपले सारखेच भांडवल होते. मला तुला दोन हिस्से आणि मला एक हिस्सा का म्हणून?"_
_अतिपंडित म्हणाला, "अरे, माझ्या नावाची किंमत मोठी आहे. तू केवळ पंडित आहेस आणि मी अतिपंडित; यासाठीच मला दोन हिस्से मिळणे रास्त आहे."_
_अतिपंडिताच्या या तर्कवादाने बोधिसत्त्वाचे समाधान झाले नाही. तेव्हा अतिपंडिताने त्याची समजूत घालण्याची दुसरी एक युक्ती शोधून काढली. तो म्हणाला, "तुला जर माझे म्हणणे पटत नसेल तर आपण उद्या या गावाजवळ प्रसिद्ध असलेल्या एका वृक्षदेवतेजवळ जाऊ, तिला आपल्या दोघांचे म्हणणे काय आहे ते सांगू आणि ती जसा निवाडा करील त्याप्रमाणे वागू."_
_दुसऱ्या दिवशी अतिपंडिताने आपल्या म्हाताऱ्या पित्याला त्या ठरलेल्या ठिकाणी वृक्षाच्या वळचळणीत दडविले, व आपआपले म्हणणे कळवून निवाडा मागितला. अतिपंडिताच्या पित्याने आवाज बदलून आपल्या मुलाच्याकडून न्याय दिला. तेव्हा बोधिसत्त्व रागाने म्हणाला, "ही देवता मोठी लबाड दिसते. हिला या ठिकाणी राहू देणे इष्ट नाही."_
_असे बोलून त्याने आसपास पडलेली लाकडे पाचोळा वगैरे गोळा करून त्या वृक्षाभोवती पसरून त्याला आग लावून दिली. बिच्चारा अतिपंडिताचा बाप धुराने गुदमरून गेला, आणि जळून जाण्याच्या भीतीने एका फांदीला लोंबकळून त्याने खाली उडी मारली. आणि तो म्हणाला, "मुलगा पंडिता झाला म्हणजे बस्स आहे, पण अतिपंडित नको! माझा मुलगा अतिपंडित झाला म्हणून माझ्यावर हा भयंकर प्रसंग ओढावला."_
_ही लबाडी उघडकीस आल्यामुळे अतिपंडिताच्या नफ्याचा अर्धा हिस्सा देऊन बोधिसत्त्वाशी तडजोड करणे भाग पडले._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२२/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
Friday, 20 November 2020
नावाची फारशी किंमत नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_नावाची फारशी किंमत नाही_*
*_(नामसिद्धी जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एके काळी बोधिसत्त्व तक्षशिला नगरीत प्रसिद्ध आचार्य होऊन पाचशे शिष्यांना शिकवीत असे. त्यातील एकाचे नाव *पापक* असे होते. "कायरे पाप्या, इकडे ये रे पाप्या" असे लोक त्याला म्हणत असत. त्यामुळे कंटाळून जाऊन तो आपल्या गुरूला / बोधिसत्त्वाला म्हणाला, "गुरुजी, मला माझे नाव अमंगल वाटते. दुसरे एखादे चांगलेसे नाव मला द्या."_
_बोधिसत्त्व म्हणाला, "येथल्या येथेच चांगले नाव घेण्यापेक्षा देशपर्यटन करून एखादे चांगले नाव पाहून ये, आणि मला सांग, म्हणजे आम्ही सर्वजण तुला त्याच नावांर हाक मारीत जाऊ."_
_दुसऱ्या दिवशी पापकाने दुसऱ्या गावी जाण्यासाठी शिदोरी बांधून सकाळीच दुसऱ्या गावाचा रस्ता धरला. वाटेत ज्याच्या त्याच्या नावाचा अर्थ पाहात तो जाऊ लागला. वाटेत एका शहराजवळ आला असता काही लोक प्रेत घेऊन स्मशाणयात्रेला चालले होते. तेव्हा पापक म्हणाला, "कायहो इतकी मंडळी कोठे चालली?"_
_ते लोक म्हणाले, "जीवक नावाचा आमचा एक मित्र मरण पावला त्याच्या अंत्यविधीला आम्ही जात आहो." "पण काय हो! जीवक मरतो हे कसे?"_
