Saturday, 28 December 2024

भगवान बुद्धांची सरळ शिकवण

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भगवान बुद्धांची सरळ शिकवण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_28.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹


_भगवान बुद्धांची सरळ, स्वच्छ आणि कल्याणकारी शिकवण उत्तर भारताच्या नगरात आणि गावात पसरू लागली. *भगवानांनी समजविले की अंधविश्वास आणि अंधमान्यतेमुळे धर्माचे सत्य समजत नाही, योग्य धर्माचे पालन होत नाही आणि त्यामुळे त्याचा कुशल परिणाम प्राप्त होत नाही.* भगवान जेव्हा केसमुत्तीला गेले तेव्हा तेथील निवासी कालामांना जो उपदेश दिला तो अनेकांना मान्य झाला. कारण त्यात कुठल्याही धोकेबाजीची शक्यता नव्हती._

_भगवानांनी स्पष्ट शब्दात म्हटले हे कालामो ! तुम्ही कोणत्याही बाबीला केवळ ह्यासाठी स्वीकारू नका की -_

१. ही बाब ऐकलेली आहे, म्हणजे वारंवार ऐकली आहे.

२. ही बाब परंपरागत आहे, म्हणजे परंपरेनी मानली जात आहे.

३. ही आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकूल आहे.

४. ही बाब तर्कसंगत आहे.

५. ही बाब न्यायसंगत आहे.

६. हिला सांगण्याची पद्धत सुंदर आहे.

७. ही आमच्या मतांच्या अनुकूल आहे.

८. सांगणाऱ्याचे व्यक्तित्व आकर्षक आहे. (हे म्हणणे विशेषता स्वतः त्यांच्यावर लागू होते.)

९. सांगणारा श्रमण आमचा पूज्य आहे. (हे कथनही विशेषता स्वतः त्यांच्यावर लागू होते.)

*_म्हणजे कोणाव्दारे सांगितली गेलेली अथवा कुठलीही ऐकलेली गोष्ट अंधविश्वास वा अंधश्रद्धेमुळे स्वीकारू नका._*

_*ज्या सत्त्याला तुम्ही आपल्या अनुभवामुळे जाणाल की ह्या-ह्या बाबी कुशल आहेत, निर्दोष आहेत, ह्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होते, आम्हाला सुख प्राप्त होते, त्याचाच स्वीकार करा.*_

_*जे सत्य आपल्या अनुभूतीव्दारे जाणले गेले आणि पाहिले की हे कुशल आहे, तेव्हा केवळ जाणूनच राहू नका, तर त्यानुसार चाला, त्यानुसार आचरण करा तरच कल्याण होईल.*_

_भगवानांची ही वाणी केवळ त्या कालामांनाच स्वीकृत झाली नाही, तर तिने अनेक लोकांना सत्याकडे चालण्यासाठी आकर्षित केले._

_माझा आपला अनुभव आहे. मी कट्टर हिंदू सनातनी घरात जन्मलो आणि वाढलो. बर्माच्या भारतीयांचा आणि विशेषता हिंदुंचा नेता होतो. मी भगवान बुद्धांना खूप पूज्य मानित होतो. त्यांच्या मंदिरात जाऊन नमनही करीत होतो. ते केवळ ह्यासाठी की भगवान बुद्धही विष्णुचे अवतार होते, म्हणजे ईश्वराचेच अवतार होते. परंतु सोबतच समाजात जी एक बहुप्रचलित मान्यता होती की ह्या अवतारात त्यांनी जे उपदेश दिले, ते केवळ दुर्जनांसाठी होते, ज्यामुळे त्यांचे पालन करून ते नरकगामी होवोत. म्हणून त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर आम्ही कधीही चालू नये._

_*जेव्हा विशिष्ट कारणामुळे मला वरील संकोचासह पूज्य गुरुदेव सयाजी ऊ बा खिनांच्या विपश्यना केंद्रात शिबिरासाठी जावे लागले. तेव्हा तेथे काही वेळ प्रतीक्षा करतांना टेबलावर ठेवलेली कालामसुत्ताची एक पुस्तिका माझ्या नजरेस पडली. मी ती उचलून वाचली. वाचल्यावर विश्वास झाला की येथे धर्माच्या नावावर गुरुबाजीचा प्रपंच नाही. ही व्यक्ती केवळ मानण्याला महत्व देत नाही आणि ह्या प्रकारे अंधविश्वास पसरवित नाही, तर सत्याला आपल्या अनुभूतिव्दारे जाणून त्या मार्गावर चालण्याला महत्व देते. त्यांच्या उपदेशात मला बुवाबाजीचा कोणताही धोका दिसला नाही. त्यामुळे आश्वस्त होऊन शिबिरात बसण्याचा निर्णय घेतला.*_

_*ह्यामुळे आम्ही समजू शकतो की भिन्न-भिन्न भ्रांतीत पडलेले अनेक लोक बुद्धांच्या वेळीही माझ्याच प्रमाणे त्यांच्या शिकवणुकीच्या सत्याला समजून त्यांचे अनुयायी झाले असतील.*_

_तरीही उत्तर भारताचे एवढे मोठे विशाल भूखंड आणि त्याची इतकी मोठी लोकसंख्या, जेथे अनेक प्रकारच्या अंधविश्वासांवर आणि अंधमान्यतांवर आधारित अनेक प्रकारचे कर्मकांडच प्रचलित होते. भगवानांच्या उपदेशामुळे त्यापैकी अनेक मिथ्या मान्यतांमध्ये सुधारणा झाली. जसे की मागील ३० सप्टेंबर, २०१२ च्या अंकातील सहा दिशांना नमस्कार करणाऱ्या श्रेष्ठीपुत्र सिगालची भ्रांती दूर होण्याचे वर्णन आहे._

_*कोण्या देवतेला भोजन चढविले जाते तेव्हा प्रश्न निर्माण होतो की जर दूरवर असणारा कोणी देवता ज्याचे अस्तित्व आहे की नाही, त्याला हे भोजन पोहचत असेल तर मग घरातून यात्रेसाठी निघालेल्या लोकांनी भोजन सोबत का न्यावे? घरातच त्यांच्यासाठी भोजनाचा भोग लावावा. ही बाब समजली तेव्हा ह्यातूनही लोक बाहेर निघाले.*_

_ह्याच प्रकारे उत्तर भारताचे कितीतरी लोक अंधविश्वासांशी जुळलेले होते. त्यापैकी काही बाहेर निघू शकले, काही बाहेर निघू शकले नाहीत आणि काही लोक आजपर्यंतही त्यालाच चिकटून आहेत._

*_अंधविश्वासाने बुद्धी नष्ट_*

_*जेव्हा कोणी अंधविश्वासात बुडलेला असतो तेव्हा सामान्य बुद्धिचाही प्रयोग करणे सोडून देतो. सोडले नाही तर स्वार्थ-निपुण पुरोहित 'शास्त्र-वचन' प्रमाणचे उदाहरण देऊन त्याला धमकी देतो की धर्माच्या क्षेत्रात कुतर्क करेल तर नरकगामी होईल. अंधविश्वासाला तोडणाऱ्या प्रत्येक तर्काला कुतर्क नाव दिले जाते. भयभीत मानव इतकेसे सत्यही समजू शकत नाही की जर जल-स्रानाने पाप-मुक्ती होत असेल तर बेडूक, मासोळ्या, कासव, मगर इत्यादी सर्व जलचरांची सद्गती निश्चित समजली पाहिजे. चोर, डाकू, लुटारू, हत्यारे, दुराचारी, व्यभिचारी आपले केलेले पाप जर नदीत वाहवून टाकत असतील तर निश्चित रूपाने स्वर्गाचे अधिकारी मानले पाहिजेत. धर्माच्या नावावर जेव्हा अशा मिथ्या मान्यता स्थापित होतात तेव्हा सदाचाराच्या ऐवजी दुराचाराला प्रोत्साहन मिळू लागते. मनुष्य आपले लोकही बिघडवितो आणि परलोकही. ह्या विपरीत जेव्हा धर्म आपल्या शुद्ध रूपात स्थापित होतो तेव्हा तो आपले लोकही सुधारतो आणि परलोकही._*

*_धम्मे च ये अरियप्पवेदिते रता, अनुत्तरा ते वचसा मनसा कम्मुना च।_*

*_ते सन्तिसोरच्चसमाधिसण्ठिता, वजन्ति लोकं दुभयं तथाविधा ।।_*

_*जे आर्याव्दारे प्रवेदित धर्मात निरत राहातात, ते श्रेष्ठ मन, वचन व कर्म असणारे, शांती, शील व समाधीत स्थित होण्यामुळे उत्तम कार्य करणारे होतात, (त्यामुळे) कुशल संयत जीवन जगतात आणि ह्या प्रकारे (मरणानंतर) दोनच गतींना प्राप्त होतात देव अथवा मनुष्य.*_

*_उष्ण देशात नदी-स्रान_*

_उष्ण देशात गरमी आणि घामामुळे वारंवार अस्वस्थ आणि अस्वच्छ होणाऱ्या शरीराला एखाद्या जवळच्या नदी व सरोवरात दिवसातून एक, दोन अथवा तीनदा स्नान घालने समजू शकते. परंतु ह्याला एक कर्मकांड बनवून धर्मासोबत जोडणे व ह्या स्नानाने पापकर्म धुतले जाण्याची मिथ्या मान्यता स्थापित करणे, कर्म सिद्धांतावर आधारित शुद्ध धर्माला दूषित करणेच आहे._

_दुर्बल मानव ह्या हीनग्रंथीने ग्ररत राहतो की तो आपल्या स्वतःच्या बळावर ध्यान साधनेव्दारे आपल्या पूर्वकृत दुष्कर्माच्या मळाचे प्रक्षालन करू शकत नाही. त्याची ही हीनग्रंथी कोण्या अशा पुरोहिताव्दारे पुष्ट केली जाते की ज्याने धर्माला आपल्या आजीविकेचे साधन बनविले आहे. असा पुरोहित आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी यजमानाला मिथ्या आश्वासन देतो की येथे स्रान करण्यामुळे ह्या नदीची अमुक देवी अथवा ह्या जलाशयाचा अमुक देवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला साऱ्या पापकर्मातून मुक्त करेल. व्याकुळ चित्त असणाऱ्या दुर्बळ मानवाला हे आश्वासन खूप प्रिय वाटले आणि तो ह्या कर्मकांडालाच सद्धर्म मानतो. ही अंधमान्यता सहजपणे समाजात पसरत जाते आणि पिढ्यान् पिढ्या आपले अस्तित्व मजबूत करीत जाते. *कोणी बोधिसंपन्न महापुरुष समाजाला ह्या अंधविश्वासातून बाहेर काढतो आणि कुशल कर्मावर आधारित शुद्ध धर्म पंथावर चालण्यासाठी प्रेरित करतो.*_

_या साधकांनो! आम्हीही अशा अंध विश्वासांच्या आणि अशा अंधमान्यतांच्या जंजाळापासून मुक्त होऊन, धर्माच्या स्वस्थ परंपरेला जीवनाचे अंग बनवू आणि आपले कल्याण साधून घेऊ!_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २९/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...