Tuesday, 30 April 2024

विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्तत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्तत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_21.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                     _*औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधि मंडळाच्या विद्यमाने दि. १२ डिसेंबर १९५५ रोजी सभा भरविण्यात आली होती.* या समेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रथम *श्री. शंकरराव देव यांच्या दि. ७ डिसेंबर रोजी महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानातील एका विधानाचा परामर्श घेतला. श्री. शंकरराव देव यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, " महाविद्यालयाला केवळ' मिलिंद' हे नाव देऊन भागणार नाही, तर अक्रोधाने क्रोध जिंकणाऱ्या बौद्ध शिकवणुकीचाच पुरस्कार तिथे झाला तर मिलिंद हे नाव सार्थ होणार आहे."*_

                   _*डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. देवांच्या टीकेसंबंधी बोलताना म्हणाले, मिलिंद हा एक ग्रीक होता. त्याला आपल्या विद्वतेबद्दल घमेंड होती की, ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाहीत. त्याने जगाला आव्हानही दिले होते. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्खुबरोबर वाद करावा. पण त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. मिलिंद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता. तो काही तत्त्वज्ञानी नव्हता किंवा जाडा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत होते. पण अशा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. महाप्रयासाने "नागसेन" भिक्खुला तयार केलं गेलं. मिलिंदाचं चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे, असा त्याने निश्चय केला, मग त्यात यश येवो किंवा अपयश येवो.*_

                    _*नागसेन हा ब्राह्मण होता. वयाच्या सातव्या वर्षी त्यानं आपल्या आईबापाचं घर सोडलं होतं. अशा या नागसेनाने भिक्खु लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन मिलिंदाचा पराजय झाला. त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. त्या पुस्तकाला पाली भाषेत ' मिलिंद पन्ह' असं नाव आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर मिलिंद प्रश्न असं आहे. या पुस्तकाचं शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावं अशी माझी इच्छा आहे. त्यात शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत हे दिलेले आहे. म्हणून मी व माझ्या सोसायटीने ह्या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिलं व जागेला 'नागसेन वन' असं नाव दिलं. मिलिंद हरला व बौद्ध झाला, म्हणून मी हे नाव दिलेलं नाही. मी जे ह्या कॉलेजला नाव दिलेले आहे ते आदर्शभूत असंच आहे, असं माझं मत आहे.*_

*_शिक्षणसंस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे हे अत्यंत अनुचित आहे._*

                 _*बौद्धधर्माशी संलग्न झालेले 'मिलिंद' हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की, विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे. हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धानीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे.*_

_मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात २,९०० व या कॉलेजात ६०० विद्यार्थी आहेत. मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे._

                _*श्री. शंकरराव देवांनी या कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला आहे. तो असा 'अक्रोधेन जेयत् क्रोधं !' मनुष्याने क्रोध हा अक्रोधाने जिंकावा, असं ते म्हणाले. कारण मी अतिशय क्रोधी आहे, हे जगाला चांगले परिचित आहे. श्री देव म्हणतात, माणसाने क्रोध गिळला पाहिजे. मला यावरून वाटते की देवांचं वाचन अपुरं आहे. त्यांनी चांगलं वाचन केलेलं दिसत नाही (टाळ्या). भगवान बुद्धानी 'राग' (Anger) यावर व्याख्यान दिलं आहे. ते जर देवांनी वाचलं असतं तर त्यांनी असले उद्‌गार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टीका करू नये.*_

राग दोन प्रकारचे असतात. 

१ द्वेषमूलक, 

२ प्रेममूलक. 

           _*जो कसाई असतो तो कुऱ्हाड घेऊन जातो. त्याचा राग हा द्वेषमूलक असतो. आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल ? तिचा राग असतो तो प्रेममूलक असतो. मुलाने सदाचारी व्हावं म्हणून आई मुलाला मारीत असते. माझा रागही प्रेममूलक आहे. तुम्ही समतेनं वागावं म्हणून मी राजकारणात शिव्या देतो. माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांची मी मुळीच पर्वा करणार नाही. (टाळ्या) मी सगळं केलं ते झगडा करून केलं आहे.*_

           _पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती. आम्हाला विद्या शिकता आली नाही. आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती; पण ती आम्हाला ब्राह्मणांनी घेऊ दिली नाही. परंतु भगवान बुद्धाने हा दंडक मोडला._

                _*एकदा भगवंतास लोहित नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकवितोस. यावर भगवंताने त्याला सांगितले की, ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला अन्नाची जरूरी आहे, त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरूरी आहे. ही विचारसरणी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली. (टाळ्या) विद्या ही एक प्रकारची तलवार आहे. ही दुधारी असते. तिने दुष्टांचा संहारही करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते.* म्हटलेच आहे की-

_स्वदेशे पूज्यते राजा ।_

_विद्वान सर्वत्र पूज्यते ।।_

                 _*तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात; पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. विद्येबरोबर भगवान बुद्धानी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचरणानं संपन्न असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानव जातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयीची आत्मियता, या चार पारमिता असल्या पाहिजेत. तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्येबरोबरच मानवाजवळ जर करूणा नसली तर तो कसाई आहे, असं मी समजतो. करूणा म्हणजे माणसामाणसावरचं प्रेम ! ह्याच्यापुढेही मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे. ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धानीच होय. मी माझ्यासारखा विद्वान भारत वर्षात पाहू इच्छितो.*_

                 _*सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धाचा बौद्ध धर्म होय. इतर धर्म निरर्थक आहेत.* माझ्या धर्मात ईश्वराला मुळीच वाव नाही. कारण लोक सांगतात की, ईश्वराने सृष्टी निर्माण केली व त्याने नकारापासून साकार व साकारापासून नकार उत्पन्न केले. पण या जगात साकार वस्तु अगोदर होत्या व आहेत. ईश्वर असता तर त्याने इकडे डोळेझाक केलीच नसती. म्हणून ईश्वर आहे, ही कल्पनाच मुळी खोटी आहे. जर देव (परमेश्वर) असलाच तर, आर्डिनरी जीवनात त्याचा उगीच खुंटा कशाला ? माझ्या धर्मात आत्म्यालाही स्थान नाही. *बौद्धधर्माचा मूळ पाया दुःख दूर करणे हा आहे. तोच धर्म माझ्या मते सर्वश्रेष्ठ होय.* इतर धर्म मनुष्य व ईश्वर यांच्या काल्पनिक संबंधावर भर देऊन आधारलेले आहेत._

             _*जगात काही माणसे भित्री असतात. माणसाने एकटं जाण्याचं धैर्य केलं पाहिजे. एकटं जाण्याचं धैर्य मी करतो. (टाळ्या) हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची पर्वा करीत नाही किंवा त्याची खंतही बाळगीत नाही.*_

                _एक डॉ. पिक्विक व त्याचे दोन चार भिडू होते. तो आपल्या भिडूंना म्हणाला की, मी तुम्हाला जत्रा दाखवितो. तो आपल्या भिडूसह एका गावात गेला व तेथे त्यांनी दोन तीन खोल्या राहाण्यासाठी घेतल्या. त्या गावात इलेक्शन होतं. डॉ. पिक्विकच्या कंपनीतला सॅम वेलर नावाचा पोऱ्या त्याच्याजवळ त्याची सेवा करण्यासाठी ठेवण्यात आला होता. निवडणुकीची धामधूम ऐकल्यावर तो त्या खोलीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला व त्याने दरवाजा उघडण्यास व लावण्यास सुरवात केली. भित्र्या डॉ. पिक्विकने विचारले की, "What are you doing there?" (तू तिथे काय करतो आहेस ?) त्याने उत्तर दिले की "There is a big crowd, Sir." (सर, तिथे मोठा जमाव आहे.) सॅम वेलर बाहेर जाण्याची धडपड करू लागला. तेव्हा डॉक्टरने त्याला बजावलं की Go with bigger crowd and not with little one (मोठ्या जमावा- सोबत जा, लहानासोबत जाऊ नकोस.) आणि पुनः असं सांगितलं की" हा मोठा जमाव जिकडे जाईल तिकडे जा. अथवा त्याच्या मागे जा." माझे मात्र तुम्हाला असे सांगणे आहे की, केवळ अशा प्रकारच्या' जमावा' मागे तुम्ही जाऊ नका._

            _*विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्त्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. 'महाजनो येन गतः सपन्थः ' ही पर प्रत्ययनेय बुद्धी सोडून विवेकाने, जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०१/०५/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३, पान नं ४५८-४६१*_

*_२) जनता : १७ डिसेंबर १९५५_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Monday, 29 April 2024

शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_42.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                    _पूर्वी ठरल्याप्रमाणे *रावळी कॅंप महिला मंडळाच्या विनंतीला मान देऊन, दि. ३ जून १९५३ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सौ. माईसाहेब आंबेडकर यांचेसह रावळी कॅंपला भेट दिली.* सदर प्रसंगी स्त्री-पुरुष समुदाय अतिशय प्रचंड होता. प्रथम अनेक भगिनींनी व संस्थांनी डॉ. बाबासाहेब व सौ. माईसाहेब आंबेडकर यास हार अर्पण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याप्रसंगी केलेल्या भाषणात म्हणाले, भगिनींनो व बंधुंनो,_

                   _येथील स्त्रियांनी इमारत फंडाला १,००१ रुपये देण्याचे कबूल करून आज जी रक्कम दिली त्याबद्दल मी त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. या वस्तीत मी आज प्रथमच आलो आहे. आज येथील स्त्रियांनी जशी मदत केली तशीच येथील एक सोसायटीही इमारत फंडाला मदत देणार आहे. या सोसायटीची काही रक्कम म्युनिसीपालिटीत शिल्लक आहे. ती रक्कम ते इमारत फंडाला देणार आहेत. ती रक्कम या वस्तीने आतापर्यंत दिलेल्या सर्व रकमांपेक्षाही मोठी आहे. अर्थात ती घेण्यासाठी मला परत याठिकाणी यावे लागणार आहे व त्यावेळी मी जरूर येईन._

              तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आता मी सांगणार आहे. परवा *दिनांक २७-५-१९५३ रोजी आपण मोठ्या प्रमाणावर बुद्ध जयंती साजरी केली.* वास्तविक आपण ही एक मोठी चांगली गोष्ट केली, असे मला वाटते. परंतु काही वर्तमानपत्रांनी या गोष्टीला विपरित स्वरूप दिले. जेथे ३० हजार लोक हजर होते तेथे ३ हजार लोकच होते असे आपल्या बातमीत डोळ्यावर कातडे ओढलेल्या वर्तमानपत्रांनी ठोकून दिले. काहींनी तर बुद्ध जयंतीच्या बातमीला आपल्या वर्तमानपत्रात थाराच दिला नाही. हे त्यांचे नेहमीचेच आहे. डॉ. आंबेडकरांचे कार्य म्हटले की, एकतर त्याला प्रसिद्धीच द्यावयाची नाही आणि प्रसिद्धी दिलीच तर त्या कार्यालां गौणत्व तरी आणावयाचे किंवा विपरीत स्वरूप तरी द्यावयाचे ! बुद्ध जयंतीवर वर्तमानपत्रात जी टीका आलेली आहे त्या टीकेला समर्पक व सविस्तर उत्तर मी देणार आहे. या वर्तमानपत्रात आलेल्या टीकेचा तुमच्यावर मात्र विपरीत परिणाम होऊ देऊ नका. *मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते अगोदर तुम्ही नीट समजावून घ्या व मगच त्यावर विश्वास ठेवावयाचा किंवा नाही ते ठरवा.*_

                    _वर्तमानपत्रात एक पाढा नेहमी म्हटला जातो की, " काही जरी केले तरी अस्पृश्यता जाऊ शकत नाही, राजकारणाने म्हणा किंवा धर्मकारणाने म्हणा अस्पृश्यता जाणार नाही." अशा लोकांना माझ्याबरोबर चर्चा करावयाची असल्यास माझी तयारी आहे. हे लोक उपजत आंधळे आहेत, असे मला वाटते. त्यांनी इतिहास वाचला नाही. जगात आतापर्यंत किती परिवर्तने झाली याची त्यांना माहिती नाही. म्हणून ते अशी मूर्खपणाची टीका करतात._

                  _आज या ठिकाणी बसलेला प्रचंड स्त्री-पुरुष समुदाय हाच मागची परिस्थिती काय होती व आजची परिस्थिती काय आहे, हे समजावून देईल. लोक काय म्हणतात इकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ते जे काही लिहितात ते तुमचा गैरसमज करण्याकरिता लिहितात. सर्व वर्तमानपत्रे माझ्यावर टीका करतात, मात्र, त्याची मला पर्वा नाही. त्यांच्या टीकेमुळे माझे वजन घटेल असे समजण्याचे कारण नाही. मी दरवर्षाला पाहतो तो माझे वजन वाढतच आहे._

               _*नाशिक सत्याग्रहाची गोष्ट घेऊ. आता खऱ्या गोष्टी तुम्हाला सांगावयास हरकत नाही. श्री. भाऊराव गायकवाड इत्यादि पाच-सहा प्रमुख लोकच माझ्या मदतीस होते. त्यावेळी रात्री १२ वाजता सभा घेतली. सत्याग्रहासाठी किती लोक नावे देतात ते आम्ही पाहिले. त्यावेळी आम्ही काय प्रकार पाहिला ? सकाळपर्यंत आम्हाला एकही गडी सत्याग्रहासाठी मिळाला नाही. सत्याग्रह केला तर काय होईल याची भीती लोकांच्या मनात होती. सकाळी आम्ही एक मिरवणूक काढण्याचे ठरविले. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा या मिरवणुकीतल्या लोकांवर इतर लोकांनी दगड धोंडे टाकले. त्यामुळे प्रथम आम्हाला पंधरा-वीस सत्याग्रही मिळाले. नंतर लोकांच्या लक्षात आले की, सत्याग्रह करणे यात स्वाभिमान आहे. ही गोष्ट समजल्यावर आम्हाला सत्याग्रही मिळण्यास अडचण पडली नाही. नंतर आम्ही एक-दोन वर्षे नव्हे तर चार-पाच वर्षे सत्याग्रह चालवू शकलो. पूर्वीच्या गोष्टीचा विचार केला तर आता पुष्कळच सुधारणा झाली आहे, असे मला म्हणावयाचे आहे.*_

                       _*आपण शिक्षणाचीच गोष्ट घेऊ. माझ्यावेळी मला शाळेत घ्यावे की नाही' याचा खल करण्यासाठी ३ दिवस मास्तरांची सभा भरली होती. मला त्यावेळी सरकारकडून ३ रुपये स्कॉलरशिप मिळत होती. या मुलाला शाळेत घेतले नाही तर सरकारचा कोप होण्याचा संभव आहे, या सबबीवर मला सरकारी हायस्कूलमध्ये घ्यावयाचे ठरले. त्यावेळी मी निव्वळ गावठी पोर होतो. त्यात ब्राह्मणी जोडा घालावयाचा. पहिल्या दिवशी मी हायस्कूलमध्ये गेलो तर माझ्या ४० वर्षे वयाच्या भावाचे शर्ट घालून गेलो. पायापर्यंत घातलेले शर्ट असा त्यावेळी माझा अवतार होता. त्यावेळी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये असंख्य मुले शिकावयास होती. तर महाराचा मी एकटाच पोर त्या शाळेत होतो. आज सिद्धार्थ कॉलेजात पाहा. इतरांपेक्षाही आपल्या मुलांचा पोशाख चांगला असतो. पहिल्या वर्षी सिद्धार्थ कॉलेजात अस्पृश्यांची १५-२० मुलेच होती. परंतु आज पाहा. अस्पृश्यांची ३०० मुले सिद्धार्थ कॉलेजात शिकत आहेत.*_

                   _दुसरी गोष्ट धर्माची. मनुष्याने स्वार्थच करीत न राहाता थोडाफार परार्थही केला पाहिजे. यासाठीच धर्माची जरूरी आहे. तुमच्यासाठी हे सर्व मी करीत आहे. मला हे धर्माने शिकविले. नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. पोट काय रांडरळीसुद्धा भरते. *"कबीर कहे कूच उद्दम कीजे। आप खाये, और औरनको दीजे " । या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा, आपण खा व दुसऱ्यांनाही द्या. स्वार्थ व परार्थ दोन्ही साधा. घर प्रथम सांभाळा. मात्र समाजकार्यालाही मदत करा.*_

                    _*एका लोहित नावाच्या ब्राह्मणाने बुद्धाला दोन प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न हा की, विद्या ही ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्गांनाच शिकविली पाहिजे. शूद्र या चौथ्या वर्गाला विद्या शिकविता कामा नये, हे तत्त्व तू का मान्य करीत नाहीस ? याला उत्तर मिळाले ते असे चार वर्ग हे धंद्याकरिता पडलेले आहेत परंतु ज्ञान हा काही रोजगारीचा प्रश्न होऊ शकत नाही. ज्ञान हे जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान नसल्यामुळे आपले अत्यंत नुकसान होते. उदा. नाशिकला एका शेतकऱ्याकडे एक खतपत्र होते. सर्व काही व्यवस्थित होते. केस त्याच्या बाजूची व्हावयास पाहिजे होती. परंतु त्याच्या वकिलाने त्याला दम दिल्यामुळे विरुद्ध निकाल लागला. हे झाले ते त्या शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे झाले.*_

                     _*हिन्दुस्थानात जातीभेद राहिला याला मुख्य दोन कारणे आहेत. एकतर सर्वांना शस्त्रे वापरण्याची परवानगी नव्हती व दुसरी गोष्ट अज्ञान. मी पूर्वजांना पुष्कळ शिव्या देतो की, त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार का केला नाही. परंतु त्याला वर वर्णन केलेली परिस्थितीच कारणीभूत होती.*_

                    _*'तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा' या न्यायाने आता आपण स्वतःच आपल्यातील कमीपणा घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांनी मदत केली नाही तरी आपली सुधारणा आपणच केली पाहिजे आणि आपण अशारीतीने सुधारलो तर इतरांना आपणाला दोषी ठरविता येणार नाही. आपला कलंक आपणच काढला पाहिजे. समजा आपल्यातले लोक शिकले, ऑफिसर झाले तर इतरांना त्यांच्या हाताखाली काम करावेच लागणार व त्यांना मान द्यावाच लागणार. आमची व त्यांची स्थिती एक झाल्यावर आपल्याला ते कमी लेखणारच नाहीत.*_

                      _प्रत्येक माणसाची काया, वाचा व मने अशी त्रिशुद्धी झाली पाहिजे, अशारितीने पवित्र झालेल्या माणसाला अपवित्र कोण म्हणणार ? त्यांच्यापेक्षा तुमचे कपडे डौलदार असल्यावर तुम्हाला कोण कमी लेखणार ? आमच्या उन्नतीचा प्रयत्न आता आम्हालाच करावयास पाहिजे._

                     _*आपण धर्मासाठी सत्याग्रह केला. धर्मांतराचा ठराव केला. सर्वकाही केले. आता आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपला सद्‌गुणांकडे ओढा असला पाहिजे. अशारितीने आपण धार्मिक बनावयास पाहिजे. आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे यात शंका नाही. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. ज्ञान हे तलवारीसारखे आहे. समजा एखाद्या माणसाच्या हाती तलवार आहे. तिचा सदुपयोग की दुरूपयोग करावयाचा हे त्या माणसाच्या शीलावर अवलंबून राहील. तो त्या तलवारीने एखाद्याचा खूनही करील किंवा एखाद्याचा बचावही करील. ज्ञानाचेही तसेच आहे. एखादा शिकलेला माणूस त्याचे शील चांगले असेल तर आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करील परंतु त्याचे शील चांगले नसेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे अकल्याण करण्याकडेही खर्च करील. शील हे धर्माचे मोठे अंग आहे. शिकलेली माणसे नुसती पोटभरू असून भागणार नाही. ज्यांना स्वार्थापलिकडे काही दिसत नाही; ज्यांना थोडाही परार्थ करता येत नाही ती माणसे नुसती शिकली म्हणून काय झाले ? त्यांचा दुसऱ्याला उपयोग तो काय ? 'तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा' शिक्षणाचा उपयोग असा झाला पाहिजे.*_

                    _*जोतीबा फुले यांना मी आपला गुरू मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला व पुष्कळ मराठेही त्यांचे शिष्य होते. परंतु आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक झाली आहे. जोतीबांचे नाव आज कोणीच घेत नाही. आज मांग, चांभार हे निव्वळ उष्ट्याचे धनी झाले आहेत.* प्रगतीचे खरे मालक आम्ही आहोत. आज आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीपणाने पाहात आहेत. परंतु आमची चळवळ निष्काम बुद्धिने व फळाची आसक्ती न धरता चालू आहे. आम्हाला आशा आहे की, एक दिवस असा येईल की या वृक्षाचे धनी आम्हीही होऊ. आज जे काही एक न करता चैन करतात, आपण न कमविलेले खात आहेत त्यांनाच पुढे शरम वाटेल._

*_प्रत्येकाने बुद्धाचा फोटो आपल्या घरात लावावा एवढे सांगून मी माझे भाषण संपवितो._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ३०/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३, पान नं ३५७-३६०*_

*_२) जनता : १३ जून १९५३_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Sunday, 28 April 2024

भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_28.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सोमवार, दि. १५ डिसेंबर १९५२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते.* ते आपल्या भाषणात म्हणाले,_

                  _या कॉलेजात मी जी चार वर्षे अध्ययन केले तो काळ मोठा गोड स्मृतींचा नाही. *मी या कॉलेजातील पहिलाच अस्पृश्य विद्यार्थी होतो.* माझे मन सवर्ण विद्यार्थ्यांत मिसळायला धजत नव्हते. म्हणजे भीतीमुळे नव्हे, मलाच ते मिसळणे आवडत नव्हते. कारण माझा पोषाख इतरांसारखा झकपक नव्हता व त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहाणेच मला आवडत असे. आजकालच्या विद्यार्थ्यांसारखे माझे कॉलेज जीवन तेवढे उत्साही नव्हते याबद्दल मी कुणालाच दोष देत नाही. *माझ्या शिक्षकांनी व विद्यालय चालकांनी मला ठीक वागवले. त्यावेळच्या विद्यार्थ्यांत आणि आजच्या विद्यार्थ्यांत जमीन अस्मानाचा फरक आहे.*_

                _*आजचे विद्यार्थी ज्या विद्यापीठाचे शिक्षण घेतात त्याच्या कारभाराकडे मुळीच लक्ष घालीत नाहीत. विद्यार्थ्यांनी काय शिकावं हे विद्यापीठ ठरवित असले तरी आपल्या बौद्धिक विकासाला आपण शिकतो ते खरोखरच पोषक व आवश्यक आहे की नाही, हेही प्रत्येक विद्यार्थ्याने पाहिले पाहिजे. त्यांच्या भावी जीवनाची उभारणी याच ठिकाणी होत असते. तो राष्ट्राचा आदर्श नागरिक होणार की, त्याचे जीवित विफल होणार हेही शिक्षणक्रमच ठरविणार असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्यांचे कटाक्षाने लक्ष पाहिजे. पण आजचे विद्यार्थी त्यादृष्टीने अगदी बेपर्वा असतात.*_

                  _*उच्च विद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची कॉलेजची चार वर्षे संपून जातात आणि विद्यापीठाच्या पदव्या घेऊन ते बाहेर पडतात. पण त्यांना प्लेटो, बेकन, नित्से, स्पिनोझा यासारख्या महाश्रेष्ठ तत्त्वज्ञान्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधी अवाक्षरही माहिती नसते. ज्या तत्त्वज्ञानाने नव्या जगाची उभारणी केली किंबहुना आजचा नव मानव आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनात ज्या तत्त्वज्ञानावर जगत आहे त्या थोर तत्त्वज्ञानाची उपेक्षा आजच्या पदवीधरांकडून व्हावी यापेक्षा अति लाजिरवाणी गोष्ट कोणती ? याउलट आजची विद्यापीठे जेम्स आणि चार्लस यांचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांच्या माथी जबरीने लादत आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टी स्वतःच ओळखायला पाहिजेत आणि आपल्याला योग्य शिक्षण पाहिजे याची हाकाटी त्यांनी केली पाहिजे.*_

                 _मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मूल्ये कधीच स्थिर राहिली नाहीत. ती कालमानाप्रमाणे प्रत्यही बदलत राहातात. नुसती बदलतातच नव्हे तर ती प्रगत होत जातात. *भारतीय विद्यार्थ्यांनीही या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमूल्यांची दखल घेतली पाहिजे आणि आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे. हे नवे तत्त्वज्ञान आपल्या विद्यादायी संस्था आपल्या शिक्षणक्रमात घालतात की नाही याकडेही पाहिले पाहिजे.*_

                 _*पण खेदाची गोष्ट ही की, आधुनिक विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी रोडावत खाली चाललेली आहे. भूतकालातील मानवी प्रज्ञेशी तुलनाच होऊ शकत नाही. ही बौद्धिक पातळी का खाली घसरली ह्याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे आणि या परागतीचे कारण अगदी स्पष्ट आहे. आजचा विद्यार्थीवर्ग भूतकालीन प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञान व वाङ्‌मयकृतींचा अभ्यास मन लावून करीत नाही.*_

                 _*उलटपक्षी, आजचा विद्यार्थीवर्ग फुटबॉल, क्रिकेट आणि पोकळ राजकारणात दंग असतो. विद्यार्जन याला एक मोठा अर्थ असतो. आपली प्राचीन गुरुकुले एकांतात विद्या शिकवीत असत. रानावनातून ही विद्यापीठे प्रस्थापित झाली होती त्याचे मुख्य कारण अरो की, त्यांना विद्येच्या अभ्यासाने नवी दृष्टी यावी, या दृष्टीतून त्यांनी खऱ्या जीवनमूल्यांचा शोध व बोध घ्यावा. पण आजचे विद्यार्थी क्रीडेच्या आणि राजकारणाच्या फंदात ती दिव्य दृष्टी प्राप्त करून घेतच नाही.*_

                   _हिंदी विद्यालयातील शिक्षक मोठ्या कष्टाने, केवळ अंगिकारले आहे म्हणून विद्यादान करीत असतो. स्वयंप्रेरणेने हे विद्यादान होत नाही. शिक्षकाला लागणारी अंतःस्फूर्ती, विद्यादानाची हौस आणि त्यासाठी करावा लागणारा अव्याहत व्यासंग या सर्वांचीच त्यांच्याकडे वानवा असते. किंबहुना अध्यापक पेशाला जे नोकरीचे हिडीस स्वरूप आले आहे आणि तास भरून काढण्यासाठीच त्याला शिकवावे लागत असल्यामुळेच अध्यापक वर्गामध्ये हे शैथिल्य निर्माण झाले असावे ! व त्यामुळे अध्यापकही विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक ज्ञान पाजण्यास असमर्थ झाले आहेत._

                      _*विद्यालयांनी आपल्या फी भरमसाठ वाढविल्या आहेत. या फी अशाच वाढू लागल्या तर विद्यार्थ्यांच्या भावी जीवनावर त्यांचा निश्चितपणे अनिष्ट परिणाम होईल. त्यांचे भवितव्य भयाण होईल. केबन म्हणतो, ' knowledge is Power' ज्ञान ही महान शक्ती आहे, विद्यार्थी वर्गाला जर या ज्ञानाची कास धरून आपल्या देशाचा विकास आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात जरूर लक्ष घालून आपल्या हक्कांसाठी संतत झगडत राहिले पाहिजे.*_

                   _*विद्यापीठाचा कारभार हाकणारी सिनेटमध्ये बसलेली ही क्रियाशून्य जुनी धेंडे गेल्याशिवाय विद्यापीठाचा कारभार सुधारणार नाही. उलट या जुन्या धेंडांकडूनच विद्यापीठात उघड लाचलुचपतीचे प्रकार सुरू आहेत. सिनेटमधल्या सभासदाकडील शिक्षणसाहित्य किंवा शास्त्रीय उपकरणे खरेदी करणाच्या अटीवरच एखाद्या नव्या शाळेला किंवा कॉलेजला मान्यता मिळते. म्हणून विद्यार्थ्यांनीच विद्यापीठाचा कारभार जातीने पाहिला पाहिजे व आपले हित साधले पाहिजे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २९/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३, पान नं ३२२-३२४*_

*_२) जनता : २० डिसेंबर १९५२_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 27 April 2024

शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का ?

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का ?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_27.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                 _डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिनांक २० जुलै १९५२ रोजी महार समाज सेवा संघाने पुष्पहार अर्पण केला, तत्प्रसंगी संघाने इमारत फंडास २६ रुपये देणगी दिली व पुढील निवेदन केले._

           _*कार्यकारी मंडळाने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच आशिर्वादाने सिद्धार्थ बोर्डीग संगमनेर व कर्जत येथे सध्या शिक्षण घेत असलेल्या ७५ मुलांच्या दोन वसतिगृहांची माहिती सांगितली, पैकी कर्जत वसतिगृहास ग्रँट मिळवावयाची आहे. सदर वसतिगृह ग्रँटशिवाय चालविता येणे दुरापास्त आहे.*_

               _सिद्धार्थ बोडींग संगमनेर या संस्थेस थोडी फार सरकारी मदत मिळते. त्यामुळे त्या वसतिगृहासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा विचार चालू आहे. आपण या इमारतीस आशिर्वाद दिल्यास आमचा उत्साह द्विगुणित होऊन हे अवघड काम संघ शिरावर घेऊन पार पाडू शकेल असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले :-_

                _तुम्ही हे सामाजिक कार्य करता त्याबद्दल मला समाधान वाटते. तुमच्या संगमनेर वसतिगृहाच्या इमारत फंडास मी शुभेच्छा प्रगट करतो. *पण मला लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो तो हा की, तुम्ही या समाजाच्या मुलांना स्वतः खस्ता खाऊन शिक्षण देता ती मुले शिक्षण संपादन केल्यानंतर तुमच्या समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का ? तुम्ही त्यांच्याकडून याबाबत काही प्रतिज्ञा लेख लिहून घेता काय ? (नाही. असे उत्तर मिळाल्यावर) पददलित समाजाची सेवा करण्यासाठी आपल्यातील काही मुले शिकून तयार व्हावीत म्हणून मी' सिद्धार्थ कॉलेज' काढले. पण अनुभव मात्र कटु येत आहे. शिक्षण संपादन केल्यानंतर एखादी मोठी नोकरी मिळाली की बस्स ! झाले आपले काम !! मी कोण आहे ? मला शिक्षण कोणी दिले ? कसे दिले ? त्यांनी किती कष्ट केले ? याची तिळमात्र जाणीव न ठेवता हे लोक आपल्या समाजाला विसरतात. या लोकांना काय म्हणावे हेच मला समजत नाही, तेव्हा तुम्ही हा खटाटोप करता तो फुकट आहे असे मला वाटते, नाहीतर त्यांच्यावर काहीतरी बंधनकारक राहील असे करा. कोणाची पोरे बोर्डिंगात आणायची ? त्यांना शिक्षण द्यायचे कोणी ? आणि इतके केल्यावर त्यांनी समाजाकडे ढुंकूनही पाहायचे नाही, हा कृतघ्नपणा नव्हे का ? माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे. पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल ? ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत ? या सर्व गोष्टींचा विचार केला की, मी माझे आयुष्य तुमच्यासाठी फुकट खर्ची घातले, असे वाटू लागते.*_

                 _मुंबईत मी तुमच्यासाठी मोठा हॉल लवकरच बांधणार आहे, त्यासाठी मी त्या दिवशी *दामोदर हॉलमध्ये निवेदन केल्याप्रमाणे तुम्ही किती पैसे जमविले आणि मी किती जमविले हे स्पष्ट केले. माझ्या नावावर तुमचा किती पैसा बँकेत आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगून टाकले आहे. हेतू हा की, माझ्या पश्चात माझ्या मुलानेही त्यावर आपला हक्क सांगू नये व तुम्हालाही त्याची निश्चित कल्पना यावी.* तरी सर्वांनी हा हॉल बांधण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करा. नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, नंतर संगमनेर तालुका, पुढे माझ्या गावापुरते मी पाहीन; ही उतरती दुरावस्था थांबविलीच पाहिजे._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २८/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३, पान नं ३१४-३१५*_

*_२) जनता : २६ जुलै १९५२_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Wednesday, 24 April 2024

हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण केले पाहिजे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण केले पाहिजे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_24.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                   _डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत असल्याचा सुयोग साधून, सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थी-पार्लमेंटने, त्यांना हिंदू कोड बिला' वर भाषण करण्याची विनंती केली. सिद्धार्थ कॉलेज हे डॉक्टरसाहेबांचेच अपत्य असल्याने, त्यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीस मान दिला आणि हिंदू कोड बिलावर भाषण करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे, *ता. ११ जानेवारी १९५० रोजी बुधवारी सकाळी ९.०० वाजता, त्यांचे भाषण, सुंदराबाई हॉलमध्ये भरलेल्या, विद्यार्थी-पार्लमेंटच्या अधिवेशनात झाले.*_

_डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, चेअरमन आणि सभागृहातील सभासदहो,_

             _तुम्हास माहीत आहे की, *मी भारतीय पार्लमेंटमध्ये मांडलेल्या हिंदू कोड बिलावर सध्या वादविवादाचे मोठे रण माजले आहे.* या बिलाचे संपूर्ण विवेचन करावयाचे म्हटल्यास कमीत कमी दोन तास तरी लागतील. तेवढा वेळ तुम्हालाही नाही आणि मला देखील नाही. तरी परंतु तुम्हा विद्यार्थ्यांचा वर्ग हा जागृत व डोळस वर्ग असल्याने जेवढ्या थोड्या वेळात हिंदू कोड बिलावर माझे विचार मांडता येतील तेवढ्या वेळात ते मांडण्याचा मी प्रयत्न करीन._

                 _*या बिलाच्या कलमांची तपशीलवार अशी माहिती तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांना नसेल. कारण, तुम्ही तुमच्या नित्याच्या अभ्यासक्रमात आणि परीक्षेत गुरफटलेले असता तरीपण हे बिल आजच्या व भावी पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने व त्यामुळे आपल्या देशाचे कोणकोणते फायदे होणार आहेत हे नागरिक या नात्याने माहीत होणे जरूर असल्याने सदर बिलासंबंधीचे काही विशेष मी सांगणार आहे.*_

                 _हिंदू कोड बिलामागे मुख्यतः दोन उद्दिष्टे आहेत._ 

_*१) हिंदू कायदा सर्व देशभर सुसूत्र करणे हे पहिले उद्दिष्ट आहे. यालाच इंग्रजी भाषेत' कोडीफिकेशन' म्हणतात*_

आणि 

_*२) हिंदू कायद्याच्या काही शाखांची सुधारणा घडविणे हे दुसरे उद्दिष्ट आहे. या दुसऱ्या उद्दिष्टावरच सर्व वादविवाद केंद्रित झाला आहे.*_

               _पहिल्या उद्दिष्टापुरतेच बोलावयाचे झाल्यास त्याबद्दल कोणाचा वाद नाही आणि असणेही शक्य नाही. हिंदू कायद्याच्या सुसूत्रीकरणावर जवळ जवळ सर्वांचे एकमत आहे. कारण कोणताही कायदा घेतला तर त्यास ज्या काही मूलभूत कसोट्यांची पूर्तता करावी लागते त्या कसोट्या हिंदू कायद्यास आणणे जरूर आहे._

_कोणताही कायदा तीन मूलभूत कसोट्यास उतरावा लागतो. या कसोट्या अशा :-_

*_१) कायदा' निश्चित 'असावा लागतो. त्याच्या कोणत्याही कलमाबद्दल अगर तरतुदीबद्दल शंका, संदिग्धता राहाता कामा नये. त्याचा अर्थ सुस्पष्ट, स्वच्छ असला पाहिजे. कायद्यावरची ही पहिली कसोटी आहे._*

_*२) कायदा हा सर्व ठिकाणी सारखा असावा लागतो. प्रादेशिक फेरफारांनी तो जखडलेला असता कामा नये. मुंबईस खून झाला तर आरोपीस जी शिक्षा मिळाली तीच शिक्षा त्रिचनापल्लीस झालेल्या खुनाबद्दल तेथील आरोपीस मिळाली पाहिजे. कायद्याची ही दुसरी कसोटी आहे.*_

_*३) कायदा सर्व जनतेला आश्रय घेता येईल असा माफक व सुबोध असला पाहिजे. आपले हक्क काय आहेत हे दरेक नागरिकास समजले पाहिजे. हरघडी त्याने वकिलावरच विसंबले पाहिजे असा कायदा असू नये. कायद्याची ही तिसरी कसोटी आहे.*_

    _या कसोट्यांवर आजपर्यंत हिंदू कायदा वाचून पाहिला तर काय दिसते ? *वरील कसोट्यांपैकी एकाही कसोटीस हिंदू कायदा उतरत नाही.* जगातील भोंगळ कायद्याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास हिंदू कायद्याचेच द्यावे लागेल. हिंदू कायद्याइतका अनिश्चित, एकसुत्रीपणाचा अभाव असलेला आणि महाग कायदा जगात सापडणार नाही. या बाबतीत आणखी विवेचन करण्याचे कारण नाही. *हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण केले पाहिजे ही गोष्ट सर्वांना मान्य आहे.*_

             _आता, हिंदू कोड बिलामागील दुसऱ्या म्हणजे सुधारणा करण्याच्या उद्दिष्टाकडे वळू. वर सांगितल्याप्रमाणे या बाबतीतच विरोधकांनी आकांडतांडव चालविले आहेत. हिंदू कायद्यामध्ये सदर बिलान्वये कोणती सुधारणा सुचविली आहे हे पाहिल्यास विरोधकांचे म्हणणे रास्त आहे की गैर हे दिसून येईल._

*_हिंदू कोड बिलान्वये एकंदरीत पाच प्रकारच्या सुधारणा सुचविल्या आहेत. त्यापैकी दरेक प्रकारच्या सुधारणेची थोडी माहिती घेणे अवश्य आहे._*

*_१) पहिली सुधारणा विवाह, दत्तक आदीविषयी जो जातीचा संबंध येई त्यासंबंधीची आहे. जुन्या व चालू हिंदू कायद्याप्रमाणे विवाह व दत्तक हा ज्या त्या जातीतच घडत असे व आजही घडतो. जर दुसऱ्या जातीतील व्यक्तिशी विवाह झाला, अगर दुसऱ्या जातीचा दत्तक घेण्यात आला तर तो विवाह व दत्तक हिंदू कायद्याप्रमाणे रद्द समजण्यात येत असे. अशा त-हेने, हिंदू समाज व कायदा हे दोन्ही जातीवरच अधिष्ठित झालेले आहेत. ज्यास जात नाही असा हिंदूच नाही. ही गोष्ट हिंदू कोड बिलात अमान्य करण्यात आली आहे. हिंदू कोड बिलान्वये जातीचे उच्चाटन व्हावयाचे आहे. नव्या कायद्याने जातीची बंधने नाहिशी होणार असून कोणत्याही जातीत विवाह व दत्तक होऊ शकेल._*

_*२) दुसरी सुधारणा एकपत्नीत्व पाळण्यासंबधी आहे. प्रचलित व पुरातन हिंदू कायद्याप्रमाणे हिंदूस हव्या तितक्या स्त्रियांशी विवाह करता येतो. अनेक पत्नीत्वासंबंधी मुसलमानी कायद्यावर टीका करण्यात येते. परंतु हिंदू कायद्यात व मुसलमानी कायद्यात या बाबतीत बराच फरक आहे, तो हा को जो पुरुष चारही स्त्रियांना इन्साफ देऊ शकेल म्हणजेच त्यांचे वैवाहिक जीवन सुखाने सांभाळू शकेल, त्यासच ४ स्त्रियांशी विवाह करता येईल, अशी अट हिंदू कायद्यात नाही.*_

               _हिंदू कायद्याप्रमाणे एका पुरुषाला अनेक स्त्रियांशी लग्न करण्याचे केवळ तात्त्विक स्वातंत्र्य आहे असे नव्हे. त्याची प्रत्यक्षात अनेक उदाहरण आहेत. *बंगालमध्ये कुलीन विवाह पद्धती म्हणून एक पद्धत आहे. त्या पद्धतीप्रमाणे एका माणसाने ५०० स्त्रियांशी लग्ने केली तरी चालतात.* असेच एका बंगाल्याने ५०० बायका केल्या होत्या. पंढरपूरच्या यात्रेच्या वेळी एखादा पंड्या जसा यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंची नावे-गावे एका रजिस्टरात नोंदतो त्याप्रमाणे या बंगाली माणसाने आपल्या बायकांची नावे, वय व पत्ता एका रजिस्टरात नोंदून ठेवली होती. त्याच्या बायका ठिकठिकाणी गावोगावी असत. नवरा-बायको म्हणून त्यांचा संबंध नसे आणि तसे त्याचेवर बंधनही नव्हते त्यामुळे तो बंगाली नवरा दर गावी जाऊन आपली बायको धुंडाळी आणि वर दक्षिणाही घेई. ही आमची बहुपत्नित्वाची चाल इतकी भयंकर दयाशून्य आहे. हिंदू-कोड-बिलाचे रूपांतर कायद्यात झाल्यावर ही पद्धती बंद करण्यात येणार आहे. नवीन कायद्याप्रमाणे एका हिंदूस फक्त एक बायको करता येईल._

