✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_वास्तविक आरोहण व अवरोहण_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_27.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
_*त्या काळी समाजात अशी मान्यता होती की शारीरिक कष्ट भोगूनच व्यक्ती वाईट कर्माच्या फळांपासून. विकारांपासून मुक्त होऊ शकते आणि मृत्युनंतर उच्च लोक प्राप्त करू शकते.*_
_पूर्वी केलेल्या दुष्कर्माच्या फळरूपात आम्हाला अनेक प्रकारच्या शारीरिक यातनांना भोगावे लागते आणि ह्या जन्मात माझ्यात कष्ट झेलण्याची क्षमता आहे तर त्यांना आत्ताच का भोगू नये? त्यासाठी ते दिर्घकाळापर्यंत उपवास करून शरीराला उपाशी ठेवत असत व अनेक प्रकाराने दंडित करीत असत. कदाचित हा विचार करून की बऱ्याच काळापर्यंत अशा यातनांना इथेच भोगल्यावर त्या पूर्वीच्या दुष्कर्माचे दुष्फळ भोगण्यापासून मुक्ती मिळेल आणि मृत्युनंतर उच्च लोक प्राप्त होईल._
_भगवानांच्या जीवनकाळात लोक काट्यांवर झोपत असत, दिर्घ उपवास करीत असत, ग्रीष्म ऋतूत सावलीविना उघड्या उन्हात झोपत असत, शीतकाळात अंथरूण-पांघरूणाशिवाय उघड्या जागी थंडीत कुडकुडत असत. हे सर्व यासाठी करीत असत की पुढे जाऊन ह्या कष्टांमधून जावे लागू नये._
_शरीराला दंडित करण्याव्यतिरिक्त अजूनही अनेक प्रकारची कर्मकांड चालत असत. काही लोकांची मान्यता होती की अग्निपूजेमुळे माझी उन्नती होईल, अवनती होणार नाही. अधोगतीच्या अवरोहणापासून वाचण्यासाठी विशिष्ट वेळी अग्नीची पूजा केली जात होती. जमिनीला ओल्या शेणाने सारवून, त्यावर कुश नावाचे हिरवे गवत पसरवून, डोक्यावरुन स्नान करून, नवीन रेशमी वस्त्र घालून, त्या रात्री अग्निकुंड आणि घराच्या मध्ये त्याच जमिनीवर झोपत असत. रात्री तीनदा उठून अग्नीला हात जोडून, नमस्कार करून प्रार्थना करीत असत की आम्ही आपल्या प्रती आरोहण करतो. अर्थात भविष्यात आमचे अवरोहण न होवो, आरोहणच होवो. अधोगती न होवो, ऊर्ध्वगतीच होवो. ह्या कर्मकांडाला पूर्ण करतांना अग्नीला खूपसे तूप, तेल, लोणी इत्यादी अर्पण करीत असत. ती रात्र संपल्यावर ब्राम्हणांना स्वादिष्ट भोजन करवीत असत आणि समजत असत की ह्यामुळे आमचे आरोहणच होवो, ऊर्ध्वगतीच होवो._
_*परंतु भगवानांनी समजविले की एखाद्या कर्मकांडाद्वारे भविष्याची अधोगती म्हणजे अवरोहणापासून सुटका मिळेल हे असंभव आहे.* म्हणूनच त्यांनी आरोहण म्हणजे ऊर्ध्वगतीसाठी शुद्ध धर्माचे पालन करणे शिकविले-_
_*आर्य-श्रावक ह्या प्रकारे विचार करतो की प्राणी-हिंसा करणे, चोरी करणे, खोटे बोलणे, चुगली करणे, व्यर्थ बडबड करणे, कठोर, कटू वचन बोलणे, लोभ, द्वेष व मिथ्या कर्मकांड इत्यादी करण्यामुळे ह्या लोकात व परलोकात दोन्हीकडे वाईटच परिणाम होतो. ह्या दुष्कर्मामुळे माझे भविष्य बिघडतेच. त्यामुळे तो ह्या सर्व दुष्कर्माना त्यागून शुद्ध धर्माचे जीवन जगतो आणि आपले इहलोक व परलोक दोन्ही सुधारतो. असे करण्यामुळे त्याचे अवरोहण होत नाही, अधोगती होत नाही, तर आरोहणच होते, ऊर्ध्वगतीच होते.*_
_ह्याच प्रकारे अजून एक कर्मकांड चालत होते. वेळेवर उठून खाटेवर बसूनच पृथ्वीला स्पर्श करणे, ओल्या शेणाला स्पर्श करणे, हिरव्या गवताला स्पर्श करणे, अग्नीची परिचर्या करणे, दिवस उजाडल्यावर हात जोडून सूर्याला नमस्कार करणे, दिवसात तीनदा पाण्यात उतरणे इत्यादी. ही मान्यता चालत येत होती की असे करण्यामुळे चित्ताची शुद्धी होते, शुचिता होते._
_भगवानांनी समजविले की जेव्हापर्यंत कोणी व्यक्ती शरीराने होणाऱ्या ह्या तीन प्रकारच्या अशुद्धीत लागलेली असते तेव्हापर्यंत ती चित्ताच्या शुचितेपासून, शुद्धींपासून खूपच दूर राहते._
१. _जर तो प्राणी-हिंसेत रत राहतो, प्राण्यांप्रती सर्वस्वी निर्दयी राहतो, त्यांना मारून टाकण्यात लागलेला राहतो, लोभी असतो, रत्कपाती असतो._
२. _दुसऱ्यांची वस्तू मग ती गावातील असो वा जंगलातली त्याची चोरी करणारा असतो._
३. _काम-भोगासंबंधी मिथ्याचरण करणारा असतो. तो कोणत्याही स्त्रिचा भोग घेणारा असतो, जरी ती त्याच्या आईच्या घरची असेल, वडिलांच्या घरची असेल, भावाच्या घरची असेल, बहिणीच्या घरची असेल, नातेवाईकाच्या घरची असेल; जरी तिचा कोणाशी विवाह झाला असेल अथवा ती धंदेवाईक नाचणारी का असेना. ह्यापैकी कोणाशीही व्यभिचार करीत असेल, तर या तिन्ही शारीरिक कर्माच्या अशुद्धी आहेत, अशुचिता आहेत._
*_ह्याच प्रकारे वाणीच्या कर्मांच्या चार अशुद्धी असतात -_*
१. _खोटे बोलणारा असतो, सभेत, परिषदेत, भाऊ-बंदात, पंचायतीत, राजसभेत ह्यापैकी कोणतीही जागा असो, जेथे त्याची साक्ष विचारली जाते की जे जाणता ते खरे-खरे सांगा, हुबेहूब सांगा. न जाणतांनाही तो सांगतो की जाणतो अथवा जाणत असतांनाही सांगतो की जाणत नाही. तो पाहिले नसतांनाही सांगतो की पाहिले आहे आणि पाहिले असतांनाही सांगतो की पाहिले नाही. आपल्या अथवा दुसऱ्याच्या एखाद्या लौकिक वस्तूसाठी खोटे बोलतो._ ह्याच प्रकारे
२. _चुगली करणारा असतो,_
३. _कठोर वचन बोलणारा असतो आणि_
४. _व्यर्थ बोलणारा असतो, तेव्हा ह्या चारही त्याच्या वाणीच्या अशुद्धीच आहेत, अशुचिताच आहेत._
_*असेच मनाच्या कर्माच्या तीन प्रकारच्या अशुद्धी असतात.*_
१. _कोणी व्यक्ती मनाच्या स्तरावर लोभी असते. दुसऱ्यांचे धन आहे. दुसऱ्यांच्या वस्तू आहेत त्याला हस्तगत करू इच्छिते - कशा प्रकारे दुसऱ्यांची वस्तू माझी होईल._
