Monday, 13 November 2023

कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बौद्धजन पंचायत समितीचे शिल्पकार_* 

*_अस्पृश्य समाजातील पहिले दादासाहेब_* 

*_कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*समाजक्रांतीचे अपत्य - बोद्धजन पंचायत समिती, लेखक - वि. ल. मोहिते* लिखित पुस्तक वाचण्यात आले आणि इतिहासातील कोकणात काही सुवर्ण कामगिरी करणारे महानायकांचा खजिना हाती लागला. *आजच्या पिढीला आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामगिरीची माहिती व्हावी म्हणून ह्या पुस्तकात ह्या महानायकांचा परिचय सोबत बौद्धजन पंचायत समितीची इत्यंभूत माहिती लेखकाने प्रचंड मेहनतीने आणि अभ्यासपूर्वक दिली आहे त्याबाबत लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व अनंत मङ्गल मैत्री.* कोकणांत काम करणाऱ्या कार्यकर्त्याने वाचावे असे हे पुस्तक त्यातीलच एका महानायक :-_

*_कोकण प्रांतातील अस्पृश्य वर्गाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य समाजसुधारक गोपाळबाबा वलंगकर यांच्या परंपरेतील समाजसुधारक कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड यांचे मूळ गांव रायगड जिल्हा, रोहा तालुक्यातील पौड गांव (पहुर) असून त्यांचे वास्तव्य सातरस्ता, बी. आय. टी. चाळ, मुंबई येथील होते._*

_श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांनी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा विरुद्ध फार मोठी चळवळ केली व नवमतवादी, पुरोगामी विचारसरणीचा जोरदार प्रचार केला. *ज्या काळात अस्पृश्यवर्गाला शिक्षणाची कवाडे बंद होती, त्या काळात त्यांनी पुरुषांसहीत स्त्रीशिक्षणाचा प्रभावी प्रचार केला आणि कांही मुलींच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहाय्य केले. त्याचे फलीत म्हणजे त्या मुलींपैकी मुक्ताबाई सातांबकर, देवकाबाई सातांबकर, शांताबाई वडवलकर व अन्य मुली पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेत “शिक्षिका" म्हणून नोकरीस लागल्या, समाजकार्यात भाग घेऊ लागल्या.* अस्पृश्य वर्गाला स्वहक्क आणि स्वाभिमानाची जाणीव करुन देण्याबरोबरच दारुबंदी विषयी समाजात जनजागृती केली._

_*हिंदु धर्माने बहिष्कृत वर्गावर लादलेल्या गुलामगिरीविरुद्ध अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांनी त्यांचे सुपुत्र श्री. भिकाजी संभाजी गायकवाड यांच्या पुढाकाराने तरुणांना संघटीत करुन मुंबईत -महार समाज सेवा संघ" या नावाची संघटना दिनांक १० ऑगस्ट १९२६ रोजी स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १९ व २० मार्च  १९२७ रोजी कुलाबा जिल्हा बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद झाली, त्या ऐतिहासिक परिषदेचे सारथ्य महार समाज सेवा संघाने केले. आणि या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बासाहेब आंबेडकर व स्वागताध्यक्ष श्री. संभाजी तुकाराम गायकवाड होते. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री. अनंतराव तथा भाई चित्रे, सु. गो. तथा नानासाहेब टिपणीस आणि महाड येथील कायस्थ तरुणांच्या सक्रीय सहकार्याने परिषद यशस्वी करुन दाखविलीच,* शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिकरित्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करुन आपले मानवी हक्क प्रस्थापित करण्याचा पराक्रम गाजविला. *महाड परिषदेनंतर अस्पृश्य वर्गाने हिंदू धर्मातील चालीरीती, रुढी, परंपरा, गावकामे नाकारल्यामुळे ज्यांच्या जन्मजात श्रेष्ठत्वाला धक्का बसला त्या स्पृश्य वर्गाने कोकणातील सर्वच खेड्यात अस्पृश्य वर्गावर अन्याय अत्याचाराचे सत्र सुरु केले. त्यावेळी श्री संभाजी गायकवाड व महार समाज सेवा संघाच्या सहकाऱ्यांनी अस्पृश्यांना धीर देऊन मदत मिळवून देण्याचे कार्य केले. अन्यायग्रस्तांना धीर देऊन मदत मिळवून देण्याचे कार्य केले. त्यासाठी संघाने "कोकण संरक्षक फंड” सुरु केला.*_

_डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील कोकण प्रांतात खोती विरोधात झालेल्या शेतकरी वर्गीय आंदोलनात श्री संभाजी तुकाराम गायकवाड यांनी सक्रीय सहभाग घेतला._

_सिंध प्रांत खेरीज करुन मुंबई इलाक्यातील दलीत वर्ग व रानटी जाती यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्थितीचा विचार करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या *स्टार्ट कमिशनपुढे कोकण विभागातील अस्पृश्य वर्गातर्फे श्री. संभाजी तुकाराम गायकवाड, चांगदेव नारायण मोहिते, शिवराम गोपाळ जाधव, गोविंद रामजी आडरेकर, तानाजी महादेव गुडेकर यांनी साक्ष दिली.*_

_*ब्रिटीश सरकारने माहे नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे आयोजित केलेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सकरिता हिंदी बहिष्कृत वर्गाचा प्रतिनिधी म्हणून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केले. त्याप्रित्यर्थ महार समाज सेवा संघाने श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली “डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्स फंड' कमिटीची स्थापना केली. या कमिटीकडे जमा झालेली रक्कम रुपये १५००/- दिनांक २ आक्टोबर १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानपत्र समारंभ कार्यक्रमात त्यांना अर्पण करण्यात आली.*_

*_डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सन १९४१ साली विभागा- विभागातील जात पंचायतीना संघटीत करुन "महार ज्ञाती पंचायत समिती” (आताची बौद्धजन पंचायत समिती) या मध्यवर्ती संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था स्थापन करणाऱ्या कार्यकर्त्यांत श्री. संभाजी तुकाराम गायकवाड अग्रभागी होते._*

_*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २० जुलै १९२४ रोजी स्थापन केलेल्या "बहिष्कृत हितकारिणी सभेचे उपाध्यक्ष, धर्मांतर घोषणेस पाठींबा देण्यास दिनांक ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई येथे भरलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेचे उपाध्यक्ष" पदावर राहून श्री. गायकवाड यांनी कार्य केले. काळाराम मंदिर सत्याग्रहात त्यांनी सक्रीय भाग घेतला.* महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकण प्रांतात जेथे परिषदांसाठी डॉ. बाबासाहेब गेले, तेथे त्यांच्या समवेत श्री. गायकवाड गेले नाहीत असे क्वचितच घडले आहे, इतके ते बाबासाहेबांच्या कार्याशी एकरुप झाले होते._

*_श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या सर्वव्यापी अमोल कामगिरीमुळेचे डॉ. बाबासाहेबांनी ‘“दादासाहेब” ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. अस्पृश्य समाजातील पहिले दादासाहेब म्हणजेच संभाजी तुकाराम गायकवाड होय.. त्यानंतरचे दुसरे ‘“दादासाहेब ” श्री भाऊराम कृ. गायकवाड होत._*

_*दलीत मुक्ती संग्राम चळवळीतील एक बिनीचे शिलेदार म्हणून "अखिल मुंबई निवासी अस्पृश्य वर्गातर्फे” सन १९३७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांना थैली व मानपत्र अर्पण करुन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

*_टीप :- ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी बोद्धजन पंचायत समिती, भोईवाडा, परेल येथील कार्यालयाशी, तसेच संपर्क करावा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १४/११/२०२३_*

*_संदर्भ :-_*

*_समाजक्रांतीचे अपत्य बोद्धजन पंचायत समिती लेखक - वि. ल. मोहिते_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_13.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...