_*३) तिसरी सुधारणा घटस्फोटासंबंधी आहे. सध्याच्या कायद्याप्रमाणे बायको ही नवऱ्याची अर्धांगी समजली जाते. एकदा लग्न केले की तिला कोणत्याही कारणास्तव विभक्त होता येत नाही की काडीमोड घेता येत नाही. हिंदू कायद्याप्रमाणे विवाहाच्या गाठी न सुटणाऱ्या मानल्या जातात. *खरे म्हणजे, ज्या स्त्रीचे नवऱ्याशी अगर ज्या नवऱ्याचे स्त्रीशी पटतं नाहीं त्यांना एकत्रित ठेवण्याची सक्ती करणे केव्हाही रास्त नाही.* तेव्हा काही ठराविक अटींवर नवरा-बायकोस काडीमोड मिळण्याची सवलत हिंदू कोड बिलात ठेवण्यात आली आहे.*_

_*४) चवथ्या सुधारणे अन्वये हिंदू कायद्यातील 'कोपारसिनरी' पद्धती नष्ट करण्यात आली आहे. पूर्वजाकडून जी इस्टेट चालत येते त्यावरील वंशजाच्या हक्कासंबंधी सध्या दोन पद्धती रूढ आहेत. एक मिताक्षरा व दुसरी दायभाग. मिताक्षरा ही बंगालखेरीज सर्व प्रांतात चालू असून त्या पद्धतीनुसार बापाच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व मुलांना जन्मसिद्ध हक्क म्हणून वाडवडिलाची संपत्ती मिळू शकते. ती विकावयाची असल्यास त्या मुलांच्या संमतीची जरूरी असते. त्या पद्धतीला प्रतिबंधदाय असेही म्हणतात. दायभाग ही पद्धती बंगाल प्रांत व आजूबाजूचा काही भाग या ठिकाणी आहे. या पद्धतीमध्ये मुलांना अशाप्रकारचा कोणताही वारसा हक्क नसून बापाच्या मृत्यूनंतरच मुलांचा वडिलार्जित संपत्तीवर अधिकार येतो. याशिवाय तिसरीही एक पद्धत आहे ती म्हणजे वारसा हक्काचा कायदा (THE LAW OF SUCCESSION). परंतु तो हिंदुना लागू नाही. तेव्हा, नव्या बिलात मिताक्षरा पद्धत रद्द करण्यात आली असून दायभाग' ही पद्धत सर्वत्र रूढ करण्यात येणार आहे. यामुळे सर्वत्र सुसंबद्धता येईल आणि इस्टेटीचा योग-विनियोग करण्यास बाप मोकळा राहील. त्यामुळे संपन्नता वाढण्यास व आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.*_

_*५) पाचवी व शेवटची सुधारणा स्त्रियांना इस्टेटीत मिळणाऱ्या हक्कासंबंधी आहे. आज स्त्रियांना संपत्तीत संपूर्ण मालकी गाजविता येत नाही. तिला बक्षीस म्हणून लग्नाच्या वेळी जी रक्कम किंवा दागिने मिळतात तेच तिचे धन म्हणून समजले जाते. मुलीच्या हक्कासंबंधीचा भेदाभेद काढून टाकण्यात येणार आहे. बापाच्या मिळकतीत मुलाप्रमाणे मुलींनाही यापुढे योग्य तो वाटा मिळत जाईल. म्हणजे मुलगा-मुलगी असा भेद हा कायदा जाणणार नाही. स्त्रीला समान वाटा मिळेल. आतापर्यंत ही योजना नव्हती. १९३७ पूर्वी तर विधवांनासुद्धा आपल्या पतीच्या मिळकतीवर हक्क सांगता येत नव्हता. १९३७ साली त्यासाठी एक नवा कायदा करण्यात आला. परंतु या कायद्यात मर्यादित मालकी व मुलींचा समान वारसा हक्क मान्य करण्यात आला नव्हता. या नव्या हिंदू कायद्यान्वये हे दोन दोष काढून टाकण्यात आले आहेत.*_

              _या सर्व विवेचनाकडे पाहिले की, एक गोष्ट तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल, ती ही की सुधारणा कशी करावी अगर कोणत्या प्रकारची करावी याबद्दल मतभेद असणे शक्य आहे. परंतु सुधारणा नको असे मुळीच म्हणता यावयाचे नाही._

            _या सुधारणेकडे पाहाण्याचे तीन दृष्टिकोन संभवतात. त्या दृष्टीवरच तुमचा विरोध कशा प्रकारचा आहे हे कळून येईल._

१. एक म्हणजे बुद्धिवादी दृष्टिकोनातून या सुधारणांकडे पाहाता येईल. 

२. दुसरे म्हणजे तौलनिक अभ्यास करून या सुधारणांकडे पाहाता येईल आणि 

३. तिसरा दृष्टिकोन सनातन्यांचा येईल. 

           _पहिल्या दोन प्रकारचे जे लोक आहेत त्यांचा विरोध असण्यापेक्षा कोणत्या पद्धतीने हे संहतीकरण घडवून आणावे याच्याबाबत मतभेद होतील. परंतु यात अंतर्भूत असणाऱ्या मूलभूत तत्त्वांना त्याचा विरोध असणार नाही._

_*सनातन्यांचा दृष्टिकोन जीवनात स्वीकारणे शक्य आहे काय ? आज जीवनातील सर्व गोष्टीवर राज्यघटनेचे प्रभुत्व पडत आहे. तिला सार्वभौमत्व आहे. मी हे जाहीर करू इच्छितो की, मनूचा अधिकार आता संपला आहे.*_

                _आपल्या देशात सनातनी वृत्तीचा प्रभाव जास्त आहे. म्हणून अशा बहुसंख्य समाजाला बरोबर घेऊन जावयाचे असल्यामुळे त्याचीही विचारसरणी  मी समजावून घेऊ इच्छितो. परंतु तसे करीत असताना माझ्या मनात एक प्रश्न येतो की, या नव्या हिंदू कोड बिलात ज्या सुधारणा आहेत त्यांना आपल्या जुन्या धर्मशास्त्राचा आधार नाहीच काय ? मी काही संस्कृत तज्ञ नाही. हिंदू कायद्याचा पंडितही नाही. परंतु थोडासा मी हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यावरून मला आपल्याला कोणत्या ना कोणत्या शास्त्रातील काही आधार देता येतील._

(१) सध्याचा हिंदू कायदा जात मानतो. ही जात आईप्रमाणे मानली जाते. कारण हा कायदा 'मातृसावर्ण्य' मानतो. हा मातृसवर्णाचा नियम विश्वव्यापी आहे का ? आदिकाळापासून हा नियम चालत आला आहे का? की मातृसवर्णाचा नियम नवीन आहे? नवीन असला तर जुना नियम काय होता? हे प्रश्न आपण पाहिले पाहिजे.

_आज जातीचा प्रश्न येतो तसा प्राचीन काळीही येत होता. जन्मलेल्या मुलाची जात बापाच्या जातीवरून ठरवावयाची की आईच्या ? याबद्दल मनुस्मृतीत अवांतर वर्णाची एक पद्धती सांगितलेली आहे. बाप ब्राह्मण असला व आई क्षत्रिय असली तर मुलाची जात ब्राह्मण मानावी पण बाप ब्राह्मण आहे व आई वैश्य असेल तर मुलाची जात वैश्य मानावी असा एक संकेत या स्मृतीत सांगितला आहे. पण मनुस्मृतीच्या अगोदरच्या ग्रंथात बापाची जी जात असेल तीच जात राहील, असे सांगणारी उदाहरणे आढळतात. राजवाडे यांच्या राधामाधवविलासचंपूत अशी एक जंत्रीच दिली आहे. क्षत्रिय जातीचा शंतनू व शूद्र जातीची गंगा यांच्यापासून झालेल्या भीष्माला क्षत्रीय मानण्यात येते. कृष्णद्वौपायन हा पराशराचा मुलगा. पराशर हा ब्राह्मण व मत्स्यगंधा ही कृष्णद्वौपायनाची आई जातीने कोळी आहे. पण कृष्णद्वौपायन ब्राह्मण समजण्यात येतो. विश्वामित्र हा क्षत्रिय व मेनका ही अप्सरा त्यांच्यापासून जन्मलेली शकुंतला क्षत्रिय आहे. तर जरत्कारू हा ब्राह्मण व जरत्कारी या नागिणीपासून जन्मलेला आस्त हा ब्राह्मण आहे. बापाची जी जात तीच मुलाला लावण्यात येत असे व आज तीच पद्धत अंगिकारली तर जुन्या रूढीचा भंग कोठे होतो, असा माझा सवाल आहे._

(२) दुसरी अट पहिल्या पत्नीच्या निर्वाहासाठी अगोदर भरपूर रक्कम देण्याची तयारी असल्यास, ही अट सर्वात कठीण आहे.

तेव्हा या अटीचा अर्थ एकच आहे की कौटिल्याला एकपत्निक पद्धती हवी होती.

_*नव्या हिंदू कायद्यात ज्या घटस्फोटाच्या अटी आहेत त्याला पराशर स्मृतिचा आधार देण्यासारखा आहे. पराशर स्मृतीत स्त्रीला दुसरा विवाह करावयाचा असेल तर नवरा हा नपुंसक असावा लागतो किंवा तो बेपत्ता किंवा तो मृत झाला असेल तरीही द्वितीय विवाह करता येतो. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, पुरुषाला स्त्रीपासून विभक्त होण्याचा अधिकार पहिल्या अटीत मान्य करण्यात आला आहे. आम्ही या हिंदू कोड बिलात घटस्फोट घेण्याच्या अटी आणखी वाढवून त्याची व्याप्ती विस्तृत केली आहे. म्हणजे घटस्फोटाच्या मुद्यावर पराशर स्मृतीसारखा दुसरा अधिकारपूर्ण आधार नाही, असे म्हणावयास हरकत नाही.*_

_स्त्रियांच्या वारसा हक्कासंबंधी प्रख्यात स्मृतिकार बृहस्पति याचा आधार देता येईल. त्याने असे म्हटले आहे की, विधवेच्या संपत्तीवर कोणालाही वारसा हक्क सांगता येणार नाही. त्याला कारण सांगताना तो म्हणतो की, स्त्री ही पुरुषाची अर्धांगी असल्यामुळे निधनानंतर तो अर्धांगीच्या रूपाने जगतो. म्हणून अर्धांगीच्या धनावर कोणाचाही अधिकार चालू शकणार नाही. मला वाटते हे त्याचे विधान अत्यंत सामर्थ्यवान व पटणारे आहे._