२. _तो मनाने द्वेषयुक्त असतो, मनाने दुष्ट संकल्पी असत्तो. तो दुष्ट मनाने विचार करतो की हे प्राणी बांधले जावेत, विनाशाला प्राप्त होवोत, मारले जावोत, नष्ट होवोत._
३. _त्याचे मानस मिथ्या-दृष्टी असणारे असते, उल्टी-दृष्टी असणारे असते. तो सत्याला समजू शकत नाही आणि म्हणतो की दानाचे कोणतेही फळ नाही, यज्ञ नाही, होम नाही, चांगल्या-वाईट कर्माचे फळ नाही, हा लोक नाही, परलोक नाही, न माता आहे, न पिता आहे, न तो स्वतः उत्पन्न प्राणी आहे, न लोकात कोणी श्रमण आहे, न ब्राम्हण आहे, न कोणतेही सम्यक ज्ञान आहे, न कोणी सम्यक आचरण करणारे आहेत. तो असा मिथ्या भाव प्रकट करतो की परलोकात स्वतः जाऊन मी ह्या सत्याचा साक्षात्कार केला आहे._
*_हे सर्व चित्ताच्या अशुचितेच्या अंतर्गत येते, अशुद्धीच्या अंतर्गत येते._*
_*वस्तुतः खरी शुचिता वा शुद्धी तेव्हा होते जेव्हा कोणी व्यक्ती ह्या अकुशल कर्मापासून वाचून कुशल कर्मात प्रवृत्त होते. तेव्हा तो स्वतः उर्ध्वगतीचा अधिकारी होतो. अश्या लोकांचे आरोहणच होते, अवरोहण कधीही होत नाही.*_
_असेच अनेक प्रकारचे अंधविश्वास पसरलेले होते. काही लोक कदाचित हे मानत होते की माझ्या कर्मांनुसार भविष्यात मला कुत्र्याचे जीवन जगावे लागेल, त्यामुळे कुत्र्याचे कष्टमय जीवन आत्ताच का जगू नये? अशा प्रकारे तो कुत्र्याचे जीवन जगण्याचा निर्णय करायचा आणि कुत्र्याप्रमाणेच आचरण ठेवायचा. जमिनीवर फेकलेले भोजनच ग्रहण करायचा, नग्न राहायचा, कुत्र्याप्रमाणेच आकुंचन करून बसायचा, तसेच झोपायचा इत्यादी._
_असेच कदाचित कोणी हे समजून निर्णय करीत होता की माझ्यात कष्टमय जीवन जगण्याचे सामर्थ्य आहे आणि पुढे जाऊन मला पशुयोनीचे जीवन जगायचे आहे, तर ह्याच जीवनात गायीचे जीवन का जगू नये? आत्ताच सहन करून घेऊ ज्यामुळे मरणानंतर तसे दुःखद जीवन जगावे लागू नये. तशी अधोगती न भोगावी लागो. उलट उर्ध्वगतीच प्राप्त होवो. ह्यासाठी तो आपली सारी दैनिक जीवनचर्या गाईसारखीच करायचा. अनेक प्रकारचे कष्ट सहन करायचा._
_ह्या कशा मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. त्याला समजत नाही की आत्ता तर तो भोगतोच आहे व भविष्याच्या जीवनात ह्यापेक्षा अधिक भोगावे लागेल._
_*अशा लोकांचे भविष्य पाहून भगवानांनी समजविले की असे करण्यामुळे दुर्गतीच होते,* नारकीय जीवनच प्राप्त होते अथवा खरोखर पुढच्या जन्मी कुत्र्याचा अथवा गायीचा जन्म प्राप्त होतो आणि अपार कष्टांना सहन करावे लागते._
_अशी मिथ्या धारणा असणारी व्यक्ती जर असा विचार करेल की अधोगतीचे दुःखमय जीवन इथेच जगण्यामुळे मरणोपरांत देवलोकाची उर्ध्वगती प्राप्त करेल अथवा त्यापेक्षाही एखादी उंच गती प्राप्त करेल तर ही तिची खूप मोठी चूक आहे. भगवानांपासून हे ऐकून-समजून असे गोव्रतिक आणि कुक्कुरव्रतिक लोक रडू लागले की आमचे इतक्या दिवसांचे वर्तमान जीवन व्यर्थ गेले आणि भविष्यातही असे अधोगतीचे जीवन जगावेच लागेल. ह्यासंबंधी त्यांनी भगवानांना सत्य धर्म शिकविण्याचा आग्रह केला. ह्यावर भगवानांनी समजविले -_
_*मी ह्या चार कर्मांना स्वतः जाणून, अनुभव करून पाहिले की*_
१. _येथे ह्या जीवनात जर एखादे कार्य कृष्ण म्हणजे पापमय असले, तर त्याचे फळही पापमयच असते._
२. _जर एखादे कार्य शुक्ल म्हणजे कुशल असले तर त्याचे फळही कुशलच असते._
३. _काही कर्म कृष्ण-शुक्ल मिश्रित असले तर त्याचे फळही मिश्रितच असते._
४. _एक कर्म ते होते ज्याला न कृष्ण म्हटले जाऊ शकते न शुक्ल. ह्याच्या फळाचीही तीच स्थिती आहे. हे चवथ्या प्रकारचे कर्मच कर्म-क्षयात सहायक होऊ शकते._
_कोणते कर्म स्वतः कृष्ण आहे आणि कृष्ण फळच देणारे आहे? जेव्हा कोणी व्यक्ती समग्र शारीरिक कर्म दुसऱ्यांना पीडा देण्यासाठी करीत राहते, ह्याच प्रकारे समग्र वाणीचे कर्म, मनाचे कर्म दुसऱ्यांना पीड़ा देण्यासाठी करीत राहते तर ती मरणोपरांत पीडादायक लोकातच उत्पन्न होते आणि तिला अनेक प्रकारचे कष्टदायक तप्त-लोह-स्पर्श इत्यादी कष्टदायक शूलांचा स्पर्श भोगावाच लागतो. तिला ह्या नारकीच स्पर्शाचा अनुभव घ्यावाच लागतो._
_असेच जेव्हा कोणी व्यक्ती मन, शरीर आणि वाणीने चांगले कर्म करते, दुसऱ्यांना सुख पोहचविण्याचे कर्म करते, दुसऱ्यांच्या मंगलाचे भाव मनात येत राहातात, वाणीने द्वैषरहित चांगले वचन बोलून दुसऱ्यांना प्रसन्न करते, तर ती ह्या लोकातही सुख-शांतीचा अनुभव घेते आणि मृत्युनंतर परलोकातही द्वेषरहित सुखमय संवेदनांचाच अनुभव घेते._
_ह्याच प्रकारे कोणी द्वेषयुक्त आणि द्वेषरहित दोन्ही प्रकारचे मिश्रित कर्म करतो. तेव्हा तो येथेही दोन्ही प्रकारच्या संवेदनांचा अनुभव करतो आणि परलोकातही दोन्ही प्रकारच्या स्पर्शाचा अनुभव करतो._
_असेच अकृष्ण, अशुक्ल कर्म करणारी व्यक्ती सर्व प्रकारच्या कर्म-संस्कारांपासून मुक्त होते. तिचा पुन्हा पुनर्जन्म होत नाही._
_भगवानांच्या ह्या धर्मदेशनेमुळे त्या व्रतधारींचे व्रत सुटले आणि धर्ममार्गावर आरूढ होऊन, अभ्यास करीत-करीत भवमुक्त अवस्थेला प्राप्त झाले._
_या. साधकांनो! आम्हीही ह्या मिथ्या कर्मकांडाच्या मिथ्या मान्यतांच्या गुंत्यातून सुटून वास्तविक धर्ममय जीवन जगत आपले मंगल साधून घेऊ, कल्याण साधून घेऊ._
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २६/१२/२०२४
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment