Sunday, 29 December 2024

जन्माने नाही, कर्माने ब्राम्हण

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_जन्माने नाही, कर्माने ब्राम्हण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_29.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_एकदा भगवान इच्छानंगल वन-खण्डात विहार करीत होते. त्या वेळी तेथे अनेक प्रसिद्ध धनवान ब्राम्हणांचा निवास होता. त्यात *पौष्करसाति व तारुक्ष नावाचे दोन प्रसिद्ध ब्राम्हण आचार्य* होते. *त्या दोघांचे वाशिष्ट व भारव्दाज नावाचे दोन शिष्य होते, ज्यांच्यात ह्या बाबीवर चर्चा सुरु झाली की ब्राम्हण कसा असतो ?*_

_*भारद्वाजची ही मान्यता होती की कोणी मातेकडूनही आणि पित्याकडूनही सुजात असतो. त्याच्या आई वडील दोघांचेही सात पिढ्यांपर्यंतचे पूर्वज विशुद्ध वंशाचे असतात. त्यामुळे तो ब्राम्हण होतो. वाशिष्ट युवकाचे म्हणणे होते की कोणी शीलवान आणि व्रतसंपन्न असतो तेव्हाच तो ब्राम्हण होतो. जेव्हा दोघांच्या चर्चेतून सत्य निर्धारित झाले नाही तेव्हा ते भगवान बुद्धांजवळ पोहचले आणि आपला परिचय देऊन जातिवादाच्या विषयात जो विवाद होता की कोणी जन्माने ब्राम्हण होतो अथवा कर्माने ह्याला समजविण्यासाठी त्यांना प्रार्थना केली.*_

_भगवानांनी त्यांना सर्व प्राण्यांच्या जातिभेदाबाबत कारणासहित विस्ताराने सांगितले, सर्व प्राण्यांच्या जाती एक-दुस-यांपासून वेगवेगळ्या आहेत. विभिन्न प्रकारच्या झुडपांच्या आणि गवतांच्या जाती एकदुसऱ्यांपासून भिन्न आहेत. कीट-पतंग आणि मुंग्यांच्या जातीचे लिंग वेगळे आहेत. विभिन्न प्रकारच्या सापांचे जलचरांचे मासोळ्यांचे आणि आकाशात उडणाऱ्या पक्षांचे लिंग वेगवेगळे आहेत. अशा प्रकारची जातिचिन्ह मनुष्यात वेगवेगळी नसतात. दुसऱ्या प्राण्यांच्या शरीर संरचनेत त्यांच्या शरीराचे प्रत्येक अंग वेगवेगळ्या प्रकाराचे असते. जेव्हा की सर्व मनुष्यांच्या शरीराची सर्व अंगे वेगवेगळ्या प्रकाराची नसतात, एकाच प्रकाराची असतात._

_*मनुष्यात भेद फक्त बाहेरील ओळखीत आहेत. जो मनुष्य गोपालनाने जीविका करतो तो कृपक असतो. जो ओझे वाहतो तो मजूर असतो. जो मनुष्य एखाद्या कलेने, कारागिरीने जीविका चालवतो, तो आपआपल्या कामानुसार कुंभार, लोहार, सुतार इत्यादी म्हणविला जातो. जो मनुष्य दुसऱ्यांचे धन चोरून जगतो तो चोर आहे. शस्त्रांच्या सहायाने जीविका अर्जित करतो तो सैनिक म्हणविला जातो. जो गाव-जमिनीचा उपभोग करून जगतो तो राजा असतो. ह्या पैकी कोणीही ब्राम्हण नाही.*_

_*त्यानंतर भगवानांनी सांगितले की एखादा मनुष्य एखाद्या विशिष्ट मातेपासून उत्पन्न होण्यामुळेही ब्राम्हण होत नाही. त्यांनी पुढे सांगितले की कशाप्रकारच्या गुणांना धारण करण्यामुळे कोणी व्यक्ती ब्राम्हण होते:-*_

_जो संग्रही नाही, अपरिग्रही आहे. जो सोबत (संग) आणि आसक्तिपासून विरत आहे, साऱ्या भवसंयोजनांना नष्ट करून निर्भय झाला आहे, ज्याने क्रोध आणि तृष्णेला मनातून काढून टाकले आहे, ज्याने त्या काळच्या प्रचलित ६२ प्रकारच्या विभिन्न मान्यतांच्या बंधनांना तोडले आहे, त्यांना मी ब्राम्हण म्हणतो._

_ब्राम्हण मी त्याला म्हणतो जो आपल्या चित्ताला दूषित केल्याविना अपमान आणि पीडा सहन करतो, क्षमाच ज्याचे बळ आहे, जो अक्रोधी, व्रती, शीलवान, बहुश्रुत, संयमी आणि अंतिम शरीरधारी असतो, जो कमळाच्या पानावरील जलाप्रमाणे भोगात लिप्त होत नाही, ज्याची आसक्ती व्देष, ईष्या, अहंकार तसेच गळून गेलेले आहेत जसे सुईच्या येकावरून मोहरीचे दाणे, ज्याने ह्याच जन्मात आपल्या दुःखांचा विनाश करून आपल्या ओझ्याला उतरवून फेकले आहे, जो गंभीर प्रज्ञावान, मेधावी, मार्ग, अमार्गाचा ज्ञाता, सत्यवान आहे, जो गृहस्थ व गृहत्यागी दोघातही लिप्त होत नाही; जो कोणत्याही प्राण्याची हत्या करीत नाही, न हत्येसाठी कोणालाही प्रेरित करतो, जो विरोधीमध्ये विरोधरहित आणि दंडधारींमध्ये दंडरहित, संग्रहींमध्ये संग्रहरहित आहे, जो आदरयुक्त, मृदू व सत्य वाणी बोलतो, ज्यामुळे कोणालाही पीडा होऊ नये, अशा गुणांनी संपन्न व्यक्तीलाच मी ब्राम्हण म्हणतो._

_ह्याच प्रकारे भगवानांनी ब्राम्हणांच्या गुणांची अजून व्याख्या केली *जो पुरूष जगात न दिलेल्या वस्तू घेत नाही, जो लोक आणि परलोकांच्या विषयात आसक्तीरहित आहे, ज्याने परमसत्याला जाणले आहे, जो निर्वाण (मोक्ष) चा मार्ग सांगणारा आहे, जो शोकरहित, निर्मल आणि शुद्ध आहे, जो पाप-पुण्य दोघांच्याही प्रती आसक्तीरहित आहे, ज्याची सर्व जन्मांची तृष्णा नष्ट झाली आहे, ज्याने जन्म-मरणाच्या चक्रात टाकणाऱ्या मोहाचा त्याग केला आहे, जो भोगांना सोडून संन्यासी झाला आहे, जो लोकिय आणि दिव्य कोणत्याही बंधनात आसक्त नाही, जो रती आणि अरती यांना सोडून शीतल स्वभावाचा व क्लेशरहित आहे, अशा सर्वलोक विजयी असलेल्या मी ब्राम्हण म्हणतो, जो प्राण्यांच्या मृत्यू आणि उत्पत्तीला उत्तम प्रकारे जाणतो, जो आसक्तीरहित सुगत आणि बोधियुक्त (ज्ञानी) आहे, त्याला मी ब्राम्हण म्हणतो, ज्याची गती देव, गंधर्व आणि मनुष्य जाणत नाहीत, जो क्षीणास्रव आणि अरहंत आहे, ज्याच्या पूर्व, पश्चात आणि मध्यात काहीही नाही, जो संचयी नाही, जो पूर्व जन्मांना जाणतो, स्वर्ग आणि नरकास पाहातो, ज्याचा पुनर्जन्म क्षीण झाला आहे, ज्याची सारी कृत्ये समाप्त झाली आहेत, जो अभिज्ञानी मुनी आहे. मी त्याला ब्राम्हण म्हणतो.*_

_*जन्माने न कोणी ब्राम्हण होतो, न जन्माने अब्राम्हण, कर्माने ब्राम्हण होतो आणि कर्मानेच अब्राम्हण, कर्माने कृषक होतो, कर्माने कारागीर, कर्माने वैश्य होतो आणि कर्मानेच मजूर, कर्माने चोर होती आणि कर्मानेच सैनिक. कर्माने वाचक होतो आणि कर्मानेच राजा. त्याच प्रकारे कर्म-फळाला जाणणारा पंडित ह्या जन्माला यथार्थपणे जाणतो. लोक कर्माने चालत आहे, प्रजा कर्माने चालत आहे. चालणाऱ्या रथाच्या चाकाच्या धुरे प्रमाणे प्राणी कर्माने बांधलेले आहेत. तप, ब्रम्हचर्य, संयम आणि दमन ह्यामुळे ब्राम्हण होतो, ह्या गुणांना धारण करणाच 'उत्तम ब्राम्हण' होतो.*_

_ते दोघे तर युवक होते, परंतु ब्राम्हण समाजाचे जास्त वय असणारे लोकही ह्या विषयावर चर्चा करीत असत._

_भगवान बुद्धांच्या जीवनकाळातील एक घटना, एकदा जेव्हा ते अनाथपिडिकच्या जेतवनात थांबले होते, तेव्हा श्रावस्तीत भिन्न भिन्न स्थानांवरून आलेले ५०० ब्राम्हण तेथे एकत्र झाले. त्यांच्यात ही चर्चा सुरू झाली की *गौतम उच्च-नीचचा भेदभाव करीत नाही. नीच पेक्षाही नीच जातीच्या व्यक्तीलाही धर्म शिकवितो आणि पूज्य वनवितो. आम्ही त्याच्याशी ह्या विषयावर विवाद करू शकत नाही.*_

_त्या ब्राम्हणांतील एक आश्वलायन, युवक असुनही वैदिक ग्रंथात पारंगत होता. असे वाटते की हाच आश्वलायकन पुढे जाऊन उपनिषद काळाचा पंडित झाला असावा. त्यामुळे ब्राम्हणांनी आश्वलायनाला ह्या लायक समजले आणि त्याला ह्या विषयावर गौतम बुद्धांशी वाद करण्यासाठी तयार केले, तरीही तो वारंवार म्हणत होता की बुद्ध धर्मवादी आहे, त्यांच्याशी विवाद करणे कठीण आहे. परंतु त्या ब्राम्हणांच्या दबावामुळे आश्वलायन बुद्धांशी विवाद करण्यासाठी तयार झाला._

_जेव्हा तो बुद्धांना भेटला तेव्हा तो म्हणाला की *ब्राम्हण वर्णच श्रेष्ठ आहे, अन्य वर्ण हीन आहेत, ब्राम्हण शुक्लवर्णी आहेत, अन्य लोक कृष्णवर्णी. ब्राम्हण वर्णच शुद्ध असतो, अब्राम्हण वर्ण नाही. ब्राम्हण ब्रम्हाचे औरस पुत्र आहेत, त्याच्या मुखातून उत्पन्न झाले आहेत, तेच ब्रम्हाचे वास्तविक उत्तराधिकारी आहेत.*_

_तेव्हा भगवान म्हणाले- आश्वलायन!. *ब्राम्हणांच्या स्त्रियाही ऋतुमती, गर्भवती होतात. मुलांना जन्म देतात, त्यांना दूध पाजतात. मग हे कसे मानावे की ते ब्रम्हाच्या मुखाद्वारे उत्पन्न झाले आहेत ?*_

_आश्वलायन निरूत्तर झाला._

_आणि कोण्या ब्रम्हाने मनुष्य जातीत उच्च-नीचतेचे विधान केले असेल तर शेजारी देशात आणि भारताच्या अन्यान्य सीमांत प्रदेशात-आर्य आणि दास दोनच वर्ण का असतात? तेथे कोणी आर्य असेल तर तो दास होऊ शकतो आणि दास असेल तर आर्य होऊ शकतो. आश्वलायनाने हे स्वीकारले की त्या देश-प्रदेशात असे होते._

