Tuesday, 31 December 2024

महाप्रजापती गौतमी

 !! नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स !!

महापजापती गौतमी :- एक व्यक्तिमत्त्व अभ्यास

- महेश हरिश्चंद्र कांबळे

T.Y. BA 

(Five years integrated course in Pali)

१) परिचय :-

महाप्रजापती यांचा जन्म कोलिय नगरीतील देवदह नगरात महासुप्पबुद्ध / अंजन यांच्या घरी झाला. मायादेवीची ही धाकटी बहीण. ह्या दोघी उपवर झाल्यावर शुद्धोदन शाक्यानें त्यांच्याशी विवाह केला. बोधिसत्त्व जन्मल्यानंतर काही काळाने हिला नंद नावाचा एक मुलगा झाला. मायादेवी प्रसूतीनंतर सातव्या । दिवशीं मरण पावली, व तेव्हांपासून बोधिसत्त्वाचे लालनपालन करण्याचा सर्व भार हिच्यावर पडला. गोतमींने आपल्या मुलापेक्षाहि अधिक प्रेमाने बोधिसत्त्वाचा संभाळ केला. 

वेळेप्रसंगी सिद्धार्थ मोठे झाले आणि सिद्धार्थाने महाभिनिष्क्रमण करून सम्यक सम्बुद्ध झाले आणि कालांतराने पिता महाराज शुद्धोधन यांना भेटण्यासाठी स्वतः बुद्ध सात वर्षानंतर कपिलवस्तू येथे पोहोचतात. दुसऱ्या दिवशी नगरामध्ये पिंडपात करत असताना राजा बुद्धांना आणि भिक्षु संघाला त्यांच्या महालामध्ये भोजनासाठी निमंत्रित देतात, आणि त्याच दिवशी जेव्हा भगवान बुद्ध राजा शुद्धोधनाला धम्म सांगतात तेव्हाच, पहिल्याच धम्मश्रवण मध्ये राजा शुद्धोधन हे सोतापन्न अवस्थेमध्ये प्रतिष्टीत होतात आणि दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध नंद याला प्रवजित करतात आणि सातव्या दिवशी बुद्ध आपल्या मुलाला राहुलला प्रवजित करतात, भिक्षु बनवतात आणि मग ते वैशालीकडे प्रस्थान करतात.

कालांतराने राजा शुद्धोधन मरण पावतात. इथे प्रजापती गौतमी विचार करते की, आता माझी मोठी बहीण नाहीये, माझे पती सुद्धा नाहीये, माझा मुलगा आता भिक्षु झालेला आहे आणि माझा नातू सुद्धा प्रवजित झालेला आहे. आता ह्या राजमहलाच्या खोल्या मला एकट करून सोडतात, येथे माझं मन लागत नाहीये. या राज वैभवामध्ये मी एकटी काय करू ? असा विचार करत त्या सुद्धा त्यांच्या दासींसोबत घरदार सोडण्याचा विचार करतात.

राजमहल टाकण्याचा विचार करतात, त्यांच्या मनामध्ये वैराग जागत, आणि बुद्धांच्या धम्मामध्ये आपण सुद्धा प्रवज्जा घ्यावी आणि धम्म विनयचा पालन कराव असं त्यांना विचार येतो आणि ते प्रवज्जा घेण्यासाठी भगवान बुद्धांना भेटण्यासाठी निघतात.

२) अभ्यास हाती घेण्याचे कारण :- 

१. सुमारे २६०० वर्षांपूर्वी एक स्त्री असा विचार करते की, सम्यक संबुध्द यांनी घरदाराचा - सर्व ऐश्वर्याचा त्याग करून दुःख मुक्तिचा मार्ग शोधून दुःख मुक्त होतात... का नाही मी ही त्याच मार्गावर जाऊन सम्यक संबुद्धांच्या सानिध्यात राहून त्यांच्याकडून तो मार्ग शिकून दुःख मुक्त होऊ.

२. आणि या विचाराने महापजापती गौतमी प्रभावित होतेच सोबत असा ही विचार करते की जर मी या मार्गावरून जात आहे तर शाक्य कुळातील तसेच इतर ज्या महिला आहेत ज्यांचे कोणी ना कोणी नातलग भगवान बुद्धांच्या भिक्षू संघात सामील झाले आहेत. त्या घरी एकट्याच आहेत अशा महिलांनी ही माझ्यासारखे भगवान बुद्धांच्या संघात सामील व्हावे म्हणून ती त्या महिलांना प्रेरणा देते आणि स्वतः सोबत त्या महिलांना ही आपल्या सोबत भगवान बुद्धांना भेटण्यासाठी घेऊन जाते.... हे महापजापती गौतमीचे नेतृत्व दिसून येते.

३. बुद्धांनी महापजापती गौतमीसाठी उद्गारले पुढील वाक्य अभ्यासण्यासाठी.....

"एतदग्गं, भिक्खवे, मम साविकानं भिक्खुनीनं रतञ्जूनं यदिदं महापजापतिगोतमी'

"चिरप्रवजित भिक्षुणीश्राविकांत महाप्रजापती गौतमी पहिली आहे."

सारांश रुपाने महापजापती गौतमी यांचा "एक स्वतंत्र विचार करणारी, त्यांच्यातील नेतृत्व गुण व बुद्धांनी तिच्यासाठी उद्गारले वाक्य" यांचा अभ्यास करण्यासाठी "महापजापती गौतमी : एक व्यक्तिमत्त्व अभ्यास" हा विषय घेण्यात आलेला आहे. 

३. ध्येय :-

महापजापती गौतमी या प्रवज्जा घेण्यासाठी भगवान बुद्धांना भेटण्यासाठी जातात... तेंव्हा त्या प्रवज्जा घेण्यासाठी भगवान बुद्धांना कश्या प्रकारे विनंती करतात आणि त्या त्यात यशस्वी कश्या होतात..... हे आपण आत्ता पाहूया

महापजापतिगोतमी यांची प्रवज्जा

त्यावेळेस भगवान बुद्ध कपिलवस्तूच्या निग्रोधआराम येथे राहत होते. तेव्हा महाप्रजापती त्यांच्याकडे येते, भगवान बुद्धांना नमन करते, अभिवादन करते, आणि एका ठिकाणी बसून भगवंतांना विनंती करते. "भन्ते खूपच छान होईल की, आपण ह्या धम्मविनयांमध्ये जर स्त्रियांना सुद्धा प्रवज्जा दिली तर, स्त्रियांचेही मंगल होईल, कल्याण होईल", अशी ती बुद्धासमोर याचना करते.

तेव्हा बुद्ध त्यांच्या शब्दांमध्ये त्यांना नकार देतात आणि म्हणतात की कदाचित माझं उत्तर तुम्हा लोकांना आवडलेल नसेल, पण ते उचित आहे. अशाच प्रकारे प्रजापती गौतमीने बुद्धांसमोर दुसऱ्यांदा सुद्धा आणि तिसऱ्यांदा सुद्धा याचना केली आणि बुद्धांनी नकारच दिला.

तेव्हा प्रजापती गौतमी भगवान यांना वंदन करून बाकी सगळ्या स्त्रियांसोबत आपल्याला संघामध्ये जागा नाही, प्रवज्जा मिळणार नाही, या विचाराने दुःखी होऊन रडू लागल्या, निराश झाल्या आणि त्या ठिकाणाहून परत जातात.

तेव्हा भगवान कालांतराने चारिका करत करत वैशालीला पोहोचले आणि वैशालीचे महावनामध्ये कुटागारसाला येथे राहत होते. तेव्हा परत प्रजापती गौतमी आपले मुंडन करून, केस कापून, काशाय वस्त्र घालून, अशाच प्रकारे वैशालीच्या कुटागार सालामध्ये पोहोचते. तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर त्यांचे पाय सुजलेले असतात, शरीर मातीने मळकट झालेलं होतं आणि ते दुःखी होते, रडत होते आणि परत एकदा बुद्धांच्या कुटागार सालाकडे जाऊन ते उभे राहिले.

तेव्हा भन्ते आनंद, प्रजापती गौतमी यांना बघतात आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी जातात. त्यांना विचारतात, कि ह्या सगळ्या नाराजगिच कारण काय आहे? तेव्हा प्रजापती गौतमी सांगतात की, भगवान बुद्धांनी आम्हा स्त्रियांना भिक्षुनि संघामध्ये जागा नाही. अशा प्रकारे उत्तर दिलं आहे आणि म्हणून आम्ही दुःखी आहोत. भिक्षु आनंद त्यांना शांत करतात, त्यांना सांत्वना देतात आणि त्यांचा निरोप घेऊन बुद्धांकडे जातात. बुद्धांना याची कल्पना देतात. भन्ते आनंद भगवान बुद्धांना सांगतात की, "भन्ते बरं होईल की स्त्रिया सुद्धा भगवंतांनी सांगितलेल्या धम्मामध्ये, विनयामध्ये प्रवजित होऊन धमाच पालन करतील".

भगवंतांनी त्यासाठी नकार दिला. आनंदाने पुन्हा पुन्हा विचारून तीन वेळेस बुद्धांसमोर याचना केली आणि तिघ वेळेस सुद्धा बुद्धांनी नकार दिला. कारण की बुद्धांनी भविष्य बघता त्याचे कारण सुद्धा बघितले होते आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा नकार देत होते.

तेव्हा भन्ते आनंद भगवान बुद्धांना प्रश्न विचारतात की, "भगवान, तथागतांनी सांगितलेल्या या धर्माचे पालन करून का स्त्रिया सुद्धा सोतापन, सकदागामी, अनागामी आणि अरहंत होऊ शकतात?" तेव्हा भगवान उत्तर देतात आणि सांगतात, "हो आनंद स्त्रिया सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचे पालन करून सोतापन, सकदागामी, अनागामी आणि अरहंत होऊ शकतात."

तेव्हा आनंद भगवंतांना सांगतात कि, "भगवान, जर स्त्रिया सुद्धा बुद्धांनी सांगितलेल्या धर्माचे पालन करून सोतापन, सकदागामी, अनागामी आणि अरहंत होऊ शकतात, तर तेव्हा प्रजापती गौतमी यांनी तर भगवान बुद्धांवर उपकार केलेले आहेत, ते त्यांच्या मावशी आहेत, सावत्र आई आहे, प्रजापतींनी सिद्धार्थाला दूध पाजलेले आहे, त्यांचं लालन-पोषण केलेलं आहे".

आनंद पुढे बोलतात की, "जेव्हा आपल्या आईने शरीर त्यागले तेव्हा प्रजापती गौतमीनेच तुम्हाला मोठे केले. खूपच छान होईल भगवान की आपण स्त्रियांना सुद्धा तथागतांच्या या धम्मविनयांमध्ये जागा द्याल आणि त्यांना सुद्धा प्रवजित होऊन धम्मपालन करण्याचा एक संधी उपलब्ध करून द्याल."

तेव्हा भगवान, भन्ते आनंद यांना सांगतात आणि त्यांना कळवतात की जर स्त्रिया या आठ गुरु धर्मांना स्वीकार करतील तेव्हाच त्यांची भिक्षुणी संघांमध्ये प्रवज्जा होऊ शकते आणि भिक्षुणी संघ स्थापन होऊ शकतो.

अट्ठगरुधम्मा

"सचे, आनन्द, महापजापती गोतमी अट्ठ गरुधम्मे पटिग्गण्हाति, सावस्सा। होतु उपसम्पदा ।

आनंद, जर महाप्रजापती गोतमीने या आठ गुरु धर्माना पूर्णपणे ग्रहण केल, त्यांना समजल, त्यांचे पालन केलं तेव्हाच त्यांची उपसंपदा होऊ शकते.

"वस्ससतूपसम्पन्नाय भिक्खुनिया तदहुपसम्पन्नस्स भिक्खुनो अभिवादनं पच्चुट्ठाने अञ्जलिकम्मं सामीचिकम्म कातब्ब। 

अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो ।

जरी एखादी भिक्षुणी शंभर वर्ष उपसंपदा प्राप्त केलेली असेल तरीसुद्धा त्याच दिवशी उपसंपदा प्राप्त केलेल्या भिक्षूला नमन केले पाहिजे, अभिवादन केले पाहिजे, हात जोडून वंदना केली पाहिजे. ह्या गुरुधर्माला या धम्म विनयाला स्वीकार केले पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे, मानलं पाहिजे आणि याचे जीवनभर पालन केले पाहिजे.

"न भिक्खुनिया अभिक्खुके आवासे वस्सं वसितब्बं । 

अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो ।

भिक्षुणी अशा कुठल्याच जागेवर वर्षावास करणार नाही जिथे भिक्षु राहत नाही, या धम्मविनयला या गुरुधमाला स्वीकार केला पाहिजे, त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवन पर्यंत याचे पालन केले पाहिजे.

"अन्वद्धमासं भिक्खुनिया भिक्खुसङ्घतो द्वे धम्मा पच्चासीसितब्बा उपोसथपुच्छकञ्च,ओवादूपसङ्कमनञ्च । 

अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो ।

भिक्षुणी संघाने भिक्षूसंघासमोर दोन गोष्टींची दर पंधरा दिवसांनी अपेक्षा केली पाहिजे, आशा ठेवली पाहिजे, आधी भिक्षूच्या समोर जाऊन धम्म श्रवण करायचे, आणि उपोसथ संबंधी काही प्रश्न उत्तर असतील तर ते विचारायचे. या धम्म विनयाला स्वीकार केलं पाहिजे, त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर याचं पालन केलं पाहिजे.

"वस्संवुट्ठाय भिक्खुनिया उभतोसले तीहि ठानेहि पवारेतब्ब दिट्टेन वा, सुतेन वा, परिसङ्काय वा। 

अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीव अनतिक्कमनीयो।

वर्षावास संपल्यानंतर पवारनाच्या वेळेस भिक्खु संघासोबत तसेच भिक्षुणी संघासोबत सुद्धा पवारना केली पाहिजे आणि आपले दृश्य, श्रुत आणि संदिग्ध अशा तीन प्रकारच्या दोषांची पवारना केली पाहिजे. या धम्म विनयला स्वीकार केला पाहिजे त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर याचं पालन सुद्धा केलं पाहिजे.

"गरुधम्म अज्झापन्नाय भिक्खुनिया उभतोसले पक्खमानत्तं चरितब्ब । 

अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो।

जर भिक्षणी कडून संघादिसेस सारखा मोठा गंभीर अपराध झाला, तर त्या भिक्षुणीला दोन्ही संघांमध्ये, भिक्षु आणि भिक्षणी संघामध्ये पंधरा दिवसांपर्यंत प्रायचित केले पाहिजे. या धम्म विनयाला स्वीकार केला पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर त्याचे पालन सुद्धा केले पाहिजे.

"द्वे वस्सानि छसु धम्मेसु सिक्खितसिक्खाय सिक्खमानाय उभतोसले उपसम्पदा परियेसितब्बा। 

अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीव अनतिक्कमनीयो।

दोन वर्षावास पर्यंत सहा धम्मांचा अभ्यास करणाऱ्या भिक्षुणीला दोघी संघामध्ये उपसंपदा ग्रहण केली पाहिजे, भिक्षु संघामध्ये सुद्धा आणि भिक्षुणी संघामध्ये सुद्धा. या धम्मविनयाला स्वीकार केलं पाहिजे, त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर त्याचं पालन सुद्धा केलं पाहिजे.

"न भिक्खुनिया केनचि परियायेन भिक्खु अक्कोसितब्बो परिभासितब्बो । 

अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीवं अनतिक्कमनीयो।

भिक्षुणीने कुठल्याही परिस्थितीमध्ये भिक्षूचा अपमान नाही केला पाहिजे, या धम्म विनयला स्वीकार केलं पाहिजे, त्याला मानलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि जीवनभर पालन सुद्धा केलं पाहिजे.

"अज्जतग्गे ओवटो भिक्खुनीनं भिक्खूसु वचनपथो, अनोवटो भिक्खूनं भिक्खुनीसु वचनपथो। 

अयम्पि धम्मो सक्कत्वा गरुकत्वा मानेत्वा पूजेत्वा यावजीव अनतिक्कमनीयो ।

आजच्या नंतर भिक्षुणी, भिक्षूसंघाला काही सांगण्यासाठीच द्वार बंद आहे पण भिक्षूचे भिक्षुनींना काही सांगण्याचा द्वार उघडा आहे. या धम्म विनयाला स्वीकार केले पाहिजे, त्याला मानलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे त्याचबरोबर जीवनभर याचं पालन सुद्धा केलं पाहिजे.

"सचे, आनन्द, महापजापति गोतमी इमे अट्ठ गरुधम्मे पटिग्गण्हाति, सावस्सा होतु उपसम्पदा" ति

आनंद, जर या आठ गुरु धर्माला प्रजापती यांनी स्वीकार केलं तरच त्यांची उपसंपदा होईल.

अथ खो आयस्मा आनन्दो भगवतो सन्तिके अट्ठ गरुधम्मे उग्गहेत्वा येन महापजापति गोतमी तेनुपसङ्कमि, उपसङ्कमित्वा महापजापतिं गोतमिं एतदवोच - "सचे खो त्वं, गोतमि, अट्ठ गरुधम्मे पटिग्गण्हेय्यासि, साव ते भविस्सति उपसम्पदा ।

अशाच प्रकारे भन्ते आनंद, महाप्रजापती जिथे होत्या तिथे जाऊन, या आठ गुरु धर्मांना चांगल्या प्रकारे समजून सांगतात आणि सांगतात की जर तुम्ही या आठ गुरु धम्माला चांगल्या प्रकारे जाणलं मानलं आणि जीवन पर्यंत याचे पालन केलं तरच तुम्ही उपसंपदा घेऊ शकतात.

