Monday, 30 November 2020

तिस्सा (पहिली)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *४ तिस्सा (पहिली)* _श्रावस्तीमधील एका शाक्य कुळांत तिस्साचा जन्म झाला होता. तिने महापजापती गोतमीकडे प्रव्रज्जा घेऊन निर्वाण साधण्याचा ती प्रयत्न करू लागली. पुण्णा भिक्खुणीप्रमाणेच तिच्याप्रती अभिप्रेत बुद्धगाथा ऐकली व त्या गाथेची पुंनरावृत्ति वारंवार करू लागली. कालांतराने ही गाथा तिस्सा (तिष्या) हिच्या नावाने ओळखली जाऊ लागली._ *_तिस्से! तू शिक्षण घे. त्याचा प्रयत्न सोडू नकोस. सर्व (सांसारिक) बंधनापासून विमुक्त होऊन व अनाश्रव (निर्मल चित्त) होऊन जगात विचरण कर ||४||_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ : - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *०१/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

दांभिक कोल्हा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
*_दांभिक कोल्हा_* 
*_(अग्निकजातककथा)_* 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

 
                            _एका काळीं बोधिसत्त्व उंदराच्या कुलात जन्मला होता. वयांत आल्यावर पुष्कळ उंदरांचा राजा होऊन तो अरण्यांत एका गुहेंत रहात असे. त्या अरण्यांत एके दिवशीं गवताला आग लागून वणवा पसरला. त्यात एक कोल्हा सांपडला. पळावयास दुसरी वाट न सांपडल्यामुळें त्यानें एका झाडाच्या बुंध्याचा आश्रय घेतला. बुंध्याला डोकें टेंकून तो तेथें मृतप्राय पडून राहिला. जवळपास गवत नसल्यामुळें तो भाजून मेला नाहीं. परंतु त्या दावाग्नीच्या ज्वालांनीं त्याच्या अंगावरील सर्व केस जळून गेले. डोकें बुंध्याला टेकलें असल्यामुळें त्यावर मात्र शेंडीसारखे वर्तुलाकार केस राहिले. एके दिवशीं पाणी पिण्यास गेला असतां आपली पडछाया पाहून त्याला मोठा चमत्कार वाटला. धार्मिक ब्राह्मणासारखी डोक्यावर तेवढी शेंडी, आणि बाकी अंग गुळगुळीत. तो आपल्याशींच म्हणाला, ''शहाणा मनुष्य विपत्तीचा देखील फायदा करून घेतो. आगींनें होरपळून गेल्यामुळें जरी माझें नुकसान झालें आहे, तथापि या शेंडीचा चांगला उपयोग करून घेतां येईल.''_ 

                                 _बोधिसत्त्वाचें निवासस्थान त्याला माहीत होतें; परंतु त्याच्या गुहेंतील शतमुखी बिळांत त्याचा शिरकाव होणें केवळ अशक्य होतें. पण ते लठ्ठ लठ्ठ उंदीर या कड्यावरून त्या कड्यावर उड्या मारीत असतांना पाहून त्याला तोंडाला पाणी सुटत असे. या नवीन शेंडीचा फायदा घेऊन आपला कांहीं डाव साधेल तर पहावा या हेतूनें त्यानें बोधिसत्त्वाच्या बिळापासून कांहीं अंतरावर तपश्चर्येला सुरुवात केली. आकाशाकडे पहात दोनच पायांवर उभें रहावें. तोंड वासून सूर्याकडे टकमक बघत बसावें, इत्यादि तपश्चर्येचे प्रकार त्यानें आरंभिले. त्याला पाहून बोधिसत्त्वाला वाटलें कीं हा कोणीतरी मोठा धार्मिक प्राणी असावा. तो कोल्ह्याजवळ जाऊन त्याला म्हणाला, ''बाबारे, हें तूं काय चालविलें आहेस ? कोल्हा म्हणाला, ''आयुष्याचे दिवस प्राण्याच्या हिंसेंत आणि दुसर्याा अनेक पापकृत्यांत गेल्यामुळें मला दृढतर पश्चात्ताप झाला आहे. आणि त्या कृत्यांच्या परिमार्जनासाठीं घोर तपश्चर्या करण्याचा माझा निश्चय झाला आहे. यापुढें कोणत्याही प्राण्याला न दुखवितां त्यांची सेवा करावी. सर्व प्रकारें त्याच्या उपयोगी पडावें हेंच माझें व्रत आहे. तुम्हाला जर माझा कांहीं उपयोग झाला तर मला धन्य समजेन !''_ 

                             _मूषकराज म्हणाला, ''आम्हाला तुमच्यापासून कांहीं नको आहे. तुम्ही सत्पुरुष आहा तेव्हां तुमच्या सारख्याच्या सहवासानें आमच्यावर फार मोठे उपकार होणार आहेत. तुम्ही या प्रदेशांत राहिलांत म्हणजे आम्हाला तुमचें वारंवार दर्शन होऊन मोठें पुण्य संपादण्याचा मार्ग खुला होईल.''_

                             _कोल्हा म्हणाला, ''हें सर्व खरें आहे. तथापि माझ्या तपश्चर्येला बळकटी आणण्यासाठीं मी तुमची सेवा करूं इच्छित आहे. लहानपणीं मी गणित शिकलों होतो, त्याचा मला येथें चांगला उपयोग होईल, तुम्ही सर्व उंदीर चरावयाला जात असतांना मी तुमची संख्या मोजीत जाईन व त्याप्रमाणेंच बिळांत जात असतां गणना करून एखादा दुसरा उंदीर हरवला तर आपल्याला कळवीत जाईन._ 

                                 _बोधिसत्त्वाला ही गोष्ट फारच पसंत पडली. उंदराच्या कळपाची यायोगें अभिवृद्धि होईल असें त्यास वाटलें; व कोल्ह्याच्या विनंतीस त्यानें होकार दिला. तेव्हां कोल्हा म्हणाला, ''मी तुमच्या कळपाची गणना करीत असतां तुम्हीं सध्यांच्याप्रमाणें झुंडीनें जातां कामा नये. क्रमशः एक एकानें सरळ माझ्या जवळून गेलें पाहिजे. बोधिसत्त्वानें ही कोल्ह्याची अट संतोषानें कबूल केली._ 

                     _दुसर्याच दिवसापासून कोल्ह्याच्या गणनेला सुरुवात झाली. सगळे उंदीर त्याजवळून गेल्यावर शेवटल्या उंदरावर झडप घालून त्याला तो तेथेंच उडपून टाकीत असे व आपल्या पोटाखालीं झाकून ठेऊन इतर दूर गेले म्हणजे मग त्याचा फळहार करीत असे. बोधिसत्त्वाची आणि त्याच्या कळपांतील उंदीरांची अशी दृढ समजूत होती कीं, कोल्हा मोठा धार्मिक असून तो तपस्व्याप्रमाणें आपला निर्वाह पाण्यावर आणि फलमूलावर करीत आहे. आणि म्हणूनच आपल्या कळपांतील उंदीर कमी होत जातात याचें कारण काय हें समजण्यास त्यांना बराच विलंब लागला. परंतु हा प्रकार फार दिवस चालणें शक्य नव्हतें. दिवसेंदिवस कळप क्षीण होत चालला. हे उंदीर गेलें कोठें बरे ? हें बोधिसत्त्वाला समजेंना. कोल्ह्याला विचारावें तों तो म्हणे कीं, कळपांतील उंदरांची संख्या बरोबर आहे. सकाळीं संध्याकाळीं गणना करून आपणाला त्यांत कांहीं न्यून आढळून येत नाहीं. परंतु बोधिसत्त्वाला त्याच्या सचोटीची अधिकाधिक शंका येऊं लागली. एके दिवशीं रोजच्याप्रमाणें गणनेच्या वेळीं सर्वाच्या पुढें न जातां तो दडून बसला व सर्व पुढें गेल्यावर आपण हळूंच मागून निघाला. कोल्ह्यानें वहिवाटीप्रमाणें त्यावर झडप घातली. परंतु बोधिसत्त्व अत्यंत सावध असल्यामुळें त्याला झपाट्यासरशीं पकडतां आलें नाहीं. इतक्यांत बोधिसत्त्वानें कोल्ह्याच्या नरडीवर उडी टाकून कडकडून चावा घेतला तेव्हां तो दांभिक कोल्हा वेदनेनें विव्हल होऊन मोठ्यानें ओरडू लागला. तें पाहून बोधिसत्त्व त्याला म्हणाला, *''हे दुष्ट कोल्ह्या, धर्माच्या पांघरुणाखालीं तूं आमचे गळे कापीत होतास! लोकांना विश्वास दाखवून त्यांचा घात करणें याला धर्म म्हणत नाहींत! याला पाहिजे तर मार्जारव्रत असें म्हणावें ! ही तुझी शेंडी धर्मज्ञान संपादण्यासाठीं नसून पोटाची खळी भरण्यासाठीं आहे ! या तुझ्या शाट्याचें आतां प्रायश्चित भोग!* कोल्हा तरफडत खालीं पडला असतां बोधिसत्त्वाच्या कळपातील उंदरानीं त्याला तेथेंच ठार केलें._ 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
*संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
*संकलन :- महेश कांबळे* 
*०१/१२/२०२०* 
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

Sunday, 29 November 2020

मानमोडी’ लेणी (खोरे वस्ती)

_*‘मानमोडी’ लेणी (खोरे वस्ती)*_ _कार्तिक पौर्णिमा साजरी करण्यासाठी दिनांक २९/११/२०२० रोजी जुन्नरपासून काही अंतरावर असलेल्या मानमुकडा लेण्यांना ब्राह्मी (धम्म) लिपी कार्यशाळेच्या निमित्तीने भेट देण्याचा योग आला आणि प्राप्त झाली दगडांची भाषा जाणण्याची कला..! सुमारे २२०० ते २३०० वर्षापूर्वीच्या इतिहासाचा पट आपल्या नजरेसमोरुन झरझर ओसरुन जातो.. इतिहास कीतीही गाडला, मोडला, तोडला, फोडला तरी तो पुनुरुज्जीवीत होत असतो. जुन्नर येथील मानमोडी लेणी येथे MBCPR यांनी आयोजित केलेल्या अभ्यास दौर्यागत सहभागी झालो ज्यात आम्हाला आदरणीय अतुल भोसेकर सर यांनी अप्रतीमरित्या लेण्यांची माहिती दिली व लेण्यांचा अभ्यास कसा करावा, लेणी कशी पहावी याची ही माहिती दिली. सर्व आयोजकांचे आणि सरांचे मनःपूर्वक आभार आणि लेण्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :-_ _जुन्नर शहराच्या जवळच १.५ कि.मी अंतरावर उत्तरेस असलेल्या डोंगर रांगामध्ये १.५ कि.मी अंतर विस्तार असलेल्या या लेण्या तिन समुहात पहावयास मिळतात. जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन जो मार्ग दक्षिणेस जातो त्याच मार्गाने पुढे १ कि.मी अंतरावर गेल्यावर उजवीकडे जी डोंगररांग दिसते तेथेच या लेण्या तीन समुहात विखुरलेल्या दिसतात. *लेणी पाहायला फारसे कुणी येत नसल्याने गवत वाढल्याने वा सागाच्या पानगळीने ही वाट बुजून गेलेली असते. जंगल-झाडीतला हा अनुभव घेत अर्धा-एक तासात आपण अंबा-अंबिका लेणीगटापुढे पोचतो.* एक मोठे पटांगण पुढय़ात असलेला कातळावरचा देखावा अचानक समोर येतो. विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशी ही ३३ खोदकामे आहेत. बरीचशी जमिनीलगत ओळीने, तर काही कातळावरच्या भागात आहेत. *‘भीमाशंकर’च्या सतरा लेण्यांनंतर इथे १८ ते ३४ असे क्रमांक लेण्यांना दिले आहेत.* पूर्वेकडून क्रमाने सुरुवातीची दालने साध्या खोल्या आहेत. त्यांच्यासमोर पाण्याची काही कुंडे खोदली आहेत. यातील काही जमिनीखाली दोन टप्प्यांत आहेत. २१ क्रमांकाच्या लेण्यात पाच खोल्या आहेत. आतले खोदकाम खडक ठिसूळ लागल्याने सोडून दिले आहे. लेणे अपूर्ण राहिले, पण बाहेर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एक खंडित शिलालेख या लेण्यामागील कुणा भावांच्या दानधर्माची माहिती मिळते. यानंतर पुन्हा काही खोल्या वजा लेणी आणि पाण्याची कुंडे लागतात. त्याच्या डोक्यावरही एक मजला खोदला आहे. तिथे जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने एक जिना आहे. *पुरातत्व विभागाने जतन-संवर्धन कामांतर्गत हा जिना दुरुस्त केला. पण हे करताना सौंदर्यदृष्टी न ठेवल्याने लेण्यांच्या प्राचीन देखाव्यात नवे बांधकाम नजरेत खुपते.*_ *फार वर्षांपूर्वी या खांबांच्या जतन-संवर्धन प्रक्रियेत त्यांना सिमेंटचा गिलावा चढवला गेला आणि त्यात हे लेख बुजले. नशीब, की हे कृत्य घडण्यापूर्वी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक व ब्राह्मी (धम्म) लिपीच्या तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले यांनी या लेखांचे वाचन नोंदवून ठेवले होते. इतिहासाच्या अभ्यासात अशा नोंदी किती महत्त्वाच्या ठरतात, याचे हे उदाहरण!* या शिलालेखांतून हा डोंगर, इथली लेणी व इथे राहणाऱ्या भिक्षूंच्या संघाविषयी बरीच माहिती मिळते. *या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) या लेखावरूनच कळते. आज दोन हजार वर्षांनंतरही हे नाव ‘मानमोडी’ या अपभ्रंश रूपात वापरात आहे. या लेण्यास किंवा इथे निवास करणाऱ्या संघास ‘गिध विहार’ असेही म्हटले जाई, त्याचाही उल्लेख येतो.* _*मौर्यानंतर इ.स.पुर्व.१८४ नंतर ते इ.स २५० पर्यंत नर्मदेच्या खालचा संपूर्ण प्रदेश सातवाहनांनी समृद्ध व भरभराटीला आणला होता. देशविदेशात व्यापार समृध्द केला तो याच सातवाहनांनी. म्हणूनच सातवाहनांची नाणी क्विंटलच्या प्रमाणात मिळतात. जेव्हा मौर्यांचे प्रांताधिकारी होते तेव्हा पासूनच सातवाहन जुन्नरला राहत होते. मौर्यानंतर त्यांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. महाराष्ट्रात ३० सातवाहन राजे होऊन गेले. व यांनीच जवळपास सर्वच लेण्या कोरल्या आहेत. सादवाह, सातवाहन व सप्तकर्णी ही त्यांचीच नावे होय. त्यांची दानपत्रे,नाणी,ग्रंथ व शिलालेख त्यांनी ब्राम्ही (धम्म) लिपि, पाली प्राकृत लिपीत लिहिले आहे.*_ *_येथील खास भुतलेणी (खोरेवस्ती) वैशिष्ट्य म्हणजे लेणीच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन स्तुपाच्या मधोमध दोन व्यक्ती कोरलेल्या आपणास दिसून येतात. त्यातील एक व्यक्ती गरूड वंशीय तर एक नागवंशिय आहे. गरूडाचे आणि नागाचे वैरभाव किती प्रसिद्ध आहे हे आपणास ठाऊक आहे. परंतु या काळात हे दोन्ही वैरभाव असलेल्या व्यक्ती एकमेकांना किती आदराने जवळ होत्या की तेव्हा वैरत्वाला विसर पाडणारे तत्वज्ञान शिकविले जात होते असा सांस्कृतिक वारसा जपुन ठेवणार जुन्नर हे ऐतिहासिक शहर होत._* _दारातील भारदस्त खांब इथे पाऊल ठेवल्यापासून खुणावत राहतात. बेडसे लेण्याची आठवण करून देणारे हे खांब! दोन पूर्ण, तर बाजूचे दोन अर्धव्यक्त! तब्बल पावणेसात मीटर उंचीचे! एका चौथऱ्यावर घट, त्यातून बाहेर आलेले हे अष्टकोनी खांब, त्यावर पुन्हा उपडा कलश! जणू या लेण्याचे सौष्ठवच या स्तंभांतून डोकावते. या खांबांच्या आत ओसरी, त्यानंतर चैत्यगवाक्षाची भिंत आणि त्यापुढे प्रत्यक्ष चैत्यगृह!_ _पण आतील स्तूप कोरत असताना तो खडक ठिसूळ असल्याचे कलाकारांच्या लक्षात आले आणि त्यांनी काम थांबवले. या चैत्यगृहात शिरण्यापूर्वी डाव्या हाताला एक छोटेसे लेणे दिसते. आत एक सुंदर स्तूप कोरलेला आहे. चैत्यगृहाच्या शेजारी हा स्तूप का बरे खोदला असावा, असा प्रश्न आत शिरताना पडतो. चैत्यगृहातील अर्धवट काम पाहिले की मग त्यामागचे उत्तर कळते. आतील ही उणीव भरून काढण्यासाठी बाहेर हा स्तूप कोरला असावा._ *_वरच्या मजल्यावरील या सलग पाच खोल्यांच्या लेण्यास ३० क्रमांक दिला आहे. या खोल्यांसमोर पूर्वी गच्ची असावी. आज मात्र तिचा बराचसा भाग तुटला आहे. पहिल्या खोलीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस मूळ खोदकामात कोनाडे करत मागाहून दोन शिल्पे कोरली आहेत. डावीकडे जैनांचा क्षेत्रपाल, तर उजवीकडे जैन देवी चक्रेश्वरी! चौथ्या खोलीतही जैन शिल्पकाम दिसते. जैनांचे प्रथम र्तीथकर, बावीसावे र्तीथकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती इथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला अंबा-अंबिका असे नाव मिळाले. मूळ लेणे बौद्धकालीन. दोन हजार वर्षांपूर्वी खोदलेले! त्यात आठव्या-नवव्या शतकात ही जैन कला अवतरली आणि त्याहीनंतर केव्हातरी या देवांना हिंदूंनीही आपलेसे केले. कुठल्याही स्थापत्याविष्काराच्या भल्यामोठय़ा कालखंडात असे बदल स्वाभाविक असतात. हा सारा इतिहास आहे._* _दुसरीकडे स्तूपाविना रिकाम्या चैत्यगृहाचाही इथे आगळा-वेगळा उपयोग करून घेतला आहे. त्याची दर्शनी भिंत, गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर दहा मोठे ब्राह्मी/धम्म लिपीतील लेख कोरले आहेत. त्यांतून ही लेणी, त्यात निवास करणारा संघ, त्याला झालेला दानधर्म आदींची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. या सर्व लेखांचे वाचन झालेले आहे. पण आज मात्र यातले आठच लेख दिसतात. नष्ट झालेले लेख चैत्यगृहातील खांबांवर होते. यातील काही लेखांतून जमिनीच्या दानधर्माचे उल्लेख आहेत. ही जमीन मोजण्यासाठी त्याकाळी ‘निवर्तन’ हे परिमाण वापरले जात असे. आता निवर्तन म्हणजे किती क्षेत्र, हे समजत नाही. या जमिनीवर काही वृक्षलागवडीचे उल्लेखही लेखांत आले आहेत._ *_‘गामे वलाहकेसुकर जभति उदेसेण निवतणानि बारस।। गामसे उरकेसु निवनणानि’_* _हे शिलालेख करंज, आंबा, जांभूळ आदी वृक्षांच्या लागवडीबद्दल सांगतात. या वृक्षलागवडीमागेही काही उद्देश असल्याचा अभ्यासकांचा कयास आहे. करंज हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष! त्याच्या तेलाचा उपयोग तेव्हा ‘अॅकन्टिसेप्टिक’ म्हणून केला जाई. आंबा-जांभळाच्या लागवडीमागे व्यापारी उद्देश ठेवून इथे राहणारा संघ स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात असावा. या जमिनीचे भाग, दिशा, गावांची नोंदही लेखात आहे. जमिनींशिवाय काही पैशांच्या स्वरूपातील देणग्याही यात नोंदवल्या आहेत. त्यांना ‘कार्षांपण’ असे म्हटले जाई. या देणग्या देणाऱ्यांमध्ये बांबूकार म्हणजे बुरूड, कास्यकार म्हणजे तांबट आणि सुवर्णकार म्हणजे सोनार असे विविध थरातील लोक आहेत. यातून या लेणीनिर्माणाला असलेला सामान्य जनतेचा पाठिंबाही दिसतो. *तत्कालीन महाराष्ट्रात ही अन्यधर्मीय वास्तुकला कोरली, रुजली व बहरली त्यामागे या सहभागाची मोठी भूमिका आहे. सहिष्णू आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या या खऱ्याखुऱ्या पाऊलखुणा आहेत.*_ *चैत्यगृहातील या ब्राह्मी (धम्म) शिलालेखांच्या मांदियाळीत एक फारसी लेखही आहे. महम्मद अली नावाच्या कुणा व्यक्तीने हिजरी ९८८ (इ. स. १५८०) या दिवशी या स्थळाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. *आपण एखाद्या स्थळी जाऊन आलो, हे स्वत:चे नाव तिथे लिहून ठेवण्याचे जे ‘फॅड’ हल्ली प्रचलित आहे, ते असे बरेच जुने आहे तर!* _या चैत्यगृहानंतर ओळीने २७, २८ आणि २९ क्रमांकाच्या लेण्या (विहार) येतात. प्रत्येकी दोन खोल्यांचे हे विहार. पुढय़ात ओसरी. पण कालौघात तिचे खांब नष्ट झालेले. नाही म्हणायला तिसऱ्याच्या ओसरीतील या सालंकृत खांबांचे कलावशेष आणि भिंतीत एक भंगलेला स्मारक-स्तूप कसाबसा आपले अस्तित्व टिकवून आहे. पण या खोदकामापेक्षाही इथे लक्ष जाते ते त्यांच्या भिंतीवरील शिलालेखांकडे! त्यातही लेणे क्रमांक २७ वरचा लेख तर पाहण्यासारखाच! दोन्ही खोल्यांच्या मधोमध भिंतीवर एक घासून सपाट जागा केलेली आहे. या आडव्या पट्टीतच कुणा अज्ञात सुलेखनकाराने सुंदर अक्षरांत हा लेख कोरला आहे. सुरुवातीस स्वस्तिक, तर शेवटी श्रीवत्स ही शुभचिन्हे असलेला हा लेख असा- *_‘भारुकछकानं लंकुडियानं भातूणं अससमस पुताण_* _*बुधमितस बुधरखितस च बिगभं देयधंमं’*_ *अर्थ-* _भरुकच्छ म्हणजे आजच्या गुजरातमधील भडोच येथील अससमचे पुत्र बुधमित व बुधरखित या बंधूंनी या शैलगृहासाठी देणगी दिली आहे. हे दोघे लाकडाचे व्यापारी होते. भडोच हे तत्कालीन व्यापारी बंदर. तिथून निघालेले हे दोघे प्राचीन बाजारपेठ असलेल्या जुन्नरमध्ये आले आणि त्यांनी इथल्या लेण्यांसाठी हा दानधर्म केला आहे. म्हटले तर हा फक्त दानधर्माचा लेख; पण त्यातून तत्कालीन समाज, लोक, त्यांचे व्यवसाय, स्थळ, प्रवास, दळणवळण अशा कितीतरी गोष्टींची माहिती मिळते. म्हणूनच हे शिलालेख इतिहासाची साधने आहेत. एकूणात- लेणी काय किंवा कुठलीही ऐतिहासिक वास्तू काय, ते फक्त इतिहास सांगत नाहीत, तर त्यांच्या अभ्यासातून इतिहास, भूगोल, तत्कालीन समाज, लोक, भाषा, लिपी, चालीरीती, परंपरा अशा कितीतरी गोष्टी उलगडत जातात. शिलालेखांची ही परिभाषा हे न उलगडलेले जग दाखवतात._ _*या स्थळांना कुठल्याही धर्म-जाती-पंथाच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्यापेक्षा देशाचा वारसा म्हणून पाहिले पाहिजे. या वास्तू राष्ट्रीय संपत्ती समजून त्यांचे जतन व्हायला हवे. पण अनेकदा या वारशामागील देश-राष्ट्र ही भावना नाहीशी होऊन फक्त धर्म-पंथ तेवढे उरतात. स्थळांना देवत्व बहाल केले जाते आणि मग त्यातून खऱ्या इतिहासाला धोका निर्माण होतो. अंबा-अंबिका लेण्यातील शिल्पांनाही देवत्व बहाल झाल्याने त्यामागील राष्ट्रीय वारशाचा विसर पडून, या मूर्ती-शिल्पांवर हळद-कुंकवाचे थर जमा झाले आहेत. त्यातील अनेकांची झीज झाली आहे*_. *_काही ठळक बाबी_* *१)* _चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर कोरलेले पिंपळपान बोधीवृक्षाची आठवण करुन देते._ *२)* _सम्राट अशोकाने आपली संपत्ती, आपली अपत्ये धम्मासाठी दान केल्यानंतर त्याच्याकडे असलेला शेवटचा आवळाही त्याने भिक्खूंना दान केला होता..तो आवळा लेण्यांच्या स्तंभांवर प्रतिकात्मक स्वरुपात कोरला गेलेला आहे. जो सगळ्याच लेण्यांवर आपल्याला पाहायला मिळेल.अष्टकोनी स्तंभ आपल्याला बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाची आठवण करुन देतात._ *३)* _शिलालेखाच्या सुरुवातीला कोरलेला उलटा ओम् आणि स्वस्तिक ( भवचक्र ) ही बौद्ध धम्माची प्रतिके आहेत._ *४)* _कुठल्याही दगडाला हळदीकुंकु लावल्याने त्याचे दैवीकरण होत नसते..बुद्धरुपांना कीतीही हळदी कूंकु फासून त्याचे विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी शांत, ध्यानस्थ ,कुठल्याही आयुधाशिवाय निर्भय अवस्थेत कोरलेले बुद्धरुप आपल्या अस्तीत्वाची जाणीव करुन देते._ *_सूचना_* *या सर्व लेणी पाहण्यासाठी साधारणतः 3 तास लागतात.परंतु या लेण्या पाहताना शांतता बाळगणे महत्वाचे आहे. कारण येथील लेण्यामध्ये असलेल्या मधमाश्या कॅमेराच्या फ्लॅश व आपल्या आवाजाने उठतात व चावतात.* _*धम्माचा हा प्रवास अतिशय ऊर्जादायी तसेच न थकवणारा. ह्या अविरत चालणार्या.प्रवासातून आपल्याला गवसते ती शांतता, आणि ऊर भरुन यावा असा जाज्वल्य इतिहास....!!*_ *संकलन :- महेश कांबळे* *२९/११/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

Friday, 27 November 2020

पुण्णा (पूर्णा)

*३ पुण्णा (पूर्णा)* _श्रावस्तीमधील एका शाक्य कुळांत पुण्णा चा जन्म झाला होता. तिने महापजापती गोतमीकडे वयाच्या विसाव्या वर्षी प्रव्रज्जा घेऊन ती तिची शिष्या झाली होती. एके दिवशी अंतर्दृष्टीच्या विकासाकरीता ध्यानभावना करीत असताना शास्त्याने तिला उत्साहित करण्यासाठी म्हटलेल्या गाथेला ती वारंवार म्हणत होती. नंतर ही गाथा पुण्णा (पूर्णा) वारंवार म्हणू लागली. ही तिचीच गाथा म्हणून ओळखली जाते._ *_ पुण्णा! तू पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे (कल्याणकारी) धम्मामध्ये पूर्णत्व प्राप्त कर व परिपूर्ण प्रज्ञेने अंधकार नष्ट कर ||३||_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ : - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *२८/११/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

एकाला अपाय तो दुसर्यााला उपाय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
*_एकाला अपाय तो दुसर्यााला उपाय_* 
*_(असिलक्खणजातककथा)_* 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

                                                 _प्राचीन काळीं वाराणसी नगरींत ब्रह्मदत्त नांवाचा राजा राज्य करीत असतां त्याच्या पदरीं तरवारीची परीक्षा करणारा एक ब्राह्मण रहात असे. याला असिलक्षण पाठक ब्राह्मण असें म्हणत असत. तो एखाद्या लोहारानें राजाच्या उपयोगासाठीं नवीन तलवार आणली असतां तिचा वास घेऊन परीक्षा करीत असे. या त्या कौशल्यामुळें राजानें त्याला तलवारीचा परीक्षक नेमिलें होतें. पण अधिकार हातीं आल्यावर तो लोहाराकडून लांच घेऊन वाईट तलवारी चांगल्या ठरवूं लागला, आणि लाच न मिळाला तर चांगल्या तलवारीहि वाईट ठरवू लागला. ज्याला ही गोष्ट माहीत नव्हती अशा एका दूरच्या लोहारानें राजासाठीं उत्तम तलवार करून आणली. पण असिलक्षणपाठकाला लांच न मिळाल्यामुळें ती खोटी ठरली. त्या लोहारानें हा ब्राह्मण लबाड आहे हें तेव्हांच जाणलें, व याची खोड मोडण्यासाठीं त्यानें दुसरी एक अत्यंत तीक्ष्ण धारेची तलवार बनवून ती मिरचीच्या पुडींत चांगली लोळवून म्यानांत घालून दरबारांत आणली. राजानें असिलक्षणपाठकाला तिची परीक्षा करण्याचा हुकूम केला. त्यानें एकदम म्यानांतून काढून तिला आपल्या नाकाजवळ नेलें. मिरचीच्या पुडीच्या वासामुळें त्याला जोरानें शिंका आल्या, त्यायोगें हात घसरून त्याचें नाक कापलें गेलें ! राजानें आपल्या वैद्यांना बोलावून आणून ओषधोपचार करविले. व असिलक्षणपाठकाला गूण पडून जखम साफ बरी झाल्यावर एक लाखेचें कृत्रीम नाक करवून त्याच्या नाकावर बेमालूम बसवून देण्यास लाविलें. असिलक्षणपाठक राजाच्या मर्जीतील असल्यामुळें त्याचा गुन्हा उघडकीस आला होता, तथापि त्याला दरबारांतून घालवून देण्यांत आलें नाहीं. तो आपल्या कृत्रीम नासिकेसह राज्यसेवेला तत्पर राहिला._ 

                         _या राजाला एकुलती एकच कन्या होती. तिचें लहानपणापासून आपल्या आतेभावावर म्हणजे राजाच्या भाच्यावर अत्यंत प्रेम जडलें. राजाला ही गोष्ट इष्टच वाटत होती. आपली कन्या भाच्याला देऊन त्यालाच आपल्या मागें गादीचा वारस करावें असा त्याचा बेत होता. परंतु त्याच्या मंत्र्यांचें असें म्हणणें होतें कीं, राजकन्येला एक बलाढ्य राजा वर मिळाला असतां आपल्या राजाचें हित होईल. त्यामुळें आपल्या आणि त्या राजाच्या राष्ट्रांत निकट हितसंबंध जुळून येऊन परस्परांची परस्परांला मदत होईल. राजाला हा सल्ला विशेष आवडला; व आपला पहिला बेत त्यानें रहित केला. परंतु त्याचा भाचा आणि मुलगी या दोघांमध्यें वृध्दिंगत होत असलेलें प्रेम खच्ची करणें फार कठीण होतें. तथापि निराश न होतां त्यानें त्या दोघांला एकत्र रहाण्याची सक्त मनाई केली. मुलीला राजवाड्यांत ठेऊन भाच्याला दूर दुसरें एक घर बांधून देण्यांत आलें._ _*नदीच्या प्रवाहाला बांध घातला असतां पाणी तुंबून जाऊन तें कोठून तरी बाहेर पडण्याची मार्गप्रतीक्षा करीत असतें. तद्वत् प्रेमाचीहि स्थिती आहे. त्याला कोणी आडकाठी केली असतां त्याचा जोर वाढत जाऊन तो भल्या किंवा बुर्या मार्गानें बाहेर पडल्यावांचून रहात नाहीं.* राजकन्या आणखी तिचा भावी पति यांची प्रत्यक्ष गांठ पडत नव्हतीं. तथापि, अप्रत्यक्ष दासींच्या द्वारें दोघांचीहि भेट कशी जुळवून आणतां येईल या संबंधानें त्यांची खलबतें चालूं होतीं पण त्यांना भेटीचा योग जुळवून आणण्यास युक्ति सांपडली नाहीं._ 

                             _राजदरबारीं एक चाणाक्ष ज्योतिषीणबाई होती. तिच्या कल्पकतेबद्दल सर्वांची खात्री होती. राजाच्या भाच्यानें नजराणे पाठवून व गोड गोड बोलून तिची मर्जी संपादन केली, व आपली आणि राजकन्येची भेट होण्याचा योग जुळवून आणण्याचा कांहीं उपाय शोधून काढण्याविषयीं तिला विनंती केली. त्या धूर्त बाईला यांत कांहीं विशेष अक्कल खर्चण्याचें कारण पडलें नाहीं. तिनें या कामीं जी युक्ति योजिली तिचा यापुढील गोष्टीवरून उलगडा होणारच असल्यामुळें येथें निराळा उल्लेख करीत नाहीं. एवढें सांगितलें म्हणजे पुरे आहे कीं, राजाच्या भाच्याला तिच्या मसलतीनें फार आनंद झाला, व तिनें सांगितलेल्या मार्गांचा अवलंब करण्याचें त्यानें तिला वचन दिलें._ 

                         _ज्योतिषीणबाईनें आपण अशी युक्ति योजिली आहे हें राजकन्येला आगाऊच सांगून ठेविलें व तदनंतर राजाजवळ जाऊन ती म्हणाली ''महाराज, आपल्या कन्येवर एका पिशाच्याची वक्रदृष्टी आहे. ताबडतोब शांति भूतशांति केली नाहीं तर तिच्यावर अनिष्ट संकटें येण्याचा संभव आहे.'' राजा म्हणाला, ''माझ्या एकुलत्या एका मुलीसाठीं मी भूतशांति करण्यास तयार होणार नाहीं, अशी तुमची समजूत आहे काय ? जें काय ठरावयाचें असेल तें मला आतांच सांगा. मी सर्व व्यवस्था आजच्याआज करविण्याचा हुकूम देतों.'' ज्योतिषीणबाई म्हणाली, ''महाराज, राजकन्येला स्मशानांत नेऊन टाका, मंचकावर निजवून त्या मंचकाखालीं एक प्रेत ठेविलें पाहिजे व भूतशांतीचे मंत्र उच्चारून तें भूत त्या प्रेतावर जाईल असा प्रयोग केला पाहिजे.''_ 

                     _राजानें ज्योतिषीणबाईच्या म्हणण्याप्रमाणें सर्व व्यवस्था करावी अशी राजवाड्यांतील नोकरांना आज्ञा केली. प्रेत कशा रीतीचें निवडावें हें ज्योतिषीणबाईनें आपल्या हातीं ठेविलें होतें. ठरलेल्या दिवशीं राजाचा भाचा स्मशानाच्या कोपर्यां त जेथें हा विधी व्हावयाचा होता तेथें डोक्यावरून पायापर्यंत सर्व शरीर वस्त्रानें गुंडाळून निजला. त्यानें आपले सशस्त्र शिपाई आजुबाजूला झाडींत दडवून ठेविले होते, व आपणाबरोबर मिर्चीच्या पुडीची एक लहानशी डबी ठेविली होती. ज्योतिषीणबाईनें राजकन्येचा मंचक आणून या जिवंत प्रेतावरच ठेवविला; व ती राजवाड्यांतील नोकरांना म्हणाली ''संभाळाहो माझा प्रयोगविधी चालला असतां या प्रेतांत राजकन्येवर असलेलें भूत शिरून तें नाचूं लागेल. व पहिल्यानें जो त्याच्या तावडींत सांपडेल त्याचा प्राण घेईल. या प्रेतांत जिवंतपणा आल्याचें चिन्ह म्हटलें म्हणजे त्याला एक दोन शिंका येतील, व त्या आल्याबरोबर तें उठून धावावयास लागेल. नंतर त्याच बाईनें राजकुमारीला गंधोदकानें स्नान वगैरे घालून यथाविधी त्या मंचकावर निजविलें, व मंत्र म्हणण्यास आरंभ केला. इतक्यांत खालील माणसानें मिरचीची तपकीर ओढली त्याबरोबर त्याला सटासट शिंका येऊं लागल्या. आतां हें प्रेत आमच्यांतील कोणाचा तरी बळी घेणार असें जाणून जो तो पळत सुटला ! ज्योतिषीणबाईनें तर सर्वाच्या आधींच पळ काढला ! राजाचा भाचा मंचकाच्या बाहेर येऊन राजकन्येला भेटला, व आपल्या सशस्त्र शिपायांसहवर्तमान त्यानें तिला स्वगृहीं नेलें. पुढें राजाच्या कानीं ही बातमी गेली तेव्हां तो आपल्या अमात्यांना म्हणाला, एवीं तेवीं माझा त्यालाच मुलगी देण्याचा बेत होता. मध्यंतरी तो रहीत झाला खरा. पण शेवटीं भाच्यानें स्वतःच तडीला नेला, असें म्हणण्यास हरकत नाहीं ! आतां त्याच्या या कृत्याबद्दल त्याला दंड न करतां त्याचें यथासांग लग्न करण्याची सर्व तयारी करा.''_ 

                         _राजाज्ञेप्रमाणें विवाहमंगलाची सर्व व्यवस्था करण्यांत आली व शुभ मुहूर्तावर राजकन्येचें आणि राजाच्या भाच्याचें लग्न झालें. तेव्हांपासून राजानें सर्व राज्यभार जामातावर टाकून धर्मचिंतनांत कालक्रमणा करण्यास सुरुवात केली. असिलक्षणपाठक या तरुण राजाच्या सेवेला पूर्वीप्रमाणें सर्वथैव तत्पर असे. एके दिवशीं राजा उद्यानांत मोकळ्या जागीं बसला असतां असिलक्षणपाठक ब्राह्मण त्याजवळ उभा होता. त्यांचें संभाषण चालूं असल्यामुळें त्याला तेथून दुसरीकडे जातां येईना. पण सूर्याच्या बाजूला त्याचें तोंड असल्यामुळें लाखेचें नाक वितळलें व खाली पडलें. त्यायोगें त्याला फारच लाज वाटली. तो तोंड खालीं घालून ओशाळा होऊन मुकाट्यानें राहिला. नवीन राजा हा प्रकार पाहून हंसत हंसत त्याला म्हणाला, ''गुरुजी, विनाकारण लाजूं नका कारण शिंकेमुळें तुमची हानि झाली असली तथापि ती सर्वांनाच अपाय करते असे नाहीं. कां कीं, त्याच शिंकेनें मला राज्यप्राप्ति झाली आहे ! एकाचा अपाय तो दुसर्या चा उपाय _! 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
*संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
*संकलन :- महेश कांबळे* 
*२८/११/२०२०* 
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Thursday, 26 November 2020

परदेशीं जाऊन डौल मारणें सोपें असतें

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

            *_परदेशीं जाऊन डौल मारणें सोपें असतें_*

             *_(कटाहकजातककथा)_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  

       _एकदा बोधिसत्त्व वाराणसी नगरींत अत्यंत धनाढ्य श्रेष्ठी जन्माला आला होता. वयांत आल्यावर त्याला एक सुस्वरूप मुलगा झाला. त्याच दिवशीं त्याच्या दासीलाहि एक मुलगा झाला. या *दासीपुत्राचें नांव कटाहक असें ठेवण्यांत आलें.* तो आपल्या मालकाच्या मुलाबरोबरच वाढला. लहान मूल असल्यामुळें त्याला कोणी आडकाठी करीत नसत. पुढें बोधिसत्त्वाच्या मुलाला अक्षर ओळख करून देण्यासाठीं एक शिक्षक ठेविला. तेव्हां कटाहक देखील त्या शिक्षकाजवळ जाऊन आपल्या मित्राबरोबर लिहिण्यावाचण्यास शिकला. त्याची हुषारी पाहून पुढें वयांत आल्यावर बोधिसत्त्वानें त्याला आपल्या तिजोरीचा अधिकारी नेमिलें. तें काम तो मोठ्या दक्षतेनें करीत असे. तथापि त्याला अशी शंका आली कीं, ''कितीहि झालें तरी मी पडलों दासीपुत्र, माझा लहानसहान दोष देखील सर्वांना मोठा वाटेल; व कदाचित् माझा छळहि करितील आणि पुनः माझ्याकडून दासकर्म करवून घेतील. तेव्हां येथें रहाणें सुरक्षित वाटत नाहीं.''_

       _दिवसें दिवस दुसर्‍या कोठेंतरी दूरच्या गांवी पळून जावें हा कटाहकाचा विचार दृढ होत गेला. पण परक्या गांवीं निर्वाह कसा करावा याची त्यास पंचाईत पडली. शेवटीं त्यानें एक युक्ति शोधून काढली. ती अशी- '' दूरच्या एका लहानशा शहरांत श्रेष्ठीच्या ओळखीचा व्यापारी रहात असे. त्याचा आणि बोधिसत्त्वाचा व्यापारासंबंधानें वारंवार पत्रव्यवहार होत असे. बोधिसत्त्वाच्या तर्फे बहुधा कटाहकच हीं पत्रें लिहीत असे, व त्यांवर बोधिसत्त्वाचा शिक्का मारून तीं रवाना करीत असे. अशाच एका प्रसंगीं त्यानें आपल्या संबंधानें त्या व्यापार्‍याला पत्र लिहून त्यावर श्रेष्ठीचा शिक्का मारून तें बंद करून आपल्या पदरीं ठेविलें व दोन चार दिवसांनीं वाराणसींतून पळ काढला. त्याच्याजवळ जें द्रव्य होतें तें खर्चून वाटेंत त्यानें आपला निर्वाह चालविला आणि बरेंच दिवस प्रवास करून व्यापारी रहात होता तें शहर गांठलें. व्यापार्‍यानें 'कोठून आलांत' असा प्रश्न केल्यावर तो म्हणाला, ''वाराणसी नगरींतील प्रसिद्ध श्रेष्ठीचा मी पुत्र आहें. माझ्या थोरल्या भावामध्यें आणि मजमध्यें तंटा होऊं नये म्हणून माझ्या पित्यानें मला आपणापाशीं पाठविलें आहे. आपणाला मुलगा नाहीं असें आम्हीं ऐकतों. तेव्हां आपण माझें पुत्रवत् पालन करून आपल्या कन्येशीं माझा विवाह करून द्याल अशी माझ्या पित्याला दृढ आशा वाटत आहे, व याचसाठीं मला त्यानें हें पत्र दिलें आहे.'' असें म्हणून कटाहकानें तें पत्र त्या व्यापार्‍याला दिलें. त्यांत हाच मजकूर होता. श्रेष्ठीनें आपला मुलगा बुद्धिमान असून व्यापारांत दक्ष आहे, तेव्हां त्याला आपणाजवळ ठेऊन घेऊन आपला घरजांवई कराल अशी आशा बाळगतों इत्यादि मजकूर लिहिला होता. तो वाचून त्या व्यापार्‍याला फारच आनंद झाला. एवढ्या मोठ्या सावकाराचा मुलगा आपल्यासारख्या गरीब व्यापार्‍याचा घरजांवई होणें मोठें भूषणास्पद आहे. तेव्हा पहिल्या मुहूर्तावर त्यानें कटाहकाशीं आपल्या कन्येचें लग्न लावून दिलें._

       _कटाहक जात्या हुषार होता हें वर सांगितलेंच आहे. पण *आगंतुक श्रीमंतीमुळें त्याच्या अंगी एक दुर्गुण शिरला होता.* तो ज्याच्या त्याच्या अंगावर तोंड टाकीत असे. लहानसहान अपराधहि त्याला सहन होत नसे. भोजनसमयीं स्वयंपाकांत कांहीं कमतरता दिसून आली तर तो आपल्या बायकोवर फार संतापत असे, व त्यामुळें त्या बिचारीला उगाच त्रास सोसावा लागत असे. याशिवाय कटाहकाच्या वर्तनांत म्हणण्यासारखे दुसरे दोष नव्हते._

       _कटाहक पळून गेल्यावर श्रेष्ठीला वर्ष दोन वर्षे त्याचा पत्ता लागला नाहीं. पण पुढें तो व्यापार्‍याच्या घरीं घरजांवई होऊन रहात आहे ही बातमी त्याला समजली, व तिचा खरेपणा पाहण्यासाठीं त्यानें आपले हेर त्या शहरीं पाठविले. त्यांनी जेव्हां बोधिसत्त्वाला कटाहकाचें इत्थंभूत वर्तमान सांगितलें, तेव्हां त्यानें तेथें जाऊन त्याची फजीति करून पुनः आपल्या घरीं आणण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणें आपल्याबरोबर मोठा सरंजाम घेऊन तो त्या शहरीं जाण्यास निघाला. तो त्या शहरापासून कांहीं अंतरावर पोहोंचला नाहीं तों त्याच्या आगमनाचें वर्तमान कटाहकाला समजलें, व तो अगदीं घाबरून गेला. श्रेष्ठी या ठिकाणीं आला तर आपली पुरी फजीति होणार हें तो जाणून होता पण येथून दुसर्‍या ठिकाणीं पळून जाणें हें देखील त्याला इष्ट वाटेना. कांहीं काळ कटाहक किंकर्तव्यमूढ होऊन विवंचनेंत पडला. परंतु त्याच्या समयसूचकबुद्धीनें त्याला शेवटीं हात दिला. या नवीन संकटांतून पार पडण्यास त्यानें नवीच युक्ति शोधून काढली. त्या दिवसापासून आपल्या आप्‍तइष्टांजवळ तो पितृभक्तीचीं मोठमोठालीं वर्णनें करूं लागला. तो म्हणाला, ''अहो तुमचें हें शहर म्हणजे वाराणसीच्या मानानें नुसतें खेडेगांव आहे. येथील लोकांना रीतरिवाज कांहींच माहीत नाहीं. पितृभक्ति कशी असते हें या गांवढळ लोकांना कसें समजणार. तुम्ही एकदां वाराणसीला जाऊन पहा ! आम्हीं तेथें आमच्या वडिलांसमोर कधींहि खालीं बसत नसतों. भोजनसमयीं त्यांची सर्व सेवा करतों. पिकदाणी लागली तर आणून देतों. एवढेंच नव्हे तर वडील शौचाला जावयास निघाले; तर स्वतः त्यांजबरोबर त्यांच्या उपयोगासाठीं पाणी नेऊन ठेवितों. असलीं कामें आम्ही आमच्या नोकरांवर मुळींच सोंपवित नसतों पण या गांवीं तुम्हाला अशा तर्‍हेनें पितृसेवा करावी ही गोष्ट माहीत तरी आहे काय ?''_

       _त्या शहरांतील लोकांनीं वाराणसींत फार दिवस वास्तव्य केलें नसल्यामुळें व तेथील रीतिरिवाजाची माहिती नसल्यामुळें कटाहक सांगेल तें त्यांना प्रमाण होऊन बसलें, व काशीच्या चालीरीतीसंबंधानें त्यांना एकप्रकारचा मोठा आदर वाटला._

       _महाश्रेष्ठी लवकरच त्या शहरीं पोहोंचणार हें जाणून कटाहक आपल्या सासर्‍याला म्हणाला, ''मामाजी, तुम्ही माझ्या पित्याच्या आदरातिथ्याची सर्व तयारी करून ठेवा. मी पित्याच्या भेटीला आमच्या सामर्थ्यांप्रमाणें नजराणे घेऊन जातों व मोठ्या गौरवानें त्याला तेथें घेऊन येतों. आपले वडील इतके जवळ आले आहेत हें जाणून घरींच बसून राहणें हें वाराणसींतील कुलपुत्रांना अत्यंत अनुचित आहे. तेव्हा मी आजच्या आज माझ्या पित्याच्या भेटीसाठीं जात आहे.''_

       _बराच लवाजमा बरोबर घेऊन तो महाश्रेष्ठीच्या दर्शनाला गेला. वाटेंत महाश्रेष्ठी एका ठिकाणीं उतरला होता. तेथें कटाहकानें त्याची भेट घेऊन आपण आणलेले नजराणे दिले. श्रेष्ठीला मोठा चमत्कार वाटला ! आपलें नांव ऐकल्याबरोबर कटाहकानें पलायन करावें किंवा गर्भगळीत होऊन जावें, असें असतां हा दासीपुत्र मोठ्या शौर्यानें आपल्याजवळ येऊन नजराणे देतो याचा अर्थ काय ? हें त्याला समजेना. श्रेष्ठी या विचारांत गढून गेला असतां स्नानाची वेळ झाली, स्नानाच्यापूर्वी शौचविधीला जाण्याचा श्रेष्ठीचा परिपाठ असे. त्याप्रमाणें श्रेष्ठी आपल्या ठाण्याजवळच्या जंगलांत जाण्यास निघाला. त्यावेळीं कटाहकानें आपल्या लोकांना तेथेंच रहाण्यास सांगितलें, व तो उदकपात्र घेऊन, श्रेष्ठीच्या मागोमाग गेला. वाराणसींतील कुलपुत्र आपल्या पित्याची अनन्यभावें सेवा करीत असतात ही गोष्ट कटाहकाच्या सर्व नोकरांना माहीत असल्यामुळें त्यांना त्याच्या या कृत्यानें मुळींच आश्चर्य वाटलें नाहीं. श्रेष्ठी एकांत स्थानीं गेल्यावर कटाहकानें उदकपात्र खालीं ठेऊन त्याच्या पायावर एकदम उडी टाकली; आणि म्हणाला, ''महाराज मी जरी आपला दासीपुत्र आहें, तथापि आपल्या मुलासंगेंच माझें आपण पालन केलें आहे. मी केलेले सर्व अपराध क्षमा करून येथें मला मुलाच्या नात्यानें वागविल्यास माझ्यावर अत्यंत उपकार होईल. पण जर तुम्ही माझें कृत्य उघडकीस आणाल तर त्यापासून कोणाचाच फायदा न होतां बिचार्‍या माझ्या सासर्‍याच्या कुटुंबांत फारच गोंधळ उडून जाईल व त्यामुळें सर्वांना दुःख भोगावें लागेल.''_

       _*बोधिसत्त्व फार दयाळू होता.* त्याचें मन वळविण्यास कटाहकाला मुळीच आयास पडले नाहींत. शेवटीं त्याजकडून आपलें दासीपुत्रत्व उघडकीला न आणण्याबद्दल अभिवचन घेऊन कटाहक तेथून माघारा आला. त्या दिवसापासून तो श्रेष्ठीची दासाप्रमाणें सेवा करीत असे. श्रेष्ठी व्यापार्‍याच्या घरीं आल्यावर देखील कटाहकानें त्याची सर्वप्रकारें सेवा केली व त्याला प्रसन्न करून घेतलें._
       _एके दिवशीं कटाहक कांहीं कामानिमित्त बाहेर गेला असतां त्याची बायको बोधिसत्त्वाला भेटली. तेव्हां बोधिसत्त्व तिला म्हणाला, ''काय सूनबाई, माझा मुलगा तुम्हाला चांगल्या रीतीनें वागवतोना ?'' ती म्हणाली, ''मामंजी, आपल्या चिरंजीवाचा कोणताही दोष नाहीं, त्यांचें माझ्यावर फार प्रेम आहे. केवळ भोजनप्रसंगीं कधीं कधीं कांहीं पदार्थ वाईट लागला तर ते माझ्यावर संतापत असतात; हाच काय तो त्यांचा दोष आहे.'' ''मुली, माझा मुलगा लहानपणापासून असाच आहे. जेवण्याखाण्यांत त्याच्या फार खोडी असतात पण तूं वाईट वाटूं देऊं नकोस. त्याचें तोंड बंद करण्याचा एक मंत्र मी तुला शिकवून ठेवितों. तो तूं चांगला पाठ करून ठेव व जेव्हां माझा मुलगा तुझ्यावर रागावेल तेव्हां तो म्हणत जा. एक दोनदां या मंत्राचा प्रयोग केला असतां माझ्या मुलाची प्रकृति पाण्यापेक्षांहि थंड होईल हें मी तुला खात्रीनें सांगतों.''_

       _श्रेष्ठी कांहीं दिवस त्या व्यापार्‍याच्या घरीं राहून वाराणसीला जाण्यास निघाला. कटाहक त्याच्याबरोबर बराच दूर अंतरावर गेला. व पुष्कळ नजराणे देऊन त्यानें त्याचा मोठा गौरव केला; आणि मोठ्या आदरानें साष्टांग नमस्कार करून पुनः आपल्या सासर्‍याच्या घरीं आला. या दिवसापासून त्याचा मान अधिकच वाढला. कां कीं, आतां त्याचें दासीपुत्रत्व उघडकीला येण्याचा संभव राहिला नाहीं. त्यामुळें बिचार्‍या बायकोला भोजन प्रसंगीं अधिक त्रास होऊं लागला. एके दिवशीं आपल्या नवर्‍यासाठी स्वहस्तानें चांगलें जेवण तयार करून तिनें वाढण्यास सुरुवात केली. पहिलाच पदार्थ कटाहकाला आवडला नाहीं. तो फार संतापला. त्याच्या बायकोला सासर्‍यानें दिलेल्या मंत्राची आठवण झाली व तिनें ताबडतोब त्याचा प्रयोग केला. ती म्हणाली ः-_

_*बहुंपि सो विकत्थेय्य अञ्ञं जनपदं गतो।*_

_*अन्वागन्त्वान दूसेय्य भुंज भोगे कटाहक॥*_

*अर्थ-* _दुसर्‍या देशांत जाऊन पुष्कळ बडबड करतां येते. पण परत येऊन तो हें उघडकीस आणील. तेव्हां हे कटाहक मुकाट्यानें मिळालेल्या पदार्थांचा उपभोग घे!_


       _हा मंत्र कानीं पडल्याबरोबर कटाहक घाबरून गेला. श्रेष्ठीनें आपल्या हीनत्वाबद्दल सर्व कांहीं हिला सांगून ठेविलें असलें पाहिजे असें त्याला वाटलें. तेव्हांपासून बायकोवर संतापण्याची त्याची छाती झाली नाहीं. इतकेंच नव्हें तर तो नम्र आणि सालस बनला, व किती वाईट पदार्थ असला तरी त्यामुळें तो कधींहि चिडला नाहीं. जे काहीं मिळेल तेवढ्यानें संतुष्ट राहून आपला वेळ त्यानें सत्कर्मी खर्च केला._

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

*संदर्भ : - जातक कथा संग्रह*

*संकलन :- महेश कांबळे*

*२७/११/२०२०*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

मुत्ता (मुक्ता)

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

*२ मुत्ता (मुक्ता)*

     _मुत्ताचा जन्म श्रावस्तीमधील एका ब्राह्मण कुळांत झाला होता. वयाच्या विसाव्या वर्षीच तिने गृहत्याग केला होता. तिने महापजापती गोतमीकडे प्रव्रज्जा घेऊन ती तिची शिष्या झाली होती. एके दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर एका निर्जन ठिकाणी ती ध्यानभावनेकरिता बसली असता शास्त्याने तिला उत्साहित करण्यासाठी म्हटलेल्या गाथेला ती वारंवार म्हणत होती. त्यामुळे ही गाथा तिच्या नावाबरोबर जोडण्यात आले.

*_मुत्ते! तू राहुच्या ग्रहणापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे (सर्व) शृंखलातून मुक्त हो. विमुक्ती – प्राप्त चित्ताने ऋणमुक्त होऊनच तू भिक्षान्न खा.||||_*

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ : - थेरिगाथा*

*संकलन :- महेश कांबळे*

*२७/११/२०२०*

 

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

Wednesday, 25 November 2020

एक अज्ञात भिक्खुणी

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


             १. *एक अज्ञात भिक्खुणी*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

     _वैशालींनगरीत क्षत्रीय कुळांत एका स्त्रीचा जन्म झाला. वयांत आल्यावर एका चांगल्या परिवारातील पुरुषाशी तिचा विवाह झाला. एके दिवशी *महापजापती गोतमीची धम्म देसना* ऐकून तिच्या मनात प्रवज्ज्या घेण्याची इच्छा निर्माण झाली. ती इच्छा तिने आपल्या पतीजवळ व्यक्त केली परंतु ते करण्यासाठी पतीने परवानगी न दिल्याने ती गृहणी राहूनच धम्माचे पालन करू लागली. तिचे चित्त धम्म चिंतंनाकडे लागले होते. एके दिवशी स्वयंपाक करीत असताना विस्तव जास्त झाल्याने कढईत शिजत असलेली भाजी करपून गेली. या घटनेने तिला *संसारातील सर्व वस्तूंच्या अनित्यतेचे गंभीर ज्ञान झाले.* त्यामुळे तिने मौल्यवान अलंकार वापरण्याचे सोडून दिले. पतीने यासंदर्भात विचारणा केली असता ती म्हणाली, “स्वामी! सांसारिक जीवन जगण्यास मी स्वतःला असमर्थ समजत आहे.” हे एकूण तिच्या पतीने महापजापती गोतमीकडे जाऊन विनंती केली की, “आर्ये! हिला प्रवज्या द्यावी.” तेव्हा महापजापती गोतमीने तिला प्रव्रज्ज्या देऊन शास्त्याकडे नेले. शास्त्याने तिची महान वैराग्यवृत्ती पाहून ज्या घटनेने तिच्यामधील अंतर्दुष्टी जागृत झाली ती लक्षात घेऊन पुढील गाथा म्हटली. हीच गाथा ती वारंवार स्वतःसाठी म्हणताना दिसत असे. त्यामुळे ही गाथा तिच्या नावाबरोबर जोडण्यात आली आहे._


*_थेरी! तू आपल्या हाताने तयार केलेले चिवर अंगावर घेऊन सुखाने झोप. कारण भांड्यात घातलेल्या सुकलेल्या भाजीप्रमाणे तुझा राग शांत झाला आहे. ||१||_*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

_*संकलन : महेश कांबळे*_


_*संदर्भ : थेरिगाथा*_


*दिनांक : २६.११.२०२०*


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

परोपकाराचें फळ

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


                 *_परोपकाराचें फळ_*


                 *_(अंबजातककथा)_*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖  


            _एकदां बोधिसत्त्व ब्राह्मण कुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर ॠषिवेषानें तो हिमालयावर रहात असे. तेथें त्याचे पुष्कळ शिष्य होते. एका वर्षी हिमालयावर भयंकर उन्हाळा सुरू झाला व त्यामुळें पाण्याचे झरे वगैरे आटून गेले. मृगादिक प्राण्यांना पाणी मिळण्याची फार अडचण पडूं लागली. तेव्हां बोधिसत्त्वाच्या शिष्यांपैकीं एका तपस्व्यानें एक लाकडाची मोठी दोणी करून तेथील पशूंला पाणी पाजण्यास सुरुवात केली. पण त्यामुळें त्याला फलमुलें आणण्यासाठीं अवकाश मिळेनासा झाला, व उपाशीं पोटींच पशूंना पाणी पाजण्याची पाळी त्याच्यावर आली. तथापि त्यानें आपला प्रयत्‍न न सोडतां सर्व श्वापदांची तृप्ति करण्याचा क्रम तसाच पुढें चालविला. तें पाहून पशूंनीं *''हा तपस्वी आमच्यासाठीं फार कष्ट सहन करितो. तेव्हां याचे उपकार फेडणें अत्यंत आवश्यक आहे.''* असा विचार करून सर्वानुमतें हा ठराव पास केला, ''आजपासून जो प्राणी येथें पाणी पिण्यास येईल त्यानें रिकामें न येता आपल्या सामर्थ्याप्रमाणें एकतरी मनुष्योपभोगाला योग्य असें फळ घेऊन यावें. रिकाम्या हाताने येऊं नये.''_

                 _दुसर्‍या दिवसापासून बोधिसत्त्वाच्या आश्रमांत फळांचे नुसते ढीग पडूं लागले. पांचशें तपस्व्यांला दुसर्‍या ठिकाणीं फलमूलांचा शोध करण्यास गेल्यावांचून तेथल्या तेथें आहार मिळूं लागला. व त्यामुळें त्यांच्या तपश्चर्येला मोठी मदत झाली. त्या तपस्व्याच्या कृत्यानें बोधिसत्त्व खूष होऊन आपल्या शिष्यगणाला म्हणाला, *''तपस्वी हो, परोपकाराचें हें फल लक्षांत ठेवण्यासारखें आहे. आमच्यापैकीं एकानें परोपकरार्थ आपला देह झिजविल्यामुळें आमच्या तपश्चर्येला पुष्कळ मदत झाली आहे. म्हणून परोपकार करण्यास आपण सदोदित झटलें पाहिजे.''*_


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


 


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*


*२६/११/२०२०*


Tuesday, 24 November 2020

कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाने मूर्ख शहाणा होऊ शकत नाही

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*_कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाने मूर्ख शहाणा होऊ शकत नाही_*


                     *_(नंगलिस जातककथा)_*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

            _एकदा बोधिसत्त्व ब्राह्मण कुळांत जन्मला होता. वयांत आल्यावर तक्षशिला शहरात जाऊन त्याने सर्व शास्त्रांचे अध्ययन करून पुनः वाराणसी शहरात जाऊन आपल्या सद्गुणांनी उत्तम शिक्षक म्हणून आपली ख्याती करून घेतली. त्याच्याजवळ पुष्कळ विद्यार्थी राहत असत. त्यात एक विद्यार्थी आपल्या गुरूच्या सेवेत तत्पर असे; परंतु जडत्वामुळे शास्त्राध्ययनांत त्याचे पाऊल पुढे पडत नसे. एके दिवशी गुरूने जेवल्यानंतर त्याला आपली पाठ दाबण्यास सांगितले. ते काम झाल्यावर जाण्यास निघाला असता बोधिसत्त्व त्याला म्हणाला, "बाळा, या खाटेचे पाय वरखाली झाल्याने ती डलमळते. तेव्हा एका पायाला काही तरी टेका देऊन मग जा." शिष्याला दुसरा काही टेका भेटला नसल्याने खाटेच्या पायाला मांडीचा टेका देऊन त्याने सारी रात्र तिथेच काढली. सकाळी जेव्हा ही गोष्ट बोधिसत्त्वाला समजली तेव्हा त्याच्या मनाला ती फार लागली. "हा माझा विद्यार्थी माझ्यावर फार प्रेम करतो, माझ्याकडून ह्याचे काहीच हित होत नाही. बाकीचे विद्यार्थी पुढे पुढे जात असून याला अगदी सुरुवातीचे पाठ देखील येत नाहीत. याला शिकविण्याला काहीतरी मार्ग सापडेल काय?" अशा विचारात बोधिसत्त्व निमग्न होऊन गेला. आणि त्याने मोठ्या प्रयासाने एक युक्ती शोधून काढली._

           _दुसऱ्या दिवशी दुपारी तो विद्यार्थी जंगलात गेला असता त्याला एक साप दिसला. घरी आल्यावर त्याने सर्व माहिती आपल्या गुरुस सांगितली. तेव्हा आचार्य म्हणाले, "तो साप कसा होता? एखादी उपमा देऊन त्याचे वर्णन कर." शिष्य म्हणाला, "तो नांगराच्या इसाडासारखा होता." आचार्याला शिष्याने केलेल्या उपमेने फार आनंद झाला. साप नांगराच्या इसाडासारखा असावयाचा तेव्हा शिष्याची अवलोकनशक्ती हळूहळू वृद्धिंगत होत जाईल अशी गुरूला बळकट आशा वाटू लागली._

            _काही दिवसांनी शिष्याला जंगलात फिरत असता एक हत्ती दिसला. त्याने ताबडतोब गुरूला ही गोष्ट सांगितली. तेव्हा गुरूने हत्ती कसा असतो असा प्रश्न केला. शिष्याने रोकडा जबाब दिला की, नांगराच्या इसाडासारखा. बोधिसत्त्वाला वाटले की, हत्तीची सोंड नांगराच्या इसाडासारखी असते; परंतु मंदबुद्धीमूळे याने सर्वच हत्ती नांगराच्या इसाडासारखा असतो अशी उपमा केली असावी. विचार करिता करिता हा सुधारल्याशिवाय राहणार नाही._

           _शिष्याने आपल्या मित्राबरोबर दुसऱ्या दिवशी एक उंस खाल्ला व घरी जाऊन ही गोष्ट आपल्या गुरूला सांगितली. बोधिसत्त्वाने उंस कसा असतो असा प्रश्न केल्यावर शिष्याने नांगराच्या इसाडासारखा असतो, असा आपला ठरीव जबाब दिला. उंसाचे आणि नांगराच्या इसाडाचे थोडेसे साम्य आहे असे जाणून बोधिसत्त्व काहीं न बोलता उगाच राहिला._

           _एके दिवशी त्या शिष्याला आणि त्याच्या कांहीं सहाय्याला एका घरी आमंत्रण होते. त्या गृहस्थाने त्याला दूध, दही वगैरे पदार्थ यथेच्छ खाऊ घातले. शिष्याने ती गोष्ट घरी येऊन आपल्या गुरूला सगळे सांगितले, आचार्याने नेहमीचा प्रश्न विचारला असता शिष्याने त्याचे ठरलेले उत्तर दिले नांगराच्या इसाडासारखे, तेव्हा बोधिसत्त्वाची त्याच्या शिक्षणाबद्दल पूर्ण निराशा झाली. तो म्हणाला, "आजपर्यंत मला याची बुद्धी वृद्धिंगत होईल अशी थोडीबहुत आशा वाटत होती पण या मूर्खाला दही, दूध आणि नांगराचे इसाड यांची सांगड घालण्याला मुळीच दिक्कत वाटत नाही! जणू काय नांगराच्या इसाडाची उपमा याने कायमचीच बनवून ठेवली आहे!"_


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*


*२५/११/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

Monday, 23 November 2020

लोभीपणा

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


                *_लोभीपणा_*


        *_(सिगाल जातककथा)_*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

                 _वारणसींतील लोक उसत्वांत यक्षांना मत्स्यमासांदिकांचा बळी देत असत; व यक्षांना प्रसन्न करण्यासाठी मातीच्या भांड्यातून ठिकठिकाणी दारू ठेवीत असत. अशा एका उत्सवाच्या प्रसंगी वारणासीबाहेरील स्मशानात राहणारा एक कोल्हा मध्यरात्र उलटल्यानंतर गटाराच्या रस्त्याने आत शिरला व बलीकर्मासाठी ठेवलेल्या मत्स्यमांसादिकांवर यथेच्छ ताव मारून त्याने मातीच्या भांड्यातील सुरेचे आकंठ पान केले. त्यामुळे पुन्हा गटाराद्वारे बाहेर पडण्याची ताकद त्याच्यात राहिली नाही. तो एका पुन्नाग झाडाच्या झाडीत जाऊन पडला आणि सकाळ झाली तरी तो नशेत असल्याने तसाच झोपून राहिला. एक ब्राह्मण त्या रस्त्याने प्रातः स्नानासाठी चालला होता. त्याला पाहून कोल्हा म्हणाला, "अहो! तुमच्यापाशी माझे काही काम आहे. जरा एका बाजूला याला तर ते तुम्हाला सांगेन. तुमच्याच फायद्याचे आहे, तेव्हा वेळ गेल्यावर तुम्हाला वाईट वाटणार नाही." ब्राह्मण त्याच्या जवळ गेल्यावर तो त्याला म्हणाला, "तुमची वस्त्रे पाहून तुम्ही दारीद्रावस्थेत गांजले आहात असे वाटते. तुमची ही परिस्थिती पाहून मला तुमची फार दया आली आणि माझ्याजवळ असलेले दोनशे कार्षापण तुम्हाला दान करावे असा मी निश्चय केला आहे. पण दिवसा ढवळ्या मला तुमच्या बरोबर शहरांतील रस्त्यावरून जाता येणार नाही. तुम्ही जर तुमच्या उपरण्यात गुंडाळून मी सांगितलेली ठिकाणी घेऊन जाल, तर आजच्या आज ते कार्षापण तुमच्या हवाली करतो."_

          _त्या लोभी ब्राह्मणाला दारुड्या कोल्ह्याचे म्हणणे खरे वाटले. त्याने आपल्या उपरण्यातुन त्याला गावाबाहेर स्मशानात नेले. तेथे खाली ठेविल्याबरोबर उपरण्यात देहधर्म करून कोल्ह्याने जंगलांत पळ काढला._

            _त्याठिकाणी बोधिसत्त्व राहत होता. तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, "हे कोल्ह्यावर विश्वास ठेवून तू आपली फजिती करून घेतलीस. त्याच्यापाशी शंभर कवड्याही मिळावयाच्या नाहीत मग दोनशे कार्षापण कोठून असणार? आत्ता तुझे उपरणे धुऊन मुकाट्याने चालता हो आणि द्रव्यलोभामुळे पुनः असा फसू नकोस."_