_तेव्हा भगवानांनी म्हटले की कोणत्या विशेषतेमुळे ब्राम्हण आपल्या स्वतःला ब्रम्हाचा उत्तराधिकारी मानतात ?_

_आश्वलायनाजवळ ह्याचे उत्तर नव्हते._

_*त्यानंतर भगवान म्हणाले की कोणी क्षत्रिय आहे, परंतु हिंसक आहे, चोर आहे, व्यभिचारी. कटू-भाषी आहे-तर तो मरणानंतर नरकातच जाईल. ह्याच प्रकारे वैश्य आणि शुद्राचीही वाईट गतीच होईल. तर मग अशाच दुर्गुणांनी युक्त ब्राम्हण नरकात जाणार नाही काय ?*_

_आश्वलायना जवळ ह्याचे काहीही उत्तर नव्हते._

_असेच कोणी व्यक्ती जर सदाचारी असेल तर मरणानंतर तो स्वर्गगामी होईलच, मग तो कोणत्याही जातीचा असो._

_आश्वलायन निरूत्तर होता._

_भगवान म्हणाले की *कोणी व्यक्ती ब्राम्हण असो अथवा अब्राम्हण नदी घाटावर साबण घेऊन आपल्या शरीराचा मळ काढण्यात समर्थ आहे, तर मग ह्यात ब्राम्हणाची काय विशेषता आहे? असेच माझ्याजवळ आल्यावर कोणत्याही जातीचा व्यक्ती आपल्या मनाचा मळ उतरवून धार्मिक, होऊ शकतो. आवश्यक नाही की तो ब्राम्हण जातीचा असावा. शीलवान, धार्मिक होण्याचा सर्वाना अधिकार आहे आणि असे झाल्यावर सर्वांना एकसारखंच फळ मिळते. अशा साधकालाच मी उत्तम ब्राम्हण म्हणतो. कोणीही साधक, कोणत्याही जाती वा वर्णाचा असो, तो तप, ब्रम्हचर्य, इंद्रीय-संयम व चित्त दमनाद्वारेच ब्राम्हण म्हणविण्याचा अधिकारी होतो. अशा साधकालाच 'उत्तम ब्राम्हण' म्हणतात. नीच कुळात जन्मलेल्या व्यक्तीही आपल्या आचरणाने शुद्धी प्राप्त करू शकतात.*_

_आश्वलायन पुन्हा निरूत्तर होता._

_*जर कोणी ब्राम्हण युवक अब्राम्हण युवतीशी विवाह करेल अथवा कोणी अब्राम्हण युवक कोण्या ब्राम्हणीशी विवाह करेल आणि त्यामुळे जी संतती होईल त्याला काय म्हणाल ? श्रेष्ठ वर्ण अथवा नीच वर्ण ?*_

_आश्वलायन निरूत्तर होता._

_एखादया घोड्याचा गाढवीशी संयोग झाला तर त्यांच्या संततीला न घोडा म्हणतात न गाढव, त्याला खेचर म्हणतात. असेच ब्राम्हण आणि अब्राम्हणच्या संततीला काय म्हणाल? त्याला ब्राम्हण म्हणून श्रेष्ठ म्हणाल अथवा अश्रेष्ठ? कसा भेद कराल? मनुष्य मनुष्य आहे. कोणताही भेदभाव नाही. *ब्राम्हण वर्णाचा असो अथवा अन्य वर्णाचा. शीलवान धार्मिक होण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि सर्वाना एकसारखे फळ मिळते.*_

_दुर्भाग्याने देशात बुद्धांच्या हजारो वर्ष आधीपासूनच जात-पात, उच्च-नीच, शिवाशीवीचा कलंक खूप पुरातन काळापासून चालत येत होता. कोणी चांडाळ दिसल्यावर अशुभ मानले जात होते. त्याला स्पर्श करणे तर दूरच त्याची सावलीही पडली तरी स्नान करावे लागे. म्हणून जेव्हा कोणी चांडाळ अन्य मनुष्यांच्या समुहात येत असे तेव्हा तो टाळ्या वाजवित, घंटीचा आवाज करीत येत असे, ज्यामुळे लोक आधीच त्याच्यापासून दूर होवोत. एखाद्या चांडाळाचे दिसणेही अशुभ मानले जात असे. त्यामुळे चांडाळ दिसल्यावर तर काही जण सुगंधित द्रव्याने आपल्या डोळ्यांना धूत असत. बहुदा चांडाळाची सावली पडल्यावर लोक त्याला मारीत असत. चांडाळ नजर खाली करूनच गावात प्रवेश करीत असत._

_त्यामुळे वाटते की बुद्धांच्या नंतरही चांडाळ मृत शव वाहून नेण्याचे स्मशानाची रक्षा करण्याचे काम करीत होते आणि चांडाळांना राहण्यासाठी वेगळे गाव होते. मृत्युनंतर त्याला जाळण्यासाठी स्मशानही वेगळे असायचे._

_चांडाळ लोकांच्या अतिरिक्त अनेक अन्य जातींनाही नीच मानले जात होते. हे हीनकुळ होते नोसादकुळ म्हणजे बांबूची टोपली वर्णावणारे, चर्मकारकुळ म्हणजे मेलेल्या पशूच्या चामडीने वस्तू बनविणारे. पुक्कुसकुळ म्हणजे घाण, कचरा उचलणारे भंगी._

_*चांडाळ कुळाचे व्यक्ती वृषल मानले जात होते. भगवानांनी खऱ्या अर्थाने वृषल कोण असतो, ह्याचे विवरण दिले जो नर क्रोधी, वैरी, पापी, ईर्ष्याळू, मिथ्यामतधारी, मायावी आहे; जो हिंसक, अत्याचारी, चोर आणि व्यभिचारी आहे; जो वृद्ध माता-पित्याचे पालन-पोषण करीत नाही: दुसऱ्याला त्रास देतोः ब्राम्हण, श्रमण वा अन्य वाचकांना धोका देतोः अनर्थकारी बोलतीः पापकर्म करून लपवतो; आपली बढाई आणि दुसऱ्याची अवहेलना करतोः रूष्ट, खूप जेवणारा, वाईट इच्छा असणारा, कंजूस आणि शठ आहे; वाईट कर्म करण्यात लज्जा, भय मानीत नाही; जो अरहंत नसतानाही आपल्याला अरहंत म्हणतो, तो अधम, वृषल आहे. कोणी जन्माने वृषल होत नाही आणि जन्माने ब्राम्हण होत नाही. कर्मानेच वृषल होतो आणि कमनिच ब्राम्हण, अकुशल कर्म करणारा ब्राम्हण चांडाळासमान होतो.*_

_भगवान म्हणाले "*मी ब्राम्हणी मातेपासून उत्पन्न होण्यामुळे कोणाला ब्राम्हण म्हणत नाही. ज्याच्याजवळ काहीही नाही आणि जो काहीही घेत नाही; त्याला मी ब्राम्हण म्हणतो. न जटेने, न गोत्राने, न जन्माने ब्राम्हण होतो; ज्याच्यात सत्य आणि धर्म आहे, तोच पवित्र आहे, आणि तोच ब्राह्मण आहे."*_

*_भगवानांनी नेहमी जातीपेक्षा विद्या आणि आचरण दोघांनाच महत्व दिले आणि ह्यावरच जोर दिला._*

_या साधकांनो! आम्हीही भगवानांच्या ह्या पावन शिकवणुकीपासून प्रेरणा घेऊन आपले आचरण व कर्म सुधारून खऱ्या अथनि ब्राम्हण बनू._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ३०/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...