🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_कठिण चीवराचे नियम (श्रावस्ती)_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_त्यावेळी *भगवान श्रावस्तीला अनाथपिण्डिकाच्या जेतवनारामात विहार करीत होते. त्यावेळी पाठेय्यक (पाठाचे राहणारे- कोसल देशाच्या पश्चिमेस एक राष्ट्र होते) तीस भिक्खू जे सगळेच अरण्यवासी, भिक्षान्त्रभोजी, फेकलेल्या चिंध्याचे चीवर वापरणारे आणि तीनच चीवर धारण करणारे होते.* भगवंताच्या दर्शनासाठी श्रावस्तीला जात असता *वर्षोपनायिका (आषाढ पौर्णिमा) जवळ असल्यामुळे वर्षोपनायिकासाठी श्रावस्तीला पोहचू शकले नाही. त्यांनी वाटेत साकेत (अयोध्या) मध्येच वर्षावास केला.* श्रावस्तीला जाण्याची मनात उत्कंठा ठेवूनच त्या ठिकाणी वर्षावास केला. कारण श्रावस्ती तेथून सहा योजनच लाब होते. तरी मनात भगवंताची दर्शनाभिलाषा पूर्ण असल्याने त्यांनी वर्षावास समाप्त झाल्याबरोबर प्रवारणा झाल्यावर लगेच श्रावस्तीला निघाले. पण रस्त्यात पावसाने भिजत आणि चिखल तुडवित भिजलेल्या चीवरानिशी ते भगवान जेथे होते तेथे पोहचले आणि भगवंताला अभिवादन करून एकीकडे बसले._
_*बुद्धांचे नियम आहेत की, नवागन्तुक भिक्षुला कुशल समाचार विचारणे* तेव्हा तथागतांनी त्यांना म्हटले- “भिक्खूंनो ! वर्षावास चांगला झाला नं ? यापन करण्यासारखा झाला नं ? एकमताने, प्रेमाने, विवादरहित, चांगल्याप्रकारे वर्षावास तर झाला नं ? भोजनासाठी काही त्रास तर झाला नाही नं ?"_
_"भगवान ! आम्ही पाठेय्यक (पाठाचे राहणारे) तीस भिक्खू आहोत. रस्त्याने भिजतच आलोत." तेव्हा *भगवंतांनी ह्याचसंबंधी धार्मिक कथा सांगून भिक्खूंना सांगितले, “भिक्खूंनो ! मी तुम्हाला अनुमती देतो. वर्षावास केलेल्या भिक्खूंना कठिण चीवर देण्याची."*_
*_(वर्षावासाच्या समाप्तीवर सगळ्या संघाच्या सम्मतीने प्रदर्शनासाठी एखाद्या भिक्खूला चीवर दिल्या जाते त्याला 'कठिण' चीवर म्हणतात.)_*
*_कठिणाच्या भिक्खूंसाठी विधान_*
_“कठिण चीवर घेतल्यावर भिक्खूंनो ! तुम्हाला पाच गोष्टी करणीय आहेत."_
*(१) “आमंत्रणाशिवाय विचरणे,*
*(२) तीन चीवरांना घेतल्याशिवाय विचरण करणे,*
*(३) गणाबरोबर भोजन करणे,*
*(४) इच्छानुसार चीवर घेणे,*
"(५) जे चीवर देताना तिथे जे मिळाले तेच त्याचे असणार."
_कठिणासाठी एकत्रित झाल्यावर भिक्खूंनो ! ह्या पाच गोष्टी तुम्ही पाळाव्या."_
_*“आणि भिक्खूंनो ! कठिणासाठी अशाप्रकारे ठराव (सम्मंत्रण) करायला पाहिजे. हुशार आणि समर्थ भिक्खू संघाला सूचित करायला पाहिजे."*_
_*(क) ज्ञप्ति :-* “भन्ते । संघ माझे ऐकून घेईल. संघास सहा कठिणासाठी कापड मिळाले आहे. जर संघ योग्य समजत असेल तर हया कठिणाच्या कपड्याला (चीवराला) या नावाच्या भिक्खूला घालण्यासाठी (वापरण्यासाठी) देईल अशी सूचना आहे."_
_*(ख) अनुश्रवण :-* “भन्ते ! संघ माझे ऐकून घेण्याची कृपा करील, संघास कठिणासाठी हे चीवर मिळाले आहे. ह्या चीवराला अमूक नावाच्या भिक्खूला वापरण्यासाठी देणे मंजूर असेल तर ते चूप राहतील. मंजूर नसेल ते बोलतील. दुसऱ्यांदा पण तिसऱ्यांदा पण.”_
_*(ग) धारणा :-*"संघाने हया कठिण चीवरास अमूक नावाच्या भिक्षुला वापरण्यासाठी दिले. ते संघाला मान्य आहे. म्हणूनच आपण सगळे चूप आहात. असे मी ह्याला समजतो."_
*_कठिण चीवराची उत्पत्ती_*
*_"भिक्खूनो ! कठिण कसे उत्पन्न होते ? भिक्खूनो! कठिणाच्या उत्पत्तीत ह्या ७ मातृका (उत्पादिका) आहेत. (१) पक्कनान्तिका (प्रक्रमणान्तिका), (२) निट्ठानान्तिका (निष्ठानान्तिका), (३) सन्निट्ठानान्तिका (सन्त्रिष्ठानान्तिका), (४) नासनान्तिका, (५) श्रवनांतिका, (६) सीमात्तिक्कन्तिका, (७) आसावच्छेदिका_*
