Thursday, 26 December 2024

सत्कर्मांनी सद्गती

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_सत्कर्मांनी सद्गती_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_12.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_एका गावाच्या प्रमुखाने भगवान बुद्धांना विचारले की लोक सुगती प्राप्त करण्यासाठी खूपसे कर्मकांड करतात, अनेक प्रकारच्या वेषभूषा, माला-गंध-विलेपन धारण करतात. अनेक प्रकाराने अग्नि-परिचर्या व अन्य कर्मकांड करून समजतात की आम्ही सर्व काही केले. काही असेही आहेत जे खालच्या दर्जाची तांत्रिक साधना करून एखाद्या प्रेत-प्राण्याशी बोलतात आणि त्याच्याद्वारे लोकांना स्वर्गात घेऊन जाण्याचा दावा करतात. भगवान आपण तर सर्वज्ञ आहात. आपणही काही असे करावे ज्यामुळे जगातले सारे प्राणी मरणोपरांत सुगतिमय स्वर्गलोकातच जाऊ शकतील._

_भगवानांनी त्यालाच प्रश्न विचारून समजविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काय समजता की *कोणी जीव-हिंसक असेल, चोरी करणारा असेल, व्यभिचारी असेल, खोटे बोलणारा असेल, चुगली करणारा असेल, कठोर बोलणारा असेल, गप्पिष्ट असेल, लोभी असेल, नीचवृत्तीचा असेल, मिथ्यादृष्टियुक्त असेल, तर काय तो स्वर्गात जाण्यालायक आहे? अथवा त्याच्या मृत्युनंतर पुष्कळशा लोकांनी तेथे एकत्र होऊन प्रार्थना केली, हात जोडून वंदना केली की आपण सुगतिगामी व्हावे, स्वर्गलोकात् उत्पन्न व्हावे, तर असे करण्यामुळे तो स्वर्गलोकात उत्पन्न होऊ शकतो काय? नाही, मरणोपरांत केले जाणारे कोणतेही कर्मकांड कोणालाही मुक्ती देऊ शकत नाही, हे असंभव आहे.*_

_एका उदाहरणाने समजा. एखाद्या मोठ्या जलाशयात एखादी मोठी दगडाची शिला सोडली आणि ती आपल्या भाराने पाण्यात बुडाली तर काय समजता की एखाद्या विशाल जनसमूहाच्या प्रार्थनेमुळे, नवसामुळे आणि पूजा-पाठामुळे अथवा एखाद्या अन्य कर्मकांडामुळे ती भारी शिला पाण्यावर तरंगेल काय?_

_असेच कोणी व्यक्ती तूप-तेलाने भरलेल्या माठांना पाण्यात नेऊन फोडेल आणि त्यातील तूप, तेल पाण्यावर तरंगायला लागेल तसेच एखाद्या दुसऱ्या माठात दगड-गोटे भरून त्यालाही फोडेल व ते आपल्या भाराने पाण्यात बुडतील, तेव्हा कोणी प्रार्थना करून, पूजा-पाठ करून, कर्मकांड करून म्हणेल की हे तूपा तू खाली जा, खाली जा! हे दगड-गोट्यांनो तुम्ही वर या, वर या! जर असे होत असेल तर करून पाहा._

_हे ग्रामणी! ह्याचप्रकारे *कोणी जर प्राणीहिंसेपासून, चोरीपासून, व्यभिचारापासून, खोटे बोलण्यापासून इत्यादी दुष्कमापासून दूर राहात असेल आणि सत्यधर्माचे जीवन जगत असेल, तर तो मरणोपरांत वरच जाईल. त्याची ऊर्ध्वगतीच होईल. कोणाचाही शाप त्याला नरकाच्या कष्टमय जीवनात पाठवू शकत नाही. त्याचे सत्कर्मच त्याला वर घेऊन जाईल. त्याला वर जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. हा निसर्गाचा अतूट नियम आहे.*_

_अशाच एका अन्य प्रसंगात भगवानांना विचारण्यात आले की भगवान आपण सर्वांवर समान रूपाने करुणाभाव ठेवता काय, दयाभाव ठेवता काय? जर होय, तर कोणाला खूप लाभ होतो, कोणाला मध्यम लाभ होतो आणि कोणी-कोणीतर धर्मलाभापासून वंचितच राहतात. असे का? *आपल्या मंगलमय करुणेचा प्रभाव सर्वांवर एकसारखाच का होत नाही ?*_

_*भगवानांनी त्याला एका शेतकऱ्याचे उदाहरण देऊन समजाविले की त्याच्याजवळ तीन प्रकारच्या जमिनी आहेत १. खूप सुपीक २. मध्यम सुपीक ३. एकदम नापीक, ओसाड. अशा परिस्थितीत तो सर्व प्रथम सुपीक जमिनीत बीज टाकतो. त्यानंतर मध्यम जमिनीत व सर्वात शेवटी नापीक-ओसाड जमिनीत. बीज तेच असते आणि तेवढ्याच मेहनतीने व तळमळीने टाकले जाते. परंतु पीक एकसारखे येत नाही. ह्याचप्रकारे माझ्याजवळही तीन प्रकारचे लोक धर्म शिकण्यासाठी येतात. एक तर खूप गंभीर साधक-साधिका, जे सुपीक जमिनीसारखे आहेत. त्यात जे बीज पडेल, ताबडतोब फलदायक होईल. कारण ते पूर्ण श्रद्धा आणि तळमळीने कामाला लागतात. दुसरे सामान्य गृहस्थ उपासक उपासिका, जे आपल्या दैनिक सांसारिक कामात पडलेले असूनसुद्धा धर्म शिकतात. ते मध्यम शेतासमान आहेत. त्यांच्यात श्रद्धा व तळमळ तर आहे परंतु संसारच्या अनेक अडचणीही आहेत. तरीही ते धर्ममार्गावर चालून आपले मंगल साधतातच. तिसरे काही असे लोक जे नापीक ओसाड जमिनीसमान आहेत. उपदेश तर त्यांनाही मी तसाच देतो परंतु आपल्या कर्मकांडांमध्ये आणि अन्य जंजाळात गुंतले असल्यामुळे ते धर्माला योग्य प्रकारे ग्रहण करू शकत नाहीत. ते जेवढे शिकून, समजून जितका अभ्यास करतात, त्यांना केवळ तेवढाच लाभ होतो. कोणी-कोणी केवळ ऐकून चालला जातो, थोडासाही अभ्यास करीत नाही, तर तो धर्मापासून सर्वस्वी वंचित राहतो. परंतु माझी करुणा त्या सर्वाप्रती नेहमी तेवढीच राहते.*_

_भगवानांनी अजून एक उदाहरण देऊन समजाविले की *एखाद्याजवळ तीन माठ आहेत. एक बिलकूल छिद्ररहित, दुसरा सूक्ष्म छिद्रे असणारा आणि तिसरा मोठे छिद्र असणारा. तो सर्वप्रथम विना छिद्र असणाऱ्या माठात पाणी भरतो, जे दिवसभर त्याच्या कामी येते. नंतर दुसऱ्या माठात पाणी भरतो की जरी ते दिवसभर चालले नाही तरी काही वेळापर्यंत त्यातून पाणी मिळतेच. तिसऱ्या माठात तो पाणी ह्यासाठी भरतो की जितकेही पाणी एकत्र होईल तेवढे खानासाठी अथवा कपडे-भांडे धुण्यासाठी तरी कामात येईल.*_

_*खूप गंभीर साधक-साधिका पहिल्या माठासमान आहेत. दुसऱ्या माठासमान ते सामान्य उपासक उपासिका आहेत जे अडचणी असतांनाही धर्माला धारण करतात. वेगवेगळ्या कर्मकांडात गुंतलेले लोक तसेच आहेत जसे तिसऱ्या माठात भरलेले पाणी. ते जितके ग्रहण करतील, अभ्यास करतील, त्यांना केवळ तेवढाच लाभ होईल. मात्र माझी दया आणि करुणा सर्वांप्रती समानच राहते.*_

_*भगवानांद्वारे उपदेशित ह्या उदाहरणांपासून धडा घेऊन साचकांनी! पा, आम्हीही धर्ममार्गावर सुपीक क्षेत्र बनून, श्रद्धा आणि तळमळीने पाचही शीलांचे पूर्णपणे पालन करीत, सम्यक समाधीला पुष्ट करू आणि अनित्यबोधिनी प्रज्ञेचा सखोलतेने अभ्यास करीत आपल्या सदाचरणाच्या बळावर आपली सुगती निश्चित करू या.* ह्यातच आमचे मंगल आहे, कल्याण आहे._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २७/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...