_"जीवक असो वा अजीवक असो, मनुष्य म्हटला की तो मरणारच, मरण कोणालाच चुकले नाही. व्यवहारापूरताच काय तो नावाचा उपयोग. तू अगदीच खुळा दिसतोस!" असे त्यांनी उत्तर दिले._
_बिचारा पापक चांगल्या नावाचा हा विपर्यास पाहून आश्चर्यचकित झाला. तो तसाच पुढे जातो तो एका दासीला वेळेवर काम करीत नाही, म्हणून तिचा मालक रस्त्यावर चाबकाने मारत होता. तो त्याला म्हणाला, "या बाईचे नाव काय व हिला तुम्ही का मारता?"_
_तो म्हणाला, "हिचे नाव धनपाली आणि ही वेळेवर काम करीत नसल्याने मी हिला मारत आहे."_
_"अहो पण धनपालिवर दुसऱ्याचे काम करण्याचा प्रसंग का यावा?"_
_"अहो काय मूर्खांसारखे प्रश्न विचारता? ही जन्माचीच दासी आहे. धनपाली असे नाव ठेविले म्हणून काय झाले? धनपाली असू द्या किंवा अधनपाली असू द्या. गरिबी यायची असेल तर आल्यावाचून राहात नाही. नावाने कोणताच कार्यभाग व्हावयाचा नाही, ते केवळ व्यवहारापूरते आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत नसावी, हे मोठे आश्चर्य आहे."_
_बिचारा पापक चांगल्या नावाच्या मंगलत्वाविषयी जवळ जवळ निराश होऊन तसाच पुढे चालला. शहराच्या बाहेर गेल्यावर काही अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक माणूस त्याला दिसून आला. पापकाने त्याला हिकडे फिरण्याविषयी विचारपूस केलीआणि तसेच त्याचे नाव विचारले, तेव्हा तो म्हणाला, "माझे नाव पंथक (वाटाड्या), मी वाट चुकल्यामुळे इकडे तिकडे फिरत आहे. मला अजून माझा मार्ग सापडला नाही."_
_"पण पंथक वाट चुकतो हर कसे?"_
_"अहो हे फक्त माझे नाव आहे. वाट चुकण्याचा आणि याचा काहीच संबंध नाही. तुम्ही नांवावर भरवसा ठेवणारे वेडगळ दिसता!"_
_पापक चांगल्या नावाच्या गुणांविषयी पूर्ण निराश झाला व आपले नाव बदलण्याचा बेत त्याने रद्द केला. तेथून आपल्या गुरुजवळ जाऊन घडलेले सर्व वर्तमान त्याने सांगितले. त्याच्या मित्रांनी पापकाने कोणते नाव शोधून आणले असा बोधिसत्त्वाला प्रश्न केला. तेव्हा तो त्याला म्हणाला, "जीवक मरतो, धनपालिला दारिद्र येते व पंथक वाट चुकतो, हे पाहून आपला पापक चांगल्या नांवाचा थांग लागल्यावाचूनच परत आला." पापकाने तेच नाव कायम ठेवले हे निराळे सांगावयास नको._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२१/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
Thursday, 19 November 2020
निर्वाण / निब्बान
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_निर्वाण / निब्बान_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_मनाचे परिवर्तन अकुसलांसाठी पुर्णपणे थांबण्याची अवस्था, मनाच्या पूर्ण विश्रांतीची अवस्था, इच्छा, लालसा व दुःखाच्या अभावाची अवस्था, निर्वाणप्रत
पोहोचण्यापूर्वी मनुष्याचा सतत पुंनर्जन्म होतो; जेव्हा तो
निर्वाणप्रत पोहोचतो, तेव्हा त्याचा पुन्हा जन्म होत नाही. (कारण
मनाच्या अवस्थेचे परिवर्तन होणे थांबलेले असते.)_
_*आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गाचे अंतिम
ध्येय म्हणजेच निर्वाण होय. निर्वाणाचा
अर्थ – रोगाद्वेषापासून मुक्ति.* राध नावाचे स्थवीर भगवंताकडे गेले, तेव्हा निर्वाणाचा उद्देश स्पष्ट करताना भगवंतांनी सांगितले, *श्रेष्ठ जीवन निर्वाणाश्रीत आहे. निर्वाण हेच लक्ष्य होय आणि निर्वाण
हाच उद्देश होय. “निर्वाण” म्हणजे मनाच्या विकारांपासून मुक्ति, निर्वाण स्थितीत राहून पुण्यशील असे सर्वश्रेष्ट जीवन जगता येते. निर्वाण
हे आर्य अष्टांगिक मार्गावरील अंतिम लक्ष्य होय. मनाचे विकार नष्ट झाले म्हणजे उरलेले
जीवन निर्वाणाच्या स्थितीमध्ये सुखाने जगता येते.*_
_केवळ “योगाभ्यासाने” निर्वाणप्राप्ती होऊ शकत नाही. योगाभ्यास करण्यात
तत्पर असलेल्या आयुष्यमान मेघियच्या मनात तीन प्रकारचे संकल्प – विकल्प वारंवार
येऊ लागले होते.-_
१.कामभोगासंबंधी संकल्प – विकल्प
२.व्यापाद
(क्रोधा) संबंधी संकल्प – विकल्प
३.विहिंसे
(हिंसे) संबंधी संकल्प – विकल्प
_आयुष्यमान मेघियने संध्याकाळी भगवंतांकडे जाऊन ही गोष्ट सांगितली. भगवंत
म्हणाले, “मेघिय! योगाभ्यासाला आरंभ करण्यापूर्वि अपिरपक्व
मनाच्या व्यक्तीने आपल्या मनाला परिपक्व बनविले पाहिजे. याची साधने अशी –_
१.सत्संगती
२.सदाचार
(धम्म)
३.सदुपदेश
४.सदाचरण
५.प्रज्ञावान
होणे
_“मेघिय!
ह्या पाच गोष्टीत प्रवीण झाल्यावर भिकखुला -_
१.आसक्तीचा
नाश करण्याकरिता अशुभ भावना (शरीराच्या घृणास्पद स्वरूपाची कल्पना) केली पाहिजे.
२.वितर्काचा
नाश करण्याकरिता आना-पान स्मृतिची (श्वासोच्छवास करताना जागृत राहण्याची) भावना
केली पाहिजे.
३.क्रोधाचा
नाश करण्याकरिता मैत्रीची भावना केली पाहिजे.
४.अहंकाराच्या
नाशाकरीता अनित्यतेची भावना केली पाहिजे.
५.अनात्मसंज्ञी
होण्याकरिता सुद्धा अनित्यतेची भावना करणे अनिवार्य आहे.
_*जेव्हा अहंकाराचा समूळ नाश
होतो तेव्हा ह्याच जन्मी तो निर्वाणास प्राप्त होतो.*_
_*चितन पाच प्रकारचे आहे –*_
१)
प्रथम ध्यान हे प्रेममय
मैत्रीध्यान होय. त्यात ध्यानकर्त्याने आपल्या अंतःकरणात असे भरवून घ्यायला पाहिजे
की, तो संपूर्ण प्राणिमात्रांच्या सुखाकरिता व त्याचप्रमाणे त्याच्या
शत्रूंच्या सुखाकरिता देखील त्याने उत्कट ईच्छा करावी
२)
द्वितीय ध्यान हे करूणामय ध्यान
होय. त्यांत त्याने असा विचार करावयास पाहिजे की, सर्वच
प्राणिमात्रांचे जीवन दुःखाने भलेले आहे. त्यांच्या दुःखाची व चिंतेची हुबेहूब
कल्पना करुन त्यांच्याविषयी अतीव करुणा जागृत करावी
३)
तृतीय ध्यान म्हणजे हर्षमय ध्यान
म्हणजेच मुदिता होय. दुसर्यांच्या उत्कर्षाचा विचार करावा. त्यांच्या आनंदाने
स्वतः आनंदी व्हावे.
४)
चतुर्थ ध्यान म्हणजे
अपवित्रतेवरील ध्यान म्हणजेच उपेक्षा होय. अप्रामाणिकपणाचे गल व अकुशल कर्माचे
दुष्परिणाम ह्यांचा विचार करावा. क्षणिक सुख नेहमीच कसे क्षुद्र असते व त्याचे
परिणाम कसे प्राणघातक असतात, याचा विचार करावा.
५)
पाचवे ध्यान प्रसन्नतेवरील ध्यान
होय. त्यात आपल्या मनाला प्रेम व द्वेष, जुलूम व दास्य, समृद्धी व न्युनता या भावनांच्या मर्यादेबाहेर येऊन स्वतःच्या
प्रारब्धाचा निःपक्षपातपणे व अतिशय धिरगंभीरपणे विचार करायला हवा.
मनुष्य या ध्यानांद्वारे अभिज्ञेत
पोहोचतो.
_*अभिज्ञा सहा प्रकारच्या आहेत –*_
१. दिव्यचक्षु
२. दिव्यश्रवण शक्ति
३. दिव्य रूपशक्ती – कोणतेही रूप
धारण करण्याचे सामर्थ्य
४. पूर्व निवासामृती – पूर्व जन्माच्या
(म्हणजे जेवढी मानसिक परिवर्तने झाली त्यांच्या स्मृति)
५. परचित्तविजानन – दुसर्यांचे विचार
समजण्याचे सामर्थ्य
६. आसवक्षयज्ञान – जीवनाच्या प्रवाहाची
परिपूर्णता उमजण्याचे ज्ञान
*_ह्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. परंतु प्रत्येक मनुष्य त्यांना प्राप्त करू
शकतो. अभिज्ञेत पोहोचावायची पाच ध्याने आहेत._*
_जिच्याद्वारे एखादा मनुष्य मनोविकारांना शांत करून ज्ञान प्राप्त करू शकतो
आशा ध्यानाच्या दोन मुख्य क्रिया – समथ आणि विदस्सना –_
१. पवित्र जीवन जगून आणि तृष्णेला जिंकण्याचे
सतत प्रयत्न करून मनोविकारांवर विजय मिळविणे
२.
मनन व चिंतंनाद्वारे अलौकिक प्रज्ञेची
प्राप्ती करून घेणे
ह्या दोहोंपैकी प्रत्येकीच्या वेगवेगळ्या
वीस मुद्रा आहेत.
_*ज्ञानाच्या अंतिम अवस्थेत आणि समाधीच्या स्थितीत मन कोरे असते आणि विचार थांबलेला
असतो असे नाही आहे. तिच्या अगदी विरुद्ध स्थिति असते.* त्या अवस्थेत अंतर्मनाच्या दक्षतेची
पराकाष्ठा होते आणि ज्ञान आत्मसात करावयाचे सामर्थ्य त्यानुसारच विस्तीर्ण झालेले असते.
ज्याप्रमाणे उंच टेकड्यांमधील अरुंद पाऊलवाटेवरून चालणार्या मनुष्याचा दृष्टीकोण संकीर्ण
होतो, त्याचप्रमाणे सामान्य जागृत अवस्थेत असताना माणसाचा दृष्टीकोण
संकीर्ण असतो. गरुडाने उंच आकाशात भरारी मारून स्थिरपणे असताना उंचावरून त्याला ज्याप्रमाणे
संपूर्ण प्रदेशावर नजर टाकता येते, त्याचप्रमाणे माणसाला ज्ञानाच्या
व समाधीच्या सर्वोच्च अवस्थेत असताना, त्याच्या भव्य दृष्टिपथात
येणार्या संपूर्ण ज्ञानाचे तत्क्षणीच आकलन होते. विचार थांबलेला नसतो, तो अतिशय तीव्र स्वरुपात प्रखर असतो. परंतु स्वतःविषयी नसून बहुजनहिताय बहुजनसुखाय
असतो._
_*निरोध आणि निर्वाण*_
_*तृष्णेचा निरोध होणे म्हणजेच निर्वाण होय.* संसारीक अज्ञात पुरुष इंद्रियांच्या
विषयोपभोगात डुंबून आनंद मानतात. ते वारंवार जन्म घेतात, त्यांच्या
मनात तृष्णामय विचारांची उथळ पुथळ सुरू असते जरा, मरण ह्यांचे
वारंवार दुःख भोगतात. परंतु ज्ञानी आर्यश्रावक इंद्रियांच्या सुखोपभोगापासून अलिप्त
राहतात. त्यामुळे त्यांच्या “तृष्णेचा निरोध” होतो आणि तृष्णेचा
निरोध की, “उपादानाचा निरोध” होतो. उपादानाचा निरोध झाला की, “भवचा निरोध होतो. भवचा निरोध झाला की, “जन्म घेणे”
बंद होते आणि पुनर्जन्माच्या निरोधाने जन्म, जरा, मरण, शोक इ. दुःखांचा निरोध होतो, अशा तर्हेने तृष्णेचा निरोध म्हणजेच निर्वाण प्राप्त होणे होय._
_*पुण्य करणारे, स्वीकारण्यास योग्य अशा धम्मालाच मानणारे, जाणून घेण्यास योग्य अशा धम्मालाच जाणणारे, अनुचित धर्माचा