“सेय्यथापि, भन्ते आनन्द, इत्थी वा पुरिसो वा दहरो, युवा, मण्डनकजातिको सीसंनहातो उप्पलमालं वा वस्सिकमालं वा अतिमुत्तकमालं वा लभित्वा उभोहि हत्थेहि पटिग्गहेत्वा उत्तमने सिरस्मि पतिट्ठापेय्य; एवमेव खो अहं, भन्ते, आनन्द इमे अट्ठ गरुधम्मे पटिग्गण्हामि यावजीवं अनतिक्कमनीये"ति ।

भन्ते आनंद यांना उत्तर देत महापजापती गौतमींनी आपली राजी दाखवली आणि त्याचबरोबर खूप सारे उदाहरणे देऊन त्या किती आनंदीत आहे, किती प्रसन्न आहे, बुद्धांच्या संघांमध्ये त्यांना इतक्या चांगल्या प्रकारे भिक्खुणी संघामध्ये प्रवजित होण्याचा मान मिळत आहे. यावर ते त्यांचा आनंद दर्शवतात. गाथांमध्ये खूप साऱ्या प्रकारे उपमा देऊन ते आपली इच्छा दाखवतात आणि त्याचबरोबर या आठ गुरु धर्मांना किती चांगल्या प्रकारे पालन केलं पाहिजे आणि आम्ही भिक्षुणीसंघ याचा खूप चांगल्या प्रकारे पालन करू असे ते गाथेमध्ये वर्णन करतात.

४. उद्दिष्ट :-

महाप्रजापती गौतमी बुद्धांच्या धम्मामध्ये प्रतिष्ठित होऊन भिक्षुनि संघाची मुख्य आणि श्रेष्ठ झाल्यानंतर खूप कठीण परिश्रमाने आपल्या पारमी पूर्ण करत लवकरच अर्हत पदाची प्राप्ती करतात. आणि या अरहत पदाची प्राप्ती केल्यानंतर आपल्या मनातून उत्पन्न झालेल्या करुणा आणि कृतज्ञ भाव जाणून बुद्धांची वंदना करतात. बुद्धांना धन्यवाद देतात आणि आपल्या गाथेमध्ये बोलतात.

"अहं सुगत ते माता, त्वञ्च वीर पिता मम ।

हे शाक्यपुत्र हे वीर, मी तुमची आई आहे आणि तुम्हीच माझे पिता आहात.

या गाथेला समजणं खूपच महत्त्वाचं आहे. एका ठिकाणी जेव्हा महामायेच्या मृत्यूनंतर प्रजापती गौतमी यांनी स्वतःच्या मुलगा नंद याला दासीकडे सोपवलं आणि स्वतः सिद्धार्थाचा सांभाळ केला. आपलं दूध पाजलं, मोठं केलं. कालांतराने हाच सिद्धार्थ मोठा होऊन बुद्ध होतो सम्यक सम्बुद्ध होतो आणि जगाच्या कल्याणासाठी धम्म सांगतो. मार्ग मोकळा करतो, त्याचबरोबर भिक्षुणी संघाला सुद्धा परवानगी देतो. त्यावेळेसचे महिलेला स्वतःच अस्तित्व जाणून निर्वणाचा मार्ग सुद्धा मोकळा करून दितो आणि म्हणूनच महाप्रजापती बोलतात, "मी त्यांना आपले पिता म्हणते, कारण की असं अपूर्व असं मोठं कार्य भगवान बुद्धांनी केलेल आहे आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी त्याचबरोबर महिलांच्या कल्याणासाठी सुद्धा भगवान बुद्धांनी संघ खुला करून दिला. खूप चांगल्या प्रकारे वैराग्य चा भाव असणाऱ्या, कामा भोगांमध्ये इच्छा नसलेल्या महिलेंना, संघामध्ये येता आलं आणि निर्वाणाचा मार्ग समजता आला, अवगत करता आला म्हणून ते बुद्धांना तुम्ही माझे पिता आहात," असे उद्गारून सांगतात.

अर्हत्वपदाला प्राप्त केल्यावर महापजापती गौतमी यांनी भगवान बुद्धांच्या प्रती कृतज्ञ भाव ठेवून काही गाथा म्हणतात त्या एकूण सहा आहेत. 

"बुद्ध वीर नमो त्यत्यु, सब्बसत्तानमुत्तम । 

यो में दुक्खा पमोचेसि, अञ्जञ्च बहुकं जनं ॥

हे भगवान, हे बुद्ध वीर, तुम्हाला नमन आहे, तुम्ही फक्त मलाच नाही तर या जगामध्ये असणाऱ्या सगळ्या सत्वासाठी तुम्ही दुःखमुक्तीचा मार्ग दिला आणि ज्याने अनेक लोकांचे मंगल झाले आहे मी सुद्धा त्या दुःखातून मुक्त झालेले आहे.

"सब्बदुक्खं परितं, हेतुतण्हा विसोसिता । 

भावितो अट्ठङ्गिकोमग्गो, निरोधो फुसितो मया ॥

मी आता सगळ्या प्रकारचे दुःख जाणलेले आहेत त्याचबरोबर माझा तृष्णा सुद्धा पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि मी आता अरिओ अट्ठङ्गिको मग्गाचा अभ्यास करून पूर्णपणे दुःखातून मुक्त झालेली आहे.

"माता पुत्तो पिता भाता, अय्यका च पुरे अहूं। 

यथाभुच्चमजानन्ती, संसरिंहं अनिब्बिसं ॥

याआधी माझी आई पिता भाऊ पती खूप सारे प्रकारचे नातेवाईक होते आणि यांच्याप्रती यथार्थ न जाणून मी हा भव संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेऊ लागले पुन्हा पुन्हा मरू लागले.

"दिट्ठो हि मे सो भगवा, अन्तिमोयं समुस्सयो। 

विक्खीणो जातिसंसारो, नत्थि दानि पुनब्भवो ॥

जेव्हापासून मला भगवंतांचा धर्म पूर्णपणे समजलेला आहे तेव्हाच मी समजून गेले की हा माझा शेवटचा जन्म आहे आता परत माझा या संसारामध्ये जन्म नाही मृत्यू नाही परत मी उत्पन्न होणार नाही.

"आरद्धवीरिये पहितत्ते, निच्वं दळ्हपरक्कमे । 

समग्गे सावके पस्से, एसा बुद्धान वन्दना ॥

कठीण परिश्रम करून कठीण वीर्य गाजवून मी बुद्धांचा धम्म जाणत आहे आणि मी सगळ्या श्रावक संघाला एका नजरेत बघत आहे हीच माझी भगवान बुद्धांप्रती वंदना आहे.

"बहूनं वत अत्थाय, माया जनयि गोतमं ।

 ब्याधिमरणतुन्नानं, दुक्खक्खन्धं ब्यपानुदी"ति ॥

खूप लोकांच्या कल्याणासाठी महामायेने गौतमांना जन्म दिला, सगळ्यांना जन्म जरा व्याधी मरण इत्यादीपासून मुक्ती दिली आणि हा दुःखापासून मुक्तीचा मार्ग बुद्धांनी समस्त जगाला दिला.

५. पूर्वी केलेले काम :-

महापजापती गौतमी यांच्या जीवनावर काही विद्वानांनी आपले पेपर Academia या साईटवर ठेवलेले आहे... त्यापैकी

१. Examining the date of Mahāpajāpatīs Ordination - by Kustiani Wijewardena

२. Mahāpajāpatīs Going Forth in the Madhyam - āgama - by Bhikkhu Anālayo

६. निष्कर्ष :-

आपण ज्या कारणासाठी हा विषय घेतला होता त्याचे फलित म्हणजे महाप्रजापती गौतमी यांचे परिनिर्वान झाल्यानंतर भगवान बुद्धांनी महाप्रजापती गौतमी साठी शेवटचे उद्दगार काढले ते पुढीप्रमाणे :

महाप्रजापती गौतमी यांच्या परिनिर्वानानंतर त्यांचे धातू हातामध्ये घेऊन 'भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षुणीसंघरुपी वृक्षाला महाप्रजापती गौतमी एक महान शाखा आहेत आणि ती आता परीनिवृत्त झालेली आहे. त्याच्यामध्ये कुठलीच शोक करण्याची, दुःख व्यतीत करण्याची गोष्ट नाहीये, कारण की त्यांनी आता ह्या भव संसाराला पार केलेला आहे.

त्या पंडित होत्या, महाप्रज्ञावान होत्या. त्या भिक्षुणी संघांमध्ये जास्त काळपर्यंत प्रवजित झालेली भिक्षुणी होत्या, आणि हे आपण या ठिकाणी जाणायला पाहिजे असं बुद्ध म्हणतात.

"खूप साऱ्या प्रकारच्या रिद्धी त्यांच्या वशमध्ये होत्या, त्याचबरोबर परिचित ज्ञान, पुब्बेनिवास यासारख्या खूप सारी रिद्धी मध्ये पारंगत होत्या. त्यांचे सगळे आश्रव हे क्षीण झाले होते. त्यांचा आता परत पुनर्जन्म नाहीये. त्यांनी अर्थ धम्म निवृत्त आणि पटीभान या विषयांमध्ये परिशुद्ध ज्ञान प्राप्त केलेल आहे आणि याच्यामध्ये आता शोक करण्याची दुःख करण्याची कुठलीच गोष्ट नाही. महाप्रजापती गौतमी यांच्यामध्ये तृष्णा नावाची कुठलीच चिंगारी आता राहिलेली नाहीये, कुठल्याच प्रकारच्या तृष्णामध्ये ते आता वाहून जाणार नाहीये आणि अस अचल सुख त्यांनी प्राप्त केलेले आहे. अशाच प्रकारे भिक्षु आणि भिक्षुणी तुम्ही सुद्धा कठीण परिश्रम करा, तुमच्या सतिला विकसित करा, सात बोधिअंगांमध्ये अभ्यास करा आणि अभ्यास करत असताना या दुःखी संसाराला पार करा निब्बाण प्राप्त करा".

भगवान बुद्ध याठिकाणी स्वतःच महापजापती गौतमी यांच्यासाठी जे काही म्हणाले त्यावरून त्या किती महान स्त्री होत्या हे स्पष्ट होते आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण ही निब्बाण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असे सांगतात. 

७. ग्रंथसूची :- 

महापजापती गौतमी :- एक व्यक्तिमत्त्व अभ्यास ह्या विषयासाठी मी खालील ग्रंथांचा उपयोग केला ते पुढीलप्रमाणे....

संदर्भ ग्रंथ :-

१) अंगुत्तरनिकाय अट्ठकनिपात

२) विनय पिटक, चुलवग्ग - भिक्खुणी क्खन्दक

३) थेरीगाथा - छक्कनिपात 

!! भवतु सब्ब मङ्गलं !!

Monday, 30 December 2024

भगवानांच्या मार्गात जाती-भेद नव्हता

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भगवानांच्या मार्गात जाती-भेद नव्हता_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_30.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_भगवान बुद्धांच्या शतकांपूर्वी पासूनच देशात जाती-पातीमुळे अंधकार पसरलेला होता. नीच कुळात जन्म घेतल्यामुळे अथवा हीन कर्म केल्यामुळे व्यक्तीला हीन मानले जात होते._

_व्यवसाय, कर्म आणि जातींच्या उच्च आणि नीच, हीन व श्रेष्ठ वेगवेगळ्या श्रेण्या होत्या -_

१. शूद्र

२. चांडाळ

३. भंगी

४. चांभार

_ह्या नीच जाती मानल्या जात होत्या._

१. ब्राम्हण

२. क्षत्रिय

३. वैश्य

_ह्या उच्च जाती मानल्या जात होत्या._

_ह्याच प्रकारे ब्राम्हणांचे गोत्रही हीन आणि उच्च होते-_

*_हीन गोत्र-_*

१. कोसिय गोत्र

२. भारद्वाज गोत्र

*_उच्च गोत्र -_*

१. गोतम-गोत्र

२. मोग्गल्लान-गोत्र

३. कच्चान गोत्र व

४. वसिट्ट-गोत्र

*_हस्तकला आणि शिल्पकलाही उच्च आणि निम्न श्रेणीत वाटल्या गेली होती._*

_उच्च मानल्या जाणार्या शिल्प-कला आणि कर्म कौशल्य -_

१. लेखन कला

२. मुद्रण (छपाई) कला

३. हिशोब ठेवणे, मुनीम कार्य

_निम्न समजले जाणारे कर्म-_

१. बांबूच्या वस्तू बनविने

२. मातीचे माठ इत्यादी भांडे बनविने

३. वस्त्र विणणे

४. चर्म-कला (पशुंच्या चामड्यापासून जोडे इत्यादी वस्तू बनविणे

५. न्हावी कर्म (केस कापणे)

_*अत्यंत हीन आणि तुच्छ समजले जाणारे कर्म*_

१. मल-मूत्र उचलण्याचे काम

२. घाण, कचरा उचलून सफाई करण्याचे काम,

*_उत्कृष्ट समजले जाणारे व्यवसाय_*

१. कृषि

२. वाणिज्य व्यवसाय

३. गो-पालन

*_पाली साहित्यात खालील पाच नीच कुळ वर्णित आहेत व ह्या कुळांच्या कर्माना हीन-कर्म मानले जात होते-_*

१. चांडाळ कुळ श्मशानात शव जाळणे.

२. नेसाद कुळ पशु-पक्षांची शिकार करणे.

३. वेनकुळ शौच्यालय साफ करणे.

४. रथकार कुळ मेलेल्या पशुंच्या चामड्यापासून वस्तू वनविणे.

५. पुक्कुस कुळ कचरा उचलून सफाई करणे.

_ह्याच प्रकारे खालील कर्म करणार्या व्यक्तींनाही हीन मानले जात होते._

१. नळकार बांबूपासून टोपल्या बनविणारे.

२. कुंभकार मातीचे माठ इत्यादी बनविणारे.

३. पेसकार वस्त्र विनण्याचे काम करणारे.

४. चम्मकार चामड्याच्या वस्तू बनविणारे.

५. न्हावी केस कापण्याचे काम करणारे.

_*जे खूप नीच जातीचे होते, त्यांची सावलीही कोणावर पडली तर तो आपल्याला दूषित झालेला समजायचा. कधी-कधी क्रोधामुळे ज्याची छाया पडली, त्याला लोक मारित असत. ह्यामुळे अत्यंत नीच जातीचे लोक जे शहरात येत असत ते खूप जपून चालत असत की त्यांची सावलीही कोणावर पडू नये.*_

*_अश्या खराब स्थितीत बुद्धांनी एक खूप क्रांतीकारी पाऊल उचलले त्यांनी नीच पेक्षाही नीच जाती वाल्यांनांही आपल्या संघात सामील केले. जो राज-कर्मचारीही पूजा करायचा, शेठ सावकारही पूजायचे आणि ब्राम्हणही पूजायचे. ह्या प्रकारे नीच जातींचा उद्धार करण्याचे एक खूप मोठे पाऊल भगवान बुद्धांनी उचलले._*

_*भगवान स्वतः जात-पात मानित नसत. संघात सामील झाल्यानंतर जात-पातीमुळे कोणताही भेद-भाव केला जात नसे. भिक्षुही संघात सामील झाल्यानंतर उच्च-कुळ, नीच-कुळ सर्वांजवळ भिक्षेसाठी जात असत. कधी-कधी नीच-कुळ असणार्यांना चांडाळ व वसल म्हणून बोलाविले जात असे. कोणी नवीन भिक्षू ह्या प्रकारचे संबोधन करून दुसर्याना बोलावित असे तर तो भगवानांच्या विनयानुसार अपराध घोषित केला.*_

_त्याच दिवसांची एक घटना आहे- *प्रकृती नावाची एक षोडशी अस्पृश्य कन्या, आपल्या परिवारासाठी अस्पृश्यांच्या विहिरीतून पाणी भरित होती. दरिद्रतेमुळे मळलेले फाटके, जुने पुराणे वस्त्र घातले होते. समोरून भगवान बुध्दांचे शिष्य आनंद येत होते. आनंदही क्षत्रिय कुलोत्पन्न गौरवर्ण, प्रभावशाली व्यक्तित्वाचे धनी आणि भगवानांचे चुलत भाऊ होते.* खूप गर्मीचा ऋतू होता. तहाणेने कंठ सुकलेला होता. विहिरीजवळ ह्या मुलीला पाणी भरतांना पाहून तिला पिण्यासाठी पाणी मागितले अस्पृश्य कन्या घाबरते. ही व्यक्ती भिक्षू असतांनाही स्पष्टपणे उच्च वर्णाचीच आहे. परंतु हा जाणत नाही की मी अस्पृश्य परिवाराची युवती आहे आणि ही विहीरही अस्पृश्यांची आहे. त्यामुळे ती *आनंदांना सांगते की मी नीच जातीची मुलगी आहे आणि हे अस्पृश्यांचे पाणी मी एखाद्या उच्च कुळातील व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकत नाही.*_

_आनंद त्या अस्पृश्य मुलीला म्हणतात "ताई, मी तुला पाणी मागितले आहे, जाती विचारली नाही."_

_भिक्षु आनंदांच्या आग्रहामुळे संकोचित त्या अस्पृश्य कन्येने त्यांना जल दिले. प्रसन्नतापूर्वक आपली तहाण मागवून भिक्षु तेथून निघून गेले._

_*अचानक त्या अस्पृश्य कन्येच्या मनात विचार आला की हा उच्चजातीच्या युवापुरुष माझ्या हाताचे पाणी प्याला, तर तो मला आपली अर्धांगिनी बनविणेही अवश्य स्वीकारेल.* ती घाईघाईने भिक्षु आनंदांजवळ गेली आणि आपले म्हणणे त्यांना सांगितले. भिक्षूने ते त्वरित नाकारले. ती खूप निराश झाली. तेव्हा *आनंदानी त्या अस्पृश्य कन्येला सांगितले की मी जात-पातीच्या भेदभावामुळे तुझा प्रस्ताव अस्वीकार करीत नाही. परंतु आजन्म ब्रम्हचर्याचे व्रत घेतले असल्यामुळे मी असमर्थ आहे.* त्यानंतर त्यांनी तिला सांगितले की *आमच्या महाकारुणिक भगवान बुद्धांनी मनुष्यांना शरण दिलेली आहे. तू ही त्यांच्याजवळ जाऊन शरण घे. ज्यांना समाज हीनजातीचे मानतो. भगवान त्या सर्वांना शरण देतात. त्यांच्याजवळ जाती-जन्माचा भेदभाव नाही. त्यांच्या शरणात येऊन साधना करीत अनार्याचे आर्य बनतात. जे आज समाजात दुत्कारले जातात, लोक त्यांचाच सन्मान-सत्कार करू लागतात. तू न संकोचता भगवानांना शरण जा. तेथे अनेक साध्वी आहेत आणि माता प्रजापती तुझी उचित देखभाल करेल.*_

_हे ऐकून अस्पृश्यकन्या प्रकृती अत्यंत प्रसन्न होऊन भगवानांना शरण आली, तिला साधना मिळाली आणि पुढे जाऊन ती साध्वी झाली._

_*एकदा भगवान बुद्ध आपल्या भिक्षू-संघासह मगधची राजधानी राजगिरीत धर्मचारिकेसाठी नगराच्या राजमार्गावरून जात होते. तेव्हा नगराचा भंगी सुनीत हातात झाडू घेऊन रस्ता झाडत होता. अत्यंत हीन कुळात उत्पन्न अस्पृश्य असल्यामुळे त्याच्या मनात भाव आला की माझी छायाही ह्यांच्यावर पडू नये. त्यामुळे संकोचाने हात बांधून एका बाजूला उभा झाला. भगवानांनी त्याच्या मनाचे भाव ओळखले. निर्मम, निर्दयी समाजाच्या दुषित व्यवस्थेचा शिकार भंगी सुनीतला पाहून त्यांचे हृदय करुणेने भरून गेले. त्यांनी त्याला आपल्याजवळ बोलाविले आणि भिक्षू-संघासोबत राजगिरीच्या वेणुवण विहारात घेऊन गेले. त्याला विपश्यना साधनेची ध्यान-विधी शिकविली. भंगी सुनीत संघात प्रव्रजित होऊन अरण्यात तप करू लागला आणि अनार्यापासून आर्य अवस्था प्राप्त करून अरहंत बनता, खर्या अर्थाने भंगीपासून ब्राम्हण बनला.*_

_ह्याच प्रकारे *चांडाळ कुळात जन्मलेला एक बालक सोपाक जेव्हा चार वर्षाचा झाला तेव्हा अनाथ झाला. गरीबीमुळे भार समजून सात वर्षाच्या अवस्थेत त्याच्या काकाने त्याच्यावर क्रोधित होऊन स्मशानात एका शकासोबत त्याला पक्के बांधले ज्यामुळे जंगली पशू त्याला चिरून-फाडून खातील. महाकारुणिक भगवानांनी ही घटना पाहिली तेव्हा एका भिक्षुला पाठवून सोपाकला सोडविले व विहारात आणविले. तेथेच त्याची प्रव्रज्या आणि उपसंपदा झाली. पुढे जाऊन चांडाळाच्या घरी जन्मलेला सोपाक साधनेत करून अरहंत झाला.*_

_*इतिहासात एक अजून फार मोठे पाऊल डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी उचलेले, जेव्हा त्यांनी असे संविधान रचले ज्याच्यात उच्च-नीचला कोणतेही स्थानच नाही. मनुष्य, मनुष्य आहे. त्यांनी नीच जाती मानल्या जाणार्या लोकांना शिकण्याची सुविधा दिली. उच्चातील उच्च अभ्यास करून नीच जातीचे लोक सरकारमध्ये सेक्रेटरी सुद्धा बनले. आता त्यांना कोण नीच म्हणेल? ह्या प्रकारे उच्च नीचच्या भेद-भावाला तोडण्याचे खूप मोठे काम डॉ बाबासाहेव आंबडेकरांनी केले.*_

_परंतु तरीही गावात आजपर्यंत जात-पात, उच्च-नीच, आणि शिवाशीवची प्रथा काही मात्रेत कायमच आहे. ती दूर झाली नाही._

_मला आठवते, बर्मा (म्यंमा) त राहात असतांना अश्या कट्टर सनातनी घरात जन्मलो आणि वाढलो. तेथे पाहिले की भंगी आणि चांभारच नाही तर नीच जाती म्हणविणारे अनेक लोक असे होते, ज्यांचे स्पर्शलेले आम्ही पिऊ शकत नव्हतो. बाबासाहेबांनी यात खूप मोठी सुधारणा घडविली. तरीही समाजात नीच कुळ असणारे नीचच मानले गेले आणि उच्च कुळातील उच्चच मानले गेले._

*_जशी मोठी क्रांती भगवान बुद्धांनी नीच जातींना संघात सामावून केल्, तशीच बाबासाहेबांनी शिक्षणाचा प्रसार करून त्यांना सन्मानित केले. तरीही देशाचे हे दुर्दैव पूर्णपणे समाप्त झाले नाही._*

_आता विपश्यनेने एक पाऊल अजून समोर वाढविले आहे. त्याच्या शिबिरात सर्व जातीचे लोक सामील होतात. न कोणी नीच, न कोणी उच्च सर्व बरोबरीने सोबत राहून साधना करतात. सर्व सोबत बसून भोजन करतात, सोबत राहातात. आता तर स्थिती इथपर्यंत आली आहे ई मोठ्या संख्येने दलित म्हणविणार्यांना विपश्यनेत पुढे प्रशिक्षित करून आचार्य पदावर स्थापित केले गेले आहे. आता एक दलित वर्गाची व्यक्ती जेव्हा आचार्य-आसनावर बसते तेव्हा ती दलित नाही तर धर्माची शिक्षक आहे. जे साधनेत सामील होतात. ते सर्व जरी ब्राम्हण असोत, क्षत्रिय असोत अथवा वैश्य असोत, सर्व विपश्यनेच्या त्या आचार्यासमोर शिर नमवितात, नमन करतात आणि त्याच्याकडून धर्म शिकतात. भगवानांच्या विद्येत जात-पातीचा भेदभाव नाही, विपश्यना विद्या व आचरणच प्रमुख आहे, जी सर्वांना उपलब्ध आहे. आपसातील भेद-भावांना तोडण्याचे एक महत्वपूर्ण कार्य विपश्यना करीत आहे. पाहुया, याचा किती प्रभाव सार्या समाजावर होतो. समाजाचे आणि देशाचे हे दुर्दैव दूर होईल, तेव्हाच मंगल होईल! तेव्हाच कल्याण होईल !!_

*_टिप:- हा लेख फाल्गुन पौर्णिमा, २७/०३/२०१३ मधील आहे त्यामुळे कृपया कोणीही "दलित" या शब्दावर आक्षेप घेऊ नये._*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ३१/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Sunday, 29 December 2024

जन्माने नाही, कर्माने ब्राम्हण

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_जन्माने नाही, कर्माने ब्राम्हण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_29.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_एकदा भगवान इच्छानंगल वन-खण्डात विहार करीत होते. त्या वेळी तेथे अनेक प्रसिद्ध धनवान ब्राम्हणांचा निवास होता. त्यात *पौष्करसाति व तारुक्ष नावाचे दोन प्रसिद्ध ब्राम्हण आचार्य* होते. *त्या दोघांचे वाशिष्ट व भारव्दाज नावाचे दोन शिष्य होते, ज्यांच्यात ह्या बाबीवर चर्चा सुरु झाली की ब्राम्हण कसा असतो ?*_

_*भारद्वाजची ही मान्यता होती की कोणी मातेकडूनही आणि पित्याकडूनही सुजात असतो. त्याच्या आई वडील दोघांचेही सात पिढ्यांपर्यंतचे पूर्वज विशुद्ध वंशाचे असतात. त्यामुळे तो ब्राम्हण होतो. वाशिष्ट युवकाचे म्हणणे होते की कोणी शीलवान आणि व्रतसंपन्न असतो तेव्हाच तो ब्राम्हण होतो. जेव्हा दोघांच्या चर्चेतून सत्य निर्धारित झाले नाही तेव्हा ते भगवान बुद्धांजवळ पोहचले आणि आपला परिचय देऊन जातिवादाच्या विषयात जो विवाद होता की कोणी जन्माने ब्राम्हण होतो अथवा कर्माने ह्याला समजविण्यासाठी त्यांना प्रार्थना केली.*_

_भगवानांनी त्यांना सर्व प्राण्यांच्या जातिभेदाबाबत कारणासहित विस्ताराने सांगितले, सर्व प्राण्यांच्या जाती एक-दुस-यांपासून वेगवेगळ्या आहेत. विभिन्न प्रकारच्या झुडपांच्या आणि गवतांच्या जाती एकदुसऱ्यांपासून भिन्न आहेत. कीट-पतंग आणि मुंग्यांच्या जातीचे लिंग वेगळे आहेत. विभिन्न प्रकारच्या सापांचे जलचरांचे मासोळ्यांचे आणि आकाशात उडणाऱ्या पक्षांचे लिंग वेगवेगळे आहेत. अशा प्रकारची जातिचिन्ह मनुष्यात वेगवेगळी नसतात. दुसऱ्या प्राण्यांच्या शरीर संरचनेत त्यांच्या शरीराचे प्रत्येक अंग वेगवेगळ्या प्रकाराचे असते. जेव्हा की सर्व मनुष्यांच्या शरीराची सर्व अंगे वेगवेगळ्या प्रकाराची नसतात, एकाच प्रकाराची असतात._

_*मनुष्यात भेद फक्त बाहेरील ओळखीत आहेत. जो मनुष्य गोपालनाने जीविका करतो तो कृपक असतो. जो ओझे वाहतो तो मजूर असतो. जो मनुष्य एखाद्या कलेने, कारागिरीने जीविका चालवतो, तो आपआपल्या कामानुसार कुंभार, लोहार, सुतार इत्यादी म्हणविला जातो. जो मनुष्य दुसऱ्यांचे धन चोरून जगतो तो चोर आहे. शस्त्रांच्या सहायाने जीविका अर्जित करतो तो सैनिक म्हणविला जातो. जो गाव-जमिनीचा उपभोग करून जगतो तो राजा असतो. ह्या पैकी कोणीही ब्राम्हण नाही.*_

_*त्यानंतर भगवानांनी सांगितले की एखादा मनुष्य एखाद्या विशिष्ट मातेपासून उत्पन्न होण्यामुळेही ब्राम्हण होत नाही. त्यांनी पुढे सांगितले की कशाप्रकारच्या गुणांना धारण करण्यामुळे कोणी व्यक्ती ब्राम्हण होते:-*_

_जो संग्रही नाही, अपरिग्रही आहे. जो सोबत (संग) आणि आसक्तिपासून विरत आहे, साऱ्या भवसंयोजनांना नष्ट करून निर्भय झाला आहे, ज्याने क्रोध आणि तृष्णेला मनातून काढून टाकले आहे, ज्याने त्या काळच्या प्रचलित ६२ प्रकारच्या विभिन्न मान्यतांच्या बंधनांना तोडले आहे, त्यांना मी ब्राम्हण म्हणतो._

_ब्राम्हण मी त्याला म्हणतो जो आपल्या चित्ताला दूषित केल्याविना अपमान आणि पीडा सहन करतो, क्षमाच ज्याचे बळ आहे, जो अक्रोधी, व्रती, शीलवान, बहुश्रुत, संयमी आणि अंतिम शरीरधारी असतो, जो कमळाच्या पानावरील जलाप्रमाणे भोगात लिप्त होत नाही, ज्याची आसक्ती व्देष, ईष्या, अहंकार तसेच गळून गेलेले आहेत जसे सुईच्या येकावरून मोहरीचे दाणे, ज्याने ह्याच जन्मात आपल्या दुःखांचा विनाश करून आपल्या ओझ्याला उतरवून फेकले आहे, जो गंभीर प्रज्ञावान, मेधावी, मार्ग, अमार्गाचा ज्ञाता, सत्यवान आहे, जो गृहस्थ व गृहत्यागी दोघातही लिप्त होत नाही; जो कोणत्याही प्राण्याची हत्या करीत नाही, न हत्येसाठी कोणालाही प्रेरित करतो, जो विरोधीमध्ये विरोधरहित आणि दंडधारींमध्ये दंडरहित, संग्रहींमध्ये संग्रहरहित आहे, जो आदरयुक्त, मृदू व सत्य वाणी बोलतो, ज्यामुळे कोणालाही पीडा होऊ नये, अशा गुणांनी संपन्न व्यक्तीलाच मी ब्राम्हण म्हणतो._

_ह्याच प्रकारे भगवानांनी ब्राम्हणांच्या गुणांची अजून व्याख्या केली *जो पुरूष जगात न दिलेल्या वस्तू घेत नाही, जो लोक आणि परलोकांच्या विषयात आसक्तीरहित आहे, ज्याने परमसत्याला जाणले आहे, जो निर्वाण (मोक्ष) चा मार्ग सांगणारा आहे, जो शोकरहित, निर्मल आणि शुद्ध आहे, जो पाप-पुण्य दोघांच्याही प्रती आसक्तीरहित आहे, ज्याची सर्व जन्मांची तृष्णा नष्ट झाली आहे, ज्याने जन्म-मरणाच्या चक्रात टाकणाऱ्या मोहाचा त्याग केला आहे, जो भोगांना सोडून संन्यासी झाला आहे, जो लोकिय आणि दिव्य कोणत्याही बंधनात आसक्त नाही, जो रती आणि अरती यांना सोडून शीतल स्वभावाचा व क्लेशरहित आहे, अशा सर्वलोक विजयी असलेल्या मी ब्राम्हण म्हणतो, जो प्राण्यांच्या मृत्यू आणि उत्पत्तीला उत्तम प्रकारे जाणतो, जो आसक्तीरहित सुगत आणि बोधियुक्त (ज्ञानी) आहे, त्याला मी ब्राम्हण म्हणतो, ज्याची गती देव, गंधर्व आणि मनुष्य जाणत नाहीत, जो क्षीणास्रव आणि अरहंत आहे, ज्याच्या पूर्व, पश्चात आणि मध्यात काहीही नाही, जो संचयी नाही, जो पूर्व जन्मांना जाणतो, स्वर्ग आणि नरकास पाहातो, ज्याचा पुनर्जन्म क्षीण झाला आहे, ज्याची सारी कृत्ये समाप्त झाली आहेत, जो अभिज्ञानी मुनी आहे. मी त्याला ब्राम्हण म्हणतो.*_

_*जन्माने न कोणी ब्राम्हण होतो, न जन्माने अब्राम्हण, कर्माने ब्राम्हण होतो आणि कर्मानेच अब्राम्हण, कर्माने कृषक होतो, कर्माने कारागीर, कर्माने वैश्य होतो आणि कर्मानेच मजूर, कर्माने चोर होती आणि कर्मानेच सैनिक. कर्माने वाचक होतो आणि कर्मानेच राजा. त्याच प्रकारे कर्म-फळाला जाणणारा पंडित ह्या जन्माला यथार्थपणे जाणतो. लोक कर्माने चालत आहे, प्रजा कर्माने चालत आहे. चालणाऱ्या रथाच्या चाकाच्या धुरे प्रमाणे प्राणी कर्माने बांधलेले आहेत. तप, ब्रम्हचर्य, संयम आणि दमन ह्यामुळे ब्राम्हण होतो, ह्या गुणांना धारण करणाच 'उत्तम ब्राम्हण' होतो.*_

_ते दोघे तर युवक होते, परंतु ब्राम्हण समाजाचे जास्त वय असणारे लोकही ह्या विषयावर चर्चा करीत असत._

_भगवान बुद्धांच्या जीवनकाळातील एक घटना, एकदा जेव्हा ते अनाथपिडिकच्या जेतवनात थांबले होते, तेव्हा श्रावस्तीत भिन्न भिन्न स्थानांवरून आलेले ५०० ब्राम्हण तेथे एकत्र झाले. त्यांच्यात ही चर्चा सुरू झाली की *गौतम उच्च-नीचचा भेदभाव करीत नाही. नीच पेक्षाही नीच जातीच्या व्यक्तीलाही धर्म शिकवितो आणि पूज्य वनवितो. आम्ही त्याच्याशी ह्या विषयावर विवाद करू शकत नाही.*_

_त्या ब्राम्हणांतील एक आश्वलायन, युवक असुनही वैदिक ग्रंथात पारंगत होता. असे वाटते की हाच आश्वलायकन पुढे जाऊन उपनिषद काळाचा पंडित झाला असावा. त्यामुळे ब्राम्हणांनी आश्वलायनाला ह्या लायक समजले आणि त्याला ह्या विषयावर गौतम बुद्धांशी वाद करण्यासाठी तयार केले, तरीही तो वारंवार म्हणत होता की बुद्ध धर्मवादी आहे, त्यांच्याशी विवाद करणे कठीण आहे. परंतु त्या ब्राम्हणांच्या दबावामुळे आश्वलायन बुद्धांशी विवाद करण्यासाठी तयार झाला._

_जेव्हा तो बुद्धांना भेटला तेव्हा तो म्हणाला की *ब्राम्हण वर्णच श्रेष्ठ आहे, अन्य वर्ण हीन आहेत, ब्राम्हण शुक्लवर्णी आहेत, अन्य लोक कृष्णवर्णी. ब्राम्हण वर्णच शुद्ध असतो, अब्राम्हण वर्ण नाही. ब्राम्हण ब्रम्हाचे औरस पुत्र आहेत, त्याच्या मुखातून उत्पन्न झाले आहेत, तेच ब्रम्हाचे वास्तविक उत्तराधिकारी आहेत.*_

_तेव्हा भगवान म्हणाले- आश्वलायन!. *ब्राम्हणांच्या स्त्रियाही ऋतुमती, गर्भवती होतात. मुलांना जन्म देतात, त्यांना दूध पाजतात. मग हे कसे मानावे की ते ब्रम्हाच्या मुखाद्वारे उत्पन्न झाले आहेत ?*_

_आश्वलायन निरूत्तर झाला._

_आणि कोण्या ब्रम्हाने मनुष्य जातीत उच्च-नीचतेचे विधान केले असेल तर शेजारी देशात आणि भारताच्या अन्यान्य सीमांत प्रदेशात-आर्य आणि दास दोनच वर्ण का असतात? तेथे कोणी आर्य असेल तर तो दास होऊ शकतो आणि दास असेल तर आर्य होऊ शकतो. आश्वलायनाने हे स्वीकारले की त्या देश-प्रदेशात असे होते._

_तेव्हा भगवानांनी म्हटले की कोणत्या विशेषतेमुळे ब्राम्हण आपल्या स्वतःला ब्रम्हाचा उत्तराधिकारी मानतात ?_

_आश्वलायनाजवळ ह्याचे उत्तर नव्हते._

_*त्यानंतर भगवान म्हणाले की कोणी क्षत्रिय आहे, परंतु हिंसक आहे, चोर आहे, व्यभिचारी. कटू-भाषी आहे-तर तो मरणानंतर नरकातच जाईल. ह्याच प्रकारे वैश्य आणि शुद्राचीही वाईट गतीच होईल. तर मग अशाच दुर्गुणांनी युक्त ब्राम्हण नरकात जाणार नाही काय ?*_

_आश्वलायना जवळ ह्याचे काहीही उत्तर नव्हते._

_असेच कोणी व्यक्ती जर सदाचारी असेल तर मरणानंतर तो स्वर्गगामी होईलच, मग तो कोणत्याही जातीचा असो._

_आश्वलायन निरूत्तर होता._

_भगवान म्हणाले की *कोणी व्यक्ती ब्राम्हण असो अथवा अब्राम्हण नदी घाटावर साबण घेऊन आपल्या शरीराचा मळ काढण्यात समर्थ आहे, तर मग ह्यात ब्राम्हणाची काय विशेषता आहे? असेच माझ्याजवळ आल्यावर कोणत्याही जातीचा व्यक्ती आपल्या मनाचा मळ उतरवून धार्मिक, होऊ शकतो. आवश्यक नाही की तो ब्राम्हण जातीचा असावा. शीलवान, धार्मिक होण्याचा सर्वाना अधिकार आहे आणि असे झाल्यावर सर्वांना एकसारखंच फळ मिळते. अशा साधकालाच मी उत्तम ब्राम्हण म्हणतो. कोणीही साधक, कोणत्याही जाती वा वर्णाचा असो, तो तप, ब्रम्हचर्य, इंद्रीय-संयम व चित्त दमनाद्वारेच ब्राम्हण म्हणविण्याचा अधिकारी होतो. अशा साधकालाच 'उत्तम ब्राम्हण' म्हणतात. नीच कुळात जन्मलेल्या व्यक्तीही आपल्या आचरणाने शुद्धी प्राप्त करू शकतात.*_

_आश्वलायन पुन्हा निरूत्तर होता._

_*जर कोणी ब्राम्हण युवक अब्राम्हण युवतीशी विवाह करेल अथवा कोणी अब्राम्हण युवक कोण्या ब्राम्हणीशी विवाह करेल आणि त्यामुळे जी संतती होईल त्याला काय म्हणाल ? श्रेष्ठ वर्ण अथवा नीच वर्ण ?*_

_आश्वलायन निरूत्तर होता._

_एखादया घोड्याचा गाढवीशी संयोग झाला तर त्यांच्या संततीला न घोडा म्हणतात न गाढव, त्याला खेचर म्हणतात. असेच ब्राम्हण आणि अब्राम्हणच्या संततीला काय म्हणाल? त्याला ब्राम्हण म्हणून श्रेष्ठ म्हणाल अथवा अश्रेष्ठ? कसा भेद कराल? मनुष्य मनुष्य आहे. कोणताही भेदभाव नाही. *ब्राम्हण वर्णाचा असो अथवा अन्य वर्णाचा. शीलवान धार्मिक होण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि सर्वाना एकसारखे फळ मिळते.*_

_दुर्भाग्याने देशात बुद्धांच्या हजारो वर्ष आधीपासूनच जात-पात, उच्च-नीच, शिवाशीवीचा कलंक खूप पुरातन काळापासून चालत येत होता. कोणी चांडाळ दिसल्यावर अशुभ मानले जात होते. त्याला स्पर्श करणे तर दूरच त्याची सावलीही पडली तरी स्नान करावे लागे. म्हणून जेव्हा कोणी चांडाळ अन्य मनुष्यांच्या समुहात येत असे तेव्हा तो टाळ्या वाजवित, घंटीचा आवाज करीत येत असे, ज्यामुळे लोक आधीच त्याच्यापासून दूर होवोत. एखाद्या चांडाळाचे दिसणेही अशुभ मानले जात असे. त्यामुळे चांडाळ दिसल्यावर तर काही जण सुगंधित द्रव्याने आपल्या डोळ्यांना धूत असत. बहुदा चांडाळाची सावली पडल्यावर लोक त्याला मारीत असत. चांडाळ नजर खाली करूनच गावात प्रवेश करीत असत._

_त्यामुळे वाटते की बुद्धांच्या नंतरही चांडाळ मृत शव वाहून नेण्याचे स्मशानाची रक्षा करण्याचे काम करीत होते आणि चांडाळांना राहण्यासाठी वेगळे गाव होते. मृत्युनंतर त्याला जाळण्यासाठी स्मशानही वेगळे असायचे._

_चांडाळ लोकांच्या अतिरिक्त अनेक अन्य जातींनाही नीच मानले जात होते. हे हीनकुळ होते नोसादकुळ म्हणजे बांबूची टोपली वर्णावणारे, चर्मकारकुळ म्हणजे मेलेल्या पशूच्या चामडीने वस्तू बनविणारे. पुक्कुसकुळ म्हणजे घाण, कचरा उचलणारे भंगी._

_*चांडाळ कुळाचे व्यक्ती वृषल मानले जात होते. भगवानांनी खऱ्या अर्थाने वृषल कोण असतो, ह्याचे विवरण दिले जो नर क्रोधी, वैरी, पापी, ईर्ष्याळू, मिथ्यामतधारी, मायावी आहे; जो हिंसक, अत्याचारी, चोर आणि व्यभिचारी आहे; जो वृद्ध माता-पित्याचे पालन-पोषण करीत नाही: दुसऱ्याला त्रास देतोः ब्राम्हण, श्रमण वा अन्य वाचकांना धोका देतोः अनर्थकारी बोलतीः पापकर्म करून लपवतो; आपली बढाई आणि दुसऱ्याची अवहेलना करतोः रूष्ट, खूप जेवणारा, वाईट इच्छा असणारा, कंजूस आणि शठ आहे; वाईट कर्म करण्यात लज्जा, भय मानीत नाही; जो अरहंत नसतानाही आपल्याला अरहंत म्हणतो, तो अधम, वृषल आहे. कोणी जन्माने वृषल होत नाही आणि जन्माने ब्राम्हण होत नाही. कर्मानेच वृषल होतो आणि कमनिच ब्राम्हण, अकुशल कर्म करणारा ब्राम्हण चांडाळासमान होतो.*_

_भगवान म्हणाले "*मी ब्राम्हणी मातेपासून उत्पन्न होण्यामुळे कोणाला ब्राम्हण म्हणत नाही. ज्याच्याजवळ काहीही नाही आणि जो काहीही घेत नाही; त्याला मी ब्राम्हण म्हणतो. न जटेने, न गोत्राने, न जन्माने ब्राम्हण होतो; ज्याच्यात सत्य आणि धर्म आहे, तोच पवित्र आहे, आणि तोच ब्राह्मण आहे."*_

*_भगवानांनी नेहमी जातीपेक्षा विद्या आणि आचरण दोघांनाच महत्व दिले आणि ह्यावरच जोर दिला._*

_या साधकांनो! आम्हीही भगवानांच्या ह्या पावन शिकवणुकीपासून प्रेरणा घेऊन आपले आचरण व कर्म सुधारून खऱ्या अथनि ब्राम्हण बनू._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ३०/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Saturday, 28 December 2024

भगवान बुद्धांची सरळ शिकवण

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भगवान बुद्धांची सरळ शिकवण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_28.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹


_भगवान बुद्धांची सरळ, स्वच्छ आणि कल्याणकारी शिकवण उत्तर भारताच्या नगरात आणि गावात पसरू लागली. *भगवानांनी समजविले की अंधविश्वास आणि अंधमान्यतेमुळे धर्माचे सत्य समजत नाही, योग्य धर्माचे पालन होत नाही आणि त्यामुळे त्याचा कुशल परिणाम प्राप्त होत नाही.* भगवान जेव्हा केसमुत्तीला गेले तेव्हा तेथील निवासी कालामांना जो उपदेश दिला तो अनेकांना मान्य झाला. कारण त्यात कुठल्याही धोकेबाजीची शक्यता नव्हती._

_भगवानांनी स्पष्ट शब्दात म्हटले हे कालामो ! तुम्ही कोणत्याही बाबीला केवळ ह्यासाठी स्वीकारू नका की -_

१. ही बाब ऐकलेली आहे, म्हणजे वारंवार ऐकली आहे.

२. ही बाब परंपरागत आहे, म्हणजे परंपरेनी मानली जात आहे.

३. ही आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकूल आहे.

४. ही बाब तर्कसंगत आहे.

५. ही बाब न्यायसंगत आहे.

६. हिला सांगण्याची पद्धत सुंदर आहे.

७. ही आमच्या मतांच्या अनुकूल आहे.

८. सांगणाऱ्याचे व्यक्तित्व आकर्षक आहे. (हे म्हणणे विशेषता स्वतः त्यांच्यावर लागू होते.)

९. सांगणारा श्रमण आमचा पूज्य आहे. (हे कथनही विशेषता स्वतः त्यांच्यावर लागू होते.)

*_म्हणजे कोणाव्दारे सांगितली गेलेली अथवा कुठलीही ऐकलेली गोष्ट अंधविश्वास वा अंधश्रद्धेमुळे स्वीकारू नका._*

_*ज्या सत्त्याला तुम्ही आपल्या अनुभवामुळे जाणाल की ह्या-ह्या बाबी कुशल आहेत, निर्दोष आहेत, ह्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होते, आम्हाला सुख प्राप्त होते, त्याचाच स्वीकार करा.*_

_*जे सत्य आपल्या अनुभूतीव्दारे जाणले गेले आणि पाहिले की हे कुशल आहे, तेव्हा केवळ जाणूनच राहू नका, तर त्यानुसार चाला, त्यानुसार आचरण करा तरच कल्याण होईल.*_

_भगवानांची ही वाणी केवळ त्या कालामांनाच स्वीकृत झाली नाही, तर तिने अनेक लोकांना सत्याकडे चालण्यासाठी आकर्षित केले._

_माझा आपला अनुभव आहे. मी कट्टर हिंदू सनातनी घरात जन्मलो आणि वाढलो. बर्माच्या भारतीयांचा आणि विशेषता हिंदुंचा नेता होतो. मी भगवान बुद्धांना खूप पूज्य मानित होतो. त्यांच्या मंदिरात जाऊन नमनही करीत होतो. ते केवळ ह्यासाठी की भगवान बुद्धही विष्णुचे अवतार होते, म्हणजे ईश्वराचेच अवतार होते. परंतु सोबतच समाजात जी एक बहुप्रचलित मान्यता होती की ह्या अवतारात त्यांनी जे उपदेश दिले, ते केवळ दुर्जनांसाठी होते, ज्यामुळे त्यांचे पालन करून ते नरकगामी होवोत. म्हणून त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर आम्ही कधीही चालू नये._

_*जेव्हा विशिष्ट कारणामुळे मला वरील संकोचासह पूज्य गुरुदेव सयाजी ऊ बा खिनांच्या विपश्यना केंद्रात शिबिरासाठी जावे लागले. तेव्हा तेथे काही वेळ प्रतीक्षा करतांना टेबलावर ठेवलेली कालामसुत्ताची एक पुस्तिका माझ्या नजरेस पडली. मी ती उचलून वाचली. वाचल्यावर विश्वास झाला की येथे धर्माच्या नावावर गुरुबाजीचा प्रपंच नाही. ही व्यक्ती केवळ मानण्याला महत्व देत नाही आणि ह्या प्रकारे अंधविश्वास पसरवित नाही, तर सत्याला आपल्या अनुभूतिव्दारे जाणून त्या मार्गावर चालण्याला महत्व देते. त्यांच्या उपदेशात मला बुवाबाजीचा कोणताही धोका दिसला नाही. त्यामुळे आश्वस्त होऊन शिबिरात बसण्याचा निर्णय घेतला.*_

_*ह्यामुळे आम्ही समजू शकतो की भिन्न-भिन्न भ्रांतीत पडलेले अनेक लोक बुद्धांच्या वेळीही माझ्याच प्रमाणे त्यांच्या शिकवणुकीच्या सत्याला समजून त्यांचे अनुयायी झाले असतील.*_

_तरीही उत्तर भारताचे एवढे मोठे विशाल भूखंड आणि त्याची इतकी मोठी लोकसंख्या, जेथे अनेक प्रकारच्या अंधविश्वासांवर आणि अंधमान्यतांवर आधारित अनेक प्रकारचे कर्मकांडच प्रचलित होते. भगवानांच्या उपदेशामुळे त्यापैकी अनेक मिथ्या मान्यतांमध्ये सुधारणा झाली. जसे की मागील ३० सप्टेंबर, २०१२ च्या अंकातील सहा दिशांना नमस्कार करणाऱ्या श्रेष्ठीपुत्र सिगालची भ्रांती दूर होण्याचे वर्णन आहे._

_*कोण्या देवतेला भोजन चढविले जाते तेव्हा प्रश्न निर्माण होतो की जर दूरवर असणारा कोणी देवता ज्याचे अस्तित्व आहे की नाही, त्याला हे भोजन पोहचत असेल तर मग घरातून यात्रेसाठी निघालेल्या लोकांनी भोजन सोबत का न्यावे? घरातच त्यांच्यासाठी भोजनाचा भोग लावावा. ही बाब समजली तेव्हा ह्यातूनही लोक बाहेर निघाले.*_

_ह्याच प्रकारे उत्तर भारताचे कितीतरी लोक अंधविश्वासांशी जुळलेले होते. त्यापैकी काही बाहेर निघू शकले, काही बाहेर निघू शकले नाहीत आणि काही लोक आजपर्यंतही त्यालाच चिकटून आहेत._

*_अंधविश्वासाने बुद्धी नष्ट_*

_*जेव्हा कोणी अंधविश्वासात बुडलेला असतो तेव्हा सामान्य बुद्धिचाही प्रयोग करणे सोडून देतो. सोडले नाही तर स्वार्थ-निपुण पुरोहित 'शास्त्र-वचन' प्रमाणचे उदाहरण देऊन त्याला धमकी देतो की धर्माच्या क्षेत्रात कुतर्क करेल तर नरकगामी होईल. अंधविश्वासाला तोडणाऱ्या प्रत्येक तर्काला कुतर्क नाव दिले जाते. भयभीत मानव इतकेसे सत्यही समजू शकत नाही की जर जल-स्रानाने पाप-मुक्ती होत असेल तर बेडूक, मासोळ्या, कासव, मगर इत्यादी सर्व जलचरांची सद्गती निश्चित समजली पाहिजे. चोर, डाकू, लुटारू, हत्यारे, दुराचारी, व्यभिचारी आपले केलेले पाप जर नदीत वाहवून टाकत असतील तर निश्चित रूपाने स्वर्गाचे अधिकारी मानले पाहिजेत. धर्माच्या नावावर जेव्हा अशा मिथ्या मान्यता स्थापित होतात तेव्हा सदाचाराच्या ऐवजी दुराचाराला प्रोत्साहन मिळू लागते. मनुष्य आपले लोकही बिघडवितो आणि परलोकही. ह्या विपरीत जेव्हा धर्म आपल्या शुद्ध रूपात स्थापित होतो तेव्हा तो आपले लोकही सुधारतो आणि परलोकही._*

*_धम्मे च ये अरियप्पवेदिते रता, अनुत्तरा ते वचसा मनसा कम्मुना च।_*

*_ते सन्तिसोरच्चसमाधिसण्ठिता, वजन्ति लोकं दुभयं तथाविधा ।।_*

_*जे आर्याव्दारे प्रवेदित धर्मात निरत राहातात, ते श्रेष्ठ मन, वचन व कर्म असणारे, शांती, शील व समाधीत स्थित होण्यामुळे उत्तम कार्य करणारे होतात, (त्यामुळे) कुशल संयत जीवन जगतात आणि ह्या प्रकारे (मरणानंतर) दोनच गतींना प्राप्त होतात देव अथवा मनुष्य.*_

*_उष्ण देशात नदी-स्रान_*

_उष्ण देशात गरमी आणि घामामुळे वारंवार अस्वस्थ आणि अस्वच्छ होणाऱ्या शरीराला एखाद्या जवळच्या नदी व सरोवरात दिवसातून एक, दोन अथवा तीनदा स्नान घालने समजू शकते. परंतु ह्याला एक कर्मकांड बनवून धर्मासोबत जोडणे व ह्या स्नानाने पापकर्म धुतले जाण्याची मिथ्या मान्यता स्थापित करणे, कर्म सिद्धांतावर आधारित शुद्ध धर्माला दूषित करणेच आहे._

_दुर्बल मानव ह्या हीनग्रंथीने ग्ररत राहतो की तो आपल्या स्वतःच्या बळावर ध्यान साधनेव्दारे आपल्या पूर्वकृत दुष्कर्माच्या मळाचे प्रक्षालन करू शकत नाही. त्याची ही हीनग्रंथी कोण्या अशा पुरोहिताव्दारे पुष्ट केली जाते की ज्याने धर्माला आपल्या आजीविकेचे साधन बनविले आहे. असा पुरोहित आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी यजमानाला मिथ्या आश्वासन देतो की येथे स्रान करण्यामुळे ह्या नदीची अमुक देवी अथवा ह्या जलाशयाचा अमुक देवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला साऱ्या पापकर्मातून मुक्त करेल. व्याकुळ चित्त असणाऱ्या दुर्बळ मानवाला हे आश्वासन खूप प्रिय वाटले आणि तो ह्या कर्मकांडालाच सद्धर्म मानतो. ही अंधमान्यता सहजपणे समाजात पसरत जाते आणि पिढ्यान् पिढ्या आपले अस्तित्व मजबूत करीत जाते. *कोणी बोधिसंपन्न महापुरुष समाजाला ह्या अंधविश्वासातून बाहेर काढतो आणि कुशल कर्मावर आधारित शुद्ध धर्म पंथावर चालण्यासाठी प्रेरित करतो.*_

_या साधकांनो! आम्हीही अशा अंध विश्वासांच्या आणि अशा अंधमान्यतांच्या जंजाळापासून मुक्त होऊन, धर्माच्या स्वस्थ परंपरेला जीवनाचे अंग बनवू आणि आपले कल्याण साधून घेऊ!_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २९/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Friday, 27 December 2024

बाह्य वेषभूषेमुळे श्रमण नाही

 ✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_बाह्य वेषभूषेमुळे श्रमण नाही_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_0.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_एकदा भगवान श्रावस्तीच्या पूर्वारामात विहार करीत होते. तेथे महाराज प्रसेनजितही आले. थोड्या वेळानंतर काही जटा-धारी, भस्म-विभूती फासलेले व नग्न साधू-संन्याशी विभिन्न प्रकारच्या वेषभूषेत त्यांच्या समोरून गेले. महाराज प्रसेनजितने उठून त्यांना अभिवादन केले आणि आपला परिचय दिला. आशिर्वाद देऊन ते आपल्या रस्त्याने निघून गेले. त्यानंतर प्रसेनजितने भगवानांना म्हटले -_

_"भगवान! जे लोकात अरहंत आहेत अथवा अरहंत मार्गावर आरूढ आहेत, हे साधूही त्यापैकीच आहेत. भगवानांनी त्यांची दशा पाहून म्हटले -_

_"नाही महाराज! केवळ वेष बदलण्यामुळे कोणी व्यक्ती अरहंत अथवा अरहंत मार्गावर आरूढ होत नाही. त्यासाठी त्याला सम्यक प्रकारे प्रयत्न करावे लागतात. कोणाला सम्यक मार्ग मिळाल्यानंतरही तो योग्यप्रकारे त्या मार्गावर चालत आहे की नाही, हे जाणण्यासाठी एखाद्या समजदार व्यक्तीला दिर्घकाळापर्यंत त्याच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. थोड्या वेळात त्याच्या वागणूकीबाबत योग्य माहिती मिळू शकत नाही. महाराज ! कोणाच्या व्यवहारानेच त्याच्या इमानदारी अथवा बेइमानीची माहिती होऊ शकते. ते ही दिर्घकाळापर्यंत त्याच्या दैनिक क्रियांवर लक्ष ठेवल्यावरच._

_"कोणी प्रज्ञावान पुरुषच त्याच्या व्यवहारांवर योग्य प्रकारे लक्ष ठेऊ शकतो, सगळेच नाहीत. विपत्ती आल्यावरच मनुष्याच्या मनाच्या स्थिरतेची माहिती होते. ह्याचप्रकारे दीर्घकाळापर्यंत चर्चा केल्यावरच त्याच्या प्रज्ञेची माहिती होते."_

_ह्या व्याख्येमुळे महाराज प्रसेनजित खूप प्रभावित झाले आणि साश्चर्य क्षमायाचना करीत त्यांनी स्वतःच सत्य प्रकट करीत म्हटले-_

_"भगवान ! हे सर्व माझे गुप्तचर आहेत आणि वेष बदलून आंतरिक व शेजारी राज्यांच्या गतिविधीचा भेद घेतात आणि मला सूचित करीत राहातात. त्यानुसार विचार करून मी आवश्यक कार्यवाही करतो. भंते भगवान! आता हे लोक भस्म-विभूती धूवून, स्नान करून, विलेपन लावून, स्वच्छ कपडे घालून पाच कामगुणांचा भोग घेतील."_

_ह्यावर भगवानांनी समजाविले -_

_"केवळ वरील वेषभूषेमुळे मनुष्याला जाणू शकत नाही. केवळ बाहेरील वेष पाहून कोणावर विश्वासस करू नये. मोठे संयमित व आकर्षक कार्य करीतही दुष्टजन विचरण करीत असतात. माती वा लोखंडावर सोन्याचे पानी चढविलेले नकली कुंडल सुद्धा आकर्षक दिसते. असेच चमकदार वेष बनवून विचरण करणारे आतून घाणेरडे आणि बाहेरून चमकदार दिसून येतात. त्यामुळे जाणल्याविना, समजल्याविना एखाद्या बाह्य दिखाव्याच्या आधारावर कधीही विश्वास करू नका. त्यांच्या आचरणाला जाणून समजूनच विश्वास केला पाहिजे."_

*_योग्य श्रमण_*

_एकदा भगवान अंग देश (ओरिसा) च्या अश्वपूर गावात विहार करीत होते. तेथे भगवानांनी भिक्षूना संबोधित करीत म्हटल -_

_*"भिक्षुंनो! 'श्रमण' 'श्रमण' म्हणून लोक एखाद्याला बोलावतात आणि विचारल्यावर ही तो स्वतःला 'श्रमण' म्हणतो. अशी संज्ञा आणि असा दावा करणाऱ्या लोकांना श्रमणतेचा जो मार्ग आहे त्याला सिद्ध करावे लागते की तो खऱ्या अर्थाने त्या मार्गावर आरूढ आहे. त्यासाठीच लोक त्यांना चीवर, भिक्षा, निवास, औषध व अन्य उपयोगी वस्तूंचे दान देतात. त्यांचे दिलेले दान तेव्हाच सफल होते जेव्हा 'श्रमण' ची प्रव्रज्या निर्मल, सदाचरणयुक्त आणि लोकांच्या कल्याणात सहायक होते.*_

_*"भिक्षुंनो!  कोणी श्रमण-मार्गावर कसा आरूढ होऊ शकत नाही? ज्या भिक्षुचा जेव्हापर्यंत लोभ नष्ट होत नाही, असेच क्रोधीचा क्रोध, वैऱ्याचे वैर, निष्ट्राची निष्ठुरता, ईर्ष्याळूची ईर्ष्या. कंजूसाची कंजूसी, धूर्ताची धूर्तता, पापीची पापेच्छा, मिथ्यादृष्टी वाल्याची मिथ्यादृष्टी इत्यादी नष्ट होत नाहीत तेव्हापर्यंत तो योग्य भिक्षु होऊ शकत नाही. हे सर्व त्याच्यासाठी श्रमणाचे मळ आहेत, मार्गाच्या बाधा आहेत, अपायगतीकडे नेणारे आहेत. अशा भिक्षंच्या प्रव्रज्येला मी दुधारी अवजारांची प्रतिमा देतो, ज्याला कोणी चीवरात लपवून ठेवेल तर ते चीवरालाच कापेल. ह्या मळांनीयुक्त कोणी व्यक्ती जरी चीवरधारी असो, वस्त्ररहित (नग्न) असो, अंगाचा चिखल फासलेला असो. भस्म लावलेला असो, पाण्यात रहाणारा असो, झाडाखाली राहणारा असो, झाडाची साल घालनारा असो, खुल्या मैदानात राहणारा असो, नेहमी उभा राहणारा असो, मध्ये-मध्ये निराहार राहून भोजन करणारा असो, वेद-पाठी असो, मंत्रांचे अध्ययन करणारा असो- त्यापैकी कोणालाही मी श्रमण म्हणत नाही.*_

_*योग्य श्रमण तेव्हाच होईल जेव्हा वरील चित्ताच्या मळांचा त्याग करेल. ह्या चित्ताच्या मळांना दूर करण्यासाठी निरंतर चित्त-शुद्धीच्या मार्गाचा अभ्यास करीत असेल आणि विकारांपासून मुक्त होऊन योग्य श्रमणाचे जीवन जगू लागेल.*_

*_भिक्षूंनो ! कोणी श्रमण योग्य मार्गावर कसा आरूढ होतो ?_*

_*ज्या भिक्षुंची मिथ्यादृष्टी नष्ट होते, जो क्रोध, लोभ, वैर इत्यादी सर्व चित्ताच्या मळांपासून मुक्त होती, तोच योग्य मार्गावर आरूढ मानला जातो. तेव्हाच तो स्वतःला विशुद्ध, विमुक्त झालेला म्हणू शकतो. ह्या प्रकारच्या चित्ताच्या मळांपासून विमुक्त झालेल्या भिक्षूच्या मनात प्रसन्नता उत्पन्न होते. प्रसन्न चित्तामुळे प्रीती उत्पन्न होते. प्रीतियुक्त पुरुषाची काया स्थिर होते. तो स्थिर शरीर सुखाचा अनुभव करतो. ह्या प्रकारे सुखी चित्त समाहित (एकाग्र) होते. तो मैत्रीयुक्त चित्ताने एका दिशेला भारून टाकून विहरतो. त्यानंतर दुसरी दिशा, तीसरी दिशा, चौथी दिशा, वरची व खालची दिशा म्हणजे सर्व दिशांना मैत्रीचित्ताने भारून टाकून, सर्व प्राण्यांच्या प्रती द्वेषरहित होऊन अपरिमित मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षायुक्त चित्ताने विहार करतो. सर्वांना सुख पोहोचवितो, सर्वांच्या कल्याणात सहायक होतो. ह्या प्रकारे त्याचे श्रमण म्हणविले जाणे सार्थक झाले असे मानले जाते.*_

_*जसे भिक्षूंनो ! एखादा स्वच्छ, शीतल, मधुर जलयुक्त सुंदर घाट असणारा तलाव असेल आणि पूर्व दिशेच्या कडक उन्हामुळे संतप्त, तृषित कोणी पुरुष येऊन त्या तलावात उतरून आपली तहान दूर करती, उन्हाच्या तापाला दूर करतो. ह्याचप्रकारे पश्चिम दिशेने येऊन, उत्तर दिशेने व दक्षिण दिशेने येऊन आपली तहान भागवितात, उन्हाचा ताप दूर करतात. असेच भिक्षूंनो ! कोणी क्षत्रिय-कुळातून बेघर होऊन प्रव्रजित होतो. व तो तथागतांच्या उपदेशित धर्माला प्राप्त करून मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाची भावना करून आध्यात्मिक शांती प्राप्त करतो. ती आध्यात्मिक शांती प्राप्त श्रमण योग्य मार्गावर आरूढ आहे. ह्याच प्रकारे ब्राम्हण-कुळातून, वैश्य-कुळातून अथवा शुद्र-कुळातून बेघर होऊन, प्रव्रजित होतात आणि तथागतांच्या उपदेशानुसार चालून म्हणजे विपश्यना भावनेचा अभ्यास करून मैत्री, करुणा, मुदिता उपेक्षाची भावना करतात, तर खऱ्या श्रमणत्वाचे भागीदार बनतात. ते सर्व आस्त्रवांपासून, चित्ताच्या मळांपासून रहित होऊन चित्त-विमुक्ती, प्रज्ञा-विमुक्तीला ह्याच जीवनात स्वतः जाणून, साक्षात करून विहार करतात.*_

_*वस्तुतः आस्त्रवांच्या क्षयानेच योग्य श्रमण होतो. मग तो कोणत्याही कुळातून आलेला असो. जात त्याचा मार्गात बाधक होऊ शकत नाही.*_

_या साधकांनो! आम्हीही धर्ममार्गावर पाऊल-पाऊल चालत सर्व प्रकारच्या चित्ताच्या मळांपासून मुक्त होऊन आपले मंगल साधू, आपले कल्याण साधू !_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २८/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

फलज्योतिषाचं थोतांड - भाग ९

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_फलज्योतिषाचं थोतांड_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_83.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भाग ९_*

*_समाप्त_*

*_फलज्योतिष कला_*

_एवढं सगळं सांगून झाल्यानंतर लोक म्हणतात की, 'हे ठीक आहे. आम्हाला पटलं. पण मग माणसाने ज्योतिष बघूच नये का?' *माणसानं ज्योतिष बघावं का बघू नये, हा आमचा विषय नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही, हा आमचा विषय आहे. म्हणजे 'ज्योतिष हे शास्त्र नाही; पण ती कला आहे; असं जर कोणी म्हणालं तर आमचा त्याला विरोध नाही. ही कसली कला? ही माणसाला आधाराचं स्वप्न विकण्याची कला.* प्रत्येकाला एक आधार पाहिजे असतो. माणूस ज्यावेळी अगतिक असतो, त्यावेळेला अधिक काही तरी मिळेल. प्लॉट असेल तर बंगला मिळेल, दोन चाकी असेल तर चार चाकी मिळेल. यासाठी आधार पाहिजे असतो. आणि अत्यंत सुस्थिती असेल, तर ती आयुष्यभर तशीच टिकून राहील यासाठी आधार हवा असतो. *ही माणसाच्या मनाची कमजोरी आहे. ही योग्य गोष्ट नाही. पण ही स्वप्नं विकत घेण्यासाठी त्याला ज्योतिष मदत करतं. अशी मदत करणं, याचा शास्त्राशी काहीही संबंध नाही. शास्त्राच्यासाठी एका चोख पद्धतीनं विश्लेषणं करायचं असतं. प्रत्येकासाठी जर वेगवेगळे नियम लावण्याची पाळी आली जशी आज ज्योतिषाच्यामध्ये येते तर ते शास्त्र नव्हे, असे वि. म. दांडेकरांच्यासारखा माणूस अनेक वर्ष ज्योतिषाचा अभ्यास करून मांडतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे.*_

_मग ज्योतिष लोकांना आवडतं म्हणजे काय? ज्योतिषावर लोक विश्वास ठेवतात म्हणजे काय? *ज्योतिष कसं सांगितलं जातं, हे जर आपण समजावून घेतलं; तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. तुम्ही कुठल्याही माणसाचा हात हातामध्ये घ्या आणि त्याला असं सांगा की, 'तुमचं म्हणजे कसं, तुम्ही मनानं अगदी सरळ आहात. तुम्ही कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही. लोकांचं नेहमी भलंच व्हावं, असं तुम्हाला वाटतं. पण तुमच्या जर कोणी विनाकारण वाकडं गेलं तर मात्र तुम्ही त्याला सोडणार नाही, बरं का. तो माणूस डोकं हालवतोच. कारण त्याला खरंच स्वतःबद्दल असं वाटत असतं. तुम्ही जर एखाद्या बाईला असं सांगितलं की, 'बाई, तुझं बघ, तू एवढी सासरसाठी राब- राब राबतेस; पण घरच्यांना काही त्याचं चीज नाही' प्रत्येक बाईला ही गोष्ट एका मिनिटात पटते. किंवा पुढं जाऊन तिला असं सांगितलंत की, 'तुमचे हे म्हणजे अगदीच साधे-भोळे. तुम्ही आहात, म्हणून त्यांचा संसार नीट चाललाय; नाही तर काही खरं नव्हतं. तरी तिला असं वाटतं की, 'बरोबर आहे. हे खरंच आहे. मी जर नसते, तर यांच्या संसाराचं काही खरं नव्हतं. म्हणजे जी-जी गोष्ट आपल्याला सांगितली जाते, ती-ती गोष्ट आपल्याला योग्य वाटेल किंवा सार्वत्रिक असेल अशाच पद्धतीनं सांगितली जाते.* आमच्यातला एक कार्यकर्ता सभेमध्ये सगळ्यांचं भविष्य एकदम सांगायचा. म्हणायचा, 'मी आता भविष्याचं पहिलं वाक्य उच्चारतो. ज्याचं कुणाचं ते भविष्य नसेल किंवा चुकलं असेल, त्यांनी मला सांगायचं; मी पुढचं भविष्य सांगायचं बंद करतो. लोक कान टवकारायचे आणि हा असं म्हणायचा, 'तुम्ही लई मोठ्या मनाचे आहात. आता कुणी सांगेल का की, 'मी मोठ्या मनाचा नाही' म्हणून. या पद्धतीनं भविष्य सांगितलं जातं. ज्याला कसलाही शास्त्राचा आधार नाही._

_*शास्त्राचा आधार नाही हे फलज्योतिषाला विरोध करण्याचं एकमेव कारण नाही. त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की, बहुसंख्य वेळेला तुम्हाला असं सांगितलं जातं की, अदृश्य नियतीच्याद्वारे तुमच्या जीवनाच्या वस्तुस्थिती नक्की करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळं माणसं ही स्वतःला कुणी तरी अज्ञाताच्या हातातलं बाहुलं समजायला लागतात.* आपल्याला महाभारतातली ती कथा माहित आहे. मत्स्यवेधाचा तो पण लावलेला असतो. आणि खाली पाण्यामध्ये बघून माशाचा डोळा वेधायचा असतो. कर्ण पुढं येतो. तो धनुर्धारी असतो. पाण्यामध्ये बघतो वर बाण सोडतो. मत्स्यवेध होत नाही. माशाच्या नेत्राच्या बाजूला बाण लागतो आणि बाण खाली पडतो. द्रौपदी चटकनं म्हणते, 'बरं झालं बाई, सूतपुत्राला वरायचं टळलं' त्यावेळेला कर्णानं दिलेलं उत्तर भारतीय इतिहासामध्ये अजरामर आहे. तो असं म्हणतो की, 'सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्, दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्' मी कोण आहे हे मला माहीत नाही. मी सूत आहे की सूतपुत्र आहे, हे मला माहीत नाही. मी कुणाच्या पोटी जन्माला यायचं, हे माझ्या हातात नाही. मदायत्तं तु पौरुषम्, माझ्या पौरुषाचा विचार, माझ्या समाजाचा विचार, माझ्या कर्तृत्वाचा विचार. *या समाजामध्ये माणसाने स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही हातामध्ये कुंडली घेता, त्यावेळी तुम्ही कळत नकळत एक पांगुळगाडा आपल्या हातामध्ये घेता. तो पूर्णपणे अशास्त्रीय आणि निरुपयोगी असतो. ज्यावेळेला तुम्ही तो पांगुळगाडा हातामध्ये घेता, त्यावेळी तुमच्या हातातील ती कुंडली दैववाद रुजवते. नशिबाची कल्पना उगवते. आणि त्याच्यामुळे परिवर्तन कुजवते. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही परिवर्तनाची चळवळ आहे आणि म्हणूनच ती या सर्वाला विरोध करते.*_

*_समाप्त_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*

*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २७/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Thursday, 26 December 2024

सत्कर्मांनी सद्गती

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_सत्कर्मांनी सद्गती_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_12.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_एका गावाच्या प्रमुखाने भगवान बुद्धांना विचारले की लोक सुगती प्राप्त करण्यासाठी खूपसे कर्मकांड करतात, अनेक प्रकारच्या वेषभूषा, माला-गंध-विलेपन धारण करतात. अनेक प्रकाराने अग्नि-परिचर्या व अन्य कर्मकांड करून समजतात की आम्ही सर्व काही केले. काही असेही आहेत जे खालच्या दर्जाची तांत्रिक साधना करून एखाद्या प्रेत-प्राण्याशी बोलतात आणि त्याच्याद्वारे लोकांना स्वर्गात घेऊन जाण्याचा दावा करतात. भगवान आपण तर सर्वज्ञ आहात. आपणही काही असे करावे ज्यामुळे जगातले सारे प्राणी मरणोपरांत सुगतिमय स्वर्गलोकातच जाऊ शकतील._

_भगवानांनी त्यालाच प्रश्न विचारून समजविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काय समजता की *कोणी जीव-हिंसक असेल, चोरी करणारा असेल, व्यभिचारी असेल, खोटे बोलणारा असेल, चुगली करणारा असेल, कठोर बोलणारा असेल, गप्पिष्ट असेल, लोभी असेल, नीचवृत्तीचा असेल, मिथ्यादृष्टियुक्त असेल, तर काय तो स्वर्गात जाण्यालायक आहे? अथवा त्याच्या मृत्युनंतर पुष्कळशा लोकांनी तेथे एकत्र होऊन प्रार्थना केली, हात जोडून वंदना केली की आपण सुगतिगामी व्हावे, स्वर्गलोकात् उत्पन्न व्हावे, तर असे करण्यामुळे तो स्वर्गलोकात उत्पन्न होऊ शकतो काय? नाही, मरणोपरांत केले जाणारे कोणतेही कर्मकांड कोणालाही मुक्ती देऊ शकत नाही, हे असंभव आहे.*_

_एका उदाहरणाने समजा. एखाद्या मोठ्या जलाशयात एखादी मोठी दगडाची शिला सोडली आणि ती आपल्या भाराने पाण्यात बुडाली तर काय समजता की एखाद्या विशाल जनसमूहाच्या प्रार्थनेमुळे, नवसामुळे आणि पूजा-पाठामुळे अथवा एखाद्या अन्य कर्मकांडामुळे ती भारी शिला पाण्यावर तरंगेल काय?_

_असेच कोणी व्यक्ती तूप-तेलाने भरलेल्या माठांना पाण्यात नेऊन फोडेल आणि त्यातील तूप, तेल पाण्यावर तरंगायला लागेल तसेच एखाद्या दुसऱ्या माठात दगड-गोटे भरून त्यालाही फोडेल व ते आपल्या भाराने पाण्यात बुडतील, तेव्हा कोणी प्रार्थना करून, पूजा-पाठ करून, कर्मकांड करून म्हणेल की हे तूपा तू खाली जा, खाली जा! हे दगड-गोट्यांनो तुम्ही वर या, वर या! जर असे होत असेल तर करून पाहा._

_हे ग्रामणी! ह्याचप्रकारे *कोणी जर प्राणीहिंसेपासून, चोरीपासून, व्यभिचारापासून, खोटे बोलण्यापासून इत्यादी दुष्कमापासून दूर राहात असेल आणि सत्यधर्माचे जीवन जगत असेल, तर तो मरणोपरांत वरच जाईल. त्याची ऊर्ध्वगतीच होईल. कोणाचाही शाप त्याला नरकाच्या कष्टमय जीवनात पाठवू शकत नाही. त्याचे सत्कर्मच त्याला वर घेऊन जाईल. त्याला वर जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. हा निसर्गाचा अतूट नियम आहे.*_

_अशाच एका अन्य प्रसंगात भगवानांना विचारण्यात आले की भगवान आपण सर्वांवर समान रूपाने करुणाभाव ठेवता काय, दयाभाव ठेवता काय? जर होय, तर कोणाला खूप लाभ होतो, कोणाला मध्यम लाभ होतो आणि कोणी-कोणीतर धर्मलाभापासून वंचितच राहतात. असे का? *आपल्या मंगलमय करुणेचा प्रभाव सर्वांवर एकसारखाच का होत नाही ?*_

_*भगवानांनी त्याला एका शेतकऱ्याचे उदाहरण देऊन समजाविले की त्याच्याजवळ तीन प्रकारच्या जमिनी आहेत १. खूप सुपीक २. मध्यम सुपीक ३. एकदम नापीक, ओसाड. अशा परिस्थितीत तो सर्व प्रथम सुपीक जमिनीत बीज टाकतो. त्यानंतर मध्यम जमिनीत व सर्वात शेवटी नापीक-ओसाड जमिनीत. बीज तेच असते आणि तेवढ्याच मेहनतीने व तळमळीने टाकले जाते. परंतु पीक एकसारखे येत नाही. ह्याचप्रकारे माझ्याजवळही तीन प्रकारचे लोक धर्म शिकण्यासाठी येतात. एक तर खूप गंभीर साधक-साधिका, जे सुपीक जमिनीसारखे आहेत. त्यात जे बीज पडेल, ताबडतोब फलदायक होईल. कारण ते पूर्ण श्रद्धा आणि तळमळीने कामाला लागतात. दुसरे सामान्य गृहस्थ उपासक उपासिका, जे आपल्या दैनिक सांसारिक कामात पडलेले असूनसुद्धा धर्म शिकतात. ते मध्यम शेतासमान आहेत. त्यांच्यात श्रद्धा व तळमळ तर आहे परंतु संसारच्या अनेक अडचणीही आहेत. तरीही ते धर्ममार्गावर चालून आपले मंगल साधतातच. तिसरे काही असे लोक जे नापीक ओसाड जमिनीसमान आहेत. उपदेश तर त्यांनाही मी तसाच देतो परंतु आपल्या कर्मकांडांमध्ये आणि अन्य जंजाळात गुंतले असल्यामुळे ते धर्माला योग्य प्रकारे ग्रहण करू शकत नाहीत. ते जेवढे शिकून, समजून जितका अभ्यास करतात, त्यांना केवळ तेवढाच लाभ होतो. कोणी-कोणी केवळ ऐकून चालला जातो, थोडासाही अभ्यास करीत नाही, तर तो धर्मापासून सर्वस्वी वंचित राहतो. परंतु माझी करुणा त्या सर्वाप्रती नेहमी तेवढीच राहते.*_

_भगवानांनी अजून एक उदाहरण देऊन समजाविले की *एखाद्याजवळ तीन माठ आहेत. एक बिलकूल छिद्ररहित, दुसरा सूक्ष्म छिद्रे असणारा आणि तिसरा मोठे छिद्र असणारा. तो सर्वप्रथम विना छिद्र असणाऱ्या माठात पाणी भरतो, जे दिवसभर त्याच्या कामी येते. नंतर दुसऱ्या माठात पाणी भरतो की जरी ते दिवसभर चालले नाही तरी काही वेळापर्यंत त्यातून पाणी मिळतेच. तिसऱ्या माठात तो पाणी ह्यासाठी भरतो की जितकेही पाणी एकत्र होईल तेवढे खानासाठी अथवा कपडे-भांडे धुण्यासाठी तरी कामात येईल.*_

_*खूप गंभीर साधक-साधिका पहिल्या माठासमान आहेत. दुसऱ्या माठासमान ते सामान्य उपासक उपासिका आहेत जे अडचणी असतांनाही धर्माला धारण करतात. वेगवेगळ्या कर्मकांडात गुंतलेले लोक तसेच आहेत जसे तिसऱ्या माठात भरलेले पाणी. ते जितके ग्रहण करतील, अभ्यास करतील, त्यांना केवळ तेवढाच लाभ होईल. मात्र माझी दया आणि करुणा सर्वांप्रती समानच राहते.*_

_*भगवानांद्वारे उपदेशित ह्या उदाहरणांपासून धडा घेऊन साचकांनी! पा, आम्हीही धर्ममार्गावर सुपीक क्षेत्र बनून, श्रद्धा आणि तळमळीने पाचही शीलांचे पूर्णपणे पालन करीत, सम्यक समाधीला पुष्ट करू आणि अनित्यबोधिनी प्रज्ञेचा सखोलतेने अभ्यास करीत आपल्या सदाचरणाच्या बळावर आपली सुगती निश्चित करू या.* ह्यातच आमचे मंगल आहे, कल्याण आहे._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २७/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

फलज्योतिषाचं थोतांड - भाग ८

 ✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_फलज्योतिषाचं थोतांड_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_26.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भाग ८_*

*_शाहू महाराजांचा किस्सा_*

_राजर्षी शाहू महाराजांना १०० वर्षांपूर्वी सारासार विचारांनी एक अतिशय चांगला अशा स्वरुपाचा प्रश्न सुचला होता असे सांगितले जाते. ती घटना अशी घडली होती. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एकदा अशी वर्दी आली की, 'बाहेर एक ज्योतिषी आलेला आहे आणि तो अतिशय निष्णात आहे. अचूक भविष्य सांगतो. शाहू महाराजांचा यावर विश्वास नव्हता. पण शाहू महाराज म्हणाले, 'ठीक आहे. त्याला बोलवा. तो आत आला. त्यानं महाराजांना मुजरा केला. महाराज त्याच्याकडं न बघताच म्हणाले, 'याला काढण्या घाला आणि तुरुंगामध्ये पाठवा. आता महाराजांची आज्ञा, यापुढं कुणाची काय प्राज्ञा ? म्हणून त्याची तुरुंगात रवानगी झाली. दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि दरबार भरल्यानंतर पुन्हा शाहू महाराजांनी आठवणीनं त्या ज्योतिष्याला बोलावलं. त्याला उच्चासनावर बसवलं. त्याचा सन्मान केला. तो बिचारा अगदीच भांबावून गेला आणि तो असं म्हणाला की, 'महाराज, मला काही समजत नाही. काल मी या ठिकाणी आलो, त्यावेळी तुम्ही मला तुरुंगात का टाकलं हे समजत नाही. आणि आज तुम्ही लगेच तुरुंगातून माझी मुक्तता का केलीत आणि माझा एवढा सन्मान का केलात हे मला समजत नाही' *महाराज म्हणाले, 'मी हे सगळं एवढ्यासाठीच केलं की तुला काहीच समजत नाही, एवढं तरी तुला समजावं. तुला जर लेका, माहीत नसेल की, काल तुला अटक होणार आहे आणि तुझी सुटका होणार आहे. स्वतःचे एका दिवसाचे भविष्य ज्याला कळत नाही, त्यानं उगीच सगळ्या जगाचं भविष्य सांगत फिरण्याचा धंदा कशाला पत्करावा?'*

_महाराष्ट्रामधल्या समाजसुधारकांनी हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. *म. फुलेंनी असं विचारलं की, 'प्रत्येक लढाई मुहूर्तावर करणारी पेशवाई बुडली आणि लढाईला मुहूर्ताशिवाय बाहेर पडणारे गोरेसाहेब जिंकले. हे कशामुळं घडलं?' त्यांनी पुढं जाऊन असा प्रश्न विचारला की, '३६ गुणांची पत्रिका जुळून आमच्या आयाबहिणींची लग्नं होतात आणि त्यांच्या कपाळी वैधव्य येतं आणि अशी कोणतीच पत्रिका न बघता गोऱ्या मडमांची लग्नं होतात आणि त्यांचे संसार सुखानं होतात. असं कशामुळं घडतं?' याचा अर्थ, फुलेंना सांगायचं होतं ते हे की, ज्यावेळेला दोन सैन्य समोरासमोर भिडतात त्यावेळी त्यांच्याकडं असलेली शस्त्रास्त्रं आणि त्यांचं मनोबल याच्यावर युद्धाचा निकाल लागतो. तो आकाशातल्या ग्रहगोल-ताऱ्यांच्यावर लागत नाही. पती आणि पत्नी यांचा संसार सुखानं चालेल की नाही हे त्यांच्या पत्रिकेतील ३६ गुणांच्यावर अवलंबून नसतं. फुलेंच्या काळामध्ये अत्यंत लहानपणी लग्नं व्हायची. मुलगी ४-५ वर्षाची असायची, मुलगा १०-१२ वर्षांचा असायचा. त्या काळामध्ये बालमृत्यूचे प्रमाण फार प्रचंड होतं. स्वाभाविकपणे अनेक स्त्रियांच्या कपाळी वैधव्य यायचं. जोपर्यंत या देशामध्ये आरोग्य व्यवस्था सुधारत नाही, बालविवाहाची प्रथा जात नाही; तोपर्यंत पत्रिकेतील गुण जमले काय वा न जमले काय, त्याला किंमत नाही. म. फुले असोत किंवा राजर्षी शाहू महाराज असोत, त्यांच्या विचार पद्धतीत अतिशय वैज्ञानिक दृष्टीकोन आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.*_

*_क्रमशः_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*

*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २६/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Wednesday, 25 December 2024

वास्तविक आरोहण व अवरोहण

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_वास्तविक आरोहण व अवरोहण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_27.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_*त्या काळी समाजात अशी मान्यता होती की शारीरिक कष्ट भोगूनच व्यक्ती वाईट कर्माच्या फळांपासून. विकारांपासून मुक्त होऊ शकते आणि मृत्युनंतर उच्च लोक प्राप्त करू शकते.*_

_पूर्वी केलेल्या दुष्कर्माच्या फळरूपात आम्हाला अनेक प्रकारच्या शारीरिक यातनांना भोगावे लागते आणि ह्या जन्मात माझ्यात कष्ट झेलण्याची क्षमता आहे तर त्यांना आत्ताच का भोगू नये? त्यासाठी ते दिर्घकाळापर्यंत उपवास करून शरीराला उपाशी ठेवत असत व अनेक प्रकाराने दंडित करीत असत. कदाचित हा विचार करून की बऱ्याच काळापर्यंत अशा यातनांना इथेच भोगल्यावर त्या पूर्वीच्या दुष्कर्माचे दुष्फळ भोगण्यापासून मुक्ती मिळेल आणि मृत्युनंतर उच्च लोक प्राप्त होईल._

_भगवानांच्या जीवनकाळात लोक काट्यांवर झोपत असत, दिर्घ उपवास करीत असत, ग्रीष्म ऋतूत सावलीविना उघड्या उन्हात झोपत असत, शीतकाळात अंथरूण-पांघरूणाशिवाय उघड्या जागी थंडीत कुडकुडत असत. हे सर्व यासाठी करीत असत की पुढे जाऊन ह्या कष्टांमधून जावे लागू नये._

_शरीराला दंडित करण्याव्यतिरिक्त अजूनही अनेक प्रकारची कर्मकांड चालत असत. काही लोकांची मान्यता होती की अग्निपूजेमुळे माझी उन्नती होईल, अवनती होणार नाही. अधोगतीच्या अवरोहणापासून वाचण्यासाठी विशिष्ट वेळी अग्नीची पूजा केली जात होती. जमिनीला ओल्या शेणाने सारवून, त्यावर कुश नावाचे हिरवे गवत पसरवून, डोक्यावरुन स्नान करून, नवीन रेशमी वस्त्र घालून, त्या रात्री अग्निकुंड आणि घराच्या मध्ये त्याच जमिनीवर झोपत असत. रात्री तीनदा उठून अग्नीला हात जोडून, नमस्कार करून प्रार्थना करीत असत की आम्ही आपल्या प्रती आरोहण करतो. अर्थात भविष्यात आमचे अवरोहण न होवो, आरोहणच होवो. अधोगती न होवो, ऊर्ध्वगतीच होवो. ह्या कर्मकांडाला पूर्ण करतांना अग्नीला खूपसे तूप, तेल, लोणी इत्यादी अर्पण करीत असत. ती रात्र संपल्यावर ब्राम्हणांना स्वादिष्ट भोजन करवीत असत आणि समजत असत की ह्यामुळे आमचे आरोहणच होवो, ऊर्ध्वगतीच होवो._

_*परंतु भगवानांनी समजविले की एखाद्या कर्मकांडाद्वारे भविष्याची अधोगती म्हणजे अवरोहणापासून सुटका मिळेल हे असंभव आहे.* म्हणूनच त्यांनी आरोहण म्हणजे ऊर्ध्वगतीसाठी शुद्ध धर्माचे पालन करणे शिकविले-_

_*आर्य-श्रावक ह्या प्रकारे विचार करतो की प्राणी-हिंसा करणे, चोरी करणे, खोटे बोलणे, चुगली करणे, व्यर्थ बडबड करणे, कठोर, कटू वचन बोलणे, लोभ, द्वेष व मिथ्या कर्मकांड इत्यादी करण्यामुळे ह्या लोकात व परलोकात दोन्हीकडे वाईटच परिणाम होतो. ह्या दुष्कर्मामुळे माझे भविष्य बिघडतेच. त्यामुळे तो ह्या सर्व दुष्कर्माना त्यागून शुद्ध धर्माचे जीवन जगतो आणि आपले इहलोक व परलोक दोन्ही सुधारतो. असे करण्यामुळे त्याचे अवरोहण होत नाही, अधोगती होत नाही, तर आरोहणच होते, ऊर्ध्वगतीच होते.*_

_ह्याच प्रकारे अजून एक कर्मकांड चालत होते. वेळेवर उठून खाटेवर बसूनच पृथ्वीला स्पर्श करणे, ओल्या शेणाला स्पर्श करणे, हिरव्या गवताला स्पर्श करणे, अग्नीची परिचर्या करणे, दिवस उजाडल्यावर हात जोडून सूर्याला नमस्कार करणे, दिवसात तीनदा पाण्यात उतरणे इत्यादी. ही मान्यता चालत येत होती की असे करण्यामुळे चित्ताची शुद्धी होते, शुचिता होते._

_भगवानांनी समजविले की जेव्हापर्यंत कोणी व्यक्ती शरीराने होणाऱ्या ह्या तीन प्रकारच्या अशुद्धीत लागलेली असते तेव्हापर्यंत ती चित्ताच्या शुचितेपासून, शुद्धींपासून खूपच दूर राहते._

१. _जर तो प्राणी-हिंसेत रत राहतो, प्राण्यांप्रती सर्वस्वी निर्दयी राहतो, त्यांना मारून टाकण्यात लागलेला राहतो, लोभी असतो, रत्कपाती असतो._ 

२. _दुसऱ्यांची वस्तू मग ती गावातील असो वा जंगलातली त्याची चोरी करणारा असतो._

३. _काम-भोगासंबंधी मिथ्याचरण करणारा असतो. तो कोणत्याही स्त्रिचा भोग घेणारा असतो, जरी ती त्याच्या आईच्या घरची असेल, वडिलांच्या घरची असेल, भावाच्या घरची असेल, बहिणीच्या घरची असेल, नातेवाईकाच्या घरची असेल; जरी तिचा कोणाशी विवाह झाला असेल अथवा ती धंदेवाईक नाचणारी का असेना. ह्यापैकी कोणाशीही व्यभिचार करीत असेल, तर या तिन्ही शारीरिक कर्माच्या अशुद्धी आहेत, अशुचिता आहेत._

*_ह्याच प्रकारे वाणीच्या कर्मांच्या चार अशुद्धी असतात -_*

१. _खोटे बोलणारा असतो, सभेत, परिषदेत, भाऊ-बंदात, पंचायतीत, राजसभेत ह्यापैकी कोणतीही जागा असो, जेथे त्याची साक्ष विचारली जाते की जे जाणता ते खरे-खरे सांगा, हुबेहूब सांगा. न जाणतांनाही तो सांगतो की जाणतो अथवा जाणत असतांनाही सांगतो की जाणत नाही. तो पाहिले नसतांनाही सांगतो की पाहिले आहे आणि पाहिले असतांनाही सांगतो की पाहिले नाही. आपल्या अथवा दुसऱ्याच्या एखाद्या लौकिक वस्तूसाठी खोटे बोलतो._ ह्याच प्रकारे 

२. _चुगली करणारा असतो,_

३. _कठोर वचन बोलणारा असतो आणि_

४. _व्यर्थ बोलणारा असतो, तेव्हा ह्या चारही त्याच्या वाणीच्या अशुद्धीच आहेत, अशुचिताच आहेत._

_*असेच मनाच्या कर्माच्या तीन प्रकारच्या अशुद्धी असतात.*_ 

१. _कोणी व्यक्ती मनाच्या स्तरावर लोभी असते. दुसऱ्यांचे धन आहे. दुसऱ्यांच्या वस्तू आहेत त्याला हस्तगत करू इच्छिते - कशा प्रकारे दुसऱ्यांची वस्तू माझी होईल._

२. _तो मनाने द्वेषयुक्त असतो, मनाने दुष्ट संकल्पी असत्तो. तो दुष्ट मनाने विचार करतो की हे प्राणी बांधले जावेत, विनाशाला प्राप्त होवोत, मारले जावोत, नष्ट होवोत._

३. _त्याचे मानस मिथ्या-दृष्टी असणारे असते, उल्टी-दृष्टी असणारे असते. तो सत्याला समजू शकत नाही आणि म्हणतो की दानाचे कोणतेही फळ नाही, यज्ञ नाही, होम नाही, चांगल्या-वाईट कर्माचे फळ नाही, हा लोक नाही, परलोक नाही, न माता आहे, न पिता आहे, न तो स्वतः उत्पन्न प्राणी आहे, न लोकात कोणी श्रमण आहे, न ब्राम्हण आहे, न कोणतेही सम्यक ज्ञान आहे, न कोणी सम्यक आचरण करणारे आहेत. तो असा मिथ्या भाव प्रकट करतो की परलोकात स्वतः जाऊन मी ह्या सत्याचा साक्षात्कार केला आहे._ 

*_हे सर्व चित्ताच्या अशुचितेच्या अंतर्गत येते, अशुद्धीच्या अंतर्गत येते._*

_*वस्तुतः खरी शुचिता वा शुद्धी तेव्हा होते जेव्हा कोणी व्यक्ती ह्या अकुशल कर्मापासून वाचून कुशल कर्मात प्रवृत्त होते. तेव्हा तो स्वतः उर्ध्वगतीचा अधिकारी होतो. अश्या लोकांचे आरोहणच होते, अवरोहण कधीही होत नाही.*_

_असेच अनेक प्रकारचे अंधविश्वास पसरलेले होते. काही लोक कदाचित हे मानत होते की माझ्या कर्मांनुसार भविष्यात मला कुत्र्याचे जीवन जगावे लागेल, त्यामुळे कुत्र्याचे कष्टमय जीवन आत्ताच का जगू नये? अशा प्रकारे तो कुत्र्याचे जीवन जगण्याचा निर्णय करायचा आणि कुत्र्याप्रमाणेच आचरण ठेवायचा. जमिनीवर फेकलेले भोजनच ग्रहण करायचा, नग्न राहायचा, कुत्र्याप्रमाणेच आकुंचन करून बसायचा, तसेच झोपायचा इत्यादी._

_असेच कदाचित कोणी हे समजून निर्णय करीत होता की माझ्यात कष्टमय जीवन जगण्याचे सामर्थ्य आहे आणि पुढे जाऊन मला पशुयोनीचे जीवन जगायचे आहे, तर ह्याच जीवनात गायीचे जीवन का जगू नये? आत्ताच सहन करून घेऊ ज्यामुळे मरणानंतर तसे दुःखद जीवन जगावे लागू नये. तशी अधोगती न भोगावी लागो. उलट उर्ध्वगतीच प्राप्त होवो. ह्यासाठी तो आपली सारी दैनिक जीवनचर्या गाईसारखीच करायचा. अनेक प्रकारचे कष्ट सहन करायचा._

_ह्या कशा मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. त्याला समजत नाही की आत्ता तर तो भोगतोच आहे व भविष्याच्या जीवनात ह्यापेक्षा अधिक भोगावे लागेल._

_*अशा लोकांचे भविष्य पाहून भगवानांनी समजविले की असे करण्यामुळे दुर्गतीच होते,* नारकीय जीवनच प्राप्त होते अथवा खरोखर पुढच्या जन्मी कुत्र्याचा अथवा गायीचा जन्म प्राप्त होतो आणि अपार कष्टांना सहन करावे लागते._

_अशी मिथ्या धारणा असणारी व्यक्ती जर असा विचार करेल की अधोगतीचे दुःखमय जीवन इथेच जगण्यामुळे मरणोपरांत देवलोकाची उर्ध्वगती प्राप्त करेल अथवा त्यापेक्षाही एखादी उंच गती प्राप्त करेल तर ही तिची खूप मोठी चूक आहे. भगवानांपासून हे ऐकून-समजून असे गोव्रतिक आणि कुक्कुरव्रतिक लोक रडू लागले की आमचे इतक्या दिवसांचे वर्तमान जीवन व्यर्थ गेले आणि भविष्यातही असे अधोगतीचे जीवन जगावेच लागेल. ह्यासंबंधी त्यांनी भगवानांना सत्य धर्म शिकविण्याचा आग्रह केला. ह्यावर भगवानांनी समजविले -_

_*मी ह्या चार कर्मांना स्वतः जाणून, अनुभव करून पाहिले की*_

१. _येथे ह्या जीवनात जर एखादे कार्य कृष्ण म्हणजे पापमय असले, तर त्याचे फळही पापमयच असते._ 

२. _जर एखादे कार्य शुक्ल म्हणजे कुशल असले तर त्याचे फळही कुशलच असते._ 

३. _काही कर्म कृष्ण-शुक्ल मिश्रित असले तर त्याचे फळही मिश्रितच असते._

४. _एक कर्म ते होते ज्याला न कृष्ण म्हटले जाऊ शकते न शुक्ल. ह्याच्या फळाचीही तीच स्थिती आहे. हे चवथ्या प्रकारचे कर्मच कर्म-क्षयात सहायक होऊ शकते._

_कोणते कर्म स्वतः कृष्ण आहे आणि कृष्ण फळच देणारे आहे? जेव्हा कोणी व्यक्ती समग्र शारीरिक कर्म दुसऱ्यांना पीडा देण्यासाठी करीत राहते, ह्याच प्रकारे समग्र वाणीचे कर्म, मनाचे कर्म दुसऱ्यांना पीड़ा देण्यासाठी करीत राहते तर ती मरणोपरांत पीडादायक लोकातच उत्पन्न होते आणि तिला अनेक प्रकारचे कष्टदायक तप्त-लोह-स्पर्श इत्यादी कष्टदायक शूलांचा स्पर्श भोगावाच लागतो. तिला ह्या नारकीच स्पर्शाचा अनुभव घ्यावाच लागतो._

_असेच जेव्हा कोणी व्यक्ती मन, शरीर आणि वाणीने चांगले कर्म करते, दुसऱ्यांना सुख पोहचविण्याचे कर्म करते, दुसऱ्यांच्या मंगलाचे भाव मनात येत राहातात, वाणीने द्वैषरहित चांगले वचन बोलून दुसऱ्यांना प्रसन्न करते, तर ती ह्या लोकातही सुख-शांतीचा अनुभव घेते आणि मृत्युनंतर परलोकातही द्वेषरहित सुखमय संवेदनांचाच अनुभव घेते._

_ह्याच प्रकारे कोणी द्वेषयुक्त आणि द्वेषरहित दोन्ही प्रकारचे मिश्रित कर्म करतो. तेव्हा तो येथेही दोन्ही प्रकारच्या संवेदनांचा अनुभव करतो आणि परलोकातही दोन्ही प्रकारच्या स्पर्शाचा अनुभव करतो._

_असेच अकृष्ण, अशुक्ल कर्म करणारी व्यक्ती सर्व प्रकारच्या कर्म-संस्कारांपासून मुक्त होते. तिचा पुन्हा पुनर्जन्म होत नाही._

_भगवानांच्या ह्या धर्मदेशनेमुळे त्या व्रतधारींचे व्रत सुटले आणि धर्ममार्गावर आरूढ होऊन, अभ्यास करीत-करीत भवमुक्त अवस्थेला प्राप्त झाले._

_या. साधकांनो! आम्हीही ह्या मिथ्या कर्मकांडाच्या मिथ्या मान्यतांच्या गुंत्यातून सुटून वास्तविक धर्ममय जीवन जगत आपले मंगल साधून घेऊ, कल्याण साधून घेऊ._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २६/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

फलज्योतिषाचं थोतांड - भाग ७

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_फलज्योतिषाचं थोतांड_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_25.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भाग ७_*

*_फलज्योतिष शास्त्र नाहीः इतर कारणं_*

_फलज्योतिष हे शास्त्र का नाही, याच्याबद्दल इतर अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. *जगामधल्या १९२शास्त्रज्ञांनी की ज्यापैकी १८ शास्त्रज्ञ हे नोबेल पारितोषिक विजेते आहेत, पत्रक काढून असं जाहीर केलं की, 'फलज्योतिषाला शास्त्राचा दर्जा द्यावा, असं त्याच्यामध्ये काहीही नाही; दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकांची चुकलेली भविष्यं या त्यांच्या चुकलेल्या भविष्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे!* उदा. २० मार्च १९७७ला त्यावेळच्या दैनिक तरुण भारतचे संपादक चं.प. भिशीकर यांनी भारतामधल्या प्रमुख वृत्तपत्रांनी निवडणुकीचे दिलेले निकाल काढले. लक्षात असं आलं की, सगळेच्या सगळेजण तोंडघशी पडलेले होते. काँग्रेस सतत सत्तेमध्ये येत होती. हे तोपर्यंत देशाच्या राजकारणाचं अविभाज्य गणित होतं. आणीबाणी झालेली होती. त्याच्यामुळं तर इंदिरा गांधी सत्तेवर येणार, असं वाटत होतं. प्रत्यक्षात काँग्रेसचं त्या निवडणुकीत पानिपत झालं. परंतु नेहमीच ही भविष्य चुकतात आणि याचं प्रमाण फार मोठं आहे. याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि जी भविष्यं बरोबर येतात, त्यांच्याबद्दल मात्र मोठ्या प्रमाणात दणकून प्रसिद्धी केली जाते. नुकत्याच ९५ साली झालेल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रामधल्या सर्व प्रमुख ज्योतिषांना पत्र लिहून आम्ही असं विचारलं होतं की, 'तुम्ही या निवडणुकांच्या संदर्भात आधीच तुमचं भविष्य वर्तवू शकता का? आणि दोन वेळेला रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवून देखील एकानं देखील त्यास उत्तर देण्याचं धाडस दाखवलं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्याच्याबद्दल जर फलज्योतिषी आधी आपलं भविष्य वर्तवू शकत असता तर त्याला आव्हान घायला आम्ही तयार आहोत. मात्र एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला फक्त दोनच पर्याय असतात, त्यावेळेला शक्यता अशक्यतेच्या सिद्धांताप्रमाणे त्यापैकी एक पर्याय बरोबर येण्याची शक्यता असते. म्हणजे जर दोनच व्यक्ती निवडणुकीला उभ्या असल्या तर एक ज्योतिषी असं म्हणू शकतो की, 'हा निवडून येईल'. आणि दुसरा ज्योतिषी असं म्हणू शकतो की, 'तो निवडून येईल.' कोणाचं तरी उत्तर १०० टक्के बरोबर येऊ शकतं. परंतु ते उत्तर बरोबर येणं नसतं, तर ती शक्यता अशक्यतेच्या सिद्धांताप्रमाणे केलेली मखलाशी असते. ज्यावेळेला बहुपर्यायी उत्तर सातत्यानं बरोबर येतं, त्याचवेळेला त्याला शास्त्राचा दर्जा प्राप्त होतो._

_*पेपरमधल्या भविष्याच्या नोंदी जर आपण बघितल्या तरी फलज्योतिषाच्या नावाने केवळ करमणूक किंवा केवळ फसवणूक केली जाते, हे आपल्या सहज लक्षात येऊ शकेल. आपल्या गावातील कुठलेही दोन पेपर काढा आणि कुठल्याही गावामध्ये हा प्रयोग करता येण्यासारखा आहे. त्या दोन पेपरच्यामध्ये एकाच राशीच्या व्यक्तीचं त्या दिवशी वेगवेगळं आणि बऱ्याच वेळेला अत्यंत परस्परविरोधी असं भविष्य सांगितलेलं असतं. म्हणजे एकामध्ये जर असं लिहिलेलं असेल की 'कुटुंब सौख्य' तर दुसऱ्यामध्ये लिहिलेलं असतं की 'गृहकलह'. एकामध्ये लिहिलेलं असतं 'धनलाभ' तर दुसऱ्यामध्ये लिहिलेलं असतं 'आर्थिक टंचाई' आता एकाच दिवशी एकाच राशीची वेगवेगळी भविष्यं वेगवेगळ्या वृत्तपत्रात येतात कशी. आणि त्याच्यावर माणसं मूर्खासारखा विश्वास ठेवतात कशी?* किंवा हाही विचार करायला हरकत नाही की, *जगातली सगळी माणसं जर १२ राशींमध्ये विभागली गेली असतील तर याचा अर्थ धनलाभांश हे त्या दिवशी जगातल्या १/१२ लोकांचं भविष्य आहे. म्हणजे जगाच्या लोकसंख्येमधील त्या १/१२ व्यक्तींनी जर त्या दिवशी लॉटरीचं तिकिट काढलं किंवा शेअर्स घेतले, तर त्यांना धनाचा लाभ व्हायला पाहिजे. असं सरसकट काही घडत नसतं. हे आपण सारासार बुद्धीनं देखील समजू शकतो. पण ही सारासार बुद्धी आपण सामान्यपणे वापरत नाही.*_

_*आकाशातून ग्रहगोलांची येणारी किरणं ही जर आईच्या गर्भावर परिणाम करणार असतील तर आपण हा सारासार बुद्धीचा विचार करत नाही की, 'ही किरणं एवढी प्रचंड अशा अवकाश पोकळीतून येतात. १०-१२ मजली इमारतीच्या सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबमधून येतात. ती गरोदरबाई तिच्या खोलीमध्ये येतात. परंतु त्या गरोदर बाईच्या चार इंच जाडीच्या पोटाच्यामधील बालकाच्यावर परिणाम टाकण्यासाठी मात्र ती खोळंबून राहतात. आणि फक्त ते बालक ज्यावेळेला बाहेर येतं, त्यावेळेला ती परिणाम टाकू शकतात!' हे कसे? या सगळ्यामध्ये काहीच तर्क सुसंगती नाही, हे आपल्या लगेच लक्षात येईल. परंतु तरी देखील आपण विचारच करत नसल्यामुळं आपल्याला याच्यामधली विसंगती जाणवत नाही.* आता तुम्हांला माहीत आहे की, अंटार्किटकाला सहा महिने रात्र असते आणि ६ महिने दिवस असतो. याचा अर्थ असा की, अंटार्किटकावर आजच मानवी वस्ती थोड्या प्रमाणामध्ये शास्त्रज्ञांनी केलेली आहे. अनेक देशांचे तिथं १२ महिने तळ असतात, ज्यावेळी *अंटाक्टिकावर पूर्ण अंधार असलेल्या सहा महिन्यांच्या काळामध्ये एखादी माता प्रसूत होईल, त्यावेळी तिच्या बालकाला भविष्य असेल की नसेल? चंद्रावर माणूस पोचलेला आहे. कधी ना कधी माणूस चंद्रावर वसाहती करेल आणि चंद्रावर ज्यावेळी पहिली स्त्री प्रसूत होईल, त्यावेळेला तिच्या पत्रिकेमध्ये चंद्र कुठं लिहिला जाईल? हे प्रश्न देखील आपल्याला सुचत नाहीत किंवा जर सुचले तर आपल्याला पटत नाहीत.*_

*_क्रमशः_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*

*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २५/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Tuesday, 24 December 2024

एक अन्य प्रचलित कर्मकांड नदी-स्नान

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_एक कर्मकांड नदी-स्नान_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_15.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_नदी-स्नानाने सारे पाप धुतले जाते. भगवानांजवळ बसलेल्या सुंदरिक भारव्दाज ब्राम्हणाने जेव्हा भगवानांना हे म्हटले "काय आपण गौतम! स्नानासाठी बाहुका नदीवर याल ?"_

_"ब्राम्हण ! बाहुका नदीपासून काय घेणे आहे? बाहुका नदी काय करेल?"_

_"हे गौतम! बाहुका नदी लोकमान्य आहे. खूप लोकांव्दारे पवित्र मानली जाते. पुष्कळसे लोक बाहुका नदीत आपल्या केलेल्या पापांना वाहवून देतात."_

_तेव्हा भगवानांनी सुंदरिक भारद्वाज ब्राम्हणाला म्हटले *"बाहुका, गया व सुंदरिकात; सरस्वती, प्रयाग व बाहुमती नदीत; काळे कर्म करणाऱ्या मूढ व्यक्तीने जरी रोज स्नान केले, तरी शुद्ध होऊ शकत नाही. काय करेल सुंदरिका, काय करेल बाहुका नदी, आणि काय करेल प्रयाग? त्या पापकर्मी दुष्ट व्यक्तीला शुद्ध करू शकत नाहीत. शुद्ध कर्म करणाऱ्यासाठी नेहमीच फाल्गुन आहे. शुद्ध कर्म करणाऱ्याचे व्रत नेहमीच पूर्ण होते. ब्राम्हणा! शुद्ध कर्म करतच स्रान कर! साऱ्या प्राण्यांचे भले कर. जो व्यक्ती खोटे बोलत नाही, कोणत्याही प्राण्याची हत्या करीत नाही, दिल्याविना काही घेत नाही, जो श्रद्धावान मत्सररहित आहे. तो गयेवर जाऊन काय करेल ? छोटा जलाशयही त्याच्यासाठी गयेसमान आहे."*_

_भगवानांची ही कल्याणी शिकवण त्यांच्या जीवनकाळातच साधकात प्रचलित झाली होती आणि शतकांपर्यंत संतांना प्रोत्साहित करीत राहिली. तेव्हाच समाजात ही म्हण प्रचलित झाली -_

*_जब मन चंगा, तो कठौती में गंगा।_*

*_दासी पूर्णा_*

_*पूर्णा प्रसिद्ध श्रेष्ठी अनाथपिंडिकाची विकत घेतलेली दासी होती आणि भगवान बुद्धांची अनुयायीही.* कडाक्याच्या थंडीत सकाळी-सकाळी पाणी भरण्यासाठी तिला नदीत उतरावे लागत असे. एका दिवशी तिने पाहिले की एक ब्राम्हण त्या कडाक्याच्या थंडीत नदीत उतरून थंड पाण्यात बुड्या मारीत होता. विचारल्यावर त्याने उत्तर दिले-_

_*-ह्या स्नानामुळे पूर्वी केलेली सर्व पाप-कर्म धुतली जातील.* ह्यावर पूर्णा दासीने ब्राम्हणाला समजावित म्हटले-_

_-अरे, असे कोणी म्हटले? हा तर कोण्या अज्ञानीव्दारे कोण्या अज्ञानीला दिला गेलेला उपदेश आहे._

_*-जर पाण्याने केलेल्या स्नानाव्दारे केली गेलेली सर्व पाप-कर्म धुतली जात असतील आणि त्यामुळे विमुक्ती मिळत असेल तर हे सारे बेडूक, कासव, पाण्यातील साप, मासोळ्या आणि मगर इत्यादी जलचर निश्चित रूपाने पापमुक्त होऊन स्वर्गगामी होत असतील.*_

_ती पुढे म्हणाली *जर नदी स्नानाने पाप-मुक्ती होत असेल तर मग मेंढी-बकऱ्या, डुक्कर आणि कोंबड्यांना मारून त्यांचे मांस विकणारा कसाई व कोळी, चोर, डाकू, लुटारू आणि अन्य पापी लोक पाप-कर्म करून काय नदीत खान करून पापमुक्त होतात?*_

_*जर असे मानले तर त्यांना पाप-कर्म करण्याचे प्रोत्साहनच मिळेल.* हे ऐकून ब्राम्हणाला शुद्ध आली आणि तो पाप-कर्मापासून दूर राहून सन्मार्गावर लागला. *भगवानांच्या ह्या शिकवणुकीच्या संपर्कात जो आला त्याने हे उत्तमरित्या जाणले की आपल्या पाप-कर्माना धुण्यासाठी केवळ एकच रस्ता आहे आणि तो आहे काया, वाणी व चित्ताने मौन राहून विपश्यना साधनेव्दारे आपल्या अंतरंगातील धर्माच्या गंगेत बुडी मारणे.*_

_*ह्या प्रकारे आपल्या अंतरंगातील धर्मगंगेत बुडी मारणारी व्यक्ती आपल्या काया, वाणी आणि चित्ताला नितांत शुद्ध करून घेते आणि आपल्या साऱ्या पापांना वाहवून देते. हेच आपल्या आतील खरे धर्म-स्नान आहे. ह्यामुळेच कोणीही व्यक्ती शुद्ध ब्राम्हण बनते.*_

_भगवानांच्या ह्या शिकवणूकीला ऐकून समजून आणि अभ्यास करून शुद्ध झालेल्या ब्रम्हबंधूने म्हटले *"आतापर्यंत तर मी केवळ नावाचाच ब्राम्हण होतो. आता खरोखर पापमुक्त ब्राम्हण झालो आहे."*_

_या साधकांनो! आम्हीही ह्या मिथ्या मान्यतांना त्यागून त्याच प्रकारे चित्ताला शुद्ध करू, आपला इहलोक व परलोक सुधारू आणि खरोखर आपले मंगल साधू, कल्याण साधू !_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २५/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

मंगलमयी गृही आचार संहिता

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_मंगलमयी गृही आचार संहिता_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_59.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_नमस्कार कोणाला करावा?_*

_राजगृहाचा श्रेष्ठीपुत्र सिगाल सकाळी उठून नगराच्या बाहेर गेला. ओल्या वस्त्रांनी व ओल्या केसांनी पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर, खाली व वर सहा दिशांना हात जोडून-जोडून नमस्कार करू लागला. त्या दिवसांच्या अनेक पूजा-विधी व कर्मकांडांपैकी हे ही एक होते. त्याच वेळी भगवान वेळुवन विहारातून बाहेर पडून राजगृह नगरात भिक्षाटणासाठी निघाले. रस्त्यात श्रेष्ठीपुत्र सिगालला सहा दिशांना नमस्कार करतांना पाहिले व विचारले "गृहपती-पुत्र! हे काय करीत आहेस ?"_

_सिगालने उत्तर दिले "भंते भगवान! दिशांना नमस्कार करीत आहे. माझ्या वडिलांनी मरतांना आदेश दिला होता की दिशांना नमस्कार अवश्य केला पाहिले. ह्यामुळे सुख-शांती मिळेल. म्हणून वडिलांच्या अंतिम आदेशाचे पालन करीत आहे."_

*_भगवान म्हणाले "गृहपती-पुत्र ! आर्यधर्मात ह्या प्रकारे सहा दिशांना नमस्कार केला जात नाही."_*

_"चांगले होईल भगवान, कृपया मला आर्यधर्माचे ज्ञान सांगा." श्रेष्ठीपुत्र सिगालच्या प्रार्थनेमुळे भगवानांनी त्याला समजाविले -_

*_वास्तविक सहा दिशा_*

_भगवानांनी श्रेष्ठीपुत्र सिगालला आर्यधर्मातील सहा दिशांना नमस्कार करण्याची खरी विधी शिकविली समजाविली. कोणी व्यक्ती कोणत्या प्रकारे सहा दिशांना धर्माने आच्छादित करून म्हणजे धर्मपूर्वक जीवन जगून ह्यांच्याप्रती आपली सुरक्षा स्थापित करते._

*_सहा दिशा काय आहेत?_*

_*आई-वडिलांना पूर्व दिशा, आचार्यांना दक्षिण दिशा, पुत्र-पत्नीला पश्चिम दिशा, मित्र-सहकाऱ्यांना उत्तर दिशा, नोकर चाकरांना खालची दिशा आणि श्रमण-ब्राह्मणांना वरची दिशा समजली पाहिले.*_

१. *आई-वडिलांची सेवा*

_पुत्राला पाच प्रकारे आई-वडिलांची सेवा केली पाहिजे._ 

१. ह्यांनी माझे पालन-पोषण केले आहे, म्हणून मला ह्यांचे पालन-पोषण केले पाहिजे. 

२. ह्यांनी माझ्याप्रती कर्तव्य पूर्ण केले आहे. मलाही ह्यांच्याप्रती आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. 

३. ह्यांनी कुल-वंश कायम ठेवला आहे, मलाही कुल-वंश कायम ठेवला पाहिजे. 

४. ह्यांनी मला वारसा-धन दिले आहे. मलाही उचित वारसा-धन उत्पन्न केले पाहिजे. 

५. मृत पितरांच्या पुण्यार्थ श्रद्धापूर्वक दान दिले पाहिजे. 

_ह्या पाच प्रकाराने पूजित आई-वडील पुत्रावर पाच प्रकाराने अनुकंपा करून त्याचे भविष्य उज्ज्वल करतात._ 

१. त्याला पाप-कर्मापासून वाचवितात. 

२. त्याला पुण्य-कर्मात लावतात. 

३ त्याला शिल्प (उद्यम) शिकवितात. 

४. योग्य जीवन संगिनीशी त्याचा संबंध करवितात. 

५. योग्य वेळी वारसा धन देतात. 

_ह्या वरील पाच प्रकाराने सेवित होऊन पूर्व दिशा रूपी आई-वडील पुत्रावर पाच प्रकाराने अनुकंपा करतात. ह्या प्रकारे पूर्व दिशा गृहस्थांसाठी योगक्षेमपूर्ण होते._

२. *आचार्यांची सेवा*

_शिष्याला पाच प्रकाराने आचार्यांची सेवा केली पाहिले._ 

१. आचार्यांच्या पूर्वी तत्परतापूर्वक उठून 

२. आवश्यकतेच्या वेळी उपस्थित राहून, 

३. सेवा-सुश्रूषा करून. 

४. सत्संग करून, 

५. सत्कारपूर्वक विद्या शिकून. 

_ह्या पाच प्रकाराने सेवित आचार्य शिष्यांवर पाच प्रकाराने अनुकंपा करतात._ 

१. त्याला सुविनीत वनवितात, 

२. त्याला उत्तम प्रकारे सुशिक्षा ग्रहण करणे शिकवितात. 

३. विद्या, शिल्प लुप्त होऊ नये, ह्या योग्य पात्राव्दारे कायम रहावे, ह्या उद्देशाने त्याला चांगल्या प्रकारे शिकवितात. 

४. मित्र-सहचरात त्याची प्रशंसा करून त्याला प्रोत्साहन देतात. 

५. प्रत्येक दिशेत सुरक्षित राहू शकण्याच्या अनुकूल त्याला प्रशिक्षित करतात. 

_ह्या वरील पाच प्रकाराने शिष्याव्दारे सेवित होऊन दक्षिण दिशा रूपी आचार्य त्याच्यावर पाच प्रकाराने अनुकंपा करतात. ह्या प्रकारे दक्षिण दिशा त्याच्यासाठी योगक्षेमपूर्ण होते._

३. *पत्नीची सेवा*

_पतीला पाच प्रकाराने पत्नीची सेवा केली पाहिजे._ 

१. तिचा सन्मान करून, 

२. तिला अपमानित न करून. 

३. व्यभिचार न करून, 

४. तिला ऐश्वर्य-प्रभुत्व प्रदान करून, 

५. तिला अलंकार-आभूषणाने सजवून 

_ह्या प्रकाराने सेवित पत्नी पाच प्रकाराने पतीवर अनुकंपा करते._

१. गृह-संचलनाचे कर्तव्य उत्तम प्रकाराने पूर्ण करते. 

२-३. स्वजन-परिजन, नोकर-चाकरांना उत्तम प्रकारे प्रसन्न-संतुष्ट ठेवते. 

४. व्यभिचारिणी होत नाही. 

५. सर्व घरगुती कामात आळस न करता दक्ष राहते. 

_ह्या वरील पाच प्रकाराने सेवित झाल्यावर पश्चिम दिशा रूपी पत्नी पतीवर पाच प्रकाराने अनुकंपा करते व अशा प्रकारे पश्चिम दिशा त्याच्यासाठी योगक्षेमपूर्ण होते._

४. *मित्राची सेवा*

_पाच प्रकाराने मित्राची सेवा केली पाहिजे._

१. त्याला देऊन, 

२. गोड बोलून, 

३. चांगले करून, 

४. समानतेचा भाव प्रकट करून, 

५. वचन पालनाव्दारे विश्वास उत्पन्न करून, 

_ह्या पाच प्रकाराने सेवित होऊन मित्र बदल्यात कुलपुत्रावर पाच प्रकाराने अनुकंपा करतात._

१. प्रमादी झाल्यावर त्याची सुरक्षा करतात, 

२. प्रमत्त झाल्यावर त्याच्या धनाची रक्षा करतात, 

३. संकटाच्या वेळी त्याला शरण देतात, 

४. विपत्तीत त्याला साथ देतात, 

५. त्याच्या परिवाराच्या अन्य लोकांचाही आदर करतात. 

_ह्या वरील पाच प्रकाराने सेवित होऊन उत्तर दिशा रूपी मित्र बदल्यात त्याच्यावर पाच प्रकाराने अनुकंपा करतात. ह्या प्रकारे उत्तर दिशा त्याच्यासाठी योगक्षेमपूर्ण होते._

५. *नोकरांची सेवा*

_पाच प्रकाराने मालकाने नोकर-चाकरांची सेवा केली पाहिजे._ 

१. त्याला त्याच्या शक्तीच्या अनुकूल काम देऊन, 

२. त्याला भोजन, वेतन देऊन, 

३. रोगी झाल्यावर त्याची सुश्रूषा करून, 

४. उत्तम स्वादिष्ट भोजनात त्याला साथी बनवून, 

५. त्याला वेळेवर सुटी देऊन. 

_ह्या पाच प्रकाराने सेवित होऊन सेवक मालकावर पाच प्रकाराने अनुकंपा करतात._

१. मालकाच्या पूर्वी उठून आवश्यकतेच्या वेळी उपस्थित राहातात, 

२. उशिरा झोपणारे होतात, 

३. चोरी करीत नाहीत. दिलेलेच घेतात, 

४. कामांना चांगल्या प्रकारे करणारे होतात, 

५. यश-किर्ती पसरविणारे होतात. 

_ह्या वरील पाच प्रकाराने सेवित होऊन खालील दिशा रूपी नोकर-चाकर मालकावर पाच प्रकाराने अनुकंपा करतात. ह्या प्रकारे खालची दिशा त्याच्यासाठी योगक्षेमपूर्ण होते._

६. *श्रमण-ब्राम्हणाची सेवा*

_कुल-पुत्राला पाच प्रकाराने श्रमण-ब्राम्हणाची सेवा केली पाहिजे._

१. मैत्रीभावपूर्ण शारीरिक कर्माने, 

२. मैत्रीभावपूर्ण वाचिक कमनि. 

३. मैत्रीभावपूर्ण मानसिक कमनि, 

४. मनःपूर्वक स्वागत करून, 

५. लोकीय आवश्यकतांची पूर्ती करून. 

_ह्या पाच प्रकाराने सेवित झाल्यावर श्रमण-ब्राम्हण सहा प्रकाराने कुल-पुत्रांवर अनुकंपा करतात._ 

१. पाप कर्मापासून वाचवितात, 

२. कुशल कर्मात लावतात, 

३. कल्याणाची इच्छा ठेऊन अनुकंपा करतात, 

४. अश्रुत धर्म ऐकवितात, 

५. ऐकलेल्या धर्माचे शुद्धीकरण करून पुष्ट करतात. 

६. सद्गतीचा मार्ग सांगतात. 

_ह्या वरील पाच प्रकाराने सेवित झाल्यावर वरील दिशा रूपी श्रमण-ब्राम्हण, संत सद्‌गृहस्थावर सहा प्रकाराने अनुकंपा करतात. ह्या प्रकारे वरील दिशा त्याच्यासाठी योगक्षेमपूर्ण होते._

_*कोणी सद्‌गृहस्थ सद्धर्माच्या ह्या आचार संहितेला धारण करून, सहा दिशांपासून सुरक्षित आणि भयमुक्त होतो. भगवानांचा हा उपदेश ऐकून श्रेष्ठीपुत्र सिगाल प्रसन्न झाला. परंपरेमुळे जडता धारण केलेल्या निष्याण रूढींपासून मुक्ती पावून सद्धर्माच्या जीवंत व्यवहार-पथावर चालून आपला इहलोक व परलोक दोन्ही सुधारू शकला.*_

_*श्रेष्ठीपुत्र सिगालच्या प्रार्थनेमुळे त्या वेळी भगवानांनी जे उपदेश दिले ते केवळ सिगालसाठीच नाहीत, तर सर्व गृहस्थांसाठी अत्यंत कल्याणकारी आहेत. गृहस्थांसाठी ही आचार-संहिता शुद्ध आर्यधर्मासारखी सार्वजनिक आहे, सार्वदेशिक आहे, सार्वकालिक आहे. आजच्या कोणत्याही सद्‌गृहस्थासाठी तेवढीच उपयुक्त आहे, जेवढी २६०० वर्षापूर्वी सिगालसाठी होती.*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २५/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...