_(१) “भिक्खूनो ! कठिण आस्थत (प्रसारित) झाल्यावर तो भिक्खू निघून जातो, पुन्हा येत नाही. अशा भिक्खुमुळे 'पक्कनान्तिका' (जाणेच त्याचे अंत आहे) नामक कठिनाची उत्पत्ती झाली (उद्धार)._
_(२) ज्या भिक्षुला कठिण वितरण केले आणि तो ते घेऊन निघून गेला. परंतु सीमेच्या बाहेर गेल्यावर त्याला वाटते, मी असेच चीवर बनवून नंतर वापस येणार नाही, अशा भिक्खूमुळे 'निट्ठानान्तिका' (बनविणे ज्याचा अंत आहे) नामक कठिनाची उत्पत्ती झाली._
_(३) ज्या भिक्खुला कठिण वितरित केले, तो ते घेऊन निघून गेला. पण त्याच्या मनात वाटते की, मी आता हे चीवर बनविणार पण नाही आणि वापस येणार पण नाही. अशा भिक्खूमुळेच 'सन्त्रिट्ठानान्तिका' (कठिणाची) उत्पत्ती झाली._
_(४) ज्या भिक्खूला कठिण वितरित झाले आणि ते घेऊन तो सीमेच्या बाहेर गेला आणि त्याला वाटले की, मी ह्या कठिण चीवराला इथेच बनवून पुन्हा वापस येणार नाही आणि तो त्या कठिण चीवराला बनवितो आणि पुन्हा वापस येत नाही. अशा भिक्खूमुळेच 'नासनान्तिका' नावाच्या कठिणाची उत्पत्ती झाली._
_(५) ज्या भिक्खूला कठिण चीवर वितरित झाले. तो ते घेऊन सीमेच्या बाहेर गेला आणि त्याला वाटले की, मी हे कठिन चीवर बनवून घेऊन येईल. तसेच तो करतो. पण त्याला ऐकायला भेटते की, आवासात कठिण उत्पन्न झाले आहे. म्हणून अशा भिक्खुमुळेच 'श्रवनान्तिका' कठिणाची उत्पत्ती झाली._
_(६) ज्या भिक्खूला कठिण वितरण झाले, तो सीमेच्या बाहेर गेला आणि त्याने तसेच चीवर बनविले आणि त्याच्या मनात वाटले, "आता जाणार-आता जाणार" म्हणत म्हणत कठिणाची वेळ निघून जाते, अशा भिक्खूमुळेच 'सीमात्तिक्कन्तिका' (सीमेचे अतिक्रमण केल्यामुळे) नावाच्या कठिणाची उत्पत्ती झाली._
_(७) चीवरास घेऊन पुन्हा जाईल अशा विचारातच निघून जातो आणि सीमेच्या बाहेर त्या चीवराला बनवितो. ते सुगत चीवर बनविल्यावर "पुन्हा जाईन-पुन्हा जाईन" असा विचार करीत करीत कठिण उद्धाराची (उत्पत्तीची) वाट पाहतो. तेव्हा त्या भिक्षूचे दुसऱ्या भिक्षूबरोबर कठिण उद्धार होतो."_
*_कठिण चीवराचे विघ्न आणि अविघ्न_*
_कठिण चीवराची उत्पत्ती भिक्खू कधी कधी आशा न ठेवून करतो तर कधी कधी आशापूर्वक करतो. *कधी कधी तो करणीयपूर्वक करतो तर कधी अपविनयपूर्वक करतो आणि कधी कधी तो फासुविहार पञ्चक (सुखपूर्वक विहाराला) पूर्वक करतो.*_
_तसेच कठिण चीवराचे दोन विघ्न आहेत-_
*_(१) आवासाचे विघ्न म्हणजे -_*
_"भिक्षूनो ! एक भिक्खू त्या आवासात वास करतो किंवा पुन्हा वापस येईल अशी आशा करतो. ह्याला आवासाचे विघ्न म्हणतात."_
*_(२) चीवराचे विघ्न म्हणजे-_*
_"भिक्षूनो ! जेव्हा भिक्षूचे चीवर तयार नसते किंवा चांगले बनलेले नसते अथवा चीवराची आशा सोडलेली नसते, यालाच चीवर विघ्न म्हणतात."_
*_आता दोन कठिणाचे निर्विघ्न-_*
_(१) निर्विघ्न आवास,_
_(२) निर्विघ्न चीवर._
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
_*आपले मंगल साधावे ! आपले कल्याण साधावे ! आपली मुक्ती साधावी ! सर्वांचे मंगल होवो ! सर्वांचे कल्याण होवो !*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २२/११/२०२३_*
*_संदर्भ :-_*
*_१) विनय पिटक - महावग्ग- कठीण क्खन्धक_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/11/blog-post_22.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment