!! नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स !!
महापजापती गौतमी :- एक व्यक्तिमत्त्व अभ्यास
- महेश हरिश्चंद्र कांबळे
T.Y. BA
(Five years integrated course in Pali)
१) परिचय :-
महाप्रजापती यांचा जन्म कोलिय नगरीतील देवदह नगरात महासुप्पबुद्ध / अंजन यांच्या घरी झाला. मायादेवीची ही धाकटी बहीण. ह्या दोघी उपवर झाल्यावर शुद्धोदन शाक्यानें त्यांच्याशी विवाह केला. बोधिसत्त्व जन्मल्यानंतर काही काळाने हिला नंद नावाचा एक मुलगा झाला. मायादेवी प्रसूतीनंतर सातव्या । दिवशीं मरण पावली, व तेव्हांपासून बोधिसत्त्वाचे लालनपालन करण्याचा सर्व भार हिच्यावर पडला. गोतमींने आपल्या मुलापेक्षाहि अधिक प्रेमाने बोधिसत्त्वाचा संभाळ केला.
वेळेप्रसंगी सिद्धार्थ मोठे झाले आणि सिद्धार्थाने महाभिनिष्क्रमण करून सम्यक सम्बुद्ध झाले आणि कालांतराने पिता महाराज शुद्धोधन यांना भेटण्यासाठी स्वतः बुद्ध सात वर्षानंतर कपिलवस्तू येथे पोहोचतात. दुसऱ्या दिवशी नगरामध्ये पिंडपात करत असताना राजा बुद्धांना आणि भिक्षु संघाला त्यांच्या महालामध्ये भोजनासाठी निमंत्रित देतात, आणि त्याच दिवशी जेव्हा भगवान बुद्ध राजा शुद्धोधनाला धम्म सांगतात तेव्हाच, पहिल्याच धम्मश्रवण मध्ये राजा शुद्धोधन हे सोतापन्न अवस्थेमध्ये प्रतिष्टीत होतात आणि दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध नंद याला प्रवजित करतात आणि सातव्या दिवशी बुद्ध आपल्या मुलाला राहुलला प्रवजित करतात, भिक्षु बनवतात आणि मग ते वैशालीकडे प्रस्थान करतात.
कालांतराने राजा शुद्धोधन मरण पावतात. इथे प्रजापती गौतमी विचार करते की, आता माझी मोठी बहीण नाहीये, माझे पती सुद्धा नाहीये, माझा मुलगा आता भिक्षु झालेला आहे आणि माझा नातू सुद्धा प्रवजित झालेला आहे. आता ह्या राजमहलाच्या खोल्या मला एकट करून सोडतात, येथे माझं मन लागत नाहीये. या राज वैभवामध्ये मी एकटी काय करू ? असा विचार करत त्या सुद्धा त्यांच्या दासींसोबत घरदार सोडण्याचा विचार करतात.
राजमहल टाकण्याचा विचार करतात, त्यांच्या मनामध्ये वैराग जागत, आणि बुद्धांच्या धम्मामध्ये आपण सुद्धा प्रवज्जा घ्यावी आणि धम्म विनयचा पालन कराव असं त्यांना विचार येतो आणि ते प्रवज्जा घेण्यासाठी भगवान बुद्धांना भेटण्यासाठी निघतात.
२) अभ्यास हाती घेण्याचे कारण :-
१. सुमारे २६०० वर्षांपूर्वी एक स्त्री असा विचार करते की, सम्यक संबुध्द यांनी घरदाराचा - सर्व ऐश्वर्याचा त्याग करून दुःख मुक्तिचा मार्ग शोधून दुःख मुक्त होतात... का नाही मी ही त्याच मार्गावर जाऊन सम्यक संबुद्धांच्या सानिध्यात राहून त्यांच्याकडून तो मार्ग शिकून दुःख मुक्त होऊ.
२. आणि या विचाराने महापजापती गौतमी प्रभावित होतेच सोबत असा ही विचार करते की जर मी या मार्गावरून जात आहे तर शाक्य कुळातील तसेच इतर ज्या महिला आहेत ज्यांचे कोणी ना कोणी नातलग भगवान बुद्धांच्या भिक्षू संघात सामील झाले आहेत. त्या घरी एकट्याच आहेत अशा महिलांनी ही माझ्यासारखे भगवान बुद्धांच्या संघात सामील व्हावे म्हणून ती त्या महिलांना प्रेरणा देते आणि स्वतः सोबत त्या महिलांना ही आपल्या सोबत भगवान बुद्धांना भेटण्यासाठी घेऊन जाते.... हे महापजापती गौतमीचे नेतृत्व दिसून येते.
३. बुद्धांनी महापजापती गौतमीसाठी उद्गारले पुढील वाक्य अभ्यासण्यासाठी.....
"एतदग्गं, भिक्खवे, मम साविकानं भिक्खुनीनं रतञ्जूनं यदिदं महापजापतिगोतमी'
"चिरप्रवजित भिक्षुणीश्राविकांत महाप्रजापती गौतमी पहिली आहे."
सारांश रुपाने महापजापती गौतमी यांचा "एक स्वतंत्र विचार करणारी, त्यांच्यातील नेतृत्व गुण व बुद्धांनी तिच्यासाठी उद्गारले वाक्य" यांचा अभ्यास करण्यासाठी "महापजापती गौतमी : एक व्यक्तिमत्त्व अभ्यास" हा विषय घेण्यात आलेला आहे.
३. ध्येय :-
महापजापती गौतमी या प्रवज्जा घेण्यासाठी भगवान बुद्धांना भेटण्यासाठी जातात... तेंव्हा त्या प्रवज्जा घेण्यासाठी भगवान बुद्धांना कश्या प्रकारे विनंती करतात आणि त्या त्यात यशस्वी कश्या होतात..... हे आपण आत्ता पाहूया
महापजापतिगोतमी यांची प्रवज्जा
त्यावेळेस भगवान बुद्ध कपिलवस्तूच्या निग्रोधआराम येथे राहत होते. तेव्हा महाप्रजापती त्यांच्याकडे येते, भगवान बुद्धांना नमन करते, अभिवादन करते, आणि एका ठिकाणी बसून भगवंतांना विनंती करते. "भन्ते खूपच छान होईल की, आपण ह्या धम्मविनयांमध्ये जर स्त्रियांना सुद्धा प्रवज्जा दिली तर, स्त्रियांचेही मंगल होईल, कल्याण होईल", अशी ती बुद्धासमोर याचना करते.
तेव्हा बुद्ध त्यांच्या शब्दांमध्ये त्यांना नकार देतात आणि म्हणतात की कदाचित माझं उत्तर तुम्हा लोकांना आवडलेल नसेल, पण ते उचित आहे. अशाच प्रकारे प्रजापती गौतमीने बुद्धांसमोर दुसऱ्यांदा सुद्धा आणि तिसऱ्यांदा सुद्धा याचना केली आणि बुद्धांनी नकारच दिला.
तेव्हा प्रजापती गौतमी भगवान यांना वंदन करून बाकी सगळ्या स्त्रियांसोबत आपल्याला संघामध्ये जागा नाही, प्रवज्जा मिळणार नाही, या विचाराने दुःखी होऊन रडू लागल्या, निराश झाल्या आणि त्या ठिकाणाहून परत जातात.
तेव्हा भगवान कालांतराने चारिका करत करत वैशालीला पोहोचले आणि वैशालीचे महावनामध्ये कुटागारसाला येथे राहत होते. तेव्हा परत प्रजापती गौतमी आपले मुंडन करून, केस कापून, काशाय वस्त्र घालून, अशाच प्रकारे वैशालीच्या कुटागार सालामध्ये पोहोचते. तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर त्यांचे पाय सुजलेले असतात, शरीर मातीने मळकट झालेलं होतं आणि ते दुःखी होते, रडत होते आणि परत एकदा बुद्धांच्या कुटागार सालाकडे जाऊन ते उभे राहिले.
तेव्हा भन्ते आनंद, प्रजापती गौतमी यांना बघतात आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी जातात. त्यांना विचारतात, कि ह्या सगळ्या नाराजगिच कारण काय आहे? तेव्हा प्रजापती गौतमी सांगतात की, भगवान बुद्धांनी आम्हा स्त्रियांना भिक्षुनि संघामध्ये जागा नाही. अशा प्रकारे उत्तर दिलं आहे आणि म्हणून आम्ही दुःखी आहोत. भिक्षु आनंद त्यांना शांत करतात, त्यांना सांत्वना देतात आणि त्यांचा निरोप घेऊन बुद्धांकडे जातात. बुद्धांना याची कल्पना देतात. भन्ते आनंद भगवान बुद्धांना सांगतात की, "भन्ते बरं होईल की स्त्रिया सुद्धा भगवंतांनी सांगितलेल्या धम्मामध्ये, विनयामध्ये प्रवजित होऊन धमाच पालन करतील".
भगवंतांनी त्यासाठी नकार दिला. आनंदाने पुन्हा पुन्हा विचारून तीन वेळेस बुद्धांसमोर याचना केली आणि तिघ वेळेस सुद्धा बुद्धांनी नकार दिला. कारण की बुद्धांनी भविष्य बघता त्याचे कारण सुद्धा बघितले होते आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा नकार देत होते.
तेव्हा भन्ते आनंद भगवान बुद्धांना प्रश्न विचारतात की, "भगवान, तथागतांनी सांगितलेल्या या धर्माचे पालन करून का स्त्रिया सुद्धा सोतापन, सकदागामी, अनागामी आणि अरहंत होऊ शकतात?" तेव्हा भगवान उत्तर देतात आणि सांगतात, "हो आनंद स्त्रिया सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचे पालन करून सोतापन, सकदागामी, अनागामी आणि अरहंत होऊ शकतात."
तेव्हा आनंद भगवंतांना सांगतात कि, "भगवान, जर स्त्रिया सुद्धा बुद्धांनी सांगितलेल्या धर्माचे पालन करून सोतापन, सकदागामी, अनागामी आणि अरहंत होऊ शकतात, तर तेव्हा प्रजापती गौतमी यांनी तर भगवान बुद्धांवर उपकार केलेले आहेत, ते त्यांच्या मावशी आहेत, सावत्र आई आहे, प्रजापतींनी सिद्धार्थाला दूध पाजलेले आहे, त्यांचं लालन-पोषण केलेलं आहे".
आनंद पुढे बोलतात की, "जेव्हा आपल्या आईने शरीर त्यागले तेव्हा प्रजापती गौतमीनेच तुम्हाला मोठे केले. खूपच छान होईल भगवान की आपण स्त्रियांना सुद्धा तथागतांच्या या धम्मविनयांमध्ये जागा द्याल आणि त्यांना सुद्धा प्रवजित होऊन धम्मपालन करण्याचा एक संधी उपलब्ध करून द्याल."
तेव्हा भगवान, भन्ते आनंद यांना सांगतात आणि त्यांना कळवतात की जर स्त्रिया या आठ गुरु धर्मांना स्वीकार करतील तेव्हाच त्यांची भिक्षुणी संघांमध्ये प्रवज्जा होऊ शकते आणि भिक्षुणी संघ स्थापन होऊ शकतो.
अट्ठगरुधम्मा
"सचे, आनन्द, महापजापती गोतमी अट्ठ गरुधम्मे पटिग्गण्हाति, सावस्सा। होतु उपसम्पदा ।
आनंद, जर महाप्रजापती गोतमीने या आठ गुरु धर्माना पूर्णपणे ग्रहण केल, त्यांना समजल, त्यांचे पालन केलं तेव्हाच त्यांची उपसंपदा होऊ शकते.
"वस्ससतूपसम्पन्नाय भिक्खुनिया तदहुपसम्पन्नस्स भिक्खुनो अभिवादनं पच्चुट्ठाने अञ्जलिकम्मं सामीचिकम्म कातब्ब।
अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो ।
जरी एखादी भिक्षुणी शंभर वर्ष उपसंपदा प्राप्त केलेली असेल तरीसुद्धा त्याच दिवशी उपसंपदा प्राप्त केलेल्या भिक्षूला नमन केले पाहिजे, अभिवादन केले पाहिजे, हात जोडून वंदना केली पाहिजे. ह्या गुरुधर्माला या धम्म विनयाला स्वीकार केले पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे, मानलं पाहिजे आणि याचे जीवनभर पालन केले पाहिजे.
"न भिक्खुनिया अभिक्खुके आवासे वस्सं वसितब्बं ।
अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो ।
भिक्षुणी अशा कुठल्याच जागेवर वर्षावास करणार नाही जिथे भिक्षु राहत नाही, या धम्मविनयला या गुरुधमाला स्वीकार केला पाहिजे, त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवन पर्यंत याचे पालन केले पाहिजे.
"अन्वद्धमासं भिक्खुनिया भिक्खुसङ्घतो द्वे धम्मा पच्चासीसितब्बा उपोसथपुच्छकञ्च,ओवादूपसङ्कमनञ्च ।
अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो ।
भिक्षुणी संघाने भिक्षूसंघासमोर दोन गोष्टींची दर पंधरा दिवसांनी अपेक्षा केली पाहिजे, आशा ठेवली पाहिजे, आधी भिक्षूच्या समोर जाऊन धम्म श्रवण करायचे, आणि उपोसथ संबंधी काही प्रश्न उत्तर असतील तर ते विचारायचे. या धम्म विनयाला स्वीकार केलं पाहिजे, त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर याचं पालन केलं पाहिजे.
"वस्संवुट्ठाय भिक्खुनिया उभतोसले तीहि ठानेहि पवारेतब्ब दिट्टेन वा, सुतेन वा, परिसङ्काय वा।
अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीव अनतिक्कमनीयो।
वर्षावास संपल्यानंतर पवारनाच्या वेळेस भिक्खु संघासोबत तसेच भिक्षुणी संघासोबत सुद्धा पवारना केली पाहिजे आणि आपले दृश्य, श्रुत आणि संदिग्ध अशा तीन प्रकारच्या दोषांची पवारना केली पाहिजे. या धम्म विनयला स्वीकार केला पाहिजे त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर याचं पालन सुद्धा केलं पाहिजे.
"गरुधम्म अज्झापन्नाय भिक्खुनिया उभतोसले पक्खमानत्तं चरितब्ब ।
अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो।
जर भिक्षणी कडून संघादिसेस सारखा मोठा गंभीर अपराध झाला, तर त्या भिक्षुणीला दोन्ही संघांमध्ये, भिक्षु आणि भिक्षणी संघामध्ये पंधरा दिवसांपर्यंत प्रायचित केले पाहिजे. या धम्म विनयाला स्वीकार केला पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर त्याचे पालन सुद्धा केले पाहिजे.
"द्वे वस्सानि छसु धम्मेसु सिक्खितसिक्खाय सिक्खमानाय उभतोसले उपसम्पदा परियेसितब्बा।
अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीव अनतिक्कमनीयो।
दोन वर्षावास पर्यंत सहा धम्मांचा अभ्यास करणाऱ्या भिक्षुणीला दोघी संघामध्ये उपसंपदा ग्रहण केली पाहिजे, भिक्षु संघामध्ये सुद्धा आणि भिक्षुणी संघामध्ये सुद्धा. या धम्मविनयाला स्वीकार केलं पाहिजे, त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर त्याचं पालन सुद्धा केलं पाहिजे.
"न भिक्खुनिया केनचि परियायेन भिक्खु अक्कोसितब्बो परिभासितब्बो ।
अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो।
भिक्षुणीने कुठल्याही परिस्थितीमध्ये भिक्षूचा अपमान नाही केला पाहिजे, या धम्म विनयला स्वीकार केलं पाहिजे, त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर पालन सुद्धा केलं पाहिजे.
"अज्जतग्गे ओवटो भिक्खुनीनं भिक्खूसु वचनपथो, अनोवटो भिक्खूनं भिक्खुनीसु वचनपथो।
अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीव अनतिक्कमनीयो ।
आजच्या नंतर भिक्षुणी, भिक्षूसंघाला काही सांगण्यासाठीच द्वार बंद आहे पण भिक्षूचे भिक्षुनींना काही सांगण्याचा द्वार उघडा आहे. या धम्म विनयाला स्वीकार केले पाहिजे, त्याला मानलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे त्याचबरोबर जीवनभर याचं पालन सुद्धा केलं पाहिजे.
"सचे, आनन्द, महापजापति गोतमी इमे अट्ठ गरुधम्मे पटिग्गण्हाति, सावस्सा होतु उपसम्पदा" ति
आनंद, जर या आठ गुरु धर्माला प्रजापती यांनी स्वीकार केलं तरच त्यांची उपसंपदा होईल.
अथ खो आयस्मा आनन्दो भगवतो सन्तिके अट्ठ गरुधम्मे उग्गहेत्वा येन महापजापति गोतमी तेनुपसङ्कमि, उपसङ्कमित्वा महापजापतिं गोतमिं एतदवोच - "सचे खो त्वं, गोतमि, अट्ठ गरुधम्मे पटिग्गण्हेय्यासि, साव ते भविस्सति उपसम्पदा ।
अशाच प्रकारे भन्ते आनंद, महाप्रजापती जिथे होत्या तिथे जाऊन, या आठ गुरु धर्मांना चांगल्या प्रकारे समजून सांगतात आणि सांगतात की जर तुम्ही या आठ गुरु धम्माला चांगल्या प्रकारे जाणलं मानलं आणि जीवन पर्यंत याचे पालन केलं तरच तुम्ही उपसंपदा घेऊ शकतात.
“सेय्यथापि, भन्ते आनन्द, इत्थी वा पुरिसो वा दहरो, युवा, मण्डनकजातिको सीसंनहातो उप्पलमालं वा वस्सिकमालं वा अतिमुत्तकमालं वा लभित्वा उभोहि हत्थेहि पटिग्गहेत्वा उत्तमने सिरस्मि पतिट्ठापेय्य; एवमेव खो अहं, भन्ते, आनन्द इमे अट्ठ गरुधम्मे पटिग्गण्हामि यावजीवं अनतिक्कमनीये"ति ।
भन्ते आनंद यांना उत्तर देत महापजापती गौतमींनी आपली राजी दाखवली आणि त्याचबरोबर खूप सारे उदाहरणे देऊन त्या किती आनंदीत आहे, किती प्रसन्न आहे, बुद्धांच्या संघांमध्ये त्यांना इतक्या चांगल्या प्रकारे भिक्खुणी संघामध्ये प्रवजित होण्याचा मान मिळत आहे. यावर ते त्यांचा आनंद दर्शवतात. गाथांमध्ये खूप साऱ्या प्रकारे उपमा देऊन ते आपली इच्छा दाखवतात आणि त्याचबरोबर या आठ गुरु धर्मांना किती चांगल्या प्रकारे पालन केलं पाहिजे आणि आम्ही भिक्षुणीसंघ याचा खूप चांगल्या प्रकारे पालन करू असे ते गाथेमध्ये वर्णन करतात.
४. उद्दिष्ट :-
महाप्रजापती गौतमी बुद्धांच्या धम्मामध्ये प्रतिष्ठित होऊन भिक्षुनि संघाची मुख्य आणि श्रेष्ठ झाल्यानंतर खूप कठीण परिश्रमाने आपल्या पारमी पूर्ण करत लवकरच अर्हत पदाची प्राप्ती करतात. आणि या अरहत पदाची प्राप्ती केल्यानंतर आपल्या मनातून उत्पन्न झालेल्या करुणा आणि कृतज्ञ भाव जाणून बुद्धांची वंदना करतात. बुद्धांना धन्यवाद देतात आणि आपल्या गाथेमध्ये बोलतात.
"अहं सुगत ते माता, त्वञ्च वीर पिता मम ।
हे शाक्यपुत्र हे वीर, मी तुमची आई आहे आणि तुम्हीच माझे पिता आहात.
या गाथेला समजणं खूपच महत्त्वाचं आहे. एका ठिकाणी जेव्हा महामायेच्या मृत्यूनंतर प्रजापती गौतमी यांनी स्वतःच्या मुलगा नंद याला दासीकडे सोपवलं आणि स्वतः सिद्धार्थाचा सांभाळ केला. आपलं दूध पाजलं, मोठं केलं. कालांतराने हाच सिद्धार्थ मोठा होऊन बुद्ध होतो सम्यक सम्बुद्ध होतो आणि जगाच्या कल्याणासाठी धम्म सांगतो. मार्ग मोकळा करतो, त्याचबरोबर भिक्षुणी संघाला सुद्धा परवानगी देतो. त्यावेळेसचे महिलेला स्वतःच अस्तित्व जाणून निर्वणाचा मार्ग सुद्धा मोकळा करून दितो आणि म्हणूनच महाप्रजापती बोलतात, "मी त्यांना आपले पिता म्हणते, कारण की असं अपूर्व असं मोठं कार्य भगवान बुद्धांनी केलेल आहे आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी त्याचबरोबर महिलांच्या कल्याणासाठी सुद्धा भगवान बुद्धांनी संघ खुला करून दिला. खूप चांगल्या प्रकारे वैराग्य चा भाव असणाऱ्या, कामा भोगांमध्ये इच्छा नसलेल्या महिलेंना, संघामध्ये येता आलं आणि निर्वाणाचा मार्ग समजता आला, अवगत करता आला म्हणून ते बुद्धांना तुम्ही माझे पिता आहात," असे उद्गारून सांगतात.
अर्हत्वपदाला प्राप्त केल्यावर महापजापती गौतमी यांनी भगवान बुद्धांच्या प्रती कृतज्ञ भाव ठेवून काही गाथा म्हणतात त्या एकूण सहा आहेत.
"बुद्ध वीर नमो त्यत्यु, सब्बसत्तानमुत्तम ।
यो में दुक्खा पमोचेसि, अञ्जञ्च बहुकं जनं ॥
हे भगवान, हे बुद्ध वीर, तुम्हाला नमन आहे, तुम्ही फक्त मलाच नाही तर या जगामध्ये असणाऱ्या सगळ्या सत्वासाठी तुम्ही दुःखमुक्तीचा मार्ग दिला आणि ज्याने अनेक लोकांचे मंगल झाले आहे मी सुद्धा त्या दुःखातून मुक्त झालेले आहे.
"सब्बदुक्खं परितं, हेतुतण्हा विसोसिता ।
भावितो अट्ठङ्गिकोमग्गो, निरोधो फुसितो मया ॥
मी आता सगळ्या प्रकारचे दुःख जाणलेले आहेत त्याचबरोबर माझा तृष्णा सुद्धा पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि मी आता अरिओ अट्ठङ्गिको मग्गाचा अभ्यास करून पूर्णपणे दुःखातून मुक्त झालेली आहे.
"माता पुत्तो पिता भाता, अय्यका च पुरे अहूं।
यथाभुच्चमजानन्ती, संसरिंहं अनिब्बिसं ॥
याआधी माझी आई पिता भाऊ पती खूप सारे प्रकारचे नातेवाईक होते आणि यांच्याप्रती यथार्थ न जाणून मी हा भव संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेऊ लागले पुन्हा पुन्हा मरू लागले.
"दिट्ठो हि मे सो भगवा, अन्तिमोयं समुस्सयो।
विक्खीणो जातिसंसारो, नत्थि दानि पुनब्भवो ॥
जेव्हापासून मला भगवंतांचा धर्म पूर्णपणे समजलेला आहे तेव्हाच मी समजून गेले की हा माझा शेवटचा जन्म आहे आता परत माझा या संसारामध्ये जन्म नाही मृत्यू नाही परत मी उत्पन्न होणार नाही.
"आरद्धवीरिये पहितत्ते, निच्वं दळ्हपरक्कमे ।
समग्गे सावके पस्से, एसा बुद्धान वन्दना ॥
कठीण परिश्रम करून कठीण वीर्य गाजवून मी बुद्धांचा धम्म जाणत आहे आणि मी सगळ्या श्रावक संघाला एका नजरेत बघत आहे हीच माझी भगवान बुद्धांप्रती वंदना आहे.
"बहूनं वत अत्थाय, माया जनयि गोतमं ।
ब्याधिमरणतुन्नानं, दुक्खक्खन्धं ब्यपानुदी"ति ॥
खूप लोकांच्या कल्याणासाठी महामायेने गौतमांना जन्म दिला, सगळ्यांना जन्म जरा व्याधी मरण इत्यादीपासून मुक्ती दिली आणि हा दुःखापासून मुक्तीचा मार्ग बुद्धांनी समस्त जगाला दिला.
५. पूर्वी केलेले काम :-
महापजापती गौतमी यांच्या जीवनावर काही विद्वानांनी आपले पेपर Academia या साईटवर ठेवलेले आहे... त्यापैकी
१. Examining the date of Mahāpajāpatīs Ordination - by Kustiani Wijewardena
२. Mahāpajāpatīs Going Forth in the Madhyam - āgama - by Bhikkhu Anālayo
६. निष्कर्ष :-
आपण ज्या कारणासाठी हा विषय घेतला होता त्याचे फलित म्हणजे महाप्रजापती गौतमी यांचे परिनिर्वान झाल्यानंतर भगवान बुद्धांनी महाप्रजापती गौतमी साठी शेवटचे उद्दगार काढले ते पुढीप्रमाणे :
महाप्रजापती गौतमी यांच्या परिनिर्वानानंतर त्यांचे धातू हातामध्ये घेऊन 'भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षुणीसंघरुपी वृक्षाला महाप्रजापती गौतमी एक महान शाखा आहेत आणि ती आता परीनिवृत्त झालेली आहे. त्याच्यामध्ये कुठलीच शोक करण्याची, दुःख व्यतीत करण्याची गोष्ट नाहीये, कारण की त्यांनी आता ह्या भव संसाराला पार केलेला आहे.
त्या पंडित होत्या, महाप्रज्ञावान होत्या. त्या भिक्षुणी संघांमध्ये जास्त काळपर्यंत प्रवजित झालेली भिक्षुणी होत्या, आणि हे आपण या ठिकाणी जाणायला पाहिजे असं बुद्ध म्हणतात.
"खूप साऱ्या प्रकारच्या रिद्धी त्यांच्या वशमध्ये होत्या, त्याचबरोबर परिचित ज्ञान, पुब्बेनिवास यासारख्या खूप सारी रिद्धी मध्ये पारंगत होत्या. त्यांचे सगळे आश्रव हे क्षीण झाले होते. त्यांचा आता परत पुनर्जन्म नाहीये. त्यांनी अर्थ धम्म निवृत्त आणि पटीभान या विषयांमध्ये परिशुद्ध ज्ञान प्राप्त केलेल आहे आणि याच्यामध्ये आता शोक करण्याची दुःख करण्याची कुठलीच गोष्ट नाही. महाप्रजापती गौतमी यांच्यामध्ये तृष्णा नावाची कुठलीच चिंगारी आता राहिलेली नाहीये, कुठल्याच प्रकारच्या तृष्णामध्ये ते आता वाहून जाणार नाहीये आणि अस अचल सुख त्यांनी प्राप्त केलेले आहे. अशाच प्रकारे भिक्षु आणि भिक्षुणी तुम्ही सुद्धा कठीण परिश्रम करा, तुमच्या सतिला विकसित करा, सात बोधिअंगांमध्ये अभ्यास करा आणि अभ्यास करत असताना या दुःखी संसाराला पार करा निब्बाण प्राप्त करा".
भगवान बुद्ध याठिकाणी स्वतःच महापजापती गौतमी यांच्यासाठी जे काही म्हणाले त्यावरून त्या किती महान स्त्री होत्या हे स्पष्ट होते आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण ही निब्बाण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असे सांगतात.
७. ग्रंथसूची :-
महापजापती गौतमी :- एक व्यक्तिमत्त्व अभ्यास ह्या विषयासाठी मी खालील ग्रंथांचा उपयोग केला ते पुढीलप्रमाणे....
संदर्भ ग्रंथ :-
१) अंगुत्तरनिकाय अट्ठकनिपात
२) विनय पिटक, चुलवग्ग - भिक्खुणी क्खन्दक
३) थेरीगाथा - छक्कनिपात
!! भवतु सब्ब मङ्गलं !!