_*मिताक्षरी वारसा हक्काच्या पद्धतीला मनूचाही विरोध होता हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. तुम्हाला मी हे सांगितले तर आश्चर्य वाटेल की मनुसुद्धा एकत्र कुटुंबपध्दतीचा विरोधक होता. कुटुंबाच्या मालमत्तेला त्याचा विरोध होता.* पूर्वी यज्ञ हे सर्वश्रेष्ठ कर्म समजले जात असे. यज्ञ जितके जास्त तितका धर्माचा प्रचार जास्त असा आर्यांचा समज होता. *स्त्रियांना वेदाभ्यासाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना यज्ञ करता येत नसे. त्यामुळे त्यांचा संपत्तीवरती अधिकार नसे.* पूर्वी यज्ञ व संपत्ती यांचा संबंध निकटचा होता. तेव्हा मनूचा युक्तिवाद पुढीलप्रमाणे आहे. तो म्हणतो :- " धर्माचा प्रसार जास्त व्हावयाचा असेल तर यज्ञ जास्त हवेत हा नियम लागू करावयाचा कुटुंबपद्धतीमुळे पक्षाची संख्या कमी होणारी धर्मदृष्टीनेच एकत्र कुटुंबपद्धती ही धर्मविरोधी नाही काय ? आणि वारसा पद्धतीचा आधार तर एकत्र कुटुंबपद्धती आहे. *मला सनातन्यांना असे विचारावयाचे आहे की तुमचा मनू हा एकत्र कुटुंबाला विरोध करीत होता है मानाल काय ?*_

_*यानंतर दत्तक पद्धतीचा प्रश्न पाहू.* हिंदू दत्तक पद्धतीचा उगम कशात आर हे सुद्धा पाहिले पाहिजे. *मनूच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू माणसाला फेडाव्या लागणाऱ्या चार ऋणापैकी पितृऋण फेडण्यासाठी एकच पुत्र पुरे एकापेक्षा जास्त पुत्र असणे हे वैषयिक अभिलाषेचे चिन्ह आहे. म्हणून मनु इतर पुत्राचा संपत्तीवरील हक्कही मान्य करावयास तयार नाही तेव्हा यावरूनही असे म्हणता येईल की मिताक्षर ही वारसाहक्काची पद्धत मनूच्या नंतरची आहे. मनूने या इतर पुत्रांचा हक्क अमान्य केल्यामुळे एक पेचप्रसंग उत्पन्न झाला आणि त्यातूनच दत्तक पद्धती आली.* आपस्तंभ-सूत्रात तर पुत्राच्या विक्रयाला किया दानाला खंबीर विरोध केला आहे. *तेव्हा दत्तकविधान हे तरी शास्त्रसंमत आहे काय, असे मला सनातन्यांना विचारावयाचे आहे. परंतु पुढे समाजाची निकड लक्षात घेऊन वशिष्ठस्मृतीत बदल करण्यात आला. त्याने म्हटले की, हे आपस्तंभ स्मृतीचे बंधन फक्त जेष्ठ पुत्राच्या बाबत आहे. बाकीच्या पुत्रांना दत्तक जाता येईल. तेव्हा अशारीतीने दत्तक पद्धती आली.*_

                _तेव्हा या सर्व गोष्टींचा आधारपूर्वक विचार केल्यावर आपण असे ठामपणे म्हणू शकतो की, आजचा रूढ हिंदू कायदा हाच शास्त्रसंमत नाही. हिंदू धर्मशास्त्राशी त्याचा मुळीच संबंध नाही. मूळच्या शास्त्रापेक्षा त्यात खूप बदल झालेला आहे. सनातनी लोक शास्त्रांचा नीट अभ्यास करीत नाहीत. असेच मला म्हणावयाचे आहे. उलट मी तर असे म्हणतो की, आमच्या नव्या सुधारणानाच कोणत्या ना कोणत्या शास्त्राचे आधार आहेत._

             _म्हणून माझे असे स्पष्ट मत आहे की, नवे हिंदू कोड बिल हे क्रांतीकारक किया जहाल नाही. मी किनाऱ्यालगत बोट हाकणारा मनुष्य आहे. पॅसिफिकमध्ये प्रवास करावयास जाणाऱ्या एकाकी धाडशी प्रवाशाप्रमाणे मी नाही. तसेच जहाल आहे. या गोष्टीचा सर्वांनी विचार करावा._

            _*आम्हाला दुसराही एक प्रश्न विचारला जातों की आम्ही हिंदुना त्रास देन्यासाठी हे बिल करीत आहोत. हिंदू शास्त्रात चुका आहेत, दोष आहेत पण ते तसेच राहू द्या. तुम्ही हस्तक्षेप कशाला करता ? हिंदू दुबळे आहेत. अहिंसावादी आहेत म्हणून आम्ही त्यांना त्रास देतो असे त्याचे म्हणणे आहे. मुसलमानांच्या धर्मात ढवळाढवळ केली तर ते हिंसात्मक कृत्ये करतील, सरकारविरुद्ध प्रक्षोभ उत्पन्न करतील म्हणून आम्ही त्यांच्या कायद्यात हस्तक्षेप करण्यास भीत आहोत, असा त्यांचा आरोप आहे. हिंदू भुसभुशीत आहेत म्हणून आम्ही त्याच्या कायद्याचे संहितीकरण करतो आहोत, हे सपशेल खोटे समज आहेत.*_

              _*आमचे तर असे स्पष्ट मत आहे की, धर्माचा व भौतिक अधिकाराच्या हक्कांचा काही संबंध असू नये. सर्व देशासाठी एक सिव्हिल कोड असावे, असे आम्हालाही वाटते. तशाप्रकारची तरतूद आपल्या राज्यघटनेत आहे व तसे त्यात दिग्दर्शन आहे.*_

            _*परंतु हे सिव्हिल कोड कसे होणार ?* ते स्वर्गातून अवतरेल की परदेशातून आयात करता येईल ? कायदा हा उत्क्रांत व्हावा लागतो. वस्तुस्थितीतून तो बाहेर येतो. म्हणून *हिंदू कोड ही नव्या सिव्हिल कोडची पहिली पायरी आहे. त्यासाठी आज हिंदुंच्या कायद्याचे संहितीकरण हवे आहे. त्यातून आपणाला 'महत्तम साधारण विभाजक काढता येईल. मग आपण मुसलमान इत्यादी अल्पसंख्यांकांकडे जाऊन त्यांना या नव्या सुधारणेची दिशा दाखवू शकू परंतु माझ्या हातात काही मुद्दे असल्याखेरीज नवे सिव्हील कोड बिल तयार करणे शक्य आहे काय ? या गोष्टीचा विरोधकांनी विचार करावा. हिंदुचा पक्षपात करावा असा यात उद्देश नाही. यात फक्त आपल्या सिव्हिल कोडाला अवश्य ती भूमिका तयार करण्याचा उद्देश आहे.*_

             _या बिलात एकान्तिकता नाही. सनातनी मतांना विरोध नाही. फक्त नव्या मतांना, नव्या आचारविचारांना मान्यता दिलेली आहे. ज्यांना नवी मते, नवे आधार मान्य नसतील त्यांनी ते पाळावेत असा या बिलाचा आग्रह नाही._

एखाद्या सनातनी गृहस्थाला आपल्या मिळकतीतील भाग आपल्या मुलींना द्यावयाचा नसेल तर त्याने आपल्या मृत्यूपत्रात तसा स्पष्ट उल्लेख करावा अगर आपली मुलगी हिंदू नाही, असे म्हणावे. ही हिंदू-स्मृती त्याला पूर्ण स्वातंत्र्य देत आहे. तुम्ही अशा रीतीने नव्या सुधारणांपासून मुक्ती होऊ सनातनी वृत्तींचा त्यात नाश आहे. हे थोतांड आहे. आहे. हा उत्कृष्ट सुवर्णमध्य आहे. अशा रीतीने सनातन्यांनी आपला मार्ग फार तर आपणच चोखाळावा पण इतरांकडे त्याच मार्गासाठी आग्रह करू नये.

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Friday, 12 April 2024

चित्ताचे दमन सुखदायक आहे

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_चित्ताचे दमन सुखदायक आहे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/35.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_दुन्निग्गहस्स लहुनो यत्थकाम-निपातिनो ।_* 

*_चित्तस्स दमथो साधु चित्तं दन्तं सुखावहं ॥_* 

*_अर्थ - ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे. जे फार चपळ आहे, जेथे वाटेल तेथे झटकन जाते अशा चित्ताचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले चित्त फार सुखदायक असते._*

             _कोशल देशात पर्वताच्या पायथ्याशी मातिगाम नावाचे एक गाव होते. *तेथे एका उपासिकेने चार प्रतिसम्पदा आणि पाच अभिज्ञेसह अनागामी फळ प्राप्त केले.* जे भिक्षु तिच्याकडे रहात होते, ती सर्वांच्या चित्ताला जाणून त्यांच्या भोजनादिची व्यवस्था करीत होती. एक भिक्षु तीची प्रशंसा ऐकून तेथे गेला आणि काही दिवसातच परत आला. तथागतांनी विचारले - "हे भिक्षु ! तू त्या ठिकाणी थांबला का नाही?" होय भन्ते ! त्या ठिकाणी थांबणे कठीण आहे. ती उपासिका मनात येणारा विचार पूर्वीच जाणते. निवाश्यांचे विचार चांगलेही असू शकतात आणि वाइट ही. वाईट विचार येताच मुद्देमालासह चोरास पकडून द्यावे तसा ती निग्रह करील. मी तेथे थांबू शकत नाही."_

                _तेव्हा तथागतांनी त्या भिक्षुस पुन्हा तेथेच जाण्यास सांगितले पण तो जाण्यास राजी झाला नाही. हे लक्षात येताच तथागत म्हणाले *"भिक्षु ! जर तू तेथे जात नाहीस तर, स्वतःच्या चित्ताचे रक्षण कर त्यांचा निग्रह कर."* त्यानंतर त्यांनी ही गाथा म्हटली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १३/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - चित्तवग्गो*_

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान

(बाबासाहेबांच्या १३३व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा जुना लेख)


कार्लाईलच्या मते सत्य हा थोर पुरुषाचा पाया आहे. मात्र जर सत्यनिष्ठा आणि बुध्दी बरोबरच समाजाच्या गतिमानते बद्दल तळमळ असेल तर हा पुरुष महापुरुष होत असतो कारण महापुरुष समाजाच्या शुध्दीकरणाचे आणि प्रशासकाचे काम करीत असतो. ही कसोटी पाहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापुरुष का संबोधले जाते हे आपल्याला कळते.


बाबासाहेबांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक प्रवास हा थक्क करणारा आहे. असमतेने जातीपातीत विभागलेल्या आणि कायम शोषित राहिलेल्या समाजाला स्वातंत्र्य, समतावादी व मानव मुक्ती आणि कल्याणाचा मार्ग असलेल्या बौध्द धम्माची दीक्षा दिली. मात्र केवळ दीक्षा देऊन बाबासाहेब थांबले नाही तर ‘The Buddha and His Dhamma’ आणि ‘पालि व्याकरण व  शब्दकोश’ सारखे ग्रंथ लिहिले ज्यामुळे बाबासाहेबांचे पालि भाषेबद्दलचे प्रेम, आदर आणि दूरदृष्टी दिसून येते.


१९४० नंतर म्हणजे वयाच्या पन्नाशी नंतर बाबासाहेबांनी ‘पालि व्याकरण व शब्दकोश’ लिहिला. त्यांचे हे काम अद्वितीय होते. त्यांच्या या ग्रंथाची तुलना १७५५ मधे डॉ. स्यामुअल जॉन्सन यांच्या इंग्रजी शब्दकोशाशी केली जाते मात्र त्यात एक मोठा फरक आहे. डॉ.जॉन्सनने जेव्हा इंग्रजीचा शब्दकोश लिहिला तेव्हा इंग्रजी ही जागतिक भाषा होऊ पाहत होती तर बाबासाहेबांनी जेव्हा पालि शब्दकोश लिहिला तेव्हा पालि जवळपास एक मृत भाषा होती. आणि मृत भाषा प्रवाहात नसल्यामुळे त्यातील वेगवेगळे शब्द शोधून, त्यांचे अर्थ व वाक्य रचना करणे हे महाकठीण काम बाबासाहेबांनी केले. या शब्दकोशात बाबासाहेबांनी पालि भाषेतील शब्दांना इंग्रजी, मराठी, गुजराती आणि हिंदी मधील अर्थ दिले आहेत. एवढंच नव्हे तर वाक्य रचना कशी करावी व दोन व्यक्तींमधील घरगुती अथवा व्यावसायिक संवाद पालि मधे कसा असतो हेही दाखवून दिले. त्यामुळे हा शब्दकोश जगातल्या इत्तर सर्व शब्द्कोशांपेक्षा वेगळा ठरतो. चाईलडर्सने पालि इंग्रजीमधे शब्दकोश लिहिला होता पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याचा उपयोग नव्हता.  पालिमधे कच्चायन व्याकरण सर्वात जुने आहे. या ग्रंथात बाबासाहेबांनी पालि भाषेचे व्याकरण अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे  त्यामुळे पालि भाषा व तिचे व्याकरण शिकताना सोपे जाते. भविष्यात भारतात बौध्द धम्माचे आकर्षण वाढेल आणि बुध्द विचार समजून घेण्यासाठी लोक पालि भाषा शिकतील हा दुर्दृष्टीपणा ठेऊन बाबासाहेबांनी ‘पालि शब्दकोश व व्याकरण’ हा ग्रंथ लिहिला जो आजही पालि भाषा शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.  


‘The Buddha and His Dhamma’ हा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांनी संपूर्ण पालि त्रिपिटकाचा अभ्यास केला होता याची साक्ष या ग्रंथाच्या प्रत्येक पानावर दिसते. हा ग्रंथ १९५० ते ५६ या कालावधीत बाबासाहेबांनी प्रकृती साथ देत नसतानाही अतिशय सखोल आणि तार्किकरित्या निर्माण केला. पालि त्रिपिटकामधे काही विरोधभासी वाक्यांवर बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केले व भ.बुद्धांच्याच पालि वचनांचा आधार घेत स्पष्टीकरणही दिले.  या ग्रंथात बाबासाहेबांनी तळटीप न दिल्यामुळे अंतराष्ट्रीय स्तरावर काही जणांनी या ग्रंथावर शंका घेतली, मात्र १९६१ मधे डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन यांनी बाबासाहेबांनी या ग्रंथातील कोणती वाक्य पालि त्रिपिटक मधील कोणत्या सुत्तातील आहेत हे शोधून काढले व बाबासाहेबांनी लिहिलेला ‘The Buddha and His Dhamma’ या ग्रंथाला पालि त्रिपिटकच आधार असल्याचे सिद्ध केले.  पालि त्रिपिटक हे तुलनेने प्रचंड आहे. बायबल पेक्षा ११ पटीने मोठे आहे. पिढी दर पिढी मौखिक रूपाने बुध्द वचनांचा प्रसार होत होता. त्यामुळे नकळतपणे त्यात काही अघटीत घटनांचा उल्लेख आला आहे. बाबासाहेबांनी अशा प्रत्येक घटनेचे खंडन केले आहे व सर्वसामान्यांना बोध होईल असा बुध्दांचा इतिहास आणि त्यांचा धम्म लिहिला.  


महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास 'बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौध्द धम्म पुनर्जीवित करताना असा खांब उभा केला आहे कि कोणी तो हलवू शकणार नाही.’ बौध्द धम्म आणि बौध्द समाजासाठी जे योगदान बाबासाहेबांनी नागपूर येथे दीक्षा देऊन केले त्यापेक्षा कैक पटीचे योगदान बाबासाहेबांनी हे दोन ग्रंथ लिहून दिले आहे.


डॉ.बाबासाहेबांना १३२ व्या जयंतीदिनी खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर ती पालि भाषा शिकून द्यायला हवी तरच या महापुरुषाच्या कष्टाचे चीज होईल.


अतुल भोसेकर

अध्यक्ष, बौद्ध साहित्य प्रसारक मंडळ

9545277410

Thursday, 11 April 2024

अस्थिर मनाला स्थिर करा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अस्थिर मनाला स्थिर करा_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_11.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_फन्दनं चपलं चित्तं दुरक्खं दुन्निवारयं ।_*

*_उजु करोति मेधावी उसुकारो व तेजनं ॥_* 

*_अर्थ - चित्त हे ओढाळ, चंचल दुर्निवार व दुर्धर आहे. बाण बणविणारा जसा बाणाला सरळ करतो तसा मेधावी अधवा बुध्दिवान पुरुष अशा चित्ताला एकाग्र व सरळ करतो._*

              _एकदा तथागत चालिका नगरात चालिक नामक पर्वतावर विहार करीत होते. त्यावेळी आयुष्यमान मेधिय स्थविर हे त्यांचे उपस्थापक होते. आयुष्यमान मेधिव एकदा बुद्धांकडे आले व किमिकाला नदीकिनारी आम्रवनात विहार करण्याची परवानगी मागू लागले. तथागत म्हणाले " मेधिव ! मी एकटाच आहे. दुसरा भिक्षु येईपर्यन्त थांब." मेधिय स्थविर तथागतांचे न ऐकताच न थांबताच तेथुन निघून गेले. त्यांचे चित्त एकाग्र होत नव्हते. नाना प्रकारचे वितर्क उत्पन्न होत होते. संध्याकाळी परत येऊन त्यांनी हा प्रकार तथागतांना सांगितला. तथागत म्हणाले - *"मेधिय ! भिक्षूने इच्छाचारी होऊ नये. हे चित्त क्षणिक आहे, याला आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे"* पुढे उपदेश करतांना त्यांनी ही गाथा सांगितली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १२/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - चित्तवग्गो*_

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Wednesday, 10 April 2024

कचऱ्यातुन सुद्धा कमलपुष्प उगवते

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_कचऱ्यातुन सुद्धा कमलपुष्प उगवते_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_10.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_यथा संकारधानस्मेिं उज्झितस्मिं महापथे ।_* 

*_पदुमं तत्थ जायेथ सुचिगन्धं मनोरमं ॥_* 

*_एवं संकारभूतेसु अन्धभूते पुथुज्जने ।_* 

*_अतिरोचति पञ्ञाय सम्मासम्बुध्दसावको ॥_*

*_अर्थ - ज्याप्रमाणे महामार्गावर टाकलेल्या कचऱ्याच्या उकिरड्यावर मनोरम व पवित्र गंध असलेले कमळ उगवते, त्याप्रमाणे उकिरड्यासम बनलेल्या व अन्ध झालेल्या अज्ञ (सामान्य) जनात सम्यक सम्बुध्दाचा शिष्य (श्रावक) प्रज्ञेने झळकतो._*

              _श्रावस्तीत सिरीगुत्त आणि गरहदिन्न नावाचे दोन मित्र राहत होते. सिरीगुत्त बुद्धांचा उपासक होता आणि गरहदिन्न निगंट्ठ श्रावक यांचा. गरहदिन्नाच्या वारंवार आग्रहामुळे सिरिगुत्ताने निर्ग्रन्थांना एकदा आमंत्रित करून गूथ खड्डयात पाडून फटफजिति केली. याचा वचपा काढण्यासाठी काही दिवसानंतर गरहदिन्नाने पाचशे भिक्षुंसह बुद्धांना निमंत्रित करून त्यांना अग्निकुंडात झोकून देण्याचे ठरविले. परंतु जेव्हा बुद्ध भिक्षुंसह गेले तेव्हा त्या अग्निकुंडात कमल पुष्प उगवले. हे पाहून गरहदिन्न आश्चर्यचकित होऊन बुद्धांना शरण आला. भोजनानंतर बुद्ध दानानुमोदन करतांना *"हे प्राणी प्रज्ञाचक्षुच्या अभावामुळे बुद्धशासनातील श्रावकांच्या गुणांना ओळखत नाहीत, कारण प्रज्ञाचक्षु नाही ते आंधळे आणि प्रज्ञावान चक्षुष्मान."* असे म्हणाले आणि ह्या दोन गाथा सांगितल्या._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ११/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

अर्हतपद प्राप्त भिक्षुचा मार्ग माराला सापडत नाही

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अर्हतपद प्राप्त भिक्षुचा मार्ग माराला सापडत नाही_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/57.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_तेसं सम्पन्नसीलानं अप्पमादविहारिनं ।_*

*_सम्पदा विमुत्तानं मारो मग्गं न विन्दति ॥_*

*_अर्थ - त्या शीलसम्पनांचा, अप्रमादाने वागणाऱ्यांचा, सम्यक ज्ञानामुळे मुक्त झालेल्यांचा मार्ग माराला सापडत नाही._*

               _आयु. गोधिक राजगृहाच्या इसिगिली पर्वताच्या कालशिळे जवळ विहार करित होते. एका असाध्य रोगामुळे सहावेळा ध्यान करूनही अपेक्षित साध्य ते करू शकले नाही. रोगामुळे त्रस्त होवून गोधिकाने वस्तऱ्याने स्वतःचा गळा कापून घेतला. पण मरण्यापूर्वी काही वेळ आधी त्यांनी  अर्हतपद प्राप्त केले होते. तथागतांनी दिव्यदृष्टीने हे पाहिले आणि भिक्षुंसह त्या ठिकाणी आले. आयु. गोधिकाचे शरीर बिछान्यावर तसेच पडून होते. पापीमार त्यांच्या पूनर्जन्म जाणिवेचा शोध घेत तेथे आला. त्यावेळी बुद्धांनी स्पष्ट केले की *"पापीमार ! गोधिक कुलपुत्राच्या पुनर्जन्माच्या स्थानाला तुझ्यासारखे शेकडो, हजारो सुद्धा पाहू शकत नाही."* पुढे त्यांनी हि गाथा म्हणाली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १०/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Monday, 8 April 2024

शिलाचा सुगंध सर्वदूर पसरतो

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शिलाचा सुगंध सर्वदूर पसरतो_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_8.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अप्पमत्तो अयं गन्धो या'यं तगरचन्दनी ।_*

*_यो च सीलवतं गन्धो वाति देवेसु उत्तमो ॥_*

*_अर्थ - चन्दन किंवा तगर यांचा सुगन्ध जो आहे तो अल्पमात्र असतो. परन्तु शीलवान पुरुषाचा सुगन्ध देवापर्यंत जातो._*

                 _आयुष्यमान महाकाश्यप स्थविर राजगृहाच्या पिप्पलिगृहेत वास्तव्याला होते. एक आठवडाभर स्थविर महाकाश्यप समाधीत बसून होते, आठवड्याच्या शेवटी जेंव्हा ते समाधितून उठले तेंव्हा ह्या समाधीची मङ्गल मैत्री देण्यासाठी ते त्यांना कोणी प्रथम भिक्षा देईल याचा तपास करू लागले. जेंव्हा इंद्राला हे कळले तेंव्हा तो त्याने एका गरीब विणकराचा वेष घेवून काश्यपांना भिक्षा दिली. काश्यपांना जेंव्हा हे समजले की हा गरीब नसून इंद्र आहे तेंव्हा काश्यप इन्द्राला समज देतांना म्हणाले - "तुला जे करायचे होते ते तू तर केलेच, पुन्हा असे करू नकोस." यावर शक्र म्हणाला - " भन्ते ! मी सुद्धा पुण्य करू इच्छितो, मला पण पुण्य करण्याची लालसा आहे." शक्र प्रणाम करून निघून गेला. तथागत वेणुवनात विहार करित होते, हे जाणुन त्यांनी याचे स्पष्टिकरण असे दिले "भिक्षुंनो ! माझा पुत्र काश्यपाच्या सद्‌गुणांच्या सुगन्धाने आकर्षित होऊन शक्राने त्याल भिक्षा दिली. त्यानंतर ही गाथा त्यांनी म्हणाली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Sunday, 7 April 2024

शील सुगन्ध उत्तम आहे.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शील सुगन्ध उत्तम आहे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_7.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


*_न पुप्फगन्धो पटिवातमेति न चंदनं तगरमल्लिका वा ।_* 

*_सतञ्च गन्धो पटिवातमेति सब्बा दिसा सप्पुरिसो पवाति।।_*

*_अर्थ :- पुष्पाचा सुगन्ध मग ते पुष्प चन्दनाचे असो, तगराचे असो वा चमेलीचे असो, वाऱ्याच्या उलट दिशेला जाऊ शकत नाही. परंतु सन्ताचा सुगंध वाऱ्याच्या उलट दिशेने सुध्दा जातो. सत्पुरुषांचा सुगन्ध सर्व दिशांना पसरतो._*

                  _श्रावस्ती जेतवन महाविहारातून एके दिवशी आनन्द ध्यान संपवून भगवंतांकडे गेले आणि वंदन करून म्हणाले - "भन्ते ! सारगंध, मूलगंध आणि पुष्पगंध वाऱ्याच्या दिशेनेच वाहतात, विरूद्ध दिशेने वाहत नाहीत. काय असा एखादा गंध आहे, जो वाऱ्याच्या दिशेनेही वाहतो आणि विरूद्ध दिशेनेही वाहतो ? भगवंतांनी उत्तरादाखल ही गाथा सांगितली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०८/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 6 April 2024

कुशल कर्म करीत रहावे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_कुशल कर्म करीत रहावे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_6.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_यथापि पुप्फरासिम्हा कयिरा मालागुणे बहू ।_*

*_एवं जातेन मच्चेन कत्तब्बं कुसलं बहुं ॥_*

*_अर्थ - ज्या प्रमाणे फुलांच्या राशीतून पुष्कळ पुष्पमाल तयार होतात त्याचप्रमाणे जन्मास आलेल्या मर्त्याने पुष्कळ पुण्य सम्पादन करावे._*

               _अङ्ग राष्ट्राच्या भद्दीय नगरातील धनञ्जय सेठ यांची मुलगी विशाखा भगवंतांची उपासिका  होती. तीने सात वर्षाच्या अवस्थेतच भगवंतांचा धम्मोपदेश ऐकून स्त्रोतापत्तिफल प्राप्त केले होते. पुढे काही वर्षानी तिचे वडील महाराज प्रसेनजीत यांच्या आग्रहामुळे साकेत येथे वास्तव्यास आले. विशाखा हीचा  श्रावस्ती येथील मृगार / मिगार श्रेष्ठीपुत्र पुर्णवर्धन कुमार यांच्याशी विवाह झाला. विशाखेची भगवान बुद्ध आणि भिक्षु संघावर अगाध श्रद्धा होती, परन्तू तिच्या पतिची आणि सासर्याची निष्टा निग्रंथावर. काही दिवसांनी विशाखेच्या प्रयत्नांनी मृगार सेठ आणि पुण्यवर्धन बुद्धाचे परम शिष्य झाले. *(कृपया मिगार माता विशाखा ही कथा वाचावी)* विशाखेने दुर्मिळ जन्माचे महत्व जाणून २७ करोड स्वर्ण मुद्रा खर्च करून पूर्वाराम विहार बांधून तथागत आणि भिक्षुसंघास दान दिला. एके दिवशी ती स्वतः केलेल्या दान आणि पुण्यकर्माचे अनुस्मरण करतांना उदान (प्रीति वाक्य) म्हणाली. हे भिक्षुंनी ऐकले आणि ते भगवंतांना म्हणाले - " भन्ते ! विशाखा गीत गात होती. " भगवन्त म्हणाले - " भिक्षुंनो ! विशाखा गीत गात नव्हती, तीने उदान म्हटले. पुढे धम्मोपदेश करतांना - *"भिक्षुंनो ! जसा चतुर मालाकार नाना प्रकारच्या पुष्प राशीपासून नाना प्रकारच्या माला तयार करतो, असेच विशाखेचे चित्त नाना प्रकारचे पुण्य कार्य करण्याकडे वळले आहे."* त्यानंतर ही गाथा म्हणाले._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०७/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Friday, 5 April 2024

बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान

 🌹🌷🌼 *_भवतु सब्ब मङ्गलं_* 🌷🌹🙏🏽

*_काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी माझा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा दाखविली आणि त्या समारंभास मी हजर राहावे असे सांगितले. परंतु त्या गोष्टीस मी कबूली दिली नाही. त्यामुळे मी गैरहजर राहिल्याने पुष्कळांची निराशा झाली असेल. मात्र त्यामुळे मला वाईट वाटले नाही. कारण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा वाढदिवस साजरा करून कोणता फायदा मिळणार ? तुमच्यापेक्षा माझ्यामध्ये विशेष असे काय आहे ? माझ्यापेक्षा तुमच्यामध्ये कमी माणुसकी आहे काय ? मला तसे मुळीच वाटत नाही. काही माणसांना आपले वाढदिवस साजरे झालेले आवडत असतील, माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही. म्हणून मी त्या तरुणांना भगवान बुद्धाचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले आणि म्हणूनच माझी सर्व कामे बाजूला सारून मी आलो आहे._*

🌷🙏🏽🌹🌷🙏🏽🌹🌼🌷🙏🏽🌹🌼

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_82.html

*_संदर्भ :- २६६ - बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान  (पान नंबर २००, डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८, भाग ३)_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०६/०४/२०२४_*

🌹🌷🌼  *_ॐ मणी पद्मे हुं_* 🌷🌹🙏🏽

निष्फळ आणि सफल वाणी

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धम्माचरण न करणाराचे बोल निरर्थक ठरतात_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post_5.html

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_यथापि रुचिरं पुप्फं वण्णवन्तं अगन्धकं ।_*

*_एवं सुभासिता वाचा अफला होति अकुब्बतो ॥_*

*_अर्थ :- ज्याप्रमाणे शोभिवंत पुष्प रंग असून सुवास नसला तर ते निरुपयोगी होते, त्याप्रमाणे आचरण न करणाऱ्याचे सुभाषित बोल निरर्थक ठरतात._*

                    _श्रावस्तीमद्ये छत्तपाणि नावाचा एक अनागामी उपासक होता. एके दिवशी जेव्हा छत्तपाणि वन्दना करून तथागतांजवळ बसला होता. त्याचवेळी महाराज प्रसेनजित सुद्धा तथागतांचे दर्शन घेण्तेयासाठी तेथे आला. छत्तपाणि तथागतांच्या गौरवामुळे उठून राजास प्रणाम केला नाही. काही दिवसांनी राजाने त्याला राजभवनाजवळून जातांना बघितले, बोलवून त्या दिवशी प्रणाम न करण्याचे कारण विचारले. बुद्धगौरवामुळे उठून प्रणाम केला नाही असे छत्तपाणि म्हणाला. राजाचे समाधान झाले. आपल्या अन्तःपुरातील राण्यांना धम्म शिकवावा म्हणून छत्तपाणिस सांगितले परन्तु त्याने कबुल केले नाही. त्यानंतर राजा तथागतांकडे गेला व एका भिक्षुस मागितले. तथागतांनी हे काम आनन्दाकडे सोपविले. ते नेहमी मल्लीका आणि वासभखत्तिया यांना धम्म शिकविणाकरिता राजभवनात जात होते. यात मल्लीका मन लावून शिकून स्मरणात ठेवत होती, परन्तु वासभखत्ति मन लावून शिकत नव्हती आणि स्मरणातही ठेवत नव्हती. एके दिवशी तथागत आनन्दाने सांगितलेली बाब जाणून म्हणाले - *"मी सांगितलेला धम्म मन लावून न एकणारे आणि धारण न करणारे वर्णयुक्त गन्धरहित पुष्पाप्रमाणे निष्फल आहेत परन्तु मन लावुन ऐकणारे व धारण करणारे महाफलवान"* असे म्हणाले आणि ही गाथा सांगितली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०६/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - पुप्फवग्गो*_

_*२) धम्मपद - गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...