Tuesday, 28 November 2023

बुद्धपकिण्णककण्डं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्धपकिण्णककण्डं_*

*_(विभिन्न बुद्ध प्रकरण)_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_अपरिमेय्यितो कप्पे, चतुरो आसुं विनायका ।_

_तण्हंकरो मेधंकरो, अथोपि सरणंकरो ।_

_दीपंकरो च सम्बुद्धो, एककप्पम्हि ते जिना ॥१॥_

*_ज्या कल्पात दीपंकर बुद्ध होऊन गेले त्याच कल्पात त्यांच्या आधी तीन बुद्ध होऊन गेलेत. त्यांचे नाव तण्हंकर, मेधंकर आणि सरणंकर होते. अशाप्रकारे एकाच कल्पात हे चार बुद्ध होऊन गेलेत._*

दीपंकरस्स अपरेन, कोण्डञ्ञो नाम नायको ।

एकोव एककप्पम्हि, तारेसि जनतं बहुं ॥२॥

*_दीपंकर बुद्धानंतर कोण्डञ्ञ नावाचे नायक होऊन गेले. या कल्पात एकच होऊन गेले. त्यांनी असंख्य लोकांना दुक्खातून मुक्त केले._*

_दीपंकरस्स भगवतो, कोण्डञ्ञस्स च सत्थुनो ।_

_एतेसं अन्तरा कप्पा, गणनातो असंखिया ॥३॥_

*_भगवान दीपंकर बुद्ध आणि भगवान कोण्डञ्ञ बुद्ध यांच्यात अनेक कल्पाचे अंतर होते. या कल्पाची गणना करणे अशक्य आहे._*

_कोण्डञ्ञस्स अपरेन, मंगलो नाम नायको ।_

_तेसम्पि अन्तरा कप्पा, गणनातो असंखिया ।।४।।_

*_कोण्डञ्ञ (बुद्धा) नंतर होऊन गेलेल्या मंगल बुद्धाच्या काळात सुद्धा अनेक कल्पाचे अंतर होते. ज्याची गणना सुद्धा अशक्य होती._*

_मंगलो च सुमनो च, रेवतो सोभितो मुनि ।_

_तेपि बुद्धा एककप्पे, चक्खुमन्तो पभंकरा ॥५॥_

*_मंगल (बुद्धा) नंतर सुमन (बुद्ध), रेवत (बुद्ध) आणि सोभित (बुद्ध) हे चारही प्रज्ञावान आणि प्रतिभाशाली बुद्ध एकाच कल्पात होऊन गेलेत._*

_सोभितस्स अपरेन, अनोमदस्सी महायसो ।_

_तेसम्पि अन्तरा कप्पा, गणनातो असंखिया ॥६॥_

*_सोभित (बुद्धा) नंतर महान यशस्वी अनोमदस्सी (बुद्ध) होऊन गेला. त्यांच्यात अनेक कल्पांचे अंतर होते. ज्याची गणना करणे अशक्य आहे._*

अनोमदस्सी पदुमो, नारदो चापि नायको ।_

_तेपि बुद्धा एककप्पे, तमन्तकारका मुनी ॥७॥_

*_अनोमदस्सी (बुद्ध), पदुम (बुद्ध) आणि नारद नायक (बुद्ध) एकाच कल्पात होऊन गेलेत. त्या मुनींनी (जगातील) अंधकाराला नष्ट केले._*

_नारदस्स अपरेन, पदुमुत्तरो नाम नायको ।_

_एककप्पम्हि उप्पन्नो, तारेसि जनतं बहुं ॥८॥_

*_नारदा (बुद्धा) नंतर पदुमुत्तर (बुद्ध) नावाचा नायक होऊन गेला. हे एका- एका कल्पात उत्पन्न झालेत. त्यांनी असंख्य लोकांना दुक्खातून मुक्त केले._*

_नारदस्स भगवतो, पदुमुत्तरस्स सत्थुनो ।_

_तेसम्पि अन्तरा कप्पा, गणनातो असंखिया ॥९॥_

*_नारद बुद्धामध्ये आणि पदुमुत्तर बुद्धामध्ये सुद्धा कल्पाचे अंतर होते. ज्याची गणना करणे अशक्य आहे._*

_कप्पसतसहस्सम्हि, एको आसि महामुनि।_

_पदुमुत्तरो लोकविदू, आहुतीनं पटिग्गहो ।।१०।।_

*_एक लाख कल्पामध्ये केवळ महामुनि पुदुमुत्तर (बुद्ध) होता. हा पदुमुत्तर जगाला जाणणारा, अतिशय श्रद्धावान आणि दानास पात्र होता._*

_तिंसकप्पसहस्सम्हि, दुवे आसुं विनायका ।_ 

_सुमेधो च सुजातो च, ओरतो पदुमुत्तरा ।।११।।_

*_पदुमुत्तर (बुद्ध) नंतर तीस हजार कल्पामध्ये दोन विनायक (बुद्ध) उत्पन्न झालेत - सुमेध (बुद्ध) आणि सुजात (बुद्ध)._*

*_अट्ठारसे कप्पसते, तयो आसुं विनायका ।_*

*_पियदस्सी अत्थदस्सी, धम्मदस्सी च नायका ॥१२॥_*

*_सुजात बुद्धानंतर अठराशे कल्पात तीन विनायक (बुद्ध) झालेत. ते म्हणजे पियदस्सी बुद्ध, अत्थदस्सी बुद्ध आणि धम्मदस्सी बुद्ध हे होत._*

_ओरतो च सुजातस्स, सम्बुद्धा द्विपदुत्तमा ।_

_एककप्पम्हि ते बुद्धा, लोके अप्पटिपुग्गला ।।१३।।_

*_आणि सुजात (बुद्धा) नंतर हे तीन्ही सम्बुद्ध, नरोत्तम एकाच कल्पात झालेत. जगात यांच्या सारखा सामर्थवान कुणीही नव्हता._*

_चतुन्नवुतितो कप्पे, एको आसि महामुनि ।_

_सिद्धत्थो सो लोकविदू, सल्लकत्तो अनुत्तरो ।।१४।।_

*_आज पासून चौऱ्यान्नव कल्पापूर्वी सिद्धार्थ नावाचा महामुनि होता. तो सिद्धार्थ जगाला जाणणारा, शल्पकर्ता व अनुत्तर होता._*

_द्वेनवुते इतो कप्पे, दुवे आसुं विनायका ।_

_तिस्सो फुस्सो च सम्बुद्धा, असमा अप्पटिपुग्गला ॥१५॥_

*_आज पासून ब्यानव्या कल्पापूर्वी दोन विनायक (बुद्ध) होऊन गेलेत - भगवान तिस्स बुद्ध आणि भगवान फुस्स बुद्ध. हे सुद्धा जगात अतुलनीय आणि अपराजयी होते._*

_एकनवुतितो कप्पे, विपस्सी नाम नायको ।_

_सोपि बुद्धो कारुणिको, सत्ते मोचेसि बन्धना ।।१६।।_

*_ऐक्यान्नव कल्पा पूर्वी विपस्सी नायक (बुद्ध) होऊन गेला. त्याच्या मनात अतिशय करुणा होती. त्याने असंख्य लोकांना बंधन मुक्त केले होते._*

_एकतिंसे इतो कप्पे, दुवे आसुं विनायका ।_ 

_सिखी च वेस्सभू चेव, असमा अप्पटिपुग्गला ॥१७॥_

*_आज पासून एकतिसाव्या कल्पापूर्वी दोन विनायक (बुद्ध) होऊन गेलेत. सिखी (बुद्ध) आणि वेस्सभू (बुद्ध) हे सुद्धा जगात अतुलनीय आणि अपराजयी होते._*

_इमम्हि भद्दके कप्पे, तयो आसुं विनायका ।_ 

_ककुसन्धो कोणागमनो, कस्सपो चापि नायको ॥१८॥_

*_ह्या मंगल कल्पामध्ये तीन विनायक (बुद्ध) होऊन गेलेत - ककुसन्धो, कोणागमन आणि कस्सप (बुद्ध) नायक._*

_अहमेतरहि सम्बुद्धो, मेत्तेय्यो चापि हेस्सति ।_ 

_एतेपिमे पञ्च बुद्धा, धीरा लोकानुकम्पका ॥१९॥_

*_आता मी (वर्तमान) सम्यक सम्बुद्ध आहे. भविष्यात मेत्तेय (बुद्ध) होईल. हे पाचही बुद्ध धीर व जगावर अनुकंपा करणारे आहेत._*

_एतेसं धम्मराजूनं, अञ्ञेसंनेककोटिनं ।_

_आचिक्खित्वान तं मग्गं, निब्बुता ते ससावकाति ॥२०॥_

*_ह्या धम्मराजांनी (बुद्धांनी) नीट अनेक कोटी लोकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश देवून ते आपल्या सावकासह परिनिब्बाणाला प्राप्त झालेत._*

*_बुद्धपकिण्णककण्डं निट्ठितं ।_*

*_बुद्धप्रकिर्णक कण्ड समाप्त._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०८/१२/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) सुत्तपिटक - खुद्दकनिकाय - बुद्धवंस _*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_28.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 23 November 2023

आठ विजयी ठिकाणे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अट्ठ अभिभायतनानि_*

*_आठ विजयी ठिकाणे_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_"अट्ठ खो इमानि, आनन्द, अभिभायतनानि । कतमानि अट्ठ ?_

_"आनंद ! विजयी होण्याची आठ स्थळे आहेत, आठ ठिकाणे आहेत. ती आठ कोणती ?"_

_अज्झत्तं रूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सत्ति परित्तानि सुवण्णदुब्बण्णानि। 'तानि अभिभुय्य जानामि पस्सामी 'ति एवंसञ्ञी होति । इदं पठमं अभिभायतनं।_

*_१ आपल्या स्वतःला आतून एकटा समजणारा व बाहेरून जे आकर्षित करणार आहे त्याला काही ही किंमत न देता त्यावर विजय मिळविणारे त्याला मी एक नाव दिले ते म्हणजे (अभिक्षू-आयतन) बाहेरील वाईटावर विजय संपादन करण्याचे पहिले ठिकाण."_*

_"अज्झत्तं रूपञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति अप्पमाणानि सुवण्णदुब्बण्णानि। 'तानि अभिभुय्य जानामि पस्सामी 'ति एवंञ्ञी होति । इदं दुतियं अभिभायतनं ।_

*_२. "आपल्या स्वतःला आतून आकारहिन निराकार समजून जी बाहेर अनेक वाईट रूपे आहेत त्यावर विजय मिळविण्याचे हे दुसरे ठिकाण आहे."_*

_"अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति परित्तानि सुवण्णदुब्बण्णानि। 'तानि अभिभुय्य जानामि पस्सामी 'ति एवंसञ्ञी होति । इदं ततियं अभिभायतनं ।_

*_३. "आपल्या स्वतःला आतून आकारहीन आहोत याचे स्मरण ठेवून बाहेरील पापमयी रूपावर मग ते कुरूप अथवा सोन्यासारखे चमकणारे असो, त्यावर विजय, हे विजयाचे, तिसरे ठिकाण होय हे तिसरे अभिक्षु-आयतन आहे."_*

_"अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति अप्पमाणानि सुबण्णदुब्बण्णानि। 'तानि अभिभुय्य जानामि पस्सामी 'ति एवंसञ्ञी होति । इदं चतुत्यं अभिभायतनं ।_

*_४. "आपल्या आत ज्याला नाव देता येणार नाही असे 'नाम' आहे, हे ओळखून जो बाहेरील नामावर मग ते कितीही कीर्तीमान असो, ते वाईट आहे असे ओळखून त्यावर जो विजय मिळवितो, ती विजयाची चौथी जागा आहे."_*

_"अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति नीलानि नीलवण्णानि नीलनिदस्सनानि नीलनिभासानि । सेय्यथापि नाम उमापुप्फं नीलं नीलवण्णं नौलनिदस्सनं नीलनिभासं। सेय्यथा वा पन तं वत्थं बाराणसेय्यकं उभतोभागविमष्टुं नीलं नीलवण्णं नीलनिदस्सनं नीलनिभासं । एवमेव अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति नीलानि नीलवण्णानि नीलनिदस्सनानि नीलनिभासानि । 'तानि अभिभुय्य जानामि पस्सामी'ति एवंसञ्ञी होति । इदं पञ्चमं अभिभायतनं ।_

*_५. "आपल्या आतील रूपाला कोणतेही नाव न देता. बाहेरील जसे निळे, निळ्या रंगाचे, निळे दिसणारे, निळयाचा भास करणारे, निळ्या रूपाचे आळशीचे फूल हे केवळ आभास निर्माण करणारे आहे, असे समजून त्यावर विजयाचा पांचवा स्तंभ आहे."_*

_"अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति पीतानि पीतवण्णानि पीतनिदस्सनानि पीतनिभासानि । सेय्यथापि नाम कणिकारपुप्फं पीतं पीतवण्णं पीतनिदस्सनं पीतनिभासं। सेय्यथा वा पन तं वत्थं बाराणसेय्यक उभतोभागविमटुं पीतं पीतवण्णं पीतनिदस्सनं पीतनिभासं । एवमेव अज्दात्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति पीतानि पीतवण्णानि पीतनिदस्सनानि पीतनिभासानि । 'तानि अभिभुय्य जानामि पस्सामी 'ति एवंसञ्ञी होति । इदं छट्ट अभिभायतनं ।_

*_६. "आपल्या शरिराच्या आत कोणतेही रूप नाही हे जाणून बाहेरप्रमाणे जे कन्हेरीचे फूल पिवळे आहे, जो पिवळा रंग आहे, जे पिवळे दिसते, पिवळा भास होतो, त्या होणाऱ्या भासाला जो नाहीसे करतो, तो सहावा विजय होय."_*

_"अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति लोहितकानि लोहितकवण्णानि लोहितकनिदस्सनानि लोहितकनिभासानि । सेय्यथापि नाम बन्धुजीवकपुप्फ लोहितकं लोहितकवण्णं लोहितकनिदस्सनं लोहितकनिभाप्स। सेय्यथा वा पन तं वत्थं बाराणसेय्यकं उभतोभागविमटुं लोहितकं लोहितकवण्णं लोहितकनिदस्सनं लोहितकनिभासं । एवमेव अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति लोहितकानि लोहितकवण्णानि लोहितकनिदस्सनानि लोहितकनिभासानि। 'तानि अभिभुय्य जानामि पस्सामी'ति एवंसञ्ञी होति। इदं सत्तमं अभिभायतनं ।_

*_७. "आपल्या शरीरात नामरूप असे काही असत नाही, हे जो जाणून बाहेर लाल रंग पाहतो, जो लाल दिसतो, जे लाल झुडपावर लाल फूल दिसते आहे या भावनांना जो दाबून जो त्यावर विजय मिळवितो, तो बाईटावर, बाईट भावनेवर विजय मिळवितो, तो सातवा विजय आहे."_"

_"अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति ओदातानि ओदातवण्णानि ओदातनिदस्सनानि ओदातनिभासानि । सेय्यथापि नाम ओसधितारका ओदाता ओदातवण्णा ओदातनिदस्सना ओदातनिभासा। सेव्यथा वा पन तं वत्थं बाराणसेय्यक उभतोभागनिमष्ठं ओदातं ओदातवण्णं ओदातनिट्स्सनं ओदातनिभासं। एवमेव अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति ओदातानि ओदातवण्णानि ओदातनिदम्सनानि ओदातनिभासानि । तानि अभिभुच्य जानामि पस्सामी ति एवंसञ्ञी होति । इदं अनुम अभिभायतनं । इमानि खो, आनन्द, अरु अभिभायतनानि ।_

*_८. "ज्याने आतल्या नामस्वरूपाला आत काही ही नाही हे ओळखून बाहेर शुक्रताऱ्याप्रमाणे दिसणारे, सफेद भासणारे, सफेद असेल, आत तसेच बाहेर काही नसतेच असे जो समजतो, तो त्याने वाईट भावनेवर मिळविलेला आठवा विजय आहे."_*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) महापरिनिब्बानसुत्त (मराठी अनुवादासह - संपादक आयु अरविंद भंडारे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_23.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 22 November 2023

कठिण चीवराचे नियम

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_कठिण चीवराचे नियम (श्रावस्ती)_* 

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

        _त्यावेळी *भगवान श्रावस्तीला अनाथपिण्डिकाच्या जेतवनारामात विहार करीत होते. त्यावेळी पाठेय्यक (पाठाचे राहणारे- कोसल देशाच्या पश्चिमेस एक राष्ट्र होते) तीस भिक्खू जे सगळेच अरण्यवासी, भिक्षान्त्रभोजी, फेकलेल्या चिंध्याचे चीवर वापरणारे आणि तीनच चीवर धारण करणारे होते.* भगवंताच्या दर्शनासाठी श्रावस्तीला जात असता *वर्षोपनायिका (आषाढ पौर्णिमा) जवळ असल्यामुळे वर्षोपनायिकासाठी श्रावस्तीला पोहचू शकले नाही. त्यांनी वाटेत साकेत (अयोध्या) मध्येच वर्षावास केला.* श्रावस्तीला जाण्याची मनात उत्कंठा ठेवूनच त्या ठिकाणी वर्षावास केला. कारण श्रावस्ती तेथून सहा योजनच लाब होते. तरी मनात भगवंताची दर्शनाभिलाषा पूर्ण असल्याने त्यांनी वर्षावास समाप्त झाल्याबरोबर प्रवारणा झाल्यावर लगेच श्रावस्तीला निघाले. पण रस्त्यात पावसाने भिजत आणि चिखल तुडवित भिजलेल्या चीवरानिशी ते भगवान जेथे होते तेथे पोहचले आणि भगवंताला अभिवादन करून एकीकडे बसले._ 

          _*बुद्धांचे नियम आहेत की, नवागन्तुक भिक्षुला कुशल समाचार विचारणे* तेव्हा तथागतांनी त्यांना म्हटले- “भिक्खूंनो ! वर्षावास चांगला झाला नं ? यापन करण्यासारखा झाला नं ? एकमताने, प्रेमाने, विवादरहित, चांगल्याप्रकारे वर्षावास तर झाला नं ? भोजनासाठी काही त्रास तर झाला नाही नं ?"_

             _"भगवान ! आम्ही पाठेय्यक (पाठाचे राहणारे) तीस भिक्खू आहोत. रस्त्याने भिजतच आलोत." तेव्हा *भगवंतांनी ह्याचसंबंधी धार्मिक कथा सांगून भिक्खूंना सांगितले, “भिक्खूंनो ! मी तुम्हाला अनुमती देतो. वर्षावास केलेल्या भिक्खूंना कठिण चीवर देण्याची."*_

*_(वर्षावासाच्या समाप्तीवर सगळ्या संघाच्या सम्मतीने प्रदर्शनासाठी एखाद्या भिक्खूला चीवर दिल्या जाते त्याला 'कठिण' चीवर म्हणतात.)_*

*_कठिणाच्या भिक्खूंसाठी विधान_*

_“कठिण चीवर घेतल्यावर भिक्खूंनो ! तुम्हाला पाच गोष्टी करणीय आहेत."_

*(१) “आमंत्रणाशिवाय विचरणे,* 

*(२) तीन चीवरांना घेतल्याशिवाय विचरण करणे,* 

*(३) गणाबरोबर भोजन करणे,* 

*(४) इच्छानुसार चीवर घेणे,* 

"(५) जे चीवर देताना तिथे जे मिळाले तेच त्याचे असणार." 

               _कठिणासाठी एकत्रित झाल्यावर भिक्खूंनो ! ह्या पाच गोष्टी तुम्ही पाळाव्या."_ 

          _*“आणि भिक्खूंनो ! कठिणासाठी अशाप्रकारे ठराव (सम्मंत्रण) करायला पाहिजे. हुशार आणि समर्थ भिक्खू संघाला सूचित करायला पाहिजे."*_

_*(क) ज्ञप्ति :-* “भन्ते । संघ माझे ऐकून घेईल. संघास सहा कठिणासाठी कापड मिळाले आहे. जर संघ योग्य समजत असेल तर हया कठिणाच्या कपड्याला (चीवराला) या नावाच्या भिक्खूला घालण्यासाठी (वापरण्यासाठी) देईल अशी सूचना आहे."_

_*(ख) अनुश्रवण :-* “भन्ते ! संघ माझे ऐकून घेण्याची कृपा करील, संघास कठिणासाठी हे चीवर मिळाले आहे. ह्या चीवराला अमूक नावाच्या भिक्खूला वापरण्यासाठी देणे मंजूर असेल तर ते चूप राहतील. मंजूर नसेल ते बोलतील. दुसऱ्यांदा पण तिसऱ्यांदा पण.”_

_*(ग) धारणा :-*"संघाने हया कठिण चीवरास अमूक नावाच्या भिक्षुला वापरण्यासाठी दिले. ते संघाला मान्य आहे. म्हणूनच आपण सगळे चूप आहात. असे मी ह्याला समजतो."_

*_कठिण चीवराची उत्पत्ती_*

            *_"भिक्खूनो ! कठिण कसे उत्पन्न होते ? भिक्खूनो! कठिणाच्या उत्पत्तीत ह्या ७ मातृका (उत्पादिका) आहेत. (१) पक्कनान्तिका (प्रक्रमणान्तिका), (२) निट्ठानान्तिका (निष्ठानान्तिका), (३) सन्निट्ठानान्तिका (सन्त्रिष्ठानान्तिका), (४) नासनान्तिका, (५) श्रवनांतिका, (६) सीमात्तिक्कन्तिका, (७) आसावच्छेदिका_*

_(१) “भिक्खूनो ! कठिण आस्थत (प्रसारित) झाल्यावर तो भिक्खू निघून जातो, पुन्हा येत नाही. अशा भिक्खुमुळे 'पक्कनान्तिका' (जाणेच त्याचे अंत आहे) नामक कठिनाची उत्पत्ती झाली (उद्धार)._

_(२) ज्या भिक्षुला कठिण वितरण केले आणि तो ते घेऊन निघून गेला. परंतु सीमेच्या बाहेर गेल्यावर त्याला वाटते, मी असेच चीवर बनवून नंतर वापस येणार नाही, अशा भिक्खूमुळे 'निट्ठानान्तिका' (बनविणे ज्याचा अंत आहे) नामक कठिनाची उत्पत्ती झाली._ 

_(३) ज्या भिक्खुला कठिण वितरित केले, तो ते घेऊन निघून गेला. पण त्याच्या मनात वाटते की, मी आता हे चीवर बनविणार पण नाही आणि वापस येणार पण नाही. अशा भिक्खूमुळेच 'सन्त्रिट्ठानान्तिका' (कठिणाची) उत्पत्ती झाली._

_(४) ज्या भिक्खूला कठिण वितरित झाले आणि ते घेऊन तो सीमेच्या बाहेर गेला आणि त्याला वाटले की, मी ह्या कठिण चीवराला इथेच बनवून पुन्हा वापस येणार नाही आणि तो त्या कठिण चीवराला बनवितो आणि पुन्हा वापस येत नाही. अशा भिक्खूमुळेच 'नासनान्तिका' नावाच्या कठिणाची उत्पत्ती झाली._

_(५) ज्या भिक्खूला कठिण चीवर वितरित झाले. तो ते घेऊन सीमेच्या बाहेर गेला आणि त्याला वाटले की, मी हे कठिन चीवर बनवून घेऊन येईल. तसेच तो करतो. पण त्याला ऐकायला भेटते की, आवासात कठिण उत्पन्न झाले आहे. म्हणून अशा भिक्खुमुळेच 'श्रवनान्तिका' कठिणाची उत्पत्ती झाली._ 

_(६) ज्या भिक्खूला कठिण वितरण झाले, तो सीमेच्या बाहेर गेला आणि त्याने तसेच चीवर बनविले आणि त्याच्या मनात वाटले, "आता जाणार-आता जाणार" म्हणत म्हणत कठिणाची वेळ निघून जाते, अशा भिक्खूमुळेच 'सीमात्तिक्कन्तिका' (सीमेचे अतिक्रमण केल्यामुळे) नावाच्या कठिणाची उत्पत्ती झाली._

_(७) चीवरास घेऊन पुन्हा जाईल अशा विचारातच निघून जातो आणि सीमेच्या बाहेर त्या चीवराला बनवितो. ते सुगत चीवर बनविल्यावर "पुन्हा जाईन-पुन्हा जाईन" असा विचार करीत करीत कठिण उद्धाराची (उत्पत्तीची) वाट पाहतो. तेव्हा त्या भिक्षूचे दुसऱ्या भिक्षूबरोबर कठिण उद्धार होतो."_

*_कठिण चीवराचे विघ्न आणि अविघ्न_*

            _कठिण चीवराची उत्पत्ती भिक्खू कधी कधी आशा न ठेवून करतो तर कधी कधी आशापूर्वक करतो. *कधी कधी तो करणीयपूर्वक करतो तर कधी अपविनयपूर्वक करतो आणि कधी कधी तो फासुविहार पञ्चक (सुखपूर्वक विहाराला) पूर्वक करतो.*_

_तसेच कठिण चीवराचे दोन विघ्न आहेत-_

*_(१) आवासाचे विघ्न म्हणजे -_*

                 _"भिक्षूनो ! एक भिक्खू त्या आवासात वास करतो किंवा पुन्हा वापस येईल अशी आशा करतो. ह्याला आवासाचे विघ्न म्हणतात."_

*_(२) चीवराचे विघ्न म्हणजे-_*

              _"भिक्षूनो ! जेव्हा भिक्षूचे चीवर तयार नसते किंवा चांगले बनलेले नसते अथवा चीवराची आशा सोडलेली नसते, यालाच चीवर विघ्न म्हणतात."_

*_आता दोन कठिणाचे निर्विघ्न-_*

_(१) निर्विघ्न आवास,_ 

_(२) निर्विघ्न चीवर._

                       *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

_*आपले मंगल साधावे ! आपले कल्याण साधावे ! आपली मुक्ती साधावी ! सर्वांचे मंगल होवो ! सर्वांचे कल्याण होवो !*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) विनय पिटक - महावग्ग- कठीण क्खन्धक_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_22.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 19 November 2023

समता सैनिक दल

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! समता सैनिक दल !!_* 

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

           _महाड येथील माहे *मार्च व माहे डिसेंबर १९२७ मधील दोन्ही ऐतिहासिक परिषद यशस्वी करण्यामध्ये "महार समाज सेवा संघाचा" सक्रीय सहभाग राहिला आहे.*_

        *_या परिषदेची नीट व्यवस्था ठेवण्यासाठी संरक्षणात्मक स्वयंसेवकांची मजबुत फळी उभारण्याच्या हेतूने कॉम्रेड रामचंद्र बाबाजी मोरे यांच्या पुढाकाराने सेंट जॉर्ज हॉस्पीटल, परेल मुंबई येथे स्वयंसेवकांची पथके उभारण्यात आली._*

*_या स्वयंसेवक पथकाना "डॉ. आंबेडकर सेवा दल" असे नाव देण्यात आले. पुढे बाबासाहेबांच्या अनुज्ञेने दलाचे नांव बदलून त्याला "समता सैनिक दल” असे संबोधण्यात आले._*

              *_या दलाचे पहिले जी.ओ.सी. महार समाज सेवा संघाचे तरुण तडफदार कार्यकर्ते श्री. शंकर लक्ष्मण वडवलकर होते. आणि सखाराम भिकाजी लोटेकर, अर्जुन गोपाळ जातेकर हे प्रमुख संघटक व पुण्याचे उद्धव लक्ष्मण करंदीकर (पंच प्रमुख) हे सेक्रेटरी होते._*

             _संघाने मुंबईत परिषदेचा जोरदार प्रचार केला आणि त्यानंतर *कोकणातील प्रचारासाठी कार्यकर्त्यांची दोन तुकड्यांमध्ये विभागणी केली. त्याप्रमाणे संघाचे दोन प्रमुख कार्यकर्ते श्री. केशव गोविंद आड्रेकर, श्री. रामचंद्र बाबाजी मोरे (कॉम्रेड आर.बी. मोरे) यांनी माहे डिसेंबर १९२६ पासून रत्नागिरी, दाभोळ, दापोली, माणगांव, महाड, रोहा, पेण इत्यादी ठिकाणांसह कोकणात प्रचाराचे कार्य केले.*_

               _परिषदेच्या प्रचारकार्यासाठी *दुसऱ्या तुकडीत सहभागी असलेले सर्वश्री शिवराम गोपाळ जाधव, पांडुरंग बाबाजी मांडलेकर, चांगदेव नारायण मोहिते, गोविंद रामजी आड्रेकर, पांडुरंग महादेव साळवे, शंकर लक्ष्मण वडवलकर, जनार्दन भागाजी गमरे, राघोराम गोयलकर, तानाजी महादेव गुडेकर, गणपतराव केंबुर्लीकर, बाळू वामनेकर, सुदाम केंबुर्लीकर, तुकाराम वरघरकर यांनी कोकण प्रांतात प्रभावीपणे प्रचार केला.*_

           _*संघाचे नेते व परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. संभाजी तुकाराम गायकवाड, शिवराम गोपाळ जाधव, गोविंद रामजी आडरेकर हे परिषदेच्या पुर्वतयारीसाठी दोन महिने आधी महाड येथे तळ ठोकून बसले होते.* तसेच *महाड सत्याग्रह परिषद यशस्वी करण्यासाठी सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर यांनी अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

*_टीप :-_*

*_१) ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी बोद्धजन पंचायत समिती, भोईवाडा, परेल , मुंबई येथील कार्यालयाशी, तसेच संपर्क करावा_*

*_२) हे बाबासाहेबांचे सोबती कोकणातील ज्या - ज्या गावातील असतील त्यांनी कृपया कमेंट करावी जेणेकरून आजच्या पिढीला निदान त्यांच्या गावाची माहिती मिळेल_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_समाजक्रांतीचे अपत्य बोद्धजन पंचायत समिती लेखक - वि. ल. मोहिते_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 17 November 2023

दीपावलीचा खरा अर्थ

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_दीपावलीचा खरा अर्थ_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                      _धर्म जागतो तेव्हा अधंकार दूर होतो, प्रकाश पसरतो. *परंतु जेव्हा आम्ही धर्माला समजून घेत नाही; अंधकार काय आहे, प्रकाश काय आहे, यालाच समजत नाही; तेव्हा केवळ प्रतीक रुपाने काळ्या अमावस्येच्या रात्रीच्या अंधकाराला दूर करण्यासाठी दीप जाळतो.* चांगले आहे, चांगले प्रतीक आहे, *परंतु प्रतीक तर प्रतीकच आहे. वास्तविकतेच्या स्तरावर समजा की धर्म काय आहे ! जर धर्म खरोखर धर्म आहे, तर तो सार्वजनिक असतो, सार्वदेशिक असतो, सार्वकालिक असतो. परंतु जेव्हा मनुष्यांच्या वेगवेगळ्या समूहांचा वेगवेगळा धर्म बनतो, तेव्हा तो सार्वजनिक नसतो, म्हणजे, धर्मच नसतो. जर सार्वकालिक नसेल - या काळात हा-हा धर्म आहे व पुढील काळात हा-हा धर्म आहे, तर तो सार्वकालिक नाही. या प्रदेशातील लोकांचा हा धर्म आणि दुस-या प्रदेशातील लोकांचा तो धर्म, तर तो सार्वदेशिक नाही. तेव्हा खूप चांगल्या प्रकारे समजले पाहिजे की तो धर्म नाही, धर्माच्या नावावर धोका आहे.*_

             _*धर्म निसर्गाच्या नियमांना म्हणतात, प्रकृतीच्या कायद्यांना म्हणतात, विश्वाच्या विधानांना म्हणतात. जो नेहमी सर्वावर, सर्व काळात एक समान लागू होतो. त्याला समजून घेतले, तरच आम्ही धर्माला योग्य प्रकारे समजून घेतले.* प्रकृतीचा नियम आहे - सूर्य उगवतो, तर प्रकाश उत्पन्न होतो, वातावरणात गरमपणा, उष्णता निर्माण होते. हा सूर्याचा धर्म आहे, जो नेहमी एकसारखा असतो, अग्नीचा धर्म आहे - तो जळतो व जो कोणी त्याच्या पकडीत येईल, त्याला जाळतो. हा त्याचा धर्म आहे. स्वभाव आहे. असे नसेल तर अग्नी, अग्नी नाही, अजून काही असेल. बर्फाचा धर्म आहे - थंड असतो व जो त्याच्या संपर्कात येईल त्याला थंड करतो. हा त्याचा धर्म आहे, त्याचा स्वभाव आहे. लाखो-कोटी वर्षांपूर्वीही हाच स्वभाव होता, आजही हाच स्वभाव आहे, भविष्यातही हाच स्वभाव राहील - हाच धर्म आहे. याच प्रकारे आम्हाला शुद्ध यावी की मनात विकार जागताच मन आपली समता हरवते, आपले संतुलन हरवते, आपली सुख, शांती, हरवते. विकारांचा हा स्वभाव आहे, हा त्याचा धर्म आहे, जो सर्वांवर लागू होतो. *मन विकारांतून मुक्त झाले, निर्मळ झाले, तर आपोआप आत मैत्री जागते, करुणा जागते, सद्भावना जागते. थोडासाही द्वेष नाही, थोडेसेही दौर्मनस्य नाही, थोडीशीही दुर्भावना नाही. मैत्री आहे, करुणा आहे, सद्भावना आहे, तर या सद्गुणांचा आपला स्वभाव आहे. जेव्हा निर्मळ चित्तात हे सद्गुण जागतात, जो त्याचा स्वभाव आहे, तेव्हा आत खूप शांत वाटते. खूप सुख जाणवते. हा निर्मळ चित्ताचा स्वभाव आहे. जसा मलिन चित्ताचा स्वभाव आहे आम्हाला दुःखी बनवते, व्याकुळ बनवते, अशांत बनवते, बेचैन बनवते; तसाच निर्मळ चित्ताचा स्वभाव आहे आम्हाला शांती प्रदान करते, प्रदान करते, चैन प्रदान करते. सुख प्रदान करते, चैन प्रदान करते.*_

                  _हजारो, लाखों, कोटी वर्षांपूर्वीही जो मनुष्य आपल्या आत विकार जागवत होता, तो इतकाच व्याकुळ होत होता, जितका आज होतो आणि तितकाच भविष्यातही होईल, म्हणून सार्वकालिक आहे. जो कोणी आपल्या आत विकार जागवेल; तो स्वतःला या नावाने बोलवेल अथवा त्या नावाने, काहीही फरक पडत नाही. या आईच्या पोटी जन्मला असो अथवा त्या आईच्या पोटी जन्मला असो. काहीही फरक पडत नाही. अशी वेषभूषा असणारा असो वा तशी, काहीही फरक पडत नाही. या प्रकारचे कर्मकांड करणारा असो की त्या प्रकारचा, या प्रकारची दार्शनिक मान्यता मानणारा असो की त्या प्रकारची, काहीही फरक पडत नाही. *विकार जागवला आहे ना ! तर दंड मिळेलच, ताबडतोब मिळेल.* विकार आता जागविला आणि दंड मृत्युनंतर मिळेल, तो ही मिळेलच; परंतु आता काय होत आहे ? आता दंड मिळत आहे, आता व्याकुळ होत आहे. *हाच निसर्गाचा नियम आहे. प्रकृतीचा कायदा आहे, विश्वाचे विधान आहे. जे सर्वांवर लागू होते.*_

              _अग्नी जळतो व जाळतो. कोणीही जाणता वा अजाणता अग्नीवर हात धरेल तर जळेलच. अग्नी या बाबीला पाहाणार नाही की मला स्पर्श करणारा हा आपल्या स्वतःला कोणत्या नावाने बोलावतो, कोणता संप्रदाय, वर्ण, जात अथवा गोत्र असणारा आहे, कोणत्या आईच्या पोटी जन्मला आहे, कशी दार्शनिक मान्यता व वेषभूषा असणारा आहे ! काहीही पाहाणार नाही. अग्नीवर हात धरला आहे, तर अग्नी त्याला जाळेलच, हा त्याचा धर्म आहे. आम्हाला अग्नीने जळणे चांगले वाटत नाही, तर चुकीनेही अग्नीवर हात धरु नका, आपल्या स्वतःला दूर ठेवा. तसाच या विकारांचा धर्म आहे, आम्हाला व्याकुळ करतीलच. *आम्ही व्याकुळ होऊ इच्छित नाही तर विकारांपासून आपल्या स्वतःला मुक्त ठेवावे. याच प्रकारे धर्म सार्वभौमिक असतो कोणत्याही देशाचा, प्रदेशाचा मनुष्य असो, विकार जागवताच तत्काळ व्याकुळ होईल. जगातील कोणतीही शक्ती त्याला वाचवू शकत नाही, दंड मिळेलच. दंड आवडत नाही, तर विकारांपासून सुटका मिळवा.*_

                  _*ज्या दिवशी मानव समाजात हे ज्ञान जागू लागेल की धर्म स्वभावाला म्हणतात आणि आमच्या चित्ताचा जसा स्वभाव आहे, त्यानुसारच आम्हाला दंड वा पुरस्कार मिळेल. ज्या दिवशी निसर्गाच्या या नियमाला, कायद्याला, स्वभावाला मानव समाज समजू लागतो, तेव्हा समजा की धर्माचा उदय होऊ लागला.* वाणीचे दुष्कर्म असो वा शरीराचे, प्रथम मन मलिन करावे लागते. जोपर्यंत असे समजेल की मी वाटेल तितके विकार जागवू, वाटेल तितके दुष्कर्म करु, तरीही माझी मुक्ती होईल. मी तर भवचक्रातून निघूनच जाईन, माझ्यावर तर कोणाची तरी कृपा होईलच, तर समजा की त्याच्यावर अविद्येचा अंधकार पसरला आहे. मटकत आहेत लोग, सत्याला जाणून घेऊ इच्छित नाही. वारंवार असे होते, वारंवार अधर्माचा अंधकार पसरतो, लोक विसरतात की धर्म काय आहे. *खूप दुर्भाग्य होते की जेव्हा धर्म आणि संप्रदाय शब्द पर्यायवाची होतात;* तेव्हा कोणी बिचारा कसा समजेल की धर्म काय आहे? जगात जितक्याही धार्मिक परंपरा आहेत, कोणत्याही परंपरेला पाहा, सर्वात धर्म आहेच. एकच बाब आहे- 'सदाचाराचे जीवन जगा'. *जगातली कोणतीही धर्म परंपरा अशी नाही जी ही म्हणेल की सदाचाराचे जीवन जगणे आवश्यक नाही !* जर असे म्हणते, तर समजा धर्म नाही. *प्रत्येक परंपरा हेच म्हणते- सदाचाराचे जीवन जगा, दुराचारापासून दूर राहा.*_

                    _*दुराचार काय असतो ? जेव्हा आम्ही आपल्या वाणी वा शरीराने कोणतेही असे काम करतो ज्यामुळे अन्य प्राण्यांची हानी होते, त्याचे अहित होते, त्याचे अमंगल होते, त्याची सुख-शांती भंग होते, तेव्हा ते दुष्कर्म होते. तसेच ते तेव्हाच होते जेव्हा मनात विकार जागवतो.* हे सर्वांवर लागू होते, म्हणून सर्वांचा धर्म झाला. तसेच सदाचाराचे जीवन जगण्यासाठी मन ताब्यात ठेवावे लागते. सर्व परंपरेचे लोक आपल्या शिबिरात येतात, भेटतात, चर्चा करतात, आपल्या ग्रंथातील बाबी समोर ठेवतात तेव्हा हेच म्हणतात मनाला संयत ठेवा, संयमित ठेवा, ताब्यात ठेवा. अरे, *मनच ताब्यात नसेल तर सत्कर्म कसे कराल ?* दुष्कर्मच दुष्कर्म कराल ना ! सर्व परंपरेला हे मान्य आहे. परंतु मनाला संयमित केले, ताब्यात ठेवले तरीही अंतर्मनाच्या खोलीत विकारांचा संग्रहंच संग्रह आहे, विकारांचे संवर्धन होत आहे. मनाच्या वरवरच्या भागावर आम्ही नियंत्रण केले, संयम केला. चांगली बाब आहे, काहीही नसण्यापेक्षा हे चांगले. परंतु आत जो हा विकार जागवण्याचा स्वभाव आहे. विकारांचे संवर्धन करत राहाण्याचा ज्वालामुखी आहे. वरवर हजार शांती प्राप्त करू, पण अंतर्मनात ज्वालामुखी जेव्हा उफाळेल. तेव्हा पुन्हा तसेच्या तसेच होऊ. त्यामुळे *मनाच्या खोलीपर्यंत संपूर्ण मनाला निर्मळ करावयाचे आहे. कोण विरोध करेल ?* कोणत्याही परंपरेचा मनुष्य विरोध करु शकत नाही. कारण हा जो धर्म आहे तो अभिन्न आहे, सर्वांसाठी एकसारखा आहे. वरवरची खोळ वा पात्र अनेक आहेत. पण आत धर्माचे सार एकच आहे. एखाद्या परंपरेचे असे कर्मकांड. दुस-याचे तसे कर्मकांड, तिस-याचे काही अन्य कर्मकांड, हे भिन्न असतील ती वरची खोळ आहे. दार्शनिक मान्यता भिन्न भिन्न असतील, व्रत-उपवास, सण-वार भिन्न-भिन्न असतील. या विभिन्नतेचे नाव संप्रदाय आणि अभिन्नतेचे नाव धर्म आहे._

             _*धर्म सर्वांचा एकसारखा असतो, सर्वांवर लागू होतो, सर्व काळी लागू होतो - तरच तो धर्म आहे.* परंतु विभिन्नतेलाच धर्म मानले व असे मानून त्याच्याप्रती सखोल आसक्ती झाली की माझाच धर्म चांगला आहे, मी जे कर्मकांड करतो तेच मुक्तीपर्यंत घेऊन जाईल. तू कसले कर्मकांड करतोस ? यामुळे मुक्ती कशी मिळेल रे ? इत्यादी.... अशा अशा दार्शनिक मान्यता धर्म बनल्या, *ज्यांचा धर्माशी दूरचाही संबंध नाही. लक्षपूर्वक पाहिले तर जो धर्माचा वैरी आहे तोच धर्म बनतो, तेव्हा धर्माची हानी होते, धर्माला ग्लानी येते.* तेव्हा कोणी समजदार मनुष्य धर्माचे खरे स्वरुप प्रकट करतो, भांडत नाही. जे तुझे कर्मकांड, व्रत-उपवास, सण-उत्सव आहेत ते तू साजरे कर ! कोणाचीही निंदा नाही, भांडण नाही. पण त्याला धर्म मानू नकोस. *सदाचार आहे तरच धर्म आहे, चित्त संयमित आहे, निर्मळ आहे, तरच धर्म आहे.* हे सुटले तर धर्माचा -हास होतो, धर्माच्या नावावर अधर्म पसरतो. माझा *देव तुला स्वर्गात पोहचवेल. माझा ईश्वर, तुझा ईश्वर.... आपसात भांडतात. का भांडतात ? जर खरोखर कोणी ईश्वर असेल तर सर्वाचाच असेल ना ! भाऊ, धर्माला समजा ! खूप काळ अंधारात राहिलो. कोणाचीही निंदा नाही, भांडण नाही, कोणी जसे मानत असेल तसे मानो. आम्ही धर्माचे खरे स्वरुप समजून त्याला धारण करु.*_

                   _जेव्हा धर्म जागतो तेव्हा याच प्रकारे जागतो - आपल्या आत धर्माचे दर्शन होते, अनुभव करण्याची शक्ती जागते. *कोणाला जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त होते, तेव्हा तो स्वतः म्हणतो चक्खुं उदपादि- चक्षू उत्पन्न होतात. येथे पुन्हा शब्दांचे जंजाळ ! विचार करतो की डोळे बंद केल्यावर आत असे चक्षू उघडतील की आम्हाला सर्वच दिसू लागेल ! अरे, आमचे तर उघडलेच नाहीत, तर आम्ही कसे मुक्त होऊ ? समजून घ्या, धर्माची आपली भाषा असते, आपल्या देशात वारंवार जागते, वेळ येताच नष्ट होते. चक्षू काय असतो ? पाहाण्याची शक्ती जागते. पुरातन भारताच्या परंपरेत पाहाण्याचे दोन अर्थ - एक तर सांसारिक अर्थ - हे जे मांसल चक्षू आहेत, ते रुप पाहातील, रंग पाहातील, प्रकाश पाहातील. आकृती पाहातील हे बाह्य पाहाणे झाले. परंतु आध्यात्माच्या क्षेत्रात पाहाण्याचा अर्थ - अनुभव करणे, डोळ्याने पाहाणे नाही; अनुभव करण्याला पाहाणे म्हटले जात होते.*_

                         _खूप परातन भाषा आहे भारताची विसरुन गेले, परंतु कधी-कधी याची गुंज ऐकायला येते. जसे खूप दूरुन एखादा आवाज ऐकू आला तर म्हणतात, 'अरे पाहा, कसला आवाज आहे ?' येथे पाहाण्याचा अर्थ काय होत होता ? आजही कुठे-कुठे याच अर्थाने या शब्दाचा प्रयोग होतो. 'हे संगीत किती मधूर आहे - अरे, ऐकून तर पाहा !' ऐकून काय पाहा ? त्याचे काही रंग-रुप वा आकृती आहे ? काय पाहा ? ऐकून अनुभव कर की किती मधूर आहे ! 'ही मखमल खूप मुलायम आहे, खूपच मुलायम आहे. असे हात लावून तर पाहा !' हात लावून काय पाहा ? त्याचा रंग पाहा, त्याचे रुप पाहा, त्याची आकृती पाहावी ? हात लावून अनुभव कर, खरोखर मुलायम आहे. 'ही मिठाई खूप स्वादिष्ट आहे, खूप स्वादिष्ट आहे; अरे, तू चाखून तर पाहा.' चाखून त्याचे रुप पाहा, की त्याचा रंग पाहा, काय पाहा ? *पाहाण्याचा अर्थ व्हायचा अनुभव कर. कानात जे शब्द येतात - अनुभव कर, डोळ्याने जे रुप दिसते - अनुभव कर, नाकाने जो गंध येतो - अनुभव कर जिभेने जो रस चाखतो - अनुभव कर, शरीराला काही स्पर्श होतो - अनुभव कर, मनात काही विचार येतात - अनुभव कर. 'अनुभव कर' यालाच पाहाणे म्हटले जात असे. अनुभव करुन जाणा तर चक्खुं उदपादि . अनुभव करण्याची शक्ती जागली. या साडे तीन हातांच्या कायेत अनुभव होतो. बाहेर एखाद्या इंद्रियांचा काही विषय असेल, तो आमच्या इंद्रियाला स्पर्शे करेल, तेव्हा अनुभव होईल, नाही तर अनुभव "होत नाही. तर अनुभव करण्याची शक्ती जागली.*_

                _*पञ्ञा उदपादि - प्रज्ञा जागली, पुन्हा शब्दांचे अर्थ विसरले. भारताच्या पुरातन भाषेत 'प्रज्ञा' म्हणायचे प्रत्यक्ष ज्ञानाला. तेच प्रमुख ज्ञान 'म्हटले जात होते, तेच प्रत्यक्ष ज्ञान म्हटले जात होते.* आपले ज्ञान आहे ना! आपल्या अनुभूतीने जे ज्ञान जागले ते आपले ज्ञान, अन्यथा परोक्ष ज्ञान. कोणी म्हणते असे असे करा, तुम्ही मुक्त व्हाल. असे असे त्याने केले असेल, त्यामुळे तो मुक्त झाला, आम्ही तर नाही झालो ना ! ज्या दिवशी आम्हीही असे असे करु लागू आणि पाहू की विकार दूर होत आहेत, आमचे दुःख दूर होत आहेत, आमचे बंधन दूर होत आहेत, तर आमचे ज्ञान झाले. परके ज्ञान आम्हाला प्रेरणा देऊ शकते, आम्हाला मार्गदर्शन देऊ शकते, आम्हाला मुक्त करु शकत नाही. परोक्ष ज्ञान नाही, *आपले प्रत्यक्ष ज्ञान जागावे, भारतात यालाच प्रज्ञा म्हटले जात होते.* त्या प्रत्यक्ष ज्ञानात आम्ही पक्व व्हावे, स्थित व्हावे - तेव्हा कानावर शब्द येताच अनुभूती म्हणेल, पाहा तरंग आहे. तरंगाला तरंग लागला तर एक नवीन तरंग निर्माण झाला, *अनित्य आहे रे । अनित्य आहे रे ! त्याचा अर्थ समजू बुद्धीच्या स्तरावर, परंतु अंधपणे प्रतिक्रिया करणार नाही. अनित्य आहे रे ! नाकाने गंध आला - अनित्य आहे रे ! जिभेवर रस आला की शरीराला स्पर्श झाला - अनित्य आहे रे ! मनात चिंतन जागले - अनित्य आहे रे ! तरंगच तरंग आहेत. त्या तरंगांची अनुभूती होत आहे आणि आम्ही आपली शुद्ध हरवत नाही, तर प्रज्ञेत स्थित होत आहोत.*_

                _खूप पाठ करत होतो मीही - *इन्द्रियाणी इन्द्रियार्थेम्यः तश्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.* जो इंद्रियांचे काम इंद्रियांकडून करवतो, इंद्रिय केवळ इंद्रियांच्या कामासाठी आहेत, हे जो जाणतो तो प्रज्ञेत प्रतिष्ठित झाला. परंतु कसे जाणले ? सर्व जाणतात की इंद्रिय इंद्रियांचेच काम करतात. डोळे पाहाण्याचेच काम करतात, यात काय विशेष ? कान ऐकण्याचेच काम करतील, यात काय विशेष ? तर काय सर्व स्थितप्रज्ञ आहेत ? नाक वास घेण्याचेच काम करेल, जीभ चाखण्याचेच काम करेल, शरीर स्पर्शाचेच काम करेल, मन चिंतन करण्याचेच काम करेल, यामुळे प्रज्ञेत कसे स्थित झाले ? अरे, म्हणणा-यांनी भारताच्या पुरातन प्रज्ञेचा उल्लेख केला, तिला समोर ठेवले. *हे मनाचे चार भाग - पहिला भाग जाणण्याचे काम करतो. इंद्रियांचा काही विषय आमच्या एखाद्या इंद्रियाशी लागला तर ताबडतोब पहिला भाग- अरे काहीतरी झाले. दुसरा भाग ओळखण्याचे काम करतो, हे झाले. ... तिसरा भाग त्याच्या ज्या संवेदना होतील त्याला भोगण्याचे काम करतो. चौथा भाग प्रतिक्रिया करतो आणि गाठी बांधतो. तर ज्याने ही बाब म्हटली - इन्द्रियाणी इन्द्रियार्थेभ्य: - इंद्रियांनी केवळ इंद्रियांचे काम होवो. म्हणजे कानात शब्द आला, तर बस काम संपले. त्याच्यापुढच्या तीन भागांचे काम करणार नाही आम्ही. त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे. डोळ्याने रुप दिसले तर केवळ रुप पाहिले, बाब समाप्त. अरे, या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी काम करावे लागते, खूप सखोलतेपर्यंत मेहनत करावी लागते. आता तर कोणत्याही विषयाचा इंद्रियांशी स्पर्श झाला की तो चवथा भाग प्रबळ होऊन जागतो - आसक्ती जागवेल.* प्रतिक्रिया करेल तर गाठी बांधेल, तर *गुणान्वितं गुणान्वितं* - हेच काम करेल..._

            _सत्याला अनुभूतीवर उतरविल्याविना कोणी मनुष्य कसा समजेल ? ज्याची अनुभूती जागली, संबोधी जागली, तो म्हणतो - *विज्जा उदपादि.* विद्या जागली, म्हणजे ही जी अविद्या होती तिलाच सत्य मानत होतो. जे अनित्य आहे, नश्वर आहे, भंगुर आहे; त्यावर नित्य, शाश्वताचे आरोपण करुन, जे अनित्य आहे त्यावर नित्याचे आरोपण केले तर अविद्या आहे. त्या अविद्येच्या बाहेर निघाले तर विद्या आहे. अरे भाऊ, हे तर अनित्य आहे रे । सर्व इंद्रियांचे क्षेत्र अनित्य आहे रे ! शरीर आणि चित्ताचे सर्व क्षेत्र अनित्य आहे रे ! तर विद्या आहे, अविद्या नाही._

                         _पुन्हा शेवटी म्हणतात- *आलोको उदपादि, प्रकाश जागला. हा जो आम्ही दिवे लावून प्रकाश करतो, चांगले आहे. बाहेर बाहेरचाही अंधकार दूर झाला पाहिजे, पण आम्हाला तर आतला अंधकार दूर करायचा आहे.* तो दूर झाला तर सत्य समोर आले - अरे, काय करत आहोत ? आम्ही आपल्या आत गाठी बांधत आहोत, आपल्याला व्याकुळ करत आहोत. हीसुद्धा शुद्ध नाही की मी आपली हानी करत आहे. इतरांची हानी तर करतोच, प्रथम आपली हानी करत आहे. *जेव्हा-जेव्हा वाणी वा शरीराने दुष्कर्म करतो, मनाला मलिन करतो, एखाद्याची हत्या करतो, तर प्रथम मनात द्वेष, दुर्भावना, क्रोध जागवतो, तेव्हा कोणाची हत्या होते. चोरी करतो, तेव्हा प्रथम लोभ-हांव जागते, तेव्हा चोरी करतो. व्याभिचार करतो तेव्हा प्रथम खूप वासना जागते, तेव्हा व्याभिचार करतो. याच प्रकारें वाणीने खोटे बोलतो. कोणाला उगवतो, द्वेषाने बोलतो तर कशाने करतो ? कोणता ना कोणता विकार जागवूनच करतो. निसर्गाचा नियम आहे. जसाही मी विकार जागवला की ताबडतोब दंड मिळतो, उशीर होत नाही. दोन्ही सोबतच जागतात, म्हणून 'सहजात' म्हणतात. मी विकार जागवला आणि त्यासोबत दुःख जागले, व्याकुळ झालो. शांती समाप्त झाली. हा धर्म समजला नाही तर अंधारात आहोत आणि आपली हानी करत आहोत.*_

                       _ज्या दिवशी हे ज्ञान होईल की मी आपली हानी करणार नाही, त कसे काय हानी करणार नाही ? बाहेरच्या जगात आम्ही अग्नीवर हा ठेवला, हात जळला. एक-दोनदा चुकीने ठेवला, पुन्हा शुद्ध आल अग्नीवर हात धरु नये ! तो जाळतो. असेच आपल्या आत कायेत स्थित होऊन, कायस्थ होऊन या साढे तीन हातांच्या कायेत अनुभूतीने जाण आहोत, तर अंधकार नाही. जसे अग्नीला स्पर्श करुन बाहेर- बाहेरुन जाणले की जाळतो. तसेच कायेत स्थित होऊन जाणले, विकार जागल की आम्ही व्याकुळ होतो, आम्हाला दंड मिळतो. अनुभूतीने जाणले त धर्माला जाणले. आत प्रकाश झाला, अंधकार दूर झाला. अंधकारात मनुष्ट आपल्या स्वतःची हानी करतो अन्यथा कोणाला स्वतःची हानी करावीस वाटेल ? जगात कोण असा मनुष्य आहे जो आपल्यासाठी दुःख निर्माण करेल आणि म्हणेल मी खूप आनंदी आहे. कोण आपल्या स्वतःला व्याकु बनवू इच्छितो, दुःखी बनवू इच्छितो ? यापेक्षा मोठा अंधकार अजून काय असेल की आपल्या अंतर्मनाच्या खोलीत जेथे विकार उत्पन्न होतात, त्याला आम्ही जाणतच नाही की केव्हा उत्पन्न झाले, काय उत्पन्न झाले आणि त्याचा काय परिणाम झाला ? हे वरवरचे चित्त बाहेर बाहेरच्या जगात आपल्या स्वतःला खूप आनंदी समजते. जसे खूपसे निखारे जळत आहेत आणि त्यावर जाडसर राखेचा थर आहे. सर्व जीवन या राखेच्या थरात गेले पाहा, बिल्कुल अग्नी नाही ना ! अरे भाऊ ! आत अग्नीचे निखारे आहेत. हे दिसू लागले, अनुभवावर उतरु लागले, तर धर्म जागला, पुन्हा अधर्म करुच शकत नाही. कसा करेल ? आपली हानी कोणी कसा करेल ? कोणी करणार नाही._

                        _हे जागते तर *आलोको उदपादि. प्रकाश झाला, अंधकार दूर झाला. पुरातन भारताचे हे पुरातन शब्द, आज यांचे अर्थच लुप्त झाले आहेत. तर जे काही अंतर्मुखी होऊन अनुभव करत आहात, त्यासोबतच या शब्दाचे अर्थही जागोत - काय अज्ञान आहे, काय ज्ञान आहे, काय दुष्प्रज्ञता आहे, काय प्रज्ञता आहे, काय अविद्या आहे, काय विद्या आहे, काय अंधकार आहे, काय प्रकाश आहे ? बुद्धिविलास करुन नाही ! गुरु महाराजांनी सांगितले यासाठी मानत आहोत, आमची परंपरा म्हणते म्हणून मानत आहोत. आमचे धर्मशात्र म्हणतात म्हणून मानत आहोत, तर मग धोकाच धोका. ज्या दिवशी हे म्हणाल 'माझा अनुभव म्हणतो, म्हणून मानत आहे'. जसे अग्नीवर हात धरल्यावर हात जळतो, तसेच मनात विकार जागवल्यावर ताबडतोब दंड मिळतो, मी व्याकुळ होतो, दुःखी होतो. ही प्रज्ञा झाली, प्रत्यक्ष ज्ञान झाले. हा प्रकाश जागला. बाहेर बाहेर प्रकाश असला पाहिजे. अंधकाराचे जीवन का जगावे ? अंधकाराचे जीवन वटवाघळाचे जीवन, घुबडाचे जीवन. बाकी लोक तर प्रकाशाचे जीवन जगतील, परंतु केवळ बाहेरच्या प्रकाशाने बाब साध्य होत नाही. आतील प्रकाश जागावा ! अंतरी प्रकाश जागावा ! यासाठी साधना करायची आहे. कधीही हे समजू नका की मी डोक्यापासून पायापर्यंत इतक्या फे-या मारल्या आणि ढगांवर कोणी बसून मोजत आहे की याने किती फे-या मारल्या. याने जास्त फे-या मारल्या, याच्यासाठी हा दरवाजा उघडत आहे. त्याने कमी फे-या मारल्या त्याच्यासाठी हा दरवाजा उघडत आहे, अरे, कोणीही दरवाजा उघडणारा नाही भाऊ !*_

                    _*अत्ता हि अत्तनो नाथो, अत्ता हि अत्तनो गति । आम्ही स्वतः ... आपले मालक आहोत. अजून कोण मालक आहे ?* जरा विचार करुन पाहा! असा कोण मालक असेल जो आमच्या मनात विकार जागवून आम्हाला व्याकुळ करेल? हा कसा मालक आहे आम्हाला दुःखी बनवणारा? अरे, का विचा-याला बदनाम करता ! त्याला काय गरज आहे. की जगातील सर्व लोकांना व्याकुळ बनवावे, सर्वात विकारच विकार जागवावेत आणि म्हणावे की माझी प्रार्थना करा, मी सर्वांना तारेन. कसा असेल तो ? हा कसा प्राणी आहे ? अरे नाही, आम्ही कल्पना केली, आम्ही बनवले. ज्या दिवशी ही शुद्ध येईल की मी आपला मालक आहे. *मी आपली गती बनवतो. सुखाची गती बनवू की दुःखाची गती बनवू, दुर्गती बनवू की सद्गती बनवू अथवा सर्व गतींच्या पलीकडे मुक्त अवस्थेला प्राप्त करु मीच जबाबदार आहे.*_

                    _धर्माचा अजून एक मापदंड आहे - *धर्म ज्या दिवशी आपल्या सत्य स्वरुपात जागतो, तेव्हा प्रत्येकाला स्वावलंबी बनवतो.* अन्यथा कोणी म्हणेल की एखाद्या अदृश्य शक्तीला खूश कराल तर तुम्ही एकदम मुक्त व्हाल. या आमच्याजवळ, पण इतकी दक्षिणा ठेवा, तेव्हाच मुक्ती होईल. तर समजा, अधर्मच अधर्म आहे. कोणाचीही निंदा नाही, पण समजले पाहिजे की त्या बिचा-यांचा हा धंदा आहे, ते आपले पोट भरण्यासाठी असे म्हणतात, म्हणू द्या. आम्ही का त्या जंजाळात पडावे ? कोणी धोका देतो आणि आम्ही त्या धोक्यात पडतो, तर आपली हानी करतो, त्यापासून आम्हाला वाचले पाहिजे, जो जसे मानत असेल तसे मानो, पण ख-या अर्थाने सुखी राहो. परंतु आम्हाला स्वावलंबी बनावयाचे आहे. आम्ही जबाबदार आहोत, आमच्या प्रत्येक कर्माची जबाबदारी आमची आहे. चांगले कर्म करु, तर आपोआपच चांगले फळ येईल. प्रकृतीचा नियम आहे. जसे बीज असेल, तसेच फळ येईल. या नियमाला कोणीही बदलू शकत नाही, याला समजून आम्ही चांगले बीज टाकावे, आम्ही सत्कर्म करावे. आपोआप सर्व ठीक होईल, सर्व चांगलेच होईल. *आम्ही दुष्कर्मापासून दूर राहावे, दुष्फळ आमच्याजवळ येणार नाही, दुःख आमच्याजवळ येणार नाही. इतकी साधी बाब धर्माची, पण आम्ही तिला ऐकू इच्छित नाही, समजू इच्छित नाही, पालन करु इच्छित नाही, कारण आम्ही आपल्या स्वतःला खूप दुर्बळ समजतो* - अरे आमच्याने काय होणार? आमच्याने कसे होणार? अजून कोणी करुन देईल, अजून कोणी करुन देईल._

                    _*ज्या दिवशी धर्म जागतो, त्या दिवशी प्रत्येक मनुष्य आपली जबाबदारी समजतो, स्वावलंबी बनतो, परावलंबी केवळ इतकाच की कोणी मार्गदर्शन करावे, कोणी कसे चालावे, तो रस्ता दाखवावा. प्रत्येक पावलावर चालावयाचे मलाच आहे, ही शुद्ध जागवत आहोत तर समजा हे प्रकाशाचे पर्व आमच्यासाठी खरोखर नवीन वर्ष घेऊन आले, आमच्यासाठी खरोखर नवे जीवन घेऊन आले. आमच्यासाठी खरोखर नवीन भविष्य घेऊन आले, कल्याणकारी भविष्य घेऊन आले.*_

                  _*खूप समजदारीने अविद्येच्या अंधकाराला दूर करावे. धर्माच्या ख-या स्वरुपाला समजावे आणि मुक्तीच्या मार्गावर पाऊल-पाऊल समोर जात जावे.*_ 

_*आपले मंगल साधावे ! आपले कल्याण साधावे ! आपली मुक्ती साधावी ! सर्वांचे मंगल होवो ! सर्वांचे कल्याण होवो !*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १८/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) बुद्धवर्ष २५६०, कार्तिक पौर्णिमा, १४ नोव्हेंबर, २०१६, वर्ष ३ अंक ८_*

*_२) जमनाबाई हायस्कूल, मुंबई येथे दीपावलीप्रीत्यर्थ पूज्य गुरुजींनी जुन्या साधकांना दिलेले प्रवचन (संक्षिप्त), दि. ५ नोव्हेंबर, २००२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_17.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 16 November 2023

इतिपि सो भगवा लोकविदू

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_इतिपि सो भगवा लोकविदू_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_- ते भगवान लोकविदू (सर्व लोकांना जाणणारे) आहेत._ 

_*लोकं विदती जानातीति लोकविदू-*_

_ज्याला लोक माहित आहेत, जो लोकांना जाणतो, तो लोकविदू. किती आहेत हे लोक ?_

_*चार अधोगतीचे लोक-* निरय, असुर, प्रेत, तिर्यक (पशु-पक्षी)_ 

*_एक मनुष्य लोक._*

_*सहा देवलोक* चातुर्महाराजिक, त्रायस्त्रिंश, याम, तुषित, निर्माणरति, परनिर्मित वशवर्ती._

_*सोळा रूप ब्रह्मलोक-*-ब्रह्मपारिषद, ब्रह्मपुरोहित, महाब्रह्मा, परित्ताभ, अप्रमाणाभ, आभास्वर, परित्रशुभ, अप्रमाण शुभ, शुभकृत्स्न, बृहत्फल, अविहा, अतप्य, सुदर्श, सुदर्शी, असंज्ञसत्ता, अकनिष्ठक._

_*चार अरूप ब्रह्मलोक-* आकाशानन्त्यायतन, विज्ञानानन्त्यायतन, आकिञ्चन्यायतन, नैवसंज्ञानासंज्ञायतन._

_*अशाप्रकारे एकतीस लोक होतात-ह्यापैकी पहिले अकरा कामभोगाचे लोक आहेत. ब्रह्मलोक ब्रह्मचरणाचे लोक आहेत. तेथे कामभोग नसतात. रूप ब्रह्मलोकात रूप (शरीर) आणि नाम (मन) ह्या दोघांचे आस्तित्व असते, परंतु अरूप ब्रह्मलोकात रूप नसते, फक्त नाम असते. आज रूप शब्द सौंदर्य किंवा आकृती ह्या अर्थात प्रचलित आहे. परंतु त्या काळांतील भाषेत रूप भौतिक पदार्थांना देखील म्हणत होते. आज नामचा अर्थ केवळ नामकरण असा राहिला. याचा उपयोग एखाद्यास हाक मारणे, ओळखणे यासाठीच केला जातो. परंतु त्या काळातील भाषेत नाम चित्तालासुध्दा म्हणत होते. मनुष्य आणि पशूलोकात भरीव, ठोस भौतिक शरीर असते, पण अधोगतीच्या कांही लोकात आणि देव व ब्रह्मलोकातील प्राण्यांचे शरीर भरीव नसते, ते वायवीय असते, परंतु असते भौतिकच. केवळ अरूप ब्रह्मलोकातील प्राणी भौतिक शरीरधारी नसतात. त्यांचे शरीर सूक्ष्म वायवीय सुध्दा नसते. ते केवळ नाममय म्हणजे चित्तमय प्राणी असतात. अशाच प्रकारे असंज्ञसत्ता ब्रह्मलोकात फक्त रूपमय प्राणी असतात.*_

_*अन्य एका गणतीत एक कामलोक, दुसरा रूप ब्रह्मलोक, आणि तिसरा अरूप ब्रह्मलोक हे तीनच लोक गणले जातात.*_

_*दुस-या एका गणतीत सर्व विश्व ज्या शून्य आकाशांत स्थित आहे त्याला आकासलोक, कारण की त्यात प्राणी अस्तित्वात आहेत म्हणून ते सत्त् (सत्व) लोक आणि त्यात संस्कारांची तरंगे सामावलेली आहेत म्हणून संखारलोक हे तीन लोक म्हटले जातात.*_

_*साधारणपणे मनुष्यलोकास इहलोक म्हणतात आणि दुस-या सर्व लोकांना परलोक म्हणतात. साधना क्षेत्रात नाम आणि रूपाच्या सर्व -क्षेत्राला लोक म्हटले आहे. ह्यात सर्व एकतीस लोकांचा समावेश आहे.*_

_कांही कां असेना, कशा प्रकारेही गणती करा, या सर्व लोकांच्या बाबतीत ज्याला संपूर्ण सत्य माहित आहे, त्यालाच लोकविदू म्हणतात. याविषयी पूर्ण माहिती खऱ्या अर्थी त्यालाच होते जो ह्या एकतीस लोकांचे संशोधन पूर्ण करून त्यांना पूर्वपणे जाणून, त्या पलिकडील लोकातीत निर्वाणाचा साक्षात्कार करील म्हणजेच लोकन्तगू होईल. लोकन्तगू झाला तरच खऱ्या अर्थाने लोकविदू होतो नाही तर भ्रम-भ्रांतीतच अडकून राहातो._

*_लोकांच्या पलीकडे कसे जाणार?_*

_प्राचीन काळी रोहिताश्व नावाचा एक ऋषी होता. तो मृत्युनंतर देवलोकांत जन्मला, भगवानांच्या जीवनकाळात अनेक देव, ब्रह्मा भगवानांना भेटण्यास येत असत आणि त्यांना धर्मविषयक प्रश्न विचारत असत. एकदा भगवान अनाथपिंडिकाच्या जेतवनात विहार करीत होते तेव्हा रोहिताश्व देव रात्रीच्या वेळी सा-या जेतवनाला आपल्या प्रकाशाने प्रकाशित करीत भगवानांना भेटण्यास आला. त्याने भगवानांना प्रश्न विचारला की सर्व लोकांच्या पलिकडील त्या अवस्थेपर्यंत चालत चालत पोहोचू शकतो का, की जेथे जन्म नाही व मृत्युही नाही, जेथे पतन होत नाही व उत्पत्तीही होत नाही?_

_भगवानांनी सांगितले--नाही. चालत चालत त्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही, तरीसुध्दा मुक्तिसाठी त्या अवस्थेपर्यंत पोहोचणेही अत्यंत अनिवार्य आहे._

_रोहिताश्व देव हे ऐकून प्रसन्न झाला, कारण त्याच्या मनुष्य जीवनांत त्याने योगाच्या सामर्थ्याने सिध्दी प्राप्त केल्या होत्या. त्या सिध्दींच्या आधारावर तीव्र गतीने चालत चालत लोकांच्या पलिकडील अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या निष्फल प्रयत्नात त्याने आपले सारे जीवन घालविले होते. तेव्हा भगवानांनी समजावले_

*_इमस्मियेव व्याममत्ते कळेवरे ससञ्जिम्हि समनके-_*

_*ह्या साडेतीन हात लांब असलेल्या संज्ञायुक्त शरीरात-*_

_लोकञ्च पञ्ञपेमि, लोकसमुदयञ्च, लोकनिरोधञ्च, लोकनिरोधगामिनिञ्च पटिपदन्ति ।_

_*(अ०नि० १.४.४५, रोहितस्ससुत्त)*_

_*- मी लोकांना जाणतो, लोक-समुदयाला, लोक-निरोधाला, आणि लोक-निरोध करण्याच्या मार्गालाही.*_

_भगवानांनी स्वतः लोकोत्तर अवस्था प्राप्त केली असल्यानेच ते लोकांना जाणू शकत होते. दुस-या एका प्रसंगी भगवानांनी सांगितले-_

_*भिक्षूंनो, तथागतांनी लोक जाणला आहे. तथागत लोकापासून मुक्त आहेत. भिक्षूंनो, तथागतांनी लोक-समुदय म्हणजे लोकांची उत्पत्ती जाणली आहे. तथागतांची लोकातील उत्पत्ती नष्ट झाली आहे, समाप्त झाली आहे.*_

_भिक्षूंनो, तथागतांनी लोक-निरोध जाणला आहे. तथागतांनी लोक-निरोधाचा साक्षात्कार केला आहे. तथागतांनी लोक-निरोधगामिनी प्रतिपदा (निवारण करण्याच्या मार्गालाही) जाणली आहे. म्हणजेच लोक-निवारण करण्याचा मार्ग भावित केलेला आहे. त्याचा अनुभव घेतला आहे._

_सगळ्या लोकांच्या पलिकडील अवस्था मिळविण्यासाठी सा-या लोकांचे परिपूर्ण ज्ञान म्हणजे परिज्ञान, अभिज्ञान होणे आवश्यक आहे. लौकिक क्षेत्राच्या पलिकडील अवस्था ती व्यक्ती कशी पार करू शकेल जिने समस्त लौकिक क्षेत्राचे परिपूर्ण यथाभूत ज्ञान प्राप्त केले नाही ? अनुभूतीच्या स्तरावर असे ज्ञान प्राप्त केल्यानंतरच कोणी व्यक्ती सर्व लोकापासून विमुक्त होते. तेव्हाच त्यापासून अलिप्त होते. तेव्हा म्हटले गेले-_

_*सब्बं लोकं अभिज्ञाय, सब्बं लोके यथातथं ।*_

_सर्व लोकांना अभि-ज्ञानाने जाणून, सर्व लोकांना जशेच्या तसे ( यथातथ्य) जाणून, सर्व लोकांपासून निर्बंध, सर्व लोकांपासून अलिप्त अशी जी व्यक्ती सगळा लोकप्रपंच स्वतःच्या अनुभवाने जाणून, त्यापासून विमुक्त झाली, निर्लिप्त झाली, ती व्यक्ती ख-या अर्थाने लोकविदू आहे. तीच सर्वजित आहे._

_*स वे सब्बाभिभू धीरो, सब्बगन्थप्पमोचनो।*_ 

_*फुट्ठस्स परमा सन्ति, निब्बानं अकुतोभयं ॥*_

_*(अ० नि० १.४.२३, लोकसुत्त)*_

_तो धीर पुरूष सर्वांना पराजित करतो. तो सर्व ग्रंथींपासून विमुक्त आहे. त्याने निर्वाणिक परम शांतीला स्पर्श केला आहे आणि भय मुक्त झाला आहे._

_अशा लोकविदूला लोकांबद्दल आणि लोकमुक्त होण्याविषयी काय भय आणि काय संशय राहील? जेव्हा लोकांच्या अंतिम टोकाला जाणून त्याच्या पुढे निघून जाईल, सगळ्या लौकिक क्षेत्राच्या पलिकडील लोकातील निर्वाणाचा स्वतः साक्षात्कार करून घेईल, तेव्हाच असे होईल._

_*तस्मा हवे लोकविदू सुमेधो, लोकन्तगू वुसितब्रह्मचरियो ।*_ 

*_लोकस्स अन्तं समितावि ञत्वा, नासीसती लोकमिमं परञ्चाति ॥_* 

*_(अ० नि० १.४.४५, रोहितम्ससुत्त)_*

_म्हणून जो लोकविदू आहे, सुप्रज्ञ आहे. लोकाचा अंत जाणणारा आहे, ज्याने ब्रह्माचरण पूर्ण केले आहे (तो) समतेच्या आधारावर लोकाचा अंत जाणून इहलोकात किंवा परलोकात कोठेही आसक्त होत नाही._

_खरोखर जो सर्व लोकप्रपंचाला जाणतो तो लोकांविषयी आसक्त होवू शकत नाही. कोणी व्यक्ती लोकविदू तेव्हाच होते, जेव्हा ती लोक स्वभावाला जाणते, लोकांच्या उत्पत्तीला जाणते, लोकांच्या निरोधाला जाणते, लोक निरोधाच्या उपायांना जाणते. ह्या चौघांना आपल्या शरीराच्या आतच जाणते._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १७/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) विश्व विपश्यनाचार्य श्री सत्यनारायण गोयन्कांनी लिहिलेले पुस्तक "तिपिटक मे सम्यक संबुद्ध भाग-२/४ मधून साभार_*

*_२) अ०नि० १.४.४५, रोहितस्ससुत्त_*

*_३) अ० नि० १.४.२३, लोकसुत्त_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_67.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

शून्यागाराचे महत्व

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शून्यागाराचे महत्व_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_भगवंतांनी म्हटले आहे- “जेव्हा कोणी व्यक्ती एकटा तपतो तेव्हा जसे ब्रह्मा तपतो. जिथे दोघे जण मिळून तपतात तेव्हा जसे कोणी देवता तपतात. तिघेजण एकत्र बसून तपतात तेव्हा जसे कोणी तपस्वी मनुष्य तपतात. यापेक्षा अधिक लोक एकत्र बसून तपतात तेव्हा कोलाहल होतो." तितक्या सखोलतेने तप होत नाही, याकरीता शून्यागाराचे महत्व सर्वोपरी आहे. *शून्यागार म्हणजे असे स्थान, अशी खोली, अशी कुटी ज्याच्यात आपल्या शिवाय आणखी कोणी नाही, शून्यच शून्य. एकटा व्यक्ती एकांतात ध्यान करू शकेल, हे खूप आवश्यक असते आणि त्याचा मोठा लाभ होतो.* ब्रह्मदेशात जे ध्यानाचे केंद्र आहे, तिथल्या *शून्यागारांमध्ये जे तपस्वी तपतात, त्यामुळे तिथले तरंग कशा प्रकारे धर्माने ओतप्रोत भरलेले आहेत हे कोणी साधकच समजू शकतो. तिथे बसून ध्यान केले तर किती फरक पडेल. ठीक अशाच प्रकारे इगतपुरीमध्ये शून्यागार बनले आहेत, लोक त्यात ध्यान करतात तेव्हा किती मोठा फरक जाणवतो. शून्यागाराचे खूप मोठे महत्व आहे.*_

*_सुञ्ञागारं पविट्ठस्स, सन्तचित्तस्स भिक्खुनो।_*

*_अमानुसी रती होति, सम्मा धम्मं विपस्सती ॥_*

_*'सम्मा धम्मं विपस्सतो'* सम्यक प्रकाराने धर्माची विपश्यना करतो. कुठे करतो- *'सुञगारं पविट्टस्स'* एखाद्या शून्यागारात प्रवेश करून शुद्ध धर्माची विपश्यना करत असेल तर साधक शांत चित्त होतो. आणि *'अमानुसी रती होति'* आतमध्ये असा आनंद, असा रस प्राप्त होतो जो आपल्यासारख्या मनुष्यांना सामान्यपणे आपल्या इंद्रिय सुखांच्या अनुभूतीद्वारे प्राप्त होत नाही. त्याचा कशाशी मुकाबला होऊ शकत नाही, कशाशी तुलना होऊ शकत नाही._

_त्याच्या खूप पलीकडची दिव्य अनुभूती होते, ब्राह्मी अनुभूती होते. आणि त्याच्याही पलीकडील निर्वाणिक अनुभूती होते कारण एकांतात साधना करीत आहे. कुठे कोणता व्यत्यय नाही, कोणत्या बाधा नाहीत._

_या तपोभूमीवर देखील असे शून्यागार निर्माण होतील जिथे साधक आपल्या साधनेद्वारे धर्माच्या तळस्पर्शी गहनतेपर्यंत जाऊ शकतील. *मोठ्या कल्याणाची गोष्ट होईल. कल्याण तर जे-जे तपतील, त्या सर्वांचे होणारच आहे, पण एखाद्या जरी व्यक्तीचे कल्याण झाले तर निर्माण करण्याकरीता जे श्रम, जो त्याग, ज्या कोणी केला असेल, ते सार्थक होईल. यापेक्षा अधिक मूल्य आणखी कोणते होऊच शकत नाही.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १६/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) विपश्यना साधक" बुद्धवर्ष २५६६, चैत्र पौर्णिमा, 6 एप्रिल, २०२३ वर्ष ७ अंक १_*

*_२) धम्मपदपाळि- ३७३, भिक्खुवग्गो._*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_16.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


Wednesday, 15 November 2023

इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप

 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


             *इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप !*


                       *_ओम मणी पद्मे हुं_*


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


          _*१४ व्या शतकात इक्कयु नावाचे एक विद्वान झेन भिक्खू होवून गेले. ते कवितेतून बुद्धविचार ते सादर करीत.* एकदा प्रवासात ते एका दुर्गम विहारात थांबले. बाहेर कडाक्याची थंडी होती, बर्फ पडत होता. विहारात असलेल्या एकमेव भिक्खूंनी इक्कयुला झोपण्यासाठी एक घोंगडी दिली. मध्यरात्री खूपच थंडी पडल्याने इक्कयुना जाग आली. हाडे गारठून टाकणाऱ्या थंडीत त्यांनी ऊब मिळवण्यासाठी आजूबाजूला पाहिले. परंतु *विहारात तीन लाकडी बुद्धरूपांशिवाय काहीही नव्हते. मग इक्कयुने एक लाकडी मूर्ती उचलली आणि आग पेटवून त्या मूर्तीच्या आगीत ते हातपाय शेकू लागले.*_ 


          _आगीचा प्रकाश व धूर यांमुळे विहारातील भिक्खू जागे झाले. *अर्धवट जळालेली बुद्ध मूर्ती पाहून त्यांचा राग अनावर झाला. ते इक्कयुला म्हणाले , “तुला काय अक्कल आहे का ? चक्क बुद्धमूर्ती जाळून ऊब निर्माण करतोस ? धम्माबद्दल तुला काहीच आस्था नाही का ?”*_


_*इक्कयु हसून म्हणाले, “माझ्यातील जिवंत बोधीचित्ताला जिवंत ठेवण्यासाठी निर्जीव बुद्धमूर्तीचा बळी द्यायचा की निर्जीव बुद्धमूर्तीचा आदर करण्यापोटी जिवंत बोधीचित्ताचा बळी द्यायचा हा प्रश्न माझ्या समोर होता. पण शेवटी बुद्ध जिंकले !”*_ 


_भिक्खू म्हणाले, *“बुद्ध मूर्ती जाळून बुद्ध जिंकले म्हणतोस ?”* इक्कयु म्हणाले, *“कोणत्याही परिस्थितीत बोधीचित्त नेहमीच जागृत ठेवणे, पराकष्टाने सांभाळून ठेवणे हेच सांगितले ना बुद्धांनी ?”*_ 


    *_असे म्हणत इक्कयु राखेत काहीतरी शोधायला लागले. हे पाहून भिक्खू म्हणाला, “आता काय शोधतोस राखेत ?” इक्कयू म्हणाले, “बुद्धांच्या अस्थी !”_*


_भिक्खू हसायला लागले आणि म्हणाला, “खरंच, तू मूर्ख दिसतोस ! *अरे, लाकडी मूर्तीत अस्थी कुठून येणार ?”*_


*_इक्कायू म्हणाले, “लाकडी मूर्तीत अस्थी नसतात याचा अर्थ , लाकडी बुद्ध मूर्तीत बुद्ध नसतात ! बरे झाले हे तुम्हीच कबूल करताय , भन्ते ! हे बघा , तुम्हाला अजुन खूप शिकायचे आहे. बुद्ध रूप केवळ एक रूपक आहे , बुध्दत्त्वाचे ! त्याच्यात आम्हीं आम्हांला हवे असलेले बुद्धगुण पाहत असतो, मात्र बुद्ध तुमच्या विचारात असायला हवेत, तुमच्या आचरणात असायला हवेत.” पुढे भिक्खू आणि विहारात सर्वत्र पाहत, इक्कायु म्हणाला, “मागील शेकडो वर्षात बुद्धांना मारण्याचे, गाडून टाकण्याचे, नष्ट करण्याचे अनेकवार प्रयत्न झाले. पण बुद्ध संपू शकत नाहीत, कारण आजही ते तुमच्या- माझ्या विचारातून जिवंत आहेत !"_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_15.html

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Monday, 13 November 2023

कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बौद्धजन पंचायत समितीचे शिल्पकार_* 

*_अस्पृश्य समाजातील पहिले दादासाहेब_* 

*_कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*समाजक्रांतीचे अपत्य - बोद्धजन पंचायत समिती, लेखक - वि. ल. मोहिते* लिखित पुस्तक वाचण्यात आले आणि इतिहासातील कोकणात काही सुवर्ण कामगिरी करणारे महानायकांचा खजिना हाती लागला. *आजच्या पिढीला आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामगिरीची माहिती व्हावी म्हणून ह्या पुस्तकात ह्या महानायकांचा परिचय सोबत बौद्धजन पंचायत समितीची इत्यंभूत माहिती लेखकाने प्रचंड मेहनतीने आणि अभ्यासपूर्वक दिली आहे त्याबाबत लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व अनंत मङ्गल मैत्री.* कोकणांत काम करणाऱ्या कार्यकर्त्याने वाचावे असे हे पुस्तक त्यातीलच एका महानायक :-_

*_कोकण प्रांतातील अस्पृश्य वर्गाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य समाजसुधारक गोपाळबाबा वलंगकर यांच्या परंपरेतील समाजसुधारक कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड यांचे मूळ गांव रायगड जिल्हा, रोहा तालुक्यातील पौड गांव (पहुर) असून त्यांचे वास्तव्य सातरस्ता, बी. आय. टी. चाळ, मुंबई येथील होते._*

_श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांनी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा विरुद्ध फार मोठी चळवळ केली व नवमतवादी, पुरोगामी विचारसरणीचा जोरदार प्रचार केला. *ज्या काळात अस्पृश्यवर्गाला शिक्षणाची कवाडे बंद होती, त्या काळात त्यांनी पुरुषांसहीत स्त्रीशिक्षणाचा प्रभावी प्रचार केला आणि कांही मुलींच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहाय्य केले. त्याचे फलीत म्हणजे त्या मुलींपैकी मुक्ताबाई सातांबकर, देवकाबाई सातांबकर, शांताबाई वडवलकर व अन्य मुली पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेत “शिक्षिका" म्हणून नोकरीस लागल्या, समाजकार्यात भाग घेऊ लागल्या.* अस्पृश्य वर्गाला स्वहक्क आणि स्वाभिमानाची जाणीव करुन देण्याबरोबरच दारुबंदी विषयी समाजात जनजागृती केली._

_*हिंदु धर्माने बहिष्कृत वर्गावर लादलेल्या गुलामगिरीविरुद्ध अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांनी त्यांचे सुपुत्र श्री. भिकाजी संभाजी गायकवाड यांच्या पुढाकाराने तरुणांना संघटीत करुन मुंबईत -महार समाज सेवा संघ" या नावाची संघटना दिनांक १० ऑगस्ट १९२६ रोजी स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १९ व २० मार्च  १९२७ रोजी कुलाबा जिल्हा बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद झाली, त्या ऐतिहासिक परिषदेचे सारथ्य महार समाज सेवा संघाने केले. आणि या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बासाहेब आंबेडकर व स्वागताध्यक्ष श्री. संभाजी तुकाराम गायकवाड होते. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री. अनंतराव तथा भाई चित्रे, सु. गो. तथा नानासाहेब टिपणीस आणि महाड येथील कायस्थ तरुणांच्या सक्रीय सहकार्याने परिषद यशस्वी करुन दाखविलीच,* शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिकरित्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करुन आपले मानवी हक्क प्रस्थापित करण्याचा पराक्रम गाजविला. *महाड परिषदेनंतर अस्पृश्य वर्गाने हिंदू धर्मातील चालीरीती, रुढी, परंपरा, गावकामे नाकारल्यामुळे ज्यांच्या जन्मजात श्रेष्ठत्वाला धक्का बसला त्या स्पृश्य वर्गाने कोकणातील सर्वच खेड्यात अस्पृश्य वर्गावर अन्याय अत्याचाराचे सत्र सुरु केले. त्यावेळी श्री संभाजी गायकवाड व महार समाज सेवा संघाच्या सहकाऱ्यांनी अस्पृश्यांना धीर देऊन मदत मिळवून देण्याचे कार्य केले. अन्यायग्रस्तांना धीर देऊन मदत मिळवून देण्याचे कार्य केले. त्यासाठी संघाने "कोकण संरक्षक फंड” सुरु केला.*_

_डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील कोकण प्रांतात खोती विरोधात झालेल्या शेतकरी वर्गीय आंदोलनात श्री संभाजी तुकाराम गायकवाड यांनी सक्रीय सहभाग घेतला._

_सिंध प्रांत खेरीज करुन मुंबई इलाक्यातील दलीत वर्ग व रानटी जाती यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्थितीचा विचार करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या *स्टार्ट कमिशनपुढे कोकण विभागातील अस्पृश्य वर्गातर्फे श्री. संभाजी तुकाराम गायकवाड, चांगदेव नारायण मोहिते, शिवराम गोपाळ जाधव, गोविंद रामजी आडरेकर, तानाजी महादेव गुडेकर यांनी साक्ष दिली.*_

_*ब्रिटीश सरकारने माहे नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे आयोजित केलेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सकरिता हिंदी बहिष्कृत वर्गाचा प्रतिनिधी म्हणून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केले. त्याप्रित्यर्थ महार समाज सेवा संघाने श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली “डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्स फंड' कमिटीची स्थापना केली. या कमिटीकडे जमा झालेली रक्कम रुपये १५००/- दिनांक २ आक्टोबर १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानपत्र समारंभ कार्यक्रमात त्यांना अर्पण करण्यात आली.*_

*_डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सन १९४१ साली विभागा- विभागातील जात पंचायतीना संघटीत करुन "महार ज्ञाती पंचायत समिती” (आताची बौद्धजन पंचायत समिती) या मध्यवर्ती संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था स्थापन करणाऱ्या कार्यकर्त्यांत श्री. संभाजी तुकाराम गायकवाड अग्रभागी होते._*

_*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २० जुलै १९२४ रोजी स्थापन केलेल्या "बहिष्कृत हितकारिणी सभेचे उपाध्यक्ष, धर्मांतर घोषणेस पाठींबा देण्यास दिनांक ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई येथे भरलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेचे उपाध्यक्ष" पदावर राहून श्री. गायकवाड यांनी कार्य केले. काळाराम मंदिर सत्याग्रहात त्यांनी सक्रीय भाग घेतला.* महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकण प्रांतात जेथे परिषदांसाठी डॉ. बाबासाहेब गेले, तेथे त्यांच्या समवेत श्री. गायकवाड गेले नाहीत असे क्वचितच घडले आहे, इतके ते बाबासाहेबांच्या कार्याशी एकरुप झाले होते._

*_श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या सर्वव्यापी अमोल कामगिरीमुळेचे डॉ. बाबासाहेबांनी ‘“दादासाहेब” ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. अस्पृश्य समाजातील पहिले दादासाहेब म्हणजेच संभाजी तुकाराम गायकवाड होय.. त्यानंतरचे दुसरे ‘“दादासाहेब ” श्री भाऊराम कृ. गायकवाड होत._*

_*दलीत मुक्ती संग्राम चळवळीतील एक बिनीचे शिलेदार म्हणून "अखिल मुंबई निवासी अस्पृश्य वर्गातर्फे” सन १९३७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांना थैली व मानपत्र अर्पण करुन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

*_टीप :- ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी बोद्धजन पंचायत समिती, भोईवाडा, परेल येथील कार्यालयाशी, तसेच संपर्क करावा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १४/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_समाजक्रांतीचे अपत्य बोद्धजन पंचायत समिती लेखक - वि. ल. मोहिते_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_13.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 12 November 2023

स्तूप बनविण्यायोग्य व्यक्ती

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  

 *_थूपारहपुग्गलो_*

*_(स्तूप बनविण्यायोग्य व्यक्ती)_* 

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _बुद्धावशेष ज्या चैत्यात, स्तूपात ठेवले आहेत अशा चैत्याची किंवा स्तूपाची पूजा करणे, फूल-हार अर्पण करणे, दीप प्रज्वलीत करणे हे निव्वळ अर्थहीन कर्मकांड आहे काय? अबौद्ध व्यक्तीला तसे वाटू शकते. पण ज्या व्यक्तीला बुद्धांची शिकवण माहीत आहे आणि हे कर्मकांड जाणिवपूर्वक केल्या गेले तर त्याचे किती महत्त्व आहे हे समजल्यावर कोणीही हे कर्मकांड निरर्थक आहे असे म्हणणार नाही. *जेव्हा कोणी एक बौद्ध व्यक्ती बुद्धरूपासमोर फुले अर्पितो, दिप प्रज्वलित करतो आणि क्षणभर शांत राहातो त्यावेळी तो काही प्रार्थना करीत नसतो, काही मागत नसतो. बुद्धाच्या लोकोत्तर गुणांचे स्मरण करून ते आचरणात आणण्याविषयी चिंतन करीत असतो.* वाहीलेली फुले कोमेजतात, प्रज्वलित केलेला दिप विझतो यावरून अनित्यतेचा बोध होतो. *बुद्धरूप ध्यान आणि एकाग्रता प्राप्त होण्यास साहाय्यभूत होते. बुद्धगुणांचे स्मरण प्रेरणा देते ज्यांना ही साधी गोष्ट कळत नाही ते घाईगर्दीने ही मूर्तिपूजा होय असे म्हणून मोकळे होतात. हा सत्याचा विपर्यास होय.*_

_“चत्तारोमे, आनन्द, थूपारहा कतमे चत्तारो तथागतो अरहं सम्मासम्बुद्धो थूपारहो, पच्चेकसम्बुद्धो  थूपारहो, तथागतस्स सावको थूपारहो, राजा चक्कवत्ती  थूपारहोति।_

_“आनंद ! स्तूप बनविण्याच्या योग्यतेचे चार आहेत. ते चार कोण?_

*_१. तथागत, अर्हत सम्यक सम्बुद्ध यांचा स्तूप बनविण्याच्या ते योग्यतेचे सम्बुद्ध आहेत._*

*_२. प्रत्येक बुद्ध त्या योग्यतेचे आहेत._*

*_३. तथागतांचा (शिष्य) श्रावक यांचा स्तूप बनविला जातो._*

*_४. चक्रवर्ती राजा स्तूप बनविण्याच्या योग्यतेचा असतो._*

_“किञ्चानन्द, अत्थवसं पटिच्च तथागतो अरहं सम्मासम्बुद्धो थूपारहो? ‘अयं तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स थूपो’ति, आनन्द, बहुजना चित्तं पसादेन्ति। ते तत्थ चित्तं पसादेत्वा कायस्स भेदा परं मरणा सुगतिं सग्गं लोकं उपपज्जन्ति। इदं खो, आनन्द, अत्थवसं पटिच्च तथागतो अरहं सम्मासम्बुद्धो थूपारहो।_

*_सर्व लोकांनी मनाला प्रसन्न ठेवावे. जेव्हा मनाला प्रसन्न ठेवून शरीराला सोडल्यानंतर सुगती प्राप्त होऊन ते स्वर्गलोकांत निर्माण होतात. या कारणाने आनंद ! तथागत अर्हत सम्यक सम्बुद्धाचा स्तूप बनवावा. कारण, ते त्या योग्यतेचे आहेत._*

_“किञ्चानन्द, अत्थवसं पटिच्च पच्चेकसम्बुद्धो थूपारहो? ‘अयं तस्स भगवतो पच्चेकसम्बुद्धस्स थूपो’ति, आनन्द, बहुजना चित्तं पसादेन्ति। ते तत्थ चित्तं पसादेत्वा कायस्स भेदा परं मरणा सुगतिं सग्गं लोकं उपपज्जन्ति। इदं खो, आनन्द, अत्थवसं पटिच्च पच्चेकसम्बुद्धो थूपारहो।_

*_आनंद! प्रत्येक सम्बुद्ध कोणत्या कारणामुळे स्तुपार्ह आहेत? हा स्तूप प्रत्येक सम्बुद्धाचा आहे, हा विचार करून लोकांच्या मनाला प्रसन्नता मिळते. अशा प्रसन्न मनाने त्यांना सुगती प्राप्त होते व ते स्वर्गलोकांत निर्माण होतात. म्हणून प्रत्येक सम्बुद्ध स्तुपार्ह आहेत._*

_“किञ्चानन्द, अत्थवसं पटिच्च तथागतस्स सावको थूपारहो? ‘अयं तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स सावकस्स थूपो’ति आनन्द, बहुजना चित्तं पसादेन्ति। ते तत्थ चित्तं पसादेत्वा कायस्स भेदा परं मरणा सुगतिं सग्गं लोकं उपपज्जन्ति। इदं खो, आनन्द, अत्थवसं पटिच्च तथागतस्स सावको थूपारहो।_

*_आनंद! तथागतांच्या शिष्यांसाठी स्तूप का बांधला जातो? हा भगवान अर्हत सम्यक सम्बुद्धांच्या शिष्याचा स्तूप आहे, हा विचार करून लोक आनंदित होतात. या मनाच्या आनंदातच त्यांना काया सोडावी लागली तर ते सुगती प्राप्त करून स्वर्गलोकात उत्पन्न होतात. त्या कारणाने तथागताचे शिष्य. श्रावक स्तूपार्ह आहेत._*

_“किञ्चानन्द, अत्थवसं पटिच्च राजा चक्कवत्ती थूपारहो? ‘अयं तस्स धम्मिकस्स धम्मरञ्ञो थूपो’ति, आनन्द, बहुजना चित्तं पसादेन्ति। ते तत्थ चित्तं पसादेत्वा कायस्स भेदा परं मरणा सुगतिं सग्गं लोकं उपपज्जन्ति। इदं खो, आनन्द, अत्थवसं पटिच्च राजा चक्कवत्ती थूपारहो। इमे खो, आनन्द चत्तारो थूपारहा”ति।_

*_आनंद ! चक्रवर्ती राजाचा स्तूप बांधला जातो, याला काय कारण आहे?' जेव्हा तो धार्मिक धर्मराज यांचा स्तूप आहे, हे समजल्यानंतर लोकांचे मन प्रसन्न होते. त्याच अवस्थेत त्यांना मृत्यू आला तर ते सुगती प्राप्त करून स्वर्गलोकांत जन्मतात, म्हणून हे आनंद! चक्रवर्ती राजा स्तूपायोग्य आहे. ह्या चौघांवर स्तूप बांधण्याच्या योग्यतेचे आहेत."._*

*_स्वर्गाचं दार_*

_आऱ्हान नामक एक सैनिक बोधिसत्वाकडे आला आणि त्याने विचारले, “स्वर्ग आणि नरक खरंच असतात का?"_

_बोधिसत्वाने विचारले, "तू कोण आहेस?"_

_तो उत्तरला, "मी सामुराई आहे. "_

_बोधिसत्व रडकं तोंड करत म्हणाला, “तू सैनिक आहेस? असा कोणता राजा आहे, ज्याने भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्याला रक्षक म्हणून नेमले आहे?”_

_राग येऊन आऱ्हानने आपली तलवार काढली._

_"ओऽऽह, तुझ्याकडे तलवार आहे! पण मला वाटतं ती माझं मुंडकं कापण्याइतपत धारदार नाहीये. "_

*_आऱ्हान तलवार म्यानातून उपसत म्हणाला, “घे, तुझ्यासाठी नरकाचा दरवाजा उघडला.” या वाक्याबरोबरच योद्ध्याला बोधिसत्वाची शिकवण समजली. त्याने तलवार म्यान करत नम्रतेने मान लवली, तेव्हा बोधिसत्व म्हणाला, "हे बघ उघडले स्वर्गाचे दरवाजे ! "_*

_(ज्या उपासक - उपासिका यांना वरील परिच्छेदात स्वर्गाचा उल्लेख आलेला आहे तो वाचून काहींच्या मनात संशय - प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांच्यासाठी एक कथा देत आहे.... अभ्यासकांना त्याचा अर्थ सहज समजू शकतो आणि ज्यांना वाद करायचा आहे ते फक्त वादच करीत राहतात.)_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १२/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) महापरिनिब्बानसुत्त (मराठी अनुवादासह - संपादक आयु अरविंद भंडारे_*

*_२) झेन कथा_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_12.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 8 November 2023

तीन उपास्य दैवता

🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽✨

*_ओम मणी पद्मे हुं_*

_*माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे.*_

🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽✨


            _*गुरुवार ता. २८ ऑक्टोबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हीरक महोत्सवानिमित्त पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे भरविण्यात आलेल्या अपूर्व सोहळ्यात १ लक्ष १८ हजार रुपयाची थैली अर्पण करण्यात आली.* पैसा डॉ. साहेबांनी आपल्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी उपयोगात आणावा अशी विनंती हीरक महोत्सव समितीचे सेक्रेटरी श्री. शां. अ. उपशाम आणि श्री. आर. डी. भंडारे हा सर्व यांनी केली. त्यांच्या विनंतीचे सभेला जमलेल्या ३० हजार प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. *परंतु माझ्यासारख्या बॅरिस्टरने आपल्या निढळाच्या घामाने जमविलेला गरीब जनतेचा पैसा स्वीकारणे बेशरमपणाचे आहे असे उद्गार काढून डॉ. बाबासाहेबानी ती सर्व रक्कम मुंबईला बांधण्यात येणाऱ्या इमारत कडाला दिल्याचे जाहीर केले.*_

        _*माझी तीन उपास्य दैवतेही आहेत.* कोणाची मरीआई, खंडोबा, अशी दैवतं असतात, तशी माझी तीन दैवतं आहेत._ 

_*माझे पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे. बुद्धाने एकदा म्हटले आहे की बुद्ध धर्म हा शुद्ध धर्म आहे. येथे भेदभाव नाही. श्रमण, भिक्षु, ब्राह्मण, भंगी मग तो कोणीही असो, सारे एक आहेत. माझ्या संघात येण्यापूर्वी नदी नाला, मग नाव कोणतेही असो, यमुना असो, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी कोणतीही नदी असो, ह्या सर्व नद्या आपल्या प्रांतातून सागरात गेल्या. त्यांचं पाणी एक झालं की हे पाणी मग सांगता येणार नाही की हे यमुनेचं की हे गंगेचं, की हे गोदावरीचं ! तेव्हा माझा संघ हा महासागरासारखा आहे. जात पात नाही. तुम्ही सर्व एक आहात. तुझी विद्येची आवड आहे ना मग ती सफल कर. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला तर अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येचीही आवश्यकता आहे.* ज्ञानाशिवाय तो काय करू शकेल ? ब्रह्मदेशात शेकडा ९० लोक सुशिक्षित आहेत. आज हिन्दुस्थानात शेकडा ९० लोक निरक्षर आहेत. याचे कारण ब्राह्मणांनी आम्हाला विद्या दिली नाही हेच होय. धर्माचे कायदे आमच्या आड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली. आपले लोक समजत की दगड ही विद्या. म्हणून आपल्या धार्मिक समजुती अतिशय रसातळास गेल्या. दगडाची पूजा करणारे भाविक आमच्यात सर्वच लोक आहेत. तुकोबाने एके ठिकाणी म्हटलं आहे, नवस सायासे कन्या पुत्र होती! तरी कासया करणे लागे पती !! याचे कारण त्यांना विद्या दिली नाही. अत्यंत मोठी वस्तू आहे ही विद्या. *माझे विद्येचे वेड भयंकर आहे. ब्राह्मणाच्या घरी नाहीत इतकी पुस्तके आता दिल्लीला मजजवळ आहेत. एकूण तीस हजार पुस्तके आहेत मजजवळ ! आहेत कोणा ब्राह्मणाजवळ ? दाखवून द्यावीत त्याने ! ठाकूर आणि कंपनीची माझ्यावर हजाराची उधारीची बीलं थकलेली आहेत. मला उधारीचा माल कुठेही मिळतो. जिथं माझी उधारी थकली तिथं मी दारातच मोटार उभी करतो, इतके माझं विद्येविषयीचं वेड आहे. हे वेड सर्वांना पाहिजे.* एखाद्याची रांड असते ना! ती दुसऱ्या गावाला असते. समजा, रात्री बारा वाजता त्याला आठवण येते. मग तो रात्रीचा उठून स्मशान पाहत नाही. काही पाहत नाही, तो तिच्या - घरी जाणारच! एवढं जेव्हा पुस्तकावर प्रेम होईल तेव्हाच तो विद्येचा खरा पुजारी होईल. *मी विद्येची पूजा २४ तास करीत असतो.*_

_*माझे दुसरे दैवत स्वाभिमान होय.* मी कोणाची याचना केली नाही. *माझं ध्येय असं होतं की पोट तर भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवाही केली पाहिजे.* डॉ. परांजपे यांच्या विनंतीने एका महाविद्यालयात एकॉनॉमिक्सचा मी प्रोफेसर झालो. तेव्हा मला त्यांनी तेरा व्याख्यानं देण्यासाठी सांगितले. म्हणालो फक्त चार व्याख्यानं देईन. पटल तर ठेवा नाहीतर माझा मार्ग मला मोकळा आहे. कारण मला माझ्या लोकांची सेवा करावयाची होती. त्यासाठी वेळ हवा होता. *पोयबावडीच्या नाक्यावरच्या ४८ व ५० नंबरच्या खोलीत मी कण्याचा भात आणि कण्याची भाकरी खाल्ली. पण समाज सेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही. मार्ग निघाला. लोकांनी थैली स्वीकारून घरं बांधली. माझ्या माहितीच्या एका पुढाऱ्याने म्हणे ४७ हजाराच्या प्रॉमिसरी नोटा लिहून दिल्या होत्या आणि लोकांनी जेव्हा लाखभर रुपयांची थैली अर्पण केली तेव्हा ते फेडले. मला तसे करायचे नाही. मी माझे स्वत चे पोट स्वतःच भरून जी काही सेवा करायची ती केली. नोकरी मला करायची नव्हतीच. कोणीही गव्हर्नर जनरल येवो त्याच्याशी माझी मैत्री असे. परंतु मी कोणाजवळहीं याचना कैली नाही की मला अमुक बनवा किंवा मला ही जागा द्या. हो, दुसऱ्यासाठी मी काही केल असेल पण स्वतःसाठी एक बोट भर चिट्टी लिहिल्याचं कोणीही दाखवून द्यावं. एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर व्हाव ही मात्र माझी दांडगी इच्छा होती: ती पुरी झाली. आता मला ना पेन्सन, ना पगार, ना प्राव्हिडंड फंड ! काही नाही. एकदा इंग्रजांच्या राज्यात कौन्सिलरशिप पत्करली. एकदा काँग्रेसच्या राज्यात पण तेथेही कॉंग्रेसशी माझा खटका उडाला मला जज्ज होता आल असतं. पण अडकून घेऊन करणार काय ? तेव्हा माझा हेच की. दीनता असू नये. मी काही तरी आहे असं मानलं पाहिजे. मी परमेश्वराला देखील कमी मानतो इतका माझा स्वाभिमान तळपता आहे.*_

_आणि *माझं तिसरं दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलं, असं मला आठवत नाही. याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. मी विलायतेला अनेक वेळा गेलो. पण अजून दारू प्यालो नाही, विडी प्यालो नाही. मला कसलं व्यसन नाही पुस्तक आणि कपडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत. शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे मला सांगायला फार अभिमान वाटतो.*_

_अशाप्रकारे माझे तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतं आहेत. यांचा मी बनलेला आहे. या पदाला मी पोहोचलो हे त्यांच्याच शक्तिमुळे होय. मी मात्र केवळ कारण आहे. त्यांचा मी बनलेला एक पुतळा आहे. तेव्हा यांचं अनुकरण करा. तुम्ही माझा समारंभ कैलात तो व्यक्ती करिता केला नसून या तीन दैवतांचा आदर्श म्हणून त्यांचा कृतार्थ होण्यासाठी केलात अस म्हणून मी ही थैली स्वीकारीत आहे._

(_टीप :- बाबासाहेबांचे तीन गुरु "बुद्ध-कबीर-ज्योतिबा फुले" यांची माहिती सर्वांना आहे त्यामुळे त्याबद्दल लिहिलेले नाही आहे._)

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_8.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...