✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_एक कर्मकांड नदी-स्नान_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_15.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
_नदी-स्नानाने सारे पाप धुतले जाते. भगवानांजवळ बसलेल्या सुंदरिक भारव्दाज ब्राम्हणाने जेव्हा भगवानांना हे म्हटले "काय आपण गौतम! स्नानासाठी बाहुका नदीवर याल ?"_
_"ब्राम्हण ! बाहुका नदीपासून काय घेणे आहे? बाहुका नदी काय करेल?"_
_"हे गौतम! बाहुका नदी लोकमान्य आहे. खूप लोकांव्दारे पवित्र मानली जाते. पुष्कळसे लोक बाहुका नदीत आपल्या केलेल्या पापांना वाहवून देतात."_
_तेव्हा भगवानांनी सुंदरिक भारद्वाज ब्राम्हणाला म्हटले *"बाहुका, गया व सुंदरिकात; सरस्वती, प्रयाग व बाहुमती नदीत; काळे कर्म करणाऱ्या मूढ व्यक्तीने जरी रोज स्नान केले, तरी शुद्ध होऊ शकत नाही. काय करेल सुंदरिका, काय करेल बाहुका नदी, आणि काय करेल प्रयाग? त्या पापकर्मी दुष्ट व्यक्तीला शुद्ध करू शकत नाहीत. शुद्ध कर्म करणाऱ्यासाठी नेहमीच फाल्गुन आहे. शुद्ध कर्म करणाऱ्याचे व्रत नेहमीच पूर्ण होते. ब्राम्हणा! शुद्ध कर्म करतच स्रान कर! साऱ्या प्राण्यांचे भले कर. जो व्यक्ती खोटे बोलत नाही, कोणत्याही प्राण्याची हत्या करीत नाही, दिल्याविना काही घेत नाही, जो श्रद्धावान मत्सररहित आहे. तो गयेवर जाऊन काय करेल ? छोटा जलाशयही त्याच्यासाठी गयेसमान आहे."*_
_भगवानांची ही कल्याणी शिकवण त्यांच्या जीवनकाळातच साधकात प्रचलित झाली होती आणि शतकांपर्यंत संतांना प्रोत्साहित करीत राहिली. तेव्हाच समाजात ही म्हण प्रचलित झाली -_
*_जब मन चंगा, तो कठौती में गंगा।_*
*_दासी पूर्णा_*
_*पूर्णा प्रसिद्ध श्रेष्ठी अनाथपिंडिकाची विकत घेतलेली दासी होती आणि भगवान बुद्धांची अनुयायीही.* कडाक्याच्या थंडीत सकाळी-सकाळी पाणी भरण्यासाठी तिला नदीत उतरावे लागत असे. एका दिवशी तिने पाहिले की एक ब्राम्हण त्या कडाक्याच्या थंडीत नदीत उतरून थंड पाण्यात बुड्या मारीत होता. विचारल्यावर त्याने उत्तर दिले-_
_*-ह्या स्नानामुळे पूर्वी केलेली सर्व पाप-कर्म धुतली जातील.* ह्यावर पूर्णा दासीने ब्राम्हणाला समजावित म्हटले-_
_-अरे, असे कोणी म्हटले? हा तर कोण्या अज्ञानीव्दारे कोण्या अज्ञानीला दिला गेलेला उपदेश आहे._
_*-जर पाण्याने केलेल्या स्नानाव्दारे केली गेलेली सर्व पाप-कर्म धुतली जात असतील आणि त्यामुळे विमुक्ती मिळत असेल तर हे सारे बेडूक, कासव, पाण्यातील साप, मासोळ्या आणि मगर इत्यादी जलचर निश्चित रूपाने पापमुक्त होऊन स्वर्गगामी होत असतील.*_
_ती पुढे म्हणाली *जर नदी स्नानाने पाप-मुक्ती होत असेल तर मग मेंढी-बकऱ्या, डुक्कर आणि कोंबड्यांना मारून त्यांचे मांस विकणारा कसाई व कोळी, चोर, डाकू, लुटारू आणि अन्य पापी लोक पाप-कर्म करून काय नदीत खान करून पापमुक्त होतात?*_
_*जर असे मानले तर त्यांना पाप-कर्म करण्याचे प्रोत्साहनच मिळेल.* हे ऐकून ब्राम्हणाला शुद्ध आली आणि तो पाप-कर्मापासून दूर राहून सन्मार्गावर लागला. *भगवानांच्या ह्या शिकवणुकीच्या संपर्कात जो आला त्याने हे उत्तमरित्या जाणले की आपल्या पाप-कर्माना धुण्यासाठी केवळ एकच रस्ता आहे आणि तो आहे काया, वाणी व चित्ताने मौन राहून विपश्यना साधनेव्दारे आपल्या अंतरंगातील धर्माच्या गंगेत बुडी मारणे.*_
_*ह्या प्रकारे आपल्या अंतरंगातील धर्मगंगेत बुडी मारणारी व्यक्ती आपल्या काया, वाणी आणि चित्ताला नितांत शुद्ध करून घेते आणि आपल्या साऱ्या पापांना वाहवून देते. हेच आपल्या आतील खरे धर्म-स्नान आहे. ह्यामुळेच कोणीही व्यक्ती शुद्ध ब्राम्हण बनते.*_
_भगवानांच्या ह्या शिकवणूकीला ऐकून समजून आणि अभ्यास करून शुद्ध झालेल्या ब्रम्हबंधूने म्हटले *"आतापर्यंत तर मी केवळ नावाचाच ब्राम्हण होतो. आता खरोखर पापमुक्त ब्राम्हण झालो आहे."*_
_या साधकांनो! आम्हीही ह्या मिथ्या मान्यतांना त्यागून त्याच प्रकारे चित्ताला शुद्ध करू, आपला इहलोक व परलोक सुधारू आणि खरोखर आपले मंगल साधू, कल्याण साधू !_
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २५/१२/२०२४
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment