Wednesday, 8 November 2023

तीन उपास्य दैवता

🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽✨

*_ओम मणी पद्मे हुं_*

_*माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे.*_

🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽🌺✨🙏🏽✨


            _*गुरुवार ता. २८ ऑक्टोबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हीरक महोत्सवानिमित्त पुरंदरे स्टेडियम, मुंबई येथे भरविण्यात आलेल्या अपूर्व सोहळ्यात १ लक्ष १८ हजार रुपयाची थैली अर्पण करण्यात आली.* पैसा डॉ. साहेबांनी आपल्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी उपयोगात आणावा अशी विनंती हीरक महोत्सव समितीचे सेक्रेटरी श्री. शां. अ. उपशाम आणि श्री. आर. डी. भंडारे हा सर्व यांनी केली. त्यांच्या विनंतीचे सभेला जमलेल्या ३० हजार प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. *परंतु माझ्यासारख्या बॅरिस्टरने आपल्या निढळाच्या घामाने जमविलेला गरीब जनतेचा पैसा स्वीकारणे बेशरमपणाचे आहे असे उद्गार काढून डॉ. बाबासाहेबानी ती सर्व रक्कम मुंबईला बांधण्यात येणाऱ्या इमारत कडाला दिल्याचे जाहीर केले.*_

        _*माझी तीन उपास्य दैवतेही आहेत.* कोणाची मरीआई, खंडोबा, अशी दैवतं असतात, तशी माझी तीन दैवतं आहेत._ 

_*माझे पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे. बुद्धाने एकदा म्हटले आहे की बुद्ध धर्म हा शुद्ध धर्म आहे. येथे भेदभाव नाही. श्रमण, भिक्षु, ब्राह्मण, भंगी मग तो कोणीही असो, सारे एक आहेत. माझ्या संघात येण्यापूर्वी नदी नाला, मग नाव कोणतेही असो, यमुना असो, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी कोणतीही नदी असो, ह्या सर्व नद्या आपल्या प्रांतातून सागरात गेल्या. त्यांचं पाणी एक झालं की हे पाणी मग सांगता येणार नाही की हे यमुनेचं की हे गंगेचं, की हे गोदावरीचं ! तेव्हा माझा संघ हा महासागरासारखा आहे. जात पात नाही. तुम्ही सर्व एक आहात. तुझी विद्येची आवड आहे ना मग ती सफल कर. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला तर अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येचीही आवश्यकता आहे.* ज्ञानाशिवाय तो काय करू शकेल ? ब्रह्मदेशात शेकडा ९० लोक सुशिक्षित आहेत. आज हिन्दुस्थानात शेकडा ९० लोक निरक्षर आहेत. याचे कारण ब्राह्मणांनी आम्हाला विद्या दिली नाही हेच होय. धर्माचे कायदे आमच्या आड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली. आपले लोक समजत की दगड ही विद्या. म्हणून आपल्या धार्मिक समजुती अतिशय रसातळास गेल्या. दगडाची पूजा करणारे भाविक आमच्यात सर्वच लोक आहेत. तुकोबाने एके ठिकाणी म्हटलं आहे, नवस सायासे कन्या पुत्र होती! तरी कासया करणे लागे पती !! याचे कारण त्यांना विद्या दिली नाही. अत्यंत मोठी वस्तू आहे ही विद्या. *माझे विद्येचे वेड भयंकर आहे. ब्राह्मणाच्या घरी नाहीत इतकी पुस्तके आता दिल्लीला मजजवळ आहेत. एकूण तीस हजार पुस्तके आहेत मजजवळ ! आहेत कोणा ब्राह्मणाजवळ ? दाखवून द्यावीत त्याने ! ठाकूर आणि कंपनीची माझ्यावर हजाराची उधारीची बीलं थकलेली आहेत. मला उधारीचा माल कुठेही मिळतो. जिथं माझी उधारी थकली तिथं मी दारातच मोटार उभी करतो, इतके माझं विद्येविषयीचं वेड आहे. हे वेड सर्वांना पाहिजे.* एखाद्याची रांड असते ना! ती दुसऱ्या गावाला असते. समजा, रात्री बारा वाजता त्याला आठवण येते. मग तो रात्रीचा उठून स्मशान पाहत नाही. काही पाहत नाही, तो तिच्या - घरी जाणारच! एवढं जेव्हा पुस्तकावर प्रेम होईल तेव्हाच तो विद्येचा खरा पुजारी होईल. *मी विद्येची पूजा २४ तास करीत असतो.*_

_*माझे दुसरे दैवत स्वाभिमान होय.* मी कोणाची याचना केली नाही. *माझं ध्येय असं होतं की पोट तर भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवाही केली पाहिजे.* डॉ. परांजपे यांच्या विनंतीने एका महाविद्यालयात एकॉनॉमिक्सचा मी प्रोफेसर झालो. तेव्हा मला त्यांनी तेरा व्याख्यानं देण्यासाठी सांगितले. म्हणालो फक्त चार व्याख्यानं देईन. पटल तर ठेवा नाहीतर माझा मार्ग मला मोकळा आहे. कारण मला माझ्या लोकांची सेवा करावयाची होती. त्यासाठी वेळ हवा होता. *पोयबावडीच्या नाक्यावरच्या ४८ व ५० नंबरच्या खोलीत मी कण्याचा भात आणि कण्याची भाकरी खाल्ली. पण समाज सेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही. मार्ग निघाला. लोकांनी थैली स्वीकारून घरं बांधली. माझ्या माहितीच्या एका पुढाऱ्याने म्हणे ४७ हजाराच्या प्रॉमिसरी नोटा लिहून दिल्या होत्या आणि लोकांनी जेव्हा लाखभर रुपयांची थैली अर्पण केली तेव्हा ते फेडले. मला तसे करायचे नाही. मी माझे स्वत चे पोट स्वतःच भरून जी काही सेवा करायची ती केली. नोकरी मला करायची नव्हतीच. कोणीही गव्हर्नर जनरल येवो त्याच्याशी माझी मैत्री असे. परंतु मी कोणाजवळहीं याचना कैली नाही की मला अमुक बनवा किंवा मला ही जागा द्या. हो, दुसऱ्यासाठी मी काही केल असेल पण स्वतःसाठी एक बोट भर चिट्टी लिहिल्याचं कोणीही दाखवून द्यावं. एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर व्हाव ही मात्र माझी दांडगी इच्छा होती: ती पुरी झाली. आता मला ना पेन्सन, ना पगार, ना प्राव्हिडंड फंड ! काही नाही. एकदा इंग्रजांच्या राज्यात कौन्सिलरशिप पत्करली. एकदा काँग्रेसच्या राज्यात पण तेथेही कॉंग्रेसशी माझा खटका उडाला मला जज्ज होता आल असतं. पण अडकून घेऊन करणार काय ? तेव्हा माझा हेच की. दीनता असू नये. मी काही तरी आहे असं मानलं पाहिजे. मी परमेश्वराला देखील कमी मानतो इतका माझा स्वाभिमान तळपता आहे.*_

_आणि *माझं तिसरं दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलं, असं मला आठवत नाही. याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. मी विलायतेला अनेक वेळा गेलो. पण अजून दारू प्यालो नाही, विडी प्यालो नाही. मला कसलं व्यसन नाही पुस्तक आणि कपडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत. शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे मला सांगायला फार अभिमान वाटतो.*_

_अशाप्रकारे माझे तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतं आहेत. यांचा मी बनलेला आहे. या पदाला मी पोहोचलो हे त्यांच्याच शक्तिमुळे होय. मी मात्र केवळ कारण आहे. त्यांचा मी बनलेला एक पुतळा आहे. तेव्हा यांचं अनुकरण करा. तुम्ही माझा समारंभ कैलात तो व्यक्ती करिता केला नसून या तीन दैवतांचा आदर्श म्हणून त्यांचा कृतार्थ होण्यासाठी केलात अस म्हणून मी ही थैली स्वीकारीत आहे._

(_टीप :- बाबासाहेबांचे तीन गुरु "बुद्ध-कबीर-ज्योतिबा फुले" यांची माहिती सर्वांना आहे त्यामुळे त्याबद्दल लिहिलेले नाही आहे._)

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_8.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...