त्याग करणारे, योग्य धम्माचा अभ्यास करणारे व साक्षात्कार करण्याजोगा धम्माचा
प्रत्यक्ष साक्षात्कार करणारेच “निर्वाण” प्राप्त करतात. थोडक्यात आर्य-अष्टांगिक मार्गाचे
अनुसरण करणार्यांना निर्वाण प्राप्त होते.*_
_*निर्वाणानंतर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा लोप होत नाही. निर्वाणानंतर मनुष्य जन्ममृत्युच्या फेर्यापासून (म्हणजे तृष्णामय वैचारिक
चक्रापासून) मुक्त होतो. त्याचा तृष्णामय जिवनप्रवाह नेहमीकरता बंद होतो व कुशल जीवनप्रवाह
सुरू होतो आणि उपादानाचा एकदम अंत झालेला असतो.*_
*_निर्वाण काहीसे स्वर्गीय स्थळासमान किंवा स्वर्गासमान आहे असे बौद्धधम्म शिकवीत
नाही. जेव्हा कुटदंताने भगवंतांना विचारले, “निर्वाण कोठे आहे?’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले कि, “जेथे जेथे नीतीपर उपदेशांचे
म्हणजे आर्य – अष्टांगिक मार्गाचे पालन केले जाते तेथे तेथे निर्वाण असते.”_*
_निर्वाणाप्रत पोहोचण्याच्या हेतूने आपण कुशल कर्म केले पाहिजे, असे बौद्धधम्म शिकवितो. निर्वाणप्राप्तीचा उद्देश समोर ठेवून कुशल कर्मे करीत
राहिल्याने कालांतराने तृष्णा हळूहळू नष्ट होत जाऊन मनुष्यास निर्वाणाची प्राप्ती होऊ
शकते. पूर्णतः निःस्वार्थीपणाचाच प्रतिशब्द म्हणजे निर्वाण. “मी”, “अहं” याचे सत्याला पुर्णपणे शरण जाणे, म्हणजेच निर्वाण.
ह्या पृथ्वीवर जिवंतपणीच प्रत्येकाला निर्वाणाची अवस्था प्राप्त होऊ
शकते._
*_निर्वाणाची
अवस्था_*
_निर्वाण केवळ सुखाची अवस्था असून तिच्यात दुःखाचा लवलेशही नसतो. खरे पाहता
निर्वाण प्राप्त करण्याकरिता, निर्वाणाचा शोध घेण्याकरिता, दुःख भोगावे लागते. शरीराला व मनाला अंकित करून सर्व इंद्रियांवर ताबा मिळवावा
लागतो. शारीरिक व मानसिक बंधने तोडवी लागतात. त्यामुळे निर्वाणापूर्वीच्या अवस्थेत
दुःख भोगावे लागले तरी, निर्वाणानंतर सुखच मिळते. शिलावर प्रतिष्ठित
होऊन, मनाला अंकित केल्यावर मनुष्य कुठेही असो तो निर्वाणाचा
साक्षात्कार करू शकतो, म्हणून “शील” हे निर्वाणाचे मूळ आहे. शिलाशीवाय
निर्वाणाचा साक्षात्कार होऊच शकत नाही._
*संकलन : महेश कांबळे*
*संदर्भ :*
१) मिलिंद प्रश्न
२) बौद्ध प्रश्नोत्तरी
३) तथागताची सत्यगाथा
४) बौद्धधर्म – एक बुद्धिवादी अध्ययन
५) बौद्धधम्म जिज्ञासा
दिनांक : २०/११/२०२०
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोलित सुत्त
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _'कोलित सुत...
-
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 * _दिवाळी बौद्धांचा सण....? _* https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_2.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _६...
-
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_ अहिंसा _* *_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_* https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_9.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...
-
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 *_ माराच्या दहा सेना _* https://mikamblemahesh.blogspot.com/2021/07/blog-post_10.html 🪷🪷...