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*


*२३/११/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

वाईट परिस्थितीत वाढलेला प्राणी

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


                *_वाईट परिस्थितीत वाढलेला प्राणी_*


                     *_(अकालरावी जातककथा)_*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

            _एकदा बोधिसत्त्व औदीच्य कुळांत जन्मला होता. वयांत आल्यावर शास्त्राध्ययन करून वाराणसीत उत्तम आचार्य म्हणून तो प्रसिद्धीस आला. त्याच्याजवळ पाचशे विद्यार्थी अध्ययन करीत असत. त्या विद्यार्थ्यांजवळ वेळेवर आरवणारा कोंबडा होता. त्याच्या आरवण्याने ते जागे होत आणि अध्ययनाला सुरुवात करीत असत. तो कोंबडा काही काळानंतर मरण पावला. तेव्हा दुसऱ्या एखाद्या कोंबड्याच्या शोधात त्यांनी काही दिवस घालविले. एके दिवशी त्यातील एक तरुण विद्यार्थी स्मशानाच्या जवळ लाकडे गोळा करीत असताना त्याला तिथे एक सुंदर कोंबडा सापडला. त्याला आणून त्या विद्यार्थ्यांनी त्या कोंबड्याला आणून आपल्या जागेत ठेवले आणि त्याची उत्तम काळजी घेतली. पण हा कोंबडा कोणत्याही वेळी आरवून त्यांना त्रास देऊ लागला. एखाद्या वेळी तो मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्याने ओरडत असे आणि विद्यार्थ्यांना पहाट झाली समजून ते  जागे होऊन अभ्यासाला लागत. आणि नंतर जेव्हा त्यांच्या गुरुजवळ ते शिकत तेव्हा त्यांचे डोळे झोपेने जड होत असे. एखाद्या वेळेत तो सकाळ झाली तरी ओरडत नसे आणि विद्यार्थ्यांना वाटे अजून पहाट झाली नाही म्हणून ते तसेच झोपून राहत असत. सकाळी गुरुजवळ जाऊन अभ्यास करावा तर त्यांची तशी तयारी झालेली नसते. हा प्रकार होऊ लागला तेव्हा त्यांनी त्या कोंबड्याला मारून टाकले आणि आपल्या आचार्यांजवळ जाऊन ते म्हणाले, "गुरुजी, काही दिवसांपूर्वी आणलेल्या कोंबड्याने आम्हाला फार त्रास दिला, भलत्याच वेळी आरवण्यामुळे आमच्या अभ्यासात फारच व्यत्यय येत होता."_

           _आचार्यांनी तो कोंबडा कोठून आणला याची सर्व माहिती विचारून घेतली आणि ते म्हणाले,  *"हा कोंबडा आईबापाशिवाय वाढलेला. आचार्याचा सहवास त्याने कधीही केला नाही. तेव्हा काल आणि अकाल तो जाणत नसला तर त्यात नवल कोणते? योग्यायोग्य जाणण्यास प्राणी चांगल्या परिस्थितीतच जन्मला असला पाहिजे."*_


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*


*२४/११/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

Sunday, 22 November 2020

अतिपांडित्याचा परिणाम

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


                *_अतिपांडित्याचा परिणाम_*


                  *_(फूटवाणिज जातककथा)_*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

                 _एकदा बोधिसत्त्व वाराणसी नगरींत वाणिजकुळात जन्मला होता. त्याचे पंडित नाव ठेवण्यात आले. दुसरा एक अतिपंडित नावाचा समानवयस्क वाराणसीत राहत होता. वयांत आल्यावर बोधिसत्त्वाने त्याचा भागीदार होऊन उद्योग धंदा करण्यास सुरुवात केली. त्या दोघांना उद्योगात बराच नफा झाला, परंतु जेव्हा नफ्याची वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा अतिपंडित म्हणाला, "मला दोन हिस्से मिळायला पाहिजे, आणि तुला एकच हिस्सा मिळायला हवा."_

           _बोधिसत्त्व म्हणाला, "हे कसे! आपण दोघांनी सारखीच मेहनत केली आणि आपले सारखेच भांडवल होते. मला तुला दोन हिस्से आणि मला एक हिस्सा का म्हणून?"_

         _अतिपंडित म्हणाला, "अरे, माझ्या नावाची किंमत मोठी आहे. तू केवळ पंडित आहेस आणि मी अतिपंडित; यासाठीच मला दोन हिस्से मिळणे रास्त आहे."_

           _अतिपंडिताच्या या तर्कवादाने बोधिसत्त्वाचे समाधान झाले नाही. तेव्हा अतिपंडिताने त्याची समजूत घालण्याची दुसरी एक युक्ती शोधून काढली. तो म्हणाला, "तुला जर माझे म्हणणे पटत नसेल तर आपण उद्या या गावाजवळ प्रसिद्ध असलेल्या एका वृक्षदेवतेजवळ जाऊ, तिला आपल्या दोघांचे म्हणणे काय आहे ते सांगू आणि ती जसा निवाडा करील त्याप्रमाणे वागू."_

            _दुसऱ्या दिवशी अतिपंडिताने आपल्या म्हाताऱ्या पित्याला त्या ठरलेल्या ठिकाणी वृक्षाच्या वळचळणीत दडविले, व आपआपले म्हणणे कळवून निवाडा मागितला. अतिपंडिताच्या पित्याने आवाज बदलून आपल्या मुलाच्याकडून न्याय दिला. तेव्हा बोधिसत्त्व रागाने म्हणाला, "ही देवता मोठी लबाड दिसते. हिला या ठिकाणी राहू देणे इष्ट नाही."_

           _असे बोलून त्याने आसपास पडलेली लाकडे पाचोळा वगैरे गोळा करून त्या वृक्षाभोवती पसरून त्याला आग लावून दिली. बिच्चारा अतिपंडिताचा बाप धुराने गुदमरून गेला, आणि जळून जाण्याच्या भीतीने एका फांदीला लोंबकळून त्याने खाली उडी मारली. आणि तो म्हणाला, "मुलगा पंडिता झाला म्हणजे बस्स आहे, पण अतिपंडित नको! माझा मुलगा अतिपंडित झाला म्हणून माझ्यावर हा भयंकर प्रसंग ओढावला."_

         _ही लबाडी उघडकीस आल्यामुळे अतिपंडिताच्या नफ्याचा अर्धा हिस्सा देऊन बोधिसत्त्वाशी तडजोड करणे भाग पडले._


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*


*२२/११/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

Friday, 20 November 2020

नावाची फारशी किंमत नाही

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


          *_नावाची फारशी किंमत नाही_*


                       *_(नामसिद्धी जातककथा)_*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

                 _एके काळी बोधिसत्त्व तक्षशिला नगरीत प्रसिद्ध आचार्य होऊन पाचशे शिष्यांना शिकवीत असे. त्यातील एकाचे नाव *पापक* असे होते. "कायरे पाप्या, इकडे ये रे पाप्या" असे लोक त्याला म्हणत असत. त्यामुळे कंटाळून जाऊन तो आपल्या गुरूला / बोधिसत्त्वाला म्हणाला, "गुरुजी, मला माझे नाव अमंगल वाटते. दुसरे एखादे चांगलेसे नाव मला द्या."_

          _बोधिसत्त्व म्हणाला, "येथल्या येथेच चांगले नाव घेण्यापेक्षा देशपर्यटन करून एखादे चांगले नाव पाहून ये, आणि मला सांग, म्हणजे आम्ही सर्वजण तुला त्याच नावांर हाक मारीत जाऊ."_

            _दुसऱ्या दिवशी पापकाने दुसऱ्या गावी जाण्यासाठी शिदोरी बांधून सकाळीच दुसऱ्या गावाचा रस्ता धरला. वाटेत ज्याच्या त्याच्या नावाचा अर्थ पाहात तो जाऊ लागला. वाटेत एका शहराजवळ आला असता काही लोक प्रेत घेऊन स्मशाणयात्रेला चालले होते. तेव्हा पापक म्हणाला, "कायहो इतकी मंडळी कोठे चालली?"_

        _ते लोक म्हणाले, "जीवक नावाचा आमचा एक मित्र मरण पावला त्याच्या अंत्यविधीला आम्ही जात आहो." "पण काय हो! जीवक मरतो हे कसे?"_

          _"जीवक असो वा अजीवक असो, मनुष्य म्हटला की तो मरणारच, मरण कोणालाच चुकले नाही. व्यवहारापूरताच काय तो नावाचा उपयोग. तू अगदीच खुळा दिसतोस!" असे त्यांनी उत्तर दिले._

         _बिचारा पापक चांगल्या नावाचा हा विपर्यास पाहून आश्चर्यचकित झाला. तो तसाच पुढे जातो तो एका दासीला वेळेवर काम करीत नाही, म्हणून तिचा मालक रस्त्यावर चाबकाने मारत होता. तो त्याला म्हणाला, "या बाईचे नाव काय व हिला तुम्ही का मारता?"_

           _तो म्हणाला, "हिचे नाव धनपाली आणि ही वेळेवर काम करीत नसल्याने मी हिला मारत आहे."_

        _"अहो पण धनपालिवर दुसऱ्याचे काम करण्याचा प्रसंग का यावा?"_

         _"अहो काय मूर्खांसारखे प्रश्न विचारता? ही जन्माचीच दासी आहे. धनपाली असे नाव ठेविले म्हणून काय झाले? धनपाली असू द्या किंवा अधनपाली असू द्या. गरिबी यायची असेल तर आल्यावाचून राहात नाही. नावाने कोणताच कार्यभाग व्हावयाचा नाही, ते केवळ व्यवहारापूरते आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत नसावी, हे मोठे आश्चर्य आहे."_

           _बिचारा पापक चांगल्या नावाच्या मंगलत्वाविषयी जवळ जवळ निराश होऊन तसाच पुढे चालला. शहराच्या बाहेर गेल्यावर काही अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक माणूस त्याला दिसून आला. पापकाने त्याला हिकडे फिरण्याविषयी  विचारपूस केलीआणि तसेच त्याचे नाव विचारले, तेव्हा तो म्हणाला, "माझे नाव पंथक (वाटाड्या), मी वाट चुकल्यामुळे इकडे तिकडे फिरत आहे. मला अजून माझा मार्ग सापडला नाही."_

         _"पण पंथक वाट चुकतो हर कसे?"_

         _"अहो हे फक्त माझे नाव आहे. वाट चुकण्याचा आणि याचा काहीच संबंध नाही. तुम्ही नांवावर भरवसा ठेवणारे वेडगळ दिसता!"_

         _पापक चांगल्या नावाच्या गुणांविषयी पूर्ण निराश झाला व आपले नाव बदलण्याचा बेत त्याने रद्द केला. तेथून आपल्या गुरुजवळ जाऊन घडलेले सर्व वर्तमान त्याने सांगितले. त्याच्या मित्रांनी पापकाने कोणते नाव शोधून आणले असा बोधिसत्त्वाला प्रश्न केला. तेव्हा तो त्याला म्हणाला, "जीवक मरतो, धनपालिला दारिद्र येते व पंथक वाट चुकतो, हे पाहून आपला पापक चांगल्या नांवाचा थांग लागल्यावाचूनच परत आला." पापकाने तेच नाव कायम ठेवले हे निराळे सांगावयास नको._


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


 


*संदर्भ : - जातक कथा संग्रह*


*संकलन :- महेश कांबळे*


*२१/११/२०२०*


https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

Thursday, 19 November 2020

निर्वाण / निब्बान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*_निर्वाण / निब्बान_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

       _मनाचे परिवर्तन अकुसलांसाठी पुर्णपणे थांबण्याची अवस्था, मनाच्या पूर्ण विश्रांतीची अवस्था, इच्छा, लालसा व दुःखाच्या अभावाची अवस्था, निर्वाणप्रत पोहोचण्यापूर्वी मनुष्याचा सतत पुंनर्जन्म होतो; जेव्हा तो निर्वाणप्रत पोहोचतो, तेव्हा त्याचा पुन्हा जन्म होत नाही. (कारण मनाच्या अवस्थेचे परिवर्तन होणे थांबलेले असते.)_

       _*आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गाचे अंतिम ध्येय म्हणजेच निर्वाण होय. निर्वाणाचा  अर्थ – रोगाद्वेषापासून मुक्ति.* राध नावाचे स्थवीर भगवंताकडे गेले, तेव्हा निर्वाणाचा उद्देश स्पष्ट करताना भगवंतांनी सांगितले, *श्रेष्ठ जीवन निर्वाणाश्रीत आहे. निर्वाण हेच लक्ष्य होय आणि निर्वाण हाच उद्देश होय. “निर्वाण” म्हणजे मनाच्या विकारांपासून मुक्ति, निर्वाण स्थितीत राहून पुण्यशील असे सर्वश्रेष्ट जीवन जगता येते. निर्वाण हे आर्य अष्टांगिक मार्गावरील अंतिम लक्ष्य होय. मनाचे विकार नष्ट झाले म्हणजे उरलेले जीवन निर्वाणाच्या स्थितीमध्ये सुखाने जगता येते.*_

       _केवळ “योगाभ्यासाने” निर्वाणप्राप्ती होऊ शकत नाही. योगाभ्यास करण्यात तत्पर असलेल्या आयुष्यमान मेघियच्या मनात तीन प्रकारचे संकल्प – विकल्प वारंवार येऊ लागले होते.-_      

१.कामभोगासंबंधी संकल्प – विकल्प

२.व्यापाद (क्रोधा) संबंधी संकल्प – विकल्प

३.विहिंसे (हिंसे) संबंधी संकल्प – विकल्प

       _आयुष्यमान मेघियने संध्याकाळी भगवंतांकडे जाऊन ही गोष्ट सांगितली. भगवंत म्हणाले, “मेघिय! योगाभ्यासाला आरंभ करण्यापूर्वि अपिरपक्व मनाच्या व्यक्तीने आपल्या मनाला परिपक्व बनविले पाहिजे. याची साधने अशी –_

१.सत्संगती

२.सदाचार (धम्म)

३.सदुपदेश

४.सदाचरण

५.प्रज्ञावान होणे

_मेघिय! ह्या पाच गोष्टीत प्रवीण झाल्यावर भिकखुला -_

१.आसक्तीचा नाश करण्याकरिता अशुभ भावना (शरीराच्या घृणास्पद स्वरूपाची कल्पना) केली पाहिजे.

२.वितर्काचा नाश करण्याकरिता आना-पान स्मृतिची (श्वासोच्छवास करताना जागृत राहण्याची) भावना केली पाहिजे.

३.क्रोधाचा नाश करण्याकरिता मैत्रीची भावना केली पाहिजे.

४.अहंकाराच्या नाशाकरीता अनित्यतेची भावना केली पाहिजे.

५.अनात्मसंज्ञी होण्याकरिता सुद्धा अनित्यतेची भावना करणे अनिवार्य आहे.

_*जेव्हा अहंकाराचा समूळ नाश होतो तेव्हा ह्याच जन्मी तो निर्वाणास प्राप्त होतो.*_  

 

_*चितन पाच प्रकारचे आहे –*_

१)            प्रथम ध्यान हे प्रेममय मैत्रीध्यान होय. त्यात ध्यानकर्त्याने आपल्या अंतःकरणात असे भरवून घ्यायला पाहिजे की, तो संपूर्ण प्राणिमात्रांच्या सुखाकरिता व त्याचप्रमाणे त्याच्या शत्रूंच्या सुखाकरिता देखील त्याने उत्कट ईच्छा करावी

२)            द्वितीय ध्यान हे करूणामय ध्यान होय. त्यांत त्याने असा विचार करावयास पाहिजे की, सर्वच प्राणिमात्रांचे जीवन दुःखाने भलेले आहे. त्यांच्या दुःखाची व चिंतेची हुबेहूब कल्पना करुन त्यांच्याविषयी अतीव करुणा जागृत करावी

३)            तृतीय ध्यान म्हणजे हर्षमय ध्यान म्हणजेच मुदिता होय. दुसर्‍यांच्या उत्कर्षाचा विचार करावा. त्यांच्या आनंदाने स्वतः आनंदी व्हावे.

४)            चतुर्थ ध्यान म्हणजे अपवित्रतेवरील ध्यान म्हणजेच उपेक्षा होय. अप्रामाणिकपणाचे गल व अकुशल कर्माचे दुष्परिणाम ह्यांचा विचार करावा. क्षणिक सुख नेहमीच कसे क्षुद्र असते व त्याचे परिणाम कसे प्राणघातक असतात, याचा विचार करावा.

५)            पाचवे ध्यान प्रसन्नतेवरील ध्यान होय. त्यात आपल्या मनाला प्रेम व द्वेष, जुलूम व दास्य, समृद्धी व न्युनता या भावनांच्या मर्यादेबाहेर येऊन स्वतःच्या प्रारब्धाचा निःपक्षपातपणे व अतिशय धिरगंभीरपणे विचार करायला हवा.

मनुष्य या ध्यानांद्वारे अभिज्ञेत पोहोचतो.

 

_*अभिज्ञा सहा प्रकारच्या आहेत –*_

१.    दिव्यचक्षु

२.    दिव्यश्रवण शक्ति

३.     दिव्य रूपशक्ती – कोणतेही रूप धारण करण्याचे सामर्थ्य

४.  पूर्व निवासामृती – पूर्व जन्माच्या (म्हणजे जेवढी मानसिक    परिवर्तने झाली त्यांच्या स्मृति)

५.     परचित्तविजानन – दुसर्‍यांचे विचार समजण्याचे सामर्थ्य

६.    आसवक्षयज्ञान – जीवनाच्या प्रवाहाची परिपूर्णता उमजण्याचे ज्ञान

       *_ह्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. परंतु प्रत्येक मनुष्य त्यांना प्राप्त करू शकतो. अभिज्ञेत पोहोचावायची पाच ध्याने आहेत._*

       _जिच्याद्वारे एखादा मनुष्य मनोविकारांना शांत करून ज्ञान प्राप्त करू शकतो आशा ध्यानाच्या दोन मुख्य क्रिया – समथ आणि विदस्सना –_

१. पवित्र जीवन जगून आणि तृष्णेला जिंकण्याचे सतत प्रयत्न करून मनोविकारांवर विजय मिळविणे

२.             मनन व चिंतंनाद्वारे अलौकिक प्रज्ञेची प्राप्ती करून घेणे

ह्या दोहोंपैकी प्रत्येकीच्या वेगवेगळ्या वीस मुद्रा आहेत.

       _*ज्ञानाच्या अंतिम अवस्थेत आणि समाधीच्या स्थितीत मन कोरे असते आणि विचार थांबलेला असतो असे नाही आहे. तिच्या अगदी विरुद्ध स्थिति असते.* त्या अवस्थेत अंतर्मनाच्या दक्षतेची पराकाष्ठा होते आणि ज्ञान आत्मसात करावयाचे सामर्थ्य त्यानुसारच विस्तीर्ण झालेले असते. ज्याप्रमाणे उंच टेकड्यांमधील अरुंद पाऊलवाटेवरून चालणार्‍या मनुष्याचा दृष्टीकोण संकीर्ण होतो, त्याचप्रमाणे सामान्य जागृत अवस्थेत असताना माणसाचा दृष्टीकोण संकीर्ण असतो. गरुडाने उंच आकाशात भरारी मारून स्थिरपणे असताना उंचावरून त्याला ज्याप्रमाणे संपूर्ण प्रदेशावर नजर टाकता येते, त्याचप्रमाणे माणसाला ज्ञानाच्या व समाधीच्या सर्वोच्च अवस्थेत असताना, त्याच्या भव्य दृष्टिपथात येणार्‍या संपूर्ण ज्ञानाचे तत्क्षणीच आकलन होते. विचार थांबलेला नसतो, तो अतिशय तीव्र स्वरुपात प्रखर असतो. परंतु स्वतःविषयी नसून बहुजनहिताय बहुजनसुखाय असतो._

_*निरोध आणि निर्वाण*_

       _*तृष्णेचा निरोध होणे म्हणजेच निर्वाण होय.* संसारीक अज्ञात पुरुष इंद्रियांच्या विषयोपभोगात डुंबून आनंद मानतात. ते वारंवार जन्म घेतात, त्यांच्या मनात तृष्णामय विचारांची उथळ पुथळ सुरू असते जरा, मरण ह्यांचे वारंवार दुःख भोगतात. परंतु ज्ञानी आर्यश्रावक इंद्रियांच्या सुखोपभोगापासून अलिप्त राहतात. त्यामुळे त्यांच्या “तृष्णेचा निरोध होतो आणि तृष्णेचा निरोध की, “उपादानाचा निरोध” होतो. उपादानाचा निरोध झाला की, “भवचा निरोध होतो. भवचा निरोध झाला की, “जन्म घेणे” बंद होते आणि पुनर्जन्माच्या निरोधाने जन्म, जरा, मरण, शोक इ. दुःखांचा निरोध होतो, अशा तर्‍हेने तृष्णेचा निरोध म्हणजेच निर्वाण प्राप्त होणे होय._

         _*पुण्य करणारे, स्वीकारण्यास योग्य अशा धम्मालाच मानणारे, जाणून घेण्यास योग्य अशा धम्मालाच जाणणारे, अनुचित धर्माचा त्याग करणारे, योग्य धम्माचा  अभ्यास करणारे व साक्षात्कार करण्याजोगा धम्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार करणारेच “निर्वाण” प्राप्त करतात. थोडक्यात आर्य-अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करणार्‍यांना निर्वाण प्राप्त होते.*_

       _*निर्वाणानंतर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा लोप होत नाही. निर्वाणानंतर मनुष्य जन्ममृत्युच्या फेर्‍यापासून (म्हणजे तृष्णामय वैचारिक चक्रापासून) मुक्त होतो. त्याचा तृष्णामय जिवनप्रवाह नेहमीकरता बंद होतो व कुशल जीवनप्रवाह सुरू होतो आणि उपादानाचा एकदम अंत झालेला असतो.*_

       *_निर्वाण काहीसे स्वर्गीय स्थळासमान किंवा स्वर्गासमान आहे असे बौद्धधम्म शिकवीत नाही. जेव्हा कुटदंताने भगवंतांना विचारले, “निर्वाण कोठे आहे?’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले कि, “जेथे जेथे नीतीपर उपदेशांचे म्हणजे आर्य – अष्टांगिक मार्गाचे पालन केले जाते तेथे तेथे निर्वाण असते.”_*

       _निर्वाणाप्रत पोहोचण्याच्या हेतूने आपण कुशल कर्म केले पाहिजे, असे बौद्धधम्म शिकवितो. निर्वाणप्राप्तीचा उद्देश समोर ठेवून कुशल कर्मे करीत राहिल्याने कालांतराने तृष्णा हळूहळू नष्ट होत जाऊन मनुष्यास निर्वाणाची प्राप्ती होऊ शकते. पूर्णतः निःस्वार्थीपणाचाच प्रतिशब्द म्हणजे निर्वाण. “मी”, “अहं” याचे सत्याला पुर्णपणे शरण जाणे, म्हणजेच निर्वाण. ह्या पृथ्वीवर जिवंतपणीच प्रत्येकाला निर्वाणाची अवस्था प्राप्त होऊ शकते._

*_निर्वाणाची अवस्था_*

       _निर्वाण केवळ सुखाची अवस्था असून तिच्यात दुःखाचा लवलेशही नसतो. खरे पाहता निर्वाण प्राप्त करण्याकरिता, निर्वाणाचा शोध घेण्याकरिता, दुःख भोगावे लागते. शरीराला व मनाला अंकित करून सर्व इंद्रियांवर ताबा मिळवावा लागतो. शारीरिक व मानसिक बंधने तोडवी लागतात. त्यामुळे निर्वाणापूर्वीच्या अवस्थेत दुःख भोगावे लागले तरी, निर्वाणानंतर सुखच मिळते. शिलावर प्रतिष्ठित होऊन, मनाला अंकित केल्यावर मनुष्य कुठेही असो तो निर्वाणाचा साक्षात्कार करू शकतो, म्हणून “शील” हे निर्वाणाचे मूळ आहे. शिलाशीवाय निर्वाणाचा साक्षात्कार होऊच शकत नाही._    

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संकलन : महेश कांबळे*

*संदर्भ :*

१)      मिलिंद प्रश्न

२)      बौद्ध प्रश्नोत्तरी

३)      तथागताची सत्यगाथा

४)      बौद्धधर्म – एक बुद्धिवादी अध्ययन

५)      बौद्धधम्म जिज्ञासा

दिनांक : २०/११/२